घरगुती सावरकर
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज....
सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे. कारण विचारल्यावर सांगायचे, 'जानवे ही चावीचा जुडगा अडकविण्याची सोय आहे.' शिवाय मजबूत असल्याने तुटत नाही. त्यामुळे गळ्यात घालायला अन्य कोणताही दोरा त्यांना चालत नसे. अर्थात, श्रावणी करून घेऊन ते जानवे घालत नसत. कुठलेही मंत्रोच्चार ते जानवे घालताना करत नसत.
रूढार्थाने देवावर विश्वास नसला तरी सावरकर कोणत्या तरी अज्ञात शक्तीला मात्र मानत. कोणतेही कर्मकांड करत नसले तरी रोज अंघोळ झाल्यावर दहा मिनिटे स्वस्थ बसून कुलदेवता 'अष्टभूजादेवीचे' स्तोत्र ते म्हणत. त्यांना इतरही बरीच स्तोत्रे येत होती.
कर्मकांडांना विरोध असला तरी समुच्च हिंदूंना एक करण्यासाठी त्यांना त्याचाही आधार घ्यायची गरज पडत होती. म्हणून बाटवलेल्यांना पुन्हा हिंदू केल्यानंतर केल्या जाणार्या धार्मिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित रहायचे.
सत्यनारायण पूजा वगैरे भानगडी त्यांच्या घरात कधी होत नव्हत्या. इतकेच काय देवपूजाही होत नसायची.
रत्नागिरीला अस्पृश्योद्धाराचे काम त्यांनी सुरू केले, त्याला उच्चवर्णियांचा पाठिंबा फारसा नव्हता. इतकेच काय ते ज्या नाना पटवर्धनांच्या घरात रहात असत त्यांचाही त्याला पाठिंबा नव्हता. पण म्हणून त्यांनी सावरकरांना घरातून बाहेर काढले नाही.
सावरकरांनी कधीच आपल्या मुला बाळांना किंवा कुटुंबियांना राजकीय कार्यात आपले 'वारस' म्हणून पुढे आणले नाही. कोणत्याही सभेला पत्नीला वा मुलांना नेले नाही. आपल्यातील अत्त्युच्च गुणांचा वारसा जाणीवपूर्वक वाहून न्यावा यासाठीही प्रयत्न केले नाहीत.
विश्वासरावांच्या मुलीचे असीलता म्हणजे खड.ग हे नावही त्यांनीच ठेवलेले.
सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर मात्र संघाचे स्वयंसेवक होते. सावरकरांनी त्यांचे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राखले होते.
त्यांच्या घरी कायम लोकांचा राबता असे. सकाळपासून माणसे घरी येत असल्याने आवरासावरीला उशिर होई. त्यांची अंघोळही बरीच उशिरा होई. सहाजिकच जेवणासही उशिर होत असे. परंतु, घरच्यांना वेळीच जेऊन घेण्याची त्यांची ताकीद होती. माईने आपल्यासाठी जेवायला थांबू नये असे ते स्पष्ट सांगत.
सुरवातीच्या काळात सावरकर कुटुंबाला आर्थिक अडचणींना खूप तोंड द्यावे लागले. पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. त्यात घरखर्च चालायचा. या काळात ते मुंबईच्या दिनबंधूचे संपादन विनावेतन करायचे. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना सरकारी पेन्शन मिळू लागली. त्यात कुटुंब खर्च भागू लागला.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.
सुरवातीला खारला राहिल्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कात सावरकर सदन बांधले. त्यात लाकडाचा, विटांचा वापर केला. गांधीहत्येनंतर जाळपोळ आणि दगडफेक झाली, तेव्हा सावकर सदनही त्याला अपवाद नव्हते. पण मजबूत घरामुळे नुकसान झाले नाही. घर बांधताना ते पक्के असावे यामागचा त्यांचा हेतू कोणत्याही हल्ल्याला तोंड देणारे असावे हाच होता.
सावरकरांच्या घरगुती आयुष्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही येऊ द्या.
वाचने
40048
वाचनखूण
प्रतिक्रिया
139
In reply to गांधीजी by चतुरंग
प्रतिसाद
In reply to उत्तर by नितिन थत्ते
नितिन
In reply to नितिन by चेतन
किती वेळा
In reply to किती वेळा by नितिन थत्ते
आता पुरे झाले असे वाटते....
