केजरूके गुलाम
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.
सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.
या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.
पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?
मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.
असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.
केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.
नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.
प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.
हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.
अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.
या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).
या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.
वाचन
207294
प्रतिक्रिया
893
कुमार विश्वास
In reply to कुमार विश्वास by होबासराव
जूही खान या महिला आयोगाच्या
कुठलाहि आयोग हा निरपेक्ष असायला हवा ना?
In reply to कुठलाहि आयोग हा निरपेक्ष असायला हवा ना? by होबासराव
भयंकर शिसारी आणणारा प्रकार
युगपुरूषजी मिडियावर उखडले
In reply to युगपुरूषजी मिडियावर उखडले by गॅरी ट्रुमन
खरे कारण
In reply to युगपुरूषजी मिडियावर उखडले by गॅरी ट्रुमन
पैसे कुठून येणार?
In reply to पैसे कुठून येणार? by पैसा
आतापर्यंत ह्याना
युगपुरूषजी मिडियावर उखडले आहेत
Supreme Court stays Arvind Kejriwal's 'anti-media' circular
http://www.loksatta.com/desh-videsh-news/in-delhi-aap-govt-locks
In reply to http://www.loksatta.com/desh-videsh-news/in-delhi-aap-govt-locks by लॉर्ड फॉकलन्ड
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
In reply to दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद by नांदेडीअन
कस आहे ते . स्वतः काही काम
In reply to कस आहे ते . स्वतः काही काम by पिंपातला उंदीर
सगळीकडचे कॉंग्रेस नियुक्त
In reply to दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद by नांदेडीअन
.
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
नांदेडीयन,
In reply to नांदेडीयन, by चिनार
एका दुर्दैवी मृत्यूवर एक धागा
In reply to एका दुर्दैवी मृत्यूवर एक धागा by पिंपातला उंदीर
बाकी संजय जोशी , अडवाणीजी ,
In reply to एका दुर्दैवी मृत्यूवर एक धागा by पिंपातला उंदीर
गजेंद्र सिंग च्या मृत्यूची
In reply to नांदेडीयन, by चिनार
नांदेडीयन,
In reply to नांदेडीयन, by नांदेडीअन
तुम्ही जोपर्यंत अतिरेकी तयार
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
नांदेडीअन, वेलकम बॅक.
तिथे नेमके काय घडले होते, याचे व्हिडिओज अनेकांनी युट्युबर टाकले आहेत. ऎकीव माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा जरा बॅंडविड्थ खर्च करा आणि ते व्हिडिओज बघा. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्याला हात जोडून विनवणी करत होते खाली उतरण्यासंदर्भात. मंचावरून आम आदमी पक्षाचे नेते त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीसांना वारंवार विनंती करत होते, पण पोलीस निर्लज्जासारखे तमाशा बघत अक्षरशः हसत होते. शेवटी आपचेच काही कार्यकर्ते त्याला खाली उतरवण्यासाठी झाडावर चढले होते.
झी न्युजने हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे हे स्पष्ट दिसत आहे. सगळ्या न्युज चॅनल्सनी सुरूवातीला हाच व्हिडिओ दाखवला. नंतर हळू हळू सगळ्यांनी झी न्युजचा हा व्हिडिओ दाखवायचे बंद केले. झी न्युजने काय करामात केली होती ते या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. https://www.youtube.com/watch?v=xmdtxzuyFi8 हा वरचा व्हिडिओ जेव्हा देशद्रोही सोनु निगमने (हो, भक्तांसाठी आता तो देशद्रोही झालाय.) ट्विट केला, तेव्हा झी ग्रूपने लगेच सोनु निगमवर बॅन घालायचे ठरवले. झी ग्रूपने जाहिर करून टाकले की सोनु निगमचे गाणे असलेला कोणताही अल्बम किंवा चित्रपट झी ग्रूप विकत घेणार नाही किंवा वितरीतही करणार नाही. झी न्युजचे खंडणीखोर संपादक, जे तिहार जेलमध्ये जाऊन आले आहेम, त्या सुधिर चौधरींनी नंतर सोनु निगमला Desperate for publicity, Jobless singer वगैरे शब्दांनी हिणवले. सगळा ट्विटर समुदाय #IStandWithSonuNigam या हॅशटॅगच्या माध्यमातून सोनु निगम यांच्या पाठीशी उभा राहिला, पण या ‘जी हुजूर’ न्युज चॅनलने शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही. इनकी वफादारी देखकर तो कुत्ते भी शरमा जायें ।
त्यावेळी गजेंद्र सिंघ मेलाय की जिवंत आहे याबाबत माध्यमांमध्येच एकमत नव्हते. कुणी दाखवत होते की तो मेलाय, कुणी सांगत होते की त्याला दवाखाण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अरविंद केजरीवालने या घटनेनंतर फक्त १० मिनिटांचे भाषण केले. त्याबद्दलही नंतर त्यांनी माफी मागितली आणि १० मिनिटे भाषण का सुरू ठेवले याचे कारणही सांगितले. मिपावरच्या परमभक्तांना कंटाळून मी इकडे यायचे बंद केले होते, त्यामुळे या घटनेवर मी इकडे काही बोललो नाही. पण मी फेसबुकवर तेव्हासुद्धा म्हणालो होतो की केजरीवालने १० मिनिटेच का होईना पण भाषण करायला नको होते.
