नवी रेशमी वीण..
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मंडळी,
मागे ऋषिकेश यांनी चारोळीचा सुंदर गोफ विणला होता. आपण सर्वांनी त्यात खूप मदत केली होती. आता या नव्या वीणीमध्येही मदत कराल अशी आशा आहे. पण ही थोडी वेगळी आहे. यात २ नियम आहेत.
१. चारोळी ही चारच ओळींची असावी. पाचोळी नको.
२. चारोळी लिहिताना त्यामध्ये आधीच्या चारोळीतील एक शब्द आलेला असावा...
कृपया नियम मोडू नका. रेशमी वीणीसाठी चारोळ्यांची मदत कराल ही अपेक्षा आहे.
उदा.
विजेला घाबरून
ढग ढसाढसा रडत होता
लोक म्हणत होते
किती पाऊस पडत होता..
दुसरी चारोळी...
ढगात बसून कोंडलेली
ती ताडकन् निघाली
क्षणभरंच तळपून
अंधारात लुप्त झाली...
आता या दुस-या चारोळीपासून विणीला सुरूवात करूया...
ऋषिकेश, सहज, सर्किटराव, स्वाती, मुक्त सुनित, देवदत्त. विनायक राव.. छोटा- मोठा.. खरा-खोटा डॉन.. तमाम मि.पा. वासियांना ही विनंती.....
- प्राजु.
वाचने
22126
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
कोंडलेल्या आवेगाला
बंधनं नको आता कसलीच
बनसोक्त बरस तू
चिंबं होऊन जाती मने आपलीच
व्याकरणाची बंधने झुगारून
लिहिली चारोळी
माझेच मन म्हणाले मला
तुला कसे सुचले ह्यावेळी
In reply to व्याकरणाच by देवदत्त
व्याकरण म्हणजे असते
ग्रेसची कविता,
चर्चा करायची असते
काहीही न समजता.
ग्रेसची कविता,
चर्चा करायची असते
काहीही न समजता.
बरसलेल्या मेघाला पाहून
धरणी उद्गारली
त्याने स्वत: रिक्त होउन
झोळी माझी भरली.
धरणीची काया
अशी काही शहारली
की रोमांच उभे राहून
हिरवी बिजे अंकुरली...
- प्राजु.
In reply to वा वा... by प्राजु
बीज अंकुरे अंकुरे
काळ्या मातीच्या कुशीत
जसे रूजावे बियाणे
तसे फुलेल शेत.
(टीप : ही चारोळी कोठेतरी ऐकली आहे.)
आपला,
('टीप'लेला) छोटी टिंगी
तुझ्या भेटीसाठी मी
वाट तुडवू लागलो,
वाटच चालायला लागली
अन मी पहातच राहीलो.
हा आपला एक छोटासा प्रयत्न,बाकी आम्हाला कवितेच्या प्रांताची विशेष माहिती नाही...
(नवकवी) -इनोबा
पाऊस होऊन बरसावं म्हंटल
तर तु लाजुन उघडतेस छत्री
म्हणून म्हंटल ढगांना दूर व्हा....
बरसायचं आहे आज चांदणं होऊन रात्री
पावसाळा आला की मला
फक्त तू आठवतेस,
कारण ढग बनून डोळ्यामध्ये
तूच पाणी साठवतेस.
-इनोबा
धरती आणि पाऊस
यांचे निस्वार्थी प्रेम....
ती झेलते पाऊसाचा
प्रत्येक थेंब...
पाऊस पाहताना मला वाटलं
ढग ही रडत असेल,
स्वार्थी जगाला मात्र
त्याचे दुखः दिसत नसेल.
छोटी टींगी, विनायक राव आपण तर एकदम बादशहाच आहात चारोळी मधले... सलाम! छान विणता आहात... आवडले.
पाऊस पडाताना ती
अचानक बावरली...
विज कडाडल्यावर
मला एकदम बिलगली...
- प्राजु
(ग्रेसची क्षमा मागून)
सुख मनास बिलगत नाही
अदमास कशाचा घ्यावा
पथ सर्व अन्य विसरुनिया
शोधतो दु:खांच्या गावा
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
पडतो आहे तोच एक पाऊस
एक म्हणतो शोधतो दु:खांच्या गावा
दुसरा म्हणतो जिवलग बिलगावा
भारत म्हणतो शेत आणि शेतकरी जगावा
तुझ मला बिलगणं
मन उंच आभाळी उडणं
आता हे रोजचंच झालाय
अशी वेडी स्वप्न पडणं
स्वप्न आणी वास्तव
आहेत जसे दिवस-रात्र
गुंतवून तुम्हा-आम्हा
चालू ठेवतात जीवनचक्र
In reply to वर्तुळ by सहज
रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसेना का कुठे
रुपे जरी अनंत
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
In reply to रात्र by नंदन
वा नंदन ! सर्वोत्कृष्ट चारोळी !
