“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!
“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!
शेतकरी नेते मा. शरद जोशींचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १९८० पूर्वी शेतकर्यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. "कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकर्यांची संघटना होणार नाही" असे त्या काळी म्हटले जायचे. पण शरद जोशी नावाच्या एका ज्ञानेश्वराने शेतकर्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा मुका असलेला शेतकरी समाज ज्ञानेश्वराच्या रेड्याप्रमाणे बोलायला लागला. नुसताच बोलायला लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा शेतकरी चक्क मूठ आवळून रस्त्यावर उतरला. सरकारशी दोन हात करायला सज्ज झाला. शेतकरी संघटनेने शेतकर्याला त्याच्या गरिबीचे आणि दारिद्र्याचे मूळ कारण सांगितले. शेतीत गरिबी आहे याचे कारण शेतीतला माल स्वस्तात स्वस्त भावाने लुटून नेला जातो, हेही शिकविले.
जोपर्यंत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला बरकत येऊच शकत नाही. मग तुम्ही निसर्ग शेती करा, सेंद्रिय शेती करा, कमी खर्चाची शेती करा, जास्त खर्चाची शेती करा, पारंपरिक शेती करा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा. शेती कशीही करा; जोपर्यंत शासनाचे शेतकरीविरोधी धोरण बदलत नाही तो पर्यंत शेतकर्याचे मरण अटळ आहे. कोरडवाहू शेती केली तर बिनपाण्याने हजामत होते आणि ओलिताची शेती केली तर पाणी लावून हजामत होते, या पलीकडे फारसा काहीही फरक पडत नाही.
शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढे भाव मिळायला पाहिजे, हे सर्वांनाच मान्य आहे. तसे कोणीच नाकारतही नाही पण; कृती मात्र हमखास उलटी करतात. कुणी अज्ञानापोटी करतो तर कुणी जाणूनबुजून करतो. कुणी स्वत:ला शेतीतज्ज्ञ म्हणवून घेत असले तरी शेतीच्या अर्थशास्त्राच्या बाबतीत बहुतांशी तज्ज्ञ निव्वळ अज्ञानीच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही.
शिवाय या स्वनामधन्य शेतीतज्ज्ञामध्ये आपसात एकजिनसीपणा नाही. प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला आहे. उठसूठ ज्याला जसे वाटते तसे सांगत सुटतो. कुणालाच खोलवर जाऊन विषयाचा पडताळा घ्यावासा वाटत नाही. कुणी म्हणतो निसर्गशेती करा, कुणी म्हणतो झिरो बजेट शेती करा, कुणी म्हणतो मार्केटिंग करायला शिका तर कुणी म्हणतो प्रक्रिया उद्योग उभारा. आता तर काही लोकं मानवी मूत्र वापरायचा सल्ला द्यायला लागलेत. ज्याला जसे वाटते तसेतसे बोलत राहतात. बोलायला माझी हरकत नाही. तोंड त्यांचे आहे व जीभही त्यांचीच आहे पण शेतमालाचे भाव म्हटलं तर यांची दातखिळी का बसते? हा प्रश्न शिल्लक राहतोच आणि इथेच खरी ग्यानबाची मेख आहे.
निसर्गशेती म्हणजे काय? आमचे बाप-आजे निसर्गशेतीच तर करत होते. रासायनिक खते वापरत नव्हते, कीटकनाशके फवारत नव्हते, संकरित बियाणे लावत नव्हते आणि घरी संडास नसल्याने संडासला शेतातच जात होते आणि तरीही देशाची लोकसंख्या कमी असूनही जनतेला जाऊ द्या; त्या शेतकर्यालाच पोटभर खायला अन्न मिळत नव्हते. धान्याच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, ओलिताची व्यवस्था निर्माण झाली, फ़वारणीसाठी किडीनुरूप कीटकनाशके निर्माण झाली आणि चमत्कार झाला. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यामागे रासायनिक खतांनी मोलाची भूमिका बजावली. आजही जर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर थांबवला तर देशाचे शेतीतील उत्पादन ७० ते ८० टक्क्यांनी घटेल, अशी परिस्थिती आहे. निसर्गशेतीचा सल्ला देणार्यांनो, मुंह खोलनेसे पहले कुछ तो शर्म करो!
