इटालियन लज्जत ... पांढरा पास्ता.
पास्त्याचे विविध प्रकार इथे आहेत... http://www.archimedes-lab.org/pastashape.html
चीज ... कुठलेही चीज पण तीन मोठे चमचे द्रव स्वरूपात (हे असलेले चांगले) किंवा एक्-दीड इंचाचे दोन क्युब्स किंवा सात ते आठ चौकोनी सपाट पेपर चीज.
दूध (चार ते पाच वाटी)
बटर (दोन मोठे चमचे)
मोठा कांदा अर्धा
मोठा टोमेटो अर्धा
एक हिरवी मिरची किंवा अर्धी शिमला मिरची (हिरवी मिरची खास भारतिय टच म्हणून)
इटालियन पार्स्ली किंवा कोथिंबीर (गरजेनुसार)
एक मोठी लसूण पाकळी किंवा दोन छोट्या पाकळ्या
मोहरीची पाऊडर किंवा एक छोटा चमचा छोटी मोहरी.
मीठ (चवीपुरता)
तेल (एक चमचा)
कृती
आधी पास्ता पाण्यात शिजवून घ्यावा. त्यासाठी अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तेल आणि पास्ता बुडून वर एक नख पाणी राहिल इतकी खात्री करून घ्या. मध्यम गॅसवर झाकण लावून शिजवून घ्यावा. पास्ता शिजलाय हे समजण्यासाठी जेव्हा पास्ताच्या नळ्या शिजून आकाराने मोठ्या होतात आणि खाताना मोदकाच्या उकडीइतका मऊसूत लागतात तेच पास्ता शिजून आल्याचे लक्षण आहे. साधारणत: आठ ते दहा मिनिटं मध्यम गॅसवर उकळत्या पाण्यात शिजवला की पास्ता नीट शिजतो.
आता पास्ता वेगळ्या भांड्यात गाळून घ्यावा आणि थंड पाण्यात पुन्हा धुवावा. शिजवताना पास्ताचं पाणी गाळून घेतलेलं फेकून देऊ नका. पांढरा सॉस करताना तेच वापरायचे आहे.
आता कांदा, टोमेटो कापून मिस्करच्या मोठ्या भांड्यात टाका. मिरचीतल्या बिया काढून ती कोथींबिरीसह बारीक कापून त्यात टाका आणि एक वाटी पास्ताचं काढून घेतलेलं पाणी टाकून मिक्सरमध्ये नीट एकजीव करून घ्या.
आता मध्यम गॅसवर न चिकटणार्या (नॉन स्टी़क) भांड्यात बटर आणि अर्धा चम्चा तेल घ्या आणि त्यात कांदा टोमॅटोचं मिश्रण टाका. एक छोटा चमचा राई पाऊडर आणी बारीक किसलेला लसूण वरून टाकून दोन मिनीटं शिजवा.
त्यात दूध आणि एक वाटी पास्त्याचं पाणी टाका आणि मग चीज टाका आणि चीज विरघळेपर्यंत ढवळा. झाकण न लावता उकळू द्या. जर चीज जास्त असेल तर हे मिश्रण लवकरच उकळू लागेल आणि उतू जाऊ लागेल. तेव्हा गॅस कमी करावा किंवा थोडे आणखी पास्ताचे पाणी टाकावे. हा सॉस आटून त्याच्या आधीच्या प्रमाणाने पाऊण होईल तेव्हा ह्यात पास्ता टाकावा. जर जास्त आटला असेल तर गरजेनुसार आणखी पास्ताचे पाणी टाकावे.
पास्ता पुन्हा पाच ते सात मिनिटं मंद गॅसवर झाकण लावून ह्या सॉस मध्ये शिजवावा आणि गरमागरम सर्व्ह करावा. चवीनुसार मीठ पास्ता सॉस करताना किंवा झाल्यावर टाकू शकता.
इंग्रजीतले नाव - पास्ता विथ व्हाईट सॉस.
टीप.
१. ह्याच व्हाईट सॉसमध्ये अर्धा शिजलेला भात नीट शिजवून घेतला की त्याचं इटालियन राईस असे नामकरण होते.
