Skip to main content

सगळ्याना ओपन चॅलेंज........र ला ट न जुळवता चारोळी

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 14/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? हे समर्थानासुद्धा जमले नाही उदा: मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे मराठीत शिरिष पै यानी हा प्रकार जपानी मधुन आणला.याला हायकू म्हणतात ( कायकू विचारू नका) मूळ जपानी हायकू मधे तीनच ओळी असतात.... उदा: पानावर फुलपाखरू अलगद विसावले स्वप्नांना भेटत......... मराठीत हायकू चार ओळीत हे असे लिहिता येइल. पावसाचा थेंब तलावात पडला.......... पाण्यावरचा तरंग वाढवत वाढवत..... केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन,सगळे अभिजीत सॄष्टीलावण्य मावशी.सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? होउन जाउदे एकदा म्हणणारा विजुभाऊ

वाचने 31315
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

विजुभाऊ , तुम्हाला यमक न जुळवता केलेली चारोळी म्हणायची आहे का? तसे असेल तर माझा हा एक प्रयत्न, काय हे आव्हान दिले कोणी पेलायची ताकद मनगटात असते वादळाशी ही झुंझ मी घेईन पण वावटळीला ते का विचारु? विजुभाऊ... जमले का हे? (फाश्ट कवी) सागर

सागर्...........झकास...अजून तात्या / डॉन्या विचार करत बसले आहेत

१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ... २.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय.. ३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन , ४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात केशवसुमार ठोकरे बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी आनि कुठ बी र ला ट नाय जोडला.. उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा.. काय कलं की नायं तदमाताय.. परत चार ओळि झाल्या..

आयला डोक्याची मंडई रोजचा नवा वाद हा काही बोलला तर तो वढतोय पाय जमलं का हो? आयला जमलंच पायजे आपल्याला. (पद्य क्रांतीकारक-इनोबा ) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

पावसाच्या सरींनी दरवळला मृद्-गंध गुंजतो आहे नाद अजून थेंबांचा ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

बसलो होतो काल, मित्रन्च्या संगे, सुर्य उगवला, बाटली रिकामी. आपला, स्वयंभू

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

स्वयम्भू राव, लय भारी...सुर्य उगवला, बाटली रिकामी :-))) कोणाला वाटत असेल कै च्या कै, तर असुदे, आपल्याला आवडली. एकदम वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन :-) विजुभाऊ, जरा दम धरा, मला जरा वेळच लागेल रि॑गणात यायला. पण सुटलो ना तर मला आवरण॑ उभ्या मिपाला अवघड होईल. तात्या डायरेक्ट मला तडीपार करतील :) के.सु.शेठ, आपण खुन्नस नाय धरायची. ऊठ-सुठ ह्याला ठोकरे त्याला ठोकरे नको बॉ. त्यापेक्षा जरा राजकारन खेळू. आपन म्हनजे आमी वो, ल्हितो चारोळ्या-बेदाने जमतील तशे. ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप होत्याल 'हे असल॑ झे॑गाट कशापाई उरावर घेतल॑ म्हनून' :-) अवा॑तर : शेठ तद् माताय लैच आवडलेल॑ दिसत॑य. कालधरन॑ चार-पाच ठिकानी पाह्यल॑ :-))

In reply to by धमाल मुलगा

१.'तिच्यामायला' म्हणल की लोक उगाच तोंड हाय की गटार हाय म्हणत्याती.. २.तद माताय म्हणल म्हण्जे कस (कुनालच कलत नाय)...संस्कृतमधे बोलतुया .. साना मानुस दिसतुया .. किती गार वाटतया....अजून येऊदे, आम्ही वाचतोय ..अस म्हणत्यात ३.बाकी तदमाताय.. हे ज ह ब ह रा.. ४.र्‍हाता राहिल त्या विजुभाऊच..आर.. ठोकून काढायच म्हण्जे.. तू म्हणतोस तसच ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप गार होईस्तोवर चरोळ्या पाडायच्या.. अर् !!तद् मातय!! झाल्या का पुन्हा चार-ओळी (चारोळा)केशवसुमार

