त्यांच्या चष्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602
त्यांच्या चष्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद - http://www.misalpav.com/node/21729
त्यांच्या चष्म्यातून - भाग ३ - जनतेचा प्यारा अश्फाक - http://www.misalpav.com/node/21758
*******************************************************************************************************
पूर्वपिठीका -
अश्फाक उल्ला खान : मात्रुभूमीच्या चरणांवर रक्त सांडून हसत फाशी जाणारा पहिला मुसलमान
त्याला हुसेन नावच्या ब्रिटिशांच्या नोकर पोलिसाने एक मिलियन डॉलर क्वेश्चन विचारला होता.
एक डाव रडीचा. धर्माच्या सौदेबाजीचा. हुसेन म्हणाला - " अश्फाक नीट विचार कर. तू एक मुसलमान आहेस. या देशात ७ करोड मुसलमान रहातात आणी २२ करोड हिंदू. गांधी लोकशाहीच्या बाता मारतो. या कफिर हिंदूंच्या नादी लागून तू ब्रिटिशांविरूद्ध लढतोयस. ...इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...."
अश्फाकने हुसेनच्या धार्मिक आवाहनाला भीक घातली नाही. पण ब्रिटिश इंडियातल्या मुस्लिमांपुढे तो मिलियन डॉलर क्वेश्चन आ वासून उभा होता.
इंडीयातून ब्रिटीश निघून गेले तर ? २२ कोटी हिंदू लोकशाही मार्गानी हिंदू इंडीया बनवतील...."
*******************************************************************************************************
यांच्या चष्म्यातून - भाग ४ - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार
(संदर्भ : काँग्रेस आणी गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? प्रा शेषराव मोरे , राजहंस प्रकाशन.)
*******************************************************************************************************
१५ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या फाळणीला जवाबदार कोण ? हा प्रश्न गेली गेली ६५ वर्षे हिंदुस्थानी विचारवंतांना छळतो आहे. हिंदुत्ववादी अखंड हिंदुस्थानचा जप करत यासाठी गांधींच्या अहिंसक स्वभावाला जवाबदार ठरवतात. तर सेक्यूलर विचारवंत फाळणीसाठी संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद आणी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाला दिलेली मान्यता या गोष्टी दोषपूर्ण मानतात.
प्रा शेषराव मोरेंनी त्यांच्या वास्तववादी चष्म्यातून तब्बल ३२० ग्रंथांचे पुरावे देत - फाळणीचे श्रेय कुणाला द्यायचे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल.
त्याआधी फाळणी आणी द्विराष्ट्रवाद या एकमेकांच्या संपूर्ण विरोधी मागण्या आहेत हे वास्तव समजवून घेतले पाहिजे.
फाळणी हे हिंदूच्या इतिहासातले एक सोनेरी पान होते आणी द्विराष्ट्रवाद हे हिंदूच्या गुलामिचे बायबल होते हेही समजून घ्यावे लागेल.
ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते. अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या आसपास जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का?
सावरकर स्वतः पोथीवादी न्हवते. त्यांच्या अखंड भारताच्या पोथीला देव्हार्यात ठेवून पूजा करणारे कधी हिंदूच्या वास्तव परिस्थितीकडे डोळे उघडून बघतील काय ?
फाळणीमुळे अखंड भारताच्या धोक्यापासून हिंदूंचे रक्षण झाले. हे वास्तव समजून घेतले पाहिजे.
द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील.
मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. भारत स्वतंत्र झाला की लोकशाही आलीच. संख्येच्या बळावर हिंदू ही राज्यकर्ती जमात बनेल. डोक्याचे वजन न मोजता डोक्यांची फक्त संख्या मोजणारी भुक्कड लोकशाही सय्यद अहमदांना मान्य न्हवती. हिंदू आणी मुसलमान हे भारत नावाच्या वधूचे दोन सुंदर डोळे आहेत म्हणून राजकीय सत्तेचे वाटप दोन्ही डोळ्यांना समान झाले पाहिजे. आणी म्हणूनच सर्व सत्ताकेंद्रात (लोकसभा ते ग्रामपंचायत) ५० % राखीव जागा मुस्लिमांसाठी असल्या पाहिजेत असे सय्यदांचे म्हणणे होते. ३०% मुस्लिमांसाठी ५०% जागा आणी हिंदूच्या भावनेसाठी अखंड भारत. असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे.
मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली !
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:!
(अर्थः सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा माणूस अर्ध्याचा त्याग करतो आणी उरलेल्या अर्ध्या चा स्वीकार करतो ! )
हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे.
गंम्मत म्हणजे अखंड भारतवादी असलेले सावरकर बोलण्याच्या ओघात; हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून म्हणाले होते - हिंदू आणी मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत.
परस्पर बंधुभाव आणी परराष्ट्राविषयी राग हे जर राष्ट्राचे प्रमुख गुणधर्म मानले तर राष्ट्र कोण आहेत ? हिंदू की मुसलमान ?
खरे पाहता हिंदू समाजात आणी धर्मात तुलनेने राष्ट्रवादी गोष्टी कमी आहेत. हिंदूधर्माची मूलभूत शिकवण - परधर्म सहिष्णुता विरुद्ध इस्लामी जिहाद आणी उम्मत( कुराणसिद्ध मुस्लिम बंधुभाव) विरुद्ध हिंदू ची जातिव्यवस्था. ही लढाईच विषम आहे. हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते.
फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली. अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले.
पुढे सावरकरांनी एक व्यक्ती एक मत अशा खर्या लोकशाहीचा वारंवार पुरस्कार केला. मुस्लिमांची ५० % ची मागणी धुडकावून लावली. पण लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिमांना राखिव मतदारसंघ देण्याची सावरकरांची तयारी होती. जर भारत अखंड राहिला असता तर...... आज मुस्लिमांना त्यांच्या आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती टक्के राखिव मतदारसंघ (सावरकरांच्याच मते) द्यावे लागणार असते ? जवळ जवळ ४० %. इतर अल्पसंख्य आणी हिंदूतले फुटीर गट यांच्या सहाय्याने भारतात लोकशाही मार्गाने इस्लामी राजवट आली असती. आज जर पुन्हा अखंड भारत बनवला तर ते जगातले सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र बनेल.
गांधींनी हे ओळखले होते.
मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. पण टिळकांचा लखनौ करार मात्र विसरतात. काय होता लखनौ करार ?
काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाचा पाया टिळकांनी घातला आहे. तो म्हणजे लखनौ करार
(वास्तविक परिस्थिती अशी होती की तत्कालीन हिंदू समाजात लोकमान्य किंवा महात्मा व्हायचे असेल तर वाढीव परधर्म सहिष्णूपणा दाखवणे आवश्यकच होते. अन फाळणीही तत्कालीन राजकीय परिस्थित अपरिहार्य होती कशी ? सावरकरांनी लटका विरोध केला. डॉ. अंबेडकरांनी फाळणीचे उघड समर्थन केले. गांधींनी ती देउन टाकली. का ? ते पुढील भागात)
१) अलिगडचा लखनौ करार आणी देवबंदची सश्स्त्र क्रांती.
क्रमशः
आगामी : यांच्या चष्म्यातून - भाग ४ (ब) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार
गांधींनी हे ओळखले होते.
मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. पण टिळकांचा लखनौ करार मात्र विसरतात. काय होता लखनौ करार ?
काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाचा पाया टिळकांनी घातला आहे. तो म्हणजे लखनौ करार
(वास्तविक परिस्थिती अशी होती की तत्कालीन हिंदू समाजात लोकमान्य किंवा महात्मा व्हायचे असेल तर वाढीव परधर्म सहिष्णूपणा दाखवणे आवश्यकच होते. अन फाळणीही तत्कालीन राजकीय परिस्थित अपरिहार्य होती कशी ? सावरकरांनी लटका विरोध केला. डॉ. अंबेडकरांनी फाळणीचे उघड समर्थन केले. गांधींनी ती देउन टाकली. का ? ते पुढील भागात)
१) अलिगडचा लखनौ करार आणी देवबंदची सश्स्त्र क्रांती.