२. मांसाहारी टच द्यायचा असेल तर पास्ता, स्कीन असलेल्या चिकनसोबत शिजवून घ्यावा आणि त्या चिकनचे तुकडे आणी पास्ताचं चिकन युक्त पाणी सॉस करताना वापरावे. चिकन नसेल तर मॅगीच्या चिकन क्युबस पण चालतील. अर्धा क्युब पास्ता शिजवताना वापरा आणि अर्धा सॉस मध्ये.
यम्मी ...
:)
वरील सर्व फोटो आंतरजालावरून घेण्यात आलेले आहेत ह्याची कृपया नोंद करावी.त्यात अर्धा छोटा चमचा राई टाका.पास्त्यात राई? भलतेच प्रयोगशील दिसता आहात. माझा पास ;)
त्यात दूध आणि एक वाटी पास्त्याचं पाणी टाका आणि मग चीज टाका आणि चीज विरघळेपर्यंत ढवळाबाबौ!! तुम्हाला बेकमेल सॉस करायचा असेल तर अंमळ बेसिक्स शिकून घ्या पण असा पाकृ.चा खून पाडू नका. अल्फ्रेडो करायाचा असेल तरीही तोच सल्ला. पुढच्या पाकृ. ला शुभेच्छा!
In reply to त्यात अर्धा छोटा चमचा राई by विंजिनेर
In reply to संजीव कपूरने शिक्का by विनीत संखे
In reply to राई आणि कोथिंबीर? by पिवळा डांबिस
In reply to संजीव कपूरने शिक्का by विनीत संखे
In reply to सगळे फोटू तुम्ही काढलेले आहेत by रेवती
In reply to मोहरीच उलट महत्त्वाची by विनीत संखे
In reply to राई पावडर वापरा पण ट्राय by रेवती
In reply to पाकृ छानै. by सूड
In reply to पाकृ छानै. by सूड
In reply to व्हाईट सॉस असा करतात?? कुछ तो by प्राजु
In reply to प्राजुशी सहमत by सानिकास्वप्निल
In reply to पास्त्यातले स्टार्च पास्ता by पक्या
In reply to आवडले. by गवि
In reply to देवाक काळजी!! by पिवळा डांबिस
In reply to इटालियन जेवणात राई वापरली जातेच by विनीत संखे
कोथींबीर ही इटालियन पार्स्लीला चांगला पर्याय आहे.एवढे तरी म्हणू नका राव! हे म्हणजे, 'न्यूट्रि-नगेट' हा कोंबडीला चांगला पर्याय आहे म्हणण्यासारखे झाले. कोंबडी ती कोंबडी, आणि न्यूट्रि-नगेट ते न्यूट्रि-नगेट. किंवा सोयाप्रोटीनचे शाकाहारी हॉटडॉग, बर्गरप्याटी वगैरे मिळतात, दिसायलाही हुबेहूब तस्सेच दिसतात, पण चवीत काहीही संबंध नसतो, फक्त 'हॉटडॉग', 'बर्गर' खाल्ल्याचे मनाचे समाधान, तसलाच प्रकार. 'साधारणतः तशी दिसते' यापलीकडे कोथिंबीर आणि पार्स्ली यांच्यात काहीही साम्य नाही. चवीत तर नाहीच नाही. बाकी एकदा पार्ल्यात 'मेक्सिकन'च्या नावाखाली पनीर घातलेले काहीतरी असंबद्ध आणि एकदा पुण्यात नूडल्स घातलेले मिनेस्ट्रोनी सूप खाल्लेले आहे, तेव्हा या जगात कोण कशात काय घालून त्याला काय म्हणेल ते सांगवत नाही, यावर पूर्ण विश्वास आहे. ती तरला दलालही असले काही ना काही अघोरी प्रकार करत असतेच, असे पुसटसे आठवते. 'इंडियन चायनीज़' हा प्रकार (अमेरिकेतही) सुप्रसिद्ध आहेच. (तसे 'चिनी भोजन' या नावाखाली जगात वेगवेगळ्या ठिकाणी जे काही मिळते, ती त्या जेवणाची स्थानिक मॉडिफाइड आवृत्तीच असते, असे वाटते.) पण कमीतकमी (निदान अमेरिकेत तरी) त्याला 'भारतीय पद्धतीचे चिनी जेवण' असे मार्केट केले जाते, हेही नसे थोडके. तुम्ही तसे करा हवे तर. 'आमच्या पद्धतीचे इतालियन' म्हणा. मग काहीही हरकत नाही. (आम्हीही अधूनमधून पारंपरिक देऋब्रा पद्धतीने वाट्टेल त्यात वाट्टेल त्या ऐवजी वाट्टेल ते घालून कायकाय बनवून पहात असतोच की. आमच्या चवीला पटल्याशी कारण. बाकीचे जग गेले तेल लावत. डोक्याला.)
