निषेध निषेध तीव्र निषेध...
प्रतिक्रिया

In reply to या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to फरक पडतो. by प्रशु
In reply to >>तुमच्या by II विकास II
In reply to तुम्हाला by Nile
In reply to मोठा लेख by llपुण्याचे पेशवेll
In reply to मोठा लेख by llपुण्याचे पेशवेll
In reply to फरक पडतो. by प्रशु
In reply to काय फरक by Nile
In reply to फरक पडतो. by प्रशु
तुमच्या लेखी संयुक्त महारष्ट्राचे आंदोलनही गे॑रवाजवी असेल....=)) हा शब्द काळजाला भिडला ... णविणंच दिसतोय ;) च्यायला काष्मिरप्रश्ण आहे का हा बेळगाव म्हणजे ? भौगोलिक स्थाण आहे तेच रहाणार आहे , राजकीय स्थान कुठेही असल्याने काय फरक पडणार आहे (भारतात आशेपर्यंत ?) ? की ते बेळगाव म्हणजे मुंबै आहे ? आपला वैयक्तिक काय संबंध आलाय बेळगाव शी ? बेळगाव महाराष्ट्रात आल्यावर आपण प्रत्येक कुटुंबाला दरमहा काही ठरावीक रक्कम देणार आहात का ? तिथल्या लोकांना शांतता मिळाली म्हणजे झालं .. बाकी बोला ... काय म्हणताय ? जेवणात काय होतं आज ? :) - पशु
In reply to तुमच्या by टारझन
In reply to <<<भाषा हा by शिल्पा ब
In reply to तीव्र निषेधच.. by उपास
In reply to तीव्र निषेधच.. by उपास
आज चिंतामणराव देशमुखांसारखा असता तर दिल्लीश्वरांच्या श्रीमुखात राजीनामा फेकून आला असता..श्रीमुखात राजीनामा कसा फेकतात? दिल्लीश्वरांचे श्रीमुख (मुंबईत पाहिलेल्या काही कचरापेट्यांसारखे) शेजारी 'मला खाऊ द्या' अशी पाटी लावून सदैव आ वासलेले असते काय?
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, नाहीतर काय फरक पडतो, भारतात आहोत ना.. असं म्हटलं असतं तर मराठी माणसाच्या डोक्यावर मिर्या वाटल्या असत्या मर्डरजीने..यावरून एक किस्सा आठवला. आणीबाणीनंतर ज्या निवडणुका झाल्या, त्यावेळी दक्षिण महाराष्ट्रात (नक्की आठवत नाही, पण बहुधा सांगलीला) जनता पक्षाच्या एका प्रचारसभेसाठी मोरारजी देसाई (तेच ते आपले मर्डरजी!) भाषणास व्यासपीठावर उभे राहिले. त्यावेळी कोणीतरी त्यांना 'त्या' एकशेपाचांबद्दल विचारले. त्यावर मोरारजींनी 'ते एकशेपाच नव्हतेच मुळी, ते फक्त ऐशी होते, आणि ते गुंड होते' अशा काहीशा शब्दांत आपल्या 'कृत्या'चे समर्थन केले. प्रचारसभेच्या (बहुधा) अध्यक्षस्थानी विराजमान असलेल्या (किंवा किमानपक्षी व्यासपीठावर निश्चित उपस्थित असलेल्या - नेमके तपशील आता आठवत नाहीत.) एस.एम.जोशींनी (होय, तेच ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे आघाडीचे नेते!) हूं की चूं केले नाही, किंवा एका अक्षराने आक्षेप घेतला नाही. पुढे मोरारजी (तेच ते तुमचे मर्डरजी!) सत्तेवर आल्यावर एके काळच्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्याच आणखी एका आघाडीच्या नेत्याची - ना. ग. गोर्यांची - लंडनच्या दूतावासात राजदूत या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली होती, आणि ती त्यांनी स्वीकारलीही होती, असे आठवते. तेव्हा कृपा करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची कौतुके वगैरे सांगू नका - सामान्य माणसाला मूर्ख बनवण्याचा प्रकार होता तो. Politics makes strange bedfellows हेच शेवटी खरे. (नाही म्हणायला पुढे अनेक वर्षांनी अधूनमधून बेळगावच्या प्रश्नावरून राजकारण्यांनी काही ना काही खुसपट काढले, की आमच्या पुण्याची आख्खीच्या आख्खी टिनपाट महानगरपालिका - झाडून सगळे कॉर्पोरेटर - कामधंदे नसल्यासारखी - किंवा असलेले कामधंदे सोडून - बेळगावला 'अटक करून घ्यायला' जात असे, ते आठवते. पुण्यात काय महानगरपालिकेने लक्ष घालण्यासारख्या समस्या नाहीत? पुण्यातल्या समस्त रस्त्यांतले खड्डे एका रात्रीत आणि कायमचे बुजले काय? पण तेवढेच आपले पेपरात नाव छापून यायला बरे!) - पंडित गागाभट्ट.
In reply to शंका by पंगा
In reply to शब्दच्छल.. by उपास
आमच्या इथला बंडू गोखले त्यातला पहिला बळी..आणि त्याच्या बळी जाण्याला कारणीभूत कोण? १. त्याच्यावर गोळी घालण्याचा आदेश देणारे मोरारजी? (तुमच्या भाषेत मर्डरजी?) २. त्याला मरायला पाठवणारे (आणि पुढे राजकीय परिस्थिती बदलल्यावर गोळ्या घालणाचा आदेश देणार्याने केलेल्या त्याच्या हत्येच्या समर्थनाचा साधा निषेधही न करणारे) संयुक्त महाराष्ट्र समितीचे थोर पुढारी? माझ्या मते दोघेही! गोळ्या घालण्याचा आदेश देणार्या मोरारजींचा दोष अर्थात आहेच. त्यांची मग्रूरी, अगदी हलकटपणाचा आरोप जरी त्यांच्यावर केलात तरी तो मान्य आहे. त्याबद्दल प्रश्न नाही. पण एकदा बंडू गोखल्याला सत्याग्रहासाठी पाठवल्यावर त्याच्यावर जर सरकारकडून गोळ्या घालण्यात आल्या, आणि पुढे वीसएक वर्षांनंतर राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर त्याचे मारेकरी आणि त्याला सत्याग्रहाला पाठवणारे पुढारी राजकीय लाभासाठी एकत्र आले, आणि तेव्हा त्याच्या मारेकर्याने त्याच जुन्या मग्रूरीने त्या हत्येचे निर्लज्ज समर्थन केले, तर तेथेच उपस्थित असलेल्या त्याला मुळात सत्याग्रहाला पाठवणार्या नेत्यांची अशा वक्तव्याचा निषेध करण्याची किमान नैतिक जबाबदारी मानावी की नाही? आणि (कदाचित राजकीय कारणांसाठी) तेच जर का अशा वेळी मूग गिळून गप्प बसले, तर बंडू गोखल्याची सर्वात मोठी प्रतारणा कोणी केली? मोरारजींनी निश्चितच नाही. मोरारजी एवीतेवी पडले राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री. त्यांच्यावर नाही म्हटले तरी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी म्हटल्यावर वेळप्रसंगी गोळ्या घालण्याचा आदेश देणेही त्यांच्या अखत्यारीत आलेच. आता प्रसंग तितका टोकाचा नव्हता, गोळ्या घालण्याचा आदेश देण्याइतकी परिस्थिती नव्हती आणि म्हणून गोळ्या घालण्याचा आदेश देणे हे अतिरेकी कृत्य होते, ते मोरारजींनी केले आणि म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच, हे सर्व मान्य. मोरारजींच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. पण निषेध करायचा कोंणी? ज्यांच्याकडे या आंदोलनाचे नेतृत्व होते आणि ज्यांनी बंडू गोखल्याला तेथे मरायला पाठवले, त्यांनीच जर निषेध केला नाही, आणि राजकीय परिस्थिती बदलून मारेकर्याबरोबर एकाच मंचावर आल्यावर त्याच मारेकर्याने पुन्हा एकदा आपल्या कृत्याचे मग्रूरपणे समर्थन केले असता त्याविरुद्ध (राजकीय फायद्याकरिता) एक चकार शब्दही काढला नाही, तर त्या समर्थनास त्यांची मूकसंमती जाहीर होत नाही काय? आंणि त्या परिस्थितीत बंडू गोखल्याच्या हत्येचे पातक काही अंशी तरी (माझ्या मते बर्याच अंशी!) या नेत्यांच्या माथी येत नाही काय? तेव्हा कोठे गेली होती या महान नेत्यांची संयुक्त महाराष्ट्राबद्दलची आस्था? की नवीन राजकीय परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास, त्याकरिता एकशेपाचांना मोजावी लागलेली प्राणांची किंमत वगैरे या नेत्यांना महत्त्वाची नव्हती? आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या थोर नेत्यांनाच जर मुळात आज (बदललेल्या राजकीय परिस्थितीत) त्या चळवळीचे महत्त्व राहिलेले नसेल, त्याकरिता लोकांनी मोजलेल्या प्राणांच्या किमतीचे मोल राहिलेले नसेल, तर मग आमच्याकडून तरी त्या चळवळीचे महत्त्व वाटण्याची, त्याकरिता गेलेल्या प्राणांच्या किमतीचे मोल ठेवण्याची अपेक्षा कोणी का करावी? इतिहासात आणि राजकारणात हे चालतच असते, कोणीतरी कोणालातरी मारतच असते आणि कोणीतरी कोणाच्यातरी हातून मरतच असते. ते आम्ही आज काय म्हणून उगाळत बसावे? त्यांना मरू घालणार्यांना जर तो कालचा इतिहास उगाळण्यात रस नसेल, फक्त आजच्या परिस्थितीकडे आणि येणार्या उद्याकडे पाहायचे असेल, तर आम्ही तरी याहून वेगळे काही का करावे? बंडू गोखल्याच्या (आणि इतर एकशेचारांच्या) तळमळीविषयी शंका नाही. मात्र त्यांना मूर्ख बनवून त्यांचा तोफेचे खाद्य म्हणून वापर करण्यात आलेला आहे या मताशी कायम आहे. (बंडू गोखल्याच्या बलिदानाचे त्याला लढायला पाठवणार्या नेत्यांना त्यानंतर वीस वर्षांनंतर सोयरसुतक नव्हते. असते, तर त्याच्या मारेकर्याच्या वीस वर्षांनंतरच्या त्याच्या हत्येचे समर्थन करणार्या मग्रूरीच्या वक्तव्याचा त्यांनी किमान निषेध केला असता. निदान त्याच मंचावर बसले असता राजकीय फायद्याकरिता गप्प राहिले नसते. बंडू गोखल्याची याहून मोठी फसवणूक कोणी केली नसेल.) बाकी महाराष्ट्राचे म्हणाल, तर 'बाँबे बिगर बायलिंग्वल' जाऊन आता वेगळ्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधीच झालेली आहे. (माझा जन्म महाराष्ट्रातच झाला, मुंबई राज्यात नव्हे.) आणि ही स्थापना टिकाऊ आहे. मराठीभाषकांकरिता वेगळ्या ("संयुक्त") महाराष्ट्र राज्याची मागणी योग्य होती किंवा नाही, मुळात भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व बरोबर होते की नाही, या मुद्द्यांवर मतांतरे असतील, पण आता महाराष्ट्र जाऊन पुन्हा जुने 'बाँबे बिगर बायलिंग्वल' येणे नाही. कोणीही काहीही म्हणो, परंतु हे चक्र आता पुन्हा उलटे फिरणे नाही, कोणी फिरवू शकत नाही. (उद्या जनतेच्या सोयीसाठी जनतेच्या मागणीनुसार नवी पुनर्रचना किंवा रचनेत थोडाफार फेरफार झाल्यास गोष्ट वेगळी. पण ती नवी घटना असेल, जुन्याशी त्याचा संबंध नाही. आणि अशा एखाद्या पुनर्रचनेकरिता जनतेने जर एखादे आंदोलन केले, तर तेही नवे आंदोलन असेल, जुन्याशी त्याचा संबंध लावता येणार नाही.) तेव्हा आता बंडू गोखल्याच्या, इतर एकशेचारांच्या आणि एकंदरीतच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नावाने गळे काढण्याचे (सर्वांनीच) थांबवावे, हे उत्तम. बेळगावची जर काही समस्या असेलच, तर ती बेळगावच्या आजच्या रहिवाश्यांच्या आजच्या प्रश्नांच्या संदर्भात सोडवण्याचा प्रयत्न करावा, गरज पडल्यास त्यासाठी न्यायालयात जावे किंवा आंदोलनही करावे, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी किंवा त्यामागच्या तथाकथित तत्त्वांशी त्याचा संबंध जोडू नये, हे उत्तम. जुन्याच्या उगाळण्याने आणि जुन्या गोष्टींच्या नावाने गळा काढण्याने फक्त आग जळती ठेवून त्यावर आपली पोळी भाजू पाहणार्या राजकारण्यांचा फायदा होतो, अन्य कोणाचाही नाही.
मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली नसती तर कदाचित मी ह्या साईटवर नसतोही. . गुजरातेत पडलो असतो किंवा केंद्रशासित..हे पटले नाही. १. मुंबई द्वैभाषिक राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये झाली हे लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य जर अस्तित्वात आले नसते, तर गुजरात राज्यही अस्तित्वात आले नसते, हे सयुक्तिक आहे. तेव्हा मराठी माणसांनी जर रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली नसती, तर आपण गुजरातेत पडण्याची भीती आपल्याला जरूर असू शकेल, पण तशी शक्यता अजिबात नव्हती. २. मुंबई राज्याच्या विभाजनानंतरसुद्धा मुंबई शहर हे गुजरातीभाषक मुख्यभूमीशी भौगोलिकदृष्ट्या संलग्न नसल्यामुळे गुजरात राज्यात गेले असते ही शक्यता धूसर वाटते. (किंबहुना तसे झाले असते, तर त्याच तत्त्वाने बेळगावबद्दलच्या महाराष्ट्राच्या भूमिकेस त्याने पुष्टीच मिळाली असती असे वाटते. आणि तशीही मुंबईतील मराठीभाषकांची संख्या मुंबईतील गुजरातीभाषकांच्या संख्येपेक्षा बरीच अधिक असावी. तेव्हाही आणि आजही.) ३. पण तरीही 'मुंबईत कोणत्याही एका भाषिक समूहाची टक्केवारी पन्नास किंवा अधिक नाही' या कारणास्तव यदाकदाचित मुंबई महाराष्ट्रास मिळाली नसतीच, तर त्याच न्यायाने ती इतर कोणत्याही राज्यास मिळण्याचेही काही कारण नव्हते. ४. याचा अर्थ, मुंबई जर महाराष्ट्रास मिळाली नसती, तर फार फार तर केंद्रशासित होऊ शकली असती. ५. यदाकदाचित मुंबई केंद्रशासित झाली असती, तरी त्यामुळे आपल्याला या साइटवर येता न येण्याचे काहीच कारण नव्हते. ५अ. केंद्रशासित प्रदेशांत मराठी सायटी काढू नयेत असा कोणताही नियम अस्तित्वात असल्याचे ऐकिवात नाही. ५ब. तसेही या सायटीचा सर्वर मुंबईत असण्याबद्दल साशंक आहे. ५क. या सायटीचे मूळ संस्थापक हे ठाण्याचे एक सद्गृहस्थ आहेत, असे ऐकलेले आहे. माझ्या आजवरच्या माहितीनुसार ठाणे हे बृहन्मुंबईच्या हद्दीत कधीही नव्हते. सबब, मुंबई केंद्रशासित झाली असती तरी ठाणे हे महाराष्ट्रातच राहिले असते, आणि त्यामुळे मुंबईच्या केंद्रशासित होण्याचा या सायटीच्या स्थापनेवर काहीही फरक पडला नसता. ५ड. केंद्रशासित प्रदेशांच्या रहिवाशांनी मराठी सायटींवर वावरू नये, अशाही स्वरूपाचा कोणता नियम असण्याबद्दल ऐकलेले नाही. ५ई. मुंबई शहर महाराष्ट्रात नसतानासुद्धा (पक्षी: महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलेले नसताना) मुंबईत मराठी वृत्तपत्रे आणि इतर मराठी प्रकाशने अस्तित्वात होती, आणि मुंबईतील मराठीभाषक ती वाचत होतेच. इंटरनेटचे माध्यम आल्यावर मुंबई केंद्रशासित झाली असतासुद्धा या परिस्थितीत फरक पडण्याचे काही कारण नसते. ५फ. महाराष्ट्राबाहेर गुजरातेत वडोदरा येथे, मध्यप्रदेशात इंदौर आणि ग्वालियर येथे, तसेच गोव्यात मराठीभाषकांच्या किंवा मराठी जाणणार्यांच्या वस्त्या आहेत. इतर ठिकाणीही असतील. या ठिकाणी मराठी वृत्तपत्रे किंवा अन्य प्रकाशने प्रकाशित करण्यास बंदी असावी असे वाटत नाही. यांपैकी काही ठिकाणी मराठी वृत्तपत्रे प्रकाशित होतही असतील. निदान गोव्यात तरी होतात असे वाटते. खुद्द बेळगावातसुद्धा होतात. जेथे वृत्तपत्रे प्रकाशित होऊ शकतात, तेथे आंतरजाल आल्यावर मराठी सायटी यावयास काहीच अडथळा असू नये. सबब, 'मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली नसती तर कदाचित मी ह्या साईटवर नसतोही' हे आपले विधान (किंवा ही आपली भीती) निराधार वाटते. - पंडित गागाभट्ट.
In reply to पटले नाही by पंगा
In reply to पंगा, by शिल्पा ब
In reply to टग्या by आण्णा चिंबोरी
In reply to का हो ? by शिल्पा ब
In reply to शिल्पाताई by पुष्करिणी
In reply to पटले नाही by पंगा
In reply to प्रतिसाद आवडला.. by उपास
पण त्यांच्यातील मताशी मी सहमत होऊ शकत नाही, दिलगीर आहे.आपले एकमत झाले(च) पाहिजे (संयुक्त महाराष्ट्रासारखे), असा कोठला नियम आहेसे वाटत नाही. किमान माझे तसे मागणे नाही. असो. बाकी सविस्तर जमल्यास नंतर. - पंडित गागाभट्ट.
In reply to प्रतिसाद आवडला.. by उपास
In reply to प्रतिसाद आवडला.. by उपास
In reply to ---मुंबईत by निस्का
मुंबईत 'मराठमोळे' वातावरण आहे/होते?पुण्यात ठीक आहे पण मुंबैत ते कधी नव्हतच........बरोबर बोललात. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे
In reply to ---मुंबईत by निस्का
In reply to होते की by प्रदीप
पन्नाशीच्या, साठीच्या दशकांत मुंबईत बर्यापैकी मराठमोळे वातावरण होते.पन्नाशीच्या, साठीच्याच कशाला, मी तर म्हणतो सत्तरीच्या दशकात किंवा अगदी ऐशीच्या दशकाच्या मध्यापर्यंतसुद्धा मुंबईत (निदान ज्या भागांशी माझा संबंध आला तेथे) बहुधा बर्यापैकी मराठमोळे वातावरण असावे. माझे आजोळ गिरगाव-ठाकूरद्वार भागातले. ते ऐशीच्या दशकाच्या उत्तरार्धात तेथून हलेपर्यंत तेथे बर्यापैकी जाणेयेणे असे. छान मराठमोळे वातावरण होते. शेजारीपाजारी सगळे मराठी, बोलणेचालणे मराठी, अगदी किराणा अने भुसार मालाचे वेपारी जरी गुजराती असले, तरी गिर्हाइकाशी मराठीतच बोलत. त्याशिवाय नातेवाइकांच्या निमित्ताने ग्रांट रोड (शास्त्री हॉल), दादर, विलेपार्ले, किंवा इतर उपनगरांतसुद्धा जेथेजेथे जाण्याचा संबंध आला, तेथे याहून वेगळी परिस्थिती निदान जाणवली तरी नाही. हिंदी आवर्जून जेथे वापरावी लागे, असे फार थोडे व्यवहार म्हणजे (१) टॅक्सीवाल्याशी बोलताना (गरजेपोटी), (२) बसचे तिकीट मागताना (केवळ सगळे हिंदीत बोलत म्हणून, नाहीतर बेस्टच्या कंडक्टरला सहसा छान मराठी कळत असे, आणि बहुतकरून मराठी बोलणाराच निघे), आणि (३) लोकलचे तिकीट काढताना (येथेही कदाचित मराठी चालू शकली असती, असे वाटते, पण खात्री नाही. तसाही गिरगावकरांचा लोकलशी संबंध कमीच. निदान त्या काळी आणि आमच्या आईच्या पिढीपर्यंत तरी.). कदाचित दूधवाल्या भय्याशी हिंदी बोलावे लागत असल्यास कल्पना नाही. (आमच्या आजोळी दूधकेंद्राचे दूध आणि तेही बहुधा चाळीतल्या रामागड्याला पिटाळून येत असल्याकारणाने भय्याशी संबंध नव्हता.) अर्थात, तेव्हासुद्धा मुंबईत सर्वत्र अशी परिस्थिती असेलच, असे नाही. मराठमोळे वातावरण नसलेले विभाग मुंबईत तेव्हाही असावेतच. माटुंगा-किंग्ज़ सर्कल, नेपियन सी रोड, वांद्रे (पश्चिम), भायखळा, हाजीअली वगैरे विभागांत तेव्हाही मराठी सर्रास वापरली किंवा किमान सरसकटपणे समजली जात असेलच असे सांगता येत नाही. माझा फारसा संबंध न आल्यामुळे मला नक्की माहीत नाही. पण तेथे ही परिस्थिती बहुधा पूर्वापार असावी, अलीकडची नसावी. आणि तसाही मराठी माणसाचा या विभागांशी रोजच्या व्यवहारांकरिता कितपत संबंध येत असावा? (क्वचित आलाच तर बंबैया हिंदीत - हा हिंदीवरचा मराठी माणसाचा सूड आहे असे माझे प्रामाणिक मत आहे, पण ते असो - काम चालून जात असावे.) (फोर्ट, नरीमन पॉइंट वगैरेंसारख्या ठिकाणी जेथे मराठी माणसाचा निदान नोकरीपुरता तरी रोजचा संबंध येऊ शकतो, तेथे मराठमोळे वातावरण आहे असे निश्चितच म्हणता येणार नाही, पण मग तेथे ते तसे कधी(पर्यंत) होते, याबद्दल साशंक आहे.) ऐशीच्या दशकाच्या उत्तरार्धात माझे आजोळ गिरगाव-ठाकूरद्वार भागातून कायमचे हलल्यावर त्या भागाशी नंतर माझा संबंध आलेला नाही. पण ऐशीच्या दशकात एक गोष्ट जाणवू लागली होती. ती