मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॉल संस्कृति

बलि · · काथ्याकूट
सर्वप्रथम मला सामील करून घेतल्याबद्दल मिपा चे आभार. माझं पहिलं लेखन तुमच्यासमोर ठेवतो आहे . चूकभूल माफ असावी . काही दिवसांपूर्वी मी माझ्या फेसबुक च्या भिंतीवर एक चित्र प्रकाशित केले होते. त्यात एक गरीब स्त्री रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत होति. त्या चित्राचा आशय असा होता कि, " कृपया रस्त्यावर भाजी विकणाऱ्या लोकांबरोबर भाव कमी जास्त करू नका. ते आपल्या शेतातील माल कमी किमतीला विकतात. मॉल मध्ये खरेदी करू नका. शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजी विकत असतो. " ह्या चित्रावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. माझ्या मित्राबरोबर मी ह्या विषयी खूप वेळ गप्पा मारल्या . त्याचा सारांश असा , माझ्या मित्राला हे मान्य नव्हतं. त्याच्या म्हणण्यानुसार काही नामांकित मॉल चालवणाऱ्या संस्था भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतात आणि ते सुद्धा पिक यायच्या आधीच त्याचा बुकिंग करून ठेवतात. पण सगळ्याच शेतकऱ्यांना ह्याचा लाभ होत असावा का ? अगदी शहरातील भाजी विक्रेते सोडा, पण शहराबाहेरच्या रस्त्यांवर भाजी विकणारे नक्कीच शेतीमध्ये काम करणारे असतील आणि त्यांना जर फायदा होत असेल तर काय बिघडले ? आजच्या बाजारात दलालांचा सुळसुळाट आहे हे खरंय पण सगळेच धंदा म्हणून भाजी विकतात असेही नहि. त्याच्या म्हणण्यानुसार मोल्स मध्ये स्वस्त दरात भाजी मिळते म्हणून तिथून खरेदी करावं. ह्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती कि, २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? ( अर्थात पिज्जा मलादेखील आवडतो आणि इतर पिज्जा खाणार्यान्बद्दल मला काही आक्षेप नाही ). ह्या विषयावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची इच्छा झाली म्हणून हे लेखन करावा असं मनात आलं.

वाचने 35334 वाचनखूण प्रतिक्रिया 146

अग्निकोल्हा Wed, 10/16/2013 - 17:54
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ?
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणारे २-३ रुपयांचा विचार करत नाहित. सहा महिन्यातुन एखादा पिझ्झा खात असतिल तर गोष्ट निराळी...

परिंदा Wed, 10/16/2013 - 17:56
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? >> शेतकर्‍यांना रास्त भाव मिळायला पाहिजे हे मान्य! पण हे मॉल आणि मॉर्डन संस्कॄतीविषयी बोलणारे नेहमी पिझ्झाचेच उदाहरण का देतात? उद्या १० रु ची भाजी कोणी २० रुपयांना विकली तर योग्य आहे का? यावर २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी त्या अतिरिक्त १० रु चा विचार करावा का? किंवा महिना १०-१५ हजार कमावणार्‍यांनी त्या अतिरिक्त १० रु चा विचार करावा का? किंवा ६-७ हजारांची पेन्शन मिळणार्‍यांनी त्या अतिरिक्त १० रु चा विचार करावा का?

ग्रेटथिन्कर Wed, 10/16/2013 - 18:24
२० वर्षापुर्वी पुण्यातल्या मंडईत मारुती800मधून आलेल्या एक गोर्या घार्या बाईने अनुनासिक स्वरात भाजीवाल्या म्हातारीशी चाराण्याची कोथिंबीर १० पैश्याला दे म्हणून घासाघिस चालवली होती, तो प्रसंग आठवला . मॉल आणि भाजिविक्रेते दोघांकडून माल खरेदी करावा...

In reply to by ग्रेटथिन्कर

विजुभाऊ Wed, 10/16/2013 - 19:25
मारुती800मधून आलेल्या एक गोर्या घार्या बाईने अनुनासिक स्वरात भाजीवाल्या म्हातारीशी चाराण्याची कोथिंबीर १० पैश्याला दे म्हणून घासाघिस चालवली होती
गोरी घारी आणि सानुनासीक स्वर्ई पुण्यातील एका पेठेची आणि एक्स्टेन्डेड कोथरुड भागची व्यवच्छेदक लक्षणे समजायची का? भगवान परषुराम पहाताहेत हो वरुन...

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Wed, 10/16/2013 - 22:29
पळपुटे प्यारेश्वर, स्त्रिया आंजावर आहेत की नाहीत हा मुद्दा अलाहिदा आहे. वर वर्णिलेल्या एवंगुणविशिष्ट स्त्रियांबद्दलचे फेसिनेसन मराठी आंजावर वेळोवेळी बाहेर पडते हा मुख्य मुद्दा आहे. असे पळून जाऊन काय होणार? बी अ म्यान, करू नका लेखणीची तल्वार म्यान ;)

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय गुरुवार, 10/17/2013 - 10:36
वर वर्णिलेल्या एवंगुणविशिष्ट स्त्रियांबद्दलचे फेसिनेसन काही लोकांकडुन सगळ्याच माध्यमांतुन बाहेर पडते. त्यामुळे ...........

In reply to by ग्रेटथिन्कर

मृत्युन्जय गुरुवार, 10/17/2013 - 10:35
अगदी कालपरवाच मी चारचाकीत बसुन आलेल्या एका सावळ्या, काळ्या डोळ्यांच्या भसाड्या आवाजात बोलणार्‍या बाईला एक किलो बटाट्यावर कढीपत्ता फुकट द्या म्हणुन भांडणार्‍या बाईला बघितले तो प्रसंग आठवला.

धन्या Wed, 10/16/2013 - 18:42
माझ्या मते भाजी विकणार्‍यांकडून भाजी खरेदी करायला हवी. तीही एक दोन रुपयांसाठी घासाघीस न करता. आपल्या खिशातून एक दोन रुपये जास्त गेले तर आपल्याला फारसा फरक पडणार नसतो. परंतू त्या भाजी विकणार्‍यांना नक्की पडतो. मी सिंहगड रोडवरुन जिथून ऑफीसची बस पकडतो तिथे रस्त्याच्या बाजूला (हो, फुटपाथवरच) एक दहा पंधरा भाजीवाले बसतात. बसायला सिमेंटच्या गोणीचं कापड आणि समोरचा भाजीचा ढीग. काही भाजीवाले आता ओळखीचे झाल्यामुळे मोकळेपणाने बोलतात. त्या धंद्याचं गणित समजावून सांगतात. फारसं काही सुटत नाहीच. फक्त कुणा दुसर्‍याकडे राब राब राबायचे त्याच्याऐवजी हा स्वतःचा व्यवसाय ईतकंच. यातच बर्‍याच भानगडी असतात. ज्या एरीयात भाजी विकायची तिथले लोकल पुढारी "इथे बसायचंय ना?" असं धमकावत प्रत्येक "महोत्सवाला" वर्गणी गोळा करतात. कार्पोरेशनवाले पावत्या फाडतात. अशात त्यांचं कुणी एक दोन रुपयांसाठी घासाघिस करणारं गिर्‍हाईक पाहीलं की वाईट वाटतं.

In reply to by बॅटमॅन

धन्या Wed, 10/16/2013 - 18:57
छोटे व्यावसायिक बळीचे बकरे असतात लैवेळेस.
हेहे. हे सगळीकडेच होतं. उदा. दोन-तीनशे रुपयांचं लाईटबील थकलं की कनेक्शन तोडलं जातं. लाखांच्या थकबाक्या असणारे उदयोग मात्र वीज वापरतच असतात.
तस्मात अंमळ घासाघिशीकडे दुर्लक्ष केले तरी फार अडचण होऊ नये.
वर पिझ्झाचं उदाहरण खटकलं. पण खरंच पिझ्झाच्या चार छोटयाशा तुकडयांसाठी कमीत कमी दोनशे रुपये मोजणारे भाजीवाल्यांकडे केवळ दोन तीन रुपयांची घासाघीस करतात ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

In reply to by धन्या

बॅटमॅन Wed, 10/16/2013 - 19:02
पूर्ण सहमत आहे. संधी मिळेल तिथे बारगेनिङ्ग करणे हा तसेही आपला स्थायीभावच असतो. त्यात परत समोरचा छोटा भाजीवाला असला तर ही प्रवृत्ती उफाळून येते एकदम.

मुक्त विहारि Wed, 10/16/2013 - 18:57
आणि तसेही आमच्या डोंबिवलीत अद्याप आजू बाजूच्या खेड्यातून भाजी विकायले येते.तिथल्याच भाजावाल्यांकडून घेतो. आणि घासाघीसच्या बाबतीत म्हणाल तर, भाजीची प्रत महत्वाची.प्रती प्रमाणे दर असेल तर खरेदी करायची.तसे २/३ भाजीवाले मला ओळखतात आणि योग्य त्या दरानेच भाजी विकतात. शेवटी काय हो टाळी एका हाताने वाजत नाही.....

In reply to by मुक्त विहारि

शैलेन्द्र Wed, 10/16/2013 - 19:11
डोंबिवलीत भाजी घेताना आपलं एक तत्त्वं आहे, आगरी म्हातार्‍यांकडुन घ्यायची, शक्यतो भय्या टाळायचा.. भाजी चांगली मिळते, वजन शक्यतो नीट असतं आणि घरगुती असल्याने जास्त खतं/किटकनाशक मारलेले नसतात.

In reply to by मुक्त विहारि

धन्या Wed, 10/16/2013 - 19:20
चर्चेचा विषय भरकटतोय असं वाटतंय. चर्चा "भाजी मॉलमधून न घेता भाजीवाल्यांकडून घ्यावी" या विषयावर व्हावी असं धागाकर्त्याला अपेक्षित असावं. वरच्या दोन प्रतिसादांवरुन ही चर्चा "मराठी भाजीवाले आणि उत्तर भारतीय भाजीवाले" अशी भरकटेल असं दिसतंय.

