मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

गंगाधर मुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! Pandharpur बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!

वाचने 19185 वाचनखूण प्रतिक्रिया 73

आयुर्हित गुरुवार, 07/10/2014 - 00:33
आजच्या या आषाढि एकादशीच्या शुभ पावन दिवशी भक्तीरसात भिजलेले "अरविंद" श्री गंगाधरजी मूटे पाहून मन तॄप्त झाले. जय हरी विठ्ठल...!जय हरी विठ्ठल...!!

माहितगार गुरुवार, 07/10/2014 - 10:25
--/\-- जाहले आज बढीया रसपान 'अरविंदा'ने दिले आम्हा आत्मभान !! धन्यवाद

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/10/2014 - 11:21
ऑफीसात चित्र दिसत नाहीये ... पण धाग्याचे नाव विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! वाचुन एका खास मिपाकराची आठवण झाली .... =))

In reply to by भृशुंडी

माहितगार Fri, 07/11/2014 - 08:19
शीर्षक मनाला साशंकीत करावयास लावत, पण ती माझ्या मनाचा मळभ आहे जो मला सतत पिणे शब्द पाहीला की नाही त्या गोष्टीची आठवण देतो ? शीर्षक भरकटलेल्या अशुद्ध मनाला आकर्षीत करून आणत आणि सन्मार्गाला नेऊन सोडत. या अर्थाने शीर्षक धक्का तंत्राचा उपयोग करत, पण ते भयानक नाही मार्मिक आहे. काव्य तंत्र आणि समीक्षेबद्दल मला काहीच कल्पना नाही. या काव्यावर काव्यातील भावात्मकते सोबत काव्यतंत्राचा प्रभाव जाणवत राहतो. काव्याच तंत्र असावयास हरकत नाही, भावोत्कटता, सोअत चपखल शब्द सुचणे एवढी असली पाहीजे की तांत्रीकता जाणवली नाही पाहीजे. अर्थात कविची अभिव्यक्त होतानाची भावोत्कटता आणि स्फूर्ती ह्यास गणितीय नियम लागू होऊ शकत नाहीत ते जुळूनच याव लागत अस कुठेतरी वाटल. (चूभु.दे.घे.) हे असूनही भरकटणार्‍या मनांना, तसेच महाराष्ट्रातील अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस लोकांकरता हे काव्य एक ऊत्तम पाठ आहे.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:22
काव्यतंत्राचा प्रभाव जाणवण्याचे कारण गीत लयीत आणणे, हे आहे. गीत गाताना शब्दांची ओढातान होनार नाही, याची काळजी घ्यावीच लागते. :)

In reply to by मराठे

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:06
अरविंद हे उपनाव मी फक्त भक्तीगितासाठीच वापरत असतो, ज्या भक्तीगीतांना सामाजिक बांधिलकी नसते. केवळ भक्तीभाव असतो. अभय हे उपनाव मी सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या आणि वैचारिक मांडणी करणार्‍या सर्व प्रकारच्या काव्यामध्ये वापरतो. भावभक्ती व सामाजिक बांधिलकी यात द्वंद निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक वाटते. :)

In reply to by माहितगार

पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे एक छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल! - विंदा करंदीकर

In reply to by अनुप ढेरे

माहितगार Fri, 07/11/2014 - 11:10
दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!
कृष्ण असो वा विठ्ठल, किती खोडकर असले तरीही संदीपनींना संदीपनींचाच, यशोदेला यशोदेचाच रोल पार पाडावा लागतो. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!>>>. मस्स्स्त...! *i-m_so_happy*

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:19
त्याच्या कंपणीत बसने लैच अवघड असते राव! तरीही लाखो लोकं खुशीने पायीपायी जातात हो कंपनीत बसायला. शिवाय एकदा चढली की गावे आणि नाचावे पण लागते बरं का! जमेल तुम्हाला? ;)

गंगाधर मुटे Sat, 07/12/2014 - 18:35
बिरुटे सर, ज्याला विठ्ठल कळत नाही आणि विद्यार्थीही कळत नाही, ज्याला स्वार्थ कळत नाही आणि परमार्थही कळत नाही, ज्याला चांगले कळत नाही आणि वाईटही कळत नाही, अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

