एक वर्षानंतर . . .
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________In reply to मुनिवर by सुबोध खरे
मुळात हरयाणात "जाट आरक्षण" आणि महाराष्ट्रात "मराठा आरक्षण" हे कॉंग्रेसने आपल्या मावळत्या काळात न्यायालयाकडून मान्यता मिळणार नाही हे स्पष्ट दिसत असूनहि "मतांवर डोळा" ठेवूनच दिले होते. हा निर्णय विधानसभेत मंजूर करून न घेता आचारसंहिता सुरू होण्याआधी जेमतेम काही आठवडे याविषयी अध्यादेश काढला होता. जर या निर्णयाचा फायदा निवडणुकीत झाला तर पुन्हा एकदा ५ वर्षांकरिता सत्ता मिळेल आणि जर निवडणुक हरलो तर हे निर्णय रेटून न्यायची जबाबदारी नवीन सरकारवर येऊन पडेल. जर नवीन सरकारला ते शक्य झाले नाही तर त्यांच्यावर टीका करायला हे मोकळे आणि जर नवीन सरकारने निर्णयाचे विधेयकात रूपांतर करून ते मान्य करून घेतले तर आम्हीच हे आधी आणले होते असे म्हणून श्रेय घ्यायला हे मोकळे. अशी "दोन्ही हातात लाडू" परिस्थिती काँग्रेसने निर्माण केली होती. त्यांच्या दुर्दैवाने सत्ताही गेली आणि आरक्षणाचा निर्णयही न्यायालयाने रद्द केल्यामुळे नवीन सरकारवर दोषारोप झाले नाहीत. याबाबतील गुजरातच्या आनंदीबाई पटेल यांनी पटेल आरक्षण आंदोलन परिस्थिती अतिशय संयमाने हाताळली. पटेलांच्या दडपणाखाली आरक्षणाचे विधेयक आणून ते मंजूर करून घेतले असते तर ते न्यायालयात टिकले नसतेच. पण त्यामुळे गुजरातमधील इतर मागासवर्गीय जाती (क्षत्रिय, तेली इ.) भाजपच्या विरोधात गेल्या असत्या. त्यामुळे आरक्षणाची खोटी आश्वासने न देता त्यांनी दूरदर्शनवर भाषण देऊन "घटनेनुसार ५२% पेक्षा अधिक जागा राखीव ठेवणे शक्य नाही. जरी ते देण्याचा प्रयत्न केला तरी न्यायालयात तो निर्णय टिकणार नाही. पटेल हे इतर मागासवर्गियात मोडतात हा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा नसून मागासवर्गीय आयोगाने घ्यायचा असतो. त्यांनी जरी तो निर्णय घेतला तरी तो न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे घटनात्मकदृष्ट्या पटलांना आरक्षण देणे शक्य होणार नाही." असे अगदी स्पष्ट व संयमित शब्दात सांगितले.
In reply to हरयानातील जाटांना राखीव जागा by श्रीगुरुजी
In reply to भाजप-मोदी-भक्त असा प्रचार करत by नितिन थत्ते
In reply to कोणते भाजप-मोदी-भक्त असा by श्रीगुरुजी
In reply to https://www.facebook.com by नितिन थत्ते
In reply to तिथे कोठे असं लिहिलंय? मुळात by श्रीगुरुजी
In reply to https://www.facebook.com by नितिन थत्ते
>> ह्या सर्व मध्ये भाजप आहे ना?ह्याचं स्पष्ट उत्तर मिळेल असं वाटत नाही.
