आरोग्य पंचविशी -१
In reply to > by प्रकाश घाटपांडे
मुळात आपल्याला तळलेले पदार्थ का आवडतात?" हा प्रश्न आपल्या उत्क्रांतीशी निगडीत आहे. आदिमानवाच्या काळात अन्नाची सुबत्ता नव्हती. तेंव्हा त्याला दिवसे न दिवस शिकार मिळत नसे तेंव्हा त्याला शरीरात साठवलेल्या चरबी वर अवलंबून रहावे लागे. उत्क्रांती मध्ये माणूस हे शिकला कि चरबीयुक्त किंवा प्रथिनयुक्त पदार्थ हे आपल्याला अशा काळात तारून नेतात त्यामुळे हे त्याच्या DNA स्मृतीवर कोरले गेले आणी ते आपल्याला वारसा हक्काने मिळालेले आहे. आपल्याला सर्वात जास्त आवडणाऱ्या पदार्थात तळलेले पदार्थ किंवा दुधाच्या मलई युक्त मिठाया आणी मांसाहारी पदार्थ येतात. अगदी लहान मुलाला सुद्धा बटर/ लोणी आवडते. याच उत्क्रांती मध्ये मिळवलेल्या स्मृती मुळे आपल्याला दुधाची खमंग मिठाई(कलाकंद कुंदा, कंदी पेढे इ ) किंवा तंदूर मध्ये भाजलेले पदार्थ ( चिकन/ पनीर तंदुरी) आवडतात. आदिमानवाला एक लक्षात आले कि पदार्थ भाजले कि ते पचायला हलके होतात त्यातील जंतू आणी विष नष्ट होतात शिवाय त्यातील पाण्याचा अंश कमी होऊन ते जास्त संतृप्त(CONCENTRATED) होतात.त्यामुळे एका वेळी जास्त घन द्रव्य पोटात जाते हीच स्मृती तुमच्या आमच्या DNA वर कोरली गेली आहे. म्हणून दुधाची खमंग मिठाई इत्यादी बरोबरच भाजलेला कांदा वांगे ई भाज्या सुद्धा आपल्याला आवडतात. तेंव्हा आपण जरी कितीही सुविकसित किंवा अत्याधुनिक असल्याचा दावा केला तरी अजून आपली आदिमानवाशी नाळ जोडलेलीच आहे.हे ज्याम आवडले . मस्त लेखमाला वाचतोय
In reply to मुळात आपल्याला तळलेले पदार्थ by स्पा
In reply to +१ हेच लिहायला आलो होतो! by आदूबाळ
In reply to +१ हेच लिहायला आलो होतो! by आदूबाळ
In reply to आदिमानवाइतके शारीरिक कष्ट by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to नाही ना. पण काय, शेवटी डीएने by आदूबाळ
In reply to +१ हेच लिहायला आलो होतो! by आदूबाळ
In reply to मुळात आपल्याला तळलेले पदार्थ by स्पा
हॉटेल च्या आचार्याला वेळ नसतो तो प्रथम काढीत तेल ओततो मग त्यात चिरलेल्या भाज्या टाकतो आणी थोड्या थोड्या वेळाने ते हलवतो. मधल्या काळात तो इतर काही कापणे चिरणे हि आपली कामे उरकत असतो. त्याला हे माहिती असते कि दोन चमचे तेल टाकले तर भाजी खाली जळण्याची शक्यता आहे तेंव्हा भरपूर तेल टाका. भाजी परतण्याच्या ऐवजी तळली जाते. तेल हॉटेल मालकाचे असते आणी अंगावर तुमच्या चढते त्याच्या बापाचे काय जाते?असं काहीही नसतं. एखाददूसर्या उपहारगृहात घडत असेलही पण विधानातील सार्वत्रीकरण निखालस चुकीचे आहे. काळ्या तेलात तळलेला बटाटावडा आणि ताज्यातेलात तळलेला बटाटावडा ह्यांच्या रंगात फरक असतो. पावाचा चुरा, पीठ किंवा रवा लावलेले पदार्थ तळल्यास त्याचे कण तेलात उतरतात. आणि ते जळून तेल काळे पडते. एक बॅच तळून झाली की नवीन बॅच तेलात सोडण्यापूर्वी चहाच्या गाळणीने तेलातील अतिरिक्त कण (ब्रेडची पावडर किंवा रवा) बाहेर काढले जातात नंतरच पुढची बॅच तेलात सोडली जाते. ब्रेडची पावडर किंवा रवा असलेले पदार्थ तळलेले तेल लवकर बदलावे