`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)
लेखनप्रकार
मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता)
__________________________________
मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील.
अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल. वेगवेगळ्या सिद्धांचं मनाविषयीचं आकलन, व्यक्तिमत्त्वाची घडण, आपली स्मृती, माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, मनाचा कल आणि व्यक्तिगत कौशल्य, संगीत, खेळ, फ्रॉइड आणि इतर दिग्गज मनोतज्ज्ञांचे विचार, मानवी नातेसंबंध, मनाचं हृदयाशी नातं (भावनिक विश्व : आनंद, नैराश्य, न्यूनगंड, अल्झायमर, आत्महत्या वगैरे), मानसिक धारणा, भक्तिमार्ग आणि इतर आध्यात्मिक मार्गातल्या मनापलीकडे नेणार्या साधना पद्धती आणि सरते शेवटी मनापासून मुक्ती असा लेखनाचा समग्र आवाका असेल.
____________________________
प्रथम मनाचं अत्यंत उघड स्वरूप समजावून घेऊ.
मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते. श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे.
संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ‘पहिली संवेदना’ हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.
(भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.)
मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे. मुक्त तर आपण ऑलरेडी आहोतच. मनाच्या प्रक्रियेमुळे आपण बंधनात असल्याचा भास होतोय आणि म्हणून मनाची प्रक्रिया जाणणं उपयोगी आहे.
मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही.
मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो.
मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्यात सापडतो आणि या कामात बर्याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं. पण इतक्या थोर लोकांनी सांगितलेली साधना व्यर्थ कशी असेल म्हणून लोक रोजरोज ध्यान करत राहतात. त्यांना ज्याम कंटाळा येतो, यांच्या साधनेमुळे बर्याच वेळा घरचे वैतागतात (कारण साधनाकालात घरात शांतता लागते) पण सांगणार कुणाला? . शेवटी ते गुरुंना विचारतात आणि गुरू सांगतात ‘साधना कमी पडते आहे, जास्त वेळ बसत चला’. अशी साधना जन्मभर केली तरी काही उपयोग होत नाही कारण साधकाला मनापासून मुक्ती मिळत नाही.
मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय. म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे.
ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.
हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय. ज्या क्षणी तुम्ही पहिला विचार जाणाल त्या क्षणी तुम्हाला कोणत्या संवेदनेनं तुमचा पहिला विचार निर्माण झाला ते कळेल. आणि मी संवेदना ही मनाची कारक आहे असं का म्हटलंय ते लक्षात येईल.
जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.
________________________________
‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ असं मनाचं अत्यंत कलात्मक वर्णन करणार्या काव्यपंक्तीचं श्रेय अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांना विनम्र अर्पण
________________________
पूर्वप्रकाशन : मनोगत
वाचने
47389
वाचनखूण
प्रतिक्रिया
211
In reply to असं आहे होय? by अर्धवटराव
तुमचा कॉम्प्युटर हँग झाला असेल?
In reply to तुमचा कॉम्प्युटर हँग झाला असेल? by संजय क्षीरसागर
याचा अर्थ...
In reply to क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी by मदनबाण
भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण
In reply to भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण by संजय क्षीरसागर
अरे हो! तुम्हाला वाटेल मी पुन्हा प्रश्न टाळला
तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून
In reply to तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून by लंबूटांग
लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे
In reply to लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे by संजय क्षीरसागर
??
In reply to ?? by कवितानागेश
तुम्ही संपादक आहात म्हणून सांगतो
In reply to तुम्ही संपादक आहात म्हणून सांगतो by संजय क्षीरसागर
होय!
ह्या धाग्यावर खुद्द लेखक
In reply to ह्या धाग्यावर खुद्द लेखक by यशोधरा
विषय काय आहे म्हणायचा?
In reply to विषय काय आहे म्हणायचा? by लंबूटांग
विषय ना? भुंगा कसा गुणगुणतो
In reply to विषय ना? भुंगा कसा गुणगुणतो by यशोधरा
नाही हो
In reply to नाही हो by संजय क्षीरसागर
मुळात गुणगुण आहे म्हणूनच ना?