शांती पडली सांवरियाच्या प्रेमात धोनी युवराजनंतर पुढचा जोकर रणबीरचा -छोटी टिंगी ;)

In reply to by प्रमोद देव

ये ना गड्या घरी, असे ती म्हणाली, जेंव्हा तो घरी गेला, तिने त्याचा खरंच गडी केला. आपला, स्वयंभू

हे घ्या ... हिंदीतून आहे .... "चांद गया भजिया तलने, सितारे तोडकर लाऊंगा, विजूभाऊ तू 'चारोळी' की बात करता है, तेरेलिये तो "शाकुंतल" लिख डालुंगा ...." अवांतर : जे लिहलय ते ग्वाड मानून घ्या कारण आ.का. व. चा. घं. क. ना. हे. ज.जा. आ. [ म्हणजे आम्हाला काव्य व चारोळीतलं घंटा कळत नाही हे जग जाहीर आहे .....] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

कोण म्हणतो मी एकटा आहे, एका॑तही जसा मित्र माझा क॑टाळतो मी गर्दीला, गर्दीतही मी एकटाच आहे! हा हा हा..घ्या तद् माताय! मीटर, मात्रा, यम,नियम सगळ॑ तिच्याआयला नेऊन घातल॑ तिकडे....सात गडगड्याच्या विहीरीत. आपला -ध मा ल रावसाहेब.

कुणाच्या खा॑द्यावर कुणाचे ओझे, कोणि झोकलेली अन् भोग कोणाच्या नशिबी ! आयला, चारोळी बेदाणे म्हणता म्हणता हे काय? जर्दाळूच झाला :-) ना चार ओळी ना दोन ओळी काय म्हणावे ह्याला प्रश्न माझ्या अ॑तरी घ्या च्यामारी, अजुन एक. - ध मा ल. (मॅनेजि॑ग डायरेक्टर, पौष्टीक ड्रायफ्रूट्स प्रा. लि.)

In reply to by धमाल मुलगा

थोडेसे 'सुमार' विडंबन - कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके, कोणि कलेली अन् वास कोणाच्या नशिबी !

की काय अज्याबात न्हाई... पन र ला ट जुळवने काय कटिनबी न्हाई. हे पाह्य म्या पाडली जिलबी मी चार वळींची. च्या मारी टोपी आहे काय नी न्हाई काय. चायलेंज खेल आपल्याला बी आवडतु, माझ्या तीन रान्या असे कोनतरी बोलतं, मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या, मग ह्याच्याकडं काय घंटा... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

In reply to by सृष्टीलावण्या

मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या, मग ह्याच्याकडं काय घंटा... हा हा हा..सृष्टीताई, फर्मास....लगे रहो !!!!

कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके, मस्तच की रे बघा कसं एक्दम वस्तुस्थिती ला धरून काव्ये होताहेत की नाय. हातातल्या सिगरेट ने मला मोठे केले तारुण्य नेले आणि म्हातारपण आणले माझा हात तुझ्या हाती असावा आणि माझे डोके उशाशी...... स्टेथास्कोप छातीशी मी खोकतो ठक ठक.... आता ओकतो मी सगळी दु:खे केवढा सागर साठला.... तुला पामराला राहीला दूर किनारा

In reply to by विजुभाऊ

एकटा मी असतो प्रिये विना तक्रार जीणे जगतोय तुझ्या विना पण खरे सांगू प्रिये जगणे हे जीणेच उरले नाही तुझ्या विना...... (या कवितेला आंधी च्या तेरे बिना जिंदगी से कोइ..चा वास आला तर तो केवळ योगायोग समजावा)

तिला पाहिले एकदा तळ्याच्या पलिकडे, मनी आस तिला आणण्याची मळ्याच्या खोलीकडे - (धाकल॑) देशमुख-पाटील. (स्वगत :आता खातोय जोडे सगळ्या॑चे)

तिला म्हणालो तुझ्या डोळ्यात, बुडावसं वाटतंय, ती म्हणाली लाजून, पोहता येतं का तुला? आपला, स्वयंभू