इथवर येऊन पोहोचलो आहोत आपण. राजस्थानमधल्या एका शेतकर्याला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीमध्ये का यावेसे वाटले ? आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलावे वाटले ? राजस्थान सरकार आणि केंद्र सरकारवर त्याचा असा काय राग होता ? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. ‘हा आपने घडवून आणलेला खून आहे’. ‘ही आपची नौटंकी होती.’ ‘कुमार विश्वासला त्याचा प्लॅन नीट एक्जिक्युट करता नाही आला. त्याच्या तोंडून शेकडो लोकांपुढे लटक गया हे चुकीने निघाले आणि पर्दाफाश झाला.’ ‘रडण्यासाठी आशुतोषला ऑस्कर द्यायला पाहिजे.’ हो, अगदी इथवर येऊन पोहोचलो आहोत आपण.
याबद्दल मी मिपावर अगोदरच लिहिले आहे. वेळ आणि इच्छा असेल तर शोधून वाचून घ्या. :)
बराच रिकामा वेळ दिसतोय आपल्याकडे. माझे विचार हे मुल्यवान आहेत आणि ते वाचण्यासाठी तुम्ही इतकी धडपड करताय हे पाहून खूप बरे वाटले. पण किमान माझे तरी भक्त होऊ नका हो. असो. थॅन्क्स फॉर युवर एन्करेजिंग वर्ड्स. :) मी भक्तांसोबत चर्चा करायचे का बंद केले होते हे वर सांगितलेच आहे. आता हेच बघा ना. एव्हढा मोठा पोस्ट लिहिला तुम्ही, पण त्यात एक वाक्य खरे लिहिले असेल तर शप्पथ ! देवाने गेल्या काही दिवसांत मला अशा धादांत खोट्या माहितीने ओतप्रोत असलेल्या पोस्ट्सकडे दुर्लक्ष करण्याची सुबुद्धी दिली होती. पण आज १०-१५ मिनिटं वाया घालवून तुम्हाला का रिप्लाय करतोय काही कळत नाहीये. नक्कीच काहीतरी जादू किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर आहेत तुमच्याकडे. अशा बिवबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यात माझा किती वेळ वाया जात होता हे मलाच कळत नव्हते. तुमच्याकडे असलेल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवरने तुम्ही तुमचा वाया गेलेला वेळ परत आणू शकत असाल. माझ्याकडे तशी कोणतीही पॉवर नाहीये हो. :( जाऊ द्या. तुम्हाला माझे मुल्यवान विचार वाचायचेच आहेत ना ? मग माझा फेसबुकवरचा तो पोस्ट टाकतो इकडे. माझ्या फेसबुकच्या मित्र यादीमध्ये अमराठी भाषिक मित्रांची संख्या खूप आहे, त्यामुळे पोस्ट इंग्रजी, मराठी, हिंदी असा मिक्स भाषेमध्ये लिहिला होता. थोडा त्रास होईल वाचतांना, पण सहन करून घ्या. त्यात एक वाक्य टाकायचे राहून गेले होते, ते इथे टाकतो. Arguing with idiot is like playing chess with a pigeon... No matter how good you are, the bird is going to shit on the board and strut around like it won anyway. दुसर्या प्रतिसादामध्ये माझा तो फेसबुकचा पोस्ट टाकतो. तोसुद्धा वाचून घ्या. काहीच शंका उरणार नाहीत मनात.
In reply to नांदेडीअन, वेलकम बॅक. by नांदेडीअन
Time to clean the profile by
In reply to नांदेडीअन, वेलकम बॅक. by नांदेडीअन
तिथे नेमके काय घडले होते,
In reply to तिथे नेमके काय घडले होते, by चिनार
.
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
त्याची सुसाईड नोट त्याने
In reply to त्याची सुसाईड नोट त्याने by चिनार
नुसतेच तेव्हढे नाही तर ...