झिरो बजेटशेती हा शब्द ऐकला की मला ओकार्या व्हायला लागतात. झिरो बजेट शेती हा शब्द मला काही केल्या पचवून घेताच आला नाही. शून्य खर्चाची शेती करायची म्हणजे नेमके काय करायचे? शेतीला बियाणे लागले ते चोरून आणायचे का? गोड गोड बोलून खतं उधारीत आणायची मग त्याचे पैसे बुडवायचे का? खर्च शून्य करायचा म्हटलं तर शेतकर्यांनी वस्त्र परिधान करणे सोडून झाडाच्या वल्कली अंगाभवती गुंडाळाव्यात का? मजुरांकडून फुकटात काम करून घ्यायचे म्हटले तर मग या देशात वेठबिगारी व गुलामगिरीची पद्धत नव्याने सुरुवात करायची का? कसली आली बोडक्याची शून्य खर्चाची शेती?
अनेकदा शेतकर्यांनी मार्केटिंग करायला शिकावे, असा सल्ला घाऊकपणे दिला जातो. आता या उपटसुंभांना कोणी सांगावे की, कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन आणि विपणन हे दोन स्वतंत्र भाग असतात. शेतीमध्ये सुद्धा जो शेती कसून उत्पादन करतो तोच शेतकरी असतो. शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे. शेती करताना वेळेची इतकी बचत होत नाही की त्याने जोडीला मार्केटिंगसदृश अन्य व्यवसाय करावा. आजवर अनेकांनी असे चिक्कार प्रयोग केले आहे पण “तेलही गेले, तूपही गेले; हाती धुपाटणे आले” अशीच त्यांची गत झाली, असे इतिहासच सांगतो. याउलट जो शेती सोडून केवळ मार्केटिंगमध्ये गेला त्याने चांगल्यापैकी बस्तान बसवले, असेही इतिहासच सांगतो. जो शेतकरी नोकरी, पुढारीपणा किंवा व्यापार करायला लागतो तो अल्पावधीतच नोकरदार, पुढारी किंवा व्यापारी होतो; शेतकरी म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. सातबारा नावाने असला तर त्याला शेतमालक म्हणता येईल, शेतकरी म्हणता येत नाही. अर्थात शेतकरी फक्त तोच जो शेती कसून उत्पादनाचा विभाग हाताळतो. एका वाक्यात असेही म्हणता येईल की “ज्याची उपजीविका फक्त आणि फक्त शेती उत्पादनावर अवलंबून असते, तोच खराखुरा शेतकरी” भलेही मग सातबारा त्याच्या नावाने असो किंवा नसो. तो भूधारक असो किंवा भूमिहीन असो! आपण जेव्हा शेतकरी असा शब्द वापरतो तेव्हा शेती कसून उत्पादन करणार्याविषयी बोलत असतो; व्यापारी, उद्योजक, दलाल यांच्या विषयी बोलत नसतो. शेती कसणे सोडून सार्यांनीच व्यापार सुरू करणे अशी कल्पनाच करणे शक्य नाही. इतके साधे गृहितक आमच्या शेतीतज्ज्ञांना कळत नाही, ही अद्भूतआश्चर्याच्या तोडीची बाब आहे.
तरीही शेतकामातून अतिरिक्त वेळ मिळाला तर किरकोळ मार्केटिंग करणे, शेतकर्याला वावगे नाही. अनादिकाळापासून शेतकरी शक्य होईल तसे किरकोळ मार्केटिंग करतच आला आहे. पूर्वी दहा-वीस गावाच्या परिघात एका मुख्य गावी गुजरी भरायची. आठवडी बाजार भरायचा. तिथे शेतकरी आपला शेतमाल स्वत: दुकान मांडून विकायचे. ही शेतमालाची मार्केटिंगच होती ना? आपल्या जवळचा शेतमाल विकून येणार्या पैशात अन्य गरजेच्या वस्तू खरेदी करणे, शेतकर्यांच्या अंगवळणीच पडले आहे. अगदी पौराणिक काळातला जरी विचार केला तरी गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला घेऊन जायच्याच ना? कुठे मध्यस्थ होता? कुठे दलाल होता? मग मार्केटिंग म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते? आणि तरीही बरेचशे उपटसुंभ तज्ज्ञ शेतकर्यांना जणू काही फार मोलाचा आणि क्रांतीकारी मूलमंत्र सांगतो आहोत, अशा थाटामाटात मार्केटिंगसारखा बोजड शब्द वापरून शेतकर्याला सल्ले द्यायला उतावीळ असतात.
