मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धरसोड

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज नानाआजोबा आले. तालुक्याला असत्यात. आज्जीचे कायतरी भाऊ हायेत ते. आजोबा आले की आई मला काम सांगणार. पल्याडच्या गल्लीतल्या वाण्याच्या दुकानातनं कापी आणायची. हे आजोबा च्या पीत न्हाईत, कापी पितेत. “आजोबा, तुमी चा का न्हाई घेत? काय हुईल का तुमाला? ” म्या उगं इचारलं. “ बाळ अंजली, बापूजींनी सांगितलं देशासाठी थोडा त्याग करा. तेंव्हापासून चहा सोडला.” आजोबा म्हन्ले. भौतेक ते गांधी जैंतीवाले बापूजी असत्याल. कदी मीठ घ्या म्हन्तेत, कदी चा सोडा. आजोबा चा सोडले, तेचा बापूजींना काय उपेग? असंल कायतरी. जौंदे. हेंनी चा सोडला, कापी पकाडली. येक सोडलं की दुसरं कायतरी पकडायचं. म्या असं काय केलं की आज्जी म्हन्ते “धरसोड”. --- (अवांतर - शशक स्पर्धेतल्या कथा आता वाचणार आहे.)

वाचने 17790 वाचनखूण प्रतिक्रिया 47

बऱ्याच दिवसांनी आन्जीला पाहून छान वाटले! अजूनही तिची निरीक्षणं चालू आहेत! आतिवासताई, खूप आवडली ही शतशब्दकथा! धन्यवाद! Sandy

बऱ्याच दिवसांनी आन्जीला पाहून छान वाटले! अजूनही तिची निरीक्षणं चालू आहेत! आतिवासताई, खूप आवडली ही शतशब्दकथा! धन्यवाद! Sandy

तर्राट जोकर 16/10/2015 - 02:28
लय मस्त... येक नमुना ऐसा भी: बाप मेल्यावर काहीतरी सोडायचे, म्हणून येका कारट्याने त्याला अजिबात आवडत नसलेली वांग्याची भाजी खायची सोडली....

मनीषा 16/10/2015 - 07:54
अंजी स्मार्ट आहे , तिचा प्रश्नं योग्यं आहे. अवांतर : कॉफीवाल्यांचं चहाशी इतकं काय वाकडं अस्तं देव जाणे.

In reply to by मनीषा

आतिवास 17/10/2015 - 10:41
अवांतराशी सहमत. "मी कॉफी घेत नाही" असं चहा पिणारी व्यक्ती म्हणताना मी कधी ऐकलं नाही हे लक्षात आलं. पण कॉफीवाले मात्र अनेकदा चहा न घेणारे असतात.

नाव आडनाव 16/10/2015 - 10:44
कापी माझे आजोबा आठवले. ते काफी म्हणायचे. तेंव्हा काफीची वडी मिळायची. आजोबा घरी आले तर काफी दुकानातून मी आणायचो. मस्त लिहिता तुम्ही.

नाखु 16/10/2015 - 11:05
आणि समाजात
उलटसुलट करून त्याचं समर्थन करता आलं की त्याला “धरसोड” म्हणत नाहीत
च एकच नाव आहे पॉलीसी ( जी स्थलकाल सापेक्ष बदलता येते). उदा विवाहीतांना लग्नागोदर अगदी नजरेसमोर नको असलेली वांग्याची भाजी लग्नानंतर प्रिय(?) वाटू शकते. कथा आवडली. पुलेप्र

द-बाहुबली 16/10/2015 - 12:01
:) मार्मीक. बाकी जे आंजीला कळतं ते आज्ज्याला कळलं नाही... ह्या आज्यासारख्या प्रवृत्तीच्या लोकांनीच आपल्या देशाची खरी वाट लावली.