क्रमशः
आगामी : यांच्या चष्म्यातून - भाग ४ (ब) - काँग्रेसची फाळणी - हिंदूंवर उपकार
वाचने
38264
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख पुन्हा वाचला जाईल,हा भाग
अतर्क्य व अशक्य !
बरोब्बर
In reply to अतर्क्य व अशक्य ! by तर्री
" लखनऊ करार झाला तेंव्हा
In reply to अतर्क्य व अशक्य ! by तर्री
कुठलाही न्यून गंड बाळगू नका
In reply to " लखनऊ करार झाला तेंव्हा by शैलेन्द्र
इतका सरळ प्रश्न जिव्हारी
In reply to कुठलाही न्यून गंड बाळगू नका by तर्री
हा विनोद आहे हो ....
In reply to इतका सरळ प्रश्न जिव्हारी by शैलेन्द्र
विदा आणी पुरावे नकोच आहेत, पण
In reply to हा विनोद आहे हो .... by तर्री
माफ करा, लेख गंडल्यासारखा
खर आहे.
In reply to माफ करा, लेख गंडल्यासारखा by अन्या दातार
हम्म
लेख उत्कंठावर्धक पण बराच
सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली
खैबर खिंडीतून पहिले रानटी
पर्वणी...
छान सुरुवात
पटकन पुढचा भाग टाका. वाट बघतो
पटकन पुढचा भाग टाका. वाट बघतो
"हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात "
शिष्यवृत्ती मिळाली ती देण्यात
In reply to "हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात " by तर्री
हे पुस्तक आजच विकत आणलंय.
नरहर कुरूंदकरांच्या जागर
आज स्वतंत्र भारतात याहून काय
In reply to नरहर कुरूंदकरांच्या जागर by अप्रतिम
वाचतो आहे.
धर्म आणि राजकारण...
डॉ. फार बंरं केलत हो ,लिखमामा
आफ्टरथॉट
सावरकरांचा अखंड भारताचा पर्याय आणि आंबेडकर
In reply to आफ्टरथॉट by विकास
म्हणूनच
In reply to सावरकरांचा अखंड भारताचा पर्याय आणि आंबेडकर by दीपक साळुंके
थोडक्यात. १. हिंदू जमातीकडे
अयो
In reply to थोडक्यात. १. हिंदू जमातीकडे by llपुण्याचे पेशवेll
पुप्याशी आणि राजघराण्याशी सहमत
In reply to अयो by राजघराणं
फाळणीचे श्रेय
+१, मलाही नक्की हेच म्हणायचे
In reply to फाळणीचे श्रेय by क्लिंटन
+२ क्लिँटनशी सहमत पुभाप्र
In reply to +१, मलाही नक्की हेच म्हणायचे by शैलेन्द्र
आज अफगाणिस्तानात अमेरिकेचे
In reply to फाळणीचे श्रेय by क्लिंटन
हे पाकिस्तानला लागू होते
In reply to आज अफगाणिस्तानात अमेरिकेचे by इष्टुर फाकडा
सविस्तर प्रतिसाद आवडला.पण
In reply to फाळणीचे श्रेय by क्लिंटन
काश्मीर खोरे
In reply to सविस्तर प्रतिसाद आवडला.पण by अप्पा जोगळेकर
फुटीर तत्वांना फूस लावली याचा
In reply to काश्मीर खोरे by क्लिंटन
काय सांगता?
In reply to फुटीर तत्वांना फूस लावली याचा by अप्पा जोगळेकर
मूळ धाग्यापासून विषय भरकटत
In reply to काय सांगता? by क्लिंटन
लेख आणि प्रतिक्रिया एका दमात
In reply to फाळणीचे श्रेय by क्लिंटन
जर तर च्या गोष्टी !
हा हा
In reply to जर तर च्या गोष्टी ! by तर्री
गांधी नेभळट ?
In reply to हा हा by क्लिंटन
आश्चर्य
In reply to गांधी नेभळट ? by तर्री
पटेलांचा राजीनामा
In reply to हा हा by क्लिंटन
?