In reply to नुसतेच तेव्हढे नाही तर ... by विकास
.
In reply to तिथे नेमके काय घडले होते, by चिनार
तुम्हाला बुवा फारच चिंता आहे
In reply to तुम्हाला बुवा फारच चिंता आहे by नांदेडीअन
बर बर ...चालुद्या !
In reply to बर बर ...चालुद्या ! by चिनार
मी तर चालतच राहीन हो.
In reply to मी तर चालतच राहीन हो. by नांदेडीअन
चालत राहा !
In reply to नांदेडीअन, वेलकम बॅक. by नांदेडीअन
तिथे नेमके काय घडले होते,
In reply to तिथे नेमके काय घडले होते, by लॉर्ड फॉकलन्ड
आपल्याला माहीत नाही का?
In reply to दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद by नांदेडीअन
.
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
थांबा. त्यांची अपाँईंटमेंट
In reply to थांबा. त्यांची अपाँईंटमेंट by मृत्युन्जय
कायदेशीर असली किंवा नसली तरी
In reply to कायदेशीर असली किंवा नसली तरी by लॉर्ड फॉकलन्ड
जर कायदेशीर नसेल तर त्यात
In reply to जर कायदेशीर नसेल तर त्यात by मृत्युन्जय
.
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
असे असेल तर केजरीवाल
स्टिंग ऑपरेशन
In reply to स्टिंग ऑपरेशन by गॅरी ट्रुमन
सरकारी अधिकार्याला लाच
In reply to सरकारी अधिकार्याला लाच by नांदेडीअन
आर्र्र्र्र्र ! भक्तांच लैच
In reply to आर्र्र्र्र्र ! भक्तांच लैच by पिंपातला उंदीर
एच एस फुलका
केजरीवालगीरी
बर्याच आहेत तुर्तास एव्ह्ढेच
एखाद्याने आपल्या राजकीय
In reply to एखाद्याने आपल्या राजकीय by पिंपातला उंदीर
अहो हा केजरूला शिव्या घालायचा
In reply to एखाद्याने आपल्या राजकीय by पिंपातला उंदीर
प्रशांत भुषण आणि योगेंद्र
नाही पण एवढे इतर लोक असताना
दिल्लीतला भ्रष्टाचार कमी
In reply to दिल्लीतला भ्रष्टाचार कमी by चिनार
उपाययोजना सोपी आहे
बाकी राज्यांना सुद्धा फायदा होईल
In reply to बाकी राज्यांना सुद्धा फायदा होईल by ईश्वरसर्वसाक्षी
याला
In reply to याला by विकास
याला कुर्हाडीवर पाय मारणे
In reply to याला कुर्हाडीवर पाय मारणे by काळा पहाड
:)
दिल्लीचे मुख्य सचिव फक्त १०
In reply to दिल्लीचे मुख्य सचिव फक्त १० by श्रीगुरुजी
याच परिमल रॉय यांना मनोहर
In reply to याच परिमल रॉय यांना मनोहर by नांदेडीअन
आज हायकोर्टामध्ये कॉलेजतर्फे
In reply to आज हायकोर्टामध्ये कॉलेजतर्फे by नांदेडीअन
>>> केस अजूनही संपलेली नाहीये
In reply to याच परिमल रॉय यांना मनोहर by नांदेडीअन
केजरीवालांनी पूर्वीच सांगितले
In reply to दिल्लीचे मुख्य सचिव फक्त १० by श्रीगुरुजी
कमाल आहे
In front of camera : - Arvind Kejriwal : We are against corruption.Behind the camera :- Kejriwal : Reward posts to corrupt people.And what when caught? Kejriwal :- Ye sab modi ki chaal hai.राजेंद्र कुमार प्रकरण आत्ताचे आहे ना. गुरुजींनी सहामहीन्यापुर्वी लिहून ठेवले आहे ते पुन्हा लागु होत आहे.ते काय करायचं ते आप बघून घेईल
In reply to ते काय करायचं ते आप बघून घेईल by पिंपातला उंदीर
तुम्ही फार अवघड करताय
In reply to ते काय करायचं ते आप बघून घेईल by पिंपातला उंदीर
बाकी आपची काळजी आम्हाला
त्यांनीच स्वतःची तुलना त्या
दोन्ही न्यायालयांचा आप ला झटका
In reply to दोन्ही न्यायालयांचा आप ला झटका by श्रीगुरुजी
?