In reply to देवाक काळजी!! by पिवळा डांबिस
पिझ्झा-पास्ता-रिझोतो-लझान्या वगैरे इटालियन खाद्यपदार्थ बेचव असते तर आणखी काय पाहिजे होतं? निदान आमचं वजन किमान ५० पौंडाने कमी दिसलं असतं महाराजा!!!!शब्दाशब्दाशी सहमत आहे. (वजनासकट.) :)
In reply to देवाक काळजी!! by पिवळा डांबिस
का बरे, काका? अळूवडीत करंदी घातली, तर बिघडत काहीच नाही, पण पदार्थाचे कुळशील बदलते*, असेही कोणास वाटू शकते. अळूवडी किंवा करंदी यांपैकी कशाचेही वावडे नसतानासुद्धा. पण म्हणून दुसर्या कोणाला जर तसे वाटत नसेल, तर त्याने असे काही करूच नये काय? (* 'काशी होते' हे कोणी ठरवावे?) आमच्या दक्षिणेत (तुम्हाला माहीत असेलच) ब्लॅक-आइड-पीची (महाराष्ट्रातल्या चवळीच्या उसळीच्या बर्यापैकी जवळ जाणारी) उसळ बनवतात. फक्त त्यात डुकराचे बारीकबारीक तुकडेसुद्धा घालतात. (बर्याच पालेभाज्यांतसुद्धा घालतात. किंबहुना कशात घालत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे.) आता आम्हा भटांच्या परंपरेत चवळीच्या उसळीत डुकराचे तुकडे घालणे बसत नसल्याने आम्हाला (डुकराचे वावडे नसले, तरी) हे चमत्कारिक वाटते खरे. नव्हे, अगदी पदार्थाचे कुळशीलही बदलल्यासारखे वाटते. दाक्षिणात्यांना नाही तसे वाटत तर त्याबद्दल काही बोलणारे आम्ही कोण? कशाचे कुळशील कोणते ते आम्ही काय म्हणून ठरवावे? ते चिनी लोक डंपलिंगे बनवतात. त्यांना 'उकडीच्या मोदकांत डुकरे घातल्याने पदार्थाचे कुळशील बदलते' म्हणून आम्ही सुनवावे काय? शेवटी पदार्थाचे कुळशील वगैरे हे सर्व सापेक्ष नसते काय? ज्याच्यात्याच्या set ideasमधून (मराठी शब्द सुचला नाही; क्षमस्व.) घट्ट रुतून बसलेले?पास्ता मधे मोहरी ...ट्राय केली म्हणून कुठे बिघडलं.बिघडत काहीच नाही, फक्त त्या पदार्थाच्या कुळाशीलाची काशी होते.....
