ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला.
या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी :
१. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच.
२. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे.
३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच.
माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात...
काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते.
त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते.
बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता.
केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते.
इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल.
मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला.
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत.
आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत.
परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वाचने
133846
वाचनखूण
प्रतिक्रिया
637
नोटंच्या ऐवजी स्टैंप
In reply to नोटंच्या ऐवजी स्टैंप by पहाटवारा
छान आयडीया आहे, पण
एकात्मिक भरणा पद्धती
- सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
- चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
- अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.In reply to एकात्मिक भरणा पद्धती by निनाद
चांगली माहिती,याचे नीट
In reply to चांगली माहिती,याचे नीट by संदीप डांगे
ग्रेट!
In reply to एकात्मिक भरणा पद्धती by निनाद
याबद्दल सविस्तर व योग्य
In reply to याबद्दल सविस्तर व योग्य by संदीप डांगे
पण अॅप
In reply to पण अॅप by निनाद
कोणतेही अॅप चालेल
सुरूवात तर नक्कीच चांगली आहे !!
In reply to सुरूवात तर नक्कीच चांगली आहे !! by बंड्याभाय
आधीचे पंतप्रधान म्हणजे...
In reply to सुरूवात तर नक्कीच चांगली आहे !! by बंड्याभाय
आधीचे पंतप्रधान उत्तम
भ्रष्टाचार कमी होईल का....
In reply to भ्रष्टाचार कमी होईल का.... by चौकटराजा
सहमत, करप्शन इज अ ह्युमन
In reply to भ्रष्टाचार कमी होईल का.... by चौकटराजा
आता गैर लोकाना नवे मार्ग
आता गैर लोकाना नवे मार्ग शोधावे लागतील.हे प्रश्न मानवी स्वभावामुळे निर्माण होत असल्याने, हा चोर-पोलिस खेळ मानवाच्या सुरुवातीपासून चालू असून मानवाच्याच्या अंतापर्यंत चालू राहील, यात संशय नाही.एक अवांतर दृष्टीकोन
In reply to एक अवांतर दृष्टीकोन by चौकटराजा
बघा तुम्ही
कपिलमुनी,
In reply to कपिलमुनी, by डँबिस००७
भाजप धार्जिणी म्हणजे सगळ्यात
बँकांसमोरच्या रांगा अजूनही
In reply to बँकांसमोरच्या रांगा अजूनही by डॉ सुहास म्हात्रे
टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध
In reply to टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
विडिओ पाहिला..पण संगीत काही
In reply to बँकांसमोरच्या रांगा अजूनही by डॉ सुहास म्हात्रे
शाईचं कळालं नाही. रोज ४५००
In reply to शाईचं कळालं नाही. रोज ४५०० by मराठी कथालेखक
बँक बंद झाल्यावर संध्याकाळी
In reply to बँक बंद झाल्यावर संध्याकाळी by संदीप डांगे
रंग नै बरं, रांग असेल रांग!
याला उपाय म्हणून आता सरकारने
In reply to याला उपाय म्हणून आता सरकारने by डँबिस००७
सरकारच्या दूरदर्शीपणाचा भक्कम
म्हात्रे सर, या कारवाईचे
In reply to म्हात्रे सर, या कारवाईचे by संदीप डांगे
आन्ना ...
In reply to आन्ना ... by चौकटराजा
चौरकाका, तुमचा प्रतिसाद सद्य
In reply to आन्ना ... by चौकटराजा
दुसऱ्या ठिकाणी लिहिलेला
In reply to म्हात्रे सर, या कारवाईचे by संदीप डांगे
हे सगळे आणि पाकिस्तानी
In reply to हे सगळे आणि पाकिस्तानी by डॉ सुहास म्हात्रे
खूप खूप धन्यवाद!
पुढील लक्ष्य कोणते ....
In reply to पुढील लक्ष्य कोणते .... by गामा पैलवान
याबाबतीत माझे काही अंदाज (ते
विरोधी पक्षांचे नेते केवळ
In reply to विरोधी पक्षांचे नेते केवळ by डॉ सुहास म्हात्रे
देवा विरोधी पक्षातील अश्या
In reply to विरोधी पक्षांचे नेते केवळ by डॉ सुहास म्हात्रे
सरबरीत झालाय तो...