In reply to मुळात गुणगुण आहे म्हणूनच ना? by यशोधरा
काय हो.. दोन देशांनी एकमेकांत
In reply to काय हो.. दोन देशांनी एकमेकांत by मोदक
ए बाबा, ते आमाला काय विचारते?
अपेक्षित शब्दांचे खेळ
In reply to अपेक्षित शब्दांचे खेळ by लंबूटांग
एक राहिलंच
भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा
In reply to भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा by मदनबाण
तुम्ही कमाल करताय!
In reply to तुम्ही कमाल करताय! by संजय क्षीरसागर
पण प्रस्तुत लेख ज्यांच्यासाठी
In reply to पण प्रस्तुत लेख ज्यांच्यासाठी by कवितानागेश
तुम्ही कन्क्लूजनला यायची घाई करताय :
In reply to तुम्ही कन्क्लूजनला यायची घाई करताय : by संजय क्षीरसागर
मी अजापजप या साधनेची फलश्रुती
In reply to मी अजापजप या साधनेची फलश्रुती by कवितानागेश
तुम्हाला मानवी मनाबद्दल सगळं काही कळतंय...
In reply to तुम्हाला मानवी मनाबद्दल सगळं काही कळतंय... by संजय क्षीरसागर
मनाचे अवलोकन करणं अगदीच
In reply to मनाचे अवलोकन करणं अगदीच by कवितानागेश
जपामुळे ज्या गोष्टी होतात असं तुम्ही खत्रीपूर्वक लिहिताय ...
In reply to जपामुळे ज्या गोष्टी होतात असं तुम्ही खत्रीपूर्वक लिहिताय ... by संजय क्षीरसागर
अजपाजप...
In reply to अजपाजप... by अर्धवटराव
`अजपाजप?'
In reply to `अजपाजप?' by संजय क्षीरसागर
नामात नाही कारण कोणतही नाम हा
In reply to नामात नाही कारण कोणतही नाम हा by कवितानागेश
अवांतर: तुम्ही कायम हे असे
In reply to अवांतर: तुम्ही कायम हे असे by बॅटमॅन
मुलांनो
In reply to नामात नाही कारण कोणतही नाम हा by कवितानागेश
तोच 'अजपाजप' असतो. अनाहत नाद असतो?
In reply to `अजपाजप?' by संजय क्षीरसागर
बरं...
In reply to जपामुळे ज्या गोष्टी होतात असं तुम्ही खत्रीपूर्वक लिहिताय ... by संजय क्षीरसागर
तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला
In reply to तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला by कवितानागेश
तुम्ही आता माहित नसलेल्या विषयावर लिहीताय!
In reply to तुम्ही आता माहित नसलेल्या विषयावर लिहीताय! by संजय क्षीरसागर
>> अनाहत नाद म्हणजे वैश्विक शांततेची तुम्हाला झालेली जाणीव.
In reply to >> अनाहत नाद म्हणजे वैश्विक शांततेची तुम्हाला झालेली जाणीव. by उन्मेष दिक्षीत
अनाहत
In reply to अनाहत by उन्मेष दिक्षीत
आपणच की
In reply to आपणच की by अभ्या..
ए गपे!
धागा वाचून mind मध्ये mind
आता प्रतिसादांची पण शंभरी
In reply to आता प्रतिसादांची पण शंभरी by प्यारे१
हो ना!
In reply to हो ना! by संजय क्षीरसागर
कोण हो..?? कोण ते आयडी..??
In reply to हो ना! by संजय क्षीरसागर
आयडी वेगैरे काही उगवत नाहीत
घोड्याला पाण्यापर्यंत आणता
In reply to घोड्याला पाण्यापर्यंत आणता by मदनबाण
जाऊ द्या हो बाणराव
In reply to जाऊ द्या हो बाणराव by अर्धवटराव
चखन्याला शाकाहारी काय आहे?
In reply to चखन्याला शाकाहारी काय आहे? by प्यारे१
व्हेज भेजा फ्राय
In reply to जाऊ द्या हो बाणराव by अर्धवटराव
सगळं रेडी हाए... येताय का...
In reply to घोड्याला पाण्यापर्यंत आणता by मदनबाण
घोड्याला पाण्यापर्यंत आणता येते पण त्याला पाणी पाजता येत नाही!