In reply to ? by विकास
+१
निदान आतातरी केजरीवाल नौटंकी सोडून कामाला लागतील
Why did TV headlines
<strong>केजरु के गुलाम या जोकर !! </strong>
केजरीवाल सरकारच्या शिरपेचात
In reply to केजरीवाल सरकारच्या शिरपेचात by श्रीगुरुजी
माजी...
पूर्ण चौकशी होऊन, कोर्टाचा
In reply to पूर्ण चौकशी होऊन, कोर्टाचा by नांदेडीअन
अच्छा म्हणजे युगपुरुषांना
In reply to अच्छा म्हणजे युगपुरुषांना by काळा पहाड
कॅमेरे? कसले कॅमेरे? त्याआधी
In reply to कॅमेरे? कसले कॅमेरे? त्याआधी by श्रीगुरुजी
स्मार्ट सिटी
In reply to स्मार्ट सिटी by कपिलमुनी
माझ्या माहितीप्रमाणे स्मार्ट
In reply to माझ्या माहितीप्रमाणे स्मार्ट by चिनार
स्मार्ट सिटीज वर एक वेबसाईटच
In reply to स्मार्ट सिटी by कपिलमुनी
तुमची निराशा होण्याची शक्यता
In reply to तुमची निराशा होण्याची शक्यता by काळा पहाड
प्रश्न
In reply to प्रश्न by कपिलमुनी
ओके. मला वाटलं मला रिप्लाय
In reply to प्रश्न by कपिलमुनी
तुमचा अपेक्षाभंग होणार आहे.
In reply to तुमचा अपेक्षाभंग होणार आहे. by श्रीगुरुजी
काहीही हं श्री !
In reply to काहीही हं श्री ! by कपिलमुनी
लोळ : ) : )
In reply to लोळ : ) : ) by पिंपातला उंदीर
पिंपात उंदीर लोळतोय असे चित्र
In reply to पूर्ण चौकशी होऊन, कोर्टाचा by नांदेडीअन
>>> पूर्ण चौकशी होऊन,
In reply to >>> पूर्ण चौकशी होऊन, by श्रीगुरुजी
गुरुजी
In reply to गुरुजी by कपिलमुनी
स्मृती इराणींबाबत माहिती
In reply to स्मृती इराणींबाबत माहिती by श्रीगुरुजी
केस चालू आहे
In reply to केस चालू आहे by कपिलमुनी
तोमर व इराणी यांच्या केसमध्ये
In reply to >>> पूर्ण चौकशी होऊन, by श्रीगुरुजी
४ महिने तोमरचे समर्थन करून
बबन लोणीकर (भाजप) - मंत्री
In reply to बबन लोणीकर (भाजप) - मंत्री by सतीश कुडतरकर
श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी by कपिलमुनी
कपिलमुनी
In reply to कपिलमुनी by सतीश कुडतरकर
सतीश भौ
In reply to सतीश भौ by कपिलमुनी
मुनिवर
In reply to बबन लोणीकर (भाजप) - मंत्री by सतीश कुडतरकर
स्कीप
नांदेडीअन
In reply to नांदेडीअन by होबासराव
भविष्यात कुणी राजकारणी असा फ्रॉड करायचा विचारसुद्धा करणार नाही
काय हालत करून टाकलीय. दिल्ली
In reply to काय हालत करून टाकलीय. दिल्ली by काळा पहाड
शीला दिक्षीत
In reply to शीला दिक्षीत by कपिलमुनी
धाधांत खोटे विधान
मेट्रो प्रकल्प हे शीला दिक्षित सरकारचे मोठे यश आहे.भाजप विरोधाची ही परिसीमा आहे. अनेक वर्षे आणि अनेक लोकांच्या परिश्रामाचे यश आहे. Physical construction work on the Delhi Metro started on 1 October 1998. After the previous problems experienced by the Kolkata Metro, which was badly delayed and 12 times over budget due to "political meddling, technical problems and bureaucratic delays", DMRC is a special purpose organisation vested with great autonomy and powers to execute this gigantic project involving many technical complexities, under a difficult urban environment and within a very limited time frame. DMRC was given full powers to hire people, decide on tenders and control funds. The DMRC then consulted the Hong Kong MTRC on rapid transit operation and construction techniques. As a result, construction proceeded smoothly, except for one major disagreement in 2000, where the Ministry of Railways forced the system to use broad gauge despite the DMRC's preference for standard gauge. The first line of the Delhi Metro was inaugurated by Atal Bihari Vajpayee, the Prime Minister of India, on 24 December 2002 and thus, it became the second underground rapid transit system in India, after the Kolkata Metro. The first phase of the project was completed in 2006, on budget and almost three years ahead of schedule, an achievement described by Business Week as "nothing short of a miracle".राजकारण हे तडजोडीवर चालत