In reply to विरोधी पक्षांचे नेते केवळ by डॉ सुहास म्हात्रे
गैरसोयीचे असल्याने यावर
In reply to गैरसोयीचे असल्याने यावर by मोदक
दुसर्यांचा विरोध हा "अंध
The question that still need
Backfire ?
In reply to Backfire ? by मोहन
बॅकफायर म्हणजे रद्दबातल नाही
डांगेजी - मी ही Backfire
In reply to डांगेजी - मी ही Backfire by मोहन
अशा लेखांना फाट्यावर मारायचं,
In reply to डांगेजी - मी ही Backfire by मोहन
या निर्णयाने ज्यांचे मोठे
In reply to या निर्णयाने ज्यांचे मोठे by डॉ सुहास म्हात्रे
कारवाईच्या विरुद्ध असलेली
कारवाईच्या विरुद्ध असलेली मतेही (काही अतिउत्साही राजकारणी सोडले तर) अगदी लॉजिकल वाटावी अशीच मांडली जाणार.वरचे अखिलेश यादव यांचे "काळा पैसा अर्थव्यवस्थेला उपयोगी असते" हा दावा एक मूर्खपणा नसून नेत्याच्या शब्दांवर डोळे मिटून विश्वास ठेवणार्या भारतातल्या असंख्य अंधभक्तांना आपल्या बाजूला वळविण्याचा किंवा त्यातला खोटेपणा ओळखूनही स्वार्थी हितसंबंधासाठी त्या दाव्याची भलावण करून आपली रोटी भाजणार्या लोकांना दिलेला दिलासा आहे. जेव्हा केजरीवाल किंवा राहूल गांधी "कोठे आहेत करोडपती बँकेच्या रांगात?" असे विचारतात तेव्हा फारसा विचार न करणार्या सर्वसाधारण माणसाचा "अरे खरंच, ते लोक का नाही उभे माझ्याबरोबर उभे?" असा विचार करण्याइतका बुद्धीभेद होतो. जरा विचार केल्यावर हे ध्यानात येते की, (अ) ज्यांना खर्या व्यवहारांसाठीसुद्धा बँकेत जावे लागत नाही असे कोट्याधिश आता तेथे जावून १, ५, १०, १०० कोटी बॅगेत (किंवा टेंपोमध्ये) घेऊन बँकेत जातील व सरकारच्या जाळ्यात अडकण्याचा मूर्खपणा करतील का?"; (आ) "असे केले तरी त्यांचे त्याच्या कोट्यावधी काळ्या पैशातले कितीसे पैसे सुरक्षितपणे पांढरे होतील?"; (इ) "काळे पैसे लपवायला इतर सुरक्षित मार्ग शोधणे किंवा 'बिझनेस लॉस' समजून काळे पैसे नष्ट करणे/कचर्यात टाकून देणे व स्वतः सुरक्षित रहाणे (पक्षी : सीर सलामत तो पगडी पचास न्याय) त्यांच्या करिता जास्त चांगले असणार नाही का?" या प्रश्नांची खरी उत्तरे वरची विधाने करणार्या राजकारण्यांना माहित नसतील इतके ते निर्बुद्ध निश्चितच नाहीत. त्याउलट, लोकांचा बुद्धीभेद करून आणि त्यांना उल्लू बनवून त्यांच्यावर राज्य करणे हा तर त्यांच्या डाव्या हाताचा मळ आणि जीवनभरचा व्यवसाय असतो, नाही का ? :)सहमत
backfire ची शक्यता आहेच
In reply to backfire ची शक्यता आहेच by मराठी कथालेखक
ज्याची जळते त्यालाच कळते!!
