मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी बिभीषण एकटा

चाणक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती यांना न कसली नीती, यांना न कसली भिती तो जो ऊभा राहिला, अन्याय बोलण्या काही तो ही म्हणे आताशा, मद्यात धुंद राही कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...

वाचने 3156 वाचनखूण प्रतिक्रिया 18

चाणक्य Wed, 01/09/2013 - 11:42
आजुबाजूला घडू नयेत अश्या ब-याच गोष्टी घडताना मी बघतो. पण दुर्दैवाने ईच्छा असूनही परिस्थिती बदलता येत नाही, कारण माझी एकट्याची ताकद अपुरी पडते. रावणाच्या राज्यात असलेल्या बिभीषणा सारखी माझी अवस्था झाली आहे. बघवत तर नाही, पण एकट्याने काही करताही येत नाही. आजुबाजुला सगळेच रावणाधिष्ठीत....

स्पा Wed, 01/09/2013 - 12:16
सुंदर गझल हे तर
कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही
खासच

भन्नाट आहे. फिदा झालो मी या रचनेवर
पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
तुफान..

चेतन Wed, 01/16/2013 - 12:36
रचना आवडली अवांतर कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही येथे युधिष्ठीर आणि दुर्योधनाला भिष्मांनी सभेत शिरसावंद्य माणुस शोधण्याच्या प्रसंगाची आठवण झाली