म्हणजे, चाळीत हळूहळू वाढू लागलेला गुजराती-मारवाडी टक्का. याला कारण, गुजराती-मारवाडी मंडळींना धंद्याच्या दृष्टीने ठिकाण सोयिस्कर असल्याकारणाने, जागा मिळवण्यासाठी ते वाटेल ती किंमत मोजायला राजी असत, आणि चाळमालकाबरोबरच मराठी भाडेकरूंनासुद्धा (जागा सोडण्याकरिता) किंमत देऊ केली जात असल्याकारणाने, मराठी भाडेकरूसुद्धा चाळीतली जुनी आणि अडचणीची जागा सोडून उपनगरांत जायला राजी होऊ लागली. त्यापूर्वी चाळीतून स्थलांतरे होत नसतच, असे नाही; बोरिवली, मुलुंड, डोंबिवली, अगदी बदलापूरपर्यंतही लोक चाळ सोडून गेलेली पाहिलेली आहेत, पण अशी स्थलांतरे ही सहसा (१) घरातल्या मुलीचे त्या-त्या ठिकाणच्या घरात लग्न झाल्याकारणाने, किंवा (२) विस्तृत कुटुंब चाळीतल्या छोट्याशा खोलीत राहत असता त्यापैकी एखाद्या भावंडाने लग्न झाल्यावर दाटी कमी करण्यासाठी जमेल तसा स्वतंत्र संसार थाटल्यामुळे, यांपैकी एखाद्या कारणाकरिता होत असत. चाळीतली जागा सोडावयास मंडळी सहसा राजी नसत, आणि एखादवेळेस अशा कारणाकरिता सोडलीच, तरी कुटुंबातला एखादा सदस्य तरी मूळ जागी टिकून राहत असे. ऐशीच्या दशकात ही परिस्थिती हळूहळू बदलू लागल्याचे जाणवू लागले, आणि अलीकडे त्या भागात अनेक वर्षांत गेलेलो नसलो, तरी आज खूपच बदललेली आहे असे ऐकून आहे. (अर्थात हे होणे स्वाभाविक होते.) तर सांगण्याचा उद्देश, त्या वेळपर्यंत तरी मराठीची परिस्थिती (निदान मराठी माणसाचा जेथे रोजच्या व्यवहारांकरिता संबंध येत असे अशा ठिकाणी) तितकीशी वाईट असावी असे वाटत नाही. त्यानंतर माझा मुंबईत राहण्याचा संबंध जेमतेम वर्ष ते दीड वर्षापुरता आला असावा. तोही सलग नाही. दोन वेगवेगळ्या वेळेला. राहण्याची ठिकाणे: गोरेगाव (हायवेच्या पल्याड), अंधेरी (पश्चिमेस स्टेशनालगत) आणि सहार. गोरेगाव (हायवेच्या पल्याड)चे वातावरण निश्चितपणे मराठमोळे म्हणू शकणार नाही, परंतु अगदीच अमराठी वाटले नाही. (हायवेच्या अल्याड मुख्य गावात कदाचित अधिक बरी परिस्थिती असावी; मला कल्पना नाही.) अंधेरी (पश्चिम)चा (किमानपक्षी स्टेशन ते एस व्ही रोडपर्यंतच्या पट्ट्याचा - त्यापलीकडची फारशी कल्पना नाही.) दूरान्वयानेही मराठमोळेपणाशी संबंध जाणवला नाही. सहार-चकाला भागात (निदान मी जेथे राहिलो त्याच्या जवळपास) पुन्हा मराठमोळेपणाचा अभाव तरी जाणवला नाही. १९९३पासून मात्र माझा मुंबईशी संबंध (दोनतीन वर्षांआड एखाददुसर्या दिवसाची धावती भेट - तीही दिली तर - देण्यापलीकडे) फारसा आलेला नाही. मधल्या काळात मुंबईच्या डेमोग्राफिक्समध्ये झालेल्या फेरफारांची मला फारशी कल्पना नाही. मात्र अलीकडे खूप बोंबाबोंब वर्तमानपत्रांतून ऐकू येते, त्यावरून मधल्या काळात बहुधा आकाश कोसळले असावे असे वाटते. मात्र एक शंका आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली १९६० साली. ऐशीच्या दशकाचा उत्तरार्ध काय किंवा १९९३ काय, ही त्याच्या बर्याच नंतरची गोष्ट झाली. म्हणजे मग (मुंबईसकट संयुक्त) महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा मुंबईतल्या मराठी माणसाला नेमका फायदा झाला, की तोटा? (की मुंबईसकट संयुक्त महाराष्ट्राचा आणि मुंबईतल्या मराठी माणसाच्या बर्यावाईटाचा काहीही अनोन्य संबंध नाही? पण मग ते १०५ नेमके कशासाठी मेले?) - पंडित गागाभट्ट.
In reply to होते की by प्रदीप
पुण्या अथवा इतर शहरांच्या बाबतीत मला माहिती नाही, तेव्हा मी तुलनात्मक सांगू शकत नाही.१९९२ साली मी पुणे कायमचे सोडले असे म्हणायला हरकत नाही. त्या वेळेपर्यंत तरी पुणे हे त्या मानाने खूपच अधिक मराठमोळे होते असे वाटते. म्हणजे ४११०३०च्या तीन पेठांतच नव्हेत, तर इतरत्रही. अर्थात तेव्हाही पुण्याचे सर्वच विभाग मराठमोळे होते, अशातला भाग नाही. कँप विभाग हा (नामदेव शिंपी समाजाची बर्यापैकी वस्ती वगळता) खूपसा मुसलमान-ख्रिस्ती-पारशी-सिंधी (आणि एकंदरीतच बहुतकरून अमराठीभाषक) असावा. तसेच औंध, सिंध सोसायटी वगैरे भागही मोठ्या प्रमाणात अमराठी असावेत. एक (आता नेमकी कोणती पेठ ते आठवत नाही, पण) दाक्षिणात्य (बहुधा बहुतकरून 'शेट्टी' हे उपनाम धारण करणार्या - बहुधा घरी तुळूभाषक(?), पण घराबाहेर तितकीच अस्खलित मराठी बोलणार्या - मंडळींचा) विभाग असल्याचेही आठवते. इतरही अमराठी भाग असावेत. पण असे काही थोडे पारंपरिक अमराठी भाग वगळल्यास बहुतकरून मराठीची परिस्थिती खूपच चांगली असल्याचे आठवते. १९९२नंतर पुण्याशी दर दोनतीन वर्षांआड दोनतीन आठवड्यांकरिता भेट देण्यापलीकडे फारसा प्रत्यक्ष संबंध आलेला नाही, त्यामुळे सद्यपरिस्थितीची नीटशी कल्पना नाही. अलीकडे उत्तरेहून येणार्या लोकांचे प्रमाण नको तितके वाढलेले आहे अशी बोंब तेथूनही ऐकू येते, पण माझ्या भेटींत मला असे जाणवलेले नाही. अर्थात माझा संबंध मर्यादित काळापुरता आणि त्यातही मर्यादित भागांशी येत असल्याकारणाने तसे असू शकेल. तशीही पुण्याची व्याप्ती (आणि त्यामुळे व्याख्या) हीसुद्धा अलीकडे खूपच बदललेली आहे. त्यात आयटीमुळे स्थलांतरितांचे प्रमाण - त्यातही इतर राज्यांतून येणार्या स्थलांतरितांचे प्रमाण - खूपच वाढलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या डोळ्यांत ती आलेली नाही, इतकेच. आयटीमुळे पुण्याची जी वाढ झाली, आणि मुख्य म्हणजे ती ज्या भागांत झाली, त्यातील बर्याच भागांबद्दल मी पुणे सोडायच्या वेळेस 'अशा नावाची गावे पुण्यात किंवा पुण्याजवळ आहेत' याचीही कल्पना नव्हती. आज त्या 'हॅपनिंग' जागा आहेत, आणि तेथील जागांचे भाव अवाच्या सवा झालेले आहेत, असे कळते. कदाचित आजकाल तेथे (आणि पुण्याच्या आजूबाजूच्या बाह्यविभागांत - आउटलायिंग एरियाज़मध्ये) या 'बाहेरच्या लोकांच्या' इन्फ्लक्समुळे मराठमोळे वातावरण राहिलेले नसूही शकेल. याबद्दल थोडेफार उडतउडत आणि अर्धवट ऐकलेले आहे, प्रत्यक्ष अनुभवलेले नाही. कदाचित पुण्याचे सद्यरहिवासी याबद्दल खात्रीलायकरीत्या सांगू शकतील; सद्यपरिस्थितीची मला नीटशी कल्पना नाही. - पंडित गागाभट्ट.
In reply to ---मुंबईत by निस्का
In reply to पटले नाही by पंगा
In reply to उत्तम प्रतिसाद by प्रदीप
त्यावेळी मागील काही बाबी विसरणे व पुढे जाणे हे देशाच्या भवितव्यासाठी शहाणपणाचे आहे, असा सूज्ञ विचार एसेम ह्यांनी केला असेल तर त्यात मला गैर वाटत नाही (आणि त्याचबरोबर मी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उदोउदो करणेही तितकेच रास्त वाटते). काळ बदलत रहातो, संदर्भ बदलत रहातात, आपले दृष्टिकोन बदलत रहातात आणि नवी गणिते तयार होतात, ह्यात गैर काही नाही. तेव्हा एसेम ह्यांनी थोडाफार विवेक दाखवला असावा. तसा त्यांनी दाखवला हेच मलातरी कौतुकाचे वाटते.अगदी बरोबर. असाच विवेक आता कोणीही दाखवायला तयार नाहि. पन्नास वर्षांपूर्वीचे प्रश्न कुरवाळत बसण्यापेक्षा पुढे चलायला मंड्ळी तयारच नाहीत. ज्या चळवळीच्या मुख्य नेत्यांनीही सुज्ञपणा दाखवला त्या चळवळीचे फक्त निमित्त करून अजूनही राजकारण केले जाते व भावना भडकवल्या जाऊ शकतात हेच कीती बरोबर आहे? ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
In reply to धन्यवाद by ऋषिकेश
त्या चळवळीचे फक्त निमित्त करून अजूनही राजकारण केले जाते व भावना भडकवल्या जाऊ शकतात हेच कीती बरोबर आहे?आता खरे तर निव्वळ राजकारणी लोक ह्याचा वापर करून घेत आहेत.
