मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. Afzal Guru’s last interview यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

वाचने 65873 वाचनखूण प्रतिक्रिया 339

In reply to by भंकस बाबा

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 08:15
भंकसबाबा, अर्धवट माहिती पसरवल्याने जे घातक विष मनात तयार होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. महिषासुर शहिद दिवस कन्हयाने साजरा केलेला नाही. कन्हया अध्यक्ष झाला तो २०१५ मधे. हा दिवस २०११ पासूनतरी जे एन यु त साजरा केला जात आहे, त्याबद्दल अभाविपने वेळोवेळी विरोधही केलेला आहे. त्यासंदर्भात एक बातमी http://www.thehindu.com/news/cities/Delhi/student-groups-come-to-blows-over-mahishasura-issue-at-jnu-once-again/article6491346.ece खरेतर जे एन यु त अनेक विद्यार्थी संघटना वेगवेगले कार्यक्रम करत असतात, त्या प्रत्येक कार्यक्रमाला जबाबदार विद्यापिठ प्रशासन असते, युनियन प्रेसिडेंट नाही. तसेच आता तो अध्यक्ष आहे म्हणून जे एन यु तल्या अठरापगड वेगवेगळ्या विद्यार्थी संघांनी केलेल्या २०१५च्याही आधीच्या सगळ्या कार्यक्रमांना तोच जबाबदार कसा? ह्या लॉजिक ने तर दुसरे महायुद्ध कन्हयानेच प्लान केले असेही म्हटले पाहिजे. साला कुटुंबाचे मासिक उत्प्नन 3000 आहे सांगतो मग गाढ़वा अभ्यास कर ना, त्या गरीबीत रुतलेल्या आईबापाला बाहेर काढ ना. >> गरिबांनी राजकारणात उतरू नये असे तुम्हाला म्हणायचे आहे बहुतेक. टिळकांचेही असेच काहीसे वाक्य आहे, अमका संसदेत जाऊन काय हे करणार का वैगेरे, नेमकं आठवत नाही पण भावार्थ तोच आहे. राजकारण हे पोटभरलेल्यांची मक्तेदारी असावी असं तुमचं मत आहे काय? असं असेल तर अभ्यास वाढवा आणि कोणाच्या गरिबीची खिल्ली उडवू नका. मीही गरिब होतो, विद्यार्थीदशेत मीही आंदोलनं केली आहेत, ती लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यासाठी नसतात ह्याची मला जाण आहे. स्वार्थी, आप्पलपोट्या, झापडबंद, आपण बरे आपला काम बरे टैप विद्यार्थ्यांना ती नसते. ह्या लष्कराच्या भाकर्‍या कुणीतरी भाजतो म्हणून हे अप्पलपोटे विद्यार्थी सुखनैव फायदे भोगू शकतात. असे फायदे भोगून पोट भरले की कुणालाही उपदेश करायला मोकळे. कन्हया स्वत:ची गरिबी सांगतोय ते त्याच साठी.

In reply to by तर्राट जोकर

कोण म्हणे गरीब राजकारणात नाही,भुजबळांनी त्यांच्या पक्षाच्या एका झोपडीत राहणाऱ्या बाईला निवडून आणून नाशिक zp अध्यक्ष केले होते राव।सोता भुजबळ भाजी विकायचे आणि आता बघा समतेचा किती धूर निघू ऱ्हायला ।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 08:52
बरोबर. असे धूर फक्त काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते, नेते काढतात. डॉन्टटेल्मी! गरिब कन्हयाला घर सांभाळण्याचा शानपणा शिकवणार्‍यांना गरिब चहावाला पंतप्रधान होतो तेव्हा काय प्रॉब्लेम नसतोय.

In reply to by तर्राट जोकर

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 08:56
गरिब कन्हयाला घर सांभाळण्याचा शानपणा शिकवणार्‍यांना गरिब चहावाला पंतप्रधान होतो तेव्हा काय प्रॉब्लेम नसतोय. लै वेळा सहमत!!!

In reply to by बोका-ए-आझम

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 09:09
मजाच आहे बुआ!! आमची सगळी श्रद्धास्थाने एक एक करत ढासळत आहेत!, काही बोललो असतो पण मग ते दूसरी धूणी इकडे धूणे झाले असते त्यापरी आम्ही आवरतो स्वतःला

In reply to by नाना स्कॉच

बोका-ए-आझम Tue, 03/08/2016 - 11:18
उदाहरणार्थ एखादा माणूस खोटं बोलला, तुम्ही सोडून द्याल. देशाचा पंतप्रधान खोटं बोलला तर त्यावरून गदारोळ माजेल की नाही? कोणी याला नेहमीच महत्व होतं, आहे आणि राहील. जेव्हा जे बोललं जातंय ते अगदी त्रिकालाबाधित सत्य असेल - एखाद्या शास्त्रीय नियमासारखं - तेव्हाच कोण बोललंय हे गौण ठरेल आणि काय बोललेत त्याला महत्त्व मिळेल.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 09:15
हा हा हा. फक्त गरजेपुरता तिरपागडा अर्थ काढून 'तुम्हाला हेच म्हणायचं आहे' ही आता टिपीकल भक्त शैली म्हणून प्रसिद्ध झाली आहे. इथे चहावाला पंतप्रधान झाला हे मला सहन होत नाही असा अर्थ काढलात, वा वा वा! अहो नमोभक्तीत इतके आंधळे होऊ नका की सरळ लिहिलं ते समजत नाहीये. नमोची गरिबी डोक्यावर घेऊन नाचायचं आणि कन्हयाला म्हणाय्चं घर सांभाळ. दांभिकपणा बघा आधी मग बघा कोणाला काय सहन होत नाहीये ते. तसेही गरिबीतून पुढे आलेले नमो एकमेव नेते नाहीत भारतातले. तरी मी चहावाल्याचा मुलगा, मी चहावाल्याचा मुलगा असे स्वतःची टिमकी वाजवत स्वतःच फिरत असतात.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा Tue, 03/08/2016 - 09:34
इथे चहावाला पंतप्रधान झाला हे मला सहन होत नाही असा अर्थ काढलात
हे वाक्य खरे तर तुम्हाला उद्देशून नव्हते.. ते एक सर्वसामान्य विधान होते. पण असो, तुम्ही ते तुमच्यावर ओढवून घेतलेत. मर्जी तुमची. आम्ही काय बोलणार?

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा Tue, 03/08/2016 - 15:10
हो बरोबर आहे. दोन मोठी माणसे बोलत असताना लहानांनी तोंड बंद ठेवायचे असते.. चुकले बर का. स्वारी.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम Tue, 03/08/2016 - 22:34
यालाच bias म्हणतात. आणि दुसरी गोष्ट - त्यांचं चहावाला किंवा त्याचा मुलगा असणं जेवढेवेळा मिडियाने काढलंय त्याच्या एक शतांशानेही त्यांनी स्वतः काढलं नसेल. भक्तही त्यात आलेच. आणि जशी टिपिकल भक्त शैली आहे तशी टिपिकल विरोधी शैलीही आहेच. तसं पाहिलं तर भक्तांच्या आणि विरोधकांच्या arguments मध्ये काहीही फरक नाही - कोक आणि पेप्सी जसे डोळ्यांवर पट्टी बांधून प्यायल्यावर सारखेच लागतात (हा त्यांच्यातल्या blindfold test चा निष्कर्ष आहे. गूगलून पाहू शकता.) तसंच आहे. त्यामुळे तुम्ही भक्तांकडे एक बोट केलंत तर तीन बोटं तुमच्याकडेही रोखलेली आहेत हे लक्षात ठेवा.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 23:02
कसं आहे बोकाशेठ, ज्या लेवलचं आर्गुमेंट असेल त्या लेवलवर यायला लागतं. बाकी कट्टर भाजपसमर्थकांची (लक्षात घ्या इथे भक्त नाही म्हटलंय) एक ठराविक मानसिक बैठक आहे. एक टिपिकल स्टाईल आहे. त्यांच्यासाठी स्वतःची मतं हीच सत्य असतात. कुठे अडचण आली की हळूच भावनिक मुद्दे घुसडतात. हे फक्त मिपावर नाही तर जालावर अनेक ठिकाणी चर्चांमधे बघितलंय. उदा: तुमचं वरील वाक्य. भक्तांकडे बोट दाखवणारेच तिप्पट भक्त आहेत असे तुम्ही खुबीने सांगत आहात. त्यामुळे आपसूकच भक्तांकडे असलेलं एक बोट फारसं महत्त्वाचं नाही हे सूचित होतं. यावर बोलण्यासारखं भरपूर आहे पण असो. आता ब्रेक घ्यावा म्हणतो. जमलं तर लिहिन भक्तांची लक्षणे. धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा Tue, 03/08/2016 - 09:42
तुमच्यासारखा ज्ञानी माणूस मिपावर आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. जरा ज्ञानाच्या पुढे जाऊन बघा. कन्हैया विद्यार्थी आहे. त्याने जेएनयू मधे प्रवेश विद्यार्थी म्हणुन घेतला आहे, जर हे चुकीचे असेल तर मग त्याला राजकारण करायला डाव्यानीच पाठवले असा तर्क निघतो. घरची स्थिति हलाकीची असताना हां फ़क्त अभाविपला जेएनयू पासून लांब ठेवायचे म्हणुन राजकारण करत आहे. त्याने प्रथम आपली पीएचडी पूर्ण करावी ज्यासाठी तो भारत सरकारचे पैसे घेत आहे. एकदा डॉक्टरेट हातात आलि की मग पाहिजे तेवढे उकिरडे फुंक ना! काश्मीर हां नेहमीच ज्वलंत मुद्दा राहिला आहे. जिथे आपण हजारो जवान गमावले आहेत. काश्मिर फुटिरतावाद्याना समर्थन हे मी देशद्रोह समजतो, तुम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र समजत असाल. अशा फुटिरतावाद्याच्या खांद्याला ख़ान्दा लावुन हां आजादीच्या गोष्टी करतो. मग या देशातल्या 70% बहुसंख्य हिंदुच्या श्रद्धेशि खेळणाऱ्या महिषासुर शहीद दिवसाचा तो एका शब्दाने विरोध करु शकत नाही. प्रश्न महिषासुर शहीद दिवस साजरा करण्याचा नाही, साजरा करायला तुम्ही कुंभकर्ण, दुर्योधन, शकुनि, मारीच हे सगळे दिवस साजरे करा पण जी भाषा पत्रकात दुर्गेविषयी वापरली आहे ती घाणेरडी आहे. हेच जर दुसऱ्या धर्माच्या आस्थेबरोबर हिन्दुनि केले असते तर असहीष्णुतेचा पुर वाहला असता. कन्हैयाचे तोंड आतापर्यन्त फुटले असते. तो भलेही 2015 साली आला असेल पण चुकीच्या गोष्टीचे उदात्तीकरण करण्यार्या पवृत्तिला तो खतपाणि पण घालत आहे. ढ

In reply to by भंकस बाबा

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 09:52
या देशातल्या 70% बहुसंख्य हिंदुच्या श्रद्धेशि खेळणाऱ्या महिषासुर शहीद दिवसाचा तो एका शब्दाने विरोध करु शकत नाही. सत्तर फत्तर काही नाही!! त्या 70% हिंदुं मधले बहुतांशी भाकरी ,नोकरी ,लोकल च्या वेळा ,बॉस चा उद्धार वगैरे करत जगत असतात माफक प्रकारे धर्म फॉलो करत असतात (वर्षात एकदा कुलदेवतेला नारळ वगैरे), त्यांना उगाच तुमच्या दुखावलेल्या भावनाना वजन प्राप्त व्हावे म्हणून जोडून घेऊ नका अन गृहीत ही धरु नका, अन इतकेच ठाम असेल तर ते पुराव्याने शाबित करा की "70% हिंदूंच्या" भावना दुखावल्या आहेत, मिपावरची 4 भड़क टाळकी म्हणजे 70 % हिंदु नव्हेत.

