शिवस्वरूप खंडोबा - एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति"
लेखनप्रकार
इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l
एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl
(ऋग्वेद १/१६४/४६)
[सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणी गॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि].
आजकाल टीवीवर 'खंडोबा'च्या जीवन चरित्रावर मालिका सुरु आहे. मालिकेत खंडेराय हे महादेवाचे अवतार आहे, असे दाखविले जाते. खंडेराय हे धनगर समाजातले होते. काहींच्या मते देत्यांचा राजा बळी यांनी खंडेरायांना जेजुरीचे क्षेत्रपाल नेमले होते. एक मात्र खंर, शेकडों/ हजारों वर्षांपासून लोक त्यांची पूजा करतात, त्या अर्थी त्यांनी आपल्या आयुष्यात काही भव्य-दिव्य केल असेल. आपल्या प्रजेला निश्चित सुखी ठेवले असेल. काही तथाकथित पुरोगाम्यांना वाटते, मालिकेत खंडेरायाचे चरित्र विकृत करून दाखविले जात आहे. त्यांना हे सर्व ब्राह्मणी षड्यंत्र वाटते. पण मला तर वाटते या अतिविद्वान लोकांना देशाच्या मूळ सर्वसमावेषक संस्कृती बाबत कुठलेहि ज्ञान नाही.
आसेतु हिमालय पर्यंत पसरलेला हा विस्तृत आणि विशिष्ट भू भाग भारत भूमी म्हणून वैदिक काळापासून ओळखला जातो. प्राचीन काळापासून विभिन्न जनजाती समूह इथे एकत्र नांदत आहे. त्यांची जात-पात भाषा वेगळी तरी त्यांचे आणि भारत भूमीचे भविष्य सर्वांनी एकत्र राहण्यातच आहे, हे प्राचीन वैदिक ऋषींनी ओळखले होते. एकत्र राहण्यासाठी सर्वाना आपल्यात समावून घेणे गरजेचे. त्या साठी सर्व जमाती आणि जातीय समूहांच्या परंपरेचा सम्मान करणेहि गरजेचे.
ईश्वराची कल्पना सर्व जातीय समूहांनी आपापल्या परीने वेगवेगळी केली. कुणी आपल्या पूर्वजांना ईश्वर मानले, कुणी प्रकृतीला ईश्वर मानले, कुणी सर्पांची पूजा करायचे तर कुणी लिंग पूजा करायचे, तर कुणी वृक्षांना देवता मानायचे. हे सर्व पाहूनच तुलसीदास यांनी म्हंटले आहे, “जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी". पण सर्वांचा उद्देश्य एकच, सत्य मार्गावर जाण्यासाठी भगवंताच्या कृपेची प्राप्ती.
हे ओळखूनच कदाचित् उपनिषदकरांनी, ईश्वराची नवीन संकल्पना पुढे आणली.
यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।
सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥
(ईशान उपनिषद /६)
जो सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंताला पाहतो, तो कुणाचा हि द्वेष करीत नाही. अर्थात प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराचा निवास आहे. तात्पर्य ईश्वराच्या प्रत्येक स्वरुपाची पूजा उपासना करताना आपल्या इष्ट देवताची कल्पना त्या ईश्वरीय स्वरुपातहि करू शकतो.
भगवंतानी गीतेत हीच भावना रोखठोक शब्दात सांगितली ते म्हणतात, अर्जुन, मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे. मीच विष्णू आहे, मीच शंकर आहे, कुबेर आहे, अग्नि आहे, मेरू पर्वत आहे, कार्तिकेय आहे, महासागर आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ आहे, अश्वांमध्ये उचैश्रवा आहे, गजेंद्रामध्ये ऐरावत आहे आणि सुरभी गायहि आहे. मी सर्पांमध्ये वासुकी आहे, नागांमध्ये अनंत नाग आहे, वरुण आहे दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे, .....अर्थात त्या काळी माहित असलेल्या सर्व ईश्वरी स्वरूपांमध्ये एकच ईश्वर आहे हि भावना लोकांमध्ये रुजवली.