In reply to उत्तम प्रतिसाद by प्रदीप
मात्र ज्या उमाळ्याने तुम्ही एसेम. जोशींना धारेवर धरले आहे, त्यामागील भावनेचा आदर राखूनही, त्याविषयी माझा मतभेद आहे. बंडू गोखले व इतर १०४ हुतात्म्यांना 'मूर्ख बनवून त्यांचा तोफेचे खाद्य म्हणून वापर करण्यात आलेला आहे', असे तुम्ही म्हणत आहात. असे काही समितीच्या नेत्यांनी केलेले नाही. त्या चळवळीचे सर्वच नेते लढ्याच्या प्रत्यक्ष अग्रणी होते. 'तुम्ही व्हा पुढे, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी', असली कसलीही चलाखी त्यांनी केलेली नव्हती. त्यांनी सर्वांनीच लाठीमार खाल्लाय, तुरुंगवास भोगलाय. आणि सर्व काही करायचे ते करून, अलिकडच्या तथाकथित 'पोलादी ' नेतृत्वाप्रमाणे केलेल्या कृत्यांची ओनरशिपही त्यांनी कधीचा नाकारली नव्हती. तेव्हा तुम्ही तीव्र शव्ब्दांत केलेली त्या नेत्यांची निर्भत्सना गैरलागू आहे.असेलही कदाचित. ही चळवळ घडली तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, त्यामुळे मला अर्थातच फर्स्ट-हँड माहिती नाही. आपण ही चळवळ आपल्या हयातीत बघितलेली असल्याकारणाने अधोरेखित तपशिलांची अधिक खात्रीलायक माहिती आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे असूही शकेल. मात्रः
पण तुमचा आक्षेप, ह्या घटनांनंतर जेमतेम २० वर्षांनंतर वेगळ्या व्यापीठावर एकत्र आल्यावर एस्सेम ह्यांनी , मोरारजींच्या उद्धट उद्गारांचा निषेध का केला नाही, ह्याविषयी आहे. तुम्ही जो किस्सा लिहीला आहे, तो तसाच घडला असेल तर, एस्सेम ह्यांनी निषेध नोंदवणे जरूरीचे होते हे खरे आहे. पण एक वेगळा झंझावात तेव्हा राष्ट्रात आलेला होता, त्यावेळी मागील काही बाबी विसरणे व पुढे जाणे हे देशाच्या भवितव्यासाठी शहाणपणाचे आहे, असा सूज्ञ विचार एसेम ह्यांनी केला असेल तर त्यात मला गैर वाटत नाही (आणि त्याचबरोबर मी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उदोउदो करणेही तितकेच रास्त वाटते). काळ बदलत रहातो, संदर्भ बदलत रहातात, आपले दृष्टिकोन बदलत रहातात आणि नवी गणिते तयार होतात, ह्यात गैर काही नाही. तेव्हा एसेम ह्यांनी थोडाफार विवेक दाखवला असावा.मोरारजींनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यालाच तात्त्विक विरोध दाखवला असता, किंवा 'राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्या वेळी त्या परिस्थितीत मला जे योग्य वाटले, ते मी केले' अशा स्वरूपाचे विधान केले असते, आणि एसेम 'मागील काही बाबी विसरून पुढे जाण्याकरिता' 'बदललेल्या काळात आणि बदललेल्या संदर्भांना अनुसरून' गप्प राहिले असते, तर ते कदाचित 'नवीन परिस्थितीत विवेकी' ठरूही शकले असते. कारण ते बहुधा 'मोरारजींच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून तत्कालीन परिस्थितीचे आकलन' म्हणून (त्याच्याशी व्यक्तिशः सहमत न होता) सोडून देण्यासारखे विधान ठरते. मात्र, 'ते (म्हणजे मेलेले) १०५ नव्हतेच, ते ८०च होते, आणि ते गुंड होते' अशा स्वरूपाच्या मोरारजींच्या विधानास त्याच मंचावर असताना साधा आक्षेपही न घेतल्यास 'याचा अर्थ (१) ते १०५ नव्हते, ८०च होते, आणि (२) ते गुंड होते ही मोरारजींची विधाने यांना मान्य आहेत काय?' असा प्रश्न पडतो. त्यापुढे 'ते गुंड होते हे मान्य असल्यास, मग ते 'गुंड' यांनीच धाडले होते ना? हेही यांस मान्य आहे काय?' हा पुढचा प्रश्न आपोआपच उद्भवतो. (आणि 'बंडू गोखले आणि इतर १०४ हे आम्हीच पाठवलेले गुंड होते' हे खुद्द त्या चळवळीच्या अग्रणींनी मूकसंमतीने अप्रत्यक्षपणे मान्य करणे, हा त्या चळवळीचा एक वेळ सोडा, खुद्द बंडू गोखल्याचा अपमान नव्हे काय? तेही त्याच्याच नेत्यांकडून? याचा अर्थ '१९७७मध्ये तात्कालिक राजकीय गरजेसाठी बंडू गोखले हा 'गुंड' म्हणून संबोधून फेकून देण्यासारखा डिस्पोज़ेबल झाला होता' असा का घेऊ नये? म्हणजेच त्याचा केवळ तोफेचे खाद्य म्हणून, एक प्यादे म्हणून वापर झाला नाही काय?) आक्षेप संयुक्त महाराष्ट्र चळवळीला व्यापक राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने विवेकाने विसरण्याला नाही. आक्षेप आहे तो आपल्याच कार्यकर्त्यांवरील वाटेल त्या आरोपांना (तसे नाही हे माहीत असून) मूकसंमती देण्याला. (या अग्रणी नेत्यांना पश्चात्बुद्धीने आपल्याच कार्यकर्त्यांच्या चारित्र्याबद्दल नव्याने संशय निर्माण झाला असल्यास गोष्ट वेगळी.) 'मेलेले १०५ नव्हते, ८०च होते' यामुळे परिस्थिती कमी आक्षेपार्ह किंवा अधिक स्वीकारार्ह नेमकी कशी होते, हा आणखी एक पूर्णपणे वेगळा मुद्दा. देशाच्या भवितव्यासाठी विवेकाने मागील काही बाबी विसरणे ही एक गोष्ट, आणि (मान्य नसताना किंवा मान्य करण्यासारखे नसताना) वाटेल ते आरोप डोक्यावर घेणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट. एक उपप्रश्नः याचा अर्थ, बदललेल्या परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही त्या चळवळीच्या अग्रणींच्या लेखी 'देशाच्या भवितव्याकरिता विसरून जाण्यासारखी एक बाब होती' असा घ्यावा काय? तसे असल्यास (हत्येच्या समर्थनाचे आणि गुंड धाडल्याच्या आरोपाचे न केलेले खंडन वगळता) त्यात निश्चितपणे काही गैर आहेच, असे नाही. पण मग जर चळवळीच्या अग्रणी नेत्यांकरितासुद्धा जर ही राष्ट्रहितार्थ विसरून जाण्यायोग्य जुनी बाब असेल, तर मग आज आपण तरी ती वारंवार उगाळत का बसावी? इतरत्र आधी म्हटल्याप्रमाणे, कोणाचीही काहीही मते असोत, वेगळ्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही आता घडून गेलेली घटना (fait accompli) आहे. कोणीही काहीही म्हटले, तरी आता काळाची चाके उलटी फिरवून ही बाब कोणी अघटित करू शकत नाही. मग प्रश्न आला कोठे? राहता राहिला प्रश्न बेळगावचा. हा दोन राज्यांमधला प्रश्न आहे हे लक्षात घेता, संबंधित राज्यसरकारे आणि केंद्रसरकार न्यायालयात वर्षानुवर्षे जो काही गोंधळ घालायचा तो परस्पर घालत बसूदेत. हे आवश्यक आहे किंवा योग्य आहे असे मला व्यक्तिशः वाटत नाही, परंतु संबंधित सरकारांचे दृष्टिकोन याहून वेगळे असू शकतात, त्यात मी ढवळाढवळ करू किंवा ते बदलू शकत नाही आणि इच्छीतही नाही. त्यामुळे ते जे काही परस्पर दृष्टिआड चालले आहे ते चालू द्या. असे मला वाटते. त्यातून जे काय निष्पन्न व्हायचे ते कधी ना कधीतरी होईल. नाहीतर होणारही नाही. पण मध्यंतरी राजकीय पक्षांनी आणि सामान्य जनतेने याबाबत आंदोलने करण्याची आणि रस्त्यावर उतरून गोंधळ घालण्याची नेमकी काय गरज आहे?
तुम्ही जो किस्सा लिहीला आहे, तो तसाच घडला असेल तरकिस्सा आणीबाणीनंतरच्या निवडणुकांआधीच्या प्रचारमोहिमेतला आहे. तत्कालीन वृत्तपत्रांत त्या काळी जे वाचले, त्याच्या आठवणींतून लिहिलेला आहे. तपशिलांची अचूकता पडताळण्यासाठी जालावर या घटनेबद्दलच्या माहितीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या मर्यादित प्रयत्नांना दुर्दैवाने अपयश आले. तत्कालीन वृत्तपत्रांतून शोध घेणे मला व्यक्तिशः शक्य नसल्याकारणाने केवळ आठवणींवर विसंबून राहणे मला भाग आहे. किस्सा आठवणींतून उतरवलेला असल्याकारणाने मोरारजींच्या वक्तव्यातील नेमक्या शब्दांबाबतच्या माझ्या आठवणींत (इतक्या वर्षांनंतर आणि नेमका संदर्भ डोळ्यांसमोर नसताना) थोडा फेरफार होण्याची शक्यता गृहीत धरूनसुद्धा, त्या वक्तव्यातील मुद्द्यांबद्दलच्या आणि नेमक्या आशयाबद्दलच्या माझ्या आठवणीबद्दल माझ्या मनात शंका नाही. अर्थात, या घटनेच्या तपशिलांबद्दलचा एखादा दुवा जालावर कोणाला सापडू शकल्यास, किंवा अन्य कोणत्याही प्रकारे या घटनेबद्दल कोणी काही खात्रीलायक तपशील (जाहीरपणे) पुरवू शकल्यास, त्याचे स्वागतच आहे.
शेवटचे निटपिकींग अनावश्यक होते, ते सोडून प्रतिसाद आवडला.'मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली नसती तर कदाचित मी ह्या साईटवर नसतोही' हे विधान कोणत्याही कोनातून पाहिले, तरी निराधार वाटते, हे दाखवून देण्यासाठी ते निटपिकिंग (मला) आवश्यक वाटले. धन्यवाद. अतिअवांतरः या विषयी जालावर थोडा शोध घेत असताना (वरकरणी मराठी आडनाव असलेल्या एका गृहस्थाच्या ब्लॉगवरील एक दुवा सापडला. दुव्यावरील मजकुरातून, तसेच मजकुरातील 'टाइम' मासिकामधील वृत्ताच्या दुव्यावरील मजकुरातून, आंदोलनकालीन घटनांबद्दल एक वेगळा पर्स्पेक्टिव मिळतो, असे वाटते. अर्थात, दोन्ही दुव्यांवरील माहितीच्या विश्वसनीयतेबद्दल वैयक्तिक खात्री नसल्याकारणाने, नो कमेंट. - पंडित गागाभट्ट.
In reply to उत्तर by पंगा
आक्षेप संयुक्त महाराष्ट्र चळवळीला व्यापक राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने विवेकाने विसरण्याला नाही. आक्षेप आहे तो आपल्याच कार्यकर्त्यांवरील वाटेल त्या आरोपांना (तसे नाही हे माहीत असून) मूकसंमती देण्याला.तुम्ही आठवणीतून सांगितलेल्या घटनेविषयी काही वाद घालायचा नाही. जालावर सगळेच दुवे सापडवून दर्शवण्याचा अटटाहास मीतरी करीत नाही. तेव्हा ती घटना तशीच घडली असे मानून, तुम्ही म्हणता तशी मोरारजीच्या आरोपास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मूक संमति देणे हे चूक आहे. पण तरीही मला वाटते त्या क्षणी एस्सेम ह्यांनी (बहुधा) आपल्याच सहकार्यांच्या हाती कोलित देण्याचे मनोमनी नाकारले असावे. ते एक ज्येष्ठ नेते होते, व त्यांनी मोरारजीच्या वक्तव्याचा थोडाजरी जाहीर पुनरुल्लेख केला असता तर जनता पक्षाच्या नरड्याला, जन्मापूर्वीच नख लागले असते-- होय, मधू लिमये इ. त्यांच्या काही तर्ककर्कश सहकार्यांमधे ही क्षमता जरूर होती (तुमच्याच प्रमाणे मीही एक उल्लेख केवळ आठवणीच्या आधारे केला आहे, तो नॉर्वेच्या तत्कालिन राष्ट्राध्याक्षाच्या हत्येचा. त्या घटनेवरून (प्रजा?) समाजवादी पक्षाने तेव्हाच्या आपल्याच मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेची वासलात लावली होती. ह्यातील तपशिल आता आठवत नाहीत). गिरीश शहाणे ह्यांच्या ब्लॉगचा दुवा पाहिला. त्यात काही खास नवी माहिती मिळाली नाही. सलमान रश्दी/आफ्टरनून ह्यांचे संदर्भ वापरणार्याबद्दल काय विशेष बोलणार? 'टाईम'चा संदर्भ आहे खरा, पण त्यात लिहील्याप्रमाणे मुंबईत अत्यंत अनागोंदीची परिस्थिती होती व अगदी नाईलाजाने सरकारने शेवटी गोळीबार केला, हा सूर चुकिचा व खोडसाळ वाटतो. कारण असले काही खरोखरीच घडले असेल व अगदी बेधुंद जमावास आटोक्यात आणण्याकरीता नाईलाजाने गोळीबार केला गेला असेल, असे जर असते, तर शहाणे म्हणतात ती 'मिथ' पसरवणे व ती अनेक वर्षे जनमानसात तशीच रुजू ठेवणे ही अगदी कठीण बाब झाली असती. अगदी त्यावेळीही समितीच्या 'मराठा' ह्या मुखपत्राने खोडसाळपणे असली सर्वथा चूक बातमी पसरवली असती तर केवळ त्याच कारणास्तव आ. अत्रेंना सरकार तुरुंगात टाकू शकले असते. अगदी ६८च्या शिवसेना दंगलींच्या संदर्भातही अशा प्रकारची होलसेल दिशाभूल कुणी केलेली नाही. दुर्दैवाने त्या चळवळीत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या व मला जवळून माहिती असलेल्या व्यक्ति आता हयात नाहीत. दै. मराठ्याचे तेव्हाचे अंक कुठे पहाता आले, तर 'दुसरी' बाजू कळू शकेल.