In reply to by नाना स्कॉच

बोका-ए-आझम Tue, 03/08/2016 - 22:51
या देशातल्या 70% बहुसंख्य हिंदुच्या श्रद्धेशि खेळणाऱ्या महिषासुर शहीद दिवसाचा तो एका शब्दाने विरोध करु शकत नाही.
या वाक्याचा मला जाणवलेला अर्थ हा आहे - जी बहुसंख्य हिंदूंचं श्रद्धास्थान आहे -दुर्गा - त्यावर जो हेतुपुरस्सर हल्ला केला गेला (२०११ पासून साजरा केला जातोय महिषासुर शहीद दिवस आणि त्याच्याशी कन्हैयाचा संबंध नसेल किंवा तो त्यात सहभागीही नसेल) त्याचा तो विरोध करु शकला असता. तो त्याने केला नाही. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून तो आपला विरोध दाखवू शकला असता पण त्याने तसं केलं नाही. कदाचित त्यामुळे तो आपल्या बाजूचा आहे असा निष्कर्ष त्या महिषासुर शहीद दिवस साजरा करणाऱ्यांनी काढला असेल, पण त्याने त्यांचा गैरसमज दूर करण्याचाही प्रयत्न केला नाही. बाकी ७०% वगैरे राहू दे. जेवढं ते विधान अतिशयोक्त आहे तेवढंच तुमचं
त्या 70% हिंदुं मधले बहुतांशी भाकरी ,नोकरी ,लोकल च्या वेळा ,बॉस चा उद्धार वगैरे करत जगत असतात माफक प्रकारे धर्म फॉलो करत असतात (वर्षात एकदा कुलदेवतेला नारळ वगैरे),
हे विधान अतिशयोक्त आहे. अजिबात कर्मकांड न करणारा हिंदू हा कट्टर असू शकतो आणि दररोज दोन तास पूजा करणारा हिंदू हा liberal असू शकतो. किती टक्क्यांच्या भावना आणि कशा दुखावतात हे आपण निश्चितपणे कधीच सांगू शकत नाही. तस्मात राहू द्या.

In reply to by तर्राट जोकर

sagarpdy Tue, 03/08/2016 - 12:48
इकडे निर्दोष मुक्तता (जामिनावर नाही) तरी - "पुराव्या अभावी सुटका आहे हो! माणूसच हुशार तो कि त्याने पुरावा मागे सोडला नाही. पण हाच खरा सूत्रधार" असा प्रचार होतो. तुम्ही काय हे बंडल जामिनावर सुटलेल्या लोकांचे समर्थन करताय !? जोपर्यंत मिडिया (यात सोशल मिडीयापण आला) आणि विचारवंत या सर्वोच्च न्यायाधिकरणाने निर्दोष ठरवत नाहीत तोपर्यंत सगळे जण दोषीच! उल्टा बील्टा सब झूट.

In reply to by विवेक ठाकूर

पिलीयन रायडर Mon, 03/07/2016 - 13:30
विडंबन टाकुन कन्हैया देशद्रोही नाही सिद्ध करत आहेत.. भरमसाठ मोठे मोठे प्रतिसाद आलेत ना त्याच्या "भारत" विरोधी नार्‍यांवर.. पुन्हा ती चर्चा कशाला? पण तुम्ही लिहीलेले वाक्य कन्हैया विषयी आहे का? नाही ना? अफजल गुरु विषयी आहे ना? तुम्ही एवढंच सांगा की मोदींना विरोध हे अफजल गुरुला देशद्रोही ठरवण्याचे कारण कसे होते?

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम Mon, 03/07/2016 - 16:07
पिरातै, तुम्ही फारच अपेक्षा ठेवताय असं नाही वाटत? डोक्यावर पडायला मुळात डोकं असावं लागतं. आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त काही Amnesty Plan आहे का?

नाखु Mon, 03/07/2016 - 12:01
मधील (आगामी ) खणखणीत संवाद मिपाकर संपादक: ठाकुर ये विवेक मुझे दे !!! समीक्षक विचारवंत :नही, नही ,कभी नही (अगर होता तो देता ना!) शोले प्रेमी नाखुस सिनेमावाला.

तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 12:51
मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!). >> ह्या वाक्याचा मला समजलेला अर्थ. जो त्यांच्या (मोदीभक्तांच्या) विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल) पार्ट वन अफझल = देशद्रोही. मोदीभक्त = देशभक्त (स्वयंघोषित) कन्हय्या = मोदीविरोधी कन्हय्या = अफजल समर्थक (संशयित) मोदीभक्तांसाठी >> कन्हया (अफझल समर्थक) = अफझल समकक्ष. म्हणजे कन्हया= अफझल. म्हणजे जो जो मोदीविरोधात आहे तो अफझल गुरुसारखाच कट्टर देशद्रोही ठरवला जातो. अफझल गुरु हे एक विशेषण म्हणून घेतलंय काय ठाकूर साहेब? क्या मै सही समझ रहा हुं?

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 13:33
मला समजले पण भक्तांना कोलित मिळालंय तुम्हाला छळायला. आता गावलात, स्वस्तात नाय सुटणार तुम्ही. ;-)

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा Mon, 03/07/2016 - 13:54
अफझल समर्थक = मोदीविरोधी हे बाकी लाखात एक बोललात.. मुळात कन्हैयाने मोदींच्या विरुद्ध चकार शब्द देखील काढला नव्हता. तरी पण त्याला मोदीविरोधक म्हणून लेबल लावण्याचा तुमचा प्रयत्न तुमच्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर हळूहळू कमी करत चालला आहे. विठा बोलता बोलता त्यांची लेखणी सरकली. आता त्या सरकलेल्या लेखणीबद्दल मोकळ्यामनाने माफी मागतील की नाही? पण त्याचे ते निलाजरेपणे समर्थन करत सुटलेत आणि तुम्ही पण त्या चिखलात पडून आपले तोंड बरबटवून घेताय? असो, मी काय लिहिणार? किमान तुम्ही ज्या वाक्याचे समर्थन करायला उतरला आहात त्याचा वाच्यार्थ तरी बघा. लेखणी सरकलीय वो.. लेखकाने प्रांजळपणे ती सरकलीय हे कबूल केले की झाले. पण काय करणार, गिरे तो भी टांग उपर. त्यांचा पूर्वजन्म पाहता हे साहजिकच आहे.. तुम्ही तरी बहकू नका म्हणजे झाले. बाकी तुमचा पण पूर्वजन्म तसाच असेल तर मग काय बोलणार?

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 14:19
अफझल समर्थक = मोदीविरोधी असे नाही ते. मोदिविरोधी ते अफझल समर्थकच असे भक्तांचे लॉजिक. समिकरणं कशीही मांडली तर बरोबरच येत नाहीत. कोणी लिहलंय ह्ह्यापेक्षा काय लिहलंय हे बघितलं तर जास्त बरं होईल. मी कोणाच्याही वाक्याचं समर्थ्न करत नाही. ठाकूरांनी लेखणी सरकली हे मान्य केलं तर मला काही समस्या नाही. पण ती सरकली नसावी व त्यातून सरळ जो अर्थ निघतोय तो तसा नसावा हे माझं मत. त्यांनी सरकल्याचं मान्य केलं तर माझं मत मागे घेईल. मुळात कन्हैयाने मोदींच्या विरुद्ध चकार शब्द देखील काढला नव्हता. तरी पण त्याला मोदीविरोधक म्हणून लेबल लावण्याचा तुमचा प्रयत्न.... >> कन्हयाने मोदींच्या विरोधात नाही? जामिनावर सुटल्यानंतरचे भाषण ऐकले नाही काय? मी कशाला कोणाला लेबल लावण्याचा प्रयत्न करु? बाकी कशाचे काय अर्थ काढायचे हे ज्याने त्याने ठरवावे.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 16:01
कुणी टाइमलाईन ऑफ इवेन्ट्स बघत नसेल तर तो माझा दोष नाही. कन्हयाचे संघाच्या (संघ, भाजप, अभाविप, मोदी, इत्यादी) विरोधात असणे अफझलगुरु प्रकरणाच्या आधीपासून आहे. त्याचे प्रेसिडेन्शियल इलेक्शनसाठीचे भाषण ऐका. त्यानेच भारतविरोधी घोषणा दिल्यात हे अजून सिद्ध झालेले नाही हे लक्षात असू द्यावे.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Mon, 03/07/2016 - 20:26
जर मोदींना विरोध केला म्हणून त्याला तुरूंगात टाकायचं असतं तर जेएनयु मधील निवडणुकीतील भाषणानंतरच लगेच त्याला आत टाकलं असतं. ती निवडणुक होऊन बरेच महिने लोटले. त्यात कोण निवडून आले, त्यांनी काय भाषणे केली इ. ची जवळपास कोणत्याच माध्यमातून चर्चा झाली नाही. ९ फेब्रुवारीला हुतात्मा अफझल गुरूच्या तिसर्‍या महानिर्वाणपर्वाच्या दिवशी जो कार्यक्रम जेएनयुत झाला, त्या कार्यक्रमामुळेच त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मोदींवर टीका केल्याने नव्हे.

In reply to by तर्राट जोकर

lakhu risbud Tue, 03/08/2016 - 11:47
मोदी,भाजप यांना विरोध हा तुमचा एककलमी कार्यक्रम आहे हे मान्य,पण राबवताना त्यांच्या विरोधात जी व्यक्ती,संघटना कुठल्याही मुद्द्यावर विरोध का करेना. अश्या व्यक्ती,संघटना तुमच्या मित्र असल्यासारखे का वागतंय हे खरच कळत नाही ? दुश्मन का दुश्मन याने मेरा दोस्त हि वृत्ती का दाखवत आहात ?

In reply to by lakhu risbud

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 11:57
तुम्ही कसं बघता यावर सगळं डिपेन्ड करतं. जे एन यु प्रकरण फक्त देशविरोधी घोषणांपुरतं मर्यादित नाही. बडी लंबी और मोटी कहानी है, बहुत सारे साइडट्रॅक्सभी है. असो.

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा Tue, 03/08/2016 - 12:49
तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असलेला तुमचा डायहार्ड फैन. जरा आम्हा निर्बुद्ध लोकांना पण कळू दे राजकारण.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 14:54
तुमची मते हेच अंतिम सत्य आहेत. तुम्ही जिंकले. अभिनंदन!
मी जे लिहिले आहे त्या घडलेल्या घटना आहेत. आणि इतक्या लगेच तलवार म्यान करू नका हो.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 15:19
माझी काहीच अपेक्षा नाही. इतक्या लवकर शस्त्रे म्यान केलीत म्हणून आश्चर्य वाटले. असो.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम Mon, 03/07/2016 - 16:18
जे मोदीविरोधी ते अफझल समर्थकच असं कुठेही म्हटलेलं नाहीये. लोकसभेतले विरोधी पक्षाचे खासदार, डावे, मोदींचे त्यांच्या स्वतःच्या पक्षात असलेले विरोधक हे सगळे मोदींचे विरोधक आहेत आणि त्यांना मोदींना आणि त्यांच्या धोरणांना विरोध करायचा पूर्ण अधिकार आहे. घटनेने दिलेला. त्यांना by default अफझल समर्थक कोणीही म्हटलेलं नाहीये. उगाचच वाट्टेल ते अर्थ इतरांवर लादू नका.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 16:23
साहेब, हा अर्थ मी नाही तर श्रीमान श्रीगुरुजींनी हा धागा टाकून काढलाय. अन्यथा कन्हयाच्या धाग्याचे अफझलचा धागा काढून शब्दटूशब्द विडंबन करणे ह्याचा अर्थ तुम्ही सांगा. तुम्ही सांगितलेला अर्थ योग्य असेल तर बिनशर्त माफी मागेन. प्रॉमिस. आणि हे माझे प्रॉमिस आहे, भाजपाच्या जुमला सर्कारचे नाही.

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर Mon, 03/07/2016 - 19:58
खुद्द लेखकानं त्याचा हेतू स्पष्ट केलायं : मग "कन्हैय्या कुमार: वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!" असले फालतू धागे काढून देशद्रोह्यांचा उदोउदो करणे बरोबर आहे का? पण हे स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याच्या थाटात वावरणार्‍या भ्रमिष्टांना ते दिसण्याची सुद्धा शक्यता नाही. कळण्याची तर गोष्टच दूर.

In reply to by विवेक ठाकूर

बोका-ए-आझम Mon, 03/07/2016 - 20:05
हे आमच्या पिताश्रींचं संकेतस्थळ नसूनपण जर आम्ही असे वावरतो, तर खरोखर आमच्या पिताश्रींनी संकेतस्थळ काढलं, तर तुमचं काय होईल!

In reply to by विवेक ठाकूर

माहितगार Mon, 03/07/2016 - 22:23
पण हे स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याच्या थाटात वावरणार्‍या भ्रमिष्टांना ते दिसण्याची सुद्धा शक्यता नाही. कळण्याची तर गोष्टच दूर.
प्रथम दर्शनी या वाक्याचे स्वरुप व्यक्तिलक्ष तर्कदोषाचे आहे. मी या धाग्यावरची संपूर्ण चर्चा वाचलेली नाही, व्यक्तिगत टिकेतून आपल्या बाजूचे समर्थन होते का या बद्दल साशंकता वाटते.

In reply to by माहितगार

तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 22:39
मी या धाग्यावरची संपूर्ण चर्चा वाचलेली नाही, व्यक्तिगत टिकेतून आपल्या बाजूचे समर्थन होते का या बद्दल साशंकता वाटते. >> सिलेक्टीव प्रतिसाद वाचून मत देणे हेही व्यक्तिलक्ष तर्कदोषाचे लक्षण असावे काय?