In reply to आता पुरे झाले असे वाटते.... by sagarparadkar
मग
In reply to मग by नितिन थत्ते
आकाशवाणी,
In reply to ५५ कोटी..... खरे खोटे !!! by इन्द्र्राज पवार
धन्यवाद
सावरकर यांच्याबद्दल बरेच चुकिचे समज आहेत.
गांधी-नेहरू-पटेल-माऊंटबॅटन....५५ कोटी..!!
In reply to गांधी-नेहरू-पटेल-माऊंटबॅटन....५५ कोटी..!! by इन्द्र्राज पवार
>>नेहरूनी
In reply to >>नेहरूनी by नितिन थत्ते
नितिन, ही
In reply to नितिन, ही by बिपिन कार्यकर्ते
शक्यता
In reply to गांधी-नेहरू-पटेल-माऊंटबॅटन....५५ कोटी..!! by इन्द्र्राज पवार
पवारसाहेब
पवारसाहेब
धागा
In reply to धागा by नितिन थत्ते
सहमत
In reply to सहमत by ऋषिकेश
किंवा,
In reply to किंवा, by बिपिन कार्यकर्ते
असहमत
In reply to सहमत by ऋषिकेश
हो ना!
In reply to सहमत by ऋषिकेश
अहो पण
In reply to धागा by नितिन थत्ते
फ्लॅशबॅक...
In reply to धागा by नितिन थत्ते
तुमचा
- सावरकरांचं कार्य त्यांच्या संपर्कात असलेल्या किंवा त्यांच्या समकालीन लोकांना वगळून मांडता येईल का? गांधीजींच्या कार्याबद्दल बोलताना जिना किंवा नेहरूंना वगळून चालेल का? जर गांधी-सावरकर किंवा नेहरू-सावरकर संबंध अतिशय सलोख्याचे असते तर त्यांचा उल्लेख टाळून जाणं चाललं असतं का?
- अर्थात धागा "घरगुती सावरकर" असा असल्याने तरीही हे सर्व अवांतर ठरलं असतंही; पण गांधीजींनी काही चुका केल्या आणि त्याचे हे-हे पुरावे मी देतो/ते असं लिहीणं (जे इंद्र लिहीत आहे) म्हणजे गांधी-नेहरूंना ठोकणं आहे का?
- अगदी चर्चा धाग्याशी अवांतर असेल तरीही ती (मी धरून) अनेकांसाठी माहितीपूर्ण आहे, तर अशावेळी सर्कारी बाबूगिरी दाखवून सुरू असलेली चर्चा बंद पडणं योग्य आहे का?
अदितीIn reply to तुमचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
आदिती
In reply to तुमचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
सावरकरांच
लेखी, तोंडी.... रे़कॉर्ड...!!!
In reply to लेखी, तोंडी.... रे़कॉर्ड...!!! by इन्द्र्राज पवार
धन्यवाद.. चर्चा चालूदे .. वाचतोय
In reply to लेखी, तोंडी.... रे़कॉर्ड...!!! by इन्द्र्राज पवार
ही
धन्यवाद!
बातमी
In reply to बातमी by नितिन थत्ते
मणिभवन, वगैरे वगैरे ...
In reply to मणिभवन, वगैरे वगैरे ... by sagarparadkar
मी फक्त
In reply to बातमी by नितिन थत्ते
संदर्भ....!!
In reply to संदर्भ....!! by इन्द्र्राज पवार
सन्दर्भ ...
In reply to सन्दर्भ ... by sagarparadkar
नवा
In reply to बातमी by नितिन थत्ते
पवारांच्य
In reply to पवारांच्य by सोम्यागोम्या
अभ्यास....!!!
जुनाच मुद्दा असणार कारण आपण 'इति'हासाबद्दल बोलतोय ना?
भोचकजी
लढ बाप्पू ...
हुश्श...
In reply to हुश्श... by श्रावण मोडक
सहमत... अवां
In reply to सहमत... अवां by भडकमकर मास्तर
ग्रे...
In reply to ग्रे... by बिपिन कार्यकर्ते
संपादकांच्या
In reply to संपादकांच्या by श्रावण मोडक
लेख
इतिहास...विभूतिपूजा....!!
इतिहासाकडे पाहणे...!!!
सुंदर चर्चा.
In reply to सुंदर चर्चा. by ज्ञानेश...
चर्चा....जुनी मते !!!
सावरकरांच्या जयंतीनिमित्त एक