हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १
In reply to ठीक आहे..... by नाना स्कॉच
५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?एकांगी भूमिकांकडे निर्देश करण्यात वावगे नसावे तेव्हाच, कोणत्याही एका चुकीने दुसर्या चुकीचे समर्थन होत नाही हेही लक्षात घ्यावयास हवे. सामाजिक सौहार्द आणि सहिष्णू वातावरणासाठी वस्तुतः Truth and reconciliation commission सारखी व्यवस्थेची गरज मी माझ्या मागच्या एका धागा लेखातून मांडली आहे तीचा पुर्नौल्लेख करतो.
४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?सकारात्मक कृती अफर्मेटीव्ह अॅक्शनचा भाग म्हणून आरक्षणाचे तर्कसुसंगत समर्थ जिथपर्यंत होते तिथपर्यंत ठिकच अन्यथा हे काँग्रेसी लांगूलचालन ठरते पण मुख्य म्हणजे या मुद्द्याचा असहीष्णूतेच्या मुद्द्याशी खूप सरळ संबंध नाही. एखादी गोष्ट तर्कसुसंगत नाही म्हणून केली नाही अथवा थांबवली तरी त्यानेही कुणी असहीष्णू आहे असे ठरत नसावे. आणि लांगूलचालन अथवा लोकानुनय करणारे अधिक सहिष्णू असतात असेही नसावे.
२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?इथे तुम्ही हिंदूंच्या स्थितप्रज्ञतेच्या आदर्शांचा उल्लेख केलात तर सहिष्णूतेचे क्रेडीट तुम्हाला नक्कीच मिळते पण या दोन्ही वाक्यांचा निट तपासले तर संबंधीत तोंडसूखांना मुद्देवार अभ्यासपूर्ण खोडणे यातून पुढे येत नाही आम्हाला राग आलेला आहे पण आम्ही तो गिळून शांत आहोत अशी वाली भूमिका आहे. मुद्देसूद पणे खोडले की झाले मनात राग ठेऊन काय साध्य होते ? किमान पक्षी स्थितप्रज्ञतेच्या भूमिकेला धक्का पोहोचतो. मुख्य म्हणजे मानव हा स्खलनशील आहे, तुमचा-किंवा कोणताही धर्म कितीही केव्हा ग्रेट असो त्यातील एखादी व्यक्ती पथभ्रष्ट होणारच नाही उद्या अनंतमुर्ती अथवा ओवेसीवर राग आला म्हणून काही बाही करणारच नाही याची गॅरंटी देणेही अवघड होते पण एखादी व्यक्ती पथभ्रष्ट झाली तरीही सर्व हिंदू धर्मीय असहीष्णू आहेत असा निष्कर्ष कुणी काढणेही घाईचे असावे.
१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!अपवादावरुन नियम सिद्ध करण्याचे अट्टाहास नसतीलतर, तौलनिक दृष्ट्या ढोबळ मानाने हिंदू धर्मीय तत्वज्ञान आणि हिंदू धर्मीय अधिक सहिष्णू आहेत हे मान्यच. अर्थात त्याच वेळी एका चुकीने दुसर्या चुकीचे समर्थन होते असेही नसावे.
In reply to १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख by माहितगार
In reply to ... by hmangeshrao
In reply to ↓ by चेक आणि मेट
In reply to मोदी नव्हे पंतप्रधान म्हणाले by श्री गावसेना प्रमुख
In reply to ↓ by चेक आणि मेट
In reply to ↓ by चेक आणि मेट
In reply to . by hmangeshrao
In reply to आपल्या स्मित हस्यासाठी शुभेच्छा :) by माहितगार
In reply to . by hmangeshrao
In reply to आमचा खापरपणजोबा हिंदू राजे व by DEADPOOL
In reply to ... by hmangeshrao
In reply to आपणच अत्यंत ठळक अक्षरात by DEADPOOL
In reply to .. by hmangeshrao
In reply to अ आणि ब हे भारताचे नागरिक by DEADPOOL
In reply to आणि टेक्स खापरपणजोबा भरत होते by DEADPOOL
In reply to .. by hmangeshrao
In reply to .. by hmangeshrao
In reply to एक सजेशन आहे by इरसाल
In reply to इथे किती मिरच्या लावव्यात? ;) by DEADPOOL
In reply to लिंबू मिरच्या टांगा. धाग्याला by मितभाषी
In reply to धाग्याला दृष्ट लागलीच होती. ४ by उगा काहितरीच
In reply to धाग्याला दृष्ट लागलीच होती. ४ by उगा काहितरीच
In reply to लिंबू मिरच्या टांगा. धाग्याला by मितभाषी