@त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/blank-expression-smiley-emoticon.png

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Sun, 07/13/2014 - 20:29
...अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही. - विंदा करंदीकरांच्या कवितेवरील गंगाधर मुटे यांचे भाष्य
शक्य आहे की विंदाच्या काव्य जीवनातील सुरवातीच्या काळातील कविता असेल, अर्थात त्यांच मी लेखन फारस वाचलेल नाही पण काव्य लिहिताना शाळा या शब्दाशी यमक जुळवण्या साठी काळा हा शब्द ओढून ताणून आणलेला वाटतो किंवा कसे माहीत नाही. बहुधा तो यमक जुळवण्या पुरताच असावा बाकी रुपक या अर्थाने निरर्थक असावा तरीही प्रथम दर्शनी तो उल्लेख रुचला नाही हे खरे. पण काळ्या रंगा संबंधीत रुपके वापरणारे ते एकटेच भारतीय साहित्यिक नसावेत आणि नवीन काळातील मुल्य बदल होण्या आधी जुन्यापिढीतील कविने विचार केला नसेल हे संभवते. पण बाकी कविता (इश्वर स्वरुप) विठ्ठलाचे शरसंधान करत नाही असे निश्चितपणे म्हणता येईल असे वाटते. इथे कविता शरसंधान अद्वैताच स्वरूप नीटस न कळलेल्या भक्तगणांच करते आहे (कि अद्वैताची मर्यादा सांगते आहे) ? आणि इश्वराच रूप सर्वत्र आहे हि श्रद्धा महत्वाची असली तरी चिमूटभर मीठा सोबत संकल्पनेची मर्यादा समजून घेण्या साठीही हि कविता आहे. काळा रंगाच रुपक वापराव का आधूनीक मुल्यांप्रमाणे विवाद्य मुद्दा असला तरी तो दांभिकतेच स्वरूपावर टिपण्णी असल्यास कल्पना नाही. माणसाला (बारश्याच्या वेळी) इश्वराची अथवा संतांची नाव देण्याची पद्धत मला स्वतःला मुलतः पटत नाही कारण त्या मूळ पुरूष (अथवा इश्वरीय) कडून अभिप्रेत गूणांच्या पेक्षा अगदीच वेगळ्याच गूणांचे दर्शन असंख्य लोकांकडून होताना दिसते. माणूस स्खलनशील असतो आई-वडील किंवा मागच्या पिढीतील लोकांनी काय नाव ठेवले यात नाव असलेल्या व्यक्तीचा दोष नसतो म्हणून त्या व्यक्तीला समजून घेता येते पण नाव ठेवणार्‍या संबंधीत भक्ताला (त्याचा उद्देश चांगला असूनही) समजून घेता येते का ? कवितेतल्या मास्तरांना अद्वैत समजत आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण गीतेतला आपापल कर्म करण्याचा उपदेश हा अद्वैताच्या कल्पनेपासून फार फारकत घेऊन नसावा आणि मास्तरांची गफलत तेथे होते आहे. (कि कविला अद्वैताची मर्यादा दाखवून द्यावयाची आहे..विद्यार्थ्याचे वेगळे वागण्यातून कविला द्वैताकडे निर्देश करावयाचा आहे का ?) योग्य ठिकाणी कठोर होण्याची गरज असताना सुद्धा शिक्षक आळंम टाळम करतो आहे या कडे कविचा निर्देश असेल काय या बाबतीत मास्तर केवळ एक रुपक आहे पालक आणि समाजही श्रद्धेच्या मर्यादा न समजता दांभिकतेला तर सत्य समजत नाहीए ना ? खोडकरपणा त्याच वेळी मुलांच्या लहान वयातला सहजभाव आहे हे ही कवि स्वतः अप्रत्यक्षपणे स्विकारतोय आणि वाचकापुढेच प्रश्न टाकतो आहे की तुम्ही स्वतः मास्तर/पालक अथवा समाजाचा घटक असाल तर नेमक काय कराल ? म्हणून त्या रंग रूपकाची मर्यादा यमकाची ओढाताण करून केलेली जुळवा जुळव लक्षात घेऊन सुद्धा इतर बाबतीत कवितेची दखल विनोदी आणि गंभीर दोन्ही अर्थांनी घ्यावी वाटते.