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Mon, 03/07/2016 - 20:21
कमाल आहे. तुम्हाला आता नसलेलही दिसायला लागलंय.
जे मोदीविरोधी ते अफझल समर्थकच असं कुठेही म्हटलेलं नाहीये. लोकसभेतले विरोधी पक्षाचे खासदार, डावे, मोदींचे त्यांच्या स्वतःच्या पक्षात असलेले विरोधक हे सगळे मोदींचे विरोधक आहेत आणि त्यांना मोदींना आणि त्यांच्या धोरणांना विरोध करायचा पूर्ण अधिकार आहे. घटनेने दिलेला. त्यांना by default अफझल समर्थक कोणीही म्हटलेलं नाहीये. उगाचच वाट्टेल ते अर्थ इतरांवर लादू नका.
हा अर्थ मी धाग्यात कोठे काढलाय ते दाखवता का जरा?

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 21:56
कन्हयाच्या धाग्याचे अफझलचा धागा काढून शब्दटूशब्द विडंबन करणे ह्याचा अर्थ तुम्ही सांगा.

श्रीगुरुजी Mon, 03/07/2016 - 13:17
http://www.newindianexpress.com/thesundaystandard/Kanhaiya-was-Aware-of-Anti-India-Event-JNU-Registrar/2016/03/06/article3312100.ece
Kanhaiya was Aware of 'Anti-India' Event: JNU Registrar
University registrar Bupinder Zutshi, diposing before the high-power enquiry committee constituted by Vice-Chancellor Jagadesh Kumar, has said that Kumar was against the authorities’ decision to cancel the ‘anti-India’ programme. “At around 16:42 hours (on February 9), I got a call from the mobile number 9********7. The caller said, ‘Sir, I am Kanhaiya Kumar speaking, why did you withdraw the permission for the cultural event as the organisers are the same who have got requisite permission for organising the event?’” The registrar’s deposition, accessed by The Sunday Standard, indicates that the student union president was aware of the ‘anti-national event’ beforehand. Zutshi further stated that he told Kumar that he had not given any permission to organise any event. “It is the DSW who gives permission. So I handed the mobile to DSW and asked him to talk to students,” said Zutshi. Before the interrogators, Kumar had said that he was in his room till 5 pm and was not aware of any such ‘anti-national’ activities on the campus. The interrogation report of Kumar states that he only came to know about the event through some of his friends sitting outside the Brahmaputra Hostel at around 5 pm when he woke up and went outside to have snacks and tea. Contrary to it, Zutshi told the enquiry committee, “I had called a meeting of JNSU in my office at 3 pm on February 9 to discuss the route for the new bus acquired by JNU for disabled students. Mr Kumar and Mr Rama Naga reached first. Around 3 pm and we had a discussion on the bus route. After 10 minutes, Mr Saurav Sharma (ABVP member and JNSU joint secretary) also came.We all discussed the bus route for 10 minutes.” Zutshi said Sharma told him that he wanted to talk about some serious issues which were about to happen on the campus. Both Kumar and Naga were sitting there. “Sharma showed me a pamphlet regarding the ‘cultural event’ on ‘judicial killing of Afzal Guru’ and said some of the students are organising this event today (February 9, 2016) at 5 pm at Sabarmati Dhaba,” Zutshi told the committee.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी मी दीपक चौरीसिया च्या लाइव डिबेट ची लिंक दिली आहे त्यात तुम्ही वरती जे दिले आहे ते कनैह्या स्वतः काबुल केले आहे , त्याच्या मुलाखती मधून थोडक्यात आशय असा निघतो कि उमर चा एका प्रश्न लक्षात घेण्या जोगा आहे त्याने आपले पोस्टर विद्यापीठात लावले होते व प्रशासनाला हा कार्यक्रम काय आहे हे सांगितले होते तरीही प्रशासनाने आधी परवानगी दिली मग कार्यक्रमच्या आधी १ तास ती रद्द का केली मुळात रोहित च्या पार्श्वभूमीवर अश्या वादग्रस्त कार्याक्रमाल्ला परवानगी सुरवातीला देणे ही प्रशासनाची चूक ह्या कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मिडिया वर होते अभाविप ने ह्याचा विरोध केला व ह्या कार्यक्रमाला आम्ही विरोध करणार हे प्रशासनाला सांगितले ह्यामुळे कायदा सुव्यवस्था थोडक्यात प्रकरणातील गंभीरता पाहून हा कार्यक्रम आयत्यावेळी रद्द झाला चेकाळलेले उमर व कनैह्या ह्यापैकी अध्यक्ष कनैह्या ने प्रशासनाला जाब विचारला समाधान कारक उत्तर कानैह्याला मिळाले न्हाई म्हणून प्रशासनाला फाट्यावर मारून कनैह्या उमर ह्यांनी संयुक्तीपणे कार्यक्रम सुरु केला. ह्यात कानैह्याने आपल्या पक्षाचे गीत म्हटले ,भारत विरोधी नारे दिले न्हाई मात्र उमर तेव्हा गप्पा बाजूला उभा होता पुढे जेव्हा उमर चा कार्यक्रम सुरु झाला भारत विरोधी घोषणा सुरु झाल्या तेव्हा अभाविप आली व प्रतुत्तर देण्यास सुरवात झाली तेव्हा कनैह्या चा समूह उमरचे कवच कुंडल बनून अभाविप ला थांबविण्याचे काम करत होता ,केंद्र सरकर ने अत्यंत हुशारीने सुरवातीचे काही दिवस काहीही न करता पुरावे गोळा करायला सुरवात केली जे कोर्टात येतीलच पण ह्या चार दिवसात कनैह्या व उमर हे बेफाम झाले , प्रत्येक टीव्ही चेनेल मध्ये येउन लाइव डिबेट मध्ये बडबड केली हीच बडबड कानैह्याला नडणार आहे उदा मी दिलेल्या लिंक मधून स्पष्ट अर्थ निघतो कि केवळ अभाविप मुळे हा कार्यक्रम थांबला म्हणून कनैह्या ने उमर ला मदत करायचे ठरवले माझ्यामते उमर चा कार्यक्रम सुरवातीला प्रशासनाने रद्द केला असता तर कनैह्या ने एवढे सक्रिय सहभाग घेतला नसता कदाचित कनैह्या चे अटक होण्याच्या पूर्वी अनार्ब , सरदाना ते दीपक चौरसिया ह्यांच्या कार्यक्रमात मुलाखतीत चीड आणणारी गोष्ट अशी कि माझ्या उमरच्या विचारांना पाठिंबा नाही मात्र त्यांना त्यान्ह्चे विचार मांड्यांची मोकळीक आहे ही त्यांची भूमिका आणि अभाविप चे गुंड मध्ये येउन हा कार्यक्रम कसा थांबतात हा सवाल , थोडक्यात उमर काय वाट्टेल ते बोलो मला काय त्यांचे सोयरसुतक नाही पण अभाविप विद्यापीठात सोकाळता कामा नये हा मुलगा जेल मधून बाहेर आला व भाषणबाजी केली करण थापर ने अनुपम फेम प्रसिद्ध जस्टीस गांगुली व इतर लोकांना बोलावून कनैह्या साठी कार्यक्रम केला. त्यात सुरवातीला कनैह्या च्या कार्यक्रमात काही लोक अध्यापक गिलानी साठी बोर्ड घेऊन होते ह्य्मुळे कानैह्याला काही त्रास होईल का अशी विचारणा केली त्यांनतर पध्धतशीर पणे कनैह्या साठी जस्टीस राणी ने कसा चुकीचा निर्णय अंतरीम जमीन देतांना दिला ह्यावर आख्यान सुरु झाले , ह्यात सगळ्यात दुर्दैवी गोष्ट जस्टीस गांगुली ह्यांना आपल्या सहकार्यांनी अफजल ला दिलेली फाशी चुकीची वाटली तिथे त्यांना कनिष्ठ न्यायाधीशांचा निर्णय कसा पटेल , त्यांनी जे करण दिले ते मला अंतर्मुख करून केले ह्या देशात देशद्रोहाची कायद्यात उल्लेख नाही व्याख्या नाही म्हंणून पूर्वी जे अश्या संधर्भात निर्णय देतांना कोर्टाने निरीक्षणे नोंदवली त्याचा दाखला त्यांनी दिला ह्यासाठी देशविरोधी नारे हा देशद्रोह नाही हा लाडका सिद्धांत देखील मांडला , अमेरिकन petrioat सारख्या कायद्याची भारताला किती नितांत गरज आहे ह्याची जाणीव झाली

In reply to by श्री गावसेना प्रमुख

कन्हैय्या च्या प्रकरणात समर्थन करणाऱ्यांची संख्या जर बघितली तर मला मोदींची काळजी वाटायला लागते,पुढच्या इलेकशन ला मोदी पक्के हरणार आणि मूलनिवासी हे प्रचंड बहुमताने निवडणार आणिमोदींना जेल मध्ये टाकतील।

चेक आणि मेट Mon, 03/07/2016 - 20:03
देशामध्ये तीन-चार टक्के कम्युनिस्ट आहेत,तसेच मिपावरही एक-दोन आयडी कम्युनिस्ट असतील असे समजूया,आणि फाट्यावर मारूया. . . वंदे मातरम्।

धनावडे Mon, 03/07/2016 - 20:14
माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे आताच्या सरकारने देशाच एवढ काय नुकसान केलय कि सगळे विचारवंत एवढे काळजीत पडलेत आणि एवढा विरोध करतायत मला तरी एक सामान्य माणूस म्हणून काय धोकादायक वाटत नाय(कदाचित मी सामान्य असल्यामुळे मला कळत नसेल)

In reply to by धनावडे

श्रीगुरुजी Mon, 03/07/2016 - 20:23
हे जे विचारवंत, पुरोगामी इ. इ. समजले जात होते/आहेत, त्यांचा मोदी आल्यापासून रमणा बंद झाला आहे. त्यामुळे ही सगळी चिडचिड.

In reply to by धनावडे

निशांत_खाडे Tue, 03/08/2016 - 01:33
चर्चा करायला मुद्दाच सापडत नाहीये न यांना.. त्यात हे कन्हैया प्रकरण सापडले आणि बस तुटूनच पडले सगळे.. रच्याकने, काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते कि बेंगलोरच्या एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारा अंतर्गत नरेंद्र मोदींवर होणाऱ्या शासकीय खर्चाची चौकशी केली. पंतप्रधान कार्यालयातून अशी माहिती देण्यात आली होती कि मोदींच्या कपड्यावर, जेवणावर व वयक्तिक मोबाईलच्या बिलावर शासनाकडून कुठलाही खर्च केला जात नाहीत, तो सर्व खर्च मोदी स्वतः करतात. त्यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या आचाऱ्याचा पगारही नरेंद्र मोदी स्वतःच देतात. एका व्यक्तीने तर मोदींच्या किचन मध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाले व भाजीपाल्याची खरेदी पावती मागितली होती पण खर्च मोदींचा वयक्तिक स्वरूपाचा असल्याने ते जमले नाही. करत असल्याने ते देणे शक्य नव्हते. अश्याच एका दुसऱ्या उत्तरात असे सांगण्यात आले होते की मोदींनी कार्यभार स्विकारल्यापासून एकही रजा घेतलेली नाही व ते स्वतःच्या मानधनातील पंचेवीस हजार रुपये दरमहा 'पंतप्रधान आपत्कालीन मदत निधी' साठी दान करतात. लवकरच 'देशात लाखो लोक उपाशी असून सुद्धा मोदी दोन वेळा जेवण करतात हे निंदनीय आहे' असाही ऐकायला मिळायची शक्यता आहे.. दुवा: http://www.newindianexpress.com/thesundaystandard/Food-for-Thought-PM-Foots-His-Own-Kitchen-Bill/2015/12/27/article3197690.ece

गामा पैलवान Mon, 03/07/2016 - 20:27
विवेक ठाकूर, आपला इथला प्रतिसाद वाचला. १. >> माझा आक्षेप अफजल आणि कन्हैयाला एकाच लाईनीत बसवण्याला आहे. असं बघा की जनेवित भारतद्रोही घोषणांचा जो प्रकार झाला तसाच अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत तीनेक वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हा अफझल गुरूला फासावर लटकवलं होतं. त्यावेळेस तर मोदीसरकारही नव्हतं. जर तेव्हाच अशा घटनांना चाप लावला असता तर आज जनेवित अशा भारतद्रोही घोषणा दिल्या गेल्या नसत्या. तर मग उद्या इतरत्र हाच प्रकार होऊ नये म्हणून आज कन्हैय्याला दमात घेतलं तर काय बिघडलं? २. >> .... सध्या जे सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह असं चित्रं रंगवलं जातंय त्या विरोधात आवाज उठवला आहे. काही अपेक्षा मनात ठेवून जनतेने मोदींना सत्तेत बसवलं आहे. त्या अपेक्षा अमुविच्या प्रसंगी पुऱ्या झाल्या नव्हत्या. अगदी अफझलला फासावर लटकावला तरीही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विवेक ठाकूर Tue, 03/08/2016 - 17:07
आहो, एखाद्याला देशद्रोही ठरवणं म्हणजे त्याला बरबाद करणं आहे. काही अपेक्षा मनात ठेवून जनतेने मोदींना सत्तेत बसवलं आहे काय अपेक्षापूर्ती झालीये वाटतं तुम्हाला दोन वर्षात ?