In reply to पटेलांचा राजीनामा by आदिजोशी
तर्री, विनोद म्हणुन लिहीलय की
In reply to जर तर च्या गोष्टी ! by तर्री
. जर तर च्या गोष्टीतून
In reply to जर तर च्या गोष्टी ! by तर्री
. जर तर च्या गोष्टीतून
In reply to जर तर च्या गोष्टी ! by तर्री
आज कश्मीर
In reply to . जर तर च्या गोष्टीतून by अप्पा जोगळेकर
आक्षेपार्ह प्रतिसाद !
In reply to . जर तर च्या गोष्टीतून by अप्पा जोगळेकर
आक्षेपार्ह वाटला नाही...
In reply to आक्षेपार्ह प्रतिसाद ! by तर्री
उपरोध
In reply to आक्षेपार्ह प्रतिसाद ! by तर्री
मनोबा तुमचा नाही नाही आ.जोंचा !
In reply to आक्षेपार्ह प्रतिसाद ! by तर्री
समजून घ्या हो . (सिरीअस्लीच आहे ते )
वाचनीय लेखमाला..
वाचनीय लेखमाला..
गांधीजींनी हिंदुस्थानात हिंदू
तर्क फारसा पटला नाही
फाळणीचा जनमानसावर आघात इतका
In reply to तर्क फारसा पटला नाही by ऋषिकेश
खरं तर गान्धींना फाळणीसाठी
In reply to फाळणीचा जनमानसावर आघात इतका by हारुन शेख
एक आक्षेप नेहमीचा मात्र दुसरा.. :(
In reply to खरं तर गान्धींना फाळणीसाठी by आनन्दा
चर्चा !!
In reply to एक आक्षेप नेहमीचा मात्र दुसरा.. :( by ऋषिकेश
निष्कर्ष?
In reply to चर्चा !! by अर्धवटराव
थोडं डिप्लोमॅटीक उत्तर...
In reply to निष्कर्ष? by सुनील
दंगलग्रस्त भागात जाऊन बसणे म्हणजे "प्रश्न हाताळणे नव्हे"
In reply to एक आक्षेप नेहमीचा मात्र दुसरा.. :( by ऋषिकेश
गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे
In reply to खरं तर गान्धींना फाळणीसाठी by आनन्दा
उत्तम !!!
In reply to गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे by क्लिंटन
क्लिंटनराव! उत्तम काम केले
In reply to गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे by क्लिंटन
अरेरे...
In reply to गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे by क्लिंटन
आणखी काही पुरावे
In reply to गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे by क्लिंटन
क्लिंटन यांनी तुणतुणे जोडल्यावर आता,
In reply to गांधीजी आणि ५५ कोटींचे तुणतुणे by क्लिंटन
माझे मत
मग काश्मीर मध्ये काय झाले?
In reply to माझे मत by हारुन शेख
तर्री ...आपले प्रश्न
In reply to मग काश्मीर मध्ये काय झाले? by तर्री
बरोबर ...अगदी बरोबर.
In reply to तर्री ...आपले प्रश्न by अत्रुप्त आत्मा
उत्तरं
In reply to मग काश्मीर मध्ये काय झाले? by तर्री
९० च्या दशकात पाकिस्तानने
In reply to उत्तरं by हारुन शेख
सत्य आहे...
In reply to ९० च्या दशकात पाकिस्तानने by इष्टुर फाकडा
आंगाश्शी!!!!!!!!!! याचा
In reply to सत्य आहे... by मन१
better, a change has to come within
In reply to आंगाश्शी!!!!!!!!!! याचा by बॅटमॅन
१००० % सहमत.
In reply to better, a change has to come within by मन१
सगळा दोष फाळणीवर टाकला कि
In reply to ९० च्या दशकात पाकिस्तानने by इष्टुर फाकडा
@ हारुन शेख : Kudos !!
In reply to सगळा दोष फाळणीवर टाकला कि by हारुन शेख
मी काश्मीरमध्ये जे होतंय याचा
In reply to सगळा दोष फाळणीवर टाकला कि by हारुन शेख
भावना पोचल्या.
In reply to मी काश्मीरमध्ये जे होतंय याचा by इष्टुर फाकडा
गुजरात मध्ये काय झाले ते सगळ्यांना ठाऊक आहेच.
In reply to उत्तरं by हारुन शेख