|| दक्षिणायण ||
लेखनप्रकार
डिसक्लेमर : लेखकास कुठल्याही प्रांताबद्दल तिटकारा नाही पण रस्सम-भाता ऐवजी 'चटणी-भाकरी' खावुन वाढल्याने महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम आहे.
भारतात आर्य होते की द्रवीड ? (नुकताच आयपीएल मधून बाद झालेला,राहुल नव्हे बरे का) हे इतिहासाचा अभ्यास केल्यावरही मला समजणार नाही, अशी खात्री मला माझ्या अतुलनीय, अफाट आणि आडमाप बुद्धीमत्ते विषयी असल्याने मी त्या भानगडीत पडत नाही, पण काही समाजमान्य थोर इतिहास अभ्यासक विचारवंत व्यक्तींशी (म्हणजे काय हो ?) चर्चा केल्यावर दाक्षिणात्य मंडळी म्हणजे द्रवीड आणि इतर भाग म्हणजे आर्य असा एक समज आहे. तो कितपत खरा आहे याची मला कल्पना नाही (आणि घेणे-देणे ही नाही.), पण त्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या रहाणीमानामध्ये प्रचंड फरक आहे हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो.
तसं पहायला गेलं तर अगदी १८-१९ वर्षांचा होईपर्यंत आंध्र,केरळ,कर्नाटक आणि तामिळनाडू यापैकी कोठेही रहाणारा व्यक्ती माझ्या लेखी काळा ठिक्कर पडलेला "मद्राशी" असायचा.मग थोडीशी अक्कल आल्यावर ? (स्वतःविषयी माझे बरेच गैरसमज आहेत, हा त्यातलाच एक.) त्यातील फरक समजायला लागलं. त्यात दीड-एक वर्षे गुंटूर-हैदराबाद रहाण्याचा अनुभव गाठीशी पडला आणि खस्सम हईदराबादां के चारमिनारां की, त्यातील फरक अधिक स्पष्ट व्हायला लागला. असो, या चारही प्रांतात, भाषा आणि संस्काराच्या आधारावर थोडा-फार फरक आहे.पण एकुणच सगळे प्रांत दाक्षिणात्य या सदरात गणले जातात.
फरकाची सुरुवात होते ती भाषेपासून.
इथली भाषा टकंणे अतिशय सोपे आहे. आपल्या मराठीतला 'ळ' घ्या त्याला आडवा करा,मग 'ह' घ्या त्याला आडवा करा. हिचं दोन अक्षरे कधी काटकोनात फिरवा, कधी ४५ अंशात तर कधी त्याला उभा, आडवा, किंवा तिरका काप मारा.तशीच ही दोन्ही अक्षरे एकमेकांमध्ये वेगवेगळं अंतर राखत एकमेकांमध्ये घूसडा.झालं टकुंन . त्याचा उच्चार तर त्याहून सोपा आहे. वेगवेगळ्या आकाराचे ऍल्युमिनिअमचं डब्बे घ्या. त्यात खडे टाका. खडे टाकलेल्या डबे जोरजोरात हलवा.जो काही आवाज येईल अगदी तोच उच्चार. दिवसभर हेच मधुर स्वर माझ्या कानपूर त नृत्य करीत असतात (आयटी मध्ये अंदाजे ६०% जनता दाक्षिणात्य या प्रकारात मोडते. बाकीची सर्व मॅनेजर या जमातीत ). एव्हाना दोन दाक्षिणात्य माणसे बोलताहेत की भांडताहेत असा मला प्रश्न पडतो.
हिन्दी ही राष्ट्रभाषा नाही हे हायकोर्टानं सांगायच्या आधीपासून येथील समस्त जनतेला माहीत असावे. बंगळूरात रिक्षावाले जरा तरी हिन्दी-इंग्रजी बोलतात, पण, आपल्या आकाश-गंगेच्या बाहेर असलेल्या तामिळनाडू नावाच्या परग्रहावर तमीळ शिवाय दुसर्या भाषेत काही बोलल तर बहुधा अयप्पास्वामी यांची जीभ छाटून टाकत असावेत.(माफ कर रे देवा ! ) अर्थात, त्याला एक अपवाद आहे, तो म्हणजे पल्लवरम ! या बहुल-मुस्लीम भागात ऊर्दूमिश्रीत तमीळ आणि तमीळमिश्रित हिन्दी? बोलल्या जाते. जिथे हिंदीचीच ही गत आहे तिथे बाकी भाषाच काय ? बंगळूरात मात्र माझ्या डोक्याला झिणझिण्या आल्या.इथे जुजबी कन्नड शिकावं म्हटल तर समोरचा कन्नड असेल असे नाही. तो कोणीही असू शकतो. मल्याळी, तामिळी, कन्नडागी किंवा मग तेलगू. असो.