In reply to राजकारण हे तडजोडीवर चालत by होबासराव
सरकार चालवणे मुष्किल होइल
माणूस थोडा प्रगल्भ होतो आणि
साधारण २-३ महिन्यांपूर्वी मी
In reply to साधारण २-३ महिन्यांपूर्वी मी by नांदेडीअन
(No subject)
In reply to (No subject) by कपिलमुनी
वरील उत्तरात काय वावगं आहे हे
In reply to वरील उत्तरात काय वावगं आहे हे by चिनार
किती बजेट
In reply to किती बजेट by कपिलमुनी
"budget allocation for each
In reply to साधारण २-३ महिन्यांपूर्वी मी by नांदेडीअन
>>> सगळीकडे काम सुरू आहे CCTV
In reply to >>> सगळीकडे काम सुरू आहे CCTV by श्रीगुरुजी
प्रश्न असा आहे, की १६,००,०००/
In reply to प्रश्न असा आहे, की १६,००,०००/ by काळा पहाड
१. पाच वर्षात १६ लाख कॅमेरे
In reply to १. पाच वर्षात १६ लाख कॅमेरे by मृत्युन्जय
इथे थोडंसं अॅनॅलिसीस आहे:
In reply to प्रश्न असा आहे, की १६,००,०००/ by काळा पहाड
१६००००० की १५०००० ?
In reply to १६००००० की १५०००० ? by चिनार
प्रॉमिस दहा ते पंधरा लाखांचे
केजरीवाल यांनी राजकारणात
मोदी आणि केजरीवाल
In reply to मोदी आणि केजरीवाल by कपिलमुनी
पटेश!
हम्म
हिंदुत्ववादी नेत्यांच्या उथळ वक्तव्यामुळे
माई
सोमनाथ भारती
In reply to सोमनाथ भारती by होबासराव
http://indiatoday.intoday.in
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by स्पार्टाकस
त्या धाग्याचा दुवा इथे देऊ
In reply to त्या धाग्याचा दुवा इथे देऊ by डॉ सुहास म्हात्रे
स्पार्टाकस या आय डी चे लेखन
In reply to स्पार्टाकस या आय डी चे लेखन by सतीश कुडतरकर
हा दुवा नाही "केजरीवाल भजन
In reply to हा दुवा नाही "केजरीवाल भजन by डॉ सुहास म्हात्रे
हा तो दुवा - http://www
In reply to हा तो दुवा - http://www by स्पार्टाकस
स्पार्टाण्णा
In reply to स्पार्टाकस या आय डी चे लेखन by सतीश कुडतरकर
ह्याविषयी
In reply to ह्याविषयी by कपिलमुनी
कपिलमुनी
In reply to लेख आवडला. by स्पार्टाकस
तुला परत बघुन आनंद झाला.
In reply to लेख आवडला. by स्पार्टाकस
>>> ग्रामपंचायतीचा सरपंच
In reply to >>> ग्रामपंचायतीचा सरपंच by श्रीगुरुजी
देवेगौडा, गुजराल का चंद्रशेखर
In reply to देवेगौडा, गुजराल का चंद्रशेखर by स्पार्टाकस
यापैकीच १. ओळखा. उत्तर अगदी
In reply to >>> ग्रामपंचायतीचा सरपंच by श्रीगुरुजी
सोसायटीचे सेक्रेटरी
In reply to सोसायटीचे सेक्रेटरी by कपिलमुनी
>>> सोसायटीचे सेक्रेटरी
In reply to >>> सोसायटीचे सेक्रेटरी by श्रीगुरुजी
आणि फक्त तेवढंच नव्हे, तर
२००४ आणि २००९ च्या
In reply to २००४ आणि २००९ च्या by सतीश कुडतरकर
लोणीकरांच्या केसमध्ये फारसा
In reply to लोणीकरांच्या केसमध्ये फारसा by श्रीगुरुजी
लोणीकर साहेब मोठे वस्ताद
In reply to लोणीकर साहेब मोठे वस्ताद by पिंपातला उंदीर
होय... मी बीए पास नाही!
In reply to होय... मी बीए पास नाही! by नांदेडीअन
आपण बी. ए. पास आहोत असा दावा
दिल्ली
In reply to दिल्ली by सव्यसाची
ते करण्याची त्यांची इच्छा
In reply to दिल्ली by सव्यसाची
>>> परंतु ज्या गोष्टींवर
In reply to >>> परंतु ज्या गोष्टींवर by श्रीगुरुजी
रडीचा डाव