मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लग्न पाहवे करून पार्ट -२

विवेकखोत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सर्व प्रतिसाद व सुचना लक्षात घेणून लिहिण्याचा दुसरा प्रयत्न करत आहे. (काही चुकल्यास क्षमा असावी. ) माझे आजोबा नेहमी म्हणायचे कि "लग्न पाहावे करून , घर पाहावे बांधून " या गोष्टी आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणतात . घर अहून बांधायचे आहे पण लग्न मात्र करतो आहे . हा तर मंडळी माझा सांगायचा उद्देश असा होता कि enganement चा प्रवास हा खूप छान होता. असा काही नाही हे अनुभवणारा मी एकमेव व्यक्ती आहे. पण माझ्या साठी हा एक वेगळा अनुभव होता. लग्न आपल्या कडे एक कुटुंब संस्था म्हणून प्रचलित आहे. म्हणजे नुसते सोबत राहून (लीवइन ) खरच ती भावना, ते प्रेम किंवा जे बंधन आहे ते निर्माण होते का ? विषयांतर करत नाही पण जे लोक लग्नाची इंनिंग सुरु करता तेच खूप मोठी खेळी खेळतात. मला तर खूप छान vaatte आहे कि आपल्या सोबत अजून एक व्यक्ती आहे हक्काची जी नेहमी मला एक प्रेरणा स्थान असेल. माझ्या मध्ये बरेच चांगले बदल झाले आहेत. लग्न आपल्याला एक जोडीदार देतो , प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभा राहनारा एक व्यक्ती देतो, सांभाळून घेणार आपला माणूस देतो. आयुष्य एक नवे वळण घेते. अजून तर माझे लग्न बाकी आहे तरी पण आयुष्याची नवी खेळी सुरु करताना मनावर एक प्रकारचे दडपण आले होते, तरी पण तिने (वाग्दत्त वधू) मला त्या tension मधून लीलया बाहेर काढले मला समजून घेतले. कबुल आहे कि आई वडील आपले बहिण भाऊ सगळ्या सोबत राहत असताना आपण त्या म्हणजे जोडीदाराच्या प्रेमात इतके लवकर कसे काय पडतो. जे कारण मला जाणवले ते म्हणजे communication gap . किवा आदर म्हणावा त्या मुळे जेवढे मोकळे आपण जोडीदारासोबत बोलतो तेवडे पालकांच्या close नसतो. पण असो माझ्या साठी तर लग्न हि गोष्ट खूप छान बदल घेऊन आली आहे. माझी career growth पण छान झाली. कॉलेज मध्ये असताना जो माझ्या तला कवी व लेखक (म्हणू शकता ) जो कामाच्या रगाड्यात मेला होता, तो तिच्या मुळे जागा झाला व मी माझा पहिला वाहिला पोस्ट लिहिला आणि खरच खूप छान प्रतिसाद पण मिळाले. वाटले नव्हते कि इतके लोक वाचतील पण खरच मी.पा. चा खूप आभारी आहे. मला रोज निशी लिहिण्याची सवय पण तिने लावली. तुमी म्हणत होता कि आता पासून बायकोचे ऐकता, पण जर चांगल्या सवयी जोपासत असतील तर काय हरकत आहे. आणि त्या रूपाने मी. पा. ला एक नवीन लेखक पण मिळाला (हि हि हि ). तर मंडळी आयुष्याची नवीन खेळी साठी मला तुमच्या सर्वाच्या आशीर्वादा ची आणि शुभेछ्या ची गरज आहे.

वाचन 21444 प्रतिक्रिया 84

विवेकखोत Wed, 11/30/2011 - 16:24
सर्व प्रतिसाद व सुचना लक्षात घेणून लिहिण्याचा दुसरा प्रयत्न करत आहे. (काही चुकल्यास क्षमा असावी. कारण आता लिहिण्याची खुमखुमी स्वस्थ बसू देणार नाही )

इंटरनेटस्नेही Wed, 11/30/2011 - 16:28
चांगलं लिहिलं आहेत. प्रामाणिक आणि ओघवते लेखन. फक्त लेखनाचा एकंदरीत टोन हा थोडासा दैनंदिनी छाप वाटतो आहे तो सुधारल्यास अजुन चांगले वाटेल. शिवाय शुद्धलेखनाच्या किरकोळ चुका देखील टाळत्या येण्याजोग्या आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