In reply to by विवेक ठाकूर

गामा पैलवान Tue, 03/08/2016 - 20:58
विठा, पुरी पाच वर्षं द्यायला हवीत ना? तरी माझ्या ज्या अपेक्षा पुऱ्या होताहेत असं वाटतंय त्या सांगतो. २६/११ सारखे घातपात तर बंद झाले ना? देशभर फटाक्यासारखे बॉम्बस्फोट व्हायचे ते बंद झाले ना? आ.न., -गा.पै.

ट्रेड मार्क Tue, 03/08/2016 - 02:00
मोदी सरकारची तुलना हिटलर, मुसोलिनी ई ई बरोबर होत आहे तर RAW, CBI सरकारच्या हातातले बाहुले आहे असे म्हणले जाते. असे असेल तर ज्या प्रमाणे गेस्टापोने विरोधी लोकांचा कोणाला सुगावा लागू न देत काटा काढला तसं जरासुद्धा विरोधात बोलणाऱ्या या विद्यार्थ्यांना परस्पर वाटेला लावणे असे कितीसे अवघड असावे या फ़ासिस्ट सरकारला? एवढे सरळ सरळ देशविरोधी, धर्मविरोधी बोलणारे तर सगळेच गेले कित्येक महिने सुखेनैव बरळत आहेत. नाहीतर वद्रा परिवार (रोबर्ट सोडून) जसे सगळे ठराविक काळात यमसदनास गेले तसे या विद्यार्थ्यांना नाहीसे करणे अवघड नसावे. मग का सगळे एवढे बोंबलत आहेत? मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा काय मोठा फरक झालाय तुमच्या आमच्या दैनंदिन जिवनात?

In reply to by ट्रेड मार्क

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 06:39
मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा काय मोठा फरक झालाय तुमच्या आमच्या दैनंदिन जिवनात? 1. मते थोड़ी वेगळी पडतात म्हणून मी राष्ट्रद्रोही असल्याचे इतकेवेळा (घाण घाण शिव्या देऊन) सांगितले गेले की आम्हाला फेसबुक प्रोफाइल डिलीट (डीएक्टिवेट नाही) करून सोशल मीडिया सन्यास घ्यावा लागला 2. काँग्रेस वाईट आहेच पण बीजेपी सुद्धा काही धुतल्या तांदळाची नाही अन वाईस वर्सा बोलल्याची जबर शिक्षा झाली 3. डाळ 200 ₹/किलो भावाने खावी लागते आहे 4. सर्विसटॅक्स वाढल्यामुळे बायको सोबत भांडणे अन स्वयंपाकघरातील भांड्यांना पोचे यायचे प्रमाण वाढले आहे!! तुर्तास इतके आठवले

In reply to by नाना स्कॉच

सुबोध खरे Tue, 03/08/2016 - 10:40
नाना साहेब मूळ विषय काय ? आणी आपण तो कुठे नेताय? काहीही झाले कि "मोदी साहेबांवर आणी अच्छे दिन" वर टीका केल्याशिवाय तुमच्या घरात "डाळ" शिजत नाही का? डाळ महाग झाली म्हणून तुम्ही बोंब मारली कि कांदे स्वस्त झाले म्हणून इतर लोक तुम्हाला खिजवणार. विषय काय आणी आपण तो कुठे नेतो आहे? सर्विसटॅक्स वाढल्यामुळे बायको सोबत भांडणे अन स्वयंपाकघरातील भांड्यांना पोचे यायचे प्रमाण वाढले आहे!! बोंब मारायची ठरवलीच आहे म्हणून असे? अजून सेवा कर "वाढलेला" नाही. ०१ एप्रिल पासून वाढणार आहे. अगोदरच आपल्या भांड्यांना पोचे आले? आणी बायकोबरोबर भांडणे वाढली ?

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 10:48
तुम्ही अजूनही साडेबारा टक्के सेवाकर देताय का? शिंचे आमच्याच बिलात साडेचौदा टक्के का येतंय काय माहित.

In reply to by सुबोध खरे

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 11:18
आम्ही आदर करतो हो तुमचा, (आता तुम्ही तो मागत नाही आम्ही तो स्वतः उस्फुर्त देतो) कारण तुम्ही वय हुद्दा समज वगैरे ने वरिष्ठ अन ज्येष्ठ आहात, तुम्हीच जर काय बोलला पेक्षा कोण बोलला वर लक्ष द्यायला लागले तर आम्ही काय करु शकतो सरजी?? तुम्हाला माझा विरोध दिसला पण ट्रेडमार्क ह्यांनी विचारलेला प्रश्न नाही दिसला का? (मी हाईलाइट केलाय तरी तो). मला मुद्दा भरकटवायची हौस नाही साहेब, जो प्रश्न विचारला गेलाय त्याला प्रश्न प्रमाणिक राहून उत्तर दिले आहे, अन मुख्य म्हणजे मी स्वतःपुरते बोललो आहे, मला लाल पांढरे झेंडे खांद्यावर घेण्यात रस नाही तर लोकल सुटेल ह्या भीती ने फाटका टॉवल अन गंजीफ्रॉक खांद्यावर घेऊन बाथरूम कड़े धावण्यात रस आहे, मला एका प्रतिसादातून एक प्रश्न सापडला ज्याला मी "मॅटर ऑफ़ फॅक्ट" का काय म्हणतात तसा राहून माझ्या स्वल्प वैयक्तिक अनुभवानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय, तो तुम्हाला इतका खुपावा?? ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना खड़सावा की साहेब ज़रा ! का फ़क्त आम्हीच दिसतो! अन सेलेक्टिव खड़सावणे करायचे असेल तर सरळ सांगा की ते अन त्यांच्यासरखे तुमचे लाडके अन आम्ही तुमचे दोड़के ते!. आम्ही तरी तुम्हाला पुर्ण मिपाचा एसेट समजतो बुआ, अन आमचे वैयक्तिक श्रद्धास्थान, तसे नसता नेवी मधे जायचे म्हणाणाऱ्या धाकट्या भावाला तुमचे लेख पोथी सारखे पाठ करायला लावले नसते!. विद्यमान सरकारच्या काही गोष्टी पटतात काही नाही ज्या पटत नाहीत त्या मांडल्या तर आपण माझ्यावर शिक्के मारायची गरज नाही, मारू नयेत, अर्थात ही एक विनंती आहे! उणे अधिक माफ़ी असावी ____/\____ -नाना जाता जाता, दिल्लीत श्री श्री रविशंकर ह्यांच्या कार्यक्रमासाठी (खासगी संस्था खासगी कार्यक्रम) भारतीय भुदलाकडून पांटून ब्रिज बांधून घेत आहेत म्हणे? ह्यावर आपले मत एक अधिकारी म्हणून जाणून घ्यायला आवडेल

In reply to by नाना स्कॉच

सुबोध खरे Tue, 03/08/2016 - 12:09
1. मते थोड़ी वेगळी पडतात म्हणून मी राष्ट्रद्रोही असल्याचे इतकेवेळा (घाण घाण शिव्या देऊन) सांगितले गेले की आम्हाला फेसबुक प्रोफाइल डिलीट (डीएक्टिवेट नाही) करून सोशल मीडिया सन्यास घ्यावा लागला याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. बाकी डाळी किंवा कांद्याच्या भावाबद्दल आरडा ओरड मूळ मुद्द्याच्या व्यस्त प्रमाणात झाली आहे त्याबद्दल वाईट वाटते. मुद्दा बरोबर कि चूक याबद्दल मी काहीही बोलत नाहीये. मुद्दा महागाई का झाली आहे आणि किती झाली आहे? याला मोदी सरकार किती जबाबदार आहे? अवर्षण किती आणि आन्तर राष्ट्रीय परिस्थिती किती जबादार आहे याचा नीट उहापोह न करता सवंग विधाने करणारे लोक. आन्तर राष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या तरी आमच्या किमती कमी का होत नाहीत याबद्दल ओरडणार्या लोकांना समजावणे कठीण आहे. सवंग लोकप्रियते साठी (सीताराम येचुरी म्हणतात तसे) लोकांना स्वस्त पेट्रोल/ डीझेल देण्यापेक्षा दूरगामी आपला राखीव तेलसाठा निर्माण करण्यासाठी हा पैसा वापरला गेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करून उपयोग होत नाही http://www.isprlindia.com/aboutus.asp http://www.isprlindia.com/aboutus-2.asp http://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/sought-rs-15000-crore-in-budget-for-second-phase-of-strategic-oil-reserves-project-oil-minister-dharmendra-pradhan/articleshow/50848724.cms http://www.livemint.com/Politics/zLaLDxE5ZbpiKcQXcW20AP/UAEs-Adnoc-to-store-crude-in-Indias-strategic-facility.html हा पैसा तुम्हाला स्वस्तात पेट्रोल आणि डीझेल दिले तर सरकार कुठून आणेल? आणि डीझेल स्वस्त केले नाही तर महागाई होणार कारण दुष्काळ आणि जागतिक मंदी आहेच जी काही मोदी सरकारने केलेली नाही. इंग्रजीत म्हण आहे कि शांततेच्या काळात तुम्ही जितका घाम गाळाल तितके युद्धात तुम्हाला कमी रक्त सांडावे लागेल. एक गोष्ट नक्की आहे कि गेल्या पाच वर्षात कोणताही निर्णय न घेतल्याने जे नुकसान झाले आहे त्या प्रमाणात हे सरकार जसे देशा बद्दल निर्णय घेत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. बहुसंख्य पत्रकार आणि डावे लोक यांचा रमणा बंद झाला आहे म्हणून त्यांची कोल्हे कुई चालू आहे हीही वस्तुस्थिती आहे. असो

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 12:18
बहुसंख्य पत्रकार आणि डावे लोक यांचा रमणा बंद झाला आहे म्हणून त्यांची कोल्हे कुई चालू आहे हीही वस्तुस्थिती >> बाकीचं नंतर, पण हे वाक्य फार वाचायला मिळतंय. ह्याबद्दल काही पुरावा आहे काय? म्हणजे आधी होता ह्याचा आणि आता बंद झालाय ह्याचाही.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Tue, 03/08/2016 - 12:27
तुम्हाला पुरावा देण्यासाठी कष्ट घ्यावे असे मला अजिबात वाटत नाही. याचा तुम्हाला पाहिजे तो अर्थ तुम्ही काढू शकता. वरच्या विधानातील फक्त संदिग्ध वाक्य निवडून बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं किंवा बळी गेलेल्या निरपराध लोकांवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे किंवा रवींद्र म्हात्रे यांचे कष्ट सोडून टूण्डाचे किंवा सलमान खानचेच कष्ट तुम्हाला दिसतात तेंव्हा आपल्याशी अधिक बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही. धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 13:12
मी काहीही दुर्लक्ष केले नाही. 'बाकीचे नंतर' बोललो. तुम्ही वस्तुस्थिती आहे असे म्हणून वाक्य लिहिता, विचारले तर संदिग्ध आहे म्हणता याचा काय अर्थ घ्यावा? बाकी बळी गेलेले, म्हात्रे, कष्ट इत्यादी असंबंधित मुद्दे इथे मांडून भावनिक संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. बरं जिथे टुंडाचा विषय मांडला तो न्यायालयाचा निकाल मान्य आहे की नाही हाच प्रश्न विचारण्यासाठी होता. माझे टूंडाबद्दल भारी प्रेम उतू चाललंय म्हणुन नाही. तुम्ही त्याला अजून उत्तर दिले नाही पण टुंडाचा इतिहास बघा चे उपदेश मला दिले. टुंडा, अफझल, कन्हया, साध्वी, संजय दत्त, भटकल, जुन्दाल, समीर यांबद्दल न्यायालय जो निर्णय दिला/देईल तो मला मान्य असेल असे मी म्हटले, तुम्ही तसे म्हटलेले नाही. हा दांभिकपणा आहे. मुद्दा टूंडा किंवा सलमान खानचा नाही हे शेंबड्या पोरालाही कळेल. जेव्हा नावडते आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटतात तेव्हा न्यायालयात न्याय होत नाही असे म्हणता, तेच नावडते निरपराध अडकले की न्यायालयाने कसे फटकारले ह्याचे गुणगान गाता. हा दुटप्पीपणा आहे. हा प्रश्न तुम्ही टाळत आहात. तुम्ही वस्तुस्थिती आहे असे म्हणुन बेधडक विधानं करता, त्याबद्दल विचारले तर उत्तर देता येत नाही म्हणून पलायन करता. तुमची बाजू सांभाळायला मग दुसरे सदस्य येतात. चर्चेत टिकत नाही बघून भावनिक कोलांट्या मारणे आपल्यासारख्या सदस्यांना मुळीच शोभत नाही. असो.