हैदराबादी हिन्दी हा मात्र पि.एच.डी. करण्याचा विषय आहे. 'उंन्ही बोले तो, बसांमई जा रइ थी !! " म्हणजे ती बसने चालली होती. बाब्बो !! काय प्रकार आहे ? एखाद्या भाषेचा अश्या प्रकारचा स्लँग असा पण असू शकतो पण तिचं भाषा मला कुठेतरी आधी ऐकल्यासारखी वाटली, येस्स, मालेगाव ! (सौजन्य : हैदराबाद मुक्ती संग्राम ) जसा इथे ' द अंग्रेज ' नावाचा चित्रपट आला होता तसेच मालेगाव आणि जवळपासच्या भागात ' खान्देस का जमांई' नावाची कॅसेट अतिशय गाजली होती. बाकी काहीही म्हणा, हैदराबादला मिळणारी, हिरवट रंगाची, बिर्याणी मस्त असते ब्वा !!
एकमेकांना नावाने पुकारण्यात दाक्षिणात्य माणसासारखा सूरमयी कोणीच नसावा, नाव सपलं की त्याच्या नावाच्या मागे आपल्या इथे जस 'या'(जसे सुहाश्या) लावायची पद्धत आहे,त्याच प्रकारे इकडची मंडळी 'आ ' लावून एखाद्या ताणेसारखा लांबपर्यंत ओढतात. दिनेशाssss, पुर्णय्याssss, ईरण्णाssss, सुरेशाssss, महेशाssss, सतीशाssss, लक्ष्मणाsssss (खरं तर हे आमच्या तीर्थरूपांचे नाव, पण दक्षिणेकडे आडनाव लावत नाही आणि मी मात्र माझं पुर्ण नाव लिहीतो. माझी काही चेन्नईकडचे मित्र-मंडळी अजुन ही याच नावाने ठणाणा करतात.त्यातही सा* , लक्ष्मणाण्णाssss असा उल्लेख करतात.) . मंजू (इथे हे नाव स्त्री आणि पुरुष या दोघांकरिता आहे.) त्यापुढे तुम्ही काहीही लावा ..उदा. मंजूला (बाई),मंजूस्वामी (पुरुष). मंजूनाथ (पुरुष)..मंजूश्री (स्त्री आणि पुरुष) पुकारताना मात्र दोन्हीचा धावा एकच, मंजू !! , माझ्या रुमवर काम करण्यार्या स्त्री ला मात्र धास्तीने मंजू अम्माsss असे म्हणतो. नावाचा हा घोटाळा सगळीकडेच आहे. पण इथे मात्र अती प्रमाणात , चेन्नई ला असताना माझ्या वीस जणांच्या टीममध्ये ( ही मी टिम लिडर असल्याची जाहिरात नव्हे !) सहा 'सेन्थिल' नावाचे महान आत्मा होते. (मला फक्त 'सिन्थॉल' नावाचा साबण माहीत आहे.) पण त्या ही पेक्षा अवघड मला गेलं ते एका स्टॉपच नाव. 'कोपनाण्णाआग्रहरा !! (लिहिताना बोट दुखायला लागली.)
काही मुली जश्या मोबाइल आणि कानाला हेडसेट सकट जन्माला येतात, त्याच प्रकारे इथले पुरुष मिशां सकट जन्माला येत असावेत. मिशा ठेवण्याची पद्धत आपल्याकडेही आहे. पण इथल्या मिशा नाकपुड्यांतून सरू होऊन थेट खालचा ओठ झाकले जाण्याला अर्धा सेमी उरेल अश्या प्रकारच्या, काही काही भरदार मिशा पाहूनं तर त्या व्यक्तीने मिशा ठेवल्यात की मिशांनी त्या व्यक्तीला ठेवले आहे तेच कळत नाही,त्यात दुग्ध-शर्करा योग म्हणजे कानावरून ओसंडून वाहणारे केस. व्वा ! काय पण ध्यान आहे.. बायकांची ही तीच गत. केसात गजरा आपल्याकडेही माळतात.काळ्याभोर केसांत दोन मोगर्यांची रांग लावून माळलेला सुगंधी मोगरा किती छान दिसतो ना ! पण इथे मुळात बायकाच काळ्याभोर !! आणि वर डोकं मोगराच्छादित !! केसांत गजरा माळला आहे की गंगावन मोगर्याच्या टोपलीत वाळायला घातले आहे तेच समजत नाही.लग्नात वधूने घातलेला गजरा म्हणजे उलट्या बाजुला घातलेला 'सेहरा' जणू. काळे-गोरे जगात सर्व ठिकाणीच आहेत. पण इथली काही मंडळी मात्र वेगळ्याच घाटणीची आहेत, बर लुंग्या तरी नेसतात नाहीतर ढेकळात पडली तर दिसणार नाहीत आणि म्हशीवर बसली तर म्हशीचा आकार बदलल्या सारखा वाटेल.त्यात हा अश्या प्रकारचा साजशृंगार.