विवेकखोत Wed, 11/30/2011 - 16:46
अहो पहिला धागा खूप दिवसा पूर्वी लिहिला होता पण तांत्रिक करणा मुळे तो प्रसिद्ध नाही झाला असो तुमाला जर लेखन प्रकार आवडला नसेल तर क्षमा असावी पण लिहिता लिहिता चांगले लिखाण जमेल (अर्थात तुमच्या मार्गदर्शनामुळे)

In reply to by विवेकखोत

मेघवेडा Wed, 11/30/2011 - 16:53
ह्या वर्षाअखेर संपन्न होणार्‍या 'मिपारत्न' सोहळ्यात, श्री. परिकथेतील राजकुमार ह्यांना 'मार्गदर्शकरत्न' पुरस्काराने सन्मानीत करावे असा ठराव मी मांडत आहे. रत्नपारखी

पियुशा Wed, 11/30/2011 - 16:35
अर्र.................. फार घाई केलीत धागा टाकण्याची ! महिनाभर तर जाउ द्यायचा होतात की ;) असो.... . आमचे आशीर्वाद आहेतच हो ;)

In reply to by पियुशा

किचेन Wed, 11/30/2011 - 16:56
आमचे आशीर्वाद आहेतच हो पियू तुझ वय सांग त्यांना.नाहीतर मी जशी वप्याला काका बोलले होते तसा हा तुला काकू बोलेल! ;)

किचेन Wed, 11/30/2011 - 16:42
'लग्न पाहावे करून , घर पाहावे बांधून'...अगदी बरोबर! थोडस अवघड आहेच. साखरपुडा ते लग्न हा प्रवास सर्वांसाठी सुखाचाच असतो.हक्काचा,समजूतदार जोडीदार मिळाला याचा आनंद गगनात मावत नाही.रोज रात्री फोने वर तासान तसं घालवायचे, साप्तःशेव्ती खडकवासला,मुळशी...गेला बाजार एखादी बाग शोधून मस्त गप्पा मारत बसायच्या.मग एकमेकांबद्दल,एकमेकांच्या आवडी निवडी कळायला लागतात.लग्नाआधी अरे किती वेगळी आणि युनिक आहे हि अस वाटत.पण..... लग्नानंतर नवेपण संपल कि तेच रोजच स्वयंपाक,डबा, ऑफिस, बस... दमून भागून घरी आल्यावर एकत्र चा प्यायलाही वेळ नाही.गप्पांच सोडाच. विक एन्डला मस्त ताणून द्यायची किवा अठ्वादाभाराची काम अटपायची,मग कुठे उरतोय बाहेर जायला वेळ.आपली हि किवा आपला हा काहीही वेगळा नाही ,इतरांसारखाच आहे.काहीही युनिक नाहीये त्यात. तुम्ही अस होऊन देऊ नका.संभाषण खूप म्हन्त्वाच! हळुवार गप्पा चालू द्या.चर्चा असेल तर तिला स्वतःच मत मांडण्याची मुभा द्या.तीच पूर्ण बोलून झाल्यावर तुम्ही बोला.फार लांब जायला जमत नसेल तर जेवणानंतर एक फेरी तरी होऊ द्यात. एवढ अवघड नसत हो! एकमेकांना समजून घेण महत्वाच.फ़्रिक़्वेन्सि जुळली कि झाल! :)

In reply to by किचेन

रेवती Wed, 11/30/2011 - 21:21
तिला स्वतःच मत मांडण्याची मुभा द्या. अहो तै, माझ्याही नवर्‍यानं मला माझं मत मांडायची मुभा दिली (म्हणजे मी घेतली). आता फक्त माझच मत असतं. बघा बुवा! खोतसाहेबांना नंतर त्यांचं काही मत होतं हेच आठवणार नाही.;)

In reply to by रेवती

स्पंदना गुरुवार, 12/01/2011 - 06:07
धमाल गो बाय !! पण रेवती अस जर का सगळ उघड केल तर मग हे बकरे खाटका कड यायचे कसे? स्वतःच पोट भरल म्हणुन दुसर्‍यां आपल्या जातीच्या पाशवी शक्तींना उपाशी ठेवुन चालेल का? खर तर +++१ लिवायला पायजे , लिवल घे!

