पाणी
१९९२ सालच्या "रिओ वसुंधरा शिखर परीषदेच्या" (Earth Summit) निमित्ताने २१ व्या शतकातील पर्यावरणीय समस्यांबद्दल बराच उहापोह झाला. त्यातील पर्यावरणीय बदलासंदर्भात प्रथमच घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही परीषद जास्त लक्षात राहीली. याच परीषदेत "जागतीक जल दिन" चालू करण्यासंदर्भात सुचवण्यात आले आणि १९९३ पासून, दरवर्षी २२ मार्च हा "जागतिक जल दिन" म्हणत साजरा केला जाऊ लागला. ज्या भाषेत पाण्याला देखील "जीवन" ह्या सार्थ शब्दाने संबोधले जाते, तेथे पाण्याचे महत्व नव्याने सांगायची गरज नसावी...
ह्या दिवसाच्या निमित्ताने जगभर स्वच्छ पाण्याची आठवण ठेवण्याचा आणि त्या निमित्ताने जागृती करायचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी या दिनानिमित्त एक पाणीसमस्येवरून विषय ठरवला जातो आणि त्यावर जगभर कार्यक्रम होतात. या वर्षीचा विषय हा "Water for the Cities: Responding to the Urban Challenge" असा आहे. उपलब्ध असलेल्या जागतिक विदाप्रमाणे २००८ सालपासून ५०% हून अधिक जग आता अधिकृतपणे शहरात रहाते. अथवा याच्याच उलट म्हणायचे तर मानवी जगाचे ५०% शहरीकरण झाले आहे आणि २०५० सालापर्यंत जगाच्या लोकसंख्येच्या ६९% जनता ही शहरी भागात रहाणार आहे. आजच्या घडीला, जगभरातील जवळ्पास नव्वद कोटी जनतेला स्वच्छ पाणी मिळत नाही. लाखो लोकं दरवर्षी दुषित पाण्याचे अथवा प्रदुषित सांडपाण्याचे बळी होतात. असे म्हणले जाते की एखाद्या युद्धापेक्षा, पाणी आणि सांडपाणी यांच्यामुळे दरवर्षी बळी जातात.
भारताच्या संदर्भात ताजे पाणी हे तुलनात्मकरीत्या किती आहे हे खालील नकाशावरून समजू शकेलः (संदर्भः www.undp.org)
थोडक्यात पाण्याचे पूर्ण दुर्भिक्ष नसले तरी अफ्रिकासोडल्यास इतर बहुतांशी प्रगत आणि विकसनशील राष्ट्रांपेक्षा आपल्याकडे पाणी कमी आहे. हे पाणी देखील ताजे आहे याचा अर्थ पिण्यायुक्त आहे असा नाही तर केवळ ते समुद्रातले नसून नद्या-तलाव, भूगर्भातील आणि साठवलेले पाणी आहे.
आज भारतात साधारण ८४% जनतेस पिण्यायुक्त पाणी मिळते असा अंदाज आहे. तरी देखील २१% रोगराई ही पाण्यामुळे वाढते असा देखील अंदाज आहे. शहरीकरणाचा विचार केल्यास अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत जिथे घरोघरी मोबाईलफोन्स आहेत पण प्यायला अथवा रोजच्या वापराकरता पाणी नाही अथवा सांडपाण्याची व्यवस्था नाही. या संदर्भात अजून बरेच काही लिहीता येईल. कमी लेखायचा तर त्याहूनही नाही. फक्त एक नागरीक म्हणून आपण काय करू शकतो याचा मात्र नक्की विचार करावासा वाटतो.
या निमित्ताने तीनएक वर्षांपुर्वी न्युयॉर्कच्या संयुक्त राष्ट्रसंघामध्ये एक प्रदर्शन भरले होते त्यातील काही पोस्टर्सचे फोटो खाली देत आहे:
खालील पैकी प्रत्येक गोष्ट तयार करण्यासाठी किती पाणी लागते?
- घराभोवती पाणी झिरपण्यासाठी जागा (सगळेच काँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण करायचे नाही).
- कचरा रस्त्यावर जाणार नाही याची काळजी घेणे.
- बागेसाठी पाण्याचा मर्यादीत उपयोग
- गाडी धुण्यासाठी आणि घरातील जमिनी धुण्यासाठी देखील कमीत कमी उपयोग.
- झाडे लावणे / वाढवणे
In reply to पाण्याची समस्या दिवसेंदिवस by अनामिक
In reply to शहरी भाग सोडून मुबलक पाणी? by राही
In reply to मला शहरी भाग सोडून म्हणजे by अनामिक
In reply to बरोबर आहे by किशोरअहिरे
चक्क ८ दिवसाला एकदा पाणी येते नळालालातुरात राहता वाट्टं !!!
५० फुट पर्यंत पाणी नव्हते म्हणुन आजुन ४० बोअरींग केले ..४० फुट वाढविले का ४० बोअर वर मारले...
In reply to पाण्याला मीटर बसवणे. by मन१
In reply to मनोबा आपण सांगितलेला हा उपाय by मी ऋचा
In reply to मनोबा आपण सांगितलेला हा उपाय by मी ऋचा
In reply to @ मी ॠचा... by प्रसन्न केसकर
In reply to समयोचित लेख! दरवर्षी असे लेख by नगरीनिरंजन
(एका मिनिटात आंघोळ करणे, आठवड्यातून एकदाच कपडे, फरशी धुणे, गरीब दयनीय माणसासारखं गाडी, डिशवॉशर न घेणे, शक्यतो कांदे न कापणे, न रडणे, आत्यंतिक गरज असल्याशिवाय मूत्रविसर्जन न करणे, वगैरे).ह्या लिस्टमध्ये ननि कदाचित " आठवड्यातुन फक्त दोनच वेळा आंघोळ करणे " लिहायला विसरले की काय अशी शंका आली? आम्ही मात्र , महिन्यातुन एकदा आंघोळ करणे, २-३ महिन्याला एकदा कपडे धुणे, दात आठवड्याला धुणे, ताटाऐवजी पेपरात खाणे, हात त्याच पेपराला पुसणे (जेवणानंतर) ई. ई. कर्म करुन पाणी वाचवतो....
In reply to समयोचित लेख! दरवर्षी असे लेख by नगरीनिरंजन
In reply to काही प्रश्न by सहज
In reply to पाणी शुद्ध करण्यासाठी इंधन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to तुमने समस्या बदल डाली. by सहज
जिओ थर्मल एनर्जी(मराठी??)भु-औष्णिक उर्जा..
In reply to जिओ थर्मल एनर्जी(मराठी??) by वपाडाव
In reply to काही प्रश्न by सहज
In reply to सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे by स्पा
In reply to स्पावड्या... अगदी हेच आमच्या by वपाडाव
In reply to वॉटरलेस पब्लीक युरिनल्स... by प्रसन्न केसकर
In reply to भारतात पब्लीक युरिनल्स हिच एक by अनामिक
In reply to पब्लीक युरिनल्स कमी असतील.... by प्रसन्न केसकर
In reply to माझ्या अनुभवाने हॅण्ड हेल्ड by नितिन थत्ते
In reply to धन्यवाद by विकास
In reply to उत्तम परामर्श विकास by अनामिक
In reply to लेख by मुक्तसुनीत
In reply to उत्तम लेख. अजून भारतातील by पुष्करिणी
In reply to च्यायला माझ्या हापिसात by पिंगू
In reply to मला सुद्धा असेच वाटते की by वपाडाव
In reply to मला सुद्धा असेच वाटते की by वपाडाव
उत्तम लेख!! समायोचित. आणि