In reply to by सुबोध खरे

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 12:25
तेलाच्या भावा बद्दल मी काही तरी म्हणले आहे का? हे एक, तेलाच्या भावाबद्दल किंवा कच्चे तेल बाजाराबद्दल मला शुन्य माहीती आहे म्हणून मी त्यावर बोलतच नाहीये, शिवाय आधीच्या सरकार पेक्षा कमी भावात पेट्रोल मिळते आहे म्हणून मी आनंदी सुद्धा आहे, डाळी बद्दल मला झळ पोचते आहे म्हणून मी तितके मात्र बोलतोय बाकी डाळ उद्योगाबद्दल मिपावरचे दूसरे एक सदस्य श्री सोन्याबापु ह्यांनी विस्तृत माहीती देऊन डाळ तुटवडा हा नैसर्गिक नसुन मानवनिर्मित आहे अन त्याच्यामागे जमाखोर व्यापारी आहेत हे विवेचन "एका वर्षा नंतर" ह्या धाग्यात केल्याचे स्मरते, माफ़ करा पण मला खोदकामात गती नाही म्हणून लिंक देऊ शकत नाहीये मी, तरीही वरती उल्लेख केलेल्या धाग्यात ते सापडु शकेल असे सुचवतो. एक व्यनि सोन्याबापु ह्यांना टाकून जमल्यास ती माहीती तुमच्यासाठी मागवु शकतो, (जर त्यांना द्यावी वाटली तर) बहुत काय बोलणे, मी पत्रकार पण नाही अन सरकारी मलाई खाणारा डावा विचारवंत सुद्धा नाही त्यामुळे ते उल्लेख का केले आपण हे काही मला कळले नाही बघा साहेब. सरकार माझ्यासारख्याना जे रिलीफ देत आहे त्याचे कौतुक आहेच पण ज्याच्यात मला त्रास आहे ते मात्र मी मांडतो आहे अन मांडत राहीन इतके सांगतो अन आपली रजा घेतो आता

In reply to by नाना स्कॉच

सुबोध खरे Tue, 03/08/2016 - 12:36
The government budgeted a contribution of Rs.20,000 crore for the fund in fiscal year 2015-16 while another Rs.20,000 crore is expected to be raised from sovereign wealth funds हे शेवटच्या दुव्यातील वाक्य आहे नाना साहेब २०,००० कोटी रुपये या वर्षात आणी तितकेच पुढच्या वर्षात सरकारला जनतेकडूनच घ्यावे लागतील ना? मग २० कोटी लोक जे कर भरतात/ भरू शकतात (उच्च आणी मध्यम वर्गीय) त्यांच्या कडून हा पैसा जर घ्यायचा तर माणशी १००० रुपये वर्षाला होतात. हि महागाई तुम्हाला आहे तशी मला हि आहे पण दूरदृष्टीचा विचार केल्यास हा पैसा देणे श्रेयस्कर आहे. वरील तिन्ही दुवे एकदा वाचून घ्या अशी तुम्हाला विनंती आहे. आणी हेही आपल्याला पटत नसेल तर सोडून द्या अधिक उणे काही अनवधानाने बोललो असेल क्षमा करा.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 13:25
२०,००० कोटी रुपये या वर्षात आणी तितकेच पुढच्या वर्षात सरकारला जनतेकडूनच घ्यावे लागतील ना? मग २० कोटी लोक जे कर भरतात/ भरू शकतात (उच्च आणी मध्यम वर्गीय) त्यांच्या कडून हा पैसा जर घ्यायचा तर माणशी १००० रुपये वर्षाला होतात. >> माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे म्हणत आणि तो १०० दिवसात देशात परत आणू अन्यथा फाशी चढवा हे म्हणले. त्याबद्दल अजिबात विचारु नका आणि हे माणशी हजार रुपये म्हणजे कैच नै, देशासाठी एवढा त्याग करा असल्या बाता ऐकायला लागतायत. मोदींच्या सरकार चालवण्याच्या पद्धती, निर्णय ह्याबद्दल अजिबात चीड, राग, द्वेष नाही. पण भक्तांच्या असल्या तर्कांनी प्रचंड राग येतो. उद्या मोदी म्हणतील श्वास घेणे देशासाठी योग्य नाही तर हे भक्त काय करतील देव जाणे.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 15:35
माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे म्हणत आणि तो १०० दिवसात देशात परत आणू अन्यथा फाशी चढवा हे म्हणले.
(१) माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का? (२) काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फासावर चढवा असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का?

In reply to by विवेक ठाकूर

श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 20:48
तुम्हाला फार घाई बुवा. मागे मिपावर एक उंदीरमामा होते. ते मिपावर दिवसरात्र पडीक असायचे. ते काहीतरी प्रतिसाद द्यायचे आणि त्याला १-२ मिनिटात उत्तर नाही आले तर लगेच "गुरूजी धाग्यावरून पळून गेले", "गुरूजींनी या धाग्यावरून काढता पाय घेतला" अशी स्वत:चीच सोयिस्कर समजूत करून घेऊन मनोमन खूष व्हायचे. तुमचंही तसंच दिसतंय. मी काही इथे २४ तास पडीक नसतो. दुपारी जेवणानंतर थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ मी इथे येतो. इतरवेळी पोटापाण्यासाठी उद्योग करावा लागतो. तुमचं बरं आहे. तुम्ही सदासर्वकाळ इथे राहू शकता. माझ्या अनुपस्थितीत वरील प्रतिसाद आल्यावर मी इथे नसल्याने त्यावर माझ्याकडून लगेच उत्तर आले नाही तर लगेच "गुरूजींची वाचा बसली" अशी तुम्ही सोयिस्कर समजूत करून घेऊन खूष झालेले दिसताय. काही हरकत नाही. माझ्या अनुपस्थितीमुळे एखादा आनंदी होत असेल तर चांगलंच आहे.

In reply to by विवेक ठाकूर

श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 20:41
ही फीत सर्वत्र प्रसिद्ध आहेच. मीसुद्धा ती पूर्वी पाहिली आहे. परंतु काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फासावर चढवा असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का?

In reply to by विवेक ठाकूर

गामा पैलवान Tue, 03/08/2016 - 21:02
काहीही हं विठा! मोदींनी विदेशी पैशाचा आकडा लक्षात यावा म्हणून फक्त उदाहरण दिलंय की प्रत्येक भारतीयास पंधरावीस लाख रुपये असेच मिळून जातील. याचा अर्थ अस नव्हे की मोदी तो पैसा आणून वाटणार आहेत. (तसा तो आणून वाटला तर चलनफुगवटा भयानक वाढेल त्याचं काय करायचं?) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मोदक Tue, 03/08/2016 - 21:08
असे कसे म्हणता गापै?? रघुराम राजन सही करून म्हणतात "मै धारक को अमुक अमुक रूपये अदा करने का वचन देता हूं" ते म्हणजे रघुराम राजन साहेब त्यांच्या खिशातून अदा करतात - तुमा झंटलमेन लोकांना इत्के शिंपल कळत नै का?

In reply to by गामा पैलवान

विवेक ठाकूर Tue, 03/08/2016 - 23:19
गुरुजींचे दोन प्रश्न होते. पैकी पहिला प्रश्न हा होता : (१) माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का? आता विडिओ दिल्यावर त्यांनी दुसरा प्रश्न पुढे काढून, पहिला मागे सारला आहे .... ही फीत सर्वत्र प्रसिद्ध आहेच. मीसुद्धा ती पूर्वी पाहिली आहे. परंतु काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फासावर चढवा असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का? मोदींचं भाषण ही भोळ्या जनतेला फसवायची एक चाल होती (आणि भारतात अशा मतदारांची संख्या अमाप आहे)... कारण निवडून आल्यावर त्यांचे अमीत शहा निर्ल्लज्जपणे `वो तो चुनावी जुमला था' असं म्हणालेत. आणि म्हणून तर बिजेपीला भारतीय जुमला पार्टी म्हणतात!

In reply to by विवेक ठाकूर

श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 23:29
आता विडिओ दिल्यावर त्यांनी दुसरा प्रश्न पुढे काढून, पहिला मागे सारला आहे ....
मुळात त्यांनी दोन मुद्दे एकत्र केले होते (माणशी १५ लाख व काळा पैसा परत न आणल्यास मला फाशी द्या). मी ते मुद्दाम वेगळे करून विचारले. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत दिल्याने त्या मुद्द्यावर वाद नाही. दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्याशीच संबंधित आहे व त्यात त्यांची तपशिलाची चूक झाली आहे. म्हणून तर मी त्यांना दुसर्‍या मुद्द्याचाही संदर्भ विचारला. तो अजून त्यांनी दिलेला नाही.
मोदींचं भाषण ही भोळ्या जनतेला फसवायची एक चाल होती (आणि भारतात अशा मतदारांची संख्या अमाप आहे)... कारण निवडून आल्यावर त्यांचे अमीत शहा निर्ल्लज्जपणे `वो तो चुनावी जुमला था' असं म्हणालेत. आणि म्हणून तर बिजेपीला भारतीय जुमला पार्टी म्हणतात!
असले सब्जेक्टिव्ह व स्वतःचा मनचे लिहू नका. याच न्यायाने केजरीवालांची आश्वासने ही दिल्लीतल्या भोळ्या जनतेला फस्विण्याची एक चाल होती कारण दिल्लीत अशा मतदारांची संख्या अमाप आहे किंवा नितीशकुमार/लालूची आश्वासने ही बिहारमधील भोळ्या जनतेला फस्विण्याची एक चाल होती कारण बिहारमध्ये अशा मतदारांची संख्या अमाप आहे असे म्हणता येईल. काळा पैसा परत न आणल्यास मला फाशी द्या असे मोदी कोठे व कधी म्हणाले त्याचा संदर्भ हवा आहे. तो असल्यास द्या.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Wed, 03/09/2016 - 00:16
सरळ प्रश्न विचारला की भक्त कसे उत्तरं देतात ह्याचा हा उत्तम नमुना. काळा पैशाचं काय झालं तो प्रश्न सोयिस्कर बाजूला टाकून हे फाशीचं कधी बोलले हेच राहून राहुन विचारताय. आश्वासनं देऊन जनतेला फसवलंय म्हटलं तर इतरांचे दाखले देतात. मग त्यांच्यात आणि तुमच्या काय तो डिफरंस? आधी काळ्या पैशाचं काय झालं ते सांगा जमलं तर. माणशी १५ लाख होतील एवढी रक्कम आहे म्हणे परदेशात. आमच्या अकाऊंट ला येणार नाही ते आम्हालाही माहित आहे. तेवढं अर्थशास्त्र कळतं. पण देशाच्या अकाउंटमधे तर येणार होते की नाही? त्यानेच विविध योजना, रस्ते, पाणी, वीज इत्यादींचे प्रश्न सुटणार होते. मग आता काळा पैशाच्या मुद्द्यावर टांग मारुन देशासाठी योगदान असे मोठेमोठे शब्द वापरुन प्रामाणिकपणे कर भरनार्‍यांच्याच खिशात हात घातला. वरुन हजार रुपये फार नाही हो देशकार्यासाठी असे भक्त निर्लज्जपणे म्हणायला. लक्षात घ्या काळा पैशाच्या मुद्द्याने भाजपाला निवडणुक जिंकण्यात सिंहाचा वाटा निभावलाय. त्याचे उत्तर द्यायचे सोडून फुटकळ डिटेल्समधे चर्चा फिरवू नका. भाजपने आपले प्रॉमिस निभावले काय हे सांगा मग फाशीचा संदर्भ सांगतो. भाजपाच्या राजकिय विरोधकांच्या नानाची टांग, हा प्रश्न तुम्हालाच मत देणारी जनता विचारते तेव्हा काय?