- सर्किट
जीवन हेच स्वप्न
की जीवन हे वास्तव?
मिठीतील जीवन स्वप्न
अन मुठीतील वास्तव?!
In reply to जीवन हेच by ऋषिकेश
ऋष्या, अजुनही वास्तव मुठीतच आहे म्हणजे आमच्या सारखाच बॅचलर दिसतोस.. बरोबर ओळखलं का नाही? :)
वास्तवाची वीण उसवते
स्वप्नांचा अन दिसे किनारा
सुषुप्सेतली गोडस धुंदी
क्लांत जिवा देतसे निवारा
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
In reply to वास्तव by नंदन
स्वप्नांपेक्षा निराळे
वास्तवातले जग,
स्वप्नात सुखाचा ओलावा
वास्तवात असे धग.
स्वप्नास म्हटले मी एकदा
येशील का वास्तवात...
स्वप्न म्हणाले मी इथेच बरा
तू जळत रहा त्या विस्तवात.
मंडळी!
चालू द्या! जळ्ळं आम्हाला काव्यात्मक दोन ओळी लिहिता येत असतील तर शपथ! :)
तात्या.
In reply to छान चाललं आहे, by विसोबा खेचर
आम्हाला तरी कुठं येतंय काव्यात्मक वगैरे...आपलं सहज काहितरी लिहायचं...या मंडळींना ते चांगलं वाटलं की बास!
चला आता तुमच्या साधना कोळीण,रौशनी वगैरे महिला मंडळाला आणा रिंगणात...
In reply to छान चाललं आहे, by विसोबा खेचर
गद्यातले बादशाह आम्ही
जाणून आहे मधली आळी
पण जळ्ळं लिहता येत नाही
काव्यात्मक दोन ओळी
असे तरी लिव्हायचे कि वो! ;-) ह. घ्या.
काव्याच्या रम्य वसंतात
काव्य खुलू लागले
लेखणी झाली मुक्त
अन काव्य बोलू लागले
च्यामारी!चांगली कविता करतोय तर करू द्या की...राव,शेठ साहेब असली विशेषणं लावून डोकं पिकवू नका.
(कवितेचा बॉयफ्रेंड) -इनोबा
In reply to वसंत by इनोबा म्हणे
चारोळ्यांना अलिकडे
बरंच काही कळू लागलं,
मनोगताच्या कुंडीकडून
काव्य इथे फूलू लागलं
In reply to रानफुले !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कळत नकळत
फुलू लागले काव्य
जणू निरागस चेहेर्यावर
उमलले हास्य
चारोळी फुल्टू आवडली.
आपला
कॉ.विकि
नंदन, सहजराव, ऋषिकेश, स्वाती, विनायक, दिलीपजी, देवदत्त, छोटी टिंगी...
आपण तर वीण एकदम घट्ट विणता आहात. खूप बरं वाटतंय.
असेच चालू राहूदे.
फुलता फुलता फुलाने
काट्याला झिडकारले..
किड्यांनी ताबडतोब
झाडंच पोखरले....
- प्राजु.
In reply to सह्ह्ही... by प्राजु
पोखरलेल्या वाशांचं
एक घर अजूनि तगून आहे
वठलेल्या झाडाचं
एक बीज अजूनि रुजून पाहे
काही चारोल्या प्रेमवर पण लिहा.
आम्हाला वाचायला आवाडतिल
सागर राणे
सागर,
आपणच लिहा ना.... एक शब्द घेऊन सुरू करा पुढे लिहितिल सगळी..
- प्राजु.
In reply to आपणही.. by प्राजु
राणे साहेब तुम्ही सुरूवात करा....आम्ही मंडळी पडीकच आहोत इथे पुढचं विणायला ;)
आपला,
(पडीक) छोटी टिंगी
खरच आम्हाला लिहिता आले असते तर कवितेचा महापुर आनला असता आज.