लागते. अन्यथा कटलेट वगैरे पदार्थ काळे पडलेले दिसून येते. (चवीतही फरक पडतो). तेल थंड झाल्यावर कापडाने गाळून नंतरच ते वापरले जाते. आजचे तेल, काळे पडले नसेल तर, फक्त उद्यापर्यंतच चालते. तिसर्यादिवशी ताजे तेल वापरात घ्यावेच लागते. आचार्याला वेळ नसतो, तो भरपूर तेल कढईत टाकून त्यावर भाज्या टाकतो, मधल्यावेळात तो आपली इतर चिरण्याकापण्याची कामे करतो हे विधानही दिशाभूल करणारे आहे. हॉटेलच्या किचन मध्ये शेफ असतो त्याच्या हाताखाली ४ आचारी असतात आणि त्यांचा प्रत्येकाचा असिस्टंट असतो. शेफ पदार्थ कसा बनवायचा, त्याची चव त्याचे सादरीकरण इ.इ. गोष्टी करण्याबरोबरच त्याचे आचारी त्यांना शिकविल्याप्रमाणे वागत आहेत की नाही ह्यावर देखरेख ठेवत असतो. जिथे शेफ नसतो तिथे मालक हे पाहतो. (जसे माझ्या उपहारगृहात मीच लक्ष ठेवतो). कढईत तेल जास्त टाकल्यास शेफ किंवा मालक तिथल्यातिथे आचार्याला झापतो, तेल कमी करायला लावतो. भाज्या चिरणे, कापणे ही कामे करायला 'हेल्पर्स' असतात. आणि अशा चिरुन कापून ठेवलेल्या भाज्या, मसाले, दूध, क्रिम, बटर, चिझ 'पोर्शन' बरहुकूम काढून आचार्याच्या हातात तयार देणे हे 'असिस्टंट' आचार्याचे काम असते. त्यात त्याने चुक केली तर त्याला आचार्याच्या आणि शेफच्या शिव्या खायला लागतात. तेल हॉटेल मालकाचे असते आणी अंगावर तुमच्या चढते त्याच्या बापाचे काय जाते? त्याची नोकरी जाते. जास्त तेल, जास्त तुप, जास्त बटर, जास्त क्रिम, जास्त काजू वगैरे वापरण्याने पदार्थाची उत्पादन किंमत (कॉस्ट) वाढते. पदार्थाच्या चवीत प्रमाणाबाहेर फरक पडतो. गिर्हाईक तुटते. धंदा बसतो. 'काळे तेल' म्हणजे वाईट आणि 'स्वच्छ तेल' म्हणजे चांगले हाही एक गैरसमज आहे. तेल काळे पडते ते त्यात जमणार्या अतिरिक्त कणांमुळे. त्या कणांचे (जळून) कार्बन मध्ये रुपांतर होते. त्याने तेल काळे दिसते. तेल जास्त वापरलेले नसेल तर त्याच्यात दुषित द्रव्ये तयार झालेली नसतात ते बर्यापैकी सेफ असते. 'स्वच्छ तेल' म्हणजे शुद्ध आणि आरोग्यदायी हा माझाही, ह्या व्यवसायात यायच्या आधी, गैरसमज होता. तेलाचे जे डबे उपहारगृहातून रिकामे होतात ते विकत घेणारी माणसे असतात. रिकाम्या डब्यांना चांगली किंमत येण्यासाठी हे डबे विकत घेणार्यांच्या कांही अटी असतात. जसे डब्याला जास्त मोठे छिद्र नसावे. डबा चेपलेला, खराब दिसणारा नसावा आणि मुख्य तेलाच्या मुळ कंपनीचे स्टीकर व्यवस्थित असावे. अशा डब्यांना जास्त किंमत येते. ती का? तर सांगतो. काळ्या पडलेल्या तेलात कार्बनचे प्रमाण जास्त असते. हे वापरलेले तेलही विकत घेतले जातो. हे तेल विकत घेणारी माणसे तुमच्या उपहारगृहात येऊन हे तेल घेऊन जातात. तुम्हाला त्यासाठी कुठे वणवण भटकावे लागत नाही. ह्या काळ्या पडलेल्या तेलांत कांही रसायन मिसळले जाते. जे आपल्या आरोग्यास नक्कीच हानीकारक असते. ते रसायन मिसळले की थोड्यावेळाने सर्व कार्बन कण तळाशी बसतात. वरचं तेल वेगळं केलं जातं. हे तेल खुप स्वच्छ दिसत असतं. पुढे हे अजून गाळलं जातं. आणि शेवटी ते ९० टक्के स्वच्छ दिसायला लागतं पण त्यात ते अनारोग्यकारक 'रसायन' असतं हे विसरता