In reply to by धन्या

बॅटमॅन Wed, 10/16/2013 - 19:22
तो आंग्ल नेटाचा नियम नैका? लै वेळ कुठलीही चर्चा चाल्ली की शेवटी कशीही हिट्लर अन नाझीपर्यंत येऊन थांबणारच. तसा मराठी नेटाचा नियमः लै वेळ कुठलीही चर्चा चाल्ली की शेवटी कशीही उत्तर भारतीयांपर्यंत येऊन थांबणारच.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Wed, 10/16/2013 - 19:36
लै वेळ कुठलीही चर्चा चाल्ली की शेवटी कशीही उत्तर भारतीयांपर्यंत येऊन थांबणारच." + १

In reply to by धन्या

बलि Wed, 10/16/2013 - 19:39
चर्चा "भाजी मॉलमधून न घेता भाजीवाल्यांकडून घ्यावी" या विषयावर व्हावी असं धागाकर्त्याला अपेक्षित असावं

In reply to by बलि

मुक्त विहारि Wed, 10/16/2013 - 19:57
आम्ही आपले जरा डीटेल मध्ये सांगातले तर लगेच उत्तर भारतीयांचा कैवार घेणारे पुढे आले की काय? मी आधीच म्हणालो की मी भाजी खरेदी आग्री माणसांकडून घेतो.(ह्याचाच अर्थ मी मॉल मधून घेत नाही.त्यातच हे पण सांगीतले की भैय्याकडून घेत नाही.तर काय बिघडले?) बरे आणि हे सगळे उप-प्रतिसादात आलेले मुद्दे आहेत.मुख्य प्रवाहातले नाहीत. महत्वाचे..... वरील सगळे टाइमपास म्हणून लिहीले आहे.मुद्दाम फार गहन विचार करू नका....पण मी मात्र जास्त विचार करूनच लिहीले आहे.....

In reply to by मुक्त विहारि

धन्या Wed, 10/16/2013 - 20:06
आम्ही आपले जरा डीटेल मध्ये सांगातले तर लगेच उत्तर भारतीयांचा कैवार घेणारे पुढे आले की काय?
हातावर पोट असणारे माणसं इथून तिथून सारखीच असतात. मी चार वर्षांपूर्वी उसगावात होतो तेव्हाची गोष्ट. आपल्याकडे ब्ल्यूप्रिंटवाले जोरात होते. मनात विचार यायचा, या उसगाववाल्यांनी जर ब्ल्यूप्रिंटवाल्यांसारखा विचार केला तर आपल्याला परतीचं विमान तरी पकडता येईल का. असो.

In reply to by धन्या

मुक्त विहारि Wed, 10/16/2013 - 20:22
आणि तो तुम्हीच छान व्यक्त केला आहे... "मनात विचार यायचा, या उसगाववाल्यांनी जर ब्ल्यूप्रिंटवाल्यांसारखा विचार केला तर आपल्याला परतीचं विमान तरी पकडता येईल का?" तुम्ही हा विचार केलात तर भैय्ये लोक... मराठी माणसांनाच बाहेर कसे काढता येईल ह्याचा विचार करतात. हाच विचारातला फरक आहे. अहो संत भूमी आहे आपली.माझ्या मनांत पण असेच विचार येणारच ना? पण संताच्याच डोक्यात काठी बसली तर त्या संताने प्रतिकार करायचा की मार खातच रहायचे? मला अद्याप ह्याचे उत्तर मिळालेले नाही?

In reply to by मुक्त विहारि

ग्रेटथिन्कर Wed, 10/16/2013 - 22:17
मुविच्या या मुद्द्याला अनुमोदन. मराठी माणसाने हाडाची काडं करायची आणि फायदा उपटायला 'बिहारी' कशाला?

हेच धोरण मी मार्केटयार्डात पाळतो. शेतकरीच विक्रेता असेल, तर भावात (फार) घासाघीस करायची नाही.पण फुलं आडत्यांकडुन घेणं आलं कि तोडातोडी करायचीच! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

मुक्त विहारि Wed, 10/16/2013 - 21:47
एकाला एक न्याय तर एकाला एक न्याय.... आता तुम्हीच असे वागताय तर आम्ही पण असेच वागायचे ठरवतो.. नाही म्हटले तरी आमचे गुरुजी बादशाही आहेत....

उपास Wed, 10/16/2013 - 20:06
आठवड्याच्या बाजारी (रविवारी) पाषाणात आजूबाजूच्या गांवातून (लव्हाळं वगैरे) भाजी येते पण ती आठवडाभर टिकतेच असं नाही. थोडं वेगळं मत - भाजी रस्त्यावरच्या विक्रेत्याकडून घेतली जाते पण काही भाजीविक्रेते/ फळवाले चलाखी करतातच, मॉल मधून भाजी घेत नसलो तरी तिथे चलाखी करण्याचं आणि आपली तिथे फसवणूक होतेय असं वाटायचं प्रमाण कमी आहे. जे आहे ते रोख ठोक, पाहिजे तर घ्या नाही तर नको. वाजवी आहे की नाही किंमतिला ते ग्राहकानेच ठरवायचं. पण मटकीमध्ये खडे न येणं, कोथींबीर चांगली मिळणं (चांगला दर्जा) जर जर मॉल मध्ये सहज होत असेल तर घेण्यास अडथळा नसावाच, शेतकर्‍याने/ भाजी विक्रेत्याने मालाचा दर्जा उंचवलाच पाहिजे, तो 'व्यवसाय' करतोय दान मागत नाहिये. मी भाजी वाल्याला नेहमी हटकून सांगतो की तुझ्याकडे चांगला माल मिळत असेल तर मी अजून गिर्हाईक पाठवेन ते खुषीने दोन पैसे जास्त देतिल पण माल चांगलाच हवा, फळांच्या बाबतित हे विशेष! जाता जात एक प्रश्न - आंब्याची पानं + झेंडू ह्याच तोरण पाडव्यांना, दसर्‍याला घराला बांधलं जातं, त्याची वाजवी किंमत काय? मुंबईत जे १५-२० रुपयांत मिळत तेच पुण्यात (पाषाण / बाणेर भागात) ८० कसं काय असू शकतं? कुणी गणित समजावून सांगेल का, असं असल्याने बरेच जण प्लास्टीकच्या तोरणाचा पर्याय (जे पर्यावरणासाठी चांगलच कदाचित!) वापरु लागणारच. पण तोरणाच्या बाबतित तरी (आणि तेच मिटर न पाडता चालवणार्‍या रिक्षाच्या बाबतही) आपली लुबाडणूक होतेय, असं वाटत राहातं.

In reply to by उपास

धन्या Wed, 10/16/2013 - 20:18
तुमचे दोन्ही मुद्दे योग्य आहेत. मालाच्या गुणवत्तेत तडजोड नकोच. अशावेळी पुढच्या भाजीच्या गाडीकडे जायचं. सगळेच बेईमान नसतात. दोन तीन वेळा एकाच भाजीविक्रेत्याकडून भाजी घेतली की आपण त्यांचे "रेगुलर कस्टंबर" होतो आणि चांगली भाजी तर मिळतेच परंतू घासाघिस न करताच चार पैसे कमी दयावे लागतात.
आंब्याची पानं + झेंडू ह्याच तोरण पाडव्यांना, दसर्‍याला घराला बांधलं जातं, त्याची वाजवी किंमत काय? मुंबईत जे १५-२० रुपयांत मिळत तेच पुण्यात (पाषाण / बाणेर भागात) ८० कसं काय असू शकतं? कुणी गणित समजावून सांगेल का
शहरी भाग सोडला की आंब्यांचा झाडांना तोटा नसतो. झेंडूची मात्र निगराणी करावी लागते. परंतू त्याचे कुणी "सिझन" आहे म्हणून गैरफायदा घेत असेल तर अशा वेळी त्या चिजा खरेदी न करणं हेच उत्तम. खुशाल प्लास्टिकचं तोरण दाराला लावावं अशा मताचा मी आहे.

In reply to by धन्या

मुक्त विहारि Wed, 10/16/2013 - 20:52
१. त्याच दिवशी तोरण बांधायलाच हवे असा काही नियम नाही आहे.तुम्ही थोडी स्वस्त दरांत पाने-फुले मिळायला लागली की पण तोरण बांधू शकता. २. तुमच्या आसपास जी कुठली झाडे असतील तर त्याची पाने आणि जमिनीवर पडलेली फुले वापरलीत तरी चालेल. मी वलसाड, गुजरातला असतांना आंब्याची पाने आणि सदाफुलीची फुले वापरून तोरण करत होतो.दोन्ही फुकट मिळत होते. लुबाडणूक आणि दादागिरी सहन करण्याच्या प्रमाणात वाढते....

In reply to by उपास

बलि Wed, 10/16/2013 - 23:24
जे आहे ते रोख ठोक, पाहिजे तर घ्या नाही तर नको.
रस्त्यावरचा भाजी विक्रेता / ती कुठे आपल्या हाताला धरून पकडून ठेवतात . आवडली भाजी तर घ्यायची नाहीतर पुढचा ठेला . नाही का !!
मी भाजी वाल्याला नेहमी हटकून सांगतो की तुझ्याकडे चांगला माल मिळत असेल तर मी अजून गिर्हाईक पाठवेन ते खुषीने दोन पैसे जास्त देतिल
स्वागत असो

In reply to by उपास

सुमीत भातखंडे गुरुवार, 10/17/2013 - 11:08
हा हा...सहमत आहे. तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे हे रिक्षावाल्यांच्या बाबतीतही म्हणता येईल. पुण्यात मिटरची पद्धत आहे, पण पिंपरी चिंचवड मधे मात्र वाट्टेल ते सांगतात. ३० रु. च्या खाली नाहीच काही. मिटर-बिटर हा प्रकारच नाही.

भाते Wed, 10/16/2013 - 20:26
उत्तर भारतीयांच्या कैवाऱ्यांना मारा xxवर. मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त द्यायला माझी अजिबात ना नाही. पण त्या भैयाला तेवढेसुद्धा मिळता कामा नये. किमान डोंबिवलीत तरी मराठी माणसाकडुन फसवणुक होत नाही. त्यामुळे दोन चार रुपये जास्त गेले तरी चांगल्या मालाची (भाज्यांची) खात्री असते. योग्य वेळी घासाघिस करावीच लागते. वैयाक्तिक अनुभव.