काळ पुढे गेला, भरतखंडात जनसंख्या वाढली, नवे नवे विचार जन्मले आणि त्या सोबत देवतांची संख्याहि वाढत केली. प्रत्येकाला आपला देव हा श्रेष्ठ वाटणारच. जिथे श्रेष्ठत्व तिथे भांडणेहि होणारच. आपल्या पुराणकारांनी, या वरहि उपाय शोधला. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमायेची संकल्पना लोकांच्या मनात रुजवली. सर्व स्त्री देवता म्हणजे आदिमायेचे स्वरूप. पुरुष देवता म्हणजे विष्णू किंवा महेश. इंद्राला पराजित करणारा गवळी समाजातला गोवर्धन गिरधारी हा विष्णू अवतार म्हणून प्रसिद्धी पावला तर धनगर समाजातील खंडोबा हे महादेवाचे अवतार ठरले. अश्या रीतीने समाजाला एकसुत्रात बांधण्याचे कार्य आपल्या ऋषी मुनी आणि पुराणकारांनी केले. सर्वांच्या परंपरेंचा आणि उपासना पद्धतींचा सम्मान केला. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच आहे, हि भावना जनतेत रुजवली.
पण आज आपल्या देशाचे दुर्भाग्य, स्वत:ला पुरोगामी(????) म्हणविणारे लोक समाजात दुही माजविण्याचे कार्य, मोठ्या जोमात करतात आणि स्वत:ला धन्य मानतात. प्रत्येकाला तो दुसर्यापासून कसा वेगळा आहे, हे दाखविण्यातच आपली उर्जा व्यर्थ करतात. अश्या अतिविद्वान लोकांना ‘खंडेराय’ मालिकेतहि षड्यंत्र दिसेल. पण ईश्वराला मानणारे आणि श्रद्धावंत लोक ‘खंडोबा’च्या स्वरुपात महादेवाचे दर्शन करतात आणि महादेवात खंडेरायांचे.
वाचने
12316
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
छान आहे. आवडला लेख.
छान आहे.
खंडेराय हे धनगर समाजातले होते
In reply to खंडेराय हे धनगर समाजातले होते by भीमराव
मला स्वत:लाहि खंडोबाच्या जीवन
In reply to खंडेराय हे धनगर समाजातले होते by भीमराव
बाप रे बाबुदादा! कुठून कुठून
आवो मांत्रिक बोवा ल्हान
खंडोबा = खोंडा हब्बा?
पटाईतराव ___/\___
In reply to पटाईतराव ___/\___ by बोका-ए-आझम
पटाईत राव , अप्रतिम लेख !!
बाबुदादा, श्रीनिवास टिळक
सुंदर.
कृपया गैरसमज पसरवणं थांबवा .
In reply to कृपया गैरसमज पसरवणं थांबवा . by तुडतुडी
अभ्यासोनि प्रकटावे
In reply to अभ्यासोनि प्रकटावे by प्रसाद गोडबोले
आपणच अभ्यासोनी प्रकटावे
In reply to कृपया गैरसमज पसरवणं थांबवा . by तुडतुडी
तुडतुडी ताई, लेख पुन्हा वाचा.
मूळ मल्हारी महात्म्यात बानू
In reply to मूळ मल्हारी महात्म्यात बानू by तुडतुडी
ओके . आपण संदर्भ द्यावा , मी
“Never forget the glory of human nature! We are the greatest god. Christs and Buddhas are but waves in the boundless ocean which I AM.”
- Swami VivekanandaIn reply to ओके . आपण संदर्भ द्यावा , मी by प्रसाद गोडबोले
आम्हा पामरांची पावलं कर्माचं
In reply to आम्हा पामरांची पावलं कर्माचं by प्यारे१
आम्हा पामरांची पावलं कर्माचं
In reply to आम्हा पामरांची पावलं कर्माचं by प्रसाद गोडबोले
:)
“Never forget the glory of
रा चिं ढेरे
कित्ती अभ्यास करतात नै लोक !!
तुमच्या कडुन अशा लिखाणाची अपेक्षा न्हवती...
मी दासबोध वाचलाय . चीड येते
In reply to मी दासबोध वाचलाय . चीड येते by तुडतुडी
___/\___ एक साथ नमस्ते!
In reply to मी दासबोध वाचलाय . चीड येते by तुडतुडी
बापरे!
In reply to मी दासबोध वाचलाय . चीड येते by तुडतुडी
समर्थ रामदास चमत्कार करणारे
मूळ लेखातील आशयापासून अवांतर
In reply to मूळ लेखातील आशयापासून अवांतर by प्रसाद प्रसाद
पुस्तकाचे नाव
In reply to पुस्तकाचे नाव by कपिलमुनी
दक्षिणेचा लोकदेव-खंडोबा
प्रसाद प्रसाद. अगदी असंच मी
तुडतुडीताई,
In reply to तुडतुडीताई, by तर्राट जोकर
हा हा हा...काय गंमत आहे बघा
रा चिं ढेरे
In reply to रा चिं ढेरे by पैसा
व्वा! दंडवत घ्या पैसाताई!
In reply to रा चिं ढेरे by पैसा
एकेकाळी जे घडायचे ते घडून
इथे उद्देश फक्त सत्य समोर