मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(हल्ली मी घेतच नाही ...(؟)... )

गणपा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
फिझा यांची माफी मागुन त्यांच्या लिहिण्याला ही आमची पोच. हल्ली मी काही घेतच नाही ..(؟)... भांजाळला गाल एकदा पाठीवर उमटले वळ ... आणि निघाली कमरेतुनी कळ त्या कळीची दाहकता कुणा कळतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... घेण्याची कारणे होती हजार चढणार प्रेट्रोल,वाढती महागाई वर तुटपुंजा पगार ... विदेशी 'टाकुन', देशी घेतली तरीसुद्धा ..... कळी माझी खुलतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... नाही नाही म्हणत परत बळेच भरला ग्लास ... पुढ्यातला चखणा आणि माझं मुस्काट यांची सांगड घालणे मला जमलेच नाही .... पण हल्ली मी घेतल्या वाचुन रहातच नाही ...

वाचने 7008 वाचनखूण प्रतिक्रिया 21

रेवती Fri, 11/18/2011 - 20:10
स्वयंपाकघर सोडून गणपा तिर्थक्षेत्री वळलेला बघून भावना आवरता आल्या नाहीत.;) आणि कमरेतुन निघाली कळ याऐवजी आणि निघाली कमरेतूनी कळ हे कसे वाटेल? अर्थात कसेही लिहिले तरी कळ काही थांबणार नाही.;)

चाफा Fri, 11/18/2011 - 20:24
एक विरोधाभास वाचुन गंमत वाटली मुळ कवितेपेक्षा विडंबन जास्त लोकप्रीय झालं :) बाकी गणपा शब्द चपखल बसलेत :)

In reply to by चाफा

प्रभाकर पेठकर Sat, 11/19/2011 - 12:17
मुळ कवितेतील आपली भावना सुंदर आहे पण ती 'कवी' पुरती संकुचित आहे. इतरांना त्याचा 'एहसास' होईलच असे नाही. पण, श्री. गणपा ह्यांनी व्यक्त केलेली भावना सर्वकालीक आणि सर्वसमावेशक असल्याने जास्त 'लोकप्रिय' झाली आहे.

गणपा रं गणपा.. एक नंबर रे. अवांतर :- 'विडंबन म्हणजे दारू' हे चित्र कधी बदलणार ? हे विडंबन वाचून कवि गणेशा ह्यांच्या मनाला आता किती यातना होतील बरे :( आकाशातला बाप त्यांना अजून सहनशीलता देवो. आमेन !

In reply to by परिकथेतील राजकुमार

विजुभाऊ Mon, 11/21/2011 - 19:02
अवांतर :- 'विडंबन म्हणजे दारू' हे चित्र कधी बदलणार ? हे विडंबन वाचून कवि गणेशा ह्यांच्या मनाला आता किती यातना होतील बरे आकाशातला बाप त्यांना अजून सहनशीलता देवो. ग्ण्पा भौ क्व्ता छान आहे. क्दाच्ति प रा ( सालं हे टंकताना चुकलं की प रा चा उगाचच प्रा होतो) भौ नी मोकलाया दही दिश्या... ही क्विता वच्ली न्सावी. किवा त्य्ना फ्क्त द्रु च दिस्ते त्य्मुळे त्य्ना विंड्ब्न हे ब्निआ द्रुचे होतस्ते हे ठौक न्ही.त्यत त्यंची च्कू न्सावी

In reply to by फिझा

वाहीदा Mon, 11/21/2011 - 15:48
चांगल्याच कवितेचे विडंबन येते अन मुख्य म्हणजे लोकप्रिय रचनेचेच तुमची कविता लोकांना आवडली ही त्याची पावती आहे :-)