निवडणूक सुधारणा - उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार
जनलोकपाल विधेयकाच्या गदारोळानंतर अण्णा हजारे यांनी पुढील पावले म्हणून निवडणूक सुधारणांचा मुद्दा बोलून दाखवला आहे.
सध्याची निवडणूक पद्धत निर्दोष नाही यात काही संशय नाही. निवडणुक सुधारणांबाबत काही मुद्दे गेली अनेक वर्षे (म्हणजे कमीत कमी ३०-३५ वर्षे) चर्चेत आहेत. स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन, लोकप्रतिनिधीला परत बोलवण्याचा हक्क हे दोन मुद्दे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या काळापासून मी ऐकत आहे. [त्यापूर्वीच्या काळात मी काही समजण्याच्या वयात नव्हतो ;) ].
गेल्या काही काळापासून उमेदवार नाकारण्याचा हक्क हाही चर्चेत आहे. त्या अनुषंगाने कलम ४९-ओ संदर्भात काही चर्चा घडत असतात.
उमेदवार नाकारण्याचा हक्क मला फारसा पटत नाही. त्याची कारणे पूर्वीच्या काही धाग्यांमधून चर्चिली गेली आहेत.
प्रतिनिधीला परत बोलावण्याचा हक्क असावा असे मला वाटते. तो कसा बजावावा याविषयी काही विचार मांडत आहे. काही मुद्दे इम्प्रॅक्टिकल वाटू शकतील. त्यावर सदस्यांनी पर्याय सुचवावे.
१. कोणत्या कारणासाठी लोकप्रतिनिधीला परत बोलावू शकतो यावर काहीही निर्बंध नसावेत.
२. प्रतिनिधीला परत बोलावण्याची मागणी मतदारसंघातील किमान १० % मतदारांनी करावी. ती एका अर्जाने करावी की प्रत्येकाने स्वतंत्र अर्जाने करावी हा डिटेलचा प्रश्न आहे तो सध्या बाजूस ठेवू. तत्वत: १०% मतदारांनी मागणी करावी.
३. अर्ज करणार्यांनी मागच्या निवडणुकीत मतदान केलेले असावे. हे अर्जदारांनी सिद्ध करायचे नसावे तर निवडणूक अधिकार्यांनी तपासून घ्यावे.
४. अर्ज करणार्यांनी मागच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला मतदान केलेले असावे. ही अट जरा जास्त होत आहे हे मला माहिती आहे. यात गुप्त मतदानाच्या तत्त्वाचा भंग होण्याची शक्यता आहे. परंतु एक-एक अर्ज आणि मत अशी तपासणी मॅन्युअली न करता इलेक्ट्रॉनिकली बल्क स्वरूपात करणे शक्य आहे. जेणेकरून अमुक मतदाराने कोणाला मत दिले होते हे कुठे दिसून येणार नाही. ही अट ठेवण्याचे कारण एका पक्षाचे निष्ठावान मतदार दुसर्या पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यास त्याला परत बोलावण्यास नेहमीच उत्सुक असू शकतील. या अटीचा माझा आग्रह नाही पण ही फेअर अट आहे असे मला वाटते. जर मी त्याला निवडून दिलेले नाही तर त्याला परत बोलावण्याचा अधिकार मला नसावा.
५. १०% व्हॅलिड अर्ज आले की प्रतिनिधीला परत बोलवावे की नाही याविषयी मतदारसंघात मतदान घ्यावे. [याला अल्टरनेट ३०% अर्ज व्हॅलिड आले तर बिना मतदान प्रतिनिधित्व रद्द करावे].
६. सहा महिन्यात पुन्हा निवडणूक घ्यावी. या निवडणुकीत परत बोलावलेल्या उमेदवाराला भाग घेता येऊ नये. पुढच्या रेग्युलर निवडणुकीत त्याला भाग घेता यावा.
७. परत बोलावण्यासाठी निवडणूक घ्यायची असेल तर ती एका टर्ममध्ये एकदाच घेता यावी. जर त्यावेळी परत बोलावण्यात अपयश आले तर उरलेल्या टर्ममध्ये पुन्हा ही प्रक्रिया करता येणार नाही.
सदस्यांनी वर लिहिलेल्या प्रक्रियेतील तत्त्वांबाबत तसेच डिटेल्सबाबत आपली मते सांगावी. प्रस्ताव खुल्या चर्चेसारखा चालवावा अशी अपेक्षा.
वाचने
12404
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
हम्म्म
एक अतिरिक्त मुद्दा
सहमत-असहमत
In reply to सहमत-असहमत by सुनील
असहमत - सहमत
सर्व अटी ओके आहेत ...
In reply to सर्व अटी ओके आहेत ... by छोटा डॉन
असहमत
In reply to असहमत by परिकथेतील राजकुमार
ओके
In reply to ओके by छोटा डॉन
महाराजांच्या कृपेने हा माझाच
In reply to ओके by छोटा डॉन
श्रेयनिर्देश?
