माझे सत्याचे प्रयोग
लेखनप्रकार
टिपः सदर लेखातील हिरव्या रंगातील तिरपी अवतरणे मुस्त सारांश आहे. भाषांतर नाहि
मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस पोरबंदरला आजच्या दिवशी जन्माला आला. पुढे हा मुलगा शिकला, आफ्रिकेला गेला. तिथल्या वंशभेदाबरोबर लढला, आफ्रिकेत प्रसिद्धी मिळवून जेव्हा हा माणूस भारतात परतला तेव्हाही भारत पारतंत्र्यातच होता. टिळकांच्या नसण्याने संपूर्ण भारताला एकत्र बांधणार्या नेत्याची कमी होती. अश्यावेळी या माणसाने असं शस्त्र प्रत्येक भारतीयाच्या हातात दिलं जे वापरण्यासाठी इच्छाशक्ती सोडल्यास कोणत्याही कौशल्याची, शिक्षणाची अथवा नेत्याची गरज नव्हती. हा हा म्हणता संपुर्ण देशात हाच माणूस असा नेता बनला की त्याने उठा म्हणताच लाखो लोकं जीव तळहातावर घेऊन उभी राहत आणि त्याहून आश्चर्य म्हणजे त्याने थांबा म्हणताच चळवळ थांबे. त्याच्या ह्या असामान्य ताकदीने सगळे जग त्यांना महात्मा म्हणू लागले होते.
----------
"मला तुम्ही महात्मा म्हणता. आता यापुढील आयुष्यात मी जे काहि करेन ते सतत तुमच्यासमोर येत राहणार आहे. परंतू माझा भूतकाळ मी स्वतः सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहि. " माझे सत्याचे प्रयोग मधल्या शेवटच्या प्रकरणात हे वाक्य मी पाचेक वर्षांपूर्वी वाचलं आणि बापुंच्या प्रामाणिकपणासमोर मी हात जोडले. "माझे सत्याचे प्रयोग" हे माझं अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक. जर मला कोणी मी वाचलेल्या पुस्तकांपैकी उत्तम फिलॉसॉफिकल पुस्तक कोणते विचारले तर मी ह्याच पुस्तकाचे नाव देईन. पहिल्यांदा हे पुस्तक वाचल्यावर मी बराच भारावलो होतो; पण ते केवळ गांधी ह्या व्यक्तीने भारावणं होतं. मला हे पुस्तक इतकं आवडलं की ते पुनः पुन्हा वाचलं.. दरवेळी मला गांधीजी नव्याने भेटू लागले आणि हळू हळू मी गांधी या व्यक्तीपेक्षा गांधी ह्या विचाराने भारावलो गेलो.
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना या व्यक्तीला आपण केलेली चोरी, आपली वासना आदी गोष्टींवर जाहिर वाच्यता करताना जराहि संकोच वाटलेला दिसत नाहि. "मी पहिली चोरी केली तेव्हा खूप रडलो. आता काय करावे हे कळेना. शेवटी मी ठरवले की वडिलांना सत्य सांगायचे. " असे ठरवून वडीलांना सत्य सांगणारा मोहन हा आपल्यातलाच एक वाटतो.
तरूणपणीच्या चुकांबद्दल बोलताना "माझे वडील तिथे शेवटचे श्वास घेत होते. आणि मला पत्नीवरोबर शरीरव्यवहाराची उबळ आली. याची आता मला लाज वाटते परंतू तेव्हा ती भावना डोक्यावर स्वार होती. माझी पत्नी गर्भार होती. ती झोपली होती. पण तिची जराही पर्वा न करता मी तिला उठवले. पती इथे सुखासाठी तळमळत असताना तिने झोपणे मला प्रशस्त वाटले नाहि. मला सांगायला लाज वाटते की मी त्या परिस्थितीत तिला उठवले व तिला आलिंगन देणार इतक्यात दारावर टक्-टक झाली. मी प्रचंड रागवलो. दार उघडलं तर बाहेर नोकर होता. त्याला काहि बोलणार तोच त्याच्या डोळ्यातील भाव पाहून मी काय समजायचं ते समजलो. जेव्हा माझ्या वडिलांबरोबर मी हवा होतो तेव्हा मी काय हरत होतो ही बोच माझ्या मनाला तेव्हा पासून आहे" इतके स्वच्छ लिहिले आहे.