In reply to ह्याचा अर्थ काय? by तर्राट जोकर
In reply to ह्याचा अर्थ काय? by तर्राट जोकर
In reply to कुणी पक्षविरहीत, न्युट्रल by तर्राट जोकर
In reply to आज रेल्वे अंदाजपत्रक सादर by श्रीगुरुजी
In reply to ह्याच बातम्या आधी यायच्या आणि by नाव आडनाव
In reply to ह्याच बातम्या आधी यायच्या आणि by नाव आडनाव
In reply to भाजपच्या ईमेल आयडीवरून का by श्रीगुरुजी
In reply to आज रेल्वे अंदाजपत्रक सादर by श्रीगुरुजी
In reply to रेल्वे मंत्र्यांनी भाडेवाढ न by नितिन थत्ते
In reply to केवळ आपल्या विचारसरणीचे सरकार by अभिजित - १
In reply to ते म्हणतात ते(च) सगळे खरे by नाना स्कॉच
In reply to मी पण by अर्धवटराव
In reply to मी पण by अर्धवटराव
In reply to केवळ आपल्या विचारसरणीचे सरकार by अभिजित - १
गिरीश कुबेर वेगळ्या विषयावर बोलत आहेत पण ते इथे पण लागू आहे. मी ओळखीच्या एका माणसा बरोबर भाजप निर्मित महागाई या वर बोलत होतो. हा कट्टर संघ कार्यकर्ता. त्याने महागाई भाजपच्या राज्यात वाढली आहे हे मान्य केले. पण त्याने अफलातून कारण दिले मला . तो म्हणाला कोन्ग्रेस चे लोक देशाचा पैसा खायचे. भाजप सरकार असे करत नाही. ( थोडक्यात ते बेपारी लोकांकडून पैसा घेतात आणि बेपारी जनतेची लुट करतात ती क्षम्य आहे असे त्याचे म्हणणे .. आहे कि नाही अफलातून युक्तिवाद ? )हा संघ कार्यकर्ता असं म्हटला असेल तर तो मूर्ख आहे एवढंच मी म्हणेन.
In reply to गिरीश कुबेर वेगळ्या विषयावर by श्रीगुरुजी
In reply to सगळे तुमच्यासारखे नसतात हो. by तर्राट जोकर
In reply to कसला ओव्हरटाईम? by श्रीगुरुजी
In reply to भारत सरकारचा एक स्तुत्य by श्रीगुरुजी
In reply to सरकारचे आणखी एक अपयश. by अर्धवटराव
In reply to माझी ह्या बाबतीतली माहीती, by नाना स्कॉच
In reply to निपचित पडलेला धागा जिवंत by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी by कपिलमुनी
In reply to पीपीएफ चे व्याज दर आज ना by श्रीगुरुजी
In reply to PPF किंवा सुकन्या ह्या by श्री गावसेना प्रमुख
In reply to मुद्दा नसला by कपिलमुनी
In reply to चांगले निर्णय by मार्मिक गोडसे
In reply to .. by hmangeshrao
In reply to पी पी एफ च्या व्याज दराविषयीच्या लिन्क by दुर्गविहारी
In reply to ... डोळे पाणावले ! by lgodbole
In reply to स्पष्टीकरणाचा सम्बध काय ? by दुर्गविहारी
In reply to .. by lgodbole
In reply to जे एन यु फॉर्मुला फर्गुसनमध्ये by hmangeshrao
In reply to जे एन यु फॉर्मुला फर्गुसनमध्ये by hmangeshrao
In reply to .... by hmangeshrao
In reply to .. by hmangeshrao
In reply to .... by hmangeshrao
In reply to मल्ल्याचं कर्ज माफ केलंय असं कोण म्हणलाय? by ट्रेड मार्क
In reply to आयएसआय अधिकार्याला भारतात प्रवेश मोदी सरकारने दिला. by दिवाकर देशमुख
In reply to हि घ्या 'भक्ताची' पोस्ट by अर्धवटराव
In reply to हे सरकार बदलल्यामुळेच शक्य by तर्राट जोकर
In reply to या धाग्याचे आयुष्य केव्हाच by श्रीगुरुजी
चेरामन जुमा मशिद ही भारत आणि अरब यांच्यातील व्यापारी संबंधांचे प्रतीक आहे. त्रिशूर जिल्ह्यात असलेली ही मशिद सौदीतून भारतात आलेल्या व्यापाऱ्यांनी इ. स. ६२९मध्ये बांधली होती. केरळमधील 'चेरा' राजा चेरामन पेरुमल यानं मक्केत पैगंबर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यानं इस्लाम धर्म स्वीकारला.