पुलंनी पूर्वी म्हटल्याप्रमाणे, "बाईने मानेवर केस बॉबकट करून नाकात नथ घातली तर बिघडत काहीच नाही, फक्त ते बघवत नाही, इतकंच!"याचा अर्थ एवढाच, की पु.लं.ना बॉबकट करून नाकात नथ घातलेली बाई बघण्याची सवय नव्हती. बाकी काही नाही. (त्यांच्या काळात नसतील करत कदाचित. त्यांचा प्रश्न.) (अवांतर: बाकी पु.लं.ची वाक्ये ही ब्रह्मवाक्ये मानण्याची पद्धत नेमकी कधीपासून रूढ झाली? नाही म्हणजे, त्यांना त्यांची मते असू शकतात, प्रत्येकाप्रमाणेच त्यांनाही तो अधिकार आहे, वगैरे वगैरे सर्व मान्य आहे. पण म्हणजे बाकीच्यांनीही त्यांना ताबडतोब 'की जय' म्हणायला सरसावलेच पाहिजे काय? बर्याच ठिकाणी तर ते काहीच्याकाहीच मते मांडून गेलेले आहेत. केळ्याच्या शिक्रणीचे तर त्यांना फेटिश असावे बहुधा. ठिकठिकाणी ओढूनताणून केळ्याच्या शिक्रणीवर - आणि त्या अनुषंगाने अनेकदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केळ्याच्या शिक्रणीशी supposedly निगडित असलेल्या एका समाजावर, पण ते जाऊ द्या - उतरलेले आहेत. आणि काहीही मते मांडलेली आहेत. काहीही मताचे एक उदाहरणच द्यायचे झाले, तर 'केळ्याची शिक्रण ही आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्याची बोळवाबोळव आहे' म्हणे. आता कदाचित पु.ल. वाढले त्या वातावरणात किंवा परिसरात केळ्याची शिक्रण ही आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्यांच्या बोळवाबोळवीकरिता वापरली जात असू शकेलही - मला कल्पना नाही, परंतु वाढीच्या संस्कारक्षम वयात मनुष्य आपल्या आजूबाजूला जे पाहतो त्यावरून अनेकदा त्याची घट्ट मते बनतात आणि ती आयुष्यभर टिकतात, म्हणून ही अटकळ - पण म्हणून ही पद्धत सार्वत्रिक आहे या निष्कर्षावर उडी का मारावी? उदाहरणच द्यायचे झाले, तर आम्ही ज्या पुणे ४११ ०३० विभागात वाढलो, त्या विभागात आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्याची बोळवाबोळव केळ्याच्या शिक्रणीने होत नाही - 'जेवूनच आला असाल?' या प्रश्नाने होते - हे कधीकाळी पुण्यात वास्तव्य केलेल्या पु.लं. ना आम्ही सांगण्याची गरज असावी काय? तर अशा या पु.लं.ची वाक्ये, केवळ 'ते पु.ल. होते' एवढ्याच कारणास्तव आपोआप ग्राह्य का धरली जावीत? पु.लं.नी ही वाक्ये लिहिली - rather, he got away with them - याबद्दल तक्रार नाही. त्यांच्या मनात आले ते त्यांनी लिहिले. त्यांना त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहेच. प्रश्न हा आहे, की ही वाक्ये जशीच्या तशी स्वीकारताना आणि जिकडेतिकडे दाखले म्हणून उद्धृत करताना आणि दाखले म्हणून स्वीकारताना बाकीच्यांची - यात आम्हीही आलोच - विचारशक्ती नेमकी कोठे केळ्याची शिक्रण खायला जाते? विचारवंतांची परंपरा असलेला महाराष्ट्र स्वतंत्र विचार करण्याची आपली क्षमता गमावून बसला आहे काय? केळ्यात फॉस्फरस असते हे लक्षात घेता हे आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे. इत्यलम्.)
In reply to आता फक्त काव्य आणि कलादालन by परिकथेतील राजकुमार
In reply to असू द्या हो पराशेठ. व्यासंग by गवि
"प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे" असं स.त. कुडचेडकरांनी "केतकी पिवळी पडली" मधे म्हटलंय की नाही..हेच वाक्य पाचव्या खोलीत बसून मोठ्याने म्हटलं तर कसं वाटेल याचा विचार करतोय :)
In reply to "प्रयास हा प्रतिभेचा by विंजिनेर
In reply to "प्रयास हा प्रतिभेचा by विंजिनेर
In reply to "प्रयास हा प्रतिभेचा by विंजिनेर
In reply to >>हेच वाक्य पाचव्या खोलीत by सूड
In reply to तो संकल्प ''पास्ता विथ व्हाईट by ५० फक्त
In reply to "प्रयास हा प्रतिभेचा by विंजिनेर
In reply to जबरा.. काय कल्पना by गवि
In reply to "प्रयास हा प्रतिभेचा by विंजिनेर
In reply to आता फक्त काव्य आणि कलादालन by परिकथेतील राजकुमार
In reply to आता फक्त काव्य आणि कलादालन by परिकथेतील राजकुमार
In reply to आता लिहिणारच नाही जा by विनीत संखे
In reply to असं रागावून गेलात तर by रेवती
In reply to ''मोहरी बरोबर थोडासा पावभाजी by ५० फक्त
In reply to लई भारी.. by गवि
In reply to करुन बघितली ही पाककृती.. by मनिम्याऊ
त्यात अर्धा छोटा चमचा राई