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर Wed, 03/09/2016 - 07:01
आमच्या अकाऊंट ला येणार नाही ते आम्हालाही माहित आहे. तेवढं अर्थशास्त्र कळतं. पण देशाच्या अकाउंटमधे तर येणार होते की नाही? त्यानेच विविध योजना, रस्ते, पाणी, वीज इत्यादींचे प्रश्न सुटणार होते. मग आता काळा पैशाच्या मुद्द्यावर टांग मारुन देशासाठी योगदान असे मोठेमोठे शब्द वापरुन प्रामाणिकपणे कर भरणार्‍यांच्याच खिशात हात घातला.
आधी स्वच्छ भारत अभियान आणि आता शेतकरी कल्याण ! हे भिकार सरकार फक्त नवे भावनिक शब्द काढून लोकांना लुटण्याचा धंदा करते आहे. अर्थात, मोदींचं कोणतंही भाषण पाहा निव्वळ भावनिक आव्हानं आणि पवारांचे गुरु शोभावे अशी निसरडी गुळगुळीत विधानं. त्यामुळे `काम काय झालं?' असा प्रश्न आला की कुठूनही आणि कशीही कोलांटी मारायला मोकळे!

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Wed, 03/09/2016 - 15:06
सरळ प्रश्न विचारला की भक्त कसे उत्तरं देतात ह्याचा हा उत्तम नमुना. काळा पैशाचं काय झालं तो प्रश्न सोयिस्कर बाजूला टाकून हे फाशीचं कधी बोलले हेच राहून राहुन विचारताय. आश्वासनं देऊन जनतेला फसवलंय म्हटलं तर इतरांचे दाखले देतात. मग त्यांच्यात आणि तुमच्या काय तो डिफरंस?
तुमच्या मूळ प्रतिसादात (१) माणशी १५ लाख रूपये इतका काळा पैसा आणि (२) काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फाशी द्या असे मोदी म्हणाले , असे दोन मुद्दे एकत्र जोडले होते. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याबाबतीत खर्‍याखोट्याचा मुद्दाच नव्हता. दुसरा मुद्दा मात्र निखालस खोटा होता. हे मला माहित होते. म्हणूनच मी दोन्ही मुद्दे वेगळे करून त्याबाबतीतला पुरावा मागितला. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत आहेच आणि ती तुम्ही विजयी आविर्भावात देणार याची खात्रीच होती. दुसरा मुद्दा निखालस खोटा होता आणि त्याबाबतीत तुम्ही मौन पाळणार हेही मला माहित होते. तुम्ही दोन मुद्दे पुढे आणले. एका मुद्द्याचे पुरावे आहेत आणि दुसरा खोटा आहे. म्हणूनच मी त्याबद्दल विचारतोय.
आधी काळ्या पैशाचं काय झालं ते सांगा जमलं तर.
http://www.ndtv.com/india-news/3-770-crore-surfaces-in-governments-black-money-drive-1225010 http://zeenews.india.com/business/news/finance/sebi-bars-22-brokers-for-tax-evasion-trades-of-rs-8100-crore_1856691.html http://zeenews.india.com/business/taxes/tax-news/black-money-modi-govt-collects-rs-2428-crore-tax-from-644-entities_1842325.html http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-over-rs-16000-cr-undisclosed-income-detected-in-20-months_1837564.html सर्वोच्च न्यायालयाने काळा पैसा परत आणण्यासाठी एका एसआयटीची स्थापना केली असून त्याचे काम सुरू झाले आहे. http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-sit-asks-dri-to-verify-if-505-billion-flown-out-of-india-from-2004-13_1855888.html स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी भारत व स्वित्झर्लँड सरकारमध्ये बोलणी सुरू आहेत. http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-significant-progress-in-tax-cooperation-with-india-says-swiss-govt_1850946.html अजून बर्‍याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही.
भाजपने आपले प्रॉमिस निभावले काय हे सांगा मग फाशीचा संदर्भ सांगतो.
कधी देताय संदर्भ?

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Wed, 03/09/2016 - 15:54
अजून बर्‍याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही. >> बरोबर. ते फक्त झी न्यूज आणि तुमच्याकडेच येतात. कधी देताय संदर्भ? >> जेवढा काळा पैसा मोदींनी प्रॉमिस केलाय (१५ लाख पर पर्सन) तेवढा सगळा भारतात आल्यावर नक्की देऊ. अन्यथा मला फासावर चढवा. विश्वास आहे ना... मोदींवर?

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 18:15
अजून बर्‍याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही. >> बरोबर. ते फक्त झी न्यूज आणि तुमच्याकडेच येतात.
मी दिलेल्या लिंक्स वेगवेगळ्या माध्यमांच्या आहेत. या बातम्या पहिल्या पानावर फारश्या येत नाहीत. वाहिन्यांवर यावर चर्चा देखील होताना दिसत नाही. मराठी वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर तर याबाबतीत क्वचितच काही ऐकू येते. एनीवे, काळा पैसा परत आणण्याच्या संदर्भात जी पावले उचलली गेली आहेत त्याविषयी मी अनेक संदर्भ दिलेले आहेत. कधी देताय संदर्भ? >> जेवढा काळा पैसा मोदींनी प्रॉमिस केलाय (१५ लाख पर पर्सन) तेवढा सगळा भारतात आल्यावर नक्की देऊ. अन्यथा मला फासावर चढवा. विश्वास आहे ना... मोदींवर? अगदी अपेक्षित उत्तर. फाशीसंदर्भात तुम्ही एक पुडी सोडून दिली होती. ती बातमी खोटीच होती. त्यामुळे तुमच्याकडे त्याचे कोणतेच संदर्भ/पुरावे नाहीत. आपण केलेला खोटा दावा मागे घ्याल का? एनीवे, एका धाग्यात तुम्ही मला "बिनपुराव्यांची आगगाडी" असे म्हणाला होता त्याची आठवण झाली.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर गुरुवार, 03/10/2016 - 18:34
या बातम्या पहिल्या पानावर फारश्या येत नाहीत. वाहिन्यांवर यावर चर्चा देखील होताना दिसत नाही. मराठी वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर तर याबाबतीत क्वचितच काही ऐकू येते. >> महत्त्वाच्या असतील तेव्हाच बातम्या पहिल्या पानावर येतील ना, तेव्हाच चर्चा होईल ना. अशा धूळफेक बातम्यांनी तुमच्यासारख्या समर्थकांची छाती अभिमानाने भरुन येत असेल, पण देशाच्या अकाऊंट मधे पैसा येत नाही. एनीवे, काळा पैसा परत आणण्याच्या संदर्भात जी पावले उचलली गेली आहेत त्याविषयी मी अनेक संदर्भ दिलेले आहेत. >> पावले उचलण्याच्या बातम्यांना काहीही महत्त्व नाही. काम झाले तरच अर्थ आहे. फाशीसंदर्भात तुम्ही एक पुडी सोडून दिली होती. ती बातमी खोटीच होती. त्यामुळे तुमच्याकडे त्याचे कोणतेच संदर्भ/पुरावे नाहीत. आपण केलेला खोटा दावा मागे घ्याल का? >> काळापैशाबाबत भाजपाने, मोदींनी पुडी सोडून दिली होती. त्याबद्दल त्यांना जाब विचारला काय? जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ... माझ्यासारख्या सामान्य माणसाने एका संस्थळावर एक विधान केले तर ते खोटं आहे मान्य करा म्हणताय. मोदींनी तुम्हाला पावले उचलली आहेत नामक चॉकलेट दिलंय तर आनंदाने खाताय. कशाला किती महत्त्व द्यायचे ते आधी शिका गुरुजी.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 19:22
महत्त्वाच्या असतील तेव्हाच बातम्या पहिल्या पानावर येतील ना, तेव्हाच चर्चा होईल ना. अशा धूळफेक बातम्यांनी तुमच्यासारख्या समर्थकांची छाती अभिमानाने भरुन येत असेल, पण देशाच्या अकाऊंट मधे पैसा येत नाही.
धूळफेक! धन्य आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
पावले उचलण्याच्या बातम्यांना काहीही महत्त्व नाही. काम झाले तरच अर्थ आहे.
नुसती पावले नाहीत ती! प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हाच सुरु झाली आहे आणि देशाच्या खात्यात पैसे परत यायला सुरूवात झालेली आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
काळापैशाबाबत भाजपाने, मोदींनी पुडी सोडून दिली होती. त्याबद्दल त्यांना जाब विचारला काय? जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ...
पुडी? कमाल आहे. तुमची माहिती कमी आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
माझ्यासारख्या सामान्य माणसाने एका संस्थळावर एक विधान केले तर ते खोटं आहे मान्य करा म्हणताय. मोदींनी तुम्हाला पावले उचलली आहेत नामक चॉकलेट दिलंय तर आनंदाने खाताय. कशाला किती महत्त्व द्यायचे ते आधी शिका गुरुजी.
नुसती पावले नाहीत ती! प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हाच सुरु झाली आहे आणि देशाच्या खात्यात पैसे परत यायला सुरूवात झालेली आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Wed, 03/09/2016 - 16:30
पहिल्या मुद्द्याची चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याबाबतीत खर्‍याखोट्याचा मुद्दाच नव्हता
म्हणजे काळा पैसा (१५लाख माणशी) १०० दिवसात आणण्याचे वचन ही मोदी/ भाजपची चूक होती. त्यातल्या काँप्लेक्सिटीचा अंदाज नव्हता/ केवळ निवडणूक जिंकायला केलेलं विधान. हे गुरुजींना मान्य का?

In reply to by बाळ सप्रे

श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 18:17
म्हणजे काळा पैसा (१५लाख माणशी) १०० दिवसात आणण्याचे वचन ही मोदी/ भाजपची चूक होती. त्यातल्या काँप्लेक्सिटीचा अंदाज नव्हता/ केवळ निवडणूक जिंकायला केलेलं विधान. हे गुरुजींना मान्य का?
काळा पैसा (त्यांच्या अंदाजानुसार १५ लाख माणशी) परत आणण्याबद्दल मोदी बोलले होते. १०० दिवसात आणीन, नाही आणला तर मला फासावर चढवा, परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करीन असे ते काहीही बोलले नव्हते. काळा पैसा परत आणण्या संदर्भात त्यांनी गेल्या २१ महिन्यात काय केले आहे त्याचे अनेक संदर्भ मी वर दिले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे गुरुवार, 03/10/2016 - 18:23
माझ्या प्रश्नात फासावर चढवण्याचा उल्लेख नाही.. काय काय चालू आहे ते मी वाचलय पण १०० दिवसात प्रत्येकी १५ लाख झाले नाहीत तेव्हा ते विधान चुकल हे मान्य का? (पुन्हा एकदा प्रश्न स्पष्ट केलाय) दुसर्‍या प्रतिसादातील वाक्य इथे घुसवून गोलगोल करणे टाळा. एवढच बघायचय की मान्य होतेय का चूक ..

In reply to by बाळ सप्रे

श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 19:17
परत तेच! किती वेळा सांगायचं? काळा पैसा परत आणणार (जो मोदींच्या अंदाजानुसार प्रतिमाणशी १५ लाख रु. असावा) असे ते बोलले होते. हा काळा पैसा १०० दिवसात परत आणणार असे ते कोठेही बोलले नव्हते. तसे ते बोलले होते असे तुम्हाला वाटत असल्यास त्याची लिंक द्या.

In reply to by श्रीगुरुजी

होबासराव गुरुवार, 03/10/2016 - 19:22
बातमि वाचलि का ? नव-युगपुरुषावर गाझियाबाद च्या एका तरुणाने हल्ला केलाय जेएनयु त, हल्ला करण्याचे कारण नव-युगपुरुषांचे आर्मि-काश्मिर वरिल मुक्ताफळे. दया कुछ तो गडबड है...कहि ये फिर से वोहि स्याहि फेक - तमाशा देख वालि स्ट्रॅटेजि तो नहि ?

In reply to by होबासराव

श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 19:25
त्यापेक्षा इथे जास्त महत्त्वाची बातमी आहे. http://www.thehindu.com/news/cities/Delhi/jnu-student-found-dead-in-delhi/article8336159.ece?homepage=true जेएनयुतील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बातमी आहे. त्याची जात कोणती हे अजून बातमीत आले नाही. जातीने दलित असला तर राहुल, केजरीवाल इ. मंडळी तातडीने धावत जातील.

In reply to by श्रीगुरुजी

होबासराव गुरुवार, 03/10/2016 - 19:30
२५ वर्षाचा होता फक्त तो विद्यार्थि, अस काय ह्यांच्या मनात वादळ चाललियत / चालवलियत का हे पुढचा मागचा विचार न करता आत्महत्या करताहेत. वाईट आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Fri, 03/11/2016 - 12:32
मोदी १५ लाख बोलले. राजनाथ १०० दिवसात आणण्याचं बोलले होते.. https://www.youtube.com/watch?v=UZ8FfN0E4lQ म्हणजे बीजेपीचे प्रॉमिस १५लाख माणशी १०० दिवसात असा माझा अंदाज..