पूर्वी गावागावात बाराबलुतेदारांचे व्यवसाय चालायचे, गावागावात तेलघाण्या होत्या. गुळाची गुर्हाळं होती, हातमाग होते, कवेलू बनविण्याच्या भट्ट्या होत्या, कुंभारांचा कुंभारवाडा होता. तेलबियांपासून तेल, तूर-चण्यापासून डाळ, धानापासून तांदूळ, ज्वारी-बाजरी-गव्हापासून पीठ गावातच तयार होत होते. ही तेव्हाची शेतमाल प्रक्रियाच होती ना? आता शासकीय धोरणांच्या कृपेने गावात पिठाची चक्की हा एकमेव कुटीरोद्योग उरला आहे. बाकी सारंच शहरात-महानगरात पळालं आहे. हा बदल आपोआप घडलेला नाही. याला शासनाची इंडियाला पूरक आणि भारताला मारक शेतकरीविरोधी धोरणेच जबाबदार आहेत. इस्रायली शेती, शेतकरी व त्यांचं तंत्रज्ञान या विषयी बोलणारे चिक्कार आहेत. रस्त्याने चालायला लागलं की जागोजागी ठेचा लागतात इतके मार्गदर्शक गल्लोगल्ली झाले आहेत पण; इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणाविषयी कुणीच “माईचा लाल” बोलायला तयार नाही. शेतीविषयात भरारी घेण्यात इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा सिंहाचा वाटा आहे. तिथले शेतीधोरण शेतीला पूरक आहेत भारतासारखे मारक नाहीत, हे मात्र जाणीवपूर्वक मांजरीच्या शेणासारखे या तज्ज्ञाकरवी झाकून ठेवले जाते.
स्वातंत्र्योत्तर काळात शहरातील औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी शेतमाल स्वस्तात लुटून नेणारी धोरणे राबविली गेली त्यामुळे गावात बचत निर्माण होणे थांबले आणि खेडी भकास होत गेली. शेतमाल स्वस्तात मिळाल्याने आणि पक्का माल महाग विकण्याची मुभा मिळाल्याने शहरात-महानगरात बचत निर्माण झाली. बचत निर्माण झाली म्हणून शहरात कारखानदारी वाढली आणि शहरे फुगत गेली. जेथे बचत निर्माण होत नाही तेथे प्रक्रिया उद्योग उभे राहू शकत नाही. गाव ओसाड झाले आणि गावात प्रक्रियाउद्योग निर्माण होत नाही याचे कारण येथे दडले आहे. आमचे शेतकी तज्ज्ञ वैचारिक पातळीवर खुजे असल्याने त्यांना हे कळत नाही. त्यामुळे ते शेतकर्यांना दोष देत फ़िरत असतात. शासकीय योजनांचा लाभ शेतकर्यांना घेता येत नाही असा “वड्याचे तेल वांग्यावर काढणारा” राग आळवत बसतात. धोरणे आखताना चक्क शेतकरी विरोधी आखायची आणि वरून पुन्हा शेतकर्यांनी प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत असे सल्ले देत फिरायचे हा चक्क वाह्यातपणा आहे.
मी निसर्गशेती, कमी खर्चाची शेती, पारंपरिक शेती, सेंद्रीयशेती वगैरे कोणत्याही शेतीपद्धतीच्या विरोधात अजिबात नाही, याउलट शेतकर्यांसमोर शेती पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असले पाहिजे, या मताचा आहे. शेतकर्याला जे सोयीचे वाटेल, त्याच्या खिशाला परवडणारे असेल तसे तो स्वीकारेल. हा त्याच्या व्यवसाय स्वातंत्र्याचा भाग म्हणून मान्य केले पाहिजे. पण होते असे काही मंडळी स्वत:ला ब्रम्हदेवाचा अवतार समजून किंवा ऋषी-महाऋषी भासवून आम्ही सांगतो तसे केले तर तुझ्या शेतीत करोडो रुपयाचे उत्पन्न येईल आणि तू मालामाल होशील, अशी बतावणी करून फीच्या माध्यमातून पुन्हा शेतकर्यांची लूटच करून जातात. शेतकरी देशोधडीला लागतो आणि यांची दुकानदारी मात्र “दिवसा दुप्पट आणि रात्रीची तिप्पट” या वेगाने बहरत जाते. त्यालाही माझा आक्षेप नाही मात्र शेतमाल लुटीच्या व्यवस्थेबद्दल ही मंडळी तोंडामध्ये चक्क बोळे कोंबून असतात, यावर माझा आक्षेप आहे.
