मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
*********************************** किती वाकुडे बोल बोलून झाले स्वत:च्याच सत्वास गाळून झाले धरा सांगताहे कथा पावसाची किती थेंब पदरात झेलून झाले ? जरी भोवती 'माणसे' फार झाली तरी एकट्यानेच 'खेळून' झाले नको रोकडा, दागिनेही नकोसे बियाण्यासवे सत्व तोलून झाले जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ? चकोरापरी प्राण उधळून झाले कसा रे मुरारी तुझा हा अबोला? सुरांवर तुझ्या आज भाळून झाले 'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे' पुन्हा आरशालाच टाळून झाले किती राहिले श्वास देहात बाकी ? 'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ? *********************************** विशाल

वाचन 2107 प्रतिक्रिया 0