In reply to टांगली असती, पण तुम्ही लगेच by DEADPOOL
In reply to बुध्दीभेद करून एकमेकात भांडणं by मितभाषी
In reply to इथे किती मिरच्या लावव्यात? ;) by DEADPOOL
In reply to एक सजेशन आहे by इरसाल

In reply to बरं आहे हेच अखलाक च्या बाबतीत by श्री गावसेना प्रमुख
In reply to सत्य बेमालूम कसे दाबावे by तर्राट जोकर
In reply to जरा आपण विदा देतात का? by DEADPOOL
In reply to जरा आपण विदा देतात का? by DEADPOOL
In reply to देडफूट साहेबांचे कच्चकून अभिनंदन. by मितभाषी
In reply to सहिष्णुता म्हणजे गांडुगिरि नव्हे by viraj thale
In reply to सहिष्णुता म्हणजे गांडुगिरि नव्हे by viraj thale
In reply to बरोबर. पण सहिष्णुतेची सेल्फ by तर्राट जोकर
In reply to इथे कोणालाही प्रमाणपत्रे नको by DEADPOOL
In reply to मग वरचे दहा प्रश्न मन की बात by तर्राट जोकर
In reply to मग वरचे दहा प्रश्न मन की बात by तर्राट जोकर
In reply to च्यामारी मंडळी लय तापलीत! by DEADPOOL
In reply to दाभोळकर, पानसरे यांच्या by मितभाषी
In reply to कश्मीरी पंडितांविषयी काय by DEADPOOL
In reply to आधी प्रश्न मी विचारला आहे. by मितभाषी
In reply to दाभोलकर व पान्सरे यांना by DEADPOOL
दाभोलकर व पान्सरे यांना हिन्दूत्ववाद्यानी मारले याचा काय पुरावाआहे!=)) =)) =)) ते पुढे बघु आपण. अजून ट्रेलरच चालू झालाय तुम्ही थेट क्लायमॅक्सलाच पोहोचले. हत्येबद्दल मत विचारले होते. सनातन्यांची भूमिका जाणून घ्यायची आहे.
In reply to दाभोलकर व पान्सरे यांना by मितभाषी
In reply to दाभोलकर व पान्सरे यांना by मितभाषी
In reply to आणि मी सनातनी नाही पण by DEADPOOL
In reply to चला किमान एक मान्य केले by मितभाषी
In reply to आमची भूमिका- by DEADPOOL
In reply to कारण त्यांचा हल्ला बुवाबाजी व by DEADPOOL
In reply to कश्मीरी पंडितविषयी आपल्या by DEADPOOL
In reply to फायनली by इरसाल
In reply to कश्मीरी पंडिताविषयी ही लिंक घ्या! by DEADPOOL
In reply to हा हा हा, by भंकस बाबा
In reply to पुरे आता ! by विटेकर
In reply to सहमत. ;) by तर्राट जोकर
In reply to आपली बाजू लंगडी पडते by DEADPOOL
In reply to हा हा. इतरांना वाट्टेल ती by तर्राट जोकर
In reply to पुरे आता ! by विटेकर
इतर धर्मियातील कट्टरवाद्यांचे लांगूलचालन केले की निवडणुकीत फायदा होतो. मते मिळतात. सत्ता मिळते. कट्टरवाद्यांच्या माध्यमातून व्होट बँक जोपासता येते.>> असे करुनच राज्यांमधे व केंद्रात भाजपा सत्तेत आली आहे काय?
उदारमतवादी, विचारवंत, निधर्मी, पुरोगामी, मानवतावादी असे प्रमाणपत्र मिळाले की माध्यमातून प्रतिष्ठा मिळते. जातीयवादी असा शिक्का मारून वाळीत टाकले जात नाही. हातून चुकीची गोष्ट घडून चव्हाट्यावर आली की हा जातीयवाद्यांचा, मनुवाद्यांचा कट आहे असा कांगावा करता येतो. कट्टर, धर्मांध, पुराणमतवादी, मनुवादी, अल्पसंख्याकविरोधी असे शिक्के मारून तुच्छतेने बघितले जात नाही. आचारविचारातील ढोंगावर पुरोगामित्वाचा लेप चढून ढोंग झाकले जाते.>> ह्याने काय फायदा होतो?
In reply to @गुरुजी, by तर्राट जोकर
>> असे करुनच राज्यांमधे व केंद्रात भाजपा सत्तेत आली आहे काय?आधीच्या प्रतिसादातील "इतर धर्मियातील" हे शब्द वाचलेले दिसत नाही.
>> ह्याने काय फायदा होतो?सगळे फायदेच प्रतिसादात दिले आहेत.
In reply to >> असे करुनच राज्यांमधे व by श्रीगुरुजी
In reply to इतर धर्मियातील म्हणजे? नीट by तर्राट जोकर
इतर धर्मियातील म्हणजे? नीट कळले नाही. जरा विस्तार कराल का?इतर धर्मियातले म्हणजे हिंदू धर्म वगळता इतर धर्मियातले.
