अंनिस व धर्मश्रद्धा
अंनिस ही विवेकजागराची चळवळ आहे. विवेक ही काही अंनिसची मक्तेदारी नाही. समाजात विवेकाचा विचार सांगणारे संतजन होतेच की. बर्याच लोकांना अंनिस ही डामरट वाटते. दाभोलकर म्हणजे अंनिस हे समीकरण रुजण्याच कारण त्यांनी चळवळ प्रसारमाध्यमातुन रुजवण्याचे प्रयत्न केले. खरतर अंनिसचा विचार हा नवीन नाही. बुवाबाजीचा भंडाफोड झाल्यावर लोक बुवा बदलतात पण मानसिकता बदलत नाहीत. विवेकाधिष्ठीत समाज निर्माण करण्यासाठी नरेंद्र दाभोलकरांनी केलेले हे आवाहन- या पुर्वी याची चर्चा इथे झाली आहे
गरज विवेकी धर्मजागराची
[दैनिक सकाळ ३० आक्टोंबर २००७]
(नरेंद्र दाभोलकर)
धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न जेथे झाला, त्या महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे...
कथित धर्मरूढी, प्रथा, परंपरा, पूजा, व्रतवैकल्ये, सणवार, कर्मकांडे यांना समाजजीवनात जणू उधाण आल्याचे दिसते आहे. याचा एक अर्थ यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणारे जे आहेत त्यांना यश लाभते आहे. दुसरा अर्थ आपले कल्याण होईल, असे मानून भ्रमचित्त समाज चुकीच्या मार्गाने चालला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या वातावरणाला प्रशासकीय कठोरपणाचे उत्तर पुरे होईल, असे मानले जाते आहे. परिस्थितीच्या गांभीर्याची जाण येण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.
जीवनात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि दीर्घ इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही त्यामानाने गेल्या अवघ्या चारशे वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला. विज्ञानाच्या उदयाआधीच त्याला विशालस्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले गेले. सर्व जीवनावर धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली.
आपण लहानपणी भाषा शिकतो. धर्म जन्मतःच मिळतो. मायबोलीप्रमाणे व मायधर्म संस्काराने आपण स्वीकारतो. धर्मविचाराचा प्रश्नच उपस्थित केला जात नाही. व्यक्ती प्रौढ, विवेकी झाल्यावर तिने धर्मविचार करावा, अशी अपेक्षा असते. बहुतेकांच्या जीवनात हे घडत नाही. लोकहितवादी, महात्मा फुले, न्या. रानडे, पंडिता रमाबाई, डॉ. केतकर, गाडगेबाबा, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म या विषयावर मनन, चिंतन व कृती केली. धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न केला. त्याच महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मविचार व धर्माभिमान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माभिमानी माणूस धर्मविचार करू शकेल; पण करेलच असे नाही. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. माणसाने आपले कर्तव्यकर्म करावे; पण ते ईश्वराची आज्ञा म्हणून ईश्वरार्पण बुद्धीने करावे, अंतःकरणाच्या शुद्धीला व ईश्वरविषयक तळमळीला प्राधान्य द्यावे. माणुसकीने व करुणेने वागावे, हे संतांनी सांगितले आणि आचरलेही, परंतु हा मार्ग मराठी मनाला व्यापून टाकू शकलेला दिसत नाही. कर्मकांडाचे आणि उत्सवी धर्माचे साम्राज्य अबाधित राहिलेच, पण ते वर्धिष्णूही बनते आहे.
आपल्या देशातील आजचे वातावरण धर्मनिरपेक्षतेचे नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शरणागतीचे आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना पद्धतशीरपणे उधाण आणण्याचे काम धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, त्याचे विविध धार्मिक सोहळे आपापल्या अनुयायांमार्फत करत आहेत. दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे. येथील माणसाची मानसिकता अंगभूतपणे धार्मिक आहे. ही धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. ती धार्मिकता धर्मांध बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. माणसाची धार्मिकता हा जणू कच्चा माल झाला आहे. अशा परिस्थितीत खरे प्रश्न, खरी मूल्ये याचे आत्मभान न हरवल्यासच नवल.
आत्मभाननिर्मितीचा दावा करणाऱ्या धर्माच्या नावाने हे घडावे हे भयचकित करणारे आहे. ही धार्मिकता विवेकही जागृत करत नाही आणि माणुसकीही जागवत नाही. ही प्रक्रिया याच तेजीने चालू राहिली तर धार्मिक राष्ट्रवादाचे रूप ती धारण करेल. राष्ट्राचे संविधान धर्मनिरपेक्ष व समाज धार्मिक राष्ट्रवादी अशा पेचात देश सापडेल. गुजरातमध्ये याची झलक आपण पाहिलीच आहे. याबरोबरच समाजातील अगतिकता, अस्थिरता, चंगळवाद, काळ्या पैशाचा प्रभाव, राजकीय सामाजिक मान्यतेसाठी धर्म सवंगपणे वापरणे हे सर्वही खरे आहे. या सर्वांतून अत्यंत चुकीच्या पद्धतीने धर्मभावना प्रभावित केली जात आहे.