पण मध्यंतरी राजकीय पक्षांनी आणि सामान्य जनतेने याबाबत आंदोलने करण्याची आणि रस्त्यावर उतरून गोंधळ घालण्याची नेमकी काय गरज आहे?आता हा प्रश्न केवळ काही राजकीय नेत्यांच्या हातातील हमखास बाहुले बनलेला आहे, ह्याविषयी काहीही वाद नाही.
In reply to शब्दच्छल.. by उपास
मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली नसती तर कदाचित मी ह्या साईटवर नसतोही. . गुजरातेत पडलो असतो किंवा केंद्रशासित..आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांविषयी आदर वाटतो आणि आपल्या या भावनेचा मला नक्कीच आदर वाटतो. पण कदाचित आपण गुजरात मध्ये असतो किंवा केंद्रशासित प्रदेशात असतो तर या साईटवर नसतो (याचा व्यापक अर्थ आपण आज मराठी बोलत नसतो असा मी घेतो) या म्हणण्याला काय आधार आहे? मी या क्षणी हे गुजरातच्या हृदयातून- अहमदाबादेतून लिहित आहे.मी महाराष्ट्रात राहात नाही म्हणून मराठी बोलू शकत नाही या म्हणण्याला आधार काय? अहो अहमदाबादेतूनच काय मी अमेरिकेत काही वर्षे होतो आणि तिथूनही मी या साईटीवर येतच होतो. तेव्हा आपण आपली भाषा बोलायची की पुलंच्या भाषेत वर्षभरातच ’मराठी वर्ड रिमेंबर करायला डिफिकल्ट जाते’ ही परिस्थिती उद्भवू द्यायची हे आपण ठरवायचे. त्याचा आपण कुठे राहतो याच्याशी काहीही संबंध नाही. इतकेच काय अगदी मुंबईत डॉन बॉस्को सारख्या शाळांमध्ये शिकणारे मराठी विद्यार्थी सुध्दा ’मराठी वर्ड रिमेंबर करायला डिफिकल्ट जाते’ याच ’कॅटेगरीमध्ये काऊंट’ होतात त्याचे काय? बाकी चालू द्या.
In reply to कोणत्या आधारावरून? by क्लिंटन
In reply to थोडसं स्पष्टीकरण.. by उपास
In reply to थोडसं असहमत... by सुनील
In reply to संयुक्त महाराष्ट्र चळवळ.. by उपास
आपली पिढी त्याची फळे चाखत आहे हे नक्कीमागे सातारकर यांनी ’भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा लेख मिपावर लिहिला होता. त्यावर मी दिलेल्या प्रतिसादाचा काही भाग इथे जसाच्या तसा चिकटवत आहे. "मला वाटते की स्वातंत्र्योत्तर काळात सरकारला मोठ्या प्रमाणावर समतोल आर्थिक विकास घडवता आला असता तर भाषावार प्रांतरचना यासारख्या मुद्यांना फारसे महत्व मिळाले नसते.अर्थात सरकारपुढे मोठ्या प्रमाणावर अडचणी होत्याच पण आपले जीवनमान भरभर उंचावत आहे असे लोकांना जाणवले असते तर अशा वेगवेगळ्या मागण्यांना समर्थन मिळाले नसते. एक उदाहरण द्यायचे झाले तर युरोपचे उदाहरण घेता येईल.वरकरणी युरोपात भाषेच्या आधारावर राष्ट्रे आहेत असे वाटू शकते.पण ते १००% बरोबर नाही.स्वित्झर्लंडमध्ये अर्ध्या भागात जर्मन तर उरलेल्या अर्ध्या भागात फ्रेंच भाषा बोलली जाते.बेल्जियममध्ये तर डच,फ्रेंच आणि जर्मन या तीन भाषा बोलल्या जातात.युरोपात जर भाषा हा एकच घटक देशांच्या सीमा ठरविण्यात असता तर स्वित्झर्लंड, बेल्जियम यासारख्या देशांचे अस्तित्व राहिले नसते आणि स्वित्झर्लंडचा फ्रेंच भाषिक प्रदेश फ्रान्सला आणि जर्मनभाषिक प्रदेश जर्मनीला जोडला गेला असता.पूर्वीच्या काळी ज्या कोणत्या कारणामुळे त्या देशांच्या सीमा ठरविल्या गेल्या त्या त्यांनी तशाच ठेवल्या.आज फ्रान्स,जर्मनी,स्वित्झर्लंड या तीनही देशांचा आर्थिक विकास चांगलाच झाला आहे.तेव्हा स्वित्झर्लंडमधील लोकांना आपण स्वीस नागरीक असलो काय आणि फ्रेंच/जर्मन नागरीक असलो काय त्याचा काहीही फरक पडणार नाही म्हणून आहे ती रचना मुद्दाम बदलण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. आता भारताच्या प्रश्नाकडे बघितले तर असे लक्षात येते की स्वातंत्र्य मिळाले तेव्हा लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर होत्या.लगेच आपल्याला महालात राहायला मिळेल अशी अपेक्षा कोणी केली नसेल पण दोन वेळचे अन्न,प्यायला पुरेसे पाणी,डोक्यावर घराचे छत्र आणि घालायला पुरेशी वस्त्रे आणि या सगळ्या गोष्टींसाठी हाताला काम एवढी माफक अपेक्षाही दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलेली नाही.तेव्हा अशा पार्श्वभूमीवर लोकांना ’अरे तू मराठी किंवा इतर भाषिक, तू अमक्या जातीचा किंवा अमक्या धर्माचा म्हणून तुझ्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणूनच सरकार तुझ्या माफक अपेक्षाही पूर्ण करत नाही’ असे सांगून आकर्षित करणे खूप सोपे असते.लोकांच्या अपेक्षा वेळीच पूर्ण झाल्या असत्या आणि त्यांचे जीवनमान भरभर उंचावत गेले असते तर स्वतंत्र राज्यासाठी आंदोलने,इतर आंदोलने यासारख्या गोष्टींना लोकांचे समर्थन आज मिळते तितक्या प्रमाणात मिळाले नसते.आणि आजही राजकारणी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या मागे न लागता विविध आंदोलनांच्या आगीत तेल घालतात, वातावरण तापवून आपली पोळी भाजून घेतात हेच दुर्दैव." तुम्ही म्हणता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेत्यांच्या त्यागामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली आणि त्याची फळे आपली पिढी भोगत आहे. यातला भावनिक मुद्दा बाजूला ठेवला तर मुंबईपासून महाराष्ट्राला फायदा होतो आहे यामागची कारणे कोणती? मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे आणि त्याचा ब्रिटिशांनी चांगला वापर केला. स्वत:च्या फायद्यासाठी का होईना ब्रिटिशांनी मुंबईलगत रस्ते आणि रेल्वेचा विकास केला. भारतातील इतर प्रांतांच्या मानाने १९४७ मध्ये तो नक्कीच जास्त होता. अगदी ब्रिटिश काळापासून मुंबई हे प्रथम कापड गिरण्यांचे आणि काही प्रमाणात इतर उद्योगांचे केंद्र बनले होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर या गोष्टीचा फायदा मुंबईला आपसूकच मिळाला. मुंबई हे अनेक उद्योगांचे मुख्यालय बनले. त्यामुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर महसुल सरकारला मिळू लागला. अनेक उद्योगांचे मुख्य केंद्र मुंबईत असल्यामुळे नंतरच्या काळात मुंबई ही आर्थिक राजधानी बनली. आणि या सगळ्याचा फायदा मुंबईला आणि मुंबई महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्राला मिळत गेला. आता या सगळ्या घडामोडींमध्ये मराठी माणसाचा वाटा किती? त्यापैकी किती उद्योग मराठी माणसाने सुरू केले? मराठी माणूस हा कायम नोकरदारच राहिला.नवीन व्यवसाय सुरू करायला लागणारी ’रिस्क’ घ्यायची नाही ही प्रवृत्ती. मी सध्या फायनान्स शिकत आहे आणि फायनान्सचा पहिला धडा असतो जेवढी ’रिस्क’ जास्त तेवढे ’रिटर्न’ जास्त. रिस्क कमी घेतल्यामुळे मराठी माणसाला आपोआपच रिटर्न कमी मिळाले.रिस्क घ्यायची तर नाहीच आणि कष्टाची कामेपण करायची नाहीत.यातूनच अगदी टॅक्सी चालविणे, इस्त्री करणे यासारख्या व्यवसायांमध्येही मराठी माणूस मागे पडून ’भय्यांचा’ शिरकाव झाला.हे जग आर्थिक ताकदीवर चालते आणि पैसेवाल्यापुढेच दुनिया झुकते हे एक कटू सत्य आहे. अशी आर्थिक ताकद किती प्रमाणात मुंबईतल्या मराठी माणसाकडे आहे? आणि हे सर्व मराठी समाजातील काही दुर्गुण आहेत (रिस्क न घेणे वगैरे) हे मान्य न करता बिझनेसमध्ये कराव्या लागणाऱ्या लांड्यालबाड्या आम्हाला करता येणार नाहीत म्हणून आम्ही बिझनेसमध्ये नाही अशी मल्लीनाथी करायची! आणि या सगळ्यावर ताण म्हणजे कमालीची मराठी अस्मिता बाळगायची! ’हाती नाही आणा आणि बाजीराव म्हणा’ असा दृष्टीकोन ठेवला तर ते कसे चालेल? आपल्या समाजातील या प्रवृत्तीला राज ठाकरे या धूर्त राजकारण्याने अगदी व्यवस्थित हेरले आणि ’तुम्ही मराठी म्हणून तुमच्यावर अन्याय होतो’, ’हे सगळे भय्यांमुळे होत आहे’ वगैरे भडकाऊ भाषणे देऊन स्वत:च्या राजकिय स्वार्थासाठी पुरेपुर वापर केला/करत आहे.अपयशी माणूस नेहमीच इतरांना दोष देत असतो. आणि अपयशाचे रुपांतर यशात करू पाहणाऱ्या माणसाकडे इतरांना दोष द्यायला वेळ नसतो.मुंबईत मराठी समाज मागे असेल तर त्याची कारणे काय हे कोणी शोधून काढायचा प्रयत्न केला आहे का? ती कारणे शोधून काढून मराठी माणसाकडे या जगात मान मिळविण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी (मुख्यत: पैसा, त्यासाठी लागणारे शिक्षण, त्यासाठी करावे लागणारे कष्ट) कशा आणता येतील असा विधायक प्रयत्न करायचे सोडून हे धन्यता मानणार फुकाच्या अभिमानात आणि दगड मारण्यात आणि जाळपोळ करण्यात. या सर्व पार्श्वभूमीवर माझा प्रश्न हा: मुंबईतून मिळणाऱ्या फायद्यासाठी मूळ कारणांसाठी मराठी माणसाचे योगदान फार जास्त नाही. तरीही मुंबई महाराष्ट्रात राहिली म्हणून अभिमान बाळगणे आणि त्यावर सगळ्या जगाने आपल्याला मान द्यावा अशी अपेक्षा ठेवणे याला काय अर्थ आहे? सगळ्या जगाने आपल्याला मान का द्यावा? कारण असा मान देण्यासाठी आपण काय भव्यदिव्य काम केले आहे? आणि हे मुद्दे मांडले तर ते मांडणारे मराठीद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही ठरतात. ते का?