तसेच वरचे फायदे कसे काय ते कळले नाही. ते तर तुमची मतं आहेत तेही सभ्य भाषेत मांडलेली पण त्यामागची तुच्छता लपत नाही. तुमची मतं नकोत, पुरोगाम्यांना नक्की काय फायदे होतात ते जीवंत उदाहरणांसकट स्पष्ट सांगा. तुम्ही दिलेली उदाहरणे जर खरी मानायची तर हे कारच्या मागे धावत जाणार्या श्वानांसारखे दिसते. तुम्हाला खरंच असे म्हणायचे आहे काय?इतक्या स्पष्ट शब्दात फायदे काय व कोणते आहेत ते लिहिले आहेत ते समजले नसावेत असं वाटतंय.
In reply to >> असे करुनच राज्यांमधे व by श्रीगुरुजी
In reply to मगर आणि माकडा च्या कथे by lakhu risbud
In reply to रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची by तर्राट जोकर
In reply to रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची by तर्राट जोकर
In reply to रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची by तर्राट जोकर
In reply to कार्यकारण भावाचा शोध न घेता by lakhu risbud
In reply to ... by lgodbole
In reply to त्या कोपऱ्यावरचे दगड सकाळी by DEADPOOL
In reply to ... by lgodbole
चारच लोक येतात म्हणुन भोंगा वाजवु नये , हा कुठला कायदा म्हणे ? कोपर्या कोपर्यात लाल शेंदरी दगड असतात , ते पुजायला चार लोकही नसतील तर चार लोकही नसतात , हे कारण दाखवुन ते हटवणे चालू शकेल का ?क्षमा असावी गोडबोले साहेब, आपली तुलना प्रथमदर्शनी तार्कीक उणीवेची आणि भूमिका किमान उपरोक्त प्रतिसादा पुरती लांगुलचालनाची दिसते. भोंगा वाजला त्या आवाज निर्मात्याची पार्श्वभूमी बाजूला ठेवा, १) मानवी कानाच्या, मेंदूच्या, आणि आवश्यक दैनंदीन जिवनाच्या सुसह्यतेत कोणतेही ध्वनी प्रदुषण येणे रास्त होत नाही मग तो भोंगा फॅक्टरीचा, असो अथवा धर्म स्थानाचा, किंवा एखाद्या मिरवणूकीने केलेले ध्वनी प्रदुषण समर्थनीय होत नाही. २) जो पर्यंत कायद्याची चौकट सांभाळली जाते तो पर्यंत तुमच्या चार भिंतीतून तुम्ही काय करत आहात याच्याशी इतरे जनांना देणे घेणे असण्याचे कारण नाही, इतरे जनांना त्रास न पोहोचवणारा चार भिंतीतील व्यवहार आणि आपल्याला दिलेल्या चार भिंतींच्या पलिकडे असलेल्या जनसमुदायावर नकारात्मक परिणाम करणारे कार्य यात फरक आहे.एक समांतर तुलना करु खत निर्मिती करणारा कारखाना दुसर्यांना इजा पोहोचवत नाही खताची निर्मिती चार भितींच्या आत करतो तो पर्यंत समस्या नाही. पण भोपाळ वायु दुर्घटनेत झाले तसे चार भिंतीच्या आतून विषारी वायू सोडेल आणि आजू बाजूच्या समुदायाला विषामध्ये गुरफटेल तर त्याचे समर्थन होत नाही. असो.
In reply to कार्यकारण भावाचा शोध न घेता by lakhu risbud
अहो हिंदू धर्माची चिकित्सा करा ना,चालीरीतीबद्दल प्रश्न सुद्धा विचारा. असे चिकित्सक विचार करणाऱ्यांना हिंदू समाजाने सुरवातीच्या विरोधानंतर त्या चिकित्सेची योग्यता ध्यानात आल्यावर शिरोधार्य सुद्धा मानले आहे. इस्लाम धर्मात अशी किती उदाहरणे आहेत ?>> हिंदूंनी चिकित्सा करणार्यांना शिरोधार्य मानले. ओके. पण त्यांना इस्लामचे समर्थक तर मानले नव्हते ना? जे आजकाल सर्रास होते. परत इस्लाम मधे अशी उदाहरने असण्याचा नसण्याचा हिंदूधर्माशी नक्की काय संबंध? मी सांगतो काय संबंध ते. हिंदूंना त्यातल्या त्यात कट्टर हिंदूंना टिका सहन होत नाही. त्यांना कुठलेही रिफॉर्म्स नको असतात. कारण त्यांची दुकाने बंद होतील. झाली आहेत. हिंदू संस्कृतीला वारंवार इस्लामशी तुलना करण्याचे कारण हेच आहे की तिकडे बघा धर्माविरुद्ध बोलले की कशी मुंडकी उडवतात, इकडे उडवत नाहीत म्हणून तुम्हाला बोलायला मिळतं. इतकी सुविधा आहे ना मग कशाला बोलता असा तर्क मांडणे चालू असते. म्हणजे वेगळ्या भाषेत टिका नको हेच सांगणे. वास्तविक इस्लामम्धे धर्मसुधारणेवर बंदी आहे की नाही ह्याचे हिंदूंना काही घेणे-देणे नसावे. तुमचा प्रश्न बघितला तर असे काही वाटते जणू लाखो करोडो हिंदू पळत सुटले आहेत हवाहवासा वाटणारा इस्लाम कबूल करायला आणि तुम्ही सांगताय अरे इस्लाममधे अमुक नाय तमुक नाय, तिकडे जाऊ नका. काळजी करु नका, कोणी मरायला तिकडे जाणार नाही. बाकी मी इस्लामचे समर्थन केलेले नसल्याने हा प्रश्न मला विचार असेल तर माझ्या भूमिकेशी संयुक्तिक नाही असेच म्हणेन. ह्याचा अर्थ उत्तर टाळतोय असा नसून तुमच्या प्रश्नात तथ्य, वजन नाही असा आहे.
आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हिंदू धर्माची,बहुसंख्य असणाऱ्या समाजाच्या अंतर्गत विरोधाभासांची चिकित्सा करण्याचे महत कार्य तुम्हाला इस्लाम धर्म,भारत या देशाच्या संबंधित कोणत्याही धाग्यावर करण्याचे का सुचते? त्यासाठी वेगळा धागा सुरु न करता प्रतिसाद देनारयांचेच कसे चुकते हा युक्तिवाद का करत असता ?ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी आपल्याला काही दाखले देतो. १. तुडतुडी ह्यांचा हा प्रतिसाद. सदर धाग्यात फक्त हिंदूंच्या चालिरीतींबद्दल चर्चा चालू असतांना ह्यांनी धाग्याचा विषय नसतांना मुस्लिमांवर यथेच्छ टिका करायला सुरुवात केली. तेव्हा आपण असा प्रश्न आपण विचारला नाही. जेव्हा जेव्हा हिंदूंना सुधारनांविषयी बोलल्याजाते, टिका केली जाते तेव्हा 'त्यांना आधी सांगा, तिकडे सांगायची हिंमत आहे का' म्हणून कोण मुस्लिमांचा असंबंधित विषय काढतो? हिंदूंच्या चालिरीतींच्या मागासलेपनाला मुस्लिम कारणीभूत असल्यासार्खे तर्क इथे बघितले. जणू मुस्लिम नीट झाले की हिंदू आपोआप नीट होणार आहेत. तुडतुडींच्या मतांविरुद्ध मत मी मांडले तेव्हा तो धागा हिंदूंशी संबंधित होता. २. दुसरा धागा हा http://www.misalpav.com/node/33048?page=1 ह्यात खूद्द धागालेखकांनी धर्मनिरपेक्षतेवर धागा लिहलाय. ह्यात अफझलखान-शिवाजी प्रकरणाचे धार्मिक धृवीकरणासाठी जे राजकारण केले जाते त्याविरूद्ध मी बोललो. तेव्हा धागाविषय तोच होता. ह्या धाग्यावरचे माझे सर्व प्रतिसाद वाचा आणि मी काय व कशावर बोलतोय ते ध्यानात येतं का बघा. ३. तुडतुडी यांचा इसिसवाला हा एक धागा http://www.misalpav.com/node/33103 बघा इथे मी हिंदूंबद्दल टिकास्पद कुठे आणि काय बोललोय ते. बाकी त्या धाग्यावर आलेल्या जहाल प्रतिक्रियांबद्दल तुमचा काही प्रतिसाद दिसला नाही. ४. ढोलपथकांबद्दलचा वेल्लाभट यांचा धागा http://www.misalpav.com/node/33075. इथे मी हिंदूंच्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीचे खंडन करतोय की काय ते बघा. ५. मेंटलेक्चुअलांचे उसासे आणि उमाळे ह्या धाग्यावर ट्रेडमार्क यांचा हा प्रतिसाद बघा. आणि त्यानंतर सुरु झालेली सर्व चर्चा बघा. धाग्याचा विषय मुळात गोमांसावरुन झालेली हत्या आणि त्या निमित्त विचारवंतांचे पुरस्कारपरतीकरण. मूळ विषय हिंदूभावना व मुस्लिम खाद्य संस्कृती ह्याचा झगडा आहे. ह्यात मला चुकीच्या वाटनार्या प्रतिसादांना मी प्रतिवाद केलाय. इथे हिंदूंचा विरोध, टिका केलेली नाही. शुद्ध राजकिय स्वरुपाची चर्चा होती. ६. सगळ्यात मजेदार तर हा धागा आहे. http://www.misalpav.com/node/33256 मोहरमबद्दल माहिती. ह्यात तोच प्रश्न विचारला आहे जो इथे ह्या धाग्यावर विचारला आहे. कट्टरपणा हिंस्रपणाचे मूळ धर्मात की वृत्तीत? पण काही लोकांना सरळ प्रश्नांना सरळ उत्तर देता आले नाही वर माझीच खरडपट्टी काढायला गेले आणि धागा भरकटला. एवढेच धागे आहेत तुम्ही म्हणता तसे. बाकीचे तर सगळे राजकिय धागे आहेत. त्यात भाजपविरोधी, संघविरोधी, मोदीविरोधी, भक्तविरोधी प्रतिसाद दिलेत. तेही हिंदूविरोधी वाटत असतील तर धन्य आहे.
