सत्याचा जय...
लेखनप्रकार
पूर्वपिठिका:
नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले...
नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा.
याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे.
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.
२. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो.
सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते.
पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील.
३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही.
सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत.
वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही.
४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे.
जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते.
वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील.
या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्याचा डबा दाखवणे आवश्यक आहे...
कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.
या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच.
पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद !
============================================
"नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो.";
"गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते.";
"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी.";
"लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे...
अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते.
सर्वात वाईट गोष्ट ही की बर्याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते).
जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे."
म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल:
१.
वाचने
55827
वाचनखूण
प्रतिक्रिया
218
In reply to गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध न by संजय क्षीरसागर
१) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा
१) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध नाही. २) सत्य (किंवा प्रामाणिकपणा) सदाविजयी आहे याचा अर्थ असत्य (अप्रामाणिकपणा), व्यक्तीच्या मनात अंतर्द्वंद्व निर्माण करतो. त्या अंतर्द्वद्वानं ती व्यक्ती लौकिकात कितीही यशस्वी झाली तरी स्वतःच्या मनासमोर कायम लज्जित राहाते आणि त्या अर्थानं ती पराभूत होते. थोडक्यात सत्याला असत्याशी सामना करायला लागत नाही कारण प्रामाणिक व्यक्ती अशा द्वंद्वापासून सदैव मुक्त असते.पुर्ण सहमत. अर्थातच बाकीच्या वादविवादात आपल्याला इंटरेस्ट नाही.In reply to १) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा by विलासराव
थोडासा बदल.
In reply to थोडासा बदल. by प्रभाकर पेठकर
मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू,
मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, स्वार्थी माणूस आपल्या ह्या दुर्गुणांना आपली हुशारी समजतो आणि अशा वागण्यातून आनंद मिळवितो. त्याला कधीच बोचणी लागत नाही अथवा तो लज्जितही होत नाही.सुंदर वाक्यांनी भारून गेलेला माणूस ही वस्तूस्थिती विसरतो !In reply to मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, by डॉ सुहास म्हात्रे
मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू,
मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, स्वार्थी माणूस आपल्या ह्या दुर्गुणांना आपली हुशारी समजतो आणि अशा वागण्यातून आनंद मिळवितो. त्याला कधीच बोचणी लागत नाही अथवा तो लज्जितही होत नाही.हे जरी खरे असले तरी त्याचा तुमच्या प्रामाणिक असण्याशी काय संबंध? म्हनजे लोक अप्रामाणिक आहेत म्हणुन मीही तसाच होणार असे का? उत्तर नको आहे. फक्त आपल्या अंतर्मनाचा जेंव्हा अभ्यास कराल तेंव्हा आनी तेंव्हाच हे लक्षात येईल. बाकी काहीही उपाय नाही.सुंदर वाक्यांनी भारून गेलेला माणूस ही वस्तूस्थिती विसरतो !असं ०.०००००००००००००००००००००००१ % या केसमधे नव्ह्तं एवढच नमुद करतो.हा खयाली पुलाव आहे तुमचा. बाकी चालु द्या.In reply to मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, by विलासराव
तुमचा माझ्या एकंदर
In reply to तुमचा माझ्या एकंदर by डॉ सुहास म्हात्रे
तुमचा माझ्या एकंदर
In reply to थोडासा बदल. by प्रभाकर पेठकर
प्रामाणिकपणा/ सत्य/ स्वार्थ
In reply to प्रामाणिकपणा/ सत्य/ स्वार्थ by बाळ सप्रे
याचाच विरोध कायदे, नियम,
In reply to प्रामाणिकपणा/ सत्य/ स्वार्थ by बाळ सप्रे
अपघाता नंतर उपरती.
In reply to अरे, जिओ मेरे विटेकर बुवा! by संजय क्षीरसागर
मैं कहाँ हूँ
In reply to मैं कहाँ हूँ by दिनेश सायगल
बाबा सायगल,
In reply to बाबा सायगल, by संजय क्षीरसागर
असं होय!
In reply to असं होय! by दिनेश सायगल
अरेच्या!
In reply to अरेच्या! by संजय क्षीरसागर
काय हो!
In reply to काय हो! by दिनेश सायगल
तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?