In reply to by माहितगार

साधच बघायच झालं तर,विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 09:40
विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोणत्याही कलाकृतीकडे पाहाण्याच्या दृष्टीकोन व्यक्तीसापेक्ष असतो, तुमच्या मताचा आदर आहे. मात्र मला तसे अजिबात दिसत नाही. :)

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Mon, 07/14/2014 - 12:01
मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा' यांनी मांडलेला 'चराचरात विठ्ठल (इश्वर) पाहणे' हा सुद्धा भारतीय अध्यात्म विचार आहे या बाबत आपलेही दुमत असणार नाही. करता करविता सर्वकाही परमेश्वर आहे. मुलाचा दंगा, मस्ती, अट्टल खोड्या हे सर्वकाही इश्वर निर्मित मायाजालच आहे. इश्वराच्या निर्मीत कोणत्याच गोष्टीला इश्वरेतर म्हणून मी नाकारत नाही त्यातही मी निस्पृहतेने इश्वरच (इश्वरी लीला) बघतो. असा काहीसा तो 'अत्रुप्त आत्मा' निर्देशिक करु इच्छित असलेला विचार असावा असे मला वाटते.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 09:45
खट्याळ आणि खोडकरपणा हे विठोबाचे स्वभावगूण नाहीत. फक्त तो पोरगा "काळा" आहे, एवढ्या एका कारणासाठी मास्तरला त्याच्यात विठ्ठल दिसतो!

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 14:52
अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश कृष्ण असं आहे. कृष्णाची बायको रुक्मिणी आहे ना? हा काळा, तो काळा. खट्याळपण आणि खोड्या करणं हे कृष्णचरित्रातनं घेतलेलं आहे. कदाचित आता समीकरणं जुळतील. बाकी कीस बाई कीस चालू द्या!

In reply to by प्यारे१

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 15:13
अशा तर्‍हेनेच समर्थन करायचे झाले तर ही कविता विठ्ठलावर नव्हे तर येशू ख्रिस्तावर बेतलेली आहे, आणि तो बालक म्हणजे बजरंगबलीचा अंश आहे हेही सिद्ध करून दाखवता येईल. :D

In reply to by अनुप ढेरे

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 11:26
अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.
अगदी अगदी. मी पण तेच म्हणतोय! साने गुरूजींना लहान मुलात देव दिसला. गांधीजींना जनसेवेत देव दिसला. गाडगेबाबांना ग्रामसेवेत देव दिसला. तुकडोजींना मानवतेत देव दिसला. भक्त मंडळींना दगड-धोंड्याही देव दिसला. संतांना भूतदयेत देव दिसला. साधूपुरूषांना चरचरात देव दिसला. . . . . या कवितेतील मास्तला काळा रंगात देव दिसतो! बरोबर?

In reply to by अनुप ढेरे

माहितगार Mon, 07/14/2014 - 12:07
हम्म हाही अँगल महत्वाचा आहे खासकरून अत्रुप्त आत्मा यांच्या मांडणी सोबत वाचला म्हणजे पटतो असे वाटते. मला वाटते या कवितेकडे बर्‍याच अँगलनी बघता येते किंवा आपण सर्व मिपाकरांनी पाहिले. @ बिरुटेसर, धन्यवाद, तुमच्या या कवितेस पोस्टवण्यामुळे एक चांगल्या कवितेस वाचण्याची संधी मिळाली. (मी कीस जरा जास्तच पाडला असेल तर क्षमस्व.)

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 16:03
कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.
याला मुस्कटदाबी म्हणतात. प्रश्नाची उत्तरे समर्पकपणे देता आली नाही की, एखाद्याची मुस्कटदाबी करायची ही फार जुनी परंपरा आहे. कविता केवळ विंदा करंदीकर यांची आहे म्हणून न पटणारी वस्तुस्थितीही स्विकारायची हे मला जमायचे नाही. तरी पण इथेच थांबतो. या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही. तुम दिनको रात कहेंगे तो मै रात कहूंगा!