येत नाही. हे तेल त्यावापरलेल्या डब्यात भरून त्याची छिद्र भरून टाकून त्या ब्रँडचं 'ताजं ' तेल म्हणून कमी दरात विकलं जातं. हे खुपशा हातगाड्यांवर खरिदलं जातं. जिथे आपण वडापाव, भूर्जीपाव, चायनीझ वगैरे खातो. तसेच पाणीपुरीच्या पुर्या बनविणारे हे स्वस्तातले तेल वापरतात. हे अत्यंत हानीकारक तेल आपण स्वच्छ 'दिसतं' म्हणून स्विकारतो. ते काळं दिसत नसतं. हातगाडीवला आपल्या नजरेसमोर नवा(?) डबा उघडून ताजे(?) तेल कढईत टाकतो. आपण समाधान मानतो की 'नाही बाबा! हा हातगाडीवाला इतरांपेक्षा चांगला आहे. 'काळं तेल' वापरत नाही. तर सर्वच हातगाडीवाले चोर आहेत का? तर नाही. खुप जणं चांगल्यातलं तेल वापरतात. (त्यांच्याकडे अजून भेसळयुक्त तेल विकणारा सेल्समन पोहोचलेला नसतो), तर कधी आपण वापरतोय ते तेल चांगले नाही हेच त्याला माहित नसतं तर कधी तो हे सर्व जाणूनबुजून करीत असतो. आम्ही कंपनी एजंट कडून तेल घ्यायचो आणि तेही प्रत्येक डबा रिसिल्ड नाही नं, ह्याची खात्री करून. काळे झालेले तेल फेकून द्यायचे आणि रिकामे डबे मोडून, चेपून भंगारात विकायचे. असे करायचो. असेच, मी पुण्यात दुधाबद्दल अनुभव घेतला. आम्ही नेहमी चितळे डेअरीचेच दुध घ्यायचो. एक दोनदा माझ्याच उपहारगृहात चहा घेताना मला चव अत्यंत घाणेरडी वाटली. मी सुपरवाझरला दुधाची पिशवी किचन मधून आणायला सांगितली. तर ती भलत्याच नांवाची निघाली. त्याला मी झापलं. म्हंटलं 'कोणाला विचारून तू दुधाचा ब्रँड बदललास?' तर तो म्हणाला 'चितळे डेअरीचे दुध फार महाग झालं आहे. परवडत नाही.' मी त्याला चहाचा दर वाढवायला सांगितला. पुन्हा चितळे डेअरी मील्क वापरणं सुरू झालं आणि चहाची चव पूर्ववत झाली. जे दूध म्हणून स्वस्तात विकलं जात होतं ते दूधच नव्हतं केमिकल्स्च पांढरं पाणी होतं. कांही लालची मालकांच्या उपहारगृहांत अपप्रवृती चालतही असतील पण सर्वच ठिकाणी असं नसतं. मालक मालाच्या दर्जाबाबत दक्ष असतात. आणि अशी उपहारगृहं (शहरात तरी) ८० टक्यांच्या वर असावीत असा माझा अंदाज आहे.
In reply to गैरसमज. by प्रभाकर पेठकर
In reply to अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद. by राजेश घासकडवी
माझ्या एका मित्राने म्हटलं होतं की भरपूर तेल (म्हणजे अतिरेकी या अर्थाने नाही, तर घरच्या मानाने जास्त) घातल्यामुळे (विशेषतः पंजाबी ग्रेव्हीच्या डिशेस) जास्त चवदार लागतात.खरं आहे. हॉटेलच्या कांही पदार्थांमध्ये तेल जास्त असते. पण म्हणून डॉक्टरसाहेब म्हणतात तसे 'भरपूर तेलात भाज्या टाकून आचारी इतर कामे करीत बसतो' ह्यात कांही तथ्य नाही. पण पंजाबी पदार्थांमध्ये गरम मसाले, काजूपेस्ट, क्रिम, खायचे रंग इत्यादी घटक पदार्थ असतात त्यामुळे ते आपल्या घरच्या (मराठी) पदार्थांपेक्षा वेगळे आणि जास्त चवदार होतात.
In reply to गैरसमज. by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर साहेब, by सुबोध खरे
फार कमी हॉटेलात वडा पाव मिळतो.सहमत. मी सुद्धा हातगाडीवरील खाद्यपदार्थांबद्दल लिहीले आहे. गाडीवरील वडापाव, चायनिझ किंवा पाणीपुरी वगैरे खाल्यास आपण म्हणता तसा धोका नक्कीच संभवतो.