आरं तद माताय्.......धमाल्या मस्त रे.... बघा बघा मंडळी स्वतःला काव्यातले काहीही कळत नाही म्हणणारा धमल्या कसा मस्त रंगलाय आन स्वयंभूशेठ्.....हाण तद माताय्..........जबरदस्तच

In reply to by विजुभाऊ

कसल॑ काय विजुभाऊ, इथ॑ कशाचा कशाला पायपोस नाही म्हणून आपल॑ चालल॑य आमच॑ प्राची ला गच्ची. बाकी, मजा येते हो स्वतः असल॑ काहीतरी जुळवायला. अन् त्याहून जास्त मजा ते वाचायला देऊन इतरा॑ना छळायला :-)) कोणि म्हणे तू बडा माणूस, कोणि नि॑दे तू आय.टी. हमाल मी ना होतो दु:ख्खी मुळीच मी तर आहे ध मा ल धमाल !!!! कै च्या कै काव्यसम्राट -ध मा ल.

पिझ्झा घेणार की बर्गर.. नाहीच जमणार आपलं! वेटर, १ मिसळपाव.. कांदा जास्त बिल वेगवेगळं मनस्वी

मिसळी वर लिम्बू, ताटा मधे पाव, सन्गती येउ दे, कोकम सरबत. आपला, स्वयंभू

मला पन्हे चालेल. मनस्वी

उन्हाळा वाढला, वाळ्याचे पडदे, आंब्याच्या झाडाला, पन्ह्याची तहान. आपला, स्वयंभू टिपः- ही चारोळी मनावर घेउ नका मनस्वी ताई.

तो तिच्या कानाशी हळूच कुजबुजला .......... आपण डायल केलेल्या मार्गावर सर्व लाइन्स व्यस्त आहेत कृपया थोड्या वेळाने डायल करा

.

विजुभाऊ म्हणतात 'सगळ्याना' 'ओपन' च्यालेंज? हे तर 'शाकाहारी' 'आहार' झालं? 'पुन्हा' 'द्विरुक्ती' बघून फारच रहावेना, तेव्हा म्हटलं द्यावी टाकून एक 'चार ओळींची' 'चारोळी'!:)) चतुरंग

गेले घेऊन गुलाबी फुले त्याला भेटायला.. आर्जव करीत म्हणाले, इथे भेटलास वर भेटू नको.... - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

फुले घेउन मी म्हणालो तुला आजिबात "वर" भेटणार नाही माझ्या इतका सुयोग्य चल मधुचन्द्रावर....! (सर्वसाक्षी )चन्दु

In reply to by प्राजु

फुले घेउन मी म्हणालो तुला आजिबात "वर" भेटणार नाही माझ्या इतका सुयोग्य चल मधुचन्द्रावर....! (सर्वसाक्षी )चन्दु

खूप पिऊन ना चढली तेव्हा राग मला आला तेव्हा म्हणे कोणी मला "काय रे आज पाणीच का?" -बळच कवि पुण्याचे पेशवे

पाऊस इतका पडला की शिगघ्रकवी जन्मले बघ माझी आठवण येते..का..? सर्रास विचारू लागले - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

प्रयत्न करून पाहिला खूप नको नको ते यमक... अरेरे ... तरीही जुळलेच...

शेकडो पावसाळे पाहीले, तरी मी कोरडाच, शेवटी स्वताला ढग म्हणून, मनाचं समाधान केलं. आपला, स्वयंभू

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

शेकडो पावसाळे पाहीले, तरी मी कोरडाच, शेवटी स्वताला ढग म्हणून, मनाचं समाधान केलं. छान आहे, मला आवडलं!

