मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविते, तुज शोधित आले

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मनसरोवराच्या जलात चिमणा पक्षी हलकेच उठवितो नाजुक तरंग नक्षी त्या तरंगनक्षीचे कंकण मी ल्याले कविते, तुज शोधित आले इवल्या इवल्याशा बाळमुठी चुरणारे, झोपेतच हसुनी मंत्रमुग्ध करणारे ते ओठ दुधाचे टिपुनी तन्मय झाले कविते, तुज शोधित आले मायेची थरथर सुरकुतल्या स्पर्शाची, कौतुकभरल्या नजरेत लहर हर्षाची, मी आशिर्वादाचे अमृतकण प्याले कविते, तुज शोधित आले तू हवीहवीशी साथ सख्या सजणाची, तू तन्मय मीरा दासी हरिचरणाची, तुजसाठी जगले, तुझ्यात तल्लिन झाले, कविते, तुज शोधित आले तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी तू सांजवात तेवतेस संध्याकाळी त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले कविते, तुज शोधित आले

वाचने 11760 वाचनखूण प्रतिक्रिया 30

चतुरंग Tue, 12/01/2009 - 23:08
अतिशय चित्रदर्शी, नादमय, गेय आणि सहज कविता. फार दिवसांनी इतकी छान कविता वाचल्याचा आनंद मिळाला! (अत्यानंदित)चतुरंग

धनंजय Tue, 12/01/2009 - 23:32
चित्रदर्शी कविता आहे. (तरंगातून, बालहास्यातून, वगैरे कविताच कवयित्रीला शोधत आली आहे, असे म्हणावेसे वाटते.)

क्रान्तितै, अतिशय सुंदर कविता. शेवटच्या दोन कडव्यांवरून महानोरांच्या पुढील ओळी आठवल्या. ('मुक्ता' चित्रपटातही ही कविता आहे. ती कविता प्रेयसीला उद्देशून आहे.)
तू तलम अग्निची पात जशी दिनरात जळावी मंद तू बंधमुक्त स्वछंद जसा रानात झरा बेबंद

भानस Wed, 12/02/2009 - 00:10
क्रान्ति नितांत तरल व गेय कविता. खूप आवडली. अप्रतिम.

प्रभो Wed, 12/02/2009 - 00:15
मस्त..आवडली --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्रावण मोडक Wed, 12/02/2009 - 01:04
ओह्ह, नो. तुम्ही यापेक्षा... वगैरे लिहिण्यात बराच अर्थ आहे! आणि याच कवितेत बरीच बीजं आहेत!!!

मदनबाण Wed, 12/02/2009 - 08:22
सुंदर... :) तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी तू सांजवात तेवतेस संध्याकाळी त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले कविते, तुज शोधित आले झकास्स्स... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

दशानन Wed, 12/02/2009 - 09:14
छान आहे कविता. :) ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शाहरुख Wed, 12/02/2009 - 11:55
असेच म्हणतो.. (समजणारे आवडणारा आणि आवडणारे समजून घेणारा) शाहरुख

सहज Wed, 12/02/2009 - 11:08
बरेचदा शोध म्हणजे घरदार, सगेसोयरे सोडून , मोहात न पडता दूर कुठे जाउन प्राप्त / सिद्ध करायचा गोष्टी डोळ्यासमोर येतात. घरसंसारात बसल्या बसल्या कवितेचा हा शोध म्हणजे सावता माळ्याने आपल्या मळ्यातच देवाला खेचुन आणले, तसे कवयित्रीने कवितेला आपल्याकडे खेचुन आणले. वाह! जीवन त्यांना कळले हो अशीच कविता!!!!! आवडली.

मिसळभोक्ता Wed, 12/02/2009 - 14:07
तीच ती मीरा, तोच तो पाऊस.. तोच तो साजण, तीच ती भूपाळि.. एकंदरीत जुनी वारुणी नव्या बाटलीत.. यॉन... किमान सहज किंवा अवलिया साहेबांनीतरी त्यांचे खरे विचार लिहायला हवे होते. पण एकंदरीत वातावरण बघता, तेदेखील कंपूबाजीत अथवा चपलांत मग्न. संपादकांच्या कळपाकडून तर काही अपेक्षाच नाहीत. छ्या ! चला, आम्हीच चपलांची तयरी करतो, मग. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

'तोच तो आणि तेच ते' वर आमचे दोन पैसे. 'भावगीत' या काव्यप्रकाराच्या जन्म संगीत नाटकांच्या पदांमधूनच झाला असे म्हणतात.(चुभुदेघे) संगीताचा अतिरेक झाला आणि संगीत रंगभुमीला वाचवण्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केला. पदाची रचना, सुलभपणा, चाली, गाण्याच्या पद्धती. इत्यादी. त्यामुळे झाले काय की, या निमित्ताने वेगवेगळ्या रचना निर्माण झाल्या आणि लोकप्रियही झाल्या. 'कविता गायन' या प्रकाराचा प्रवास असाच झाला असावा. मीरा,साजन,पाऊस,भुपाळी, या किंवा अशा नियमित येणार्‍या शब्दांच्या रचनांमधून एक नवअनुभव वाचायला मिळतो का, तो अनुभव आनंद देतो का ? ते वाचकांनी शोधले पाहिजे असे वाटते. सो-सो वाटणार्‍या रचनेपासून ते 'आनंदाचे डोही आनंद तरंगपर्यंतचा' प्रवास जरासा मागे आणि जरासा पुढे असाही होत असतो. तेव्हा आपण निर्मळ मनाने काव्यवाचनाचा आनंद घेतला की, 'तोच तो पणा दिसणार नाही' आणि दिसला तरी, कधी तरी त्यात बदलही होतील असे समजून, लिहिणार्‍याचा उत्साह वाढविला पाहिजे असे मनापासून वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by मिसळभोक्ता

चतुरंग Wed, 12/02/2009 - 21:28
तुम्ही द्याना हो नवी वारुणी नवीन बाटलीत, किंवा जुन्या बाटलीत दिलीत तरी चालेल, आम्ही वाचून प्रतिसाद देऊ!! (कळपातला)चतुरंग

In reply to by श्रावण मोडक

चतुरंग गुरुवार, 12/03/2009 - 06:57
संपादकांच्या कळपाकडून तर काही अपेक्षाच नाहीत. ह्या मिभोंच्या वरच्या प्रतिक्रियेतून कळप आलाय! >:P चतुरंग

प्राजु गुरुवार, 12/03/2009 - 05:52
कविता अतिशय तरल उतरली आहे.. सुंदर! - प्राजक्ता http://www.praaju.com/