धन्या Wed, 10/16/2013 - 20:40
उत्तर भारतीयांच्या कैवाऱ्यांना मारा xxवर.
उत्तर भारतियांचा कैवार कुणी आणि कसा घेतला आहे ते सांगू शकाल का? सगळेच उत्तर भारतीय त्यांच्याबरोबर केल्या जाणार्‍या कुठल्याही व्यवहारात फसवणूकच करतात असं तुम्ही ठामपणाने म्हणू शकाल का? तसेच आजवर तुम्हाला कधीच मराठी व्यक्तीने फसवले नाही असेही तुम्ही ठामपणाने म्हणू शकाल का? आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे. आपण समोरच्या व्यक्तीला कुव्यक्तीलाक्याटेगरीत टाकल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. मी फक्त चर्चा "मराठी भाजी विक्रेते आणि उत्तर भारतीय भाजी विक्रेते" अशी नाही हे निदर्शनास आणले तर मी तुमच्या नजरेत लगेच उत्तर भारतीयांचा कैवारी झालो का?
मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त द्यायला माझी अजिबात ना नाही.
समजा तुम्ही मंडईत गेलात, एक मराठी भाजीवाला आणि एक उत्तर भारतीय भाजीवाला बाजूबाजूला बसले आहेत. मराठी भाजीवाल्याकडे असलेली भाजी चांगल्या प्रतीची नाही. उत्तर भारतीय भाजी विक्रेत्याकडे चांगल्या प्रतीची भाजी आहे. दोन्हीकडे भाजीचा भाव सारखा आहे. तरीही तुम्ही मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त देऊण त्याच्याकडूनच भाजी घ्याल का?
किमान डोंबिवलीत तरी मराठी माणसाकडुन फसवणुक होत नाही. त्यामुळे दोन चार रुपये जास्त गेले तरी चांगल्या मालाची (भाज्यांची) खात्री असते.
ही खरंच चांगली गोष्ट आहे. परंतू तरीही मराठी माणसाकडून फसवणूक होत नाही किंवा उत्तर भारतीयांकडून नेहमी फसवणूकच होते असे सरसकटीकरण नाही होऊ शकत.

In reply to by धन्या

मुक्त विहारि Wed, 10/16/2013 - 21:17
@ धन्या, माझी बोलतीच बंद करून टाकली की राव.... तुमच्या ह्या प्रतिसादाला आमचा पांढरा झेंडा.१००% सहमत.. विचारांना, विचारांच्या सहाय्यानेच प्रतिकार केलेला उत्तम.अशी आमची किंचीत विचारसरणी आहे.

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन Wed, 10/16/2013 - 22:59
अहो त्यात काय एवढे? चूक लक्षात आल्यावर मोठ्या मनाने कबूल करण्यालाही **त दम लागतो. नैतर चूक असूनही कबूल न करता उलट ट्रोलिंग करणारे ट्रोलभैरव कमी नैत.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Wed, 10/16/2013 - 23:12
पुढेही माझ्या अशाच चूका झाल्या तर लक्षांत आणून द्या. मी चूक करणारच नाही, असे भाबडे वचन देवू शकत नाही.मी पण माणूस आहे. पण शक्यतो चूक होणार नाही ह्याची काळजी मात्र घेईन..

In reply to by धन्या

भाते Fri, 10/18/2013 - 20:31
मला तुम्हाला अजिबात दुखावायचे नव्हते. आपल्या विचारांशी मी सहमत आहे. बापरे, मध्यमवर्गीय असल्याने दोन चार रुपये वाचवण्यासंबंधी एक वाक्य टाकले तर धाग्याने थेट शंभरी गाठली. यापुढे प्रतिसाद देताना थोडासा विचार करायला लागणार अस दिसतंय.

पैसा Wed, 10/16/2013 - 22:25
शेती, भाजीपाला करणारे स्वतः रस्त्याकडेला बसून क्वचितच भाजी विकतात. त्यांना तेवढ्या वेळात आणखी काहीतरी काम असतं. लहान भाजी विक्रेते घाऊक बाजारातून भाजी घेऊनच विकतात. स्वतः पिकवलेली भाजी स्वतः विकणारे अगदी कमी प्रमाणात असावेत. मॉलवाले मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर जास्त असते. लहान भाजीविक्रेते बहुशः असंघटित असतात. आणि या साखळीतला शेवटचा दुवा म्हणजे खरे शेतकरी तर सर्वात वाईट परिस्थितीत असतात. ना त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर, ना आणि कसली साधने. त्यांनी त्यांच्या उत्पादनाचा बेसिक भाव वाढवून मागितला तर सगळ्याच बाजूंनी ओरडा होतो. पण जेव्हा त्यांना भाव २ रुपयांनी वाढवून मिळतो तेव्हा मधले दलाल आपल्याला ५ रुपये जास्त घेऊन माल देतात. म्हणजे कोणत्यातरी स्वरूपात दलालांना जाणारे पैसे तुम्ही चुकवू शकत नाही. दलालांना टाळायचे असेल तर स्वतः भाजी पिकवणे हा एक उपाय आहे. किंवा मग शेतकरी सहकारी संघटनांकडून भाजीपाला घेणे हा एक पर्याय चांगला आहे. अन्यथा जिथे भाजीपाला पिकवला जातो तिथे म्हणजे शेतमळ्यात जाऊन घेता येत असेल तर अति उत्तम! म्हणजे सगळे पैसे त्या शेतकर्‍याला मिळतील. २/३ रुपयांचा विचार करावा का? जरूर करावा. कारण रोजचे ३ रुपये म्हटले तर महिन्याचे ९० होतात!

In reply to by पैसा

बलि Wed, 10/16/2013 - 23:31
२/३ रुपयांचा विचार जरूर करावा कारण ते आपल्या कष्टाचे आहेत. पण जर मॉल मध्ये मिळणाऱ्या क्वालिटी चे उत्पादन रस्त्यावरचा भाजीवाला देत असेल तर घासाघीस करू नये असा मला वाटता . शिवाय रस्त्यावरून चालत जाता जाता भाजी घेत येऊ शकते . ९० वाचवण्यासाठी मॉल पर्यंत जाण्यासाठी लागणारे इंधन का घालवावे . हं अगदी मॉल घराच्या जवळ असेल आणि तुम्ही चालत जात असाल तर आमची काही हरकत नाही

In reply to by पैसा

आदूबाळ गुरुवार, 10/17/2013 - 01:50
जास्त व्यापक अर्थाने हा सगळा प्रकार "रिलेटिव बार्गेनिंग पॉवर"चाच आहे. पणनबाजूला शेतीव्यवसाय कधी संघटित झाला नाही (होऊ दिला नाही?) म्हणून एकांडे विक्रीप्रयत्न करणारा शेतकरी नेहेमी दाबलाच जातो. (आठवा: "लाल चिखल") यामुळेच आडते, कृषि उत्पन्न बाजार समिती असले मध्यस्थ फोफावतात, माजतात आणि कांद्याच्या साठेबाजीसारखे प्रकार करतात. थेट शेतकर्‍यांकडून माल घेऊ पहाणार्‍या वॉलमार्टसारख्यांना यशस्वीपणे थोपवून धरतात. जिथे शेतकरी संघटित झाला तिथे सुबत्ता आली - कारण त्यांची बार्गेनिंग पॉवर मध्यस्थांच्या तुलनेत वाढली. उदा. आणंद मिल्क युनियन लि. (अमूल). . एक उत्सुकता आहे - वर ज्यांनी ज्यांनी "आम्ही थेट शेतकर्‍यांकडून भाजी घेतो" वगैरे म्हटलं आहे त्यांना प्रश्नः काही दिवसांपूर्वी कृत्रिमरीत्या कांद्याचे भाव फुगवले गेले. तेव्हा या शेतकरी विक्रेत्यांनी या नेहेमीच्या गिर्‍हाईकांना मूळ (कमी) भावात कांदा विकला, का फुगवलेल्या भावात?

In reply to by आदूबाळ

पैसा गुरुवार, 10/17/2013 - 09:26
वाढीव किंमतींचा फायदा नेहमीच मधल्या लोकांच्या घशात गेला आहे. २ उदाहरणे देते. गोव्यात कांदे पिकत नाहीत तर बेळगावकडून येतात. मागच्या वेळी कांदे ४० रुपये किलो झाले तेव्हा मी बेळगावला गेले होते. तिथल्या मार्केटमधे त्याच दिवशी कांदे २५ रुपये किलो होते. आता कांदे ६० रुपयांवर गेले तर गोव्यातील बागायतदार सहकारी संस्थेच्या दुकांनातून ३५ रुपये किलो दराने भरपूर कांदे उपलब्ध होते. ही अतिशय उत्तम रीत्या चालवली गेलेली सहकारी संस्था आहे. ते घाऊक मार्केटमधून माल घेऊन अगदी थोडा नफा घेऊन ग्राहकांना देतात. कांदे ३५ रुपयांनी विकूनही त्यांना थोडासा फायदा होता, तर मधले २५ रुपये कोणाच्या घशात गेले? भाजीपाला, दूध, अन्नधान्य यांच्या शेतकर्‍यांना मिळणार्‍या आधारभूत किंमती आणि प्रत्यक्षात आपण विक्रेत्याला देत असलेल्या किंमती यातली तफावत बघून डोळे पांढरे होतात. भाजीपाला आणि दूध हा नाशिवंत माल आहे आणि आवश्यक सुद्धा. त्यामुळे त्यात साठेबाजीला वाव नसावा. पण अन्नधान्याच्या भयंकर वाढलेल्या किंमतीत कमॉडिटी मार्केट आणि नफेखोर लोकांचा मोठाच हात आहे.