In reply to असहमत by परिकथेतील राजकुमार
मूळातच आम्ही लोकशाही विरोधी
In reply to सर्व अटी ओके आहेत ... by छोटा डॉन
१. जे लोक मुळात पहिल्या
In reply to १. जे लोक मुळात पहिल्या by इरसाल
राहिले कोण, ज्यांनी त्यांना जिंकून दिले
परत बोलवण्याचा अधिकार
परत बोलावण्याचा अधिकार
बाकी काय होवो न होवो, पण
मुद्दा क्र. ४ शी
In reply to मुद्दा क्र. ४ शी by सविता
चपला मात्र जुन्या, फाटक्या-तुटक्या असाव्यात हे नमूद करू इच्छितो
In reply to मुद्दा क्र. ४ शी by सविता
कलमाडी ला मी गेल्या निवडणुकीत
In reply to कलमाडी ला मी गेल्या निवडणुकीत by llपुण्याचे पेशवेll
>>पेपरवाले पुण्याला आता कोणी
कायम मतदान केंद्रे
चांगला विषय
In reply to चांगला विषय by विकास
त्याच बरोबर हे देखील समजते की
निवडून आलेल्या प्रतिनीधीला
In reply to निवडून आलेल्या प्रतिनीधीला by विजुभाऊ
सर्वच उमेदवार नालायक आहेत असे
In reply to सर्वच उमेदवार नालायक आहेत असे by नितिन थत्ते
काही उदाहरणे
- २००३ मध्ये कॅलीफोर्नियाचा तत्कालीन गव्हर्नर ग्रे डेव्हीस ला असेच परत बोलावण्यात आले. त्यानंतर झालेल्या विशेष निवडणुकीत अर्नॉल्ड श्वार्झेनगर निवडून आला होता.
- मध्यंतरी विस्कॉन्सीन राज्यातील युनियनचे बरेचसे हक्क काढून टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यावरून तेथे, राजकीय हेतूने प्रेरीत पण कायद्याचा वापर करत, राज्यातील सहा ठिकाणच्या रीपब्लीकन लोकप्रतिनिधींना बोलावण्याचा प्रयत्न झाला. त्याला अंशतःच यश आले. आता तसाच प्रयत्न रिपब्लीकन्स दोन डेमोक्रॅट्सना बोलावून करत आहेत. दोन्ही कडील मतदार कायदे करणारे बहुमत बदलण्यासाठी हे करत आहेत यात शंका नाही. पण दोन्ही बाजूंना वाटले तितके ते सोपे ठरले नाही.
- मॅसॅच्युसेट्स मधील लॉरेन्स नावाच्या गावच्या भ्रष्टाचारी आहे म्हणून, महापौरास बोलावण्यासाठी जितक्या सह्या लागतात तितक्या गोळ्या केल्या गेल्या. पण निवडणूक आयोगाने दाखवून दिले की त्यातील अनेक मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत, जरी ते मतदार होते तरी आणि महापौरास "सत्याचा जय" झाला असे म्हणता आले - तात्पुरतेच! कारण विरोधक परत एकदा चुका दुरूस्त करून पुढे जायचा प्रयत्न करत आहेतच! पण त्याला परत बोलावले गेले, तर तेथे परत निवडणूक होईलच.
जेंव्हा एखाद्या प्रतिनिधीस परत बोलावले जाते तेंव्हा ती जागा मोकळी झाली हे लक्षात घेऊन तिथे पोटनिवडणूक घ्यावी लागेल.In reply to निवडून आलेल्या प्रतिनीधीला by विजुभाऊ
चूक ...
In reply to चूक ... by छोटा डॉन
सहमत पण..
In reply to चूक ... by छोटा डॉन
असहमत
सहा महिन्यात पुन्हा निवडणूक
स्पष्टीकरण
In reply to स्पष्टीकरण by सुनील
प्राथमिक निवडणूक
In reply to स्पष्टीकरण by सुनील
sansad या पत्त्यांवर पाठविलेल्या ई-मेल बाउन्स होता कामा नयेत
स्पष्टीकरण
कशासाठी
In reply to कशासाठी by आळश्यांचा राजा
+०.५
पर्याय !!
मायनेता
In reply to मायनेता by विकास
दोन माहितींचा फोकस इतका वेगळा
In reply to दोन माहितींचा फोकस इतका वेगळा by नितिन थत्ते
संस्थळावर म्हणल्याप्रमाणे...
मुद्दे पटण्यासारखे
गैरलागू
कोणत्या निकषावर बोलवायचे ते
अमेरिकेत मतदार आपापल्या प्रतिनिधींवर अंकुश ठेवतात तसा आपणही?
आमच्या मतदारसंघातले दोन्ही
परत बोलावण्यासाठीची मर्यादा
फेर निवडणूक..
आयुक्त