इथे सर्वात जास्त चलती आहे ती म्हणजे चित्रपटांची ! मला प्रश्न पडायचा की इथे चित्रपटासाठी महागडं बजेट रिकव्हर कसे काय होते ? त्याचे उत्तर आहे की इथले चित्रपट गावांमध्ये भरपूर चालतात. 'रामराजन' या नटाचा एक चित्रपट, एका गावामध्ये, दोन वर्षे चालल्याचे एकले ! (ते चित्रपटगृह त्याच्या स्व:ताच्याच मालकीचे होते.) अश्याच प्रकारचे इथे 'पेड फॅन क्लब्ज' आहेत. त्यांना तिकीटं फुकटात मिळतात. शिवाय वर क्लब्ज चालवायला पैसाही ! हे फॅन्स चालले लगेच वाजवत-गाजवत ४० फुटी फ्लेक्सला हार घालायला, बरं तो हार ही केव्हढा लांबलचक !! नवल म्हणजे एखाद्या नेत्याला घालायचा हार ही त्या नेत्याच्याच उंचीचा असतो.(पायात अडकून पडायचं साल एखाद्यावेळी.) रजनीकांत ला तर ही माणसं देवच मानतात , पण खुशबु सारख्या पडेल अभिनेत्रीचे मंदीर बांधेपर्यंत एखाद्याची आवड जाइलं असे मला स्वप्नात देखील वाटल नव्हतं. असो..
दक्षिणेकडे असणारा फरक हास्यास्पद असला तरी त्या फरका च्या त्रासामुळे कधी-कधी जीव अगदी मेटाकुटीला येतो. वाटत गड्या हा गाव आपला नव्हे .हे सगळं सोडावं आणि सरळ महाराष्ट्रात निघावं. काहीच जमले नाही तर शेती करुया आणि मग माझं मन माझ्या मळ्यात शिरत. दुपारभर च्या मेहनतीने अंग घामाने निथळून निघावं. मोट खुळू-खुळू वाजत असावी. पटाच्या गार-गार पाण्याने अंग खंगाळून घ्यावं. समोरच्या झाळीत बायजा आत्यानी चुलं पेटवलेली असावी. तिच्या मायेच्या हळव्या स्पर्शाने अजूनच चवदार झालेली गरमा-गरम झुणका-भाकर, लसूण-लाल मिरचीचा ठेचा आणि कांदा असलेली थाळी उचलावी . लिंबाच्या नाहीतर आंब्याचा थंडगार सावलीत बसावं. एका बुक्कीत कांदा फोडावा. पहिला घास घेताना दूर कुठून तरी गाईच्या किंवा म्हशीच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराचा हलकासा स्वर कानी पडावा. सुख म्हणजे तरी दुसरं काय असतं !
पण पैसा आणि स्टेटसच्या मोहात माझा पाय अडकतो, (या आयटीच्या भिंती, काचेच्या असल्या तरी खुप मजबूत आहेत.) मन मात्र सदैव घुटमळत असतं त्या माझ्या मळ्याभोवती, सह्याद्रीच्या पायथ्यापाशी, अंबाबाईच्या दाराशी, तुळजाभवानी च्या पायाशी, गणरायाच्या दहा दिवसांच्या उल्हासा भोवती, विठ्ठलाच्या नामघोषाबरोबर, तुळापुर च्या त्रिवेणी संगमावरती , पुरुषोत्तम करंडकाच्या जल्लोषा भोवती, शनिवारवाड्या च्या दिपोत्सवात, गौताळ्याच्या धबधब्याशेजारी, दिवे घाटातल्या चिंब पावसाशी, जेजुरीत रात्रभर चालणाऱ्या जागरण-गोंधळाबरोबर, त्या तीनशे किल्ल्यांवर, गावोगावी चाललेल्या लावणी महोत्सवांमध्ये,माडांच्या बनातल्या कोकणातल्या रम्य किनार्यांभोवती,................ मागे राहिलेल्या माझ्या गावा भोवती... ही यादी कधी संपेल असे वाटत नाही...
हा लेख लंवगीताईस समर्पित ..
वाचने
4162
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
चांगला लेख आहे
अप्रतिम
अप्रतीम !!
मस्त
सुहास्.. नेहमीप्रमाणे सुंदर लिखाण..
मस्त निरिक्षण रे
In reply to मस्त निरिक्षण रे by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by टारझन
+२
लेख आवडला
भारी लिखाण
छान लिहलंय. आवडलं .
मलापण आवडलं लिहिलेलं
लय भारी...
लेखन छानच आहे. दाक्षिणात्य
मस्त
लेख झकास.. थोडेसे क्वालिफाईड
अतिशय छान लेख! संपुर्ण दक्षिण
तमिळ लोकांचे सिनेमा व रजनी
मस्त लेख!
सुरेख!! केवळ सुरेख!
ठणाणा..
पक्का महाराष्ट्रप्रेमी आहेस
आणि आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे
In reply to आणि आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे by मराठे
सहमत. मलाही सवय आहे (कमी आहे,
मस्तच...