मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खळबळ

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या तीर्थरूप वडिलांचे अकस्मात निधन झाले. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत आणि आत्मनिर्भर होते. त्यांच्या जाण्याने हरवल्यागत झालेली ही विकल मनोवस्था...................... ते समाधानाने भाग्यवंतासारखे अनंतात विलीन झाले. त्यांना सद्गती मिळेलच. त्यांची तत्परता, प्रमाणिकपणा, स्वावलंबन या आदर्श संस्कारांद्वारे ते आम्हा सर्व भावंडांत वास्तव्य करून असले तरी त्यांच्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत रितीच राहील......... मळभ खळे ना श्वास दाटले मेघांनी,…. खळबळले, ढवळल्या कथा पुनवेस उसवल्या लाटांनी अंदाज कसे चुकले बावरले ऋतू कोंडल्या वाऱ्यांनी आभाळ कडे कोसळले कढ झेलले पोरक्या हातांनी कोणास न कळले मरण जिंकले केंव्हा, … मावळले सण आवळल्या सावल्या कराल पाशांनी थरथरले नभ सहवास नि माया मूढ जाहली काया धावले जीव परतले रिते भिजवीत चंदनी छाया …………………… अज्ञात

वाचने 3028 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्रभाकर पेठकर गुरुवार, 11/28/2013 - 14:53
अज्ञातकुल, तुमच्या वडिलांना आदरपूर्वक श्रद्धांजली. ह्या सर्वातून एकेकाळी गेलो आहे. तुमची भावना, विशेषतः आयुष्यात अचानक निर्माण होणारी पोकळी अनुभवली आहे. आज गेली १७ वर्ष मनांत गाडलेली ,पितृछत्र हरपल्याची, भावना तुमच्या हळूवार शब्दांनी पुन्हा चाळवली गेली. ह्या कठीण प्रसंगास धीराने सामोरे जाण्यास ईश्वर तुम्हांस आणि तुमच्या कुटुंबियांस मनोबळ देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 11/28/2013 - 15:04
ह्या कठीण प्रसंगास धीराने सामोरे जाण्यास ईश्वर तुम्हांस आणि तुमच्या कुटुंबियांस मनोबळ देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

यशोधरा गुरुवार, 11/28/2013 - 18:31
अज्ञातकुल, तुमच्या वडिलांना आदरपूर्वक श्रद्धांजली. वडिलांचे छत्र हरपण्याचे दु:ख काय असते ह्याचा अनुभव घेतला आहे :(