पगारी शेतीतज्ज्ञांचे तर बरे असते. काही वर्ष रासायनिक खतांचा वापर करा म्हणून सांगत सुटतात, त्याचाही ते पगार घेतात. मग रासायनिक खतांचा वापर टाळा म्हणून सांगत सुटतात. त्याचाही पगार घेतात. यातच त्यांच्या नोकरीचे आयुष्य निघून जाते. पण पुन्हा मरेपर्यंत पेन्शन आहेच. कर्तृत्व काय तर एकदा ’करा’ म्हणून सांगीतले आणि एकदा ’टाळा’ म्हणून सांगितले. मला असे वाटते की शेतकर्यांना आता सल्ले वगैरे देण्याची अजिबात गरज उरलेली नाही. शेतमालाच्या भावाचा मुद्दा बाजूला ठेवून अन्य उपचार करण्याची तर अजिबातच आवश्यकता नाही. जर तुम्हाला शेतीच्या भल्यासाठी प्रयत्न करतो आहोत, असा आव आणायचा असेल तर निदान शेतमालाच्या भावाचा प्रश्न निकाली निघेपर्यंततरी सर्वांनी मिळून आपले लक्ष्य शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावरच केंद्रित केले पाहिजे.
मी एक उदाहरण सांगतो. ४ वर्षापूर्वी माझा एक जवळचा नातेवाईक आजारी पडला होता. आजार तसा साधा होता. पण त्याला सतत ताप यायचा. ताप आला की १०५ डिग्री सेल्सियसच्याही पुढे जायचा. ताप चढला की पॅरसिटॉमालसहित कुठल्याही औषधाने उतरतच नव्हता. फक्त गार पाण्याच्या कापडीबोळ्याने अंग पुसून काढले की ताप उतरायचा पण तोही तात्पुरताच. काही मिनिटातच पुन्हा चढायचा. सर्व उपचार केलेत पण यश येत नव्हते. १५ दिवस लोटले पण काहीच सुधारणा होत नव्हती. हिंगणघाटचे डॉक्टर झाले, वर्ध्याचे शासकीय रुग्णालय झाले, सेवाग्राम इस्पितळात उपचार करून झाले पण ताप उतरायचे नावच घेईना उलट आजार आणखी गंभीर होत गेला. शेवटी पेशंट घेऊन आम्ही नागपूरला एक्स्पर्ट डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने तपासल्यानंतर आजवर केलेल्या औषधोपराची माहिती घेतली आणि म्हणाले की जितका औषधोपचार करायला तेवढा करून झाला आहे. आता मी आणखी कुठले औषध देऊ? काहीही द्यायचं बाकी राहिलेलं नाही. हे ऐकून आम्ही अक्षरश: हादरलोच. मग थोडा विचार करून डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे. आम्ही म्हणालो, काय खर्च येईल तो येऊ द्या साहेब चिंता करू नका पण उपचार कराच. त्यावर डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे “उपचारच न करणे.” पुढील ७२ तास रुग्णाला अजिबात औषधच द्यायचे नाही. मला खात्री आहे की पेशंटवर तोच एकमेव उपचार आहे. आम्ही होकार दिला. औषधोपचार बंद केल्याने कदाचित जर काही अघटित घडले तरी आम्ही डॉक्टरला दोष देणार नाही, असेही लेखी स्वरूपात लिहून दिले.