In reply to backfire ची शक्यता आहेच by मराठी कथालेखक
अनंत अडचणी आहेत
In reply to अनंत अडचणी आहेत by ट्रेड मार्क
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी
In reply to भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी by मराठी कथालेखक
ही सर्वसाधारण रूपरेखा आहे
पोलीस वाहनांमधून नेल्या
In reply to पोलीस वाहनांमधून नेल्या by संदीप डांगे
जुन्या नोटांची शासनमान्यता रद्द
In reply to जुन्या नोटांची शासनमान्यता रद्द by गामा पैलवान
म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही
In reply to म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही by संदीप डांगे
काहीही हं संदीप....!
In reply to काहीही हं संदीप....! by गामा पैलवान
अहो बँकेत रोजंदारीवर मजूर
In reply to अहो बँकेत रोजंदारीवर मजूर by संदीप डांगे
त्याला आता चाप बसेल.
In reply to अहो बँकेत रोजंदारीवर मजूर by संदीप डांगे
असा "मजूर" एका बँकेतल्या एका
In reply to असा "मजूर" एका बँकेतल्या एका by डॉ सुहास म्हात्रे
शाई वापरण्याचा मुद्दा
In reply to शाई वापरण्याचा मुद्दा by डॉ सुहास म्हात्रे
नुसते शाईचा ठिपका हातावर
In reply to नुसते शाईचा ठिपका हातावर by डॉ सुहास म्हात्रे
एटीएमपुढच्या रांगा उद्यापासून
In reply to नुसते शाईचा ठिपका हातावर by डॉ सुहास म्हात्रे
आपण दिलेल्या बातमीत खालील
In reply to आपण दिलेल्या बातमीत खालील by संदीप डांगे
याची अपरिहार्यता आणि कारणे
In reply to याची अपरिहार्यता आणि कारणे by डॉ सुहास म्हात्रे
मला काहीच म्हणायचे नव्हते,
In reply to मला काहीच म्हणायचे नव्हते, by संदीप डांगे
"सत्तर वर्षांची घाण" या
In reply to आपण दिलेल्या बातमीत खालील by संदीप डांगे
People faced inconvenience in
People faced inconvenience in purchasing milk, vegetables, medicines as they did not have adequate small currency notes. At various hospitals across the country, patients and their family members are facing inconvenience in buying medicines, food and availing transportation.आजच्या या बातमीवरून यातला निम्मा तरी त्रास पैसे बदलायला आलेल्या "मजूरांमुळे" होता असेच दिसत नाही काय ? पहिल्या दिवसापासून हाताला शाई लावायची असे मूळ योजनेत होते. पण तसे काही व्यावहारीक समस्या* आल्या असत्या म्हणून ते केल्याचे ताळले असे वित्तसचिवांनी राष्ट्रीय वाहिनीवर सांगितले आहे. * व्यावहारीक समस्या : असे केल्याने विरोधकांनी पहिल्या दिवसापासून "अरे बघा, बघा, हे सरकार आम आदमीवर किती अविश्वास दाखवत आहे पहा !" अशी कोल्हेकुई सुरू करून त्याचे राजकिय भांडवल केले असते.A bulk of daily labourers were rendered jobless as construction and other activities came to a standstill in the wake of cement, sand and other supplies not coming in.त्यांना त्यांच्या रोजच्या कामाची मजूरी मिळाली नसली तरी त्यापेक्षा जास्त मजूरीची लालूच असल्याशिवाय ते रोजचे काम सोडून रांगात उभे राहतील काय ? ++++++++++++++++ एका बाजूला स्वतःच काळाबाजार्यांनी पैसे बदलायला मजूर लावले आहेत असे म्हणायचे आणि त्या रांगेत उभे असलेल्या सर्व (मजूर + सज्जन) लोकांबद्दल गळा काढाताना हा मुद्दा विसरायचा. एकूण काय, भ्र्ष्टाचारविरुद्ध एक चांगले पाऊल उचललेल्या सरकारला ते आपल्या आवडीच्या पक्षाचे नाही म्हणून डोळे मिटून झोडपायचे ! चूकीला चूक आणी बरोबरला बरोबर म्हणण्याव्यतिरिक्त इतर काही मला कधीच जमले नाही. चूकीला चूक आणि बरोबरलाही चूक म्हणायला इतर बरेच काही लागते, त्याची आमच्याकडे वानवा आहे :)In reply to People faced inconvenience in by डॉ सुहास म्हात्रे