In reply to फुकाचा अभिमान काय कामाचा? by क्लिंटन
In reply to मुंबई आणि मराठी.. by उपास
... तुम्ही काय मुंबईसाठी केलेत हे सांगा असं उलट स्थानिकांना विचारणार्यांची चीड येणं स्वाभाविक आहे. ...स्थानिक नक्की कोणाला म्हणणार? इंग्रज आले तर भारतीय स्थानिक, भय्ये आले तर मराठी लोकं स्थानिक, विदर्भ-कोकणातून लोकं आले तर मूळचे आगरी, कोळी स्थानिक ... आपण भारताचे नागरीक आहोत का महाराष्ट्राचे? अदिती
In reply to नक्की स्थानिक कोण? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आधी नंतर by नितिन थत्ते
In reply to आणखी एक... by पंगा
In reply to नक्की स्थानिक कोण? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुंबई आणि मराठी.. by उपास
स्वतः पोटापाण्यासाठी बाहेरील राज्यातून येऊन, स्थानिकांचा रोजगार हिसकावूनइतर मुद्द्यांचा परामर्श इतरांनी केला आहेच म्हणून इतर मुद्द्यांवर परत न लिहिता या मुद्द्यावर उत्तर देतो. समजा मी रेल्वे स्टेशनवरील पुलावर उभा आहे आणि खाली पूर्ण भरलेली गाडी स्टेशनात आली. ती गाडी मी धावतधावत जाऊन पकडली पण इतर अनेकांना ती पकडता आली नाही. मला गाडीत चढायला मिळाले याचा अर्थ मी जे खाली प्लॅटफॉर्मवरच राहिले त्यांचा हक्क हिसकावून घेतला का? समजा उद्या मी गाडी विकत घेतली तर ज्यांच्याकडे गाडी नाही अशांचा हक्क हिसकावून घेऊन घेतली का? शिव खेरांनी त्यांच्या You can win पुस्तकात म्हटले आहे Life is like a cafeteria. You can get anything as long as you are prepared to pay for it. जे लोक अशी किंमत देऊ शकतात त्यांना पाहिजे ते मिळते. मुंबईत अनेक तथाकथित ’भय्ये’ कष्ट करून आपले पोट भरतात. ते ज्या व्यवसायांत आहेत ते व्यवसाय मराठी माणसाने करू नये असा कोणता कायदा आहे? मराठी माणसाने टॅक्सी चालवू नये किंवा भेळपुरीच्या गाड्या चालविणे, इस्त्रीची दुकाने काढणे अशी कामे करू नये असे कुठे म्हटले आहे?पण अशा कामांसाठी लागणारे कष्ट करायची तयारी नसेल आणि त्या अर्थी आपण गरज लागेल तितकी किंमत मोजायला तयार नसू तर आपल्याला पाहिजे ते कसे मिळणार? मी अमेरिकेत असताना पिझा शॉपमध्ये एका अमेरिकन माणसाशी माझे बोलणे झाले होते. तो म्हणाला "आमच्या तरूण पिढीला नवे उद्योगधंदे काढावेत, किंवा शिकून डॉक्टर, वकिल किंवा तंत्रज्ञ बनावे ही महत्वाकांक्षा नाही. जर सगळ्या तरूणांना बेसबॉल किंवा अमेरिकन फुटबॉल खेळाडू बनायचे असेल तर आमचा देश पुढे जाणार कसा? मग तुमच्यासारखे भारतीय आणि चिनी येऊन कष्ट करून प्रगती करतात आणि आमच्याकडले कट्टर लोक ’बाहेरच्यांना’ नावे ठेवायला मोकळे!" आपल्याकडील परिस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे का? फक्त संदर्भ थोडे बदलात-- म्हणजे अमेरिकन मुलांना शिकायची महत्वाकांक्षा नाही तशा मराठी मुलांच्या महत्वाकांक्षा किंवा कष्ट घ्यायची तयारी किंवा इतर गुण कुठे कमी पडतात हे संदर्भ बदलतात पण एकूण परिस्थिती सर्वसाधारण सारखीच आहे ना? इथे बांगलादेशी घुसखोरांचे अजिबात समर्थन नाही. माझ्या म्हणण्याची frame of reference भारत देश आहे. विश्वची माझे घर ही परिस्थिती अजून आलेली नाही. तेव्हा बांगलादेशी घुसखोरांना अगदी कठोर कारवाई करून हाकलून द्यावे. काहीही हरकत नाही. झोपडपट्ट्यांचे म्हणाल तर धारावीत १९७२ च्या दुष्काळाच्या वेळी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेले कित्येक मराठी लोक आजही आहेत. झोपडपट्ट्यांची वाढ झाली याला सगळेच लोक जबाबदार आहेत-- व्होट बॅंकचे राजकारण करणारे राजकारणी सगळ्यात जास्त. तेव्हा माझा मुद्दा हा की ’बाहेरच्यांनी’ येऊन तुमचे रोजगार हिसकावून घेतले यासारखी आग लावणारी भाषा बोलणे खूप सोपे असते. आणि ज्यांना काही कारणाने नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यांचा तर अशा गोष्टींवर ताबडतोब विश्वास बसतो. यातून राज ठाकऱ्यांसारख्यांच्या मताच्या पेढ्या भरतात आणि सामान्य लोक कोंबड्या झुंजाव्यात तशा या राजकारणाच्या गलिच्छ खेळात राजकारण्यांच्या शब्दाखातर झुंजत राहतात. आणि चांगले शिकले सवरलेले लोक याला पाठिंबा देतात याचेच वाईट वाटते.
In reply to रोजगार हिसकावणे by क्लिंटन
In reply to गाडी.. by उपास
तुम्ही जे गाडी पकडायचे उदाहरण दिले आहेत ना, त्याकडे मी असे बघतो. तुम्ही पुलावरुन धावत येऊन गाडी पकडू पहात आहात, असे असताना तुम्ही प्लॅटफॉर्मवर आधीच असलेल्यांना (अगदी तुमच्यापेक्षा तब्येतीने कमी असलेल्या/ वृद्ध) सगळ्यांना बाजूला ढकलून पुढे जाऊ पहात असाल तर ते बरोबर आहे का?तुमच्याकडून अगदी हीच प्रतिक्रिया मला अपेक्षित होती. किंबहुना तुम्ही ही प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त व्हावेत म्हणूनच मी रेल्वे स्टेशनातल्या गाडीचे उदाहरण दिले असे म्हटले तरी चालेल.अन्यथा इतर उदाहरण देता आले असते. स्टेशनवर वृध्द आणि इतरांना मागे ढकलून मी पुढे गेलो तर ते नक्कीच बरोबर नाही. पण हेच सामान्यीकरण समाजाच्या पातळीवर कसे करता येईल?आपल्या म्हणण्याचा अर्थ असा होत नाही का की मुंबईत बाहेरून आलेले भय्ये हे सशक्त आहेत आणि आपण मराठी लोक अशक्त आहोत?असे सरसकट कोणत्या आधारावर म्हणता येईल? मानवी शरीर वृध्दावस्थेकडे झुकल्यावर अशक्त बनते आणि ती प्रक्रिया नैसर्गिक आणि Irreversible (मराठी शब्द?) असते. तसे मराठी समाजाच्या बाबतीत नैसर्गिकरित्या झाले आहे का? आणि ते आपल्याच समाजातील दोषांमुळे--- रिस्क न घेणे, इतरांचे पाय खेचणे, भाऊबंदकी या कारणांनी झाले असेल तर त्याचा दोष इतरांवर कसा? आपल्या समाजात सर्वसाधारणपणे असलेले (प्रत्येक व्यक्तीत नव्हे) हे असेच दोषच मराठी माणूस मागे पडायला कारणीभूत झाले आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास केला नाही आणि त्याला परिक्षेत कमी मार्क मिळाले तर तो दोष कोणाचा?त्याचा स्वत:चा की परिश्रम घेऊन जास्त मार्क मिळविलेल्याचा? अनेक लोक म्हणतात की रिस्क घेण्यासाठी घरी पैसा पाहिजे. पण विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी असलेले लोक बघितले तर त्यापैकी बहुतांश सामान्य किंवा गरीब परिस्थितीतूनच वर आलेले असतात हे कसे नाकारता येईल? रघुनाथ माशेलकरांसारख्या मोठ्या माणसाने म्हटले आहे की आयुष्यात यशस्वी व्हायला थोडी तरी प्रतिकूल परिस्थिती असणे गरजेचे आहे. कारण आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडायचे आहे ही इर्षा आणि आगच माणसाला यशस्वी बनविते. माशेलकरांनी किंवा त्यांच्यासारख्या मान्यवर व्यक्तीने इतरांना दोष देण्यात वेळ घालवला असता तर आज आपल्याला त्यांचे नाव माहिती पण नसते. कारण इतरांना दोष देण्यातच धन्यता मानणारे लोक आयुष्यात काहीही भव्यदिव्य कामगिरी करू शकत नाहीत. इथे जर भय्ये गुंडगिरी करून मराठी माणसाला त्रास देत असतील तर त्याचे अजिबात समर्थन नाही.त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण एखादा पूर्ण समाज हा काही गुंड नसतो. त्यामुळे ’सगळे भय्ये असेच’ असे म्हणता येणार नाही.त्याचप्रमाणे मराठी गुंड नसतात असेही नाही. दस्तुरखुद्द दाऊद इब्राहिम मराठी भाषिक आहे तर आणखी काय बोला? तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे आपण मागे पडत असलो तर त्याची कारणे आत्मपरिक्षण करून शोधून काढून ती दूर कशी करता येतील त्यासाठी प्रयत्न करणे हितकारक ठरेल. आणि ते तसे करू न शकणारे लोकच इतरांना दोष देतात.अगदी वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला तेच बघायला मिळते, बरोबर ना?
गेल्या काही वर्षात मराठी माणूसही उद्योगाकडे सकारात्मक बघतोय असं दिसतय.हो ही नक्कीच चांगली गोष्ट आहे.सगळ्यांना व्यवसाय करता येत नाही हे मान्य.पण नोकरीतही डायरेक्टर आणि तत्सम पदांवर मोठ्या प्रमाणावर मराठी लोक पोहोचले तरी त्याचा मराठी समाजाला मिळणाऱ्या मानात नक्कीच वाढ होणार आहे. आणि बऱ्याच प्रमाणात ते आज होत आहे ही गोष्ट चांगलीच आहे.
मराठी माणूस नालायक आहे म्हणून मुंबईवर त्याला अधिकर नाही ह्या दृष्टीकोनातून बाहेर पडणे हे आधी आवश्यक आहे,माझा आक्षेप आहे मुंबई फक्त आमची असा व्यर्थ अभिमान बाळगण्यावर. माझ्या मते मुंबईच नव्हे तर सगळा भारत देश सगळ्या भारतीयांचा आहे. मराठी माणूस सुध्दा भारतीयांमध्येच मोडतो आणि मुंबई पण भारतातच येते. त्यामुळे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे पण तसाच अधिकार इतरांचाही आहे. त्याचप्रमाणे भारतात कुठेही जाऊन स्थायिक व्हायला मराठी माणसाला पण अधिकार असला पाहिजे.