तुम्ही इथे मिपावरचे बहुसंख्य प्रतिसाद देणारे मुस्लिमांच्या बद्दल "ते तसलेच आहेत"या भूमिकेतून प्रतिसाद देतात अशी मांडणी करता.पण सामान्य माणूस ज्याचा या धर्माच्या लोकांशी रोजच्या जगण्यात कोणत्या न कोणत्या प्रकारे संबंध येतो अशा लोकांना या धर्माबद्दल असा विचार का करावासा वाटला याच्या कार्यकारण भावाचा शोध न घेता तुम्ही ते विरोध करतात म्हणून त्यांच्या विरोधात ओरडत सुटलेले आहात.मी कसलाही शोध घेत नाही, माझे ज्ञान अपुरे, बुद्धी अर्धवट इत्यादी बोलून तुम्हाला समाधान मिळतं काय? असु देत. या धर्माबद्दल असा विचार करायला त्यांना भाग पाडलं जात आहे. राजकिय हेतुसाठी धार्मिक धृवीकरण करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना गेल्या कित्येक दशकांपासून प्रयत्न करत आहेत. गेल्या दहा बारा वर्षात त्याला उधान आलंय कारण आता जगात वाढलेला इस्लामप्रेरित हिंसाचार सपोर्टला आहे. गेल्या काही वर्षात डोळ्यात भरण्यासारख्या काही मोठ्या घटना झाल्या आहेत. ज्यात मुंबैचा आझाद मैदानावरचा हिंसक मोर्चा, ओवेसीबंधूंची भाषणे, काही दंगली ह्या पण आगीत तेल ओतत्या झाल्या आहेत. गेल्या दहाबारावर्षांआधी धार्मिक तणाव नव्हतेच आणि ते आताच आलेत असेही नाही म्हणत मी. धार्मिक तानतनाव संवेदनशील भागांमधेच होते. हिंदुबहुल भागांमधे ज्यांच्या अशा दंगली तनावांशी प्रत्यक्ष कधी संबंध आला नाही तिथल्या हिंदूंमधे मुस्लिमांबद्दल एक कडवट प्रतिमा होती. पण ती आजसारखी विखारी द्वेषाने भरलेली नव्हती आजच्यासारखा इस्लामोफोबिया नव्हता. आजच्या सारखी शत्रू भावना नव्हती. ज्या सामान्य माणसाला ज्या मुस्लिमांशी व्यवहार करण्याची फारशी गरज पडत नाही त्यांच्याबद्दल घृणा मात्र पराकोटीची निर्माण झालेली आहे हे आजुबाजूला बघतोय. ह्याचा कार्यकारण भाव मी जमिनीवर राहून बघत आहे. खयाली पुलाव पकवत नाही.
कमाल आहे बुवा, एक अभ्यासू इस्लामी विचारवंत ,ज्यांचा आजच्या भारताशी,देशाच्या तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणीशी काहीच संबंध नाही किंबहुना ते असली विचारसरणी नाकारतातच.असे असून सुद्धा राष्ट्रवादाची भाषा मांडणारे विचारवंत आणि तारेक फ़तह इस्लाम च्या अनुयायांची धर्माच्या नावाखाली चाललेली दादागिरी यांच्या बाबत एकमत कसे ? हे खरच कळत नाही. आता त्यांचे आणि इथल्या राष्ट्रवादी विचारवंतांचे एका मुद्द्यावर एकमत आहे म्हंटल्यावर तुमच्या सारखे सेकुलर/धर्मनिरपेक्ष विचारवंत त्यांना खोटे म्हणणर हे ओघाने आलेच.तारेक फतह बद्दल ची माझी विधानं तुम्ही हाच परिच्छेद टाकावा म्हणून केली होती. तारेक फतह तुम्हाला अभ्यासू, विचारवंत इत्यादी वाटतो. कारण तो इस्लामची पिसं काढतो. पण तिथेच हिंदूंची पिसं काढणार्यांना विचारजंत, पुरोगामी व काय काय तुच्छ नावांनी पुकारल्या जाते ते सोयिस्कर विसरल्या जातं. ह्याच तारेक ने समजा हिंदूधर्माची अशीच पिसं काढली तर तुमचा काय पवित्रा असेल? तुम्ही त्याला अभ्यासू इत्यादी म्हणायला धजाल? त्याच्याबद्दल अधिक टंकत बसून मला वेळ घालवणे योग्य वाटत नाही. कालचा एक लेख पुर्ण वाचा. तारेकला काय हवंय ह्यावर अधिक विचार करावा. त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय मुस्लिमांचे बॅशिंग करण्याचा आनंद फसवा आहे. या सगळ्यात फायदा फक्त तारेक फतह ह्या एकाच व्यक्तिचा होनार आहे हे जरा खोलात विचार केल्यावर लक्षात येईल.