आपल्या प्रतिसादाची नोंद घेतली
In reply to People faced inconvenience in by डॉ सुहास म्हात्रे
ह्या लोकांना स्वतःच्या
In reply to ह्या लोकांना स्वतःच्या by मार्मिक गोडसे
सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी
In reply to सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी by डॉ सुहास म्हात्रे
सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी
In reply to सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी by मार्मिक गोडसे
+11
In reply to +11 by अमितदादा
सहमत
In reply to सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी by मार्मिक गोडसे
+१
In reply to सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी by मार्मिक गोडसे
एखाद्या भौगोलिक विभागातले
एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतातसाहेब, आपण जो दुवा पुरावा म्हणून तुमच्या प्रतिसादात दिला आहे तो वाचला असतात तर या वाक्याला अर्थ नाही असे म्हटले नसतेत. ही माहिती तुम्ही दिलेल्या दुव्यातल्या बातमीतूनच घेतली आहे !!!!!!!!!!!!! आता, (अ) प्रथम तुमचा दुवा वाचून आणि (आ) माझा प्रतिसाद वाचून मग (इ) तुमचा वरचा प्रतिसाद वाचलात तर मला इतरही जास्त काही सांगण्यासारखे उरणार नाही ! :) ;)In reply to एखाद्या भौगोलिक विभागातले by डॉ सुहास म्हात्रे
सर्व शेतकर्यांचे जि,म. बँकेत
In reply to सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी by मार्मिक गोडसे
ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण
ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण करूनही व्यवहार करता येतील.या बँकांबद्दल तुम्हाला बरीच माहिती असावी असे लिखाणावरून दिसते. तेव्हा, आरबीआय ह्या बँकांच्या मागे लागूनही वर्षानुवर्षे हे केवायसीचे साधे सोपे काम का पूर्ण होत नाही, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगले माहित असणारच ! :) बँकांनी वर्षानुवर्षे टाळलेले हे काम आता त्यांच्याच हस्ते, घिसाडघाईत काम केल्याने ते जास्त वेळखाऊ, अपूर्ण, चुकीचे आणि गैरव्यहारांसाठी सुलभ होऊ शकेल हे सांगायला नकोच. मग त्यामुळे पैशांचे किंवा इतर गैरव्यवहार झाले की, पूर्वी चालढकल करणारे लोकच, भारतिय सरकार आणि आरबीआयला दोष द्यायला सर्वात पुढे असणार, नाही का ?!In reply to ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण by डॉ सुहास म्हात्रे
पूर्वी चालढकल करणारे लोकच,
In reply to पूर्वी चालढकल करणारे लोकच, by मार्मिक गोडसे
सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने
सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती.हे लिहायला सोपे आहे. पण... १. कठोर निर्णय !? शेतकर्याच्या फायद्याच्या कारणाने कठोर निर्णय घेतला तरी त्याचा विपर्यास करून शेतकर्यांच्या आडून गदारोळ करणार्यांना नेत्यांना आयतेच अजून एक कारण मिळाले असते. हे राजकारण भारताला नवीन नाही. आरबीआयने वारंवार नोटीसा पाठवूनही राजकिय दबाव वापरून ज्या कारणासाठी (जे सामान्य शेतकर्यांच्या फायद्याचे नाही) केवायसी केली जात नव्हती, ते कारण कायमच होते/आहे ना ? २. याशिवाय अजून जास्त महत्वाचे कारण : "आताच कठोर कारवाई का ?" असा प्रश्न पडून "चलाख" मंडळींनी यामागे काय कारण आहे याचा जोरदार तपास चालू केला असता आणि कारवाईची गुप्तता धोक्यात आली असती. गुप्तता