In reply to गाडी by क्लिंटन
In reply to विनाकारण गदारोळ by सुनील
In reply to http://en.wikipedia.org/wiki/ by शुचि
In reply to का? by ऋषिकेश
In reply to >>>निषेध काय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to परत एकदा by पाषाणभेद
परत एकदा रक्त खवळू देणारी चर्चा. अन तेच मराठीद्वेशी बोलणे अन प्रतिक्रिया.असे वाटत नाही. मराठीद्वेष वगैरे काहीही नाही. पण मराठी माणसाने सदैव कशाला ना कशाला तरी अस्मितेचा मुद्दा करून कोणाशी ना कोणाशी तरी भांडत राहिलेच पाहिजे, हेही पटत नाही, एवढेच. बेळगावातल्या मराठी जनतेने आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढून ते मिळवणे याला कोणाचाच आक्षेप असेलसे वाटत नाही. परंतु त्यासाठी महाराष्ट्राने आपला दावा ठेवून लढवत राहण्याची काही गरज आहेच, हेही पटत नाही. बेळगावची मराठी जनता कर्नाटकात राहूनही आपले न्याय्य हक्क भारतीय घटनेच्या कक्षेत मिळवू शकते, आणि बर्या बोलाने ते हक्क नाही मिळाले तर त्याकरिता लढा देऊ शकते, आंदोलन करू शकते. अशा लढ्यास विरोध असण्याचे काहीच कारण नाही. पण त्याकरिता बेळगाव महाराष्ट्रात येण्याची आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राने त्याकरिता दावे लढवत बसण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. त्यातून याचा भावनिक प्रश्न बनवून तो चिघळत ठेवून त्याच्या भांडवलावर (बहुधा इतर काहीही न करता) मते मिळवू पाहणार्या राजकारण्यांखेरीज (आणि गुंडांखेरीज) इतर कोणाचाही काहीही फायदा होतो, असे वाटत नाही. (कदाचित वर्तमानपत्रांचा आणि माध्यमांचा होत असल्यास कल्पना नाही.) बाकी रक्ताचे म्हणाल, तर खवळू द्यावे तसे खवळते. ज्यांचे यातून फावते ते खवळू द्यायला टपलेले असतातच. खवळू द्यायचे की नाही, ते आपण ठरवायचे. खवळू देऊन नुकसान आपलेच होते, समझे गुरु? हँय?
अरे मग भाषिक राज्य हा निकषच कशाला लावलात?तो निकष चुकीचा होता, हेच तर म्हणणे आहे! भाषावार प्रांतरचनेच्या अगोदर मराठीभाषक जनता विविध प्रांतांत विखुरलेली होती. त्या स्थितीत मराठीजनांचे नेमके काही बिघडत होते असे वाटत नाही. (हेच इतर भाषिक गटांबाबत.) उलट हा असला निकष लावल्याने हे नको ते भांडण उपटले. पण आता भाषिक राज्ये झालेलीच आहेत, तर आता त्यांची वेगळ्या तत्त्वावर पुनर्रचना करण्यात काही हशील नाही. पण सीमावर्ती भागांत कोठे ना कोठे अलीकडे-पलीकडे व्हायचेच, त्यासाठी एवढे कशाला लढत बसायचे?
आख्खा भारत एकच आहे ना मग. कशाला राज्य राज्य करतात?प्रशासनाच्या सोयीसाठी एवढ्या मोठ्या देशाचे लहानलहान भाग करणे प्राप्त आहे. म्हणून राज्ये हवीत. पण त्यातून मारामार्या निर्माण करण्याची गरज नाही.
...कशाला देश देश करतात. पाकिस्थान म्हणेल महाराष्ट्र त्यांचेच, गोवा त्यांचेच, मणीपूर त्यांचेच राज्य आहे. देवून टाकू आपण.देऊन कशाला टाकायचे? पाकिस्तानने समजा म्हटले की महाराष्ट्र त्यांचेच. म्हणूद्यात. आम्हीही म्हणतो पाकिस्तान आमचेच. आदर्श परिस्थितीत ते योग्यही आहे. आता तशी आदर्श परिस्थिती तूर्तास अस्तित्वात नाही हे आम्हालाही कळते. ती पुढेमागे येऊ शकली तर उत्तमच. (युरोपात नाही, कालपरवापर्यंत एकमेकांशी युद्ध करणारे देश एकत्र आले?) पण आज तशी परिस्थिती नाही तरी नुसते म्हणायला काय बिघडते? आहे तीच परिस्थिती कायम राहिली पाहिजे काय? त्यातून नेमका कोणाचा फायदा होतो?
कर्नाटक राज्य तयार करतांनाची स्थिती अन (त्याच वेळेच्या) मराठी जनसंख्येचा विचार करणार की नाही?त्या वेळची स्थिती आज नेमकी कशी लागू होऊ शकते? आणि अशा किती जुन्या भूतकाळापर्यंतचा विचार करत राहायचा? आणि असे भूतकाळात मागेमागे जात राहिले, तर परिस्थिती महाराष्ट्राच्या फायद्याचीच राहील, असेही काही सांगता येत नाही. असो. - पंडित गागाभट्ट.
In reply to पटले नाही by पंगा
In reply to पटर-पटर ;-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पटले नाही by पंगा
In reply to पटले नाही by पंगा
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to एखाद्या by पाषाणभेद
In reply to एखाद्या by पाषाणभेद
In reply to पंगा चा by परिकथेतील राजकुमार
In reply to एखाद्या by पाषाणभेद
आणि कोणता सिमावर्ती भाग कोणत्या भागात (मग तो ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, अथवा राज्य, राष्ट्र असो) हवा हे लोकशाही मार्गाने ठरवायचे असल्यास मतदानाचाच कौल घ्यावा लागतो.काय सांगता! ठिक आहे चला नागालँडमधे, मिझोरममधे, काश्मिरच्या खोर्यात असे मतदान घेऊ. त्यांना स्वातंत्र्य हवे असेल/भारतात रहायचे असेल/नसेल त्याप्रमाणे वागु. काय बरोबर का? ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
In reply to काय सांगता by ऋषिकेश
काय सांगता! ठिक आहे चला नागालँडमधे, मिझोरममधे, काश्मिरच्या खोर्यात असे मतदान घेऊ. त्यांना स्वातंत्र्य हवे असेल/भारतात रहायचे असेल/नसेल त्याप्रमाणे वागु. काय बरोबर का?मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून विचार करता हरकत काय आहे ??
In reply to पटले नाही by पंगा
बेळगावातल्या मराठी जनतेने आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढून ते मिळवणे याला कोणाचाच आक्षेप असेलसे वाटत नाही. परंतु त्यासाठी महाराष्ट्राने आपला दावा ठेवून लढवत राहण्याची काही गरज आहेच, हेही पटत नाही. बेळगावची मराठी जनता कर्नाटकात राहूनही आपले न्याय्य हक्क भारतीय घटनेच्या कक्षेत मिळवू शकते, आणि बर्या बोलाने ते हक्क नाही मिळाले तर त्याकरिता लढा देऊ शकते, आंदोलन करू शकते. अशा लढ्यास विरोध असण्याचे काहीच कारण नाही. पण त्याकरिता बेळगाव महाराष्ट्रात येण्याची आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राने त्याकरिता दावे लढवत बसण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. त्यातून याचा भावनिक प्रश्न बनवून तो चिघळत ठेवून त्याच्या भांडवलावर (बहुधा इतर काहीही न करता) मते मिळवू पाहणार्या राजकारण्यांखेरीज (आणि गुंडांखेरीज) इतर कोणाचाही काहीही फायदा होतो, असे वाटत नाही. (कदाचित वर्तमानपत्रांचा आणि माध्यमांचा होत असल्यास कल्पना नाही.)हेच तर्कशास्त्र थोडे पुढे चालवले तर ऑस्ट्रेलिया/फिजी आदी ठिकाणी भारतीयांवर होणार्या अत्याचारांसाठी आपला आपण आवाज उठवावा; भारत सरकारने नाक खूपसू नये असे म्हणता येईल. आपल्याशी नाते सांगणारा एक लोकसमूह झगडतोय आणि आपण नुसती त्यांची गंमत बघावी हे तर्कशास्त्र मलातरी नैतिक व व्यावहारिकदृष्ट्या समर्थनीय वाटत नाही. बेळगावाच्या तापल्या तव्यावर कानडी मराठी राजकारण्यांची पोटे चालतात ते खरे आहे. पण त्याचा अर्थ बेळगाव विलिनिकरणाची मागणी चुकीची होते असा होत नाही.
तो निकष चुकीचा होता, हेच तर म्हणणे आहेभाषिक निकष सरसकट चुकीचा होता असे मला वाटत नाही. एक महत्वाचा फ्याक्टर जरूर होता व आहे. मुंबईच्या द्वैभाषिक मंत्रिमंडळातही गुजराती मराठी मंत्र्याचे फारसे सख्य नव्हते. बांगलादेशासारखा एक देश भाषिक आंदोलनाच्या पायावर बनला. आज गोरखालॅण्डसारख्या भाग प.बंगाल पासून वेगळे स्थान मागतो त्यात काय भाषेचा अजिबात संबंध नाही ??? हे बघता मला तरी तो निकष चुकीचा होता असे बिल्कुल वाटत नाही.
कर्नाटक राज्य तयार करतांनाची स्थिती आज नेमकी कशी लागू होऊ शकते? आणि अशा किती जुन्या भूतकाळापर्यंतचा विचार करत राहायचा? आणि असे भूतकाळात मागेमागे जात राहिले, तर परिस्थिती महाराष्ट्राच्या फायद्याचीच राहील, असेही काही सांगता येत नाही.अरे कोण म्हणते जुन्या भूतकाळाचा विचार करा ??? एकिकरण समितीने राज्य तयार करते वेळची स्थिती बघायला सांगितली होती. इतिहासात नाही जायचे ना तुम्हाला - मग बेळगाव पालिकेच्या १९५६ ते आजतागायत (तुरळक अपवाद वगळता)निवडणूका मराठी मराठी करणार्या म.एकिकरण समितीने जिंकल्या याकडे सरळ डोळेझाक करता ??
In reply to कर्नाटकात by Dipankar
In reply to हि by मितभाषी
इतकी वषेर् कर्नाटकात राहूनही बेळगावचा चेहरा आजही लख्ख मराठी आहे.म्हणजे नक्की काय? तुम्ही बेळगाव, निपाणी इ.इ. भागांत रहाता का? इतकी वर्ष महाराष्ट्रात आणि मराठीबहुल शहर असूनही मुंबईचा चेहेरा लख्ख सामावून घेणारा आहे. बेळगाव (+इतर भाग) महाराष्ट्रात आलं तर तिथल्या लोकांना काय, किती आणि कसा फरक पडणार आहे? उदा: बेळगावात सध्या किती लोडशेडींग असतं, आणि महाराष्ट्रात आले तर किती होईल? रोजगार, रस्ते, पाणी, शाळा, इत्यादी मूलभूत सुविधांवर काय आणि कसा परिणाम होईल? बेळगावातल्या मराठी लोकांनाही खरंच महाराष्ट्रात यायचं आहे का आहे ती परिस्थितीच त्यांना मान्य आहे? अदिती
In reply to इतकी वषेर् by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हि by मितभाषी
In reply to कीवआली by मी_ओंकार
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to >>> काय फरक by पाषाणभेद
In reply to सॉरी, एस डब्बल ओ आर ई! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काही प्रश्न by क्लिंटन
In reply to आपली एकात्मता वगैरे.. by ज्ञानेश...