रुग्णाला औषध देणे बंद केले आणि पाच-सहा तासातच ताप उतरायला लागला. १५ दिवसापासून न उतरलेला ताप सातव्या तासाला ताप पूर्णपणे उतरला. पुन्हा फिरून ताप आलाच नाही. रुग्ण पूर्णपणे बरा झाला तो सुद्धा औषधी देणे थांबवल्याने. शेतीचेही तर असेच होत नाही ना? गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. शेती नावाचा पेशंट एकच आहे आणि त्यावर औषधोपचार करणारे तज्ज्ञ आहेत लक्षावधी. संपूर्ण भारतवर्षात शेतीचे मुख्य दुखणे एकच आहे आणि तेही सार्वत्रिक समान आहे मात्र सुचविण्यात येणारे इलाज नाना तर्हेचे आहेत. जो येतो तो शेतकर्याला वाटेल तसा डोज पाजूनच जातो. शेतीची मुख्य बिमारी एकच; शेतमालास योग्य भाव न मिळणे. पण इलाज मात्र भलतेच चालले. कदाचित नको त्या उपचारानेच तर शेती व्यवसाय आणखी दुर्दशेकडे ढकलला जात नाही ना? याचाही प्रामुख्याने विचार करायची वेळ आली आहे.
शेतकरी हा मुळातच उत्पादक आहे. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे त्याच्या रक्तामांसातच भिनले आहे. सोबत पिढोनपिढ्यांकडून चालत आलेला वारसा आहे आणि बालपणापासूनच शेती कशी करायची याचा त्याला अनुभव आहे. तरीही त्याला पावलोपावली सल्ले देण्याची आवश्यकता आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. बीटी आली तेव्हा संशोधकांचे म्हणणे असे होते की, देशभरात बीटी वाण लागवडीखाली यायला वीस-पंचेविस वर्षे लागतील. प्रत्यक्षात दोन ते तीन वर्षातच देशभर बीटीवाणाचा प्रसार झाला. त्यासाठी शासकीय पातळीवरून काहीच प्रयत्न करायची गरज पडली नाही. चांगलं असेल ते ते अंगिकारण्याची क्षमता शेतकर्यांना निसर्गानेच दिलेली आहे.
उत्पादन कसे घ्यावे, हे शेतकर्यांना सांगायची गरजच नाही. फक्त शेतमालाचे भाव ठरवणे त्याच्या हातात नाही म्हणून शेती तोट्यात जात आहे. शेतीत सुबत्ता येऊन बचत निर्माण करायची असेल तर सर्व शेतकरी हितचिंतकांनी “शेतमालास उत्पादन खर्चावर रास्त भाव” मिळण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत वारंवार शासकीय पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे. शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर सरकार राबवू शकत नसेल तर शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------
दि.३१/०५/२०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित माझा लेख
वाचन
133847
प्रतिक्रिया
258

अगदी योग्यच लिहिले आहे. १
दि.३१/०५/२०१५ च्या महाराष्ट्र
कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा उडवलेला प्रतिसाद???
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो by कॅप्टन जॅक स्पॅरो
क्याप्टन साहेब शेतकरी सुदा
In reply to क्याप्टन साहेब शेतकरी सुदा by भीमराव
मी पन ग्रीब हाये..
In reply to मी पन ग्रीब हाये.. by टवाळ कार्टा
शेती क्रा. उत्त्र आपोआप मिळेल
In reply to क्याप्टन साहेब शेतकरी सुदा by भीमराव
बाबुदादा. शेतकरी माणुसचं असतो
In reply to बाबुदादा. शेतकरी माणुसचं असतो by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेतकरी ह्यो शेतकरीच आसतु, त्य
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रिय captain साहेब.
In reply to प्रिय captain साहेब. by सभ्य माणुस
ठिक आहे
In reply to ठिक आहे by टवाळ कार्टा
शेत मालाचे दोन प्रकार आहेत १)
In reply to शेत मालाचे दोन प्रकार आहेत १) by नाव आडनाव
व्यापारी / दलाल असणारच, फक्त
In reply to व्यापारी / दलाल असणारच, फक्त by टवाळ कार्टा
अरे तु वेडा आहेस का? आपणचं
In reply to अरे तु वेडा आहेस का? आपणचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेतकरी टॅक्स भरतो
In reply to शेतकरी टॅक्स भरतो by सुबोध खरे
डॉक दॅट वॉज सारकॅजम!!