या बाबतीत ज्यांनी आपल्याच धर्माच्या ३० लाख लोकांना फक्त भाषा उर्दू न स्वीकारल्यामुळे मारले असा पाकिस्तानी दृष्टीकोन तुम्हाला महत्वाचा वाटतो यावरूनच तुमच्या वैचारिक पातळीची उंची कळून येते.माझ्या वैचारिक पातळीची उंची मोजण्याआधी वर उल्लेख केलेला पाकिस्तानी दृष्टीकोनाचे कुठेतरी उल्लेख करुन मी समर्थन केल्याचे तुम्ही दाखवुन द्यावे. अन्यथा प्रतिपक्षावर अतिघाईने, उतावीळपणे, मागचा पुढचा विचार न करता बेछूट आरोप करत, बिनबोभाट शिक्के मारत सुटणाराची वैचारिक पातळी वाचकांना लगेच लक्षात येईल.
स्वतःचा मुद्दा खरा ठरवण्यासाठी प्रसंगी पाकिस्तानी जे कि अत्यंत दुटप्पी,ढोंगी,भारतद्वेषी,हिंदुद्वेषी लोक आहेत अशा माध्यमां मधील बातमीचा विदा तुम्हाला द्यावासा वाटतो,तुमच्या बुद्धीची कीव येते! खरंच!अहो पण ते पाकिस्तानी जे अत्यंत दुटप्पी, ढोंगी, भारतद्वेषी, हिंदुद्वेषी का काय ते लोक आहेत ते त्यांच्याच एका हाकलून दिलेल्या नागरिकाबद्दल काय विचार करतात ते दिलंय त्या दुव्यात. त्या पाकिस्तान्यांनी तारेकबद्दल तसा विचार करणे आणि त्यांचे भारतद्वेषी, हिंदूद्वेषी असण्याचा काय संबंध? मी फक्त त्याला पाकिस्तानी कसे बघतात तेवढे पाहायला सांगितले. आपल्याकडच्या डाव्या, पुरोगामी, लोकांबद्दल हिंदुत्त्ववादी ज्या भावना ठेवून असतात अगदी तशाच पाकिस्तानी त्यांच्या देशातल्या पुरोगाम्यांबद्दल ठेवून असतात. माझ्या बुद्धीची किव करण्याची सवड तुम्हाला मिळणार नाही जर मी काय म्हणत आहे ह्याचे नीट डिकोडिंग केले तर. अर्थात ते जमायला हवे. तुम्ही तारेकची बाजू घेताय याची मौज वाटते पण. खरंच!
तारेक फ़तह यांनीच सांगितलेला किस्साबघा आता. कोण कोठला तो पाकिस्तानी पण त्याने तुमच्या आवडीचा मुद्दा मांडला तर किती कौतुक दाटून आलेय शब्दांमधे? हा जो किस्से सांगतो, ज्या प्रकारे सांगतो ते ऐकून तुम्ही माना डोलावणार. पण तिकडे आयसिसविरुद्ध फतवा काढणार्या भारतीय मुस्लिमांकडे नाके मुरडणार. तुमच्या वृत्तीतच घृणा भरली आहे हे ह्याचे द्योतक आहे. तो पाकिस्तानी इथे भारतीय मुस्लिम आणि भारतीय हिंदूंमधे अधिकाधिक तेढ कशी निर्माण होईल याची जोरदार पेरणी करतोय आणि आपलेच देशबांधव त्याच्या ह्या परस्परद्वेष वाढवण्याच्या धंद्याला समर्थन देतात हे बघून वैषम्य वाटते.
आपल्या देशात अशी लाखो उदाहरणे आहेत.आपल्या देशात अशी लाखो उदाहरणे आहेत? आहेत ना. पण त्यात धार्मिक उन्मादाची मुस्लिमांची एकमेव नाहीत. हिंदूंच्या विभत्सतेकडे भयंकर वेगाने धावू लागलेले सण उत्सव आहेत, डिजेच्या दणदणाटात साजरी होणारी शिवजयंती आहे, गनपती आहे, अजून बरंच काही आहे. पर्यावरनाचे नियम धाब्यावर टाकून होणारे उत्सव आहेत. कायमस्वरुपी बांधकामं आहेत. त्याबद्दल ओरड करनार्याम्चे आवाजही गप दाबले जातात. हिंदुविरोधी आहेत म्हनून मानहानी केली जाते. कसे असते ना आपला तो बाब्या दुसर्याचे ते कार्टे.