In reply to बाबा सायगल, by संजय क्षीरसागर
त्या दुसर्या लेखाचा संदर्भ
In reply to त्या दुसर्या लेखाचा संदर्भ by डॉ सुहास म्हात्रे
सर, मी परत लेख वाचण्यापेक्षा
In reply to सर, मी परत लेख वाचण्यापेक्षा by संजय क्षीरसागर
खास तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांना
In reply to खास तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांना by डॉ सुहास म्हात्रे
माझं म्हणणं इतकंच आहे :
In reply to माझं म्हणणं इतकंच आहे : by संजय क्षीरसागर
आता तुमचेच प्रतिसाद तुम्ही
माणूस स्वत:शी खोट बोलू शकत
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
सरळ मुद्दा आहे!
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
तुमचं मत आध्यात्मिक वगैरे
In reply to तुमचं मत आध्यात्मिक वगैरे by डॉ सुहास म्हात्रे
इकाश्री, जाऊं द्या!
In reply to इकाश्री, जाऊं द्या! by संजय क्षीरसागर
तुमच्याकडून अधिक अपेक्षा
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
विवेकपटाईतकाका, असत्य
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
विवेकसरांशी संपुर्ण सहमत.
अजून काही विचारवंताच्या सभेत
सितेला पळवून नेल्यावर
In reply to सितेला पळवून नेल्यावर by विजुभाऊ
धन्यवाद ! या गोष्टीचा हा
In reply to >>> रावणाने केवळ उपभोग by प्यारे१
.
In reply to . by पोटे
कसब वाखाणण्याजोगे आहे तुमचे.
In reply to कसब वाखाणण्याजोगे आहे तुमचे. by विश्वनाथ मेहेंदळे
+१. वाकबगार पोटे.
आमचाही एक ...
In reply to आमचाही एक ... by चौकटराजा
+११११
मी शंभरावा लिहिणार इतक्यात चौरांनी प्रतिसाद दिला
In reply to मी शंभरावा लिहिणार इतक्यात चौरांनी प्रतिसाद दिला by लंबूटांग
अर्रे हो
In reply to अर्रे हो by लंबूटांग
उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे
In reply to उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे by डॉ सुहास म्हात्रे
चलाख प्रामाणिक असणं आणि भोळसट
In reply to चलाख प्रामाणिक असणं आणि भोळसट by प्यारे१
.
In reply to . by पोटे
बरं मग?
In reply to बरं मग? by प्यारे१
.
In reply to . by पोटे
.
In reply to . by पोटे
आता नवीन लबाड उदाहरण घेऊ. हाय
In reply to . by पोटे
गायीला मारायला निघालेल्या
In reply to गायीला मारायला निघालेल्या by विजुभाऊ
माणसाच्या जीवनाला गायीच्या
In reply to गायीला मारायला निघालेल्या by विजुभाऊ
>>> समजा की तो कसाई हा ती गाय
In reply to उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे by डॉ सुहास म्हात्रे
अगदी अगदी
आयुश्यात ९०% लफडी कोण काय
In reply to आयुश्यात ९०% लफडी कोण काय by प्यारे१
म्हंजे काय ?
In reply to म्हंजे काय ? by डॉ सुहास म्हात्रे
बरेच मुद्दे सारखे असूनही
In reply to बरेच मुद्दे सारखे असूनही by प्यारे१
बरोबर आहे... पण सांगण्याच्या
In reply to बरोबर आहे... पण सांगण्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
चालायचं.
In reply to चालायचं. by प्यारे१
झालं, केलं एक रुपक "ऑन द
In reply to झालं, केलं एक रुपक "ऑन द by डॉ सुहास म्हात्रे
>>> छानसे कारकून राहून
उत्तम.
In reply to उत्तम. by विटेकर
>>> सगळे प्रतिसाद वाचून आणि
In reply to >>> सगळे प्रतिसाद वाचून आणि by श्रीगुरुजी
धन्यवाद !