In reply to अल्ला मेहेरबान by lgodbole
In reply to विद्यार्थ्यांच्या, by श्रीगुरुजी
In reply to सराफांकडे न्युसन्स वॅल्यु by तर्राट जोकर
अधिकृतरित्या संप मागे घेतला नसता तर तो आपोआपच मोडला असता व सर्वत्र मानहानी झाली असती.संप मोडायला केव्हाच सुरूवात झाली होती. मागच्या दाराने व्यवहार सुरू झाले होते. तनिष्क, जॉय लुकास इ. मोठ्या दुकानांनी अधिकृतरित्या दुकाने सुरू केली होती.
सराफांनी भाजपला भरभरुन मदत केली निवडणुकांमधे, सराफ लॉबी पुढच्या निवडणुकीत मदत करणार नाही हे निश्चित.मागील निवडणुकीत मदत केली म्हणून कर न लावता मदतीची परतफेड करण्याचा निर्णय न घेता व पुढील निवडणुकीच्या मदतीवर डोळा न ठेवता १% अबकारी कर लावण्याचा निर्णय कायम ठेवला हेच महत्त्वाचे आहे.
In reply to विद्यार्थ्यांच्या, by श्रीगुरुजी
In reply to ही बातमी रोचक आहे. by श्रीगुरुजी
In reply to व्हिसा रद्द by कपिलमुनी
In reply to बातमी रोचक होतीच. १९६२ मध्ये by श्रीगुरुजी
In reply to बातमी रोचक होतीच. १९६२ मध्ये by श्रीगुरुजी
In reply to सणसणीत थपडेचे वळ अजूनही by तर्राट जोकर
In reply to बातमी रोचक होतीच. १९६२ मध्ये by श्रीगुरुजी
In reply to एकतर चीनने डोळे वटारल्यामुळे भारताने माघार घेतली असावी... by अर्धवटराव
In reply to ., by mugdhagode
In reply to ते काँग्रेसच्या काळातच घडले होते by अर्धवटराव
In reply to माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप by तर्राट जोकर
In reply to माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप by तर्राट जोकर
In reply to अहो गुरुजी, इतरांनी केले तेच by तर्राट जोकर
In reply to अडचणीचे प्रश्न झेपत नै का नाक by तर्राट जोकर
In reply to उत्तर इथे आहे. http://www by श्रीगुरुजी
In reply to सारवासारव आहे ती, माझ्या by तर्राट जोकर
In reply to माझ्या त्या प्रतिसादातच मूळ by श्रीगुरुजी
In reply to ओके, म्हणजे आता विरोधी पक्ष by तर्राट जोकर
In reply to ज्या वाक्याची विरोधी पक्ष तर by श्रीगुरुजी
In reply to उत्तर नसले की हास्यास्पद by तर्राट जोकर
In reply to तुमच्या २९/४/१६ ला by श्रीगुरुजी
In reply to या प्रश्नाला तुम्ही आधीच तर by तर्राट जोकर
In reply to ते सारवासारवीचं, उडवाउडवीचं by श्रीगुरुजी
In reply to हा हा. भाजपाला अडचणीची ठरणारी by तर्राट जोकर
In reply to मला असला आटापिटा करण्याची by श्रीगुरुजी
In reply to अखिल ब्रह्मांड, अखिल by तर्राट जोकर
In reply to थयथयाट तुमचाच सुरू आहे. पंकजा by श्रीगुरुजी
In reply to धन्स. हाच प्रतिसाद पाहिजे by तर्राट जोकर
In reply to कागदपत्रे सापडेनात by कपिलमुनी
In reply to कागदपत्रे सापडेनात by कपिलमुनी
In reply to 'yet to be found' या शब्दांचा by श्रीगुरुजी
In reply to 'yet to be found' या शब्दांचा by श्रीगुरुजी