In reply to by आदूबाळ

नितिन थत्ते गुरुवार, 10/17/2013 - 14:04
>>>>जिथे शेतकरी संघटित झाला तिथे सुबत्ता आली - कारण त्यांची बार्गेनिंग पॉवर मध्यस्थांच्या तुलनेत वाढली. उदा. आणंद मिल्क युनियन लि. (अमूल). थोडीशी दुरुस्ती.... अमूलबाबत नुसते शेतकर्‍यांनी संघटित होऊन हे घडलेले नाही. आपले प्रायमरी उत्पादन "अ‍ॅज इज व्हेअर इज" बेसिसवर न विकता, ग्राहकोपयोगी स्वरूपात "स्वतःच्या संस्थेमार्फत रूपांतरित करून" विकायची व्यवस्था केल्यामुळे सुबत्ता आली. भाव मिळत नाही याचे दु:ख असलेले शेतकरी बहुतांशी "अ‍ॅज इज व्हेअर इज"* बेसिसवर माल विकतात. त्यांना भाव कमीच* मिळतो. हीच गोष्ट इतर प्रायमरी उत्पादनांबाबतीतही (फळे, फुले, कापूस, इतकेच काय खनिज उत्पादनांबाबतही) सत्य आहे. *इफ आय अ‍ॅम नॉट राँग भात सुद्धा तांदूळ काढून पॉलिश करून विकत नाहीत. **अमूल आपल्याकडची सरप्लस स्किम्ड मिल्क पावडर इतरांना घाऊकमध्ये विकतात तेव्हा खूप कमी भावानेच विकावी लागते.

In reply to by नितिन थत्ते

+१ कच्चा माल नेह्मीच कमी किंमतीत विकला जातो. काहितरी "व्हल्यू अ‍ॅडिशन" करून कच्च्चा माल गिर्‍हाईकाला ताबडतोप वापरता येण्याजोगा बनवून मग विकला तर त्याची किंमत अनेक पटीनी वाढू शकते. नाहितर ती व्हल्यू अ‍ॅडिशन करणारे दलाल मधे येऊन फायद्याचा मोठा हिस्सा स्वतःच्या खिशात टाकतात ही व्यापारातील वस्तूस्थिती आहे.

रेवती गुरुवार, 10/17/2013 - 01:09
फार्फार पूर्वी असं घडत होतं का आजही घडतय ते म्हैत नै, पण आमच्या घराजवळच्या मॉलात (आता तो मॉल तरी तिथं आहे का हे माहित नाही) रात्रीच्यावेळी बंद होताना जी पालेभाजी कुजून वाया जाणार्‍या प्रकारात्ली असेल ती एकेक दोन दोन रुपयांना विकत असत. मग कमी उत्पन्न गटातील नागरिक ती घेण्यासाठी गर्दी करत. आमच्या घरकामाच्या बाईंना डॉक्टरांनी नुसते मटन खाऊ नका, रोज थोडीतरी पालेभाजी खात जावा असे सांगितले. मग यांना कोणीतरी सांगितले की मॉलमध्ये जाऊन रात्री भाजी आणली तर परवडू शकेल. ते त्या सांगत होत्या. त्यावेळी तरी मॉलातल्या भाजीचा उपयोग झाल्यासारखेच वाटले. बाकी आमच्या ठरलेल्या भाजीवाले काकांची हाक ऐकू आली की आम्ही जाऊन भाजी घेऊन यायचो. त्यांना अमूक एक भाजी आणावयास साम्गितल्यास तशी आणत असत. नैतर मंडई आहेच!

चौकटराजा गुरुवार, 10/17/2013 - 06:23
गेल्या चार वर्षातील अन्नधान्य व भाजीपाला व दूध याच्यातील भाव वाढ पहाता एकतर ही भाववाढ नवश्रीमंताच्या वाढत्या खरेदी क्षमते मुळे झालेली आहे किंवा भारताची शेतीमालाची निर्यात वाढलेली आहे व परिणामी येथील पुरवठा कमी झालेला आहे. हे जर काहीच नसेल तर शेतकरी अधिक महत्वाकांक्षी झालेला आहे.असेच याचे उत्तर आहे एवढी भाववाढ होऊनही शेतकरी जर आपले रडगाणे पुढे चालूच ठेवणार असतील तर आम्ही म्हणू श्रीमंत होण्याची आकांक्षा असणे स्वाभाविक आहे पण मग काहीतरी करा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचा. ते शेतकरी कधीच करणार नाहीत कधी करू शकणार नाहीत.

डोंबिवलीचे नाव आले म्हणून खरडतो मोल मध्ये भाजी चा दर्जाबाबत निदान परदेशात तरी जास्त लक्ष द्यावे लागत नाही. पण भय्ये भाज्या विकतांना वाट्टेल तो मार्ग वापरून पैसा कमवण्याच्या मागे असतात. गावाला पैसा पाठवायचा असतो मात्र आगरी समाज परंपरागत धंदा असल्याने निष्ठेने करतो हे सत्य आहे मात्र डोंबिवलीत अनेक पिढ्या राहिलेल्या दक्षिणात्य समाज विशेतः केरळी व तमिळ , कर्नाटकी समाजाची खानपान सेवा डोंबिवलीत अव्वल आहे , तेव्हा उगाच परप्रांतीय म्हणून डोंबिवलीकर तरी नाकाने कांदे सोलत नाही मुळात भारतात भाजी ताजी घेणे अपेक्षित असल्याने मंडई मध्ये खरेदी करण्यास वेगळीच मजा आहे , तर भाज्या कापून व्यवस्थित वेष्टनात गुंडाळून मॉल मध्ये मिळतात. येत्या काळात भाजीवाल्यांना भाज्यांचा दर्जा राखावा लागणार आहे , रेल्वे नजीकच्या गटारांतील सांडपाण्यावर भाज्या पिकवून त्या विकणारे भाजीवाले पहिले आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

मुक्त विहारि गुरुवार, 10/17/2013 - 09:39
१००% सत्य... (बाय द वे... खवट नारळ परदेशातील मॉल मध्ये बदलून मिळतो काय? आमचा किराणी दुकानदार बदलून देतो. मागच्या वर्षी तर त्याने खराब निघालेले ४/५ बटाटे पण बदलून दिले.)

In reply to by निनाद मुक्काम …

सुबोध खरे गुरुवार, 10/17/2013 - 11:00
शेतकऱ्यांच्या शेतात पण शेणखत आणि सोनखत च वापरले जाते. शहरातील सांडपाण्यात पिकवलेल्या भाज्या जास्त प्रदूषित असतात हा दावा फोल होता असे वर्तमानपत्रात वाचल्याचे आठवते. शेतात पिकवलेल्या भाज्याठी तितकीच प्रदूषित रसायने( किटक नाशके) आढळून आली होती.भाजीपाल्याला कीड लागू नये म्हणून शेतकरी भरमसाट कीटकनाशके फवारताना आढळले आहेत. त्यामुळे कोणतीही भाजी हि स्वच्छ धुवूनच घ्यावी. (भारतात ओरगानिक म्हणून विकलेली ५० टक्के उत्पादने खरोखर ओरगानिक नव्हती असे आढळले.)

बाळ सप्रे गुरुवार, 10/17/2013 - 10:17
जे मॉलमध्ये स्वस्त आहे ते मॉलमध्ये घ्यावे. जे किरकोळ विक्रेत्याकडे स्वस्त आहे ते तिथे घ्यावे.. २-४ रु फरक असेल तेव्हा येण्याजाण्याचा वेळ पैसा याचाही विचार करावा.. पण तो गरीब आहे म्हणून त्याच्याकडून घ्या वगैरे पटत नाही.. समाजसेवा आणि आपला खर्चाचा ताळ्मेळ वेगळा ठेवावा.. किरकोळ भाजी विक्रेत्यंकडुन भाजी घ्यावी पण शक्यत मंडईसारख्या ठिकाणी घ्यावी.. कारण एकीकडे आपणच रस्त्यावरील विक्रेते /अतिक्रमण याविषयी बोंब मारतो.. त्यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांकडे काहिही विकत घेउन त्यांना प्रोत्साहन देउ नये असे वाटते..

सुनील गुरुवार, 10/17/2013 - 10:25
चर्चा फक्त भाजीपुरतीच मर्यादीत आहे की किराणा आणि अन्य गोष्टीदेखिल चर्चेच्या आवाक्यात आहेत?

नुमविय गुरुवार, 10/17/2013 - 10:29
मला एक नेहमी न सुटलेला कोड आहे...कि आपण एखादा माणूस थोडे पैसे वाचवत असेल तर त्याला आपण वाईट का ठरवतो...विशेष करून तेव्हा जेव्हा तो खूप पैसे कमवत असतो...मी त्या मारुती ८०० वाल्या काकुंच उदाहरण परत घेतो... अरे त्यांनी किंवा त्यांच्या नवर्यानी कष्ट करून पैसे कमावला असेल ..ते जर पैसे वाचवत असतील तर तुमच्या पोटात का दुखत..... मी जे भाजीवाले बघितले आहेत विशेषतः शहरातले ते तर मला बिल्कुनच बिचारे वैगरेइ वाटत नाहीत... माझ्या घराच्या जवळ ( चंदन नगरला ) एक सकाळी बजार भरतो रोज...तिकडे आजुबौजुच्य गावातले शेतकरी भाज्या घेऊन येतात...विमाननगर आणि आसपासचे सर्व छोटे वीकरेते तिथून सकाळी भाजी आणतात आणि १००% नफ्यावर विकतात..मी हे स्वतः खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण मी हे पडताळून बघितले आहे.. आणि त्यांना मी गरीब म्हणावे का? मी पैसे कमावतो ते कष्ट करून कमावतो आणि मी जर थोडे पैसे वाचवायला गेलो तर लगेच "जर गरीबांचा विचार करा" अशी आवई का उठवली जाते... शहरामध्ये तरी भाजीवाले आणि शेतकरी हे नक्कीच दोन वेगळे group आहेत

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/17/2013 - 11:18
२-३ रुपयांच्या भाजीवर करोडोंची चर्चा करून धाग्याची शंभरी गाठण्यास हात लावल्याबद्दल मिपाकरांचे लै लै अब्बिणंदण ! ;) हा आम्चा या धाग्याचा ट्यार्पी वाडवायचा क्शीण प्रय्न्त हाय असा कोना वाटलं तेला आमी जबाब्दार न्हाय बर्का. :) (आता पळा... धाग्याच्या व्दिशतकाची बेगमी झाली )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि गुरुवार, 10/17/2013 - 11:24
चर्चा निखळ होत आहे हे मह्त्वाचे... आणि तसाही हा धागा " काथ्थ्या कुटा"त मोडत असल्याने... चालू द्या...

