सार काही क्षम्य असतं
लेखनविषय:
म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सार काही क्षम्य असतं
पण प्रेमात पडतानाचा क्षण अनुभवणं.......
हे इतके रम्य असते की
त्यापुढे तू दिसावीस म्हणुन ;
क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर
विनाकारण उभे रहाणं क्षम्य असतं
त्यामुळे परिक्षेची एक दोन युद्ध हरणं ही क्षम्य असतं.........
माझं ताटकळतं तुझी वाट पहात असणं...तुझं येणं...
आल्यावर डोळ्याच्या कोपर्यातुन
मी किती रागावलोय ;
याचा अंदाज घेणं.....
तुझं हे असं पहाणं......
हे इतके रम्य असतं की
त्यापुढे तुझं मला तासभर उन्हात ताटकळवणंही क्षम्य असतं.......
मला उमजत असतात तुझी ती खोटी आर्जवं..
तुझे ते कसलेही बहाणे....
पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं.......
वार्यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं....
त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं...
आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं....
त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं......
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......
कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......
वाचने
8768
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
फिदा.....
वाह!
In reply to वाह! by धमाल मुलगा
असेच म्हणतो
राहवत नाही म्हणुन
मस्त विजुभाऊ
वार्यामु
वा! वा!
क्या बात है विजुभाऊ!
द॑डवत तुम्हाला.
असेच
अप्रतिम
सुंदर...
व्वा मस्त.....
वाहवा!
वार्यामु
मस्त कविता
सुंदर कविता !!!
विजुभौ,
प्रेमावर कितीही वेळ बोलत राहिलो, लिहित राहिलो तरी विषय कधीच न संपणारा,
रिकाम्या वेळात तो अनुभव आपल्या मनाभोवती पिंगा घालत असतो. तशी आपली
मनभर फिरणारी....सुंदर कविता.
'' क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर
विनाकारण उभे रहाणं क्षम्य असत ''
आपण बस स्टॉपवर तासन तास वाट पाहावी,
अन् तिने आपल्या असण्याचा लांबून अंदाज घ्यायचा अन
निघुन जायचं, हे तर फार जिव्हारी लागतं...!!!!
'' पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं "
बस, याचसाठी केला अट्टाहास तो क्षण सुखाचा व्हावा !!!!
अजूनही फावल्या वेळात सुंदर स्त्रीयांची निरिक्षणे चालली, तर कानातल्या लोलकांवर आमची नजर हमखास जातेच.
टिकली जर चंद्रकोर असेल तर मेलोच आम्ही :)
''वार्यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की''
विजुभौ, दिलसे प्रेम ज्यानं केलं, त्याला हे सर्व आठवतं, सुचतं.....
वा-यामुळे भुरभुरणा-या केसांची बट मागे घेण्याची तिची अदा
जीवघेणीच..... आणि हे सर्व केव्हा आठवतं माहित आहे
कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
डोळे खरंच भरतात की असे वाटायला लागते. या निमित्ताने आम्हाला एका कवीच्या कवितेची आठवण होते.
" माझ्याच प्राक्तनात
का वैशाख उन आले,
जेथे विसावलो मी
तिथे तुफान आले. "
सारांश कविता तुमची असेल, पण अनुभव अनेकांचा मांडला राव !!! लिखते रहो, विजुभौ
- दिलीप बिरुटे
झकास्स
तुझ्यावर रागावण्याचं कारणच .....
विजुभाउ प्रेमात पडलेत
हाय येड लावल.......
मस्तच!!
ते
In reply to ते by मृगनयनी
का?
In reply to का? by प्रभाकर पेठकर
>>>का त्या
मरहम