मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

योद्धा

चाणक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एक योद्धा होता तो शून्यातून सगळं विश्व निर्माण करणारा योद्धा जो हात तो धरायचा त्या मनगटांमधे जोर यायचा जो माणूस तो जोडायचा तो पोलादी होऊन जायचा हजार हत्तींचं बळ दिलं होतं त्याने एका मरगळलेल्या पिढीला ईतकं की पुढे दोनेक पिढ्या पेटत राहिले होते ते निखारे त्याच्या स्वतःच्या आतलं वादळ त्याने भिनवून टाकलं होतं हजारो-लाखो नसांमधे त्याने कधी कुणापुढे हात नाही पसरले उलट जे हात पसरत होते त्यांच्या धमन्यांमधे असं काही रक्त खेळवलं की न भूतो असा पराक्रम घडवला त्या हातांनीही त्याने दाखवून दिलं जगाला.....कसं 'लढायचं' असतं त्याने दाखवून दिलं जगाला.....राष्ट्रनिर्माण म्हणजे काय असतं आणि त्याची माणसं ? काय कमी पराक्रमी होती ती ? त्याच्या एका शब्दावर वाटेल तिथे झोकून देत होती स्वतःला एकएक माणूस म्हणजे आख्खं सैन्यच जणू अहर्निश कष्ट करून त्याने घडवली होती ती कणखर मने फार नाही, तीन-साडेतीनशे वर्षांपूर्वीच केली होती त्याने ही मशागत तो असा काही भरून राहिलाय ईथल्या द-याखो-यात, दगडामातीत की त्याच्या नुसत्या आठवणीने बाहू फुरफुरतात आमचे आमचा आहे तो...सांगताना छाती फुगते अभिमानाने आमची . . . . . . काल आम्ही म्हणे शिवनेरीवर त्याची जयंती साजरी केली काल आम्ही म्हणे त्याच्या मावळ्यांना आरक्षण देऊ केलं

वाचने 4097 वाचनखूण प्रतिक्रिया 20

In reply to by प्रचेतस

चाणक्य Sat, 02/20/2016 - 17:59
धन्यवाद सांगितल्याबद्दल. सासं, या कवितेत 'गर्वाने' च्या ठिकाणी 'अभिमानाने' असा बदल कराल का ?

In reply to by चाणक्य

टवाळ कार्टा Sat, 02/20/2016 - 18:26
हायला...इतक्यात बदलायला पण सांगितले? कस्ले मिपाकर हो तुम्ही....छ्या...पुर्वीचे मिपा राहिले नाही अता ;) कवीता दणदणीत आहे :)

In reply to by टवाळ कार्टा

चाणक्य Sat, 02/20/2016 - 19:46
आता चूक आहे म्हणल्यावर दुरूस्ती करणे आले. बाकी स्नेहांकिता ताईंना ईथेच धन्यवाद देतो. नाहीतर माझेच प्रतिसाद जास्त व्हायचे.

सस्नेह Sat, 02/20/2016 - 19:14
खासच ! अखेरच्या दोन ओळी विशेष भिडल्या. 'अभिमान' असा बदल केला आहे.