मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किसमिस

लीलाधर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अचानक तीने घेतला माझ्या हाताचा किस, त्यानंतर येणार्‍या प्रत्येक दिवशी आणि रात्री आम्ही खाऊ लागलो प्रेमाचे किसमिस, दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर, खरं म्हणजे माझ्या लग्नाची बाबाच काढणार होते छानशी वरात, पण मीच आणली हट्ट करून हीला घरात, आता मात्र खरंच दिवस गेले आणि आमच्या सौंच्या बुद्धीमत्तेचे दीवे घरभर पेटू लागले, एक दीवस तीने मागितली आमच्या ईस्टेटीची परात, मी मात्र बुडून गेलो दारू सोबत अंधारात, मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज, बाळा यालाच म्हणतात- बीन बुडाची आणि बीन घोडयाची वरात, म्हणूनच आपण रहावे आपल्या रीतीभातींच्या घरात आपल्या रीतीभातींच्या घरात.

वाचने 12205 वाचनखूण प्रतिक्रिया 56

पाषाणभेद Mon, 11/14/2011 - 00:30
राजकुमार>आपने जरूर उसको अपनी सुई चुभाइ होगी वर्ना हमारी प्यारी भाभीजान ऐसी हरकत कभी नही करती! अंगूर का दाना हूँ सुई ना चुभो देना सुई जो चुभोई तो रस टपकेगा जो रस टपकेगा तो किसमिस किसमिस किसमिस बन जाऊंगी

अभ्या.. Wed, 08/28/2013 - 09:09
लील्या काय कहर कविता लिहायाचास बे :-D:-D आधी दिवस काय जायचे मग लग्नाची हुरहुर काय लागायची :-D:-D भारीच ब्वा .... मिस ची होणार का आता मिसेस किसेस एवजी धुवा आता डिशेस :-D

In reply to by अभ्या..

चौकटराजा Wed, 08/28/2013 - 14:35
नव्याने फोटोशॉप शिकणार्‍या सारखे कवीराज लीलाधर यांचे झालेय ! दिवसजायचा लेअर व लग्नाचा लेअर यांची काहीतरी गडबड झाली.

दिवस कधी खोटे गेलेत का बोला, गेलेत ना आता? कामवाली ठेवा. घोड्यावर वरात जाऊं दे जोरात, हौसेनं तिला घेतलीये ना घरात ? तुम्ही खा किसमिस, दादा खातो साय आता हाय काय आणि नाय काय!

सूड Wed, 08/28/2013 - 14:01
ही कशी वाचली नाही कविता मी?? वाह वाह !! मिपावरही कलोनियल कझिन्स का काय म्हणतात ते आहेत याचा अभिमान वाटला. ;)

सस्नेह Wed, 08/28/2013 - 17:42
साखरपुड्याच्या सुपाचा बाऊल संपायच्या आतच रीतिभातींचे डेझर्ट पिऊन टाकलेस वाटतं !

सूड Fri, 06/27/2014 - 15:34
>>मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज इंटरेस्टिंग !! बाकी दिवस जाणं, मग लग्न होणं आणि परत रीतीभातींच्या घरात राहणं; चुकल्यासारखं वाटत नाहीये का काही?

In reply to by प्रचेतस

धन्या Fri, 06/27/2014 - 20:49
कविता काळजाला भिडली हे ठीक आहे. मात्र तुम्हाला कसे कळले की त्यांनी ही कविता मनापासून लिहिली आहे? कशावरुन त्यांच्या कलोनियल कझिनप्रमाणे र ला र आणि ट ला ट जुळवत नाहीत.

In reply to by धन्या

प्रचेतस Fri, 06/27/2014 - 21:13
कवी जे काही लिहितात ते मनापासूनच लिहितात. नाहीतर असले भावविभोर काव्य उमटणे कठीण. आणि त्यांचे कलोनियल कझिन तर अत्यंत प्रत्ययकारी काव्य लिहितात. त्याचा प्रत्यय तुम्हास अजिंठ्याला आणि किसनदेवांना देवगिरीवर आलाच आहे.

पैसा Sat, 06/28/2014 - 13:00
हौशी कवी बिचारे कविता जुळवतात आणि शिनेर मिपाकर त्यांचा बाजार उठवतात याबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वाटली. लिल्या, हौर आन्दो! डरनेका नै!

निखळानंद Mon, 06/30/2014 - 17:03
कवितेचे रसग्रहण मिपाकरांकडून शिकावे.. करूण रसाला छातीशी धरून भडभडून हसावे !

In reply to by सूड

निखळानंद Mon, 06/30/2014 - 19:13
मी काहीही लिहिले तरी कोणाला तरी पूर्वीचे आठवतंय काहीतरी.. चालायचंच्..मिसळपाव म्हणजे आठवणींचे गाठोडेच आहे नाहीतरी..

नाखु Fri, 02/26/2016 - 16:35
परात पुन्हा घरात (पक्षी वर) आली. अता तरी बुवा लिहिते होतील का? (प्रतीसाद सोडून अश्या प्रत्यय दर्शी कवीता)