न्यायालयाचे निर्णय व त्याची प्रशासकीय खंबीर अंमलबजावणी, यामुळे या परिस्थितीला फक्त मर्यादितच आळा बसू शकतो. धर्मनिरपेक्षतेचा संविधानातील आशय जनमानसात रुजविणे हा त्यावरचा अधिक मूलगामी उपाय आहे. त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाची व नागरी खंबीर कृतिशीलतेची गरज आहे. विचाराचे व आचाराचे पाथेय न्या. रानडे, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्ती व कृतीत भरपूर उपलब्ध आहे. या सर्वांचे धर्मकारण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, विवेककारण होते. समाजविमुख धर्म त्यांनी समाजसन्मुख केला. विधायक धार्मिकतेचे हे चिंतन समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात संघटितपणे क्रियाशील होणे, हीच आजची गरज आहे.
- नरेंद्र दाभोलकर
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत.)
वाचने
42052
वाचनखूण
प्रतिक्रिया
101
गोकुळाष्ट
In reply to गोकुळाष्ट by विसोबा खेचर
हेतु
In reply to गोकुळाष्ट by विसोबा खेचर
ह्या विषयावर राजीव दीक्षित ..
गेल्या दहा
In reply to गेल्या दहा by विसोबा खेचर
मला तर बॉ
In reply to गेल्या दहा by विसोबा खेचर
अंनिस
In reply to अंनिस by नेटकिडा
नेटकिडा
In reply to नेटकिडा by विकि
अरे वा!
In reply to अरे वा! by विकास
साधना
In reply to साधना by प्रकाश घाटपांडे
बेरकी
In reply to नेटकिडा by विकि
अंनिस चे
In reply to अंनिस चे by विसोबा खेचर
चपखल...
In reply to चपखल... by विकास
समाज बदलताना उणीदुणी निघणार नाहीत तर काय?
In reply to समाज बदलताना उणीदुणी निघणार नाहीत तर काय? by धनंजय
फुले-आगरकर-
In reply to फुले-आगरकर- by विसोबा खेचर
दाभोळकर
In reply to दाभोळकर by सहज
सहजराव,
In reply to सहजराव, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुद्देसूद
In reply to समाज बदलताना उणीदुणी निघणार नाहीत तर काय? by धनंजय
तसे का व्हावे?
In reply to समाज बदलताना उणीदुणी निघणार नाहीत तर काय? by धनंजय
उणे दुणे न काढता...
In reply to नेटकिडा by विकि
क्या बात है!!!
अनीस चे कार्यकर्ते जपतात अंधश्रद्धा
In reply to अनीस चे कार्यकर्ते जपतात अंधश्रद्धा by विजुभाऊ
मला वाटतं
In reply to अनीस चे कार्यकर्ते जपतात अंधश्रद्धा by विजुभाऊ
पण त्याच
In reply to अनीस चे कार्यकर्ते जपतात अंधश्रद्धा by विजुभाऊ
मनःशांती
,,,,,,,,,,,,,,,,,,,आपल
In reply to ,,,,,,,,,,,,,,,,,,,आपल by JAGOMOHANPYARE
आणि
In reply to ,,,,,,,,,,,,,,,,,,,आपल by JAGOMOHANPYARE
हॅहॅ
In reply to हॅहॅ by प्रकाश घाटपांडे
गोकुळाष्ट
In reply to गोकुळाष्ट by JAGOMOHANPYARE
विंजेक्शन
In reply to हॅहॅ by प्रकाश घाटपांडे
अर्थकारण हा मुद्दा...
In reply to हॅहॅ by प्रकाश घाटपांडे
अवांतर- या
.............................
>>>>>>>>>>>>>>>
धार्मिक
अजिबात ह नका घेऊ
In reply to अजिबात ह नका घेऊ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सवय आहेच
In reply to सवय आहेच by प्रकाश घाटपांडे
>>>अंधश्रध्
In reply to >>>अंधश्रध् by अवलिया
विज्ञान व श्रद्धा
In reply to विज्ञान व श्रद्धा by प्रकाश घाटपांडे
नेहमीप्रम
In reply to >>>अंधश्रध् by अवलिया
बर्ट्रांड रसलचे
In reply to बर्ट्रांड रसलचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
सायन्स
In reply to सायन्स by विजुभाऊ
आ ह
In reply to सवय आहेच by प्रकाश घाटपांडे
तुमची
In reply to तुमची by JAGOMOHANPYARE
कस ओळखलत?
In reply to कस ओळखलत? by प्रकाश घाटपांडे
चक्कर आली...
In reply to तुमची by JAGOMOHANPYARE
अनिस ची
श्रध्दा
>>गोकुळाष्ट
अंधश्रद्धा निर्मूलनाचे
In reply to अंधश्रद्धा निर्मूलनाचे by प्रकाश घाटपांडे
दाभोलकर
In reply to दाभोलकर by कपिलमुनी
दाभोलकरच योग्य आहे.