In reply to डॉक दॅट वॉज सारकॅजम!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
captain साहेब
In reply to captain साहेब by सभ्य माणुस
तो ह्या लेखाचा रेफरन्स नाही.
In reply to तो ह्या लेखाचा रेफरन्स नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
पण मी ह्याच धाग्याला धरुन
In reply to पण मी ह्याच धाग्याला धरुन by सभ्य माणुस
नाही मी कॅप्टन वगैरे नाही.
In reply to पण मी ह्याच धाग्याला धरुन by सभ्य माणुस
छान प्रश्न..:D
In reply to तो ह्या लेखाचा रेफरन्स नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
पण मी ह्याच धाग्याला धरुन
In reply to अरे तु वेडा आहेस का? आपणचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
अतिशयोक्ती चांगली करता...
In reply to व्यापारी / दलाल असणारच, फक्त by टवाळ कार्टा
इतके समजले तरी पुरे
In reply to व्यापारी / दलाल असणारच, फक्त by टवाळ कार्टा
"शेतकरी काही सुतासारखा सरळ
In reply to "शेतकरी काही सुतासारखा सरळ by नाव आडनाव
ब्राम्हणांना सरसकट शिव्या
In reply to ब्राम्हणांना सरसकट शिव्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
आधी एकतर शेपटावर पाय द्यायचा
In reply to प्रिय captain साहेब. by सभ्य माणुस
सभ्य साहेब मी स्वतः शेती करत
In reply to सभ्य साहेब मी स्वतः शेती करत by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेती हा धंदा पेट्रोलियम
In reply to सभ्य साहेब मी स्वतः शेती करत by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी सहमत.
In reply to सभ्य साहेब मी स्वतः शेती करत by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेतीमधल्या अपप्रवृत्तींना आहे. ?
सेंद्रिय शेती...जनजागृती
मागील वर्षी तेजसनं २५ नर आणि
अॅग्रोवन मधली ही एक बातमी:
In reply to अॅग्रोवन मधली ही एक बातमी: by संदीप डांगे
निर्ढावलेपणा
In reply to निर्ढावलेपणा by श्रीरंग_जोशी
अगदी! १५ वर्षं झक मारत होते
In reply to अगदी! १५ वर्षं झक मारत होते by अनुप ढेरे
:-)
मुटे सर,
शेतकर्यांच्या या धाग्यावर
नेहमीची रड
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद!
In reply to सर्व प्रतिसादकांना धन्यवाद! by गंगाधर मुटे
शेतकरी गेली ३०/३५ वर्षापासून
In reply to शेतकरी गेली ३०/३५ वर्षापासून by संदीप डांगे
हवे
In reply to सर्व प्रतिसादकांना धन्यवाद! by गंगाधर मुटे
त्याचं न्यायाने तुम्ही आणि मी
In reply to त्याचं न्यायाने तुम्ही आणि मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्याचं न्यायाने तुम्ही आणि मी एकसारखे आहोत.
त्याचं न्यायाने तुम्ही आणि मी एकसारखे आहोत.हे खरे नाही. मी गावरान आहे आणि तुम्ही (बहुधा) सभ्य. ;) अगदीच खरे नाही कारण अनेकांना वैकुंठधाम यात्रेचे निमंत्रण येऊन वाजंत्री "रघुपती राघव राजाराम" वाजवायला सज्ज झालेले असतात पण अनेकांना शेती समस्या तोपर्यंत सुद्धा कळलेल्याच नसतात. :)कॅप्टन जॅक स्पॅरोजी
शेतीमाल नक्की कसा विकला जातो
In reply to शेतीमाल नक्की कसा विकला जातो by अनुप ढेरे
उत्तम प्रश्न.
In reply to उत्तम प्रश्न. by संदीप डांगे
कापूस एकाधिकार योजना बंद
In reply to शेतीमाल नक्की कसा विकला जातो by अनुप ढेरे
तर्हेतर्हेच्या क्लूप्त्या लढवून उठाठेवी करणे
In reply to तर्हेतर्हेच्या क्लूप्त्या लढवून उठाठेवी करणे by गंगाधर मुटे
केंद्र अन राज्य सरकार
In reply to केंद्र अन राज्य सरकार by श्रीरंग_जोशी
हा विषय प्रतिसादात
In reply to हा विषय प्रतिसादात by गंगाधर मुटे
बहुतांश केंद्र
In reply to बहुतांश केंद्र by श्रीरंग_जोशी
धन्यवाद!