सागर राणे
फूल, काटे, किडे, झाड
प्रेम, चारोळ्या -- फुल्टूच यार
पडीक विणती शब्द येथे
महापुरी ओळी चार
[वरच्या पाच-सहा प्रतिसादांतले शब्द निवडून रचलेली ही असंबद्ध चारोळी :). कृपया हलकेच घ्यावी.]
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
आणा भाका विसरुन
ती गेली खूप दूर...
हृदयात ठेवून आठवणी
अन नयनी महापूर...
नंद्या भन्नाट चारोळी रचलीस रे...
हि आपली अशीच...
प्राजूच्या नादाने 'इनोबा'
आता चारोळी रचू लागला...
अन हास्यात रंगलेला 'तो'
आता दूखः वेचु लागला...
-इनोबा
सुख वेचता वेचता
थोडे दु:खही वेचायचे असते...
अरे बाबा,
जीवन हे असेच जगायचे असते....
In reply to जीवन.... by तात्या विंचू
सुख क्षणभंगूर
दुखः असे निरंतर
सुख 'सुखाचा सोबती'
दुखः खरा मैतर
येथील कवींना आवाहन
चारोळी सारखा पाचोळी प्रकार यखांदा करुन पघा. अदुगर बी यकदा आम्ही ही संकल्पना मांडली होती. पन कोनी काय उचलून धरली नाही ब्वॉ.
संकल्पना- पहिल्या चारा ओळी लिहुन यकदम हवेत न्यायच, आन पाचवी ओळ लिहून दानकन जमिनीवर आदळायच. त्यो अर्जुनाचा दशांगुळे चालणारा रथ कंच्या तरी कारनान यकदम जमिनिवर आला अगदी तस्सा.
आपला
(प्रायोगिक)
प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे
In reply to पाचोळी by प्रकाश घाटपांडे
डॉक्टरसाहेब,तुमची कल्पना आवडली.पांडवांच्या पांचाली प्रमाणे कवितेतली पाचोळीची(की पांचोळीची?) कल्पना छान आहे.
खुलासा: अर्जुनाचा रथ कोसळला यांस त्याच्या रथाच्या चाकाला बसवलेले 'डिस्कब्रेक' कारणीभूत होते,असा आमचा निष्कर्ष आहे (या विषयावर आम्ही गेल्या काही वर्षांपासून संशोधन करीत आहोत) त्यामुळे हे 'डिस्कब्रेक' बनवणार्या संस्थेवर दावा ठोकण्याच्या विचारात आहोत.
(अर्जुनाचा वकील) -इनोबा
In reply to येकदम सही by इनोबा म्हणे
रथ नक्की कुणाचा कोसळला?
आमच्या अल्प ज्ञानानुसार धर्मराजाचा रथ जमीनीला टेकला होता...
चुक भुल देणे घेणे...
(महाभारत तज्ञ) नाना
In reply to नरो वा कुंजरो वा by अवलिया
नाना धरमपाजीचा रथ केवळ जमिनीला टेकला होता,ज्या वेळी त्याने अश्वथामा मेला अशी बोंबाबोंब केली होती ना तेव्हा...(नरो वा कुंजरो वा) मात्र अर्जुनाचा रथ खराब 'डिस्कब्रेक' मुळे आपटला होता.
(-इति'हास्य' तज्ञ) -इनोबा
In reply to रिटर्न ऑफ 'नरो वा कुंजरो वा' by इनोबा म्हणे
मी तर कर्णाच्या रथाचे चाक भूमीने गिळले होते असे वाचले होते. (कुठे ते आठवत नाही. त्याचा संदर्भ कळला नव्हता. पण आता बहुधा ते अर्जुनाच्या रथाचे असावयास पाहिजे होते असे वाटते.)
In reply to मी तर by देवदत्त
देवा! अरे कर्णाच्या रथाचे चाक भूमीत अडकले ते 'ट्यूब' फाटल्यामूळे,आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे!!!त्या ट्यूब बनवणार्या संस्थेवर आणि राज्य रस्ते प्राधिकरणावर हस्तिनापुरच्या न्यायालयात आधिच खटला चालू आहे,पण अर्जुनाचा रथ कोसळला तो खराब 'डिस्कब्रेक'मुळे.
(इति'हास्याचा' गाढा अभ्यासक) -इनोबा
In reply to पाचोळी by प्रकाश घाटपांडे
पंचोळीचे एखादे उदाहरण तरी द्या!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
चारोळी वाचून हसलो
लेखणी घेऊन बसलो
चार ओळी सुचेनात
चारोळीवाचून बसलो!
चतुरंग
कोंडलेल्य