तर या कारवाईचा प्राण होता. म्हणुनच तर सर्व विरोधकांचा रोख असाच आहे की, "कारवाई गुप्त का ठेवली ? पूर्वीच्या कारवायांप्रमाणे तिच्याबाबत अगोदर प्रसिद्धी करून मग सहाएक महिन्यांच्या मुदतीत ती लागू करायला हवी होती (पक्षी : आम्हाला काळ्याचे पांढरे करायला पळवाट ठेवायला हवी होती) ! :) दोन्ही बाजूंनी विचार केला तर बरेच ध्यानात येईल. जिल्हा बँकतून वर्षानुवर्षे मुद्दामहून ठरवून कामचुकारी केली गेली त्यामागे स्वार्थी हितसंबंध नव्हते, केवळ एक सामान्य आळस होता आणि केवळ सरकारचीच चूक आहे असे ठरवले असल्यास, कितीही समजावले तरी पटणार नाही. तेव्हा, या मुद्द्याला इथेच रामराम करूया ! :)In reply to सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने by डॉ सुहास म्हात्रे
शेतकर्याच्या फायद्याच्या
In reply to शेतकर्याच्या फायद्याच्या by मार्मिक गोडसे
तो निर्णय कठोरपणे का राबवता
In reply to तो निर्णय कठोरपणे का राबवता by डॉ सुहास म्हात्रे
ठिक आहे, ६ महिन्यांपूर्वी
In reply to काहीही हं संदीप....! by गामा पैलवान
त्यानुसार जुन्या नोटा हे
In reply to त्यानुसार जुन्या नोटा हे by सचु कुळकर्णी
+१
In reply to म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही by संदीप डांगे
ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी
In reply to ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी by मृत्युन्जय
ओके!
In reply to ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी by मृत्युन्जय
आता
In reply to आता by डॉ सुहास म्हात्रे
अश्या नोटीसा आतापर्यंत दशहजार
विधीबाह्य चलन
In reply to विधीबाह्य चलन by गामा पैलवान
बरोबर
गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील.== पण फक्त तीस डिसेंबर पर्यंत! (बॅंकेत जुन्या नोटा भरायची मुदतवाढ मिळाली नाहितर)In reply to बरोबर by प्रसाद_१९८२
बँकेत भरायच्या नाहीत.
In reply to विधीबाह्य चलन by गामा पैलवान
गावातल्या गावात खापराच्या
गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील.रद्द नोटांचा तसा उपयोगही बेकायदेशीर आहे =)) त्या नोटांचे तुकडे करून आरबीआय त्यांच्या विटा बनवते असे एका वाहिनीवर पाहिले आहे. त्या विटांची बांधकामात वापरण्यासाठी विक्री होते काय हे शोधून काढले पाहिजे :)बँकांना सर्व...
वार्ताहर आणि नागरीक
(अ) हाताला शाई लावणे
In reply to (अ) हाताला शाई लावणे by डॉ सुहास म्हात्रे
आज बँका बाहेर तुरळक गर्दी
In reply to आज बँका बाहेर तुरळक गर्दी by jp_pankaj
धन्यवाद !
आजकी ताजा खबर...
In reply to आजकी ताजा खबर... by डॉ सुहास म्हात्रे
सहावा मुद्दा
In reply to सहावा मुद्दा by ट्रेड मार्क
बातमी तर तशीच आहे !
In reply to बातमी तर तशीच आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
विरोधी पक्षाने आज लोकसभेत
In reply to विरोधी पक्षाने आज लोकसभेत by डॉ सुहास म्हात्रे
जनतेच कौल
फक्त जिल्हा बँकेवर बंदी आहे
In reply to फक्त जिल्हा बँकेवर बंदी आहे by धनावडे
फक्त जिल्हा बँकेवरच. जमा
In reply to फक्त जिल्हा बँकेवरच. जमा by मार्मिक गोडसे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी
The greed of Indians for
The greed of Indians for
शेतकरी व इतरांसाठी अनेक सवलती...
In reply to शेतकरी व इतरांसाठी अनेक सवलती... by डॉ सुहास म्हात्रे
सरकारी स्तरावर
In reply to सरकारी स्तरावर by निनाद
बर्याच सरकारी खात्यांत बरीच
दहशतवद्याकडे दोन हजारांच्या
जन धन खात्यात 21 हजार कोटी!!