असहिष्णुता वाढली अशी जी ओरड होत आहे त्याला बर्याच अंशी इस्लाम च्या अनुयायांची धर्माच्या नावाखाली चाललेली दादागिरी कारणीभूत आहे. जी गेल्या १०-१५ वर्षापासून आहे, सरकारचा या गोष्टींशी संबंध नाही.आता खरेच काय खरे मानावे हाच प्रश्न पडलाय. लोक म्हणतात इस्लामची दादागिरी चौदाव्या शतकापासून सुरु आहे. तुम्ही म्हणताय गेल्या १०-१५ वर्षा पासून आहे. गेल्या १०-१५ वर्षात धर्माच्या नावाखाली कसली दादागिरी केल्या गेली आहे व तेही हिंदूंवर त्याबद्दल जरा सांगाल काय? आणि दादागिरी म्हणजे नक्की काय हे आपणास ठावूक असावे. पुन्हा लक्षात घ्या. मी असे कधीच म्हटले नाही की भारतीय मुस्लिमांमधे कोणतेच प्रश्न नाहीत. पण ज्या पद्धातीने तुम्ही किंवा हिंदुत्ववादी सतत प्रोजेक्ट करत आला आहात गेल्या दोन दशकांपासून ते तसे खूप भयंकर, दैत्यस्वरुपाचे, प्रलयाकारी नाहीत. मी कोणत्याही प्रकारे शहामृगासन करत नाही. दोन धर्मियांमधे निर्माण झालेली दरी कंस्ट्रक्टीव प्रयत्नांनी लवकरात लवकर मिटवणे आवश्यक आहे. मुस्लिमांमधे रिफॉर्म्स हवेत तर तसे प्रयत्न केले गेले पाहिजेत. पण तिथे हिंदुत्ववादी टाळाटाळ करतात. काय तर हिंदूंचा संबंध काय त्यांच्या मागासलेपणाशी? त्यांचे त्यांनी बघावे. म्हणजे इथे मिटक्या मारत फालतू गैरसमजांवर मारे टिवटिव करायची. मुस्लिम कसे धोकादायक झालेत हे वढवून सांगायचे. संतुलीत भारतीयांनाही आपल्या चर्चांनी नुसते घाबरुन सोडायचे. ह्यावर उपाय काय म्हटलं तर हात झटकायचे. ह्याशिवाय हिंदुत्ववाद्यांनी दुसरं काय केलंय? मुस्लिमांवर येताजाता टिका केल्याने नक्की काय बदल घडणार आहे कुणास ठावूक. इथं एक रहिलंच. तुमच्या आधीच्य प्रतिसादात विवेकी लोकांना समर्थन द्यावे असे तुम्ही म्हटलात. त्याबद्दल काय करावे, कसे करता येईल हे ह्या प्रतिसादात काही दिसले नाही. नेहमीसारखा विद्वेषी सूर दिसला. ते 'विवेकी लोकांना समर्थन' वैगरे बाता मुखवटा आहे काय?
In reply to कार्यकारण भावाचा शोध न घेता by lakhu risbud
माझ्या आई ला आणि बायको ला जो पर्यंत मशिदीत जाऊन नमाज अदा करण्याची परवानगी मिळत नाही तो पर्यंत मी सुद्धा मशिदीत जाणार नाही अशी तारेक फ़तह यांची भूमिका आहे, स्त्रियांसाठी समानतेचा आग्रह धरणारी अशी किती उदाहरणे मुस्लिम धर्मात तुच्या डोळ्यासमोर आहेत ?इस्लामचं तर जाऊ द्यात. इथे मंदिरांमधे स्त्रियांना प्रवेश देऊ नये म्हणून मारामारी चालली आहे. तेव्हा किती पुरुष तारेक फतेह सारखी भूमिका घेतांना दिसत आहेत? आपण नाक वर करुन विचारतोय पण आपल्याच नाकाला शेंबुड आहे हे विसरलं जात आहे. बाकी, माझा मुळ आणि महत्त्वाचा प्रश्नः मी इस्लामच्या भ्रष्ट रुपाचे जीव तोडून समर्थन करतो हा निखालस खोटा आरोप जो तुम्ही केलाय त्याबद्दल पुरावा द्या. नाहीतर माफी मागा.
In reply to हे सुटलं नजरेतून. by तर्राट जोकर
In reply to कोणाच्या नाकाला शेम्बुड् आहे? by भंकस बाबा
शिंगणापुरच्या शनि मंदिरातील चौथर्यावर जायला बंदी आहे, आणि कार्तिकेयाच्या मंदिरात जायला बंदी आहे. इतर कुठे असल्यास दाखवुन द्यावी, असली तरी जगातील एकूण मंदिराची संख्या घेतल्यास .0001 टक्केच असेल कदाचित्!आलेत का पुन्हा मीनिंगलेस सांख्यिकीवर? पुन्हा मशिदीत प्रवेश नाही मंदिरात आहे हा मुद्दाही माझा नव्हताच. रिसबुडसाहेबांनी तारेक फतेह किती महान आहे हे सांगण्यासाठी दिलेला. मी त्याला फक्त प्रतिप्रश्न केलाय की ज्या मंदिरांमधे प्रवेश नाही महिलांना तिथे किती पुरुषांनी अशा भूमिका घेतल्या. तरी तुमच्या इच्छेसाठी एक यादी देतो, काही नावाजलेली हिंदू मंदिरे आहेत. आणि मंदिरांची संख्या मोजू नका, भक्तांची मोजा. तसेच जशी ही आहेत तशी लहान मंदिरांची उदाहरने हजारोंने असू शकतात. आणि जे आहे ते आहे म्हणा. काही बट्टा लागणार नाही हिंदूधर्माला. आपला धर्म चुकत नाहीच हे छातीठोकपणे सांगणारे सगळ्यात धर्मात असतात, जसं तुम्ही आता करत आहात. http://newseastwest.com/10-temples-in-india-that-still-dont-allow-entry-of-women/ मुस्लिम महिलांना मशिदीत परवानगी नाही ही समस्या मी कुठेही अमान्य केली नाही. पण ज्या पद्धतीने तारेकफतेह चे कौतुक केले जाते ते बघता हिंदूंमधेही असे पुरुष आहेत का हा प्रश्न तर साहाजिकच येईल. कारण गरज तर इथेही आहे. त्यात 'प्रमाण' आणून मुद्दा डायलूट केला जाऊ शकत नाही. हुसैनच्या चित्रांबद्द्ल माझ्या मताची तुम्हाला काय गरज? तुम्हाला कसे कळले की ते माझ्या प्रतिसादांना अनुकूल प्रतिकूल आहे म्हणून? पैगंबराचे वादग्रस्त चित्र, जिजसचे वादग्रस्त चित्र हे जेवढे माझ्यासाठी मुल्यहिन आहेत तेवढीच हिंदू देवतांची वादग्रस्त चित्रे महत्त्वहिन आहेत. I don't believe in stupidity called Religion. That's all.
