मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
*********************************** किती वाकुडे बोल बोलून झाले स्वत:च्याच सत्वास गाळून झाले धरा सांगताहे कथा पावसाची किती थेंब पदरात झेलून झाले ? जरी भोवती 'माणसे' फार झाली तरी एकट्यानेच 'खेळून' झाले नको रोकडा, दागिनेही नकोसे बियाण्यासवे सत्व तोलून झाले जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ? चकोरापरी प्राण उधळून झाले कसा रे मुरारी तुझा हा अबोला? सुरांवर तुझ्या आज भाळून झाले 'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे' पुन्हा आरशालाच टाळून झाले किती राहिले श्वास देहात बाकी ? 'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ? *********************************** विशाल

वाचने 2107 वाचनखूण प्रतिक्रिया 9

पैसा Wed, 01/28/2015 - 15:45
कविता आवडली. वृत्तावर आणि शब्दावर तुझी हुकूमत आहे भावड्या! सगळेच सुखात राहोत!!

In reply to by प्रसाद गोडबोले

विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/29/2015 - 12:00
इथे 'प्रगो' रे किती 'डाव' 'खेळून' झाले ? असा बदल आधीच सुचवला आहे लवकरच दखल घेतली जाईल पंत ;)

कपिलमुनी गुरुवार, 01/29/2015 - 13:35
विशाल , तुमची कविता छानच आहे ! अवांतर : आय डी बदलतात तसे प्रतिसाद बदलतात याची अजून एक प्रचिती ! हीच कविता मुटेंनी टाकली असती तर वेगळ्या प्रकारे 'आस्वाद' घेतला गेला असता हे प्रकर्षाने जाणवले . @विशाल : तुझ्या धाग्यावर अवांतराबद्दल क्षमस्व

In reply to by कपिलमुनी

विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/29/2015 - 13:46
हीच कविता मुटेंनी टाकली असती तर वेगळ्या प्रकारे 'आस्वाद' घेतला गेला असता हे प्रकर्षाने जाणवले . गैरसमज आहे बंधू हा तुमचा. मुटेंनी त्यांचे समग्र लेखन शेती या विषयाशी संबंधीतच केलेले आहे. पण त्यांचे काही हट्टाग्रही लेख सोडले तर त्यांच्या गझलेवर किंवा कवितांच्या बाबतीत कधीच कुठले आक्षेप, टीका वा तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'वेगळ्या प्रमाणे आस्वाद' हा प्रकार घडलेला नाही वा तसे माझ्या पाहण्यातही नाही. मिपाचे वाचक सुज्ञ आहेत. जिथे करायचा तिथेच गोंधळ करतात. :) असो, बाकी आभार्स प्रतिसादाबद्दल.