In reply to by तर्राट जोकर

मार्मिक गोडसे Wed, 03/09/2016 - 16:12
लक्षात घ्या काळा पैशाच्या मुद्द्याने भाजपाला निवडणुक जिंकण्यात सिंहाचा वाटा निभावलाय.
मी स्वतः ह्या मुद्द्यावर सरकारच्या विजयाला हातभार लावला होता. आता शंभरावर किती शून्य वाढवतात ते फक्त बघत रहायचे.

In reply to by मार्मिक गोडसे

तर्राट जोकर Wed, 03/09/2016 - 16:16
ते शंभर तरी राहतात का ते पाहा ;-) इथे सरकार देशकार्यासाठी हजार रुपये मागतंय. तुमचं अकाउंट मायनस नउशे दाखवेल.

In reply to by नाना स्कॉच

ट्रेड मार्क Wed, 03/09/2016 - 02:02
मते थोड़ी वेगळी पडतात म्हणून मी राष्ट्रद्रोही असल्याचे इतकेवेळा (घाण घाण शिव्या देऊन) सांगितले गेले की आम्हाला फेसबुक प्रोफाइल डिलीट (डीएक्टिवेट नाही) करून सोशल मीडिया सन्यास घ्यावा लागला
आपण आपल्याला साजेशी मते असलेल्या लोकांबरोबर चर्चा करावी. सोसल मेडियावर आपल्याला आणि इतरांना सोसंल तेवढच बोलावं. सोसल मेडिया वर कुठे कसं बोलावं आणि वागावं हे कळले म्हणजे तारतम्य बाळगले की हे असले virtual त्रास होत नाहीत. चेपुवर तुम्हाला लोकांनी शिव्या घातल्या म्हणून सरकार जबाबदार धरताय तुम्ही? कमाल आहे.
डाळ 200 ₹/किलो भावाने खावी लागते आहे सर्विसटॅक्स वाढल्यामुळे बायको सोबत भांडणे अन स्वयंपाकघरातील भांड्यांना पोचे यायचे प्रमाण वाढले आहे!!
नशीब आधी एकदा अंघोळ करायला लागायची आता २ वेळा करायला लागते वगैरे नाही सांगितलंत. या धाग्याच्या विषयाला अनुसरून दैनंदिन जीवनातला फरक म्हणजे सरकारने असं काय काय केलं की तुमचं जीवन त्रासाचं व्हावं उदा. तुमच्या चेपूवरील विचारांना गंभीरपणे घेऊन तुमच्यावर पाळत ठेवणे, विनाकारण कुठल्यातरी प्रकरणात अडकवणे असे कुठले त्रास सरकार किंवा कुठल्या सरकारी विभागाकडून झालेत का? तथाकथित कट्टर हिंदू तुमच्या घरी येऊन तुम्ही रोज पूजापाठ करता आहात की नाही हे बघतात का? किंवा तुम्ही हिंदू संस्कृतीप्रमाणे कसे वागावे हे जबरदस्तीने सांगितले जातेय? तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना रोज संघाच्या शाखेत जायची जबरदस्ती केली जाते आहे का? जर हे काही होत नसेल तर का एवढा आरडाओरडा होतोय? बाकी महागाई, एखाद्या वस्तूची दरवाढ हे सगळं चालूच असतं पण इथे विषय तो नाहीये.

In reply to by ट्रेड मार्क

नाना स्कॉच Wed, 03/09/2016 - 06:26
बाकी महागाई, एखाद्या वस्तूची दरवाढ हे सगळं चालूच असतं पण इथे विषय तो नाहीये. चालूच असतं म्हणल्यावर विषयच कट ण भाऊ! मला "दैनंदिन आयुष्य" मधुन जे समजले उमगले मी त्याला अनुसरुन लिहिले, उरता उरला सरकार फासिस्ट असल्याचा प्रश्न तर तसे अजिबात नाहीये . त्याची कारणे माझ्यामते वेगळी आहेत पण ते नंतर विषयानुरूप बोलु (बघा सोसंल तितके (तुम्हाला अन आम्हाला) बोललो! :D जाता जाता, हा सोसंल वाला सल्ला फ़क्त आम्हालाच की पक्ष निरपेक्ष सगळ्यांना हो??

In reply to by नाना स्कॉच

ट्रेड मार्क Wed, 03/09/2016 - 17:46
सोसंल चाल सल्ला खरंतर माझ्यासकट जे जालावर आहेत/ असतात त्या सर्वांनाच. मिपावर जरी वेगळे आयडी घेवून वावरत असलो आपण सगळे तरी संदेशाचा उगम कुठून झालाय हे शोधणे सहज शक्य आहे. त्यामुळे एखाद्या फ़ासिस्टानॆ शोध घेऊन धडा शिकवायचा म्हणलं तर करू शकतो (ही धमकी नसून काळजी आहे). चेपू तर काय खुले पुस्तक आहे त्यामुळे तिथे तर अजूनच सांभाळून (निदान मी तरी).

ज्यांना महागाई वाढलेली दिसत आहे त्यांची एक तर कमाई कमी झालेली आहे नाहीतर चंगळवाद वाढलेला आहे असे गृहीत धरावे। शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून सेन्ट्रल गव्हर्नमेंट ने साखरेची निर्यात 15%पर्यंत करण्याचे निर्देश दिलेत त्याने साखरेचे भाव वाढणार असे दिसले रे दिसले लगेच मीडिया वाल्यांनी एका सुरात कोकलने सुरु केले महगांई कि मार नागरिक बेजार,ह्यांचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही,भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या कि सरकार ला दोष देऊन मोकळे होतात आणि भाव वाढवले कि तरी ओरडतात ,महागाई वाढली म्हणून ओरडणारे त्या सडवलेल्या दुधाचे पनीर 200 रुपये किलो आणि 10 20 रुपये निर्मिती मूल्य असलेला पिझा 200 ते 1000 रुपये पर्यंत खातात तेव्हा महागाई दिसत नाही ह्यांना।आता सरकारने डाळ आयात केल्याने डाळीचे भाव खाली येताहेत त्यामुळे विदर्भातल्या डाळ उत्पादक शेतकऱ्यांचे किती नुकसान होईल ते डाळ आयात करा म्हणून ओरडणारे भरून देतील काय।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 09:26
सरकारच्या धोरणांचे समर्थन करण्याच्या नादात तुम्ही सामान्यांच्या विरोधात तर बोलत नाही ना याची खात्री करुन घ्या.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 09:41
ज्यांना महागाई वाढलेली दिसत आहे त्यांची एक तर कमाई कमी झालेली आहे नाहीतर चंगळवाद वाढलेला आहे असे गृहीत धरावे। सरसकट गृहितकात बंदिस्त केलेत तुम्ही सगळ्या निम्न मध्यमवर्गाला. बरे नाही ते. डाळ 200 ?रोज किती डाळ खातात भाऊ महान राष्ट्रकार्य म्हणून तुम्ही सोडा डाळ आम्ही गरीब शाकाहारी माणसे आहोत 6 जणांची फॅमिली त्यात बालके वृद्ध अश्यात डाळ लागतेच आमच्या प्रथिनांच तोच एक स्त्रोत आहे भाव वाढणार असे दिसले रे दिसले लगेच मीडिया वाल्यांनी एका सुरात कोकलने सुरु केले महगांई कि मार नागरिक बेजार,ह्यांचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही. हा संदर्भ कळला नाही, मी मीडिया ला जबाबदार नाही मी मीडिया कर्मी नाही मी फ़क्त मी जे बोलतो त्याला जबाबदार आहे (अगदी तुम्हाला काय अन कितपत समजते आहे त्याचा ही मी जबाबदार नाही), एक निम्न मध्यवर्गीय डिस्पैच क्लर्क म्हणून मला महागाई विषयी जे काही वाटले ते मी बोलतोय, ह्यात मीडिया मधे कुठे आला ते काही झेपले नाही , उगाच काहीही? आता सरकारने डाळ आयात केल्याने डाळीचे भाव खाली येताहेत त्यामुळे विदर्भातल्या डाळ उत्पादक शेतकऱ्यांचे किती नुकसान होईल ते डाळ आयात करा म्हणून ओरडणारे भरून देतील काय। किती तो निरागस भाव!! फायदा शेतकऱ्यांचा कधीच होत नव्हता/नाहीये, डाळ आयातीमुळे सुद्धा नुकसान शेतकऱ्यांचे नाही तर दामदुप्पट भाव झाले की मुनाफा कमाई होईल ह्या आशेने चढ्याभावाने वेयरहाउसेस घेऊन त्यात डाळी दाबून ठेवणाऱ्या जमाखोर हलकट व्यापाऱ्यांचे होईल, ह्याच्याकडे सोइस्कर दुर्लक्ष काय?? अवांतर :- जाऊ दे!

In reply to by बोका-ए-आझम

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 11:52
खोदकाम कार्याबद्दल कौतुक अन शुभेच्छा, तरीही बोका ए आझम साहेब, स्वतःच्या आयडी ची केलेली चेष्टा होती ती. :)

In reply to by भंकस बाबा

भंकस बाबा त्यांच्या नेटचा विषय काढू नका हो,नेट हे महिन्यातून एकदा 500 रुपयाचं लागते आणि जीवनावश्यक वस्तू ह्या रोजच लागतात है कि नाही स्कॉच बाबा।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मार्मिक गोडसे Tue, 03/08/2016 - 23:19
शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून सेन्ट्रल गव्हर्नमेंट ने साखरेची निर्यात 15%पर्यंत करण्याचे निर्देश दिलेत त्याने साखरेचे भाव वाढणार असे दिसले रे दिसले लगेच मीडिया वाल्यांनी एका सुरात कोकलने सुरु केले महगांई कि मार नागरिक बेजार,ह्यांचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही
ओ गाववाले, साखरेची निर्यात 15% पर्यंत केल्याने शेतकर्‍यांचा कसा फायदा होईल ते जरा सांगाल का?

In reply to by मार्मिक गोडसे

निर्यात केल्या शिवाय साखरेला भाव कसा मिळणार,आता देशांतर्गत जो भाव आहे त्याने शेतकऱ्याला त्याच्या उसाचा 1600 1700 चा भाव मिळू शकतो ,म्हणून सरकार त्यांना ठरलेल्या कोट्याने साखर निर्यात करायला सांगताहेत आणि कारखानदारांनी शेतकरी हितासाठी साखर निर्यात करणे गरजेचे आहे।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मार्मिक गोडसे Wed, 03/09/2016 - 16:00
म्हणून सरकार त्यांना ठरलेल्या कोट्याने साखर निर्यात करायला सांगताहेत आणि कारखानदारांनी शेतकरी हितासाठी साखर निर्यात करणे गरजेचे आहे।
१)आंतरराष्ट्रिय बाजारात सध्या असलेले साखरेचे भाव भारतातील साखर निर्यात करण्यास अनुकूल आहेत का? २)सरकारला साखर निर्यातीसाठी सबसीडी द्यावी लागली का? ३)प्रत्यक्षात किती टन साखर निर्यात झाली? नसेल झाली तर का नाही झाली? ४)२०१५ मध्ये साखरेचे मागील वर्षापेक्षा ३३% अधिक उत्पादन झाले. २०१६ मध्ये ते २८% ने कमी असेल म्हणजेच ते जवळजवळ २०१४ च्या उत्पादनाइतकेच असेल. देशात साखरेचा शिल्लक साठा असल्यामुळे यंदा साखरेची देशांतर्गत मागणी पुर्ण होऊ शकते. गेल्या ५-६ महीन्यात साखरेचे भाव जवळजवळ ४०% ने वाढले. मग हा नफा नक्की कोणाला झाला? ५)देशात उसाचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील शेतकर्‍याला साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे FRP प्रमाणे मिळतात की साखरेच्या बाजारभावाने?

In reply to by मार्मिक गोडसे

बोका-ए-आझम गुरुवार, 03/10/2016 - 20:16
भारतात साखरेचं सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होतं. महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर येतो.