सध्या कोणता भारतातील नेता आपल्या चुका अश्या जाहिरपणे कबूल करेल? माझी अशी समजूत होती की "माय एक्सपरीमेंटस विथ ट्रुथ" हेच ते मुळ पुस्तक. पण लवकरच कळाले की "सत्यना प्रयोगो अथवा आत्मकथा" हे ते मुळ पुस्तक.
गेल्या महिन्यात एका मित्राकडून मुळे गुजराती कॉपी मिळवली. (गांघींची शैली आणि भाषांतरकाराची शैली यात बराच फरक वाटला. गांधीनी काहि घटना तिशय स्वच्छ व स्पष्टपणे लिहिल्या आहेत त्या भाषांतरात अलंकारात गुंफल्या आहेत). बापुंच्या स्वतःच्या शब्दातील पुस्तक वाचण्यात वेगळाच आनंद मिळाला. हे पुस्तक गुजरातीत लिहिणार्या, म्हणजेच आपला वाचकवर्ग केवळ "हाय-क्लास" मधे सिमीत न करता तळागाळात मी कसा होतो हे पोहोचवणार्या गांधींना नकळत वंदन केलं गेलं
आपलं पुर्वायुष्य सामान्य माणसांप्रमाणेच जगलेल्या, सामान्य माणसासारख्या चुका केलेल्या ह्या माणसाचा हा असामान्यत्त्वापर्यंतच्या प्रवासापुढे आपण नतमस्तक होतोच पण आपणही असेच काहि असामान्य करू शकतो याची नकळत स्फुर्ती मिळते. अनेक मोठ्या नेत्यांची चरित्रे-आत्मचरीत्रे मी वाचली आणि अश्या हिमालयाएवढ्या माणसांनी नेहेमीच प्रभावीत झालो आहे. परंतू बापूंच्या आत्मचरीत्राने स्वतःत लपलेल्या असामान्यत्त्वाचा अविष्कार घडवला. कदाचित हेच बापुंचं यश नाहि का?
====
ह्या पुस्तकावर लिहिण्यासारखं बरंच काहि आहे. जमल्यास व मिपाकरांची इच्छा असल्यास दोन भागातील लेख लिहायला आवडेल आजच्या दिवशीही महात्म्याबद्दल मिपावर होणारी अपमानास्पद विधाने वाचली. राग येण्यापेक्षा वाईट वाटले. पूर्वानुभवावरून वाद घालण्यात फायदा नाहि हेही जाणून आहे. तरी तमाम गांधीविरोधकांनी गांधींवर वाटेल तशी टिका करताना त्यांनी स्वतःच्या चुकांमधून केलेल हे सत्याचे प्रयोग जरूर वाचावेत अशी आग्रहाची विनंती.
बापूंच्या जन्मदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम!!
वाचने
20761
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
ऋषिकेश..
जरुर लिहा.
In reply to जरुर लिहा. by यशोधरा
जरूर लिही
ऋषी,
ऋषिकेशराव,
खरं सांगू,
ऋषिकेश,
In reply to ऋषिकेश, by बिपिन कार्यकर्ते
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सहमत by नंदन
+१
In reply to +१ by प्रियाली
++१
In reply to ऋषिकेश, by बिपिन कार्यकर्ते
असेच..
मराठी अनुवाद
In reply to मराठी अनुवाद by आनंद घारे
म्हणजे
In reply to मराठी अनुवाद by आनंद घारे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
In reply to मराठी अनुवाद by आनंद घारे
अरेच्च्या....
In reply to अरेच्च्या.... by धमाल मुलगा
अपील
जरूर लिही
मी फक्त
जरूर लिही
जरूर लिही
पुढचा भाग
सहमत
जरूर लिही
सावरकरांन
In reply to सावरकरांन by यशोधरा
+१
In reply to सावरकरांन by यशोधरा
+१
सावरकर गांधी आंबेडकर
टोचणी
चांगला लेख
गांधीजी
टिळक...
In reply to टिळक... by प्रभाकर पेठकर
एक संदर्भ मिळाला
In reply to एक संदर्भ मिळाला by ऋषिकेश
फ्रीडम ऍट
In reply to एक संदर्भ मिळाला by ऋषिकेश
गांधीजी...
>>तरीही
In reply to >>तरीही by यशोधरा
>> काँग्रेस
'माझे
पेठकर
धन्यवाद!
असे मी सुचविलेले नाही...
In reply to असे मी सुचविलेले नाही... by प्रभाकर पेठकर
हं
डावलले...
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.
सुरेख लेख....
अजून पुढे ...
अजुन काही हवे