In reply to by मुक्त विहारि

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/17/2013 - 11:28
जरा गम्मत केली हो.... हघ्या. (बर्‍याच स्मायल्या टाकल्यायत ना !) बाकी कोणतिही गैरवाजवी उधळपट्टी मग ती पैसेवाल्याची असो की बिनपैसेवाल्याची मला गैरच वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि गुरुवार, 10/17/2013 - 11:49
"कोणतिही गैरवाजवी उधळपट्टी मग ती पैसेवाल्याची असो की बिनपैसेवाल्याची मला गैरच वाटते." बॅटमन आणि धन्या यांची क्षमा मागून,,, थोडे अवांतर... खरे तर भाज्यांचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवायला तुम्ही आणि आम्हीच जबाबदार आहोत. एका पुस्तकांत एक किस्सा वाचला होता.बहुदा "माझे नांव भैरप्पा" ह्या पुस्तकात असेल. एक परप्रांतीय बाई गुजरात मध्ये रहायला जाते.दुसर्‍या दिवशी ती भाजीवाल्या कडून भाजीवाला जो काही दर लावेल त्या प्रमाणे भाजी खरेदी करते.भाजीवाला तोच दर त्या दिवशी ठेवतो. दुसर्‍या दिवशी ह्या गुजराथी बायका तिला भेटतात आणि समजावतात.भाजीवाल्याची सद्दी संपते. माझा खरा किस्सा.... मी त्यावेळी वलसाडला एका छोट्या गावात होतो.जेमतेम ४० घरे होती.तिथे माझ्या घरी एक काम करणारी यायची,तिने २० रु.+ जेवण असे सांगीतल.मी म्हणालो समजा जेवण नाही दिले तर. म्हणाली ५० रु. मग मी ५० रु.द्यायचे नक्की केले. दुसर्‍या दिवशी मला सरपंचाकडून बोलावणे आले. की २० रु. दर असतांना तुम्ही ५० रु. दर का ठरवलांत? मी म्हणालो , "माझी काही शेती वाडी नाही.त्यामुळे अन्नाच्या जागी मी ५० रु. दिले." इतर लोकांशी चर्चा झाली त्या बाईच्या वतीने पण तिचा नवरा बोलला.पैशांची अडचण आहे म्हणाला. सरपंचाने तिथल्या तिथे निर्णय दिला.तुम्ही ५० रु. देवू शकता. ज्या दिवशी अशा गोष्टी शहरांत होतील तो सुदिन....

In reply to by मालोजीराव

मृत्युन्जय गुरुवार, 10/17/2013 - 11:41
पिझ्झा घेताना ऑर्डर घेणाराच ऑफर्सचा भडिमार करत असतो: लार्जे पिझ्झा घेतलात, मिडियम पिझ्झा वर ५०% ऑफ आहे. देउ का? दून्ही घेतलेत? वावा. कॉल्ड ड्रि़क १९ रुपयात मिळेल. देउ का? तिन्ही घेतलेत वावा लावा केक ५९ ऐवजी ५४ रुपयात. देउ का? तुमचे भाजीवाले म्हणतात का की एक किले बटाटे घेतलेत तर कांदे ६० च्या ऐवजी ५० म्हणुन. :) टेल टेल मालोजीराव टेल. बिच्चार्‍या सावळ्या, काळ्या डोळ्यांच्या, भसाड्या आवाजात बोलणार्‍या एक किलो सोने अंगावर घालणार्‍या बायांना २ रुपयांच्या कढीपत्त्यासाठी घासाघीस करायला लावतात हे भाजीवाले ;)

In reply to by मृत्युन्जय

मालोजीराव गुरुवार, 10/17/2013 - 12:36
बरुबरे… सर्व भाजीविक्रेत्यांनी पिंपळे सौदागर, औंध,बाणेर,कोरेगाव पार्क अश्या भागात धंदा शिफ्ट करावा, तिकडे घासाघीस फार कमी होते किंवा होतंच नाही ;)

In reply to by मालोजीराव

क्रेझी गुरुवार, 10/17/2013 - 11:55
+१ मी तर हल्ली मॉलमधे, कपड्यांच्या खरेदीला वगैरे निर्लज्जपणे 'डिस्काउंट द्या' असं म्हणायला सुरूवात केली आहे! काय करणार आपण तरी, पेट्रोलमुळे जवळपास सगळ्या गोष्टींचे भाव दर दिवसाआड वाढत आहेत पण माझा पगार नाही नं तसा वाढत त्यामुळे हे करायचंच :)

नेत्रेश गुरुवार, 10/17/2013 - 11:43
विश्वासच बसत नाही येवढे सगळे लोक फुटपाथ / रस्त्यावरच्या भाजीवाल्यांना पाठिंबा देतान पाहुन. अशा लोकांमुळेच सगळे फुटपाथ आणि रस्ते भाजीवाले आणि इतर फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. लोकांना चालायला ना फुटपाथची शील्लक ना रस्ता. वर त्या भाजीवाल्यांनी उरलेली, कुसलेली भाजी तीथेच टाकून रस्त्याचा उकीरडा केला कींवा नाले भरून टाकल्यामुळे रोगराइ पसरली की पालीकेला शिव्या द्यायला तयार. भाजीवर सावलीसाठी शेड काढायला फुटपाथ फोडून ठेवले, रस्त्यावर खड्डे पाडले, मोठाले दगड आणून ठेवले आणी त्याला धडकून माणसे, दुचाकीस्वार पडले तरी शीव्या अतीक्रमण विभागाला, की पैसे खाउन दुर्लक्ष केले. सगळा दोष दुसर्यांचा. आपण फक्त २-४ रुपयांसाठी घासाघीस न करणार मोठे उदार कर्णाचे अवतार.

In reply to by नेत्रेश

शैलेन्द्र गुरुवार, 10/17/2013 - 13:27
व्यवस्थेचा थोडा अभ्यास केलात तर तुमच्या म्हणण्यातला फोलपणा तुम्हाला कळेल. भाजीपाला, दुध, पेपर, फुलं-हार हे "कच्चा धंदा" या प्रकारात मोडतात. या प्रकारात आजचा माल आजच विकावा लागतो. रोज काम "करावच" लागत. आज कंटाळा आला, पाहुणे आलेत, बायकोला बरं नाही, मुलाला लस टोचायला न्यायचय, अगदी स्वतः आजारी आहोत वगैरे कारणांनी धंदा बंद करता येत नाही. या धंद्यात बांधिलकी प्रचंड असते आणि भांडवल-नफा कमी. निव्वळ ढोर मेहनत करुन लोक काही पैसे गाठीला बांधतात आणि मग मजुर ठेवुन हा धंदा चालु ठेवतात किंवा दुसरा भांडवली धंदा शोधतात. पुण्याचं उदाहरण घ्या, दुकानाच्या गाळ्याची किम्मत कमित कमी २५ लाख आहे- समजा मी गाळा घेवुन भाजीच दुकान टाकल, माझ्याकडे माझे लॉयल २०० गिर्‍हाइक(कुटुंब) आहेत, प्रत्येकजण रोज एक किलो भाजी खातो. रोजची विक्री २०० किलो. नास-तुस सोडून किलो मागे जास्तीतजास्त १० रुपये फायदा पकडा- म्हणजे २००० रुपये फायदा. आता रोजचा खर्च काढा- वाहतुक - २०० रुपये- विज/ पाणी- २०० रुपये- हमाली- मजुरी - ३०० रुपये- इतर खर्च २०० रुपये- हे वगळता महिन्याला कमाई जास्तीत जास्त ३०००० रुपये- २५०००० रुपये १०% व्याजाने बँकेत ठेवले तर मिळतात २५००० रुपये महिना, म्हणजे सगळी दगदग करायची महिना ५००० रुपयांसाठी? एक गोष्ट मान्य करा की भारतात हे धंदे रस्त्यावरच चालणार, या सगळ्या धंद्यांना समाजसेवेचा दर्जा द्या. समस्या मान्य केली कि उपाय करणे सोपे होते.

In reply to by शैलेन्द्र

बाळ सप्रे गुरुवार, 10/17/2013 - 13:34
एक गोष्ट मान्य करा की भारतात हे धंदे रस्त्यावरच चालणार
अशी विचारसरणी असल्यावर खरच रस्त्यावरच चालणार सगळे धंदे !!! कमीत कमी किंवा गुंतवणुक न करता नफा मिळाला पाहिजे असेल तर असच होत रहाणार..

In reply to by बाळ सप्रे

शैलेन्द्र गुरुवार, 10/17/2013 - 14:58
"कमीत कमी किंवा गुंतवणुक न करता नफा मिळाला पाहिजे असेल तर असच होत रहाणार.. " हे सगळे धंदे (काही प्रमाणात दुधाचा वगळता) कमी भांडवलात करता येतात/ कमी नफा देतात. भांडवल गुंतवुन करायचा तर नफा वाढवायला लागेल. १००-१२५ रुपयात तयार होणारा शर्ट आपण १०००-१५०० रुपयाला घेतो. २५०० रुपये क्विंटल दराने शेतकर्‍याकडुन घेतलेला कांदा २००-२५० रुपये किलोने, भाज्यांच्या शोरूममधून घ्याल का? त्या वेळी कांदा ही जीवनावश्यक वस्तु असते. हे जग गरज आणि पुरवठ्याच्या तत्वावर चालत, तुमच्या-आमच्या विचारसरणीला कोणी श्ष्प विचारत नाही. दुकानातली वस्तु आणि रस्त्यावरची वस्तु यात किमतीत फरक असेल तर लोक रस्त्यावरुन विकत घेणारच, आणि विकणारच.