बहुसंख्य हॉटेलात रीफाइंड तेल म्हणजे रीफाइंड पाम तेल असते आणी फारच क्वचित सुर्यफुल किंवा दुसर्या उच्च दर्जाचे तेल असते.माझ्याही पाहण्यात अनेक उपहारगृह आहेत आणि त्यातूनच माझे मत बनले आहे.
माझे मत हे मी बर्याच कैम्पातील हॉटेल मध्ये माझ्या मित्राबरोबर( जो कैतोन्मेंत बोर्डाचा स्वास्थ्य अधिकारी होता) प्रत्यक्ष पाहून बनवलेले आहे. अर्थात हि गोष्ट २००६ ची आहे आणि आज त्यात बदल झाला असेलही(ज्याची शक्यता फारच कमी आहे.)तुम्ही कोठली उपहारगृह तपासली आहेत मला ठाऊक नाही पण मुसलमान मालकांच्या भटारखान्यात अस्वच्छता जास्त आढळते. किंवा एखादा पैशांचा लालची मालक असेल तर शक्य आहे. पण सहसा आपण ज्या उपहारगृहातून जात असतो ती साधारणतः 'सेकंड ग्रेड' पातळीची असतात. तिथे अशा गोष्टी घडत नाहित. शिवाय त्यांच्याकडे गिर्हाईके जास्त असल्याने पुन्हा पुन्हा तेच तेल वापरण्यासाठी उरतही नाही. जास्त गिर्हाईके त्यामुळे जास्त पदार्थ बनले जातात तिथे तेलाचा वारपही जास्त होतो. सारखे सारखे ताजे तेल वापरात येते. माझ्याकडे दिवसाला ८०० बटाटे वडे आणि ६०० समोसे तळले जातात. रोज तेलाचा नवा डबा वापरात येतो.
तेल जास्त वेळा तापवले आणि थंड केले कि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात शिवाय सर्व अन सैच्युरेटेड फैटी ऐसिड्चे विघटन होते हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले आहेह्यात जास्तवेळा हा फार महत्वाचा शब्द आहे.
बहुसंख्य हॉटेलात कढ्या काळ्या झालेल्या दिसतील कारण मोठ्या गैस वर तेल ठेवल्याने कढई ला लागलेले तेल जळून काळे होते आणि ते रोज रोज साफ करणे हे मोलाने घातलेली माणसे क्वचितच करताना आढळतात.लोखंडाची कढई ही, नवी कोरी आणल्यापासून, काळीच असते. आतून, ज्यात आपण तेल तापवतो, ती स्वच्छ आणि गुळगुळीत असते. बाहेरून मात्र अतिउष्णतेने खपल्या उडतात. कढई, बाहेरून, खडबडीत होते. पण कढईच्या बाहेरच्या भागाचा खाद्यपदार्थाशी संबंध येत नाही.
हेड शेफ आणि चार पाच आचारी हे फारतर २० टक्के हॉटेलना परवडेलखरं आहे माझ्या प्रतिसादात मी म्हंटलेच आहे सर्वांना शेफ परवडत नाहीत. तिथे मालक स्वतः लक्ष ठेवतो., पण ४-५ आचारी हे मध्यम आकाराच्या, जिथे आपण सर्वसाधारणपणे जातो, सर्वच उपहारगृहांना परवडते. पंजाबी पदार्थ बनविणारा एक आचारी असतो, चायनिझ बनविणारा एक असतो, रोटी, परोठा बनविणारा एक असतो, ज्यूस-सँडविच बनविणारा एक असतो, आणि एक ऑल राऊंडर (सर्व जाणणारा) असतो. हा मध्यम आकाराच्या उपहारगृहाचा बेसिक ढांचा असतो. पुण्यातील हॉटेल व्यवसायातील कर्मचार्यांची आपण मांडलेली रडकथा १०० टक्के खरी आहे. हल्ली शेफ ३० ते ३५ हजार पगार आणि नफ्यात वाटा मागतात. त्यांना टिकविण्यासाठी एवढा पगार आणि नफ्यात वाटा देणे फक्त मद्यविक्रीचा परवाना असणार्या उपहारगृहांनाच शक्य होते. तरीपण, मुख्य मुख्य कर्मचार्यांना टिकविण्याच्या अनेक क्लृप्त्या असतात.