In reply to घोड्याला पाण्यापर्यंत आणता येते पण त्याला पाणी पाजता येत नाही! by संजय क्षीरसागर
मला निराकार गवसलायं
In reply to मला निराकार गवसलायं by कवितानागेश
एखादी गोष्ट निर्गुण-निराकार असेल तर ती गवसेल कशी काय?
In reply to एखादी गोष्ट निर्गुण-निराकार असेल तर ती गवसेल कशी काय? by संजय क्षीरसागर
निराकार ही जाणीवेचीच स्थिर
In reply to निराकार ही जाणीवेचीच स्थिर by कवितानागेश
त्यात मातीत ही सिस्टीम बंद
त्यात मातीत ही सिस्टीम बंद पडल्यावर मिसलणार आहे,मिसलणार म्हणजे काय गं..?In reply to त्यात मातीत ही सिस्टीम बंद by मोदक
अरे, ये मिसल नही जानता!!!!
In reply to निराकार ही जाणीवेचीच स्थिर by कवितानागेश
म्हणजे कोमा का?
In reply to म्हणजे कोमा का? by संजय क्षीरसागर
सिद्धत्व म्हणजे नक्की काय?
In reply to सिद्धत्व म्हणजे नक्की काय? by कवितानागेश
माझा फॉर्म अबाधित असेपर्यन्त माझे आयुष्य सुरळित चालावं
In reply to माझा फॉर्म अबाधित असेपर्यन्त माझे आयुष्य सुरळित चालावं by संजय क्षीरसागर
मला लेखात उपाय वगरै सापडला
In reply to सिद्धत्व म्हणजे नक्की काय? by कवितानागेश
मनाच्या बाहेर कशासाठी पडायचं?
In reply to सिद्धत्व म्हणजे नक्की काय? by कवितानागेश
मनाच्या बाहेर कशासाठी पडायचं?
आता चर्चा समाधानकारक झाली असेल....
In reply to आता चर्चा समाधानकारक झाली असेल.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला ही या गोंधळाची अपेक्षा होती
माझा आधिचा ओशो बद्दलचा
या धाग्यावर प्रतिसाद द्यायची
In reply to या धाग्यावर प्रतिसाद द्यायची by धन्या
या धाग्यावर प्रतिसाद द्यायची ईच्छा नव्हती!
In reply to या धाग्यावर प्रतिसाद द्यायची ईच्छा नव्हती! by संजय क्षीरसागर
तुम्ही माझा प्रतिसाद
In reply to तुम्ही माझा प्रतिसाद by धन्या
आता काय म्हणावे या ....पणाला? ;)
अनेक गोष्टी - लेखातल्या आणि
बाकी काही म्हणा, "रुणुझुणू
In reply to बाकी काही म्हणा, "रुणुझुणू by बॅटमॅन
नाकमुका नाकमुका ऑर चिंताता
In reply to बाकी काही म्हणा, "रुणुझुणू by बॅटमॅन
नाकमुका नाकमुका ऑर चिंताता
In reply to नाकमुका नाकमुका ऑर चिंताता by अभ्या..
नाकमुका पेक्षा चिंताता चिता
या धाग्यावरचे सगळे इश्यूज
In reply to या धाग्यावरचे सगळे इश्यूज by मोदक
अती घाई, संकटात नेई!
संक्षी...
In reply to संक्षी... by मोदक
बडे नासमझ हो.. ये क्या चाहते
In reply to बडे नासमझ हो.. ये क्या चाहते by पिलीयन रायडर
मोदका ,
फक्त मलाच सगळ्या विषयातलं सग्गळंच्या सगळं कळतं
आण़खी एक अर्थ
(No subject)
संक्षी म्हणजे ....
In reply to संक्षी म्हणजे .... by चौकटराजा
त्यासाठी आपल्याच मनाचे
In reply to त्यासाठी आपल्याच मनाचे by धन्या
सर्वसामान्य म्हणजे साधक आणि
अनंताकडे जाण्याचे
In reply to अनंताकडे जाण्याचे by अवतार
मार्गही अनंत असू शकतात.
In reply to मार्गही अनंत असू शकतात. by संजय क्षीरसागर
एकच मार्ग
In reply to एकच मार्ग by अवतार
उत्तम पोस्ट.
In reply to एकच मार्ग by अवतार
उत्तम पोस्ट.
In reply to एकच मार्ग by अवतार
सहमत