In reply to by शैलेन्द्र

बाळ सप्रे गुरुवार, 10/17/2013 - 19:25
रस्त्याऐवजी दुकानात, मंडईत विकायचे म्हटल्यावर किंमत दसपट होते हा फार मोठा गैरसमज आहे.. थोडासा फरक पडतो.. असं असतं तर सगळे धंदे रस्त्यावरच झाले असते.. जागेसाठी घातलेले भांडवल ही दीर्घमुदतीची गुंतवणुक असते.. ब्रेक इव्ह्न व्हायला वेळ द्यावा लागतो.. तसेच धंद्याची वाढ करणेही अपेक्षित असते.. पण तेवढी गुंतवणुक करणे, रिस्क घेणे, चांगल्यातर्‍हेने धंदा करणे व तो वाढवणे ही दूरदृष्टी नसल्यामुळे आणि सरकार, महापालिका यांचे अतिक्रमणावर नियंत्रण नसल्याने रस्त्यावर धंदा थाटणे हा शॉर्टकट अवलंबला जातो.. गरज पुरवठ्यावर धंदा चालतो हे अर्थ-शास्त्रीय तत्व जगभरात लागू आहे.. पण मग फक्त भारतासारख्यादेशातच का रस्त्यावर दुकाने थाटली जातात??

In reply to by बाळ सप्रे

धन्या गुरुवार, 10/17/2013 - 19:29
पण तेवढी गुंतवणुक करणे, रिस्क घेणे, चांगल्यातर्‍हेने धंदा करणे व तो वाढवणे ही दूरदृष्टी नसल्यामुळे आणि सरकार, महापालिका यांचे अतिक्रमणावर नियंत्रण नसल्याने रस्त्यावर धंदा थाटणे हा शॉर्टकट अवलंबला जातो..
गुंतवणूक करायला पैसा तर हवा ना. अगदी कर्जाऊ पैसा मिळवायचा ठरवलं तरी पतसंस्थांनी तेव्हढा पैसा दयायला हवा ना. दुकानासाठी गाळा घेणे अगदी भाडयानेसुद्धा हे सुद्धा काहींच्या आवाक्याबाहेरचे असते.

In reply to by धन्या

बाळ सप्रे गुरुवार, 10/17/2013 - 19:36
कुठलाही धंदा सुरु करायचा असेल तर सुरवातीला अशा अडीअडचणींना तोंड द्यावे लागणारच.. शॉर्ट्कट्च काढायची सवय / इच्छा असली की एक्सक्युजेस खूप मिळू शकतात..

In reply to by बाळ सप्रे

धन्या गुरुवार, 10/17/2013 - 19:46
अशा जेन्युईन केसेस खुप जवळून पाहीलेल्या आहेत.
कुठलाही धंदा सुरु करायचा असेल तर सुरवातीला अशा अडीअडचणींना तोंड द्यावे लागणारच..
शहरामध्ये मोक्याच्या जागी गाळा अगदी भाडयाने घ्यायचे म्हटले तरी पन्नासेक हजार रुपये डीपॉझिट दयावे लागते. अधिक महिन्याचे पाच सहा हजाराचे भाडे. बरे दुसर्‍या कुठे सुरुवातीला हे करुन पैसे जमवायचे म्हटले तहेधंदा तसा व्हायला हवा ना. "ईच्छा तिथे मार्ग" हा सुविचार पुस्तकातच छान दिसतो म्हणण्याईतपत कधी कधी वास्तव भयाण असते.

In reply to by धन्या

उपास गुरुवार, 10/17/2013 - 20:01
फुटपाथवर अतिक्रमण करुन धंदा करण्याच समर्थन कधीच होऊ शकत नाही. लक्ष्मीरोडची काय अवस्था झालेय आपण बघतोच आहोत. स्वस्तात धंदा करता येतो म्हणून कुठेही तो करावा हे मुळात चुकीचे आहे, नियम पाळायचेच नसतिल आणि पोलिसांनाही कायदे राबवायचेच नसतिल तर तो व्यवस्थेचा दोष म्हणायचा..

In reply to by धन्या

बाळ सप्रे गुरुवार, 10/17/2013 - 21:15
थोड्या जेन्युइन केसेस असु शकतील पण म्हणून
"ईच्छा तिथे मार्ग" हा सुविचार पुस्तकातच छान दिसतो
हे जरा जास्तच झाले.. दुसर्‍या बाजुचीही खूप उदाहरणे आहेत.. टपरीवाल्यांचे उत्पन्न इतके असते की ५-६ तवेरा गाड्या घेउन भाड्याने लावतात.. पण टपरीऐवजी हॉटेल टाकण्याची इच्छा होत नाही.. वास्तव दुसर्‍या बाजूने जास्त भयाण आहे.. लोक विकत घेतात म्हणून हे विक्रेते अतिक्रमण विरोधी विभागाला दाद देत नाहीत .. हटवल्यावर लगेच परत येतात..

In reply to by बाळ सप्रे

शैलेन्द्र गुरुवार, 10/17/2013 - 21:47
"टपरीवाल्यांचे उत्पन्न इतके असते की ५-६ तवेरा गाड्या घेउन भाड्याने लावतात.. पण टपरीऐवजी हॉटेल टाकण्याची इच्छा होत नाही.." भाड्यानेच लावतात ना? स्वतः नाही ना वापरत? त्यांच्यासाठी तो एक धंदा आहे, आणि टपरीच्या जिवावर चलन फिरवायची ताकद आल्याने ती लोक हा धंदा करतात. रस्त्यावर धंदा करायच्या प्रवृत्तीचे समर्थन करणे हा माझा उद्देश नाही, पण सध्याचे जागांचे भाव बघता, भारतात रस्त्यावरचे धंदे कधीच बंद होणार नाहीत हे वास्तव स्विकारायला हवं. मी लाख सगळे कायदे पाळुन, मारे फुड लायसन घेवुन, गाळा भाड्याने घेवुन भाजी विकेल, पण मग मी माझ्याच रस्त्यावर पलिकडे बसुन विकणार्‍या भाजीवाल्याशी किमतीची स्पर्धा करु शकेल? माझ्याकडे शॉप अ‍ॅक्ट आणि फुड लायसन्स आहे म्हणुन ३० रुपये किलोची भाजी तुम्ही ३५ रुपये किलोने घ्याल? साहेब, तेरा वर्ष दुधाचा धंदा केला, या समस्येच्या दोन्ही बाजु अनुभवल्यात. कायदे करुन प्रश्न सुटत नाही. लोकांसाठी जगण्याचे मार्ग मोकळे ठेवावे लागतात, नाहीतर अराजक माजेल..

In reply to by शैलेन्द्र

बाळ सप्रे Fri, 10/18/2013 - 11:44
रस्त्यावर धंदा करणे ही शॉर्ट्कट घेण्याची वृत्ती आहे हे वास्तव स्वीकारायला हवं.. जर हे स्वीकारल तरच चांगला मार्ग कोणता आणि कसा हे समजेल आणि थोडे जास्त कष्ट घेउन तो मार्ग निवडण्याची इच्छा होइल..

In reply to by बाळ सप्रे

धन्या Fri, 10/18/2013 - 12:57
पण मग यावर ईलाज काय? जो समस्येवर इलाज नक्की मिळेल असं म्हणतो त्याने त्या इलाजाचा थोडाफार विचार केलेलाच असतो.

In reply to by धन्या

बाळ सप्रे Fri, 10/18/2013 - 14:25
शक्यतो रस्त्यावरील दुकानात वस्तु विकत न घेणे.. जिथपर्यंत धंदा चालतो तिथपर्यंत कायदा वगैरे गुंडाळुन ठेवुन लोकं धंदा करणारच.. एक उत्तम उदाहरण आहे.. हिंजवडीत मोठ्या आयटी कंपनीच्याबाहेरच अशा टपर्‍या आहेत.. कंपन्यांनी वेळोवेळी एम आय डी सी कडे तक्रार करुन त्यांना हटवले आहे.. पण काही दिवसातच सगळे परत येतात.. कारण कंपन्यातले लोक तिथे जाउन खाद्य पदार्थ विकत घेतात.. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांनाही वारंवार आवाहन केले त्या टपरीवाल्यांना प्रोत्साहन देउ नये म्हणून.. पण अजुनही कर्मचारी टपरीवर जाउन खातात .. आणी टपरीवाले तिथे जोरदार धंदा करतात.. कँपसमध्ये सगळ्या सुविधा असुनही!!

In reply to by शैलेन्द्र

उपास Fri, 10/18/2013 - 19:23
माझ्या अल्पमतिप्रमाणे - १. दुसरा स्वस्त पर्याय ग्रहकांना उपलब्ध नाही २. नियम पाळायचेच नाहीत इतके आपण ग्राहक म्हणून बेशिस्त आहोत ३. व्यवस्थेचा (इथे पोलिसांचा) वचक नाही, त्यांना हप्ता पोहोचवून काम भागतं आणि ते ही निर्ल्लज्ज पणे कानाडोळा करतात अशा अवैध टपर्‍यांकडे.. सद्ध्या मुंबईत (दक्षिण, दक्षिण्-मध्य) सकाळी साडेसहा ते नऊ ह्यावॅळात रस्त्यावर उभे राहून पोहे, उपमा, वडे विकले जातात, प्रमाण इतकं हाताबाहेर गेलय की सगळ्या हॉटेलवाल्यांचा सकाळचा धंदा ऑलमोस्ट बसलाय, इमाने इतबारे हॉटेल चालवणारे रडकुंडीला आलेत. मग ही फेअर कॉपिटीशन आहे की सामान्य गरिबाने केलेला काळाबाजर? डोकं चालत नाही...!

In reply to by उपास

चिरोटा Fri, 10/18/2013 - 20:45
मग ही फेअर कॉपिटीशन आहे की सामान्य गरिबाने केलेला काळाबाजर?
एकूण गिर्‍हाईकांच्या प्रमाणात हॉटेलवाले प्रामाणिकपणे किती कर भरतात हा संशोधनाचा मुद्दा आहे.मुंबईत उडुपी हॉटेलवाल्यांचे कौतुक असते.पण जादा चटणीला जिची किंमत ५० पैसेही नसते तिला ५ रुपये आकारले जातात.