ढग म्हणून गडगडलो पण बरसलो कधीही नाही म्हणूनच कायम नोकर मी न झालो कधीही साहेब पुण्याचे पेशवे

केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? चायलेंज देऊन, आम्हाला चढवता अंतस्थ कावा, कळला बरं का -डांबिसकुमार (डिसक्लेमरः वरील चार ओळींत कुणाला काव्याचा संशय आला तर तो केवळ योगायोग समजावा)

In reply to by चतुरंग

अहो मला काव्य म्हणायचं होतं! :)))) मराठी भाषा कशी समृद्ध आहे नाही! योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरले गेले तर काय काय काड्या करता येतात!! :)) खट्याळ, पिवळा डांबिस

कालचा पाउस आमच्या गावी आलाच नाही सदरहु आम्ही पीक आसवांवर काढले आहे. ( ही कविता मला १२ वी ला होती.कवी माहीत नाही)

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, कवी होते "यशवन्त मनोहर". संपूर्ण कविता येणेप्रमाणे : कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे कालपर्यन्त पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत झाडे करपली, माथी हरपली नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही

इथे भेटलास वर भेटू नको.... प्राजु मस्त..... देता प्रतिसाद मला तुम्ही ; ......साद आली घरुन मेल्या लौकर ये......... सैपाक कोण करणार ..............बिचारा सैपाकी विजुभाऊ

मला टोचता खडे... तुझ्या डोळा पाणी हा देश परका झाला पोरका झालो मी.......

सुट्टी च्या दीवशी, अन्घोळीला पण सुट्टी, काराण अन्घोळ केली की, कपडे ही धुवावे लगतात. आपला, स्वयंभू

तात्या मरतो अनुष्कावर तिच्यावर आहे जीव असेल मोठी ती हिरॉईन तर घरची तिच्या! विजुभाऊ, ह्या घ्या रे चार ओळी! लिहिल्या की नाही तत् माताय?! :) अवांतर - "यमकवाल्या किंवा 'र' ला 'ट' जुळवणार्‍या चारोळ्या" असं मी मुद्दामून म्हटलं होतं. र ला ट कोडल्याशिवाय किंवा यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं! मध्यंतरी उगाच पाडायच्या म्हणून पाडायच्या, या हेतूने मिपावर जे चारोळ्यांचं पीक आलं होतं त्यामुळे आपण तर साला पार हैराण झालो होतो. छ्या! त्यातील काहीकाही चारोळ्या एकापेक्षा एक फालतू अन् पाडायच्या म्हणून पाडलेल्या बेमतलब चारोळ्या होत्या! नुसत्या र ला ट जुळवलेल्या गोड नी गुडीगुडी प्रेम मुतणार्‍या! :) साला मिपाला काही ष्टँडर्ड आहे की नाही असंच त्या चारोळ्या वाचून एखाद्या मिपाबाहेरच्या परक्या माणसाला वाटलं असतं! बाय द वे, तात्या विन्चू या नांवाने वावतणारा प्राणी मी नाही! तो मी नव्हेच.. ! आपला, (अनुष्काचा प्रेमीपागल) तात्या.

पुण्यातल्या टरॅफिकमंदी फलक लावा स्मारट हितचिंतक म्हणाले आता ट्र र्ट बाद शरबुद्दीन जॉन फुलपुडीकर वाडीतील सर्व ख्रिश्वन, मुस्लिम, हिंदू बांधवांना गुड शुक्रवार, होली होळी आणि पवित्र ईदच्या हाद्रीक शुभेच्छा! शुभेच्छूक - तळहात, पंकज, तीरकमठा, घड्याळ, गजराज इ . इ. पक्षांचे निष्ठावान नगरसेवक (आजी, माजी, भावी)

एरवी यमक जुळवायचं जुळवायचं म्हटल तरी जुळता जुळत नाही आणि आता ते जुळवायच नाही म्हटल की आपोआप शब्द सुचत होते आणि यमक जुळून जात होते. प्रयत्नपुर्वक टाळावे लागले. मी केलेला प्रयत्न--- तुझ्या न माझ्या जु ळल्या तारा, म्हणूनी हे जिवन सुरेल न संगीत.

यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं! तात्या खरे आहे....कविता लिहिणे तेही लोकाना आवडणार्‍या हे अवघड असते.यमकाशिवाय लिहिणे तर त्य्यहुन अवघड असते... नुसते लिहिणे दोन/चार ओळी खरडणे म्हणजए काव्य नव्हे या एक्ससाइझ मधुन काही खरेच चांगले प्रयत्न ही झाले सगळ्या चारोळ्या काही फक्त आरोळ्या नव्हत्या.........काही सुंदर रांगोळ्याही होत्या.. यमकामुळे एक प्रकरचा ताल्(र्हिदम) मिळतो.....पण अर्थ हा कवितेचा प्राण असतो र ल ट जोडण्याचा खेळ सुरु होता तेंव्हा मी सदस्य नव्हतो पण या थ्रेड वर्च्या काही कविता खरेच चांग्ल्या होत्या सगळ्याच काही प्रेम ठिबकवणार्‍या नव्हत्या....वात्रट , धमाल , वास्तविक , प्रामाणीक अशा सर्व प्रकरच्या कविता होत्या दोस्तानो....या खेळात मला मजा आली. कविता रचताना मी माझा राहीलो नाही कविता वाचतानाही मी माझा राहीलो नाही एक धागा गीत माझे मला तुला गुंफणारे.............. मी आता कशास चिंता करु.... तू सवे असताना स्वप्नांच्या मागे कशास लागू... मी स्वप्न माझे जगताना.

या इथे या सांजवेळी सूर्य मावळताना आकाशी माझीच सावली झाली माझ्याहून खूप मोठी

चॅलेंज घेणारे संपले का सगळे? धमाल्या थकलास का रे बाळ? हरला असे डीक्लेर करा............... तात्या सुधा विचार करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन दमले हुशशश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श....... असे असेल तर आपण धागा विसर्जीत करूया...........

शब्दा ला शब्द जोडीले त्यांते काव्य म्हणीतले ऐशा उक्तीने ;गंज चढला उक्तितें वेळ जाय बुडोनी फक्त्; सांगे विजुभाऊ

ही चालेल का विजूभाऊ? नातं उमलावं सुगंधी, ज्याला समर्पणाची जोड, मनी रुजावी कृष्णाच्या, प्रिय सखी राधेची ओढ...

ते भिरभिरणारे सुंदर मनोहर अन मखमली गुलाबाच्या रोपावरचे फुलपाख्ररु..........!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

ज्याला त्याला आपले घर असते येणार्‍याचे स्वागत करणारे दार असते ......................यापुढच्या दोन ओळी कोणी ल्हिणार का?

सगळे प्रतिसाद नि चारोळ्या वाचून कॉमेडी एक्स्प्रेस चे 'नवकविता' फेम कवी महाशय (सतीश तावडे ) आणि 'एकेदिवशी काय जाहले' फेम इन्स्पेक्टर(कमलाकर सातपुते ) यांची आठवण झाली Challenge accepted बुडलो तेव्हा नव्हते डोक्यावर आकाश खाली नव्हते पाणी कसे असेल विचारात बुडल्यावर ? :) :)

पाहताच एकमेकां थोडी चलबिचल झाली सावरताच पुन्हा ती मी अनोखळी निघालो…

In reply to by वेल्लाभट

ससा म्हणाला सिंव्हाला मी तुला घाबरत नाही सिंह म्हणाला अच्छा? ये ना मग जवळ ये =============== http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif =============== भानावर येण्यापूर्वी पावसात जळाया लागलो नंगा नाचेन मी एक दिवस पाऊस पडून गेल्यावर ... =================== http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

भानावर येण्यापूर्वी पावसात जळाया लागलो नंगा नाचेन मी एक दिवस पाऊस पडून गेल्यावर ...

घर असावे घरासारखे नकोत नुसती नाती ! तिथे असावी जाळ्या जळमटे नको स्वच्छता नुसती

......डोहात.. पाण्यावरचा तवंग फोफावत जाणारा .... भला मोठ्ठा मिठाचा खडा ... नावेत बसलेला मी ..... आणि ती नसलेला माझा शेजार... श्रीमंत गरजू पाटिल. (धाकले) प प पाटलाचा. श श ती शेजारीण. ड ड त्या डोहात, डुबुक.... डुबुक.....

जुनाट रद्दीची काही पानं... रद्दीवाल्यानं नाकारलेली... पुसट झालेल्या काही ओळी... ..........'तुझीच'.....