In reply to by विवेकखोत

कपिलमुनी Wed, 11/30/2011 - 16:55
नवा नवरा तुम्ही !! साहजिक आहे भावना उचंबळून येणे ...लिहित चला.. फक्त सलग दोन लेख सारखेच आले ..दैनंदिनी सारखा वाटला म्हणून लिहिला .. छान कविता लिहा .. किंवा लव्ह लेटर लिहा ..खुप काळ झाला हो लव्ह लेटर वाचुन ..होउन जौ द्या एक फर्मास !!

मोहनराव Wed, 11/30/2011 - 16:46
साहेब हा तुमचा ब्लॉग नाही...नविन धाग्यात नविन असे काहीच नाही असे मला वाटते. आता तुमचा हा दुसरा धागा म्हणुन सांगतो.. शुद्धलेखनाच्या चुका वेळीच सुधारा. पुर्वद्रुश्य पाहुन मग प्रकाशित करा. (मिपाकर सगळ्यांचेच स्वागत करतात..पण वेळीच चुका सुधारल्या नाहीत तर फाट्यावरपण मारतात.)

In reply to by कपिलमुनी

५० फक्त Wed, 11/30/2011 - 17:32
+१०० टु कपिलमुनी, सांगाच किचेन्तै खरं कोण म्हणालं तुम्हाला असं, उगा मिपाकरांना बदनाम करु नका , किमान संमंकडे तक्रार तरी करा याची.

In reply to by मोहनराव

मी-सौरभ Wed, 11/30/2011 - 23:48
>>ते सध्या कश्शा कश्शाला म्हणुन घाबरणार नाहीत हो.. प्रेमात आहेत ते!! थोडं दमा मग बगा बायकूला कसं घाबरत्यात ते... ५० फक्त: तुमचं काय म्हनन??????

In reply to by मी-सौरभ

५० फक्त गुरुवार, 12/01/2011 - 00:07
'थोडं दमा मग बगा बायकूला कसं घाबरत्यात ते..' - आधी या दुअर्थी स्टेटमेंटचा अर्थ समजवा, एक दोन स्वल्पविराम टाकले ना तर प्रतिसाद गायब करायची ताकद आहे ह्यात. असो, आमचं म्हंणणं काय आहे याचा मसुदा करुन बायकोकडं दिला आहे आमच्या, तिच्याकडुन मंजुर होउन आला की लगेच इथं टंकतो.

विजुभाऊ Wed, 11/30/2011 - 17:03
बिंदास ल्ह्या हो खोत भु. हित्ले लोक तुमची खिट्टी काढायचा चान्सच बगतील. तुमी त्याना अज्याबात इकेट द्यू नका. हितली मंडळी तशी थोडी थट्टेखोर आहेत. अज्याबात घाब्रु नका.

सर्वसाक्षी Wed, 11/30/2011 - 17:08
पार्ट २ हे शिर्षक वाचुन दुसर्‍या आवृत्ती विषयी काही वाचायला मिळेल अशीअपेक्षा होती... असो. ता. क, - 'खेळी' या शब्दाचा आपल्यावर विलक्षण प्रभाव दिसतो. आपण कुठले खेळ खेळता?

५० फक्त Wed, 11/30/2011 - 17:43
जरा जास्तच झाल म्हणुन हे प्वाईंटवाईज लग्न आपल्याला एक जोडीदार देतो , प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभा राहनारा एक व्यक्ती देतो, सांभाळून घेणार आपला माणूस देतो. - पालक किंवा भाउ बहीण हे करत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला ? आयुष्य एक नवे वळण घेते. अजून तर माझे लग्न बाकी आहे तरी पण आयुष्याची नवी खेळी सुरु करताना मनावर एक प्रकारचे दडपण आले होते, तरी पण तिने (वाग्दत्त वधू) मला त्या tension मधून लीलया बाहेर काढले मला समजून घेतले. - अशा गोष्टी करायचा काही पुर्वानुभव आहे का काय त्यांना ? कबुल आहे कि आई वडील आपले बहिण भाऊ सगळ्या सोबत राहत असताना आपण त्या म्हणजे जोडीदाराच्या प्रेमात इतके लवकर कसे काय पडतो. जे कारण मला जाणवले ते म्हणजे communication gap - नाही कम्युनिकेशन गॅप नाही, शरीर संबंधांचं आकर्षण, महत्वाचं. हे तुम्हाला तुमच्या इतर स्त्रियांबद्दलही असु शकते पण ते तुम्ही मांडु शकत नाही मोकळेपणानं. . किवा आदर म्हणावा त्या मुळे जेवढे मोकळे आपण जोडीदारासोबत बोलतो तेवडे पालकांच्या close नसतो. - याला कम्युनिकेशन गॅप पेक्षा आय अ‍ॅम बेटर मॅन ' हा इगो असतो, विशेषतः वडिलांबरोबर, भावांबरोबर बोलता वागताना.

