Skip to main content

किसमिस

लेखक लीलाधर यांनी रविवार, 13/11/2011 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक तीने घेतला माझ्या हाताचा किस, त्यानंतर येणार्‍या प्रत्येक दिवशी आणि रात्री आम्ही खाऊ लागलो प्रेमाचे किसमिस, दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर, खरं म्हणजे माझ्या लग्नाची बाबाच काढणार होते छानशी वरात, पण मीच आणली हट्ट करून हीला घरात, आता मात्र खरंच दिवस गेले आणि आमच्या सौंच्या बुद्धीमत्तेचे दीवे घरभर पेटू लागले, एक दीवस तीने मागितली आमच्या ईस्टेटीची परात, मी मात्र बुडून गेलो दारू सोबत अंधारात, मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज, बाळा यालाच म्हणतात- बीन बुडाची आणि बीन घोडयाची वरात, म्हणूनच आपण रहावे आपल्या रीतीभातींच्या घरात आपल्या रीतीभातींच्या घरात.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 12208
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

राजकुमार>आपने जरूर उसको अपनी सुई चुभाइ होगी वर्ना हमारी प्यारी भाभीजान ऐसी हरकत कभी नही करती! अंगूर का दाना हूँ सुई ना चुभो देना सुई जो चुभोई तो रस टपकेगा जो रस टपकेगा तो किसमिस किसमिस किसमिस बन जाऊंगी

:(

लील्या काय कहर कविता लिहायाचास बे :-D:-D आधी दिवस काय जायचे मग लग्नाची हुरहुर काय लागायची :-D:-D भारीच ब्वा .... मिस ची होणार का आता मिसेस किसेस एवजी धुवा आता डिशेस :-D

In reply to by अभ्या..

नव्याने फोटोशॉप शिकणार्‍या सारखे कवीराज लीलाधर यांचे झालेय ! दिवसजायचा लेअर व लग्नाचा लेअर यांची काहीतरी गडबड झाली.

माताय. ही कविता नजरेतून कशी काय निसटली होती ब्वा.

दिवस कधी खोटे गेलेत का बोला, गेलेत ना आता? कामवाली ठेवा. घोड्यावर वरात जाऊं दे जोरात, हौसेनं तिला घेतलीये ना घरात ? तुम्ही खा किसमिस, दादा खातो साय आता हाय काय आणि नाय काय!

दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर, >>> बरोबर आहे . आधी दिवस गेले की हूरहूर लागणारच लग्नाची

मस्त...क्या बात है!!!

ही कशी वाचली नाही कविता मी?? वाह वाह !! मिपावरही कलोनियल कझिन्स का काय म्हणतात ते आहेत याचा अभिमान वाटला. ;)

साखरपुड्याच्या सुपाचा बाऊल संपायच्या आतच रीतिभातींचे डेझर्ट पिऊन टाकलेस वाटतं !

>>मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज इंटरेस्टिंग !! बाकी दिवस जाणं, मग लग्न होणं आणि परत रीतीभातींच्या घरात राहणं; चुकल्यासारखं वाटत नाहीये का काही?

=)) ... =)) ... =))

खूप छान कविता. आणि मनापासून लिहिलेली असल्याने काळजाला भिडणारी.

In reply to by प्रचेतस

कविता काळजाला भिडली हे ठीक आहे. मात्र तुम्हाला कसे कळले की त्यांनी ही कविता मनापासून लिहिली आहे? कशावरुन त्यांच्या कलोनियल कझिनप्रमाणे र ला र आणि ट ला ट जुळवत नाहीत.

In reply to by धन्या

कवी जे काही लिहितात ते मनापासूनच लिहितात. नाहीतर असले भावविभोर काव्य उमटणे कठीण. आणि त्यांचे कलोनियल कझिन तर अत्यंत प्रत्ययकारी काव्य लिहितात. त्याचा प्रत्यय तुम्हास अजिंठ्याला आणि किसनदेवांना देवगिरीवर आलाच आहे.

तोडलस मित्रा !! अशीच काव्यप्रतिभा दिवसेंदिवस बहरत जौ दे.......

हौशी कवी बिचारे कविता जुळवतात आणि शिनेर मिपाकर त्यांचा बाजार उठवतात याबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वाटली. लिल्या, हौर आन्दो! डरनेका नै!

कवितेचे रसग्रहण मिपाकरांकडून शिकावे.. करूण रसाला छातीशी धरून भडभडून हसावे !

In reply to by निखळानंद

तुमचे प्रतिसाद वाचून पूर्वी 'रातकिडा चंद्रसेन' आयडीने एक गृहस्थ काव्यात्मक प्रतिसाद टंकत असत, त्यांची आठवण झाली. ;)

In reply to by सूड

मी काहीही लिहिले तरी कोणाला तरी पूर्वीचे आठवतंय काहीतरी.. चालायचंच्..मिसळपाव म्हणजे आठवणींचे गाठोडेच आहे नाहीतरी..

परात पुन्हा घरात (पक्षी वर) आली. अता तरी बुवा लिहिते होतील का? (प्रतीसाद सोडून अश्या प्रत्यय दर्शी कवीता)

लिल्या मेल्या किती दिवस अशा जुन्या कविता वाचायच्या चाहत्यांणी पाच वर्षं झाली कवितेला.परत दिवस घालवलेले चालावे ;)

आज वाचली ही एवढी भावविभोर कविता. :) किसनदेवा, परत वर आणल्याबद्दल धन्सः))

.