Skip to main content

विजय तेंडुलकरांना आदरांजली.

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 19/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील एक दिग्गज व्यक्तीमत्व, जेष्ठ नाटककार तसेच पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं वृध्दापकाळानं आज पुण्यात निधन झालं आहे. ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या गाजलेल्या नाटकांत ' श्रीमंत ' , ' गिधाडे ', ' शांतता कोर्ट चालू आहे ', ' सखाराम बाईंडर ', ' घाशिराम कोतवाल ', ' कमला ' यांचा समावेश होतो. मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. समस्त मराठी साहित्यविश्वातून आज शोक व्यक्त होतोय. मिसळपाव परिवार सुध्दा विजय तेंडुलकरांना आदरांजली वाहत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7838
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

>>मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली.

या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली. सध्या त्यांचे "हे सर्व कोठुन येते" हे पुस्तक वाचायला घेतले आहे, भारी लिहीत होता हा माणूस .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक 'पद्मभूषण-विजय तेंडुलकर' यांना विनम्र आदरांजली !

In reply to by आर्य

ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक 'पद्मभूषण-विजय तेंडुलकर' यांना विनम्र आदरांजली ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजय तेंडुलकर ह्या महान लेखकास माझीही विनम्र श्रद्धांजली. कथालेखक,नाटककार,कादंबरीकार ,पटकथाकार म्हणून तेंडुलकर थोरच होते पण एक अस्सल माणूसपण त्यांच्या ठायी होतं जे आपल्याला ठायी ठायी त्यांच्या लेखनातून डोकावताना दिसत असे. त्या अस्सल माणूसपणालाही माझा सलाम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक पद्मभूषण विजय तेंडुलकर यांना विनम्र आदरांजली .

श्री. विजय तेंडुलकर हे प्रतिभावान साहित्यिक होते याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्राची हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. आपला, (खिन्न) धोंडोपंत विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. आपला, (स्पष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

धोंडोपंतांशी सहमत. तरीही त्या थोर लेखक्,नाटककाराला आदरांजली!

नाटककार तेंडुलकरसाहेबांना माझाही सलाम...! तात्या.

विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. १००% सहमत पण त्या॑च्यातल्या नाटककाराला सलाम.. ते॑' च्या आक्षेपार्ह लिखाणाविषयी व मता॑विषयी चर्चा करणे आत्ता अस्थानी आहे, न॑तर कधीतरी..

विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते तसेच माणूस म्हणून महान होते. त्यांच्या साहित्याकडे पुर्वग्रहदुषित नजरेने न पहिल्यास ,ते माणुस म्हणून ही किती मोठे ते लक्शात येते. नरेंद्र मोदींबद्दलच्या उद्गाराबद्द्ल म्हणाल तर गुजरातचा नरसंहार पाहुन झालेली तात्कालिक प्रतिक्रिया होती. -आपला आनंद

विजय तेंडुलकर यांना विनम्र आदरांजली .

खडबडीत, विद्रूप, कुरुप असाही त्याचा चेहरा असतो आणि तो तितकाच खरा असतो ह्याची जाणीव मोठ्या धाडसाने मराठी रंगभूमीला आणि एकूणच मराठी मनाला करुन देण्याचे काम करणार्‍या विजय तेंडुलकर ह्या महान लेखकाला प्रणाम. चतुरंग

अशी मोठी माणसं पुन्हा पुन्हा व्हायला हवीत, एवढंच म्हणणं आता आपल्या हातात .

तेंडुलकर मागे एकदा इथे बॉस्टनला आले होते तेव्हा इथल्या एका ज्येष्ठ लेखिकेच्या बरोबर त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या होत्या - तेसुद्धा हार्वर्ड च्या पायर्‍यांवर बसून. त्यावेळी त्यांनी त्यांची विचार करण्याची पद्धत थोडीफार उलगडून सांगितली होती. प्रियाच्या (अकाली) निधनाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. माणूस म्हणून ते महान होते की नाही ते सांगता येणार नाही पण ' त्यांच्या बोलण्यातले सच्चेपण' मात्र जरुर जाणवले.

या माणसाची मला प्रथम ओळख झाली ती साप्ताहिक 'माणूस' पासून. या साप्ताहिकात 'तें ' नी अनेक सदरें लिहीली. नंतर नाटकें, एकांकिका, चित्रपट अशा अनेक माध्यमांतून हा माणूस आमच्या पिढीच्या अंगावर आला. आमच्या जीवनात एक स्थान पटकावून बसला. कायम वादात राहूनही याला नजरेआड करता आले नाही. त्यांची नाटकें, चित्रपट, एकांकिका डोक्यांत भिणभिणत रहायच्या. आमचा एक मित्र म्हणायचा, " काय वाईट्ट लिहीतो हा ! डोके भणाणून सोडतो." ' तें ' ना विनम्र आदरांजली.