हॉटेल व्यवसायात अन्न पदार्थाची किंमत हि प्रत्यक्ष व्हेज डिशच्या किमतीच्या दहा टक्के आणि नोन व्हेज दिश च्या वीस टक्केच आहे. बाकी सर्व किंमत हि वरकड खर्चाची( overheads) येतेआपण म्हणता तशी व्हेज पदार्थांची किंमत फक्त इडली, डोसा, मेदूवडा वगैरे दाक्षिणात्य पदार्थांबाबत असते. पंजाबी व्हेज पदार्थ १० टक्के किमतीत होत नाहीत. नॉन व्हेज च्या किमती तर आकाशाला भिडल्या आहेत. व्हेज मध्येही डाळी, भाज्या, कांदे ह्यांचे बाजारभाव काय आहेत हे तुम्हाला माहित असेलच.
आपण लिहिलेली वस्तुस्थिती फक्त A ग्रेड किंवा पंच तारांकित हॉटेलातील आहे.मी जी उपहारगृह भारतात आणि मस्कत मध्ये चालविली आणि ज्यांच्या बळावर जो कांही अनुभव मिळवला आहे तो मध्यम आकाराच्या उपहारगृहाचा आहे.
पंच तारांकित हॉटेलातून सुद्धा आणलेल्या पार्सल मध्ये तेल किंवा बटर तरंगत असतेच.माझा तसा अनुभव नाही. तेल जास्त असते असा शब्दप्रयोग स्विकारण्याजोगा आहे. पण तेल बटर तरंगत असते ह्याच्याशी सहमत नाही. तुम्ही बटर चिकन, बटर पनीर, व्हेज. माखनी असे पदार्थ बाहेरून आणलेत तर त्यात नांवातच सुचविल्याप्रमाणे बटर जास्त असते.
पण तसे घरी केलेल्या पदार्थात फार क्वचित होते याचे कारण दुसरे काही असेल तर आपण सांगू शकाल.( मला तरी दुसरे काहीही कारण दिसत नाही).हॉटेलच्या कांही पदार्थात तेल, बटर जास्त असते ह्याचा उल्लेख वर आला आहेच. घरचं जेवण केंव्हाही आरोग्यदायी असतं. घरी आपण आरोग्य सांभाळतो. उपहारगृहात चव सांभाळली जाते. पण ह्याचा अर्थ सर्व उपहारगृह आरोग्यास घातकच असतात असा नाही. घरातही एकदा तेलात पुर्या तळल्या तर उरलेले तेल आपण फेकून देत नाही. भाजीत, फोडणीत वापरले जातेच. पंजाबी पदार्थांमध्ये वापरले जाणारे काजू पेस्ट, चारमगज पेस्ट, क्रिम, खायचे रंग, गरम मसाले घरच्या पदार्थांमध्ये वापरले जात नाहीत. आपल्या मराठी पदार्थांमध्ये त्यात अंतर्भूत जिन्नस आणि करण्याच्या पद्धती सर्वस्वी वेगळ्या असतात. मीही विरोधाला विरोध म्हणून लिहीत नसून स्वानुभवाचे बोल म्हणून लिहीत आहे. आपणास पटत नसेल तर राहू द्यावे.
In reply to वस्तुस्थिती. by प्रभाकर पेठकर
In reply to आरोग्यपुर्ण खाणे व चविष्ट by प्रकाश घाटपांडे
In reply to एका प्रकारचे मीठ by पैसा
In reply to आणि ते एक कार्सिनोजेन (कॅन्सर by आदूबाळ
In reply to एम एस जी किंवा मोनो सोडियम by सुबोध खरे
In reply to डॉक्टरसाहेब लेख आवडला. पटला. by नरेंद्र गोळे
In reply to पर्यायी शब्द by प्रास
In reply to प्रसन्ना, हो. बरोबर आहे. by नरेंद्र गोळे
In reply to प्रसन्न? by प्रास
In reply to दिलगीर आहे! by नरेंद्र गोळे
In reply to डॉक्टरसाहेब लेख आवडला. पटला. by नरेंद्र गोळे
In reply to बरोबर by सुबोध खरे
आपली आई/ बायको ते तेल जरुरीपुरतेच घेते. आपली आई/ बायको जेंव्हा भाजी परतते...हं. 'अनाहिता'मधे, व्यनि/खरडींमधे याबद्दल काही चर्चा होते का याबद्दल एकशब्दिय (हो किंवा नाही) कुतूहल आहे.
तेंव्हा आपण जरी कितीही सुविकसित किंवा अत्याधुनिक असल्याचा दावा केला तरी अजून आपली आदिमानवाशी नाळ जोडलेलीच आहे.ओके ...
>