In reply to शिंगणापुरच्या शनि मंदिरातील by तर्राट जोकर
In reply to मी हिन्दू धर्म चुकत नाही असे कुठेही म्हटले नाही, by भंकस बाबा
In reply to तुमचे सांख्यिकी देण्यामागेच by तर्राट जोकर
In reply to रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची by तर्राट जोकर
In reply to फतवा by ट्रेड मार्क
In reply to फतवा by ट्रेड मार्क
In reply to मगर आणि माकडा च्या कथे by lakhu risbud
In reply to याला म्हणतात असहिष्णुता by गामा पैलवान
In reply to तुम्हाला काय वाटतं? by तर्राट जोकर
In reply to खास त जो स्टाइल! by DEADPOOL
In reply to माझा कोणता मुद्दा इथे उलटलेला by तर्राट जोकर
In reply to माझाच जुना प्रतिसाद इथे by DEADPOOL
In reply to म्हणी संस्कृतीतून जन्माला by तर्राट जोकर
In reply to चला तर आम्हाला संस्कृती आहे! by DEADPOOL
In reply to बेटा, तुमसे ना हो पायेगा. by तर्राट जोकर
In reply to बेटा, तुमसे ना हो पायेगा. >>> by DEADPOOL
In reply to माझा कोणता मुद्दा इथे उलटलेला by तर्राट जोकर
In reply to याला म्हणतात असहिष्णुता by गामा पैलवान
In reply to याला म्हणतात असहिष्णुता by गामा पैलवान
In reply to रीसबुड, by डँबिस००७
In reply to .. by lgodbole
400
प्रतिसाद्दांबद्दल "डेडपूल" यांचा "जिवंतफूल" देवून सत्कार!!!In reply to 400 by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to १. सती प्रथा - पुर्ण बंद झाली by नाना स्कॉच
In reply to १. सती प्रथा - पुर्ण बंद झाली by नाना स्कॉच
In reply to १. सती प्रथा - पुर्ण बंद झाली by नाना स्कॉच
In reply to आणि आपल्या हिशेबानुसार आपल्या by DEADPOOL
In reply to अरे बापरे हे युद्ध होते की by नाना स्कॉच
In reply to नाना युध्द वैचारिक रित्या by DEADPOOL
In reply to ... by lgodbole
In reply to १. सती प्रथा - पुर्ण बंद झाली by नाना स्कॉच
In reply to हिंदूंनी स्वतः आपल्या जुनाट by दिग्विजय भोसले
In reply to हिंदूंनी स्वतः आपल्या जुनाट by दिग्विजय भोसले
आधीच मर्कट त्यात फेक्युलरी मद्य प्याला.=)) आपला रोष म्हणीतून प्रकट करण्यास मन मोकळी दाद.
हिंदूंनी स्वतः आपल्या जुनाट चालीरिती,रूढी,परंपरा बंद केल्या आहेत. अजूनही काही मिथक/पुराणकथा यावर विश्वास ठेवणारे आहेतच,त्या एकेक अतार्किक कथांचे भंजन आपण करतच आहोत,आणि करायला हवं. जेणेकरून बाहेरच्यांना हिंदूंवर शिंतोडे उडवण्याची संधी मिळणार नाही.सहमत आहेच, पण आपण आपल्या घराला उत्तम स्थितीत ठेऊ इच्छितो ते केवळ इतर काय म्हणतात या साठी नव्हे, आपण आपल्या आपल्या घरची आपल्याच स्वकीयांची काळजी करतो म्हणून ह्याचाही विचार सोबतीने व्हावा वाटते एवढेच. असो.
In reply to हिंदूंनी स्वतः आपल्या जुनाट by दिग्विजय भोसले
प्रतिसाद आवडला! इथे लाईक ची