बेळगाव प्रश्न काही देशस्थ्-कोकणस्थ किंवा पुणेकर-मुंबईकर वादासारखा फुटकळ किंवा गैरलागू नाही. ही तुलना चुकीची आहे. इथे एका पक्षावर दुसर्या पक्षाने अन्याय केलेला आहे. त्या परिसरात राहणार्या मराठी भाषिकांचा, त्यांच्या भवितव्याशी निगडीत असा हा प्रश्न आहे.पहिल्या परिच्छेदात दिलेले आपण भारतीय लोक एकमेकांशी भांडतो याचे अधिक महत्वाचे मुद्दे दिले आहेत त्याकडे दुर्लक्ष करून केवळ दुसऱ्या परिच्छेदावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रयोजन कळले नाही. असो. हा प्रश्न मराठी भाषिकांच्या भवितव्याशी निगडीत कसा हे मात्र मला समजले नाही. घरोघरी केवळ कन्नडच बोलावे अशी सक्ती तर कर्नाटक सरकार करू शकत नाही. तुम्हीच म्हणता की निपाणीमध्ये दुकानांवरील पाट्या मराठीत आहेत आणि बेळगाव-निपाणी या भागांचा मराठी चेहरा आहे. तिथून मराठी वर्तमानपत्रे निघतातच. ती बंद करायची सक्ती कोणतेही सरकार घटनात्मक दृष्टीने करू शकणार नाही. आता लोकांनीच मराठी वर्तमानपत्रे वाचणे सोडून दिले आणि त्या कारणाने ती वर्तमानपत्रे बंद पडली तर त्याचा दोष इतरांवर ढकलणार का? मराठी शाळांचे बोलाल तर आज नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्यांपैकी महाराष्ट्रातील किती मुले मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात? मुंबईतील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले तसेच बेळगावमध्येही आज ना उद्या ते कमी होणार आहेच. ते कमी झालेही असेल.मग त्याचा दोष इतरांवर कसा? बेळगाव-निपाणी भागातील मराठी विद्यार्थ्यांना ते केवळ मराठी आहेत या कारणावरून कॉलेजांमध्ये प्रवेश नाकारला जातो का? सध्याच्या काळात सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण कमीच झाले आहे. तेव्हा ’मराठी’ या कारणावरून सरकारी नोकऱ्या डावलल्या तरी त्याचा ३०-४० वर्षांपूर्वी झाला असता तितका परिणाम आज होणार नाही. मराठी असल्याच्या कारणावरून बंगलोरमधील सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकऱ्या नाकारल्या जातात का? मुंबई-पुण्याचे कित्येक मराठी तरूण-तरूणी तिथे नोकरीला आहेतच की. मग बेळगाव महाराष्ट्रात सामील व्हावे अशी इच्छा जरूर ठेवावी. त्यात वावगे आहे असे वाटत नाही. पण ते तसे झाले नाही तर मात्र मराठी समाजाच्याच अस्तित्वावर घाला येईल अशी बोंबाबोंब का? गेली ५० वर्षे बेळगाव कर्नाटकात आहे. त्या कारणावरून मराठी समाजाच्या अस्तित्वावर घाला आला असता तर आजही बेळगाव शहरात मराठी भाषिक लोक इतक्या प्रमाणावर कसे?
In reply to समजले नाही by क्लिंटन
In reply to भाषावार by शिल्पा ब
आणि अजूनही केंद्र सरकार जर आंध्रमधून तमिळ भाषिकांसाठी वेगळे राज्य निर्माण करत असेल तर...हं? हे कधी झाले? - पंडित गागाभट्ट.
In reply to काय? by पंगा
In reply to http://en.wikipedia.org/wiki/ by शिल्पा ब
In reply to अजाब... by सुनील
In reply to का? ********************* by शिल्पा ब
In reply to http://en.wikipedia.org/wiki/ by शिल्पा ब
In reply to मान्य, पण... by पंगा
In reply to सगळीकडेच by शिल्पा ब
In reply to तुमच्या by Nile
In reply to आम्ही by शिल्पा ब
In reply to ह. घ्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मला by Nile
In reply to सगळीकडेच by शिल्पा ब
In reply to एक नंबर.. by उपास
In reply to सगळीकडेच by शिल्पा ब
In reply to अनाहूत सल्ला by क्लिंटन
In reply to राग नाही by शिल्पा ब
देश स्वतंत्र झाल्यावर भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळी मराठी बहुल भाग कर्नाटकात का गेला?बेळगावची १९५१ मध्ये लोकसंख्या किती होती आणि त्यापैकी मराठी भाषिक लोक किती होते हे शोधायचा मी खूप प्रयत्न केला पण विश्वासार्ह माहिती मिळाली नाही. याच चर्चेत सुनील यांनी म्हटले आहे की इंग्रजकालीन नकाशांमध्ये बेळगाव हे मराठीबहुल भागात दाखवलेले नाही. त्याचा संदर्भ मला माहित नाही तेव्हा यावर अधिक टिपण्णी करत नाही. बेळगाववर महाजन आयोगाचे म्हणणे पुढीलप्रमाणे "Maharashtra’s claim for Belgaum is of recent origin. Though tabled in Parliament, Maharashtra MPs, especially from the treasury benches, did not vote against the amendment of Belgaum being part of their state. Belgaum is a cosmopolitan city. In 1920, when the AICC session was held in Belgaum, not a single leader from Maharashtra including N C Kelkar demanded that it be part of that state. Geographically, Kannada areas surround the city of Belgaum on three sides and by a smattering of villages belonging to Maharashtra on the fourth. Reorganisation will cause extreme hardship. Status quo should be maintained. From the records of rights of Belgaum city, it is seen that a majority of lands belong to Kannadigas. All the original records in the offices of the mamlatdar and collector are in Kannada. “On the appreciation of the whole material and assessing it objectively, I have reached the conclusion that I cannot recommend the inclusion of Belgaum city in the state of Maharashtra." भाषावार प्रांतरचना करताना भौगोलिक सलगता हा पण एक घटक मानला गेला होता. महाजन आयोगाने त्याअंतर्गत महाराष्ट्राला निपाणी, खानापूर आणि नंदगड सकट २६२ गावे देऊ केली होती. निपाणीपासून बेळगाव बसने सुमारे एक-सवा तासाच्या अंतरावर म्हणजे सुमारे ५०-६० किलोमीटर आहे असे धरले तर या मधल्या भागात (संकेश्वर आणि इतर) आणि बेळगावच्या पलीकडे जर कन्नड बहुसंख्या असेल आणि केवळ बेळगाव शहरामध्येच मराठी बहुसंख्या असेल तर मात्र भाषावार प्रांतरचनेच्या त्यावेळच्या तत्वाप्रमाणे बेळगाव महाराष्ट्राला मिळू शकले नाही. या बातमीत बेळगाव महाराष्ट्राला देण्याच्या बदल्यात सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नडबहुल भागांवर कर्नाटकने दावा सांगावा अशी मागणी केली आहे. अक्कलकोटमध्ये कन्नड बहुसंख्य आहेत असे ऐकले आहे पण सोलापूरमध्येही तीच परिस्थिती आहे का? त्या भागाची माहिती असलेल्या किंवा तिथे राहात असलेल्या मिपाकरांनी यावर प्रकाश टाकावा. तसे असेल तर भाषावार प्रांतरचनेत भौगोलिक सलगता या कारणामुळे सोलापूर, अक्कलकोट हे भाग कर्नाटकला न मिळता महाराष्ट्राला मिळाले असे म्हणता येईल.
आणि मला एखादी गोष्ट माहित नसेल तर ते मी कबूल करून माहिती मिळवते...हे सुद्धा वरील प्रतिसादात दिसले असेलच...यात bigotry असे वाटावे असे काय म्हंटले मी?याबद्दल आपले अभिनंदन आणि कौतुकच आहे. आणि bigotry या शब्दामुळे आपण दुखावल्या गेल्या असाल तर जाहिर माफी मागतो. पण तेलंगणाच्या प्रश्नी केंद्र सरकार तामिळभाषिक प्रदेश आंध्रातून काढून वेगळे राज्य करणार आहे हे विधान आणि त्यानंतरची चर्चा थोडी अप्रस्तुत वाटली म्हणून तसे म्हटले. एकेकाळी मी स्वत: bigot होतो आणि त्यामुळे अनेकदा स्वत:ला पूर्णपणे न पटताही किंबहुना उलटे प्रश्न न विचारताच मी अनेकदा काही गोष्टींना कट्टर विरोध करत असे.म्हणजे मी एखाद्या गोष्टीला का विरोध करत आहे हेच मला माहित नसे हे पण मी मान्य करतो.पण नंतरच्या काळात यातील चूक मला कळली. असो.
ी. बंडू गोखले ला ह्या स्वतंत्र भारतात मारले गेले ही जखम मराठी माणूस म्हणून माझ्या ठायी ओली राहीलच, ती विसरता येणार नाहीतुमच्या भावना अगदी खोल मनापर्यंत पोहाचल्या.वाक्य मस्त लिहलत. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे
In reply to माझ्या by भोचक
आणि तेवढे स्वातंत्र्य कर्नाटकचे सरकार देईल असे वाटतेते तसे स्वातंत्र्य वर्षानुवर्षे आहेच. शहरात शिरल्यावर प्रथम दिसते ते मारुतीचे देऊळ- पंचवटी सोन्या मारुति देवालय . नाव शुद्ध मराठीत आहें. नंतर कन्नडमध्ये लिहिले आहे. साईबाबा मंदिर आणि इतर काही धार्मिक स्थानांची नामे प्रथम मराठीत आणि नंतर कन्नडमध्ये आहेत. मराठा शिक्षण मंडल खूप पूर्वीपासुन आहे. मिसळ्पाव/वडापाव्/कोल्हापुरी जेवण मिळणारी अनेक बेळगावात उपहारगृहे आहेत. किर्लोस्कर रोडवर असलेल्या आदिनारायण भोजनालयात्(हे नावही मराठीतच आहे!) उत्कृष्ट मराठी इश्टाइल मांसाहारी थाळी मिळते.टिळकवाडीत अजुनही बहुतांशी घरे मराठी माणसांचीच आहेत. मुंबई/पुण्यात "तबला/पेटी"शिकण्याचे वर्ग आता दिसत नसले तरी बेळगावात अजुनही दिसतात. ही उदाहरणे द्यायची कारणे म्हणजे -कुठल्याही राज्य सरकारने नावे बदलून लोकांना दुखावण्याचा/चिडवण्याचा वे****पणा येथे केलेला नाही.म्हणूनच गेल्या २५ वर्षात स्थानिक लोकांना या सीमा प्रश्नाचे महत्व उरले नाही. P = NP
In reply to राजसाहेब म्हणतात...... by मितभाषी
बेळगाव प्रश्नी केंद्राने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवले गेल्याचे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने सांगितलेशरद पवार आणि अंधारात? १९८६ साली अटक करुन घेण्यासाठी ते बेळगावला आल्याचे आठवते.असो.
सीमा प्रश्न भाजप-शिवसेनेची सत्ता केंद्रात होती तेव्हाच सुटला असतासध्या कर्नाटकात दिल्लीश्वरांची थुंकी न झेलणारे,कुठल्याही समाजाचे 'लांगुलचलन' न करणारे सत्तेवर आहेत्.ते ज्या मंडळीना रिपोर्ट करतात ती मंडळी(भागवत्/गडकरी) अस्सल मराठी आहेत.सेना-(महाराष्ट्र)भाजपाने आता पुढाकार घेवून हा प्रश्न एकदाचा मिटवून टाकावा. काय बोलता?
पूर्ण