Bjp सरकार ने शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून त्याचा माल खुल्या मार्केट मध्ये विकता येईल (मार्केट कमिट्या बरखास्त करणे .ई(मचलेले राजकारणी ह्याला इरोध करतात हे येगळ त्यांचे दुकान बंद पडतील ना)ह्यासाठी पावले उचलली आहेत,ज्यांना फक्त टीका करायची आहे त्यांना ते दिसणार नाही, बाकी 2 रुपयाच्या लाह्या 75 रुपयात थिएटर मध्ये विकत घेणारे ह्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलावे हाच मोठा विनोद।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 10:22
Bjp सरकार ने शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून त्याचा माल खुल्या मार्केट मध्ये विकता येईल व राजकारणी ह्याला इरोध करतात >> ह्या दोन्हीसाठी लिन्क द्या ना! बाकी 2 रुपयाच्या लाह्या 75 रुपयात थिएटर मध्ये विकत घेणारे ह्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलावे हाच मोठा विनोद। >> मग कुणी बोलावे? २ रुपयाच्या लाह्या ७५ रुपयाला विकणार्‍या व्यापार्‍यांनी बोलावे काय?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 11:47
अहो गेले बारा वर्ष ही पावलंच उचलली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही हा कायदा बदलावा म्हणुन पावलं उचलली होती. पुढे काय घोडं अडलं ते माहित नाही. APMC Act review may abolish mandi tax Business Standard - 02 Nov 2004 Our Regional Bureau / Ahmedabad / Anand November 02, 2004 The Agricultural Produce Marketing Committee (APMC) Act may be amended by the end of the current year to abolish the ‘mandi’ tax and permit farmers to sell their produce outside ‘mandis’, said Sharad Pawar, Union minister of agriculture, consumers affairs, food and public distribution, on Sunday. “A solution would be found in the interest of the farmers, who will have the right to sell their commodities anywhere they want to. The mandi taxation system will be removed. The Centre may give incentives to states to amend their APMC Acts,” said Pawar. बाकी एनसीपी विरोध कशाला करत आहे तेही पुढे दिलं पाहिजे. http://www.asianage.com/mumbai/congress-ncp-oppose-change-apmc-act-437 Congress and NCP have opposed the proposed amendment to Maharashtra Agricultural Produce Marketing Committee Act, alleging that the BJP government is favouring the corporate sector and traders through the amendment. According to opposition leaders, the amendment is tantamount to a backdoor entry to APMC for BJP and RSS. So far, APMC has been controlled by Congress and NCP. Dhananjay Munde however said, “The state is not ready to speak about who will take guarantee to get money from the corporate sector if farmers sell their agricultural produce to them. In fact, the BJP government is trying to reduce the importance of APMC and push a policy favoured by traders through the proposed amendment. We will not allow it.” आता इथे श्रेय घेण्याच्या लढाईचं राजकारण होत असेल तर असो. रच्याकने, लैच अवांतर व्हायले ना भौ.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 11:54
×××××2 रुपयाच्या लाह्या 75 रुपयात थिएटर मध्ये विकत घेणारे ह्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलावे हाच मोठा विनोद।×××× मी त्या वर्गातला नाहीये हे स्पष्ट करुनही जर आपणाला तीच टकळी सुरु ठेवायची असली तर आमचा निरुपाय आहे शुभेच्छा

viraj thale Tue, 03/08/2016 - 10:22
अहो नाना वर्षभर ,गणपती उत्सव ,नवरात्र उत्सव ,इतर सण बहुसंख्य हिन्दू मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणी तुम्ही म्हणता हिंदूंच्या भावना दुखावल्या नाहीत .मागे एम .एफ .हूसेन च्या वेळी पण हिंदूंना असेच ग्रुहीत धरले गेले कारण ते शांत आहेत म्हणून .बहुतेक हिंदूंच्या मनात "त्या " प्रकरणा बद्द्ल चीड आहेच .

In reply to by viraj thale

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 13:33
उत्सवप्रियता (सार्वजनिक/वैयक्तिक) अन भावना दुखवणे ह्यात गल्लत होते आहे का आपली?? हिंदु उत्सवप्रिय आहेत अन काही हिंदूंच्या भावना दुखवणे (त्यात परत रियल लाइफ अन जालीय आयुष्य हा घटक आलाच पण तो तुर्तास बाजुला ठेवुयात) ह्यात काय समानता आपणाला दिसली??? 2011 पासुन महिषासुर शहादत दिवस जनेवि मधले खुळे साजरा करीत आहेत, ते हिंदु (कागदोपत्री ) नाहीत?? का कागदोपत्री अन भावनेने हिंदु असलेल्या उर्वरीत 79 कोटी + जनतेला खुप फरक पड़तोय असे तुम्ही म्हणता आहात? कृपया ज़रा स्पष्ट कराल काय?? एक क्षणभर जर हे मानले की 79 कोटी हिंदु हे भंकसबाबा म्हणाले तसे दुखावले आहेत, म्हणजे नेमके काय झाले आहे??

In reply to by नाना स्कॉच

भंकस बाबा Tue, 03/08/2016 - 23:20
एकतर तुम्ही महिषासुर शहीद दिवसाला छापलेल्या पत्रिका वाचलेल्या नाहीत. त्या भारतातील बहुसंख्य जनतेने वाचल्या असण्याची शक्यता फार कमी वाटते. पण संसदेत स्मृति इराणी बाईनीं जे भाषण केले त्यावरून वरील मामला बराच स्फोटक होता हे जनतेच्या लक्षात आले. हिंदुचा सर्वात उत्तम गुण म्हणजे ते क्षमाशील असतात. असे स्फोटक् आरोप दुसऱ्या धर्माच्या देवांवर लागले असते तर देश पेटवण्याच्या भाषा बोलल्या गेल्या असत्या.

In reply to by प्रदीप साळुंखे

>मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा काय मोठा फरक झालाय तुमच्या आमच्या दैनंदिन जिवनात? ट्रेड मार्क यांचा पूर्ण प्रतिसाद वाचता ते महागाईबद्दल बोलत नसावेत असे वाटते. त्यांचा रोख वेगळाच आहे.

In reply to by प्रदीप साळुंखे

नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 13:26
दैनंदिन जीवनात अफज़ल लटकवला की नाही?, कन्हैया किती गरीब आहे, त्याची वैचारीक बैठक इत्यादी प्रश्न बसतील का तुरडाळीच्या/साखर तेल ह्यांच्या भावाचे अन महीना बजेट संबंधी प्रश्न बसतील? प्रदीप दादा परत एकदा तुमच्यासाठी सांगतो, मी प्रश्नाला शब्दनिष्ठ राहून उत्तरे देतो आहे, अन जर ट्रेडमार्क ह्यांचा रोख महागाई कड़े नसावा असे तुमचे म्हणणे आहे तर दैनंदिन जीवनात काय अपेक्षित आहे तुम्हाला हे सांगाल काय कृपया?

In reply to by नाना स्कॉच

पूर्ण प्रतिसादाचा रोख वेगळा आहे आणि शेवटच्या ओळीत एकदमच विषयांतर केलं असेल ट्रेडमार्क यांनी.
मी प्रश्नाला शब्दनिष्ठ राहून उत्तरे देतो आहे, अन जर ट्रेडमार्क ह्यांचा रोख महागाई कड़े नसावा असे तुमचे म्हणणे आहे तर दैनंदिन जीवनात काय अपेक्षित आहे तुम्हाला हे सांगाल काय कृपया?
हे ट्रेडमार्कच सांगू शकतील,त्यांनी "दैनंदिन जीवन" हा शब्द कोणत्या आशयाने वापरला ते.

In reply to by प्रदीप साळुंखे

ट्रेड मार्क Wed, 03/09/2016 - 02:38
सध्या जे संदर्भ सोडून एखादा शब्द किंवा वाक्य उचलण्याचे फॅड आहे त्याला नाना बळी पडलेले दिसत आहेत. माझ्या प्रतिसादाचा विषय होता की सरकार फ़ासिस्ट आहे का? तर पूर्वीचे सेक्युलर सरकार जाउन आता हे सरकार आल्यावर तुमच्या जीवनात काय फरक पडला. म्हणजेच गेस्टापो किंवा केजीबी च्या एजंट सारखे आता RAW चे लोक तुमच्यावर पाळत ठेवतात का? सरकार विरोधात उघडपणे किंवा खाजगीत बोलणारा तुमचा एखादा मित्र किंवा शेजारी अचानक एका रात्री गायब झाला आहे का? आणि तो कुठे गेला, कोणी नेलं, परत येणार का नाही याबद्दल कोणालाच माहिती नाही असा झालय का? तुमच्यावर हिंदू धर्मातील परंपरा, प्रथा ई पाळण्याची सक्ती केली जाते आहे का? न पाळल्यास चाबकांच्या फटक्यांची किंवा तत्सम शिक्षा दिली जाते का? रा. स्व. संघाच्या शाखेत तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने रोज जायला पाहिजे अशी सक्ती केली जाते आहे का? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर हे सरकार फ़ासिस्ट आहे हे आपण मान्य करू. नसेल तर तुम्ही सांगा हे सरकार कसे फ़ासिस्ट आहे ते. बाकी चेपुवर तुम्हाला शिव्या पडल्या, डाळ महाग झाली, पाणी कमी जास्त दाबाने येतं, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी बॉसने झापलं, नोकरीत दुजाभाव होतो, तुम्हाला प्रमोशन/ पगारवाढ मिळाली नाही किंवा तुम्हाला तुमच्या मित्रापेक्षा जास्त मिळाली, लोकल मध्ये गर्दी वाढलीये, तुमचा शेजारी अचानक तुम्हाला त्रास द्यायला लागलाय, तुम्ही जाता त्या बस मध्ये आजकाल रोज भक्तीसंगीत लावलेलं असतं या असल्या गोष्टीं तर आपल्या आयुष्यात चालूच असतात. पण तो विषय इथे चर्चेला नाहीये. तुम्ही वेगळा धागा काढा यासाठी, मग आपण तिथे चर्चा करू.

In reply to by ट्रेड मार्क

मार्मिक गोडसे Wed, 03/09/2016 - 16:19
तुमच्यावर हिंदू धर्मातील परंपरा, प्रथा ई पाळण्याची सक्ती केली जाते आहे का?
एखाद्याला बीफ खावेसे वाटले तर त्याची ईच्छा पुर्ण केली जाईल का?

In reply to by मार्मिक गोडसे

भंकस बाबा Wed, 03/09/2016 - 16:39
बीफ म्हणजे गोमांस असे कोणी सांगितले तुम्हाला? आमच्या भेंडिबाजारात या, पोटाला तडस येईपर्यन्त घालतो खायला तुम्हाला.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क Wed, 03/09/2016 - 17:53
बीफ वर कायद्याने बंदी आहे जो कायदा काँग्रेसने पास केला. तो जर रद्द केला तर मग कायद्याने तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. प्रयोग म्हणून भेंडीबाजारात जाऊन प्रयत्न करू शकता. तसेच डुक्कर खाण्यावर कायद्याने बंदी नाहीये, ते पण भेंडीबाजारात खाउन बघू शकता, अर्थात डुक्कर तुम्हाला घेवून जायला लागेल. नंतरचे परिणाम सुद्धा तुम्हालाच भोगायला लागतील. तळटीप: एकदा दिलेल्या सल्ल्याची जबाबदारी आमचेवर नाही. सल्ला मानायचा की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, आमचा आग्रह नाही.

In reply to by ट्रेड मार्क

मार्मिक गोडसे Wed, 03/09/2016 - 18:49
बीफ म्हणजे गोमांस असे कोणी सांगितले तुम्हाला?
बीफ वर कायद्याने बंदी आहे जो कायदा काँग्रेसने पास केला.
वराह्पालन करायचे म्हणतोय, सुरुवातीला आपली 'मदत' लागेल, याल ना? परिणाम (पिल्लावळ) भोगायची जबाबदारी आमची.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क Wed, 03/09/2016 - 20:10
वराह्पालन करायचे म्हणतोय, सुरुवातीला आपली 'मदत' लागेल, याल ना? परिणाम (पिल्लावळ) भोगायची जबाबदारी आमची.
यात मला वराह ठरवण्याचा प्रयत्न असावा असं वाटतंय. दुसरी काही प्रतिक्रिया सुचली नाही बहुतेक. असो. वराह हा आम्हा हिंदूंमध्ये विष्णूचा एक अवतार मानतात. त्यामुळे आम्ही पाळतही नाही आणि खातही नाही. बाकी 'परिणाम' चांगला होण्यासाठी 'भोगायची' जबाबदारी घेतल्याबद्दल अनेक शुभेच्छा. मला तुमच्या कार्यक्षमतेबद्दल खात्री आहे, तुम्ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडाल आणि परिणामही चांगला होईल.

In reply to by ट्रेड मार्क

भंकस बाबा Wed, 03/09/2016 - 23:52
हिन्दू वराह खातात. ते हिंदुना निषिद्ध नाही वा वराह पूज्य देखिल नाही. फ़क्त यात असलेले गावठी डुक्कर आपले हिन्दू लोक खात नाही कारण तो घाण खाऊन गुजराण करतो. बाकी जंगली डुक्कर कोकण भागात आवडिने खाल्ले जाते. शिकारीला गेलेली माणसे डुक्कराचा मांडीचा भाग आपल्याकडे यावा म्हणुन भांडतात. आता कृपया हे सांगू नका की शिकार बंदी आहे.