In reply to by शैलेन्द्र

बलि गुरुवार, 10/17/2013 - 19:46
१००-१२५ रुपयात तयार होणारा शर्ट आपण १०००-१५०० रुपयाला घेतो
असं शक्यतो मॉल मध्ये होतं . लहान दुकानामध्ये ४ ० ० -५ ० ० पर्यंत मिळतो तसाच शर्ट .

In reply to by बलि

चिरोटा Fri, 10/18/2013 - 20:53
ब्रॅन्ड कुठला ह्यावरही किंमत अवलंबून असते. अ‍ॅरो,पिट्रींग्लंडचे सदरे,विजारी महाग असतातच.तो दुकानात्/मॉलमध्ये एका हंगामात एकाच किंमतीला मिळेल.मॉलवाले फेस्टिव सीझनच्या नावाखाली माल (upto 50% off)च्या पाट्या लावून स्वस्तात विकतात.अर्थात त्यामागे गिर्‍हाईक जादा माल विकत घेईल हे गणित असते.

In reply to by शैलेन्द्र

काळा पहाड Sun, 10/20/2013 - 23:18
१००-१२५ रुपयात तयार होणारा शर्ट आपण १०००-१५०० रुपयाला घेतो.
नाई ब्वा.. मि तर काही महिन्यापूर्वीच लक्ष्मी रोड वरून २५० रुपयाचा शर्ट आहे का म्हणून विचारत फिरत होतो. मिळाला सुद्धा एके ठिकाणी. आता तिथूनच घ्यायचे ठरवलेत शर्ट.. २५०, ३००, ३५० मध्ये मस्त मिळतात शर्ट.

In reply to by काळा पहाड

तुषार काळभोर Wed, 10/23/2013 - 10:14
कुठं? मी पण जावं म्हणतो.. १००० चा एक घेण्यापेक्षा १००० चे ३-४ घेऊन वापरले तर वापरताना व्हरायटीपन होईल. अन् १००० चा शर्ट २ वर्षं टिकणार असेल आणि ४ शर्ट ६-६ महिने टिकले तरी चालेल.

In reply to by शैलेन्द्र

नेत्रेश Sun, 10/20/2013 - 13:18
जर आपल्याला आपले शहर साफ, सुंदर, सुरक्षीत हवे असेल, तर या गोष्टीना बाधा आणणार्या घटकांना विरोधच करायला हवा. अगदी प्रत्यक्ष विरोध करायचा नसेल तरी कमीत कमी त्यांना उत्तेजन तरी देउ नये. फक्त १५ दीवस कुणीही रस्त्यावरच्या फ़ेरीवाल्यांकडून काहीही खरेदी केली नाही तर सगळे फ़ुटपाथ, रस्ते मोकळे होतील. शहराची साफ सफाइ करायला पालीकेची यंत्रणा पुरेशी पडू लागेल. पोलीस, अतीक्रमण वीभाग व इतर काही सरकारी खात्यांचा वेळ आणि करदात्यांचा पैसा वाचेल. पण जर आपण थोडाफार पैसा वाचवण्यासाठी रस्त्यावरच्या फेरीवाल्यांसारख्या गोष्टींना उत्तेजन देणार असू, तर आपली लायकीच बकाल आणि उकीरडा झालेल्या शहरात रहायची आहे असेच म्हणावे लागेल.

In reply to by नेत्रेश

नितिन थत्ते Sun, 10/20/2013 - 17:31
कर्ज घेऊन नंतर त्याचे हप्ते भरू नयेत आणि मग बँकेशी रिनिगोशिएट करावे अशा अर्थाचा आपला प्रतिसाद पूर्वी वाचला होता. [पक्षी- नैतिकता-कायदा वगैरे गेली तेल लावत. आपला फायदा आपण पहावा]. त्या पार्श्वभूमीवर हा प्रतिसाद आश्चर्यजनक वाटतो. (मतपरिवर्तन?)

In reply to by नेत्रेश

शैलेन्द्र Sun, 10/20/2013 - 22:13
:) त्याचं असं आहे, की ज्या गोष्टी करता येण्याजोग्या आहेत त्यावर चर्चा करुया. साफ- सुंदर आणि सुरक्षित यात फरक आहे. लोकांचे रोजगार हिरावून घेतलेल्या स्वच्छ पण सामाजिक खदखद असणार्‍या अशांत शहरात राहण्यापेक्षा कायदे वाकवून का होईना पण जिथे नैतिक मार्गाने लोकांना दोन पैसे मिळवता येतात अशा शहरात/ समाजात राहणे कधीही चांगले.

In reply to by शैलेन्द्र

काळा पहाड Sun, 10/20/2013 - 23:27
लोकांचे रोजगार हिरावून घेतलेल्या स्वच्छ पण सामाजिक खदखद असणार्‍या अशांत शहरात राहण्यापेक्षा
व्वा.. म्हणजे रिक्षा ना प्रवाशाना लूटू द्यावे नाही तर ते अशांत असतील; खिसेकापूंना काही खिसे कापू द्यावे नाही तर ते अशांत होतील; सरकारी ऑफिस मधल्या एजंट लोकांकडे दुर्लक्ष करावे नाही तर ते अशांत होतील; झोपड्पट्टी वाल्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करावे नाही तर ते अशांत होतील; यादी मोठी आहे. अशांत लोकांना "शांत" करण्यासाठी रबरी बुलेट्स आणि बांबू कधीही वापरता येतात हे लक्शात ठेवावं.

In reply to by काळा पहाड

मुक्त विहारि Mon, 10/21/2013 - 08:54
रबरी बुलेट्स आणि बांबू कधीही वापरता येतात हे लक्शात ठेवावं." मला नाही वाटत की, असे दिवस येतील. आझाद मैदान साक्षी आहे...

In reply to by नेत्रेश

बलि Mon, 10/21/2013 - 18:06
शहराची साफ सफाइ करायला पालीकेची यंत्रणा पुरेशी पडू लागेल.
यंत्रणा कमी पडते आहे हि माहिती कुठून मिळवलीत भाऊ ?

मालोजीराव गुरुवार, 10/17/2013 - 14:52
आमच्या परमदयाळू, गोर गरिबांच्या कैवारी,दिनदलीतांसी आधारू,माय्नोरीटीस गोंजारू अश्या काँग्रेस सरकारने रस्त्यावर व्यवसाय करणार्यांना सुरक्षा आणि परवाना देणारे बिल आणले आहे…रस्त्यावरच्या भाजीवाल्यांविरुद्ध गळा काढणार्यांनी बसा कोकलत !!

In reply to by मालोजीराव

उद्दाम Sat, 10/19/2013 - 09:07
रस्त्यावर भाजी विकली तर बिघडलं कुठं? रायगडावरही मॉल नव्हता . भाजीबाजार रस्त्यावरच भरायचा असे ऐकून आहे.

वेल्लाभट Mon, 10/21/2013 - 10:41
बाकी सगळ्यावर भाष्य नाही पण
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणारे २-३ रुपयांचा विचार करत नाहित. सहा महिन्यातुन एखादा पिझ्झा खात असतिल तर गोष्ट निराळी...
यावर नक्कीच आहे. अशी डबल स्टँडर्ड्स वाली लोकं जागोजागी बघायला मिळतात आणि ती डोक्क्क्यात जातात. तळपायाची मस्तकात.

प्रसाद१९७१ Mon, 10/21/2013 - 15:29
आपण कष्ट करुन मिळवलेल्या पैश्यावर टॅक्स भरतो, त्यातुन हे रस्ते बनतात. हे भाजीवाले ते रस्ते फुकट वापरतात. ह्यांच्या मुळे वाहतुक कोंडी होते.आपले कीती पेट्रोल आणी वेळ वाया जात असेल ( सिंहगड रोड बघा ) घाण करुन ठेवतात. महानगर पालिके ने सफाई ची माणसे काय ह्या फु़कट्यांसाठी ठेवली आहेत का? वजनात मारतात. उर्मट बोलतात. पुण्यातल्या बर्‍याच भाजी विकणार्‍यांचे उत्पन्न टॅक्सबल आहे, पण एक पैसा टॅक्स भरत नाहीत. पैसे जास्त गेले तरी चालतील पण मॉल किंवा लीगल दुकानातुन भाजी घेत जा.

In reply to by प्रसाद१९७१

बाळ सप्रे Mon, 10/21/2013 - 15:49
निषेध!! निषेध !! रस्त्यावरील विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा आणणारा प्रतिसाद!!!

In reply to by प्रसाद१९७१

उद्दाम Tue, 10/22/2013 - 12:11
चार दमड्या मिळवून दोन चार रुपये ट्याक्स भरणार्‍या टिपिकल मध्यमवर्गीय माणसाचा हा निर्बुद्ध प्रतिसाद आहे. इन्कम ट्याक्स वगळता , इनडायरेक्ट ट्याक्सेसही असतात, ते सगळेच भरत असतात. लीगल दुकान म्हणजे काय? रस्त्यावर बसणार्‍या लोकांकडूनही नगरपालिका रोजच्या रोज पावती फाडून पैसे गोळा करत असते. ( पुण्यात ही शिष्टिम नाही की काय? )

In reply to by उद्दाम

मुक्त विहारि Tue, 10/22/2013 - 14:01
"टिपिकल मध्यमवर्गीय माणसाचा हा निर्बुद्ध प्रतिसाद आहे." अहो हे सगळे मिपा पण आजकाल असेच आहे. असे माझे मत आहे. मग अशावेळी शहाणी माणसे दूर राहतात.हे आपल्या सारख्या सुज्ञ माणसांना पण सांगावे लागते म्हणजे निर्बुद्धाहून निर्बुद्ध कोण?

