मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

विजुभाऊ · · काथ्याकूट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत सध्या बरीच खळबळ माजली आहे. भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. पूर्वी जनसंघ नावाने स्वतःचे राजकीय आस्तित्व ठेवणारी ही संघटना आणीबाणीनन्तर बरीच बदलली. जनता पक्षाच्या कडबोळी सरकारच्या काळात संघाने सत्तेची चव चाखली. त्यानन्तरच्या इंदिरा गांधींच्या करिश्माच्या आणि इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानभुतीच्या लाटेत भाजप या नावाने रुपडे पालटून उतरलेला हा पक्ष वाहून जातो की काय अशी शंका होती. राजीवगांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला. भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. राजकारणात यायचे नाही पण राजकारण आपल्या तालावर व्हावे असा दुटप्पी अट्टाहास कशासाठी? बाबरी मशीद पाडण्यात संघाचा हात नव्हता ( असे निदान सध्या तरी मानु यात) पण बाबरी मशीदीचा मुद्दा हा संघानेच शिजवत ठेवला होता. भाजप च्या राजकीय फायद्या साठी बाबरी मशीदीचा मुद्दा सतत तेवत रहाणे अत्यन्त आवश्यक होते . दुर्दैवाने बाबरी मशीद कारसेवकानी पाडली. ( संघाचा कारसेवकांशी संबन्ध नाही) आणि तो मुद्दा भाजपच्या हातून निसटला. मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले. भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्‍याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.कधी मनमोहनसिंगांचा विरोध कर अशा फारसा पक्का पाया नसलेल्या धोरणाना हाती धरत संसदेत भाजपने आपले आस्तित्व टिकवून ठेवले. कंदहार प्रकरणात पुरती नाचक्की झाल्यानन्तर भाजपच्या सुदैवाने विरोधी पक्षानी बराच समजूतदारपणा दाखवला. संघाने त्या घटनेवर सोयीस्कर मौन पाळले. मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले. स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे. बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे. संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे. संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे.

वाचन 63501 प्रतिक्रिया 199

अभिज्ञ Wed, 09/09/2009 - 10:32
व्वा.... चांगला वैचारिक (?) लेख. "हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे." हे मात्र सर्वात विनोदी वाक्य. झोपलेल्यालाच उठवता येईल, झोपेचे सोंग घेणा-याला कसे काय उठवणार? सबब ह्या लेखावर जास्त प्रतिक्रिया देउ इच्छित नाही. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

सहमत! स्पष्टच बोलायचे तर हे वाचुन हसावे की रडावे तेच कळत नाहीय! :-( असो, ज्याची त्याची मते! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

अवलिया गुरुवार, 09/10/2009 - 23:31
१०० वा प्रतिसाद ! धाग्याचा खफ झालेला असुन संपादक मात्र डाराडुर झोपा काढत आहेत. असो ! नशीब असते एकेका लेखकाचे.. आमचे साले नशीबच गांडु.. ! दिसला धागा की खचाक करुन उडवला जातो.. असो. चालु द्या ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

विकास गुरुवार, 09/10/2009 - 23:49
१०० वा प्रतिसाद ! अहो "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" असे म्हणले की हळू हळू विस्तारच होणार! याला म्हणतात नामाचा महीमा! तुम्हाला पण असे हवे असेल तर एखादा संघावर/हिंदूत्वावर टिकात्मक लेख टाकून बघा. अभ्यासाची अथवा माहीतीची काही गरज नाही. वास्तवाला धरून नसले तर अधिक उत्तम... टंकायला सुरवात करायची आणि झोडपून काढायचे :-) बघा कसे दणादण प्रतिसाद मिळतात ते - बाजूने, विरुद्ध वगैरे. आपण तर खुद्द अवलिया, त्यामुळे याहून अधिक सांगायची काय गरज? ;)

अमोल केळकर Wed, 09/09/2009 - 10:41
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।। -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

नीलकांत Wed, 09/09/2009 - 10:52
वरील लेख हा वैचारिक दिवाळखोरी दाखवतो असेच मी म्हणेन. लेख वाचायला सुरूवात केल्यावर सविस्तर उत्तर द्यावे असा विचार होता. मात्र जस जसा लेख वाचत गेलