“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!
“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------
दि.३१/०५/२०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित माझा लेख
In reply to याचं नेमकं उत्तर मिळेल का? by संदीप डांगे
In reply to लेखात कुठेही शहरी लोकांना by गवि
In reply to धन्यवाद. by गंगाधर मुटे
In reply to शरद जोशी यांचे '`अंगारमळा '' by जेपी
In reply to शरद जोशी यांचे '`अंगारमळा '' by जेपी
In reply to पुरवठा साखळी (supply chain) by बाळ सप्रे
सरकार हे सर्वांचे प्रतिनिधी म्हणून एका कोणाचा अतिलाभ होउ नये म्हणून यावर नियंत्रण ठेवते हे तत्वतः योग्यच आहे.अरेवा, सरकारची ही किंमतीवर नियंत्रण ठेवायची इच्छा आणि शक्ती शेतीमालावरच संपते हे तुम्ही लक्षात घेतले नाही बहुतेक. तुमच्या प्रतिसादाचा तुम्हीच परत एकदा व्यवस्थित विचार करावा ही इनंती...
In reply to सरकार हे सर्वांचे प्रतिनिधी by संदीप डांगे
In reply to जिथे जिथे बहुतांश समाज हा by बाळ सप्रे
गॅस पेट्रोल दूध इ इ..यावर सरकारचे नियंत्रण आहे ही नवीनच माहिती आहे. जरा खुलासा विथ पुरावा कराल काय? तसेच तुम्हास माहित नसेल तर सांगून ठेवतो की पेट्रोलच्या किमतीत सुमारे ३५-४० टक्के करांचा वाटा असतो. पुढे बोला...
In reply to पुरवठा साखळी (supply chain) by बाळ सप्रे
In reply to सर्वत्र सत्य एकच by गंगाधर मुटे
In reply to >>> सर्वत्र सत्य एकच; तोट्यात by श्रीगुरुजी
In reply to >>> सर्वत्र सत्य एकच; तोट्यात by श्रीगुरुजी
In reply to लेखक उत्तर देईल असे वाटले by श्रीगुरुजी
In reply to माझे चार आणे.. by चिगो
In reply to आतापर्यंत मिपावर वाचलेल्या by संदीप डांगे
In reply to हो पण मग तसंच असेल तर by काळा पहाड
In reply to किंगफिशर, कोक, पेप्सी आणि इतर by संदीप डांगे
किंगफिशर, कोक, पेप्सी आणि इतर यांना ज्या दराने कच्चा माल, पाणी, कर्जे आणि इतर सुविधा मिळतात त्याच प्रमाणात शेतकर्यांना मिळत असतीलअजिबात समस्या नाही. पण या सुविधा पुरवणार्यांना (उदा: कर्ज देणारी बँक, वीज देणारी कंपनी, खते पुरवणारी कंपनी) यांना त्यांची गुंतवणूक त्यांना परतावा मिळवून देणार आहे असं वाटत असेल तरच ते देतील. सध्या तरी "किंगफिशर"चं उदाहरण देता येणार नाही कारण त्यांना कर्ज देणारी बँक ठणाणा करतीये, पण कोक, पेप्सी यांची तुलना करायची तर पत पुरवठेचं मानांकन, गुणवत्ता आणि धोका (रिस्क) याचा विचार कर्ज/सुविधा देणारी कंपनी करणारच. आजच टीव्हीवर बातमी होती की बँक पतपुरवठाच करत नाहीये म्हणून शेतकर्यांनी आंदोलन केलं.
पिकवलेल्या मालाचं आयात मालाच्या तुलनेत चांगलं प्रेझेंटेशन करू शकत असतील तरकाहीच समस्या नाही. ग्राहक दोन प्रकारचे असतात. जे क्वालिटी वर लक्ष देतात आणि दुसरे जे प्राईस कॉन्शस असतात. त्या त्या प्रकारचे ग्राहक त्या त्या प्रकारच्या विक्रेत्याकडे जातीलच.
In reply to किंगफिशर, कोक, पेप्सी आणि इतर by काळा पहाड
बँक पतपुरवठाच करत नाहीये म्हणून शेतकर्यांनी आंदोलन केलं.राष्ट्रीय खाजगी बँका व पेप्सी-कोक यांच्यापेक्षा स्थानिक पतपुरवठा संस्था आणि शेतकरी यांचे नाते जरा वेगळे आहे. बातमीची लिंक असती तर आंदोलनामागचे खरे कारण कळले असते. बर्याच पतसंस्था कायदेशीर सावकारीच असतात. त्यांनी कर्ज देणे क्रमप्राप्त आहेच. शेतीचा पतपुरवठा हा जरा गुंतागुंतीचा मामला आहे. ग्राहक दोन प्रकारचे असतात स्वतःच्या अनुभवानुसार सांगतो (दोनवर्षां आधी ऑर्डरनुसार घरपोच भाजीचा व्यवसाय करून बघितला) - प्राईस कॉन्शस ग्राहक ९५% टक्के आहेत. अगदी चार-चार करोडच्या फ्लॅटमधे राहणारे घरपोच शहाळ्यावर ५ रुपये जास्त लावले म्हणून खवळलेले बघितलंय. तेच लोक लाखोच्या गाडीत बसून पेट्रोल जाळत कॅफे कॉफीडेत जाऊन ५ रुपयाची कॉफी १०० रुपयाला विकत घेतात.
In reply to या सुविधा पुरवणार्यांना (उदा by संदीप डांगे
In reply to स्पर्धेत उतरा. by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकरकाका, by संदीप डांगे
तर माझा मुद्दा शेतकर्यांना त्यांचा माल कसा अधिक मौल्यवान आहे हे सांगून व्यवस्थित प्रेझेंटेशन केले तर स्पर्धेत टिकून चांगली किंमत व कस्टमर लॉयल्टी मिळू शकते.
सहमत.
पेठकर काका.. हॉटेल व्यवसायामध्ये भाज्या, धान्य वगैरे गोष्टी विकत घेताना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतातून वस्तू घेतल्या जातात किंवा त्याला प्राधान्य असते की दुकानातल्या वस्तूंना..? तुमचा काय अनुभव..?In reply to तर माझा मुद्दा शेतकर्यांना by मोदक
In reply to हो पण मग तसंच असेल तर by काळा पहाड
बियाणं आणि खतं सुद्धा एम आर पी वर विकलं जावू नये. त्यावेळी जो मार्केट रेट असेल त्या नुसार विकावं. ज्या शेतकर्याला परवडेल तो घेईल.कच्चा माल आणि विमान तिकीटांच्या किंमतीत एकच तत्व लाऊन कसं चालेल? पेप्सी/कोकवर पण MRP असतंच, राजे..
२. पाणी सुद्धा मीटर वर (लिटर प्रमाणे) दिलं जावं ३. सगळी सब्सिडी बंद करावी. ४. सगळी कर्जे काँपिटीटीव्ह रेट नुसार आणि पतफेडीच्या राष्ट्रीय मानकांनुसार दिली जावीत. कर्जमाफी वगैरे गोष्टीबद्दल बँकांना सरकारनं भाग पाडू नये.इतर कुठल्याही उद्योगाला सरकार जितकं प्रोत्साहन आणि संरक्षण देतं, तितकचं शेतीलाही द्यायला हवं. "पॅकेजेस" डुबतीला आलेल्या उद्योगांना/उद्योगसमुहांना पण देण्यात येतातच की..
५. एवढं करून सुद्धा जर आंतरराष्ट्रीय वस्तू स्वस्त असेल तर ती खरेदी करण्याची ग्राहकाला मुभा असावी (फ्री मार्केट तत्वानुसार).हे तर मान्यच केलंय वरच्या प्रतिसादात..
आहेत तयार शेतकरी याला?असावेत, असं वाटतं..
In reply to साहेब.. by चिगो
In reply to साहेब.. by चिगो
- म्हणूनच, शेतकर्याला 'खुल्या अर्थवस्थेचा' लाभ घेऊ द्यावा, ही मागणी आहे. मालाचा भाव तो ठरवणार. पिक/मालाच्या निर्यातीवर बंदी नको. भाव कडाडले तर ज्याची ऐपत असेल त्यानी विकत घेऊन खावे. आर्थिकदूष्ट्या दुर्बलांसाठी सरकारी अन्न-पुरवठा योजना आहेच..त्यावर मी लिहिलं,
बियाणं आणि खतं सुद्धा एम आर पी वर विकलं जावू नये. त्यावेळी जो मार्केट रेट असेल त्या नुसार विकावं. ज्या शेतकर्याला परवडेल तो घेईल.त्यावर तुम्ही लिहीलंत,
कच्चा माल आणि विमान तिकीटांच्या किंमतीत एकच तत्व लाऊन कसं चालेल? पेप्सी/कोकवर पण MRP असतंच, राजे..आता तुमचा स्टॅन्ड कसा बदलला? जर तुम्हाला "भाव कडाडले तर ज्याची ऐपत असेल त्यानी विकत घेऊन खावे" हे चालतं तर "ज्या शेतकर्याला कच्चा माल परवडेल तो घेईल" याच्यात काय चुकीचं आहे? मग शेतमालाला एम.आर.पी का नको? म्हणजे कच्चा माल ठराविक किंमतीत पण तयार शेतमाल अमर्यादित किंमतीत असं तुम्ही सुचवताय. मला कच्चा माल अमर्यादित किंमतीत नकोयच पण तो त्या पोस्ट चा लॉजिकल रिप्लाय आहे हे लक्षात घ्या.
इतर कुठल्याही उद्योगाला सरकार जितकं प्रोत्साहन आणि संरक्षण देतं, तितकचं शेतीलाही द्यायला हवं. "पॅकेजेस" डुबतीला आलेल्या उद्योगांना/उद्योगसमुहांना पण देण्यात येतातच की.."पॅकेजेस" हे नवीन उद्योगांना दिले जात नाहीत. उद्योग डबघाईला आला की सरकार विचार करून तो निर्णय घेतं. शिवाय निदान भारतात पॅकेजेस हे सरकारी उद्योगांना किंवा सरकारी बँकांना दिले जातात. किंगफिशर ला जर कोणी पॅकेज द्यायला लागेल तर त्याचा विरोधच होईल. पाणी, वीज, सब्सिडी आणि कर्ज हे शेती करण्या आधी दिले जातात. जेव्हा आपण फ्री मार्केट बद्दल बोलतोय त्यावेळी हे लॉजिक वापरणं चुकीचंच नाही का? बाकी "पॅकेजेस" दिले जातात ही चांगली गोष्ट नाहीयेच. जनतेचा पैसा असा कुठेच उधळला जावू नये. शेतीला किंवा उद्योगाला सुद्धा.
In reply to चिगोजी, तुम्ही लिहिलं होतं, by काळा पहाड
In reply to चिगोजी, तुम्ही लिहिलं होतं, by काळा पहाड
पाणी, वीज, सब्सिडी आणि कर्ज हे शेती करण्या आधी दिले जातात.व्यवसाय करण्यासाठी कर्ज, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 'टॅक्स हॉलिडेज' 'SEZ' विशिष्ठ सुविधा/सवलती हे उद्योग/व्यवसाय सुरु करण्याच्या पुर्वीच दिले जाते.
In reply to हो पण मग तसंच असेल तर by काळा पहाड
In reply to माझे चार आणे.. by चिगो
In reply to मी खाली जे काही लिहेन त्याला by अद्द्या
In reply to माझ्या अल्पकुवतीप्रमाणे प्रतिसाद.. by चिगो
In reply to माझ्या अल्पकुवतीप्रमाणे प्रतिसाद.. by चिगो
- पण कुठलाही शेतकरी बाजार, शेतकरी खरेदी विक्री संघ्,शेतकर्यांचीच पतसंस्था सांगाहो खरेच कुणी बुडविली. ज्या पंचगंगेत सहकाराची बीजे रोवली तिथला मी आयुष्यात पाहिलेला दुसरा सहकरी मॉल साल १९९० (पहिला मुंबईत अपना बझार साल १९९०)आत्ता काय अवस्थेत आहे?
- शेतकर्यांचे नातेवाईक्/मित्र/हितचिंतक जे शहरात रहात आहेत (अगदी भाऊ,मुलगा) इ ते काही संघटीत प्र्यत्न करू शकणार नाहीत्च का? (किमान नाशवंत माल त्याप्रमाणेच वार्षीक साठवणीची धान्ये) विक्री साठी?
- हे फक्त आप्लया माहीती करीता पुण्यात विदर्भ्-मराठवाड्यातील जिल्हावार मित्रमंडळे आहेत (लातूर मित्र मंडळ) आणि काही ठिकाणी त्यांची मंगलकार्यालये,सदने आहेत त्यांचा फक्त भावकीतील लग्नसराईसाठीच उयोग आहे का? धागालेखकाने यापूर्वींच्या धाग्यातही शहरी आणि अकृषीक मिपाकरांशी "सुसंवाद" केला होताच. पण खरेच सगळे कृषीतज्ञ "टाकावू आणी नालायाक" आहेत काय?
जाता जाता मागच्या धाग्यावरील काही किरकोळ व या धाग्यावरील चौराकाकांच्या "अतिकिरकोळ" प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे मिळाली (आप्लयाकडून नाही धागाकर्त्यांकडून तरी पुरे अन्याथा प्रसिद्धीसाठी मिपाचा रंगमंच आहेच "चला हवा येऊ द्या" सारखा.
In reply to चिगो by नाखु
In reply to धन्यवाद, नाखु.. by चिगो
In reply to धन्यवाद, नाखु.. by चिगो
In reply to धन्यवाद, नाखु.. by चिगो
In reply to चिगो by नाखु
In reply to मी खाली जे काही लिहेन त्याला by अद्द्या
In reply to धन्यवाद by गंगाधर मुटे
In reply to शेतकर्यांकडे खरेच वेळ नसतो. by अद्द्या
In reply to म्हणजे आपल्या विरुद्ध मत by यशोधरा
In reply to आकाशातला द्येव by नाखु
In reply to म्हणजे आपल्या विरुद्ध मत by यशोधरा
In reply to आंध्र प्रदेशात( पूर्वीच्या) by सुबोध खरे
In reply to आता दोघांतिघांनी मटात लेख by कंजूस
जोपर्यंत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला बरकत येऊच शकत नाहीजमिनीचा पोत, खतांची मात्रा, बियानांची प्रत, पाण्याची उपलब्धता, तंत्रज्ञानाचा वापर, मजूरीचे दर, वाह्तूकीचा खर्च इत्यादीमुळे एकाच प्रकारच्या शेतीउत्पादनाचा उत्पादन खर्च विविध भागात भिन्न असू शकतो. ह्या सर्व घटकांचा विचार करून शेतीमालाचा उत्पादन खर्च काढण्याचा समाधानकारक फॉर्म्युला मुटेसाहेब आपल्याकडे असेल तर येथे देऊ शकाल का?
अनेकदा शेतकर्यांनी मार्केटिंग करायला शिकावे, असा सल्ला घाऊकपणे दिला जातो. आता या उपटसुंभांना कोणी सांगावे की, कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन आणि विपणन हे दोन स्वतंत्र भाग असतात.सहमत. मुर्खच असे सल्ले देऊ शकतात. शेतकर्यांनी व शह्ररी जनतेने एकमेकांना दोष देणे बंद केले पाहीजे, कोणीही कोणावर मेहेरबानी करत नाही, दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत. शहरातील प्रत्येक नागरीक इन्कम टॅक्स भरत नाही आणी जरी भरत असला तरी त्यातूनच शेतकर्यांना पॅकेज मिळते हा जावईशोध कोणी लावला. शेतकरीही शहरी नागरीकासारखाच बाजारातून उत्पादने खरेदी करतो, शहरी नागरिकासारखा तोही ह्या उत्पादनावर असलेले अप्रत्यक्ष कर भरत असतो, त्यामुळे शेतकरी टॅक्स भरत नाही व शेतकर्याला पॅकेज आमच्याच करातून मिळते हे म्हणनेही चुकीचे आहे. मुटेसाहेब लिहीत रहा. वादाच्या मुद्यांवर आपल्या प्रतिक्रिया अपेक्षीत.
In reply to शेतकर्यांनी व शह्ररी जनतेने by मार्मिक गोडसे
In reply to शेतकर्यांनी व शह्ररी जनतेने by मार्मिक गोडसे
In reply to वेतन आयोग by गंगाधर मुटे
-शेतीमालाचा उत्पादन खर्च काढण्याचा समाधानकारक फॉर्म्युला १९८० पासून तयार आहे. पण सरकार विचारायलाच तयार नाही.सरकार नसेल तर आम्ही विचारतो. आपण हा फॉर्म्युला मिपावर धाग्याच्या रुपाने प्रकाशीत करू शकता. खरोखरच ह्या फॉर्म्युल्याने शेतकर्यांचे समाधान होत असेल तर आम्हालाही समाधान वाटेल.
- शासकिय कर्मचार्यांच्या गरजा आणि खर्च ही देशाच्या वेगवेगळ्या भागात हमखास भिन्न असतो. मग एकच वेतन आयोग सर्वांना लागू होऊ शकेल असा मार्ग काढला जातोच ना?अहो वेतन आयोगाचे निकष वेगळे असतात.त्यांच्यामते शासकिय कर्मचारी हा त्याच्या पगारात महागाईला तोंड देऊ शकणार नाही म्हणुन त्यांची महागाई सोने, चांदी,रिअल ईस्टेटच्या भावाने मोजली जाते. वेतन आयोगाच्या महागाईचा आधार घेतला तर आज मेथी किंवा कोथंबिरीच्या एका जुडीचे शेतकर्याला १००-१२५ रु. मिळायला हवेत. ह्या वेतन आयोगामुळे शासकिय कर्मचारी नाराज झालेला दिसलाय कधी तुम्हाला?
अप्रत्यक्ष कर असतो आणि देशातील तमाम जनता तो कर भरत असते, हे ज्यांना माहीत नसते ते "मी कर भरतो" अशा स्वरूपाची स्वतःची समजूत करून घेत असते. चालायचेच.ह्यावर बरेच लिहून झाले आहे पण कुत्र्याचे शेपूट वाकडेच.
In reply to . by निनाद मुक्काम …
In reply to . by निनाद मुक्काम …
कापूस व साखरेच्या मागे न लागता डाळी व खाद्य तेलाची शेती का भारतात होत नाहीभारतातील बहुसंख्य शाकाहारी जनतेसाठी डाळी प्रोटीन मिळवण्याचा प्रमुख स्त्रोत आहे म्हणून डाळी पिकविण्याचा विचार शेतकरी करू शकत नाही. ज्या पिकामध्ये २ पैसे जास्त मिळण्याची शक्यता असेल ते पीक घेण्याचा शेतकर्यांचा कल असतो, जो की स्वाभाविक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शेतीमध्ये डाळ आणि तेलवर्गीय पिकांवर सरकारांची करडी नजर राहत आली आहे. येणकेन प्रकारेन भाव पाडण्याचा प्रयोग सर्वात जास्त याच पिकावर करण्यात आला. त्यामुळे या पिकांना शेतकर्यांनी कायमच दुय्यमस्थान दिलेले आहे. इलाज नसेल तरच ही पिके नाईलाजाने घेतली जातात. आता काही भागात सोयाबिन हे मुख्य पीक झाले आहे पण सोयाबिनचे भाव तेलाच्या किंमतीवर नव्हे तर सोयाबिनच्या पेंडवर (डीओसी) ठरतात, हे कारण आहे. जनतेला स्वस्तात डाळी आणि तेल पुरवायचे असेल तर भाव पाडून शेतकर्यांची मुस्कटदाबी करण्यापेक्षा सरकारने शेतकर्यांना योग्य भाव मिळू द्यावेत आणि शेतकर्याला सबसिडी देण्याची भाषा करण्याऐवजी ग्राहकांना सबसिडी (सिलेंडरच्या धर्तीवर) द्यावी. हाच डाळी आणि खाद्यातेलांचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
In reply to अनेक वर्षांपासून आपले परकीय by निनाद मुक्काम …
In reply to अनेक वर्षांपासून आपले परकीय by निनाद मुक्काम …
In reply to कॉर्पोरेट शेती किंवा टाटाने by गंगाधर मुटे
In reply to सध्या सुद्धा अन ब्रँडेड मीठ by काळा पहाड
सध्या सुद्धा अन ब्रँडेड मीठ बाजारात उपलब्ध आहे आणि त्याची किंमत कमी आहे.अर्थ स्पष्ट झाला की टाटा आल्याने किंमत घटत नाही. वाढते!
डाळीची किंमत ९९९/किलो होईल तर जनता बाहेरची डाळ वापरणार नाही का?याचा अर्थ सुद्धा तोच की टाटाची शेती किंवा कॉर्पोरेट शेतीचे बारा वाजणार! म्हणून टाटा चपला-जोडे बनवेल/विकेल पण शेती करणार नाही.
In reply to कॉर्पोरेट शेती किंवा टाटाने by गंगाधर मुटे
In reply to मुटे सर, by सुबोध खरे
In reply to खरे साहेब, मिठात आयोडीन घातल्याने by ऋतुराज चित्रे
In reply to सहमत by dadadarekar
In reply to धन्यवाद दरेकर साहेब by गंगाधर मुटे
In reply to यावर एक लेख वाचला होता … by अनिरुद्ध.वैद्य
In reply to अहो साहेब, ते मॉडर्न सायन्स by संदीप डांगे
In reply to मॉडर्न सायन्स by सुबोध खरे
In reply to मॉडर्न सायन्स by सुबोध खरे
In reply to खरे साहेब, मिठात आयोडीन घातल्याने by ऋतुराज चित्रे
In reply to मजा आली वाचायला पण जल्ला कुणी by जेपी
In reply to लोकसत्तेतील बातमी..... by जयंत कुलकर्णी
In reply to लोकसत्तेतील बातमी..... by जयंत कुलकर्णी
कोणास लाज वाटाया हवी हे समजत नाही उमजत नाही. सहकारी तत्वावर सूतगिरणी काढायचे काम शेतकरी करतात.सहकारी तत्वावर सूतगिरणी काढायचे काम शेतकरी करत नाहेीत.पुढारी करतात. पुढारी आणि शेतकरी हे दोन स्वतंत्र शब्द आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र वेगळे आहे. त्यांचे हितसंबंध वेगळे आहेत. माझ्यावर विश्वास नसेल तर कृपया शब्दकोष बघावा आणि तुमच्या मनात पुढार्याविषयी असलेला असंतोष निष्कारण शेतकर्यावर कृपा करून काढू नये ही विनंती. ***************** पोस्ट मध्ये अन्य मुद्दे आलेत त्याचे उत्तर इतकेच की सहकार अपयशी ठरला आहे. व्यापार करणे हे सरकारचे किंवा येर्यागबाळ्याचे काम नाही. व्यापार फक्त व्यापारीच करू शकतो. सरकारने व्यापार करण्याच्या फंदात पडू नये.
In reply to सरकारने व्यापार करण्याच्या फंदात पडू नये. by गंगाधर मुटे
In reply to आहो मुटेसाहेब, by जयंत कुलकर्णी
In reply to साखर कारखान्यांना हवे अनुदान, by अभिजित - १
In reply to हायला! by पैसा
In reply to कर्ज माफी.... by प्रभाकर पेठकर
In reply to साखर कारखान्यांना हवे अनुदान, by अभिजित - १

अहो वेगवेगळे हप्ते, खंडण्या,