In reply to by ५० फक्त

वपाडाव Wed, 11/30/2011 - 18:23
का हो एवढें पिटाळुन सोडताय त्येला.... चालायचंच..... अवांतर :: खोतांच्या जीवनात कधी कोकणात कणकवली पर्यंतचा प्रवास झालेला दिसत नाही.....

In reply to by कपिलमुनी

धमाल मुलगा Wed, 11/30/2011 - 20:41
आमचं कोल्लापूरावर जास्त प्रेम. त्यामुळं खोत म्हणलं की 'पिऊन हाल्ट झालेला, एकदम फुल टॉस्स' राऊ खोत आठवतो आम्हाला. :)

In reply to by स्पंदना

धमाल मुलगा गुरुवार, 12/01/2011 - 11:19
काय कारन सांगून होतंय होय? कारनं लाऊन केलं तर त्ये प्र्येम नस्तंय सोड. कारनं सांगिटलो तर त्ये प्र्येम र्‍हात न्हाई खरं! :)

In reply to by धमाल मुलगा

गवि गुरुवार, 12/01/2011 - 11:27
"सांगिटलो" आणि शेवटचं "खरं" यामुळे शंभर टक्के कोपूप्रेमाची खात्री पटली.. (शिवाजी युनिव्हर्सिटी पासाऊट)- गवि

In reply to by रामदास

कपिलमुनी गुरुवार, 12/01/2011 - 09:30
कोपरापसुन नमस्कार ... बाकी विवेक खोतांच्या रुपात मि पा ला एक तुफान विनोदी लेखक लाभला आहे ..

In reply to by रामदास

धमाल मुलगा गुरुवार, 12/01/2011 - 11:15
वा र लो! हसता हसता, बसल्या खुर्चीतून कोसळलो राव! ओ रामदासकाका, च्यायला, प्रतिसादापुर्वी 'वैधानिक इशारा' देत चला हो. :D

In reply to by ५० फक्त

अन्या दातार Wed, 11/30/2011 - 18:24
>>लग्न आपल्याला एक जोडीदार देतो , प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभा राहनारा एक व्यक्ती देतो, सांभाळून घेणार आपला माणूस देतो. - पालक किंवा भाउ बहीण हे करत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला ? पालक्/भाऊ-बहिण सांभाळून घेत नाहीत असे नाही, पण नातं आड येत असावे. प्रत्येकाची लेव्हल एकच असत नाही. कुणी लहान असते किंवा मोठे. एकाच वयाचे असतील तर जरा ठिक आहे. >>आय अ‍ॅम बेटर मॅन ' हा इगो माझ्यामते जोडीदाराबरोबर बोलताना येत असावा. सहमत.

दंपत्यो: अविच्छिन्ना प्रीतिरस्तु...। :-) ह्या आणी त्या कायमच्या गाठ पडणाय्रा दोन्ही धाग्यांबरोबर आपला संसार प्रीतिमय,सुखाचा होवो.... :-) हिच सदिच्छा...! जवळ जवळ येता मिलनाचा मुहुर्त... उभय तरुण जीवा शब्द वाटतीलं व्यर्थ... :-) झटपट पटपट आता अंतःपट दुर सारा... अन अधिर बहुत होता पंख येतिल हारा बोला....शुभ मंगलं सावधान...। अवांतर:-हा आमचा लग्नात मंगलाष्टकात सगळ्यात शेवटी उडवायचा फ्यान्सी अ‍ॅटम आहे.... इथे लग्न या विषयावरुन ( आणी खालुनही ;-) ) इतकी चर्चा चालली आहे की हे म्हटल्या शिवाय रहावलेच नाही... :-)

आनंदी गोपाळ गुरुवार, 12/01/2011 - 00:01
तदेवलग्नं सुदिनं तऽऽदेदेवऽऽ ताऽऽराऽऽबलं चंद्र बलंत देऽवऽ विद्याऽबलंऽ दैवबलंततदेऽऽऽवऽऽऽऽ लक्ष्मी पतेऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ * (तदैव लग्नं सुदिनं तदैव, ताराबलं चंद्रबलं तदैव, विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मिपतिम तेंघ्रियुग्मस्मरामि) म्हाइतै. पन ते भड्जी म्हंतात ते टाईप्लंय वर्ती. अन लक्ष्मी पते नंतर ते ब्यांडवाले वाजाडू वाजाडु काय आइकू येईना करतात.* (आनंदी होऊन ब्यांड बडविणारा) गोपाळ