In reply to २१ नोवेंबर २०१५ by कपिलमुनी
In reply to बरं मग? by श्रीगुरुजी
In reply to मग नाचा by कपिलमुनी
In reply to आम्ही कशाला नाचू? आम्ही by श्रीगुरुजी
In reply to मग नाचा by कपिलमुनी
In reply to मुनिवर्य by ट्रेड मार्क
In reply to म्हणजे इराणींकडे डिग्री नाही by तर्राट जोकर
In reply to तजो by ट्रेड मार्क
In reply to ट्रेडमार्क, तुम्हाला मुद्दा by तर्राट जोकर
In reply to आम्हाला थोडे कमीच कळते by ट्रेड मार्क
In reply to प्रमाणपत्र by कपिलमुनी
In reply to न्यायप्रविष्ट आहे ते by ट्रेड मार्क
In reply to इराणींच्या मुद्द्यात दम नाही by तर्राट जोकर
In reply to बरोबर आहे by ट्रेड मार्क
In reply to हे हे. कामाचं काय? by तर्राट जोकर
In reply to जरा शांत व्हा. इतके उत्तेजित by श्रीगुरुजी
In reply to मुद्द्यावर बोला की गुरुजी. by तर्राट जोकर
In reply to जिथे कोळसा खाण वाटप by श्रीगुरुजी
In reply to ओ सर, तुमच्या डिग्र्यांची by तर्राट जोकर
In reply to स्मृती इराणींना न्यायालयाने by श्रीगुरुजी
In reply to न्याय by कपिलमुनी
In reply to कायद्यानुसार ज्याने by श्रीगुरुजी
त्यांनी स्वत:हून क्लॅरिफिकेशन दिला असता तर कोर्टाचा वेळ आणि देशाचा पैसा वाचला असता
In reply to गुरुजी by कपिलमुनी
In reply to तोमरचा खटला न्यायालयात आहे. by श्रीगुरुजी
केजरीवाल आणि त्यांच्या टोळीच्या आचरटपणाला मर्यादा नाही. मनाला येईल ते बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा छंद आहे. त्यांनी आरोप केला रे केला लगेच ज्याच्यावर आरोप केला आहे त्यानेच धावपळ करून पुरावे आणायचे का?पूर्ण सहमत आहे. लोकांनी या मुख्यमंत्र्यांना ज्या कामासाठी निवडून दिले आहे त्यापेक्षा कित्येक पटींनी इतर गोष्टींसाठी वेळ त्यांच्याकडे आहे--मग ते चित्रपट परिक्षण असो की आपल्या राज्यात नसलेल्या ठिकाणी काही घटना घडली तर तिथे धाऊन जाणे असो (आठवा दादरी आणि हैद्राबाद). आणि स्वत:च्या राज्यात डॉ. पंकज नारंग यांची हत्या झाली त्याठिकाणी हे भेटायला गेले आहेत याची बातमी मी तरी अजून वाचलेली नाही. हे मुख्यमंत्री एक रिकामटेकडे आणि त्यांचे समर्थक दहा रिकामटेकडे. कामधंदा नसलेल्या या रिकामटेकड्यांनी ट्विटरवर काहीतरी खरडले तर त्याची दखल इतरांनी घ्यायचे काहीच कारण नाही.
In reply to कायद्यानुसार ज्याने by श्रीगुरुजी
कायद्यानुसार ज्याने इराणीबाईंवर आरोप केलेत त्यालाचे ते सिद्ध करावे लागतात.आप आणि आपसेना च्या वेळेस तुम्हाला हेच सांगत होतो. पण तेव्हाची तुमची सोयीस्कर भूमिका वेगळी होती.
In reply to जुनी आठवण by कपिलमुनी
पण तेव्हाची तुमची सोयीस्कर भूमिका वेगळी होती.काहीही हं पि! किंवा काहीही हं नी!
In reply to जरा शांत व्हा. इतके उत्तेजित by श्रीगुरुजी
In reply to ... जबाबदारी नेम्की कुणाची ? by mugdhagode
मुळात हरयाणात "जाट आरक्षण"