मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपण का लिहिता?

विवेकपटाईत · · काथ्याकूट
आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न. माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे. सत्याबाबत म्हणाल तर सहा आंधळ्यांनी, सहा प्रकारे हत्तीचे वर्णन केले. सर्वांचे वर्णन वेगळे असले तरी प्रत्येकाच्या दृष्टीने ते सत्य होते. मला दिसलेले सत्य लोकांना पटले पाहिजे असा माझा आग्रह नाही.

वाचने 13899 वाचनखूण प्रतिक्रिया 40

बॅटमॅन Fri, 09/05/2014 - 12:33
काही नवीन वाचतां कंडुअतिशमनार्थ लेख तो ल्याहावा | तेहीं नसतां मग प्रतिसादोन काळ काढावा ||

(१) व्यक्त होणे ही माझी गरज आहे (या वाक्यात संपतं कारण पण तरी......) (२) अशा संस्थळांवर लिहीले की (अ) आपण लिहीतो त्यातल्या चुका प्रतिसादांमुळे, खरडींमुळे तिथल्यातिथे समजतात. (ब) लिहीणे सुधारते, दिशा मिळते. (३) लिखाणावरच्या प्रतिसादांमुळे ज्ञानवृद्धीही होते - त्याचा उपयोग मग लिखाण सुधारण्यातही होतो.

मी लिहितो कारण १ ) टवाळखोर प्रतिसाद : ऑफीसात काम नसते , खरडफळ्यावर गफ्फा मारायला कोणी नसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिपावरच्या काही आयडीं ( ब्यॅट्या , सूड , धन्याप्यारे , नेफळे वगैरे ) सोबत बौध्दिक वादावादी करायला लय मजा येते *biggrin* ... नो ऑफेन्स हं फ्रेन्ड्स ! कारण २ )गंभीर प्रतिसाद : फार क्वचितवेळा गंभीर प्रतिसाद लिहिण्याची वेळ येते ( तेव्हा मग ऑफीसात काम असुनही वेळ काढला जातो) जेव्हा एखाद्याविषयावर आपले मत कंप्लीटली ऑर्थोगोनल (मराठी ? संपुर्ण विरोधी ?) असते तेव्हा ते लोकांना कन्व्हे करण्याची प्रॅक्टीस करता येते शिवाय हुशार लोकांशी चर्चा केल्याने जर आपले मत चुकीचे असेल तर बदलता येते किंव्वा बरोबर असेल तर त्यातील लूपहोल्स रिमुव्हता येतात . कारण ३ ) काथ्याकुट धागा : लईच कंटाळा आला असल्यास आणि लईच वादग्रस्त विषय हाती लागल्यास्की काथ्याकुट धागा काढतो ... ( अर्थात आपल्या काथ्याकुटवर कुटाकुटी झाली नाहीतर लई वाईटही वाटते ) कारण ४ ) स्वतंत्र लेखन ( कविता कथा लेख गोष्ट वगैरे ): हे तर फार म्हणजे फार क्वचितवेळा करण्याचा योग येतो ...पण काही काही विषय असे असतात की मला बस्स बोलायचंय ऐकायला कोनी नसलं तरी चालेल मला बस्स बोलायचंय असं जेव्हा वाटतं तेव्हा असे काही लेखन करतो !

प्रसाद१९७१ Fri, 09/05/2014 - 13:52
खरे खुरे उत्तर असे आहे की असले आजा वर प्रतिक्रिया वगैरे लिहीण्याचे उद्योग मी ऑफिस मधुनच करतो, घरुन अजिबात नाही. वाचना बद्दल म्हणाल तर, चर्चा आणि प्रतिक्रीया वाचुन नविन काहीच हाती लागत नाही. नेहमीचेच चालू असते. डॉ खरे आणि जयंत कुलकर्णी ह्या लेखकांच्या लेखातुन बरीच नविन माहीती मिळते आणि ते ती छान पद्धतीने लिहीतात म्हणुन वाचतोच वाचतो. बाकी नाव घेण्यासारखे फारसे कोणी नाही ( हल्ली लिहीणार्‍यातले ) पर्यटना वरचे वाचुन काढतो आणि फोटो बघतो.

भिंगरी Fri, 09/05/2014 - 14:58
लेखनाची सुप्त इछा पुरी होते,आम्हा बुद्धीहीनांची बुद्धीवानांबरोबर गाठ्भेठ होते. मन मोकळे होते.

प्रभाकर पेठकर Fri, 09/05/2014 - 20:16
बोलायला, ऐकायला, इतरांचे बोलणे ऐकून घ्यायला, विचारांचे आदानप्रदान करायला आवडते म्हणून. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार ! शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार !! आणि वादे वादे जायते तत्व बोधः वगैरे वगैरे सुभाषितांनी माणसाच्या व्यक्तीमत्व विकासाचा मार्ग अधोरेखित केला आहे. जसे वाहते पाणी स्वच्छ असते तसेच प्रवाही विचार स्वच्छ राहतात. जर विचार प्रवाही केले नाहीत तर बुद्धीचेही 'डबके' होते आणि त्यात गाळ साठत राहतो. मिपावर विचार प्रवाही राहण्यासाठी बराच कच्चा (आणि पक्का) माल मिळतो.

पैसा Sun, 09/07/2014 - 11:07
१) का लिहिता? जेव्हा एखादा लेख आतून बोंब मारतो तेव्हाच लिहिते. फक्त एक लेखमालिका "आमचें गोंय" पब्लिकला गोव्याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने प्रीतमोहर आणि मी लिहिली होती. अर्थात तेव्हा आम्हाला ढकलण्याचे कार्य आमचे पुणेस्थित मित्र बिपिनचंद्रजी कार्यकर्ते यांनी केले होते. २) आंजावर का लिहिता? मी लिहिलेलं कोणी छापणार आहे काय! कैतरीच काय! ३)प्रतिक्रिया का लिहिता? टाईमपास, दुसर्‍याला कंटाळा आणणे, काड्या टाकून मजा पाहणे, खोटे बोलणार्‍यांना पकडणे असे अनेक उद्देश वेगवेगळ्या वेळी असतात. मात्र नवे लेखक आणि कवी या लोकांना मी चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करते, कारण हे सहसा हळवे असतात आणि उगा प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणून रुसून बसण्याचा संभव असतो.

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Sun, 09/07/2014 - 12:35
>>>>टाईमपास, दुसर्‍याला कंटाळा आणणे, काड्या टाकून मजा पाहणे, खोटे बोलणार्‍यांना पकडणे असे अनेक उद्देश वेगवेगळ्या वेळी असतात. मात्र नवे लेखक आणि कवी या लोकांना मी चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करते, कारण हे सहसा हळवे असतात आणि उगा प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणून रुसून बसण्याचा संभव असतो. पाककृतींना वगळल्याबद्दल तीव्र निषेध.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा Sun, 09/07/2014 - 12:56
पाकृ, इतर चांगले लिखाण यांना उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली जातेच! ते सोडून इतर कारणे लिहिली म्या!

१) आपल्याच मनाची विचार करायची पद्धत आपल्यालाच नव्याने कळते २) मनाला त्रास देणाऱ्या घटनांवर लिहिल्याने त्याची आंतरिक टोचणी कमी होते ३) आजपर्यंत जे करू शकलो नाही किवा जिथे जाऊ शकलो नाही त्या काल्पनिक जगात सफर करून आल्यामुळे नवीन चैतन्य येते ४) एकूणच विचारांची समृद्धी येते