त्रिवेणी Tue, 10/22/2013 - 15:24
या धाग्यावरील वरील सर्व प्रतिसाद वाचताना सहज एक विचार मनात आला की इथे फक्त भाजी वरच चर्चा चालू आहे, पण हल्ली दुकानदार दूध आणतो त्याचेही रोज 2 रु. प्रमाणे महिन्याचे एक्सट्रा पैसे चार्ज करतो.घरातील रद्दी हा अजून एक मुद्दा होऊ शकेल, पुण्यात बर्‍याच ठिकाणी रद्दीचे दर वेगवेगळे असतात, सध्या आमच्या भागात 9 रु, तर मॉडेल कोलोंनीत 12 रु.,आमच्या सोसायटी बाजूचा 6रु. ने घेतो, कारण काय तर तो किराणा माल देण्यासाठीच फक्त या कागदांचा वापर करतो म्हणे.म्हणजे आपल्या सारख्या सामान्यांच्या खिश्यातून महिना minimum 100/- असे खर्च होतात. वरती एक मुद्दा फुलांचा आला होता, मी सुद्धा डेक्कनला एक मोटठा हार 80रु घेतला दसर्‍याच्या दिवशी. मला सुद्धा तो महाग वाटला, ते विकणारा एक 18-19 वर्षाचा मुलगा होता, तो स्वता हार बनवत होता आणि त्याच्याहून छोटा त्याला मदत करत होता. मी विचार केला जाऊ देत मुलगा मेहनत करतो आहे ना, माझे थोडे पैसे जास्त गेले पण विचार केला कितीतरी मुल, तरुण बेरोजगार असतात, जे खरच नुस्त बसून राहण्यापेक्षा काही उद्योग करत आहेत तर त्यांच्यासाठी जाऊ देत माझे थोडे पैसे जास्त. सगळ्यांच्या मतांचा आदर करून आपण आपले विचार व्यक्त करू यात. एक प्रश्न उसुकता म्हणून- दारू चे दर किती दिवसांनी किवा महिन्यांनी वाढतात.कारण त्या भाववाढीचा कुठे उल्लेख नसतो, किवा भाव वाढले म्हणून चर्चा मी तरी वाचली नाही कुठे.

In reply to by त्रिवेणी

मुक्त विहारि Tue, 10/22/2013 - 15:32
खर्‍या मिपाकराची बरीच लक्षणे मिळाली... विचारांना नव्या दिशा.... १. दूध वाले २. रद्दी वाले ३. हार वाले (अ.आ. ह्यांनी ही दिशा आधीच दाखवली होती) ४. दारू वाले एका एका दिशेत १०० प्रतिसादांचे बळ आहे.... तर चौथ्या दिशेत ५०० प्रतिसादांचे बळ असल्याने तो एक वेगळा धागा काढण्यात येईल. वरील प्रतिसाद विनोदी असल्याने गहन विचार करू नका ही विनंती.......

In reply to by मुक्त विहारि

त्रिवेणी Tue, 10/22/2013 - 16:22
नाही मी गहन विचार खूपच कमी करते,कारण असा विचार करावा तर बरीच बुद्धी खर्ची करावी लागते, आधीच ईतकी वर्ष अभ्यास करून बुद्धी खर्ची घातली आहे सो आता अजिबात गहन विचार करत नाही. पण तेवढं 4थ्या दिशेसाठी नवीन धागा काढा नक्की कुणीतरी, तेवडीच आमच्या ज्ञानात थोडी भर पडेल.

In reply to by मुक्त विहारि

त्रिवेणी Tue, 10/22/2013 - 17:56
कदाचित माझ्या प्रतिसादाने आपण नाराज झाला असाल तर... माफी मागतो...>>>>>>>>> प्लीज असे बोलून मला लाजवू नका. मला आज्जीबत राग नाही आला. उलट तुम्ही दुसर्‍यांचा, त्यांचा भावनांचा विचार करता हेच खूप छान वाटले.

बलि Tue, 10/22/2013 - 15:30
दारू चे दर किती दिवसांनी किवा महिन्यांनी वाढतात.कारण त्या भाववाढीचा कुठे उल्लेख नसतो, किवा भाव वाढले म्हणून चर्चा मी तरी वाचली नाही कुठे
दारूच्या दुकानात आम्ही मात्र जराही घासाघीस न करता , मागच्या वेळेची किंमत काय होती हे लक्षात न ठेवता नोटा काढून देतो.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Tue, 10/22/2013 - 15:43
पो.पा. लिंक शोधत आहे.... तो पर्यंत आमसूले खा.... http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5204332738114588355&SectionId=22&SectionName=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&NewsDate=20130810&Provider=-&NewsTitle=%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%82%20(%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0)

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन Tue, 10/22/2013 - 15:51
अगागागागागागागागा..........चालणारी आमसुले बेक्क्क्क्क्क्क्कार एकदम =)) =)) =)) फेसबुकवर मुक्तपीठ प्रतिक्रिया फ्यान क्लब नामक पेज आहे, तिकडे चिकटवतो हे, बहुत धन्यवाद =))

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन Tue, 10/22/2013 - 15:55
काय कमेंट आहेत, वा वा वा. १. Amit - शुक्रवार, 23 ऑगस्ट 2013 - 02:31 PM IST उडणारे जिरे नाही का पहिले लेखिकेने? आम्ही त्यांना डास म्हणतो … २. Sud - बुधवार, 14 ऑगस्ट 2013 - 04:43 PM IST उद्या घरात ढेकुण पाहून त्यांना "चालणारा अक्खा मसूर " नका म्हणू किंवा भुंग्याला बघून "चालणारे व उडणारे चोकलेट एक्लेर्स " नका म्हणू हो ३. श्री - सोमवार, 12 ऑगस्ट 2013 - 08:15 PM IST लेख मस्त आहे आणि सत्य घटना आहे....मागे एकदा आमच्या घरात २०० विंचू घुसले होते आणि एका रांगेत चालले होते........बायको म्हणाली विंचू आहेत....मी म्हणालो नाही....हि तर चालती आमसुले आहेत............मग आम्ही ती बरणीत ठेवली आणि पित्त झाला कि एक आमसूल खायचो............या पेक्षा मजा एकदा आली......आमची मांजरी रात्री आम्हाला वाघाचा आवाज काढून घाबरवायची ..मग आम्ही तिची मजा केली...एकदा ती सकाळी प्रतार्विधीलीला जात असताना मी वाटेत झोपलो......तिला वाटला कि हा माणूस आहे ...............अश्या खूप सत्य घटना आहेत माझ्याकडे .................@ सकाळ .........कृपया छापाल ना ?????????????/ ४. बबली - सोमवार, 12 ऑगस्ट 2013 - 10:14 AM IST बिचारी पोर. सदाशिव पेठेत वाढलेली... तिस बरे कसे माहित अशणार विंचू.. आमसुले माहित कारण.. त्याची मस्त अशी चव येते आमटी मध्ये घातले वर.. ५. sachin - शनिवार, 10 ऑगस्ट 2013 - 07:06 PM IST नशीब आमसुलाचे सार करून प्यायला नाहीत. काय तर म्हणे चालणारी आमसुले. उद्या एखादी घूस बघून म्हणाल कि चालणारी बीटे. ६. गुरु महाराज - शनिवार, 10 ऑगस्ट 2013 - 06:50 PM IST कोकणात मी अंघोळ करत बसलो चुकुन दगड हलला,बघतो तर काय ! मगर होती ती....... दच्क्लात......पुढे ऐका....माज्या हातात साबन होता ना ? अहो ते अंडा हॉट तीच....आणि ते फुटून पिल्लू बाहेर आल आणि ते चक्क आमसुले खायला मगु लागल....बोला आता......आता दलु का दलन मुक्त पीठाच... ७. Andy USA - शनिवार, 10 ऑगस्ट 2013 - 06:50 PM IST काळ्या मुंग्या प्रथम पहिल्या तो अनुभव पुढच्या लेखात "चालणारी मोहरी" म्हणून लिहा. केव्हा वाचीन असे झालेय. हहहहहहहहहहह्पुवा!!!

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Tue, 10/22/2013 - 16:00
१. उडणारे जिरे द्या (तुमच्या कडे भरपूर आहेत) २. चालणारे ढेकूण द्या. ३. सरपटणारे दोर द्या (हे घेतांना जे.डी. ह्यांना घेवून जावे ही विनंती) इ.इ.

In reply to by मुक्त विहारि

उद्दाम Wed, 10/23/2013 - 10:22
त्या हिमालयाच्या उशीतनं बाहेर पडा आता. नाहीतर कान किर्र्र्र्र्र्र्र्र बधीर होतील.

सांजसंध्या Wed, 10/23/2013 - 11:20
वॉर्निंग : शाकाहा-यांनी वाचू नये वास्को च्या मासळीबाजारात कोळणीकडून मासळी घेताना दाबून, उलटीपालटी करून घेण्यात मजा येते. मॉलमधली महागडी मासळी चवीला पण चांगली नाही लागत. इथून खालचा मजकूर सार्वजनिक (शाहा देखील वाचू शकतात) मॉल संस्कृतीबद्दलचा एक लेख. मटा मधे छापून आला होता. http://www.maayboli.com/node/21238

In reply to by सांजसंध्या

सांजसंध्या Wed, 10/23/2013 - 21:22
मासळीवरून पुण्याची आठवण झाली. हर्णेला कुणी राहतं का ? पुण्यात असताना एक जण हॉटेलसाठी थेट हर्णेवरून मासळी मागवायचे. आम्हाला टेंपो आला कि त्यातली हवी ती घेता यायची. ताजी मासळी असायची ती. बरेच दिवस टिकायची. आमच्या शेजारचे एक बंगाली गृहस्थ भल्या पहाटे उठून नाना पेठेत जायचे. बाहेर निघताना भांड्याचा आवाज यायचा. या रहस्याचा शोध घेतल्यावर कळालं कि अल्पना टॉकीज (कुठे आहे ही ?) जवळ बारामतीवरून एक जण सकाळी सकाळी येतो. इंदापूर कि कुठून गोड्या पाण्यातली मासळी तो आणायचा. हा बंगाली लोकांचा वीक पॉइण्ट असल्याने भल्या पहाटे उठून जायला त्यांना काहीच वाटायचं नाही. मॉल मधल्या मासळी, भाज्यांवर हे बंगाली बाबू खूप उसळून बोलायचे. त्यांच्या बरोबर एकदा मार्केट यार्डात जाउन फळं, भाजी आणि किराणा आणला होता. हवा तसा माल आणि पैशांची बचत हवी असेल तर असंच करायला पाहीजे. मार्केट यार्डाचाच मॉल बनवला तर ? शेतक-यांनाही फायदा आणि गि-हाईकांनाही.