साती गुरुवार, 12/01/2011 - 01:24
स्वतःचं लग्न ठरल्यामुळे एवढा आनंदी होणारा मुलगा मी पहिल्यांदाच बघतेय. तुमच्या आनंदाने आणि उत्साहानेच मला आनंद वाटतोय. खोतसाहेब,लिहित जा हो अधूनमधून(च). लग्नानंतर एक दिवसाने,एक महिन्याने,एक वर्षाने आणि मग दरवर्षी असं लिहिलेली दैनंदिनि नंतर वाचा आणि आम्हाला वाचायलाही द्या. (थोडक्यात त्यापेक्षा जास्त फ्रिक्वेंटली स्वतःच्या लग्नाचा विचार करत बसू नका.)

स्पंदना गुरुवार, 12/01/2011 - 06:14
हे बघा खोतानु, मिपाकर खांदा देण्यात कंदीबी माग नाय हटायच तर आता तुम्हाला आनंद झाला अन थोडा बहुत दुसर्‍यांच्या खांद्यावर उधळावासा वाटला तरी मिपाकरांचे खांदे माग हटणार नाहीत, अन एक सा आठ म्हैन्यान जवा तुमाला धबाधबा रडायला परत कुटला खांदा शोधु अस वाटल तवा बी ह्ये खांदे असेच तयार असतील , तवा उधळा उधळा अपना च खांदा समझके ...

प्रचेतस गुरुवार, 12/01/2011 - 08:56
असा काही नाही हे अनुभवणारा मी एकमेव व्यक्ती आहे. पण माझ्या साठी हा एक वेगळा अनुभव होता.
अनुभव पिक्चर पाहिलाय का तुम्ही? नसल्यास जरूर अनुभव पाहून अनुभव घ्या.

मृत्युन्जय गुरुवार, 12/01/2011 - 10:05
मला रोज निशी लिहिण्याची सवय पण तिने लावली. दिसतेच आहे. समर्थ म्हणुनच गेले आहेत 'दिसामाजी लिहित जावे' आणि खरच खूप छान प्रतिसाद पण मिळाले. वाटले नव्हते कि इतके लोक वाचतील पण खरच मी.पा. चा खूप आभारी आहे. वाय्झेड कोण तो प्रतिसाद देणारा?

धमाल मुलगा गुरुवार, 12/01/2011 - 11:24
काय तर इदरकल्याणी म्हणायचं पब्लिक! त्या खोताला आधी बोहल्यावर तर चढू द्या की. लगिन ठरलंय खोताचं, आन खुळावलीए जन्ताच. घ्या खोतसायेब, बेगानी शादीमें किती अब्दुल्ले दिवाने हैत का नाय? आता येक करायचं, लग्नाची पत्रिका हितं मिपावर द्याची, सगळ्यांना आमंत्रण करायचं..येतोच सगळे आहेरात चांदीचा पेला, तुळशीच्या मंजुळा, कांद्याचे गड्डे घेऊन. क्काय? :D

विनायक प्रभू गुरुवार, 12/01/2011 - 11:28
हस्तकला ते चित्रकला- एक प्रवास कवी आणि लेखक बरोबर चित्रकार पण जागृत होणारच ना.