दाभोलकर योग्य आहे. कोकणातील ब्राम्हण लोक दाभोलकर अस नाव वापरतात.
In reply to दाभोलकर योग्य आहे. कोकणातील ब्राम्हण लोक दाभोलकर अस नाव वापरतात. by निश
अरेरे!
In reply to अरेरे! by प्रभाकर पेठकर
+१
In reply to अरेरे! by प्रभाकर पेठकर
+१ असेच म्हणतो.
पेठकर सर, माफ करा पण त्यांचि जात सांगण्यामागे कारण हे की,
In reply to पेठकर सर, माफ करा पण त्यांचि जात सांगण्यामागे कारण हे की, by निश
सहमत..
पिलीयन रायडर जी, अतिशय खर बोललात तुम्ही.
नाही.
पेठकर काका, समजुन घेतल्या बद्दल मी खरच आभारी आहे.
हे जादूटोणा विधेयक नक्की काय
In reply to हे जादूटोणा विधेयक नक्की काय by श्रीगुरुजी
येथे पहा
In reply to येथे पहा by विकास
मला तर भरपूर आक्षेपार्ह वाटला हा मसुदा.
In reply to मला तर भरपूर आक्षेपार्ह वाटला हा मसुदा. by अर्धवटराव
तसे नाही वाटले...
In reply to तसे नाही वाटले... by विकास
तो कायदा गैर नाहि...
In reply to तो कायदा गैर नाहि... by अर्धवटराव
मला तर सगळे मुद्दे योग्य वाटतायंत
In reply to मला तर सगळे मुद्दे योग्य वाटतायंत by संजय क्षीरसागर
>>> 4) to claim possession of
In reply to >>> 4) to claim possession of by श्रीगुरुजी
या सगळ्याचे उत्तर
In reply to या सगळ्याचे उत्तर by विकास
अगदी थोडक्यात सांगायचं तर...
In reply to अगदी थोडक्यात सांगायचं तर... by अर्धवटराव
"मनाची विक्षीप्त अवस्था"
In reply to "मनाची विक्षीप्त अवस्था" by विकास
तिच खरी गोम आहे.
In reply to तिच खरी गोम आहे. by अर्धवटराव
बापू
In reply to बापू by विकास
कॉन्स्पिरेटर
In reply to कॉन्स्पिरेटर by अर्धवटराव
मुद्दा आवडला...
In reply to मला तर सगळे मुद्दे योग्य वाटतायंत by संजय क्षीरसागर
ति लिस्ट वाचली आहे मी.
In reply to ति लिस्ट वाचली आहे मी. by अर्धवटराव
>>> त्यातले बरेचस्र मुद्दे
In reply to >>> त्यातले बरेचस्र मुद्दे by श्रीगुरुजी
नरबळी
In reply to >>> त्यातले बरेचस्र मुद्दे by श्रीगुरुजी
खिक्
हा कायदा व भारतीय दंड विधान
In reply to हा कायदा व भारतीय दंड विधान by चौकटराजा
-१
अवांतर
In reply to अवांतर by राही
+१११११११११११११११११११११११११११.
In reply to अवांतर by राही
सहज माहिती म्हणून ...
फेसबुक वर आज हे वाचलं.. आता हे काय नाटक आहे??
In reply to फेसबुक वर आज हे वाचलं.. आता हे काय नाटक आहे?? by पिलीयन रायडर
आँ?????
In reply to आँ????? by बॅटमॅन
बरोब्बर... असाच काही विचारांचा माणुस आहे तो..
In reply to बरोब्बर... असाच काही विचारांचा माणुस आहे तो.. by पिलीयन रायडर
पण नक्की काय खोटेपणा केलाय ते
In reply to पण नक्की काय खोटेपणा केलाय ते by बॅटमॅन
विचारलं.. चांगलं खडसावुन
In reply to विचारलं.. चांगलं खडसावुन by पिलीयन रायडर
शुद्ध सात्विक देव
In reply to शुद्ध सात्विक देव by बाळ सप्रे
शंकर.
In reply to शंकर. by प्रभाकर पेठकर
म्हणजे त्या व्यक्तिसाठी
In reply to शंकर. by प्रभाकर पेठकर
मला वाटतं शंकर महादेव हे
In reply to मला वाटतं शंकर महादेव हे by मदनबाण
मी चुकून
In reply to विचारलं.. चांगलं खडसावुन by पिलीयन रायडर
ही डोक्यावर पडलेली लोकं अशीच
हे घ्या अजुन एक...
In reply to हे घ्या अजुन एक... by पिलीयन रायडर
बापरे हा ३तास २६ मिनिटांचा
अजून एक कायदेशीर शंका
In reply to अजून एक कायदेशीर शंका by श्रीगुरुजी
"गोपाळ संतान विधी" नक्की काय
In reply to "गोपाळ संतान विधी" नक्की काय by बाळ सप्रे
सगळे वाचत बसलेलो नाही पण
In reply to सगळे वाचत बसलेलो नाही पण by विकास
सहमत
विजय तेंडुलकर एकदा म्हणाले