मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थांबली मुंबई सारी

यल्लप्पा सट्वजी कोकणे · · जे न देखे रवी...
गेला पाऊस बरसुनी रस्त्यांचे झाले नाले थांबली मुंबई सारी पाण्याखाली रेल्वे जाळे यल्लप्पा सटवाजी कोकणे २० जून २०१५ ९८९२५६७२६४

वाचने 4365 वाचनखूण प्रतिक्रिया 18

एस 22/06/2015 - 16:40
मिपावर धोधो कविता ओतणार्‍या पण इतरांच्या धाग्यांवर अजिबात न फिरकणार्‍या समग्र कवींना सरळ ब्लॉक करून टाकावे निदान काही दिवसांसाठी तरी.

In reply to by टवाळ कार्टा

सूड 22/06/2015 - 17:51
"तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै" असे झाले =))
अरे कार्ट्या, ते धाग्यावर न फिरकणार्‍या म्हणतायेत. धाग्यावर फिरकणे याचा अर्थ 'चान चान प्रतिसाद देणे' असा होत नाही. सगळ्यांचीच मानसिकता 'घटं भिंद्यात् पटं छिंद्यात्' नसते.

In reply to by सूड

टवाळ कार्टा 22/06/2015 - 19:42
तेच म्हणतोय जे मलापण वाटलेले....दुसर्यांच्या कवीता वाचल्याच नैत हे सिध्ध क्करता येणार नै...प्रतीसाद देत नै म्हणून काही दिवस बॅन करणे जरा अतीच होईल

स्वॅप्ससरांबरोबर सहमत, त्यांच्या प्रतिसादावर आलेले उपपतिसाद वाचताना खालील ओळी लिहिल्या आहेत, कविता जरी प्रतिसादात लिहीत असलो तरी ती एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून वाचावी. म्हणतो लाल तुझी अन, तू ही म्हणावे माझी लाल आडवे जे अपल्याला जाती रंगवू त्यांचे दोन्ही गाल, रेकता तू गदर्भापरी, मी म्हणावे कोकीळ गान, असशी जरी तू कितीही हलकट मी म्हणावे चान चान पाडिल्या मी जरी तांबिय कविता, त्यां तू म्हणशी भगवतगीता, वाढण्या ट्यारपी माझ्या धाग्याचा तू डिवचून उठवी अनाहिता, कौतूक करता कोणी माझे, चुंबावा तू त्याचा माथा, टीका करी जो तुझीया वरती, मी घालाव्या त्याला लाथा, पैजारबुवा,