In reply to by सूड

गंगाधर मुटे Mon, 07/14/2014 - 20:27
@ सूड, तुम्ही एकीकडे बळजबरीने माझे तोंड दाबून धरले. शब्दबान चालवून मी पुढे लिहिणार नाही याचा बंदोबस्त केला. आता पुन्हा "जशी तुमची इच्छा!!" म्हणताय? :D माझी इच्छा तर कवितेविषयी लिहायची होती. :) शब्दबान चालविण्याऐवजी तुम्ही त्या कवितेचा सविस्तर रसग्रहण करून अर्थ उलगडून दाखवला असता तर मी आपोआपच उघडा/तोंडघशी पडलो असतो ना? त्यासाठी माझी मुस्कटदाबी करायची गरजच नव्हती! जाऊ द्या. आता तरी तुम्हीच अर्थ उलगडून दाखवा. *bye*

In reply to by गंगाधर मुटे

अनुप ढेरे Mon, 07/14/2014 - 20:37
अहो लोकांनी वर स्वतःला उमजलेले अर्थ सांगितले आहेत. तुम्हीही सांगा तुम्हाला काय उमगलं. काहीच उमगलं नसेल तर राहुद्या. आणि एकच अर्थ असेल कवितेला असही नाही. एकहून अधिक अर्थ असू शकतात.

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Tue, 07/15/2014 - 08:30
विंदांच्या अष्टदर्शनेच्या प्रस्तावनेत कोणत्याही विचारधारेच्या तत्वज्ञानाच्या विपर्यस्त लेखन होत नाही आहे हे दुसर्‍या समीक्षकाकडून तपासून घेण्याचे भान विंदा दाखवताना दिसतात. दुसरा मुद्दा विंदांची हि कविता कोणत्या काव्य संग्रहातून आहे कल्पना नाही पण त्यांच्या साहित्य लेखनाचा एक मोठा भाग बाल साहित्य आणि बाल कवितांचा असावा. कवितेच्या काँटॅक्स्टची आपल्याला काहीच कल्पना नाही. बर्‍याचदा कविता एखाद्या घटनेवरून सुचलेल्या असू शकतात, किंवा लहान मुलांकरता वरवर लिहिलेल्या कवितेला आपण फारच खोदतोय असे असे तर नाही ना ?

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 19:29
@ सूड, धन्यवाद. परत धन्यवाद एवढ्यासाठी की बरं झालं वेळीच तुम्ही माझं तोंड दाबून धरलं. नाहीतर मी लिहितच राहिलो असतो आणि मग काही प्रतिसादकांनी माझी हजामत करण्यात काहीही कसर बाकी ठेवली नसती. :) कवितेचा मध्यवर्ती अर्थ किंवा कवितेचा उलगडा कुणीच करायला तयार नाही. मात्र मिळेल तो वस्तरा घेऊन माझ्यावर तुटून पडू पाहात आहेत. आनंद आहे. :)

In reply to by यशोधरा

कवीच्या कवीतेत कवीला विचारल्याशिवाय कविता टाकणार नाही. फक्त तेवढं ”कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास” तर नाही ना असा शेरा मारु नका बॊ. मग कविता डकवेन, चालेल ना ? मुटे साहेब, अवांतराबद्दल क्षमस्व. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

छ्या.... तुम्हाला नाय कल्ला आमचा प्रतिसाद मग. :) (पहिल्या प्रतिसादात मी हसरी स्मायली टाकायला हवी होती वाटतं) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा Tue, 07/15/2014 - 22:30
म्या पन न्हाय ओ टाकली स्मायली. म्हनलं, तुमास्नी समजंल. हाय का आता? समदाच सावळा (विठूरायाचा)गोंधळ की!

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 21:57
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुम्हाला कविता डकवता आली पण कवितेचा अर्थ काही डकवता येत नाहीये! :) हरकत नाही, सगळ्याच सगळंच जमत्येच असं नाही. :) पुढच्या वेळेस कोणाची आणि कुठेही कविता डकवायची झाल्यास संपूर्ण अर्थासहित डकवावी, एवढे तरी माझ्यासारख्यावर उपकार करणार काय? :)