In reply to तर्हेतर्हेच्या क्लूप्त्या लढवून उठाठेवी करणे by गंगाधर मुटे
अंहं..तसं नाही.
In reply to तर्हेतर्हेच्या क्लूप्त्या लढवून उठाठेवी करणे by गंगाधर मुटे
>>> शेतकरी - व्यापारी -
प्रिय मुटेजी,
In reply to प्रिय मुटेजी, by जयंत कुलकर्णी
तुमची आमचाही कुळकायद्यात गेली
In reply to तुमची आमचाही कुळकायद्यात गेली by निनाद मुक्काम …
शेती म्हणजे आयुष्याची माती,
In reply to प्रिय मुटेजी, by जयंत कुलकर्णी
कुळकर्णी साहेब,
कैप्टेन जैक बरोबर बोलले! अन
In reply to कैप्टेन जैक बरोबर बोलले! अन by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to +१ by नाखु
सोन्याबापु आणि नादखुळा,
In reply to सोन्याबापु आणि नादखुळा, by संदीप डांगे
मुटेसाहेब म्हणतायत मी ३०
In reply to मुटेसाहेब म्हणतायत मी ३० by प्रसाद१९७१
माझ्या मते हे त्यांचा
In reply to माझ्या मते हे त्यांचा by अभिजित - १
अभिजित साहेब,
In reply to मुटेसाहेब म्हणतायत मी ३० by प्रसाद१९७१
तुम्हाला कसलाही विचारबिचार
In reply to सोन्याबापु आणि नादखुळा, by संदीप डांगे
डांगे साहेब,
In reply to डांगे साहेब, by गंगाधर मुटे
शेतकरी संघटनेने काय बदल झाले
In reply to +१ by नाखु
नाद खुळा साहेब
In reply to कैप्टेन जैक बरोबर बोलले! अन by कैलासवासी सोन्याबापु
मस्त लिहिलेय! सगळे समजले पण
In reply to मस्त लिहिलेय! सगळे समजले पण by यशोधरा
वतनदारी/जमीनदारी ला एक
In reply to वतनदारी/जमीनदारी ला एक by कैलासवासी सोन्याबापु
अच्छा! धन्यवाद!
In reply to कैप्टेन जैक बरोबर बोलले! अन by कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबापू,
माझे काही प्रश्न गंगाधर जी साठी ..
In reply to माझे काही प्रश्न गंगाधर जी साठी .. by चौकटराजा
पौडावरुन थेट घरी दुध घालणारे
In reply to माझे काही प्रश्न गंगाधर जी साठी .. by चौकटराजा
चौकटराजेसाहेब,
In reply to चौकटराजेसाहेब, by गंगाधर मुटे
दिशाभूल करणारे विधान.
In reply to दिशाभूल करणारे विधान. by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
वेळेचा अपव्यय...
In reply to वेळेचा अपव्यय... by प्रभाकर पेठकर
अडचणीत टाकणार्या प्रश्णांना
In reply to वेळेचा अपव्यय... by प्रभाकर पेठकर
अतिशय उत्तम प्रतिसाद!
In reply to वेळेचा अपव्यय... by प्रभाकर पेठकर
उत्तम प्रतिसाद!
In reply to उत्तम प्रतिसाद! by श्रीगुरुजी
शिवाय झालेच तर टांगेवाले,
In reply to दिशाभूल करणारे विधान. by प्रभाकर पेठकर
काहीतरीच काय ???
In reply to चौकटराजेसाहेब, by गंगाधर मुटे
काही प्रति प्रश्न
लेखात कुठेही शहरी लोकांना
In reply to लेखात कुठेही शहरी लोकांना by गवि
भाव वाढले की सरकार आयात करतं,
In reply to भाव वाढले की सरकार आयात करतं, by काळा पहाड
अनेक अडथळ्यापैकी आयातधोरण हा
In reply to लेखात कुठेही शहरी लोकांना by गवि
याचं नेमकं उत्तर मिळेल का?