योगप्रभू गुरुवार, 12/01/2011 - 13:00
जावक क्र.११११११/शै. प./परवाना ०३३ प्रति, श्री. विवेक खोत विषय - वर्ग बदलून मिळणेबाबत संदर्भ - आपण शाळा व्यवस्थापनास पाठवलेले पत्र भाग १ व २ स. न.वि.वि. उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून आपणास कळविण्यात येते, की आपल्या विनंतीनुसार आपल्याला प्रशिक्षण वर्ग बदलून देण्यात आला आहे. आपण यापुढे हस्तकला वर्गाऐवजी 'प्रत्यक्ष कार्यानुभव' वर्गाला उपस्थिती लावावीत. मात्र प्रत्यक्ष कार्यानुभव वर्गातील प्रशिक्षण सुरू असताना आपणास हस्तकला वर्गातील साधने वापरता येणार नाहीत, अथवा एका वर्गातील साधने दुसर्‍या वर्गात नेता येणार नाहीत, याची नोंद घ्यावी. काही अपवादात्मक स्थितीत, जसे की कार्यानुभव वर्गातील मार्गदर्शक वैयक्तिक कारणाने अनुपस्थित असणे किंवा बाहेरगावी गेले असताना आपणास हस्तकला स्वाध्याय करता येईल. मात्र त्याचा व्यत्यय अन्य विद्यार्थ्यांच्या अध्ययनात येणार नाही, ही आपली जबाबदारी असेल. केलेले काम इतरांना दाखवता येणार नाही. प्रत्यक्ष कार्यानुभव वर्गाची सुरवात ही प्रथेप्रमाणे समारंभपूर्वक होत असते. अभ्यासक्रमाच्या सुरवातीलाच आपणास शैक्षणिक सहल हा प्रकल्प पूर्ण करावा लागेल. यात सूट मिळणार नाही. त्याचप्रमाणे सहल सुरू होण्यापूर्वी आपणास कोणत्याही स्थितीत मार्गदर्शकांना कार्यपाठ वेळेआधी सुरू करण्याची विनंती करता येणार नाही. प्रशिक्षक/मार्गदर्शकांना तशा सूचना त्यांच्या वरिष्ठांकडून दिलेल्या असतातच. आपण विद्यार्थी असल्याने ही स्वतंत्र सूचना. कार्यानुभव प्रशिक्षणात दुसर्‍या टप्प्यात आपल्याला गृहशास्त्र व बालसंगोपन हा भाग पूर्ण करावा लागेल. त्याचा काळ आणि वेळापत्रक ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. प्रशिक्षक/मार्गदर्शकांशी बोलून आपण ते ठरवावे. आपल्याला नवीन अभ्यासक्रम व प्रशिक्षण वर्गासाठी हार्दीक व सहर्ष शुभेच्छा. :) आपला सखाराम दादोबा लगटकर (स. दा. लगटकर) मुख्याध्यापक जीवनविद्या प्रशाला

In reply to by योगप्रभू

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/01/2011 - 14:55
खल्लास खल्लास ! बर्‍याच दिवसांनी बेक्कार हसलोय. भोगप्रभू आपल्याकडून पुढील श्रमपरिहाराला तुम्हाला एक बिर्र !

In reply to by योगप्रभू

सोत्रि गुरुवार, 12/01/2011 - 15:13
दंडवत घ्या हो योगप्रभू माझा! :) -('जीवनविद्या प्रशाले'चा माजी विद्यार्थी) सोकाजी

In reply to by योगप्रभू

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/01/2011 - 16:50
केलेले काम इतरांना दाखवता येणार नाही. :-D आडवं तिडवं पडुन लोळुन उड्या मारत हसणारी स्मायली :bigsmile:

In reply to by अत्रुप्त आत्मा

किचेन Fri, 12/02/2011 - 15:37
मी बोलले होते न कि हे असले लोळत हसणारे चेहरे परा सोडून इतर कोणाकडेच नाहीत. पराकाका आम्हाला पण सांगा ते कसे टंकायचे.

In reply to by योगप्रभू

तिमा गुरुवार, 12/01/2011 - 19:58
योगप्रभू, लोकं सिक्सर मारतात पण बॉल सापडतो तिथपर्यंतच! आता बॉल हरवल्यावर इतरांनी खेळायचं कसं ?

In reply to by योगप्रभू

विजुभाऊ Fri, 12/02/2011 - 14:39
योग प्रभु गुरुजी ( माताय हा बहुतेक या शब्दाचाच गुण असावा ) तुमच्या तीव्र इच्छेला मान देवून ऑस्ट्रीया सरकारने ही सोय केलेली आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10953342.cms

विजुभाऊ गुरुवार, 12/01/2011 - 14:42
आत्ता कळाले की ईव्ह ने अ‍ॅपल का खाल्ले होते. सालं बाबा अ‍ॅडमच्या जमान्यापासून हे चालत आलय शादीसे पहले जय हनुमान शादी के बाद जय श्रीराम

मन१ Wed, 01/04/2012 - 11:22
ठा..........र. राम्दास काकांचा "तुंबलेले खोत " काय योगप्रभूंचे पर्वानगी पत्र काय... कहर आहे. मिपा आहे म्हणून हापिस सुसह्य आहे.