In reply to जन धन खात्यात 21 हजार कोटी!! by नावातकायआहे
पाचशे व हजारच्या नोटा बंद
पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर जन धन बॅंक खात्यांमधील भरण्यात मोठी वाढ होऊन ती 21 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. यात पश्चिम बंगालचा प्रथम क्रमाक असून, कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.या प्रकारात पश्चिम बंगाल प्रथम क्रमांकावर आहे आणि ममता बॅनर्जी नोटा रद्द कारवाई मागे घ्या यासाठी हट्ट करत आहेत; यांचा काही संबंध असावा काय ? कालच्या टाईम्स नाऊच्या न्यूजअवरमध्ये गरीब जनतेला होणार्या त्रासासाठी नक्राश्रू ढाळणार्या तृणमूलच्या डेरेक ओब्रायनला जेव्हा, शारदा स्कॅमबद्दल (जिच्यात काही लाख गरीब लोकांचे पैसे बुडाले होते) काय कारवाई केली असा प्रश्न विचारला गेला तेव्हा, त्याचा चेहरा आणि प्रतिक्रिया बघण्याजोगी होती.ल्येटेश्ट आणभाव ..
In reply to ल्येटेश्ट आणभाव .. by चौकटराजा
आणखी काही
गुजरातमधल्या एका कॅशलेस
आणखी एक मृत्यू :-(
आता म्हणे घरांच्या किमती खाली
In reply to आता म्हणे घरांच्या किमती खाली by स न वि वि
गेल्या पंधरा दिवसातल्या
In reply to गेल्या पंधरा दिवसातल्या by संदीप डांगे
" कारण इथे ब्लॅक मनी चे
In reply to " कारण इथे ब्लॅक मनी चे by निओ१
याचा अर्थ असा होतो की
ही मुलाखत छान आहे.
In reply to ही मुलाखत छान आहे. by अनुप ढेरे
मुलाखत भारी आहे. गुरुमुर्ती
In reply to मुलाखत भारी आहे. गुरुमुर्ती by पुंबा
उजव्या वर्तुळातील अतिशय कमी
In reply to ही मुलाखत छान आहे. by अनुप ढेरे
त्यांचं भाषण प्रत्यक्ष ऐकायला
बँकेत जमा झालेल्या ठेवींवर
In reply to बँकेत जमा झालेल्या ठेवींवर by पुंबा
२.५ लाखापेक्षा जास्त जमा
नोटा रद्द करण्याच्या
बर्याच शहरात परिस्थीती
गुरुमुर्तीम्नी दिलेल्या
मी किनई लै शाना नोबेलवाला
व्यैयक्तिक अनुभव
हे खरे असेल तर मात्र प्रकरण
In reply to हे खरे असेल तर मात्र प्रकरण by जयंत कुलकर्णी
2000 हजाराची नोट येणार हे
Demonetisation will
आता फक्त हेच सांगायचे शिल्लक
पुढच्या पायर्या...
डॉ म्हात्रे
29 तारखेपासून खात्यातून रक्कम
In reply to 29 तारखेपासून खात्यातून रक्कम by संदीप डांगे
फक्त नवीन किंवा चालू
नोटाबंदी कारवाईचे अधिकाधिक परीणाम पुढे येत आहेत...
In reply to नोटाबंदी कारवाईचे अधिकाधिक परीणाम पुढे येत आहेत... by डॉ सुहास म्हात्रे
४. सशस्त्र सीमा बलाने
In reply to ४. सशस्त्र सीमा बलाने by डॉ सुहास म्हात्रे
BSF..?
In reply to BSF..? by मोदक
फरक आहे...
In reply to फरक आहे... by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद.. SSB बद्दल माहिती
In reply to फरक आहे... by डॉ सुहास म्हात्रे
माहिती
In reply to माहिती by निनाद
जरूर डकवा. तुम्हीच करा हे काम
In reply to जरूर डकवा. तुम्हीच करा हे काम by डॉ सुहास म्हात्रे
मात्र ते काम करताना "राज्य
बदल झाला