In reply to by गंगाधर मुटे

मला कविता डकवता येते पण अर्थ लागेलच हे काही सांगता येत नाही, हे खरं आहे. मी कवितेवर बोलतो म्हणजे मला कविता खूप कळते असंही नाही. मला दुसर्‍यांच्या कवितेवर आणि कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही. मला कविता अर्थासहित डकवावी वाटली तरी कवितेचा अर्थ तोच असेल हेही सांगता येणार नाही, वरील सर्व सबबीवरुन एकच सांगतो. मी यापुढे कविता डकवणार नाही. चुक झाली. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Wed, 07/16/2014 - 13:26
कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही.
सॉरी औट ओफ कोंटॅक्स्ट येऊन हे वाक्य मी माझ्यावर ओढवून घेतो. (अशात दुसर्‍या मराठी संकेतस्थळावर पडीक असताना अस्मादीकांना, 'तज्ञ नसलेल्या मंडळींचा वाढता भाषिक व्यासंग' अशा कॅटेगरीत मोडणारा शेरा आडून मिळाला :) ) राम पटवर्धनांसारख्यांच्या मराठी विश्वात आमचा कॉजवा आम्ही टीम टिम टिमकवत असतो.

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 22:05
आखिर केहना क्या चाहते है अभयारविंद मुटे साब???? नक्की काय अर्थ असू शकेल विंदा करंदीकरांच्या कवितेचा? -(ह्यावेळी शतक होऊनच जाऊ दे!)

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 22:07
पंढरपूरच्या वेशीबाहेर एक छोटी शाळा आहे. सर्व मुले गोरी पण एक मुलगा कुट्ट काळा आहे. दंगा करतो, मस्ती करतो खोड्या करण्यात अट्टल आहे, न जाणो तो विठ्ठल असेल, करणार काय असे मास्तर म्हणतात. @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, असा अर्थ आहे का हो कवितेचा? :)

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे Tue, 07/15/2014 - 22:10
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुमचा वरील प्रतिसाद येण्यापूर्वीच हा प्रतिसाद मी टाकला. क्षमस्व. चर्चा लांबवण्यात हशिल नाही.

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 22:22
विन्दांनी लिहीलेल्या बालकवितांमधली ही एक कविता असावी असा माझा समज आहे. तज्ज्ञ लोकांनी बॅटरी/विजेरी/मर्क्युरी/हॅलोजनची लाईट मारावी ही विनंती.

In reply to by प्यारे१

आयुर्हित Wed, 07/16/2014 - 01:19
पंढरपूरच्या "वेशीबाहेर" ह्या शब्दामुळे विंदांची कविता अस्प्रुश्यतेमुळे निर्माण झालेली मास्तरांची द्विधा स्थिती दर्शवित आहे, असे वाटते. त्याकाळी (सानेगुरुजींच्या आंदोलनाआधी)विठ्ठल मंदिरात प्रवेश करायला परवानगी नसल्याने विठ्ठलाला हात कसा लावायचा/काळ्या विद्यार्थ्याला शिक्षा कशी करायची "करणार काय" हाच प्रश्न पडलाय मास्तरांना. फक्त विठ्ठल हाच एकमेव शब्द हेच साम्य आहे, परंतू दोन्ही कविता दोन वेगळ्या आशयाच्या आहेत.

In reply to by आयुर्हित

प्यारे१ Wed, 07/16/2014 - 01:50
मुलांनो, पाहा पाहा हत्तीचा (नसलेला) पाय/शेपूट/सोंड/कान वगैरे वगैरे....!!! 'वेशीबाहेर' असलेल्या शाळेतली सगळी मुलं 'गोरी' नि एकच पोरगा काळा??????? मुळात सगळी 'गोरी' मुलं वेशीबाहेर का जातील शाळेत? जर तशी 'सगळीच' जात असतील तर ती शाळा 'वेशीबाहेर'ची कशी? अर्थात माझ्या गावची शाळा गावाबाहेर म्हणजे वेशीच्या पलिकडच्या पण पलिकडं आहे (हा *हारवडा, तो मां*वडा (हो, अजूनही हीच नावं आहेत.) मग 'वडा' (ओढा) मग शाळा) पण त्या शाळेत अलिकडची, पलिकडची, अलिकडून पलिकडची नि पलिकडून अलिकडची अशी सगळी मुलं जातात. ;)

आशिष दा Wed, 07/16/2014 - 11:18
सगळ्याच गोष्टींचं "रसग्रहण" आवश्यक असतं का? अतिशय गोड कविता आहे विंदांची. तेवढं बास नाही?