चारित्र्याला म्हणजेच प्रामाणिकपणाला पर्याय नाही !!याला कोणाचाच आक्षेप असण्याचा प्रश्न नाहीच. प्रामाणिक माणूस हे सत्यही जाणून असेल की अप्रामाणिक/चरित्रहीन माणसे त्यांला आपणहून त्याचा हक्क ताटात वाढून त्यांच्यापूढे ठेवणार नाहीत... कारण तो प्रामाणिक माणसांचा गुणधर्मच नाही, किंबहुना ते तसे करत नाहीत म्हणूनच त्यांना अप्रामाणिक/चरित्रहीन म्हटले जाते. तसेच, आपल्या हक्कांकरिता संघर्ष करायला मागे राहण्याला काय म्हणतात हे प्रमाणिक माणसाला सांगण्याची गरज नाही. तेव्हा, अगदी सर्वस्व पणाला नाही लावले तरी प्रामाणिकपणे, आपली अक्कलहुशारी कामाला लाउन आपल्या हक्कांचे जमेल तेवढे रक्षण करावे... आणि अपयश आले तर त्याला भ्रामक वचनांच्या मागे लपवू नये... कारण तो अप्रामाणिकपणा होईल ! त्यापेक्षा अपयश का आले हे प्रामाणिकपणे समजावून घेउन, यशासाठी भविष्यात काय सुधारणा करायला पाहिजे हा विचार करावा. कारण, अप्रामाणिकपणापुढे हार मानणे आणि वरवर "मी मनातून आनंदी आहे" असे म्हणणे यापेक्षा दुसरा अप्रामाणिकपणा विरळा आहे.In reply to >>> सगळे प्रतिसाद वाचून आणि by श्रीगुरुजी
अर्थातच चांगल्या कर्माचे
मग
सत्याचा
In reply to सत्याचा by विटेकर
तुमच्या सारखाच एखादा शहाणा
तुमच्या सारखाच एखादा शहाणा मनुष्य येऊन सांगतो की गाढवांनो , जरा पायावर उभे राहून पहा की सूर्य नेमका कोठे उगवतो ते !उत्तम ! लेखाचा मतितार्थ हाच आहे की "माणसाने विचार करणारा, आपल्या चुका जाणणारा आणि त्यावरून काही शिकणारा शहाणा माणूस बनण्याचा प्रयत्न करावा" ! बस इतकेच बरेच काही करून जाईल !! :)In reply to सत्याचा by विटेकर
सूर्य पूर्वेला उगवतो हे
In reply to सूर्य पूर्वेला उगवतो हे by विजुभाऊ
मी उत्तर धृवावर गेलो आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!लेखावरची चर्चा पाहून लेखातले
In reply to लेखावरची चर्चा पाहून लेखातले by राजेश घासकडवी
संक्षींचा विजय झाला नाही असे
In reply to संक्षींचा विजय झाला नाही असे by विश्वनाथ मेहेंदळे
हार जीत तो आदमी की होती है
In reply to हार जीत तो आदमी की होती है by प्यारे१
हं
त्यांना मोठं व्हायला सांगूया काय?कुणाला ? कुणाला? व्य नि केला तरी चालेले.In reply to लेखावरची चर्चा पाहून लेखातले by राजेश घासकडवी
नावाच्या यादीत स्वतःचे नाव
In reply to नावाच्या यादीत स्वतःचे नाव by डॉ सुहास म्हात्रे
हल्ली इन्फ्लुएन्शल पिपल पण
तिसरा पर्याय
In reply to तिसरा पर्याय by विटेकर
या तिसर्या पर्यायात जीत
या तिसर्या पर्यायात जीत नेहमी माझीच असते !हे तुमचं मत झालं. पण...सगळ्या पर्यायांत जीत नेहमी माझीच असते !हे संक्षींचं मतही तुम्हाला मान्य आहे काय हे पण जाणून घ्यायला आवडेल ! :)या धाग्यावर विजयी पावलेल्या
In reply to या धाग्यावर विजयी पावलेल्या by कवितानागेश
छान
ह्म्म
In reply to ह्म्म by विटेकर
या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य
In reply to या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य by धन्या
या ओळीचा अर्थ सांग्ण्यासाठी
In reply to या ओळीचा अर्थ सांग्ण्यासाठी by विटेकर
वल्लीने सांगितलेला अर्थ बरोबर
In reply to या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य by धन्या
____/\____
In reply to ____/\____ by प्यारे१
ट्रान्सलेटर कशाला हवा? माझं
In reply to ट्रान्सलेटर कशाला हवा? माझं by धन्या
हा प्रतिसाद सीरियस असल्यास
In reply to हा प्रतिसाद सीरियस असल्यास by प्यारे१
अर्थ
In reply to अर्थ by प्रचेतस
वल्ली सरांचे शाल आणि श्रीफळ
In reply to वल्ली सरांचे शाल आणि श्रीफळ by प्यारे१
(No subject)
In reply to ट्रान्सलेटर कशाला हवा? माझं by धन्या
हो ना ! अकरावीपर्यंत संस्कृत
In reply to हो ना ! अकरावीपर्यंत संस्कृत by डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा ..
In reply to हा हा हा .. by हाडक्या
अवांतराबद्दल क्षमस्व...
In reply to हा हा हा .. by हाडक्या
तसं मला काही आठवत नाही. पण मी
In reply to तसं मला काही आठवत नाही. पण मी by डॉ सुहास म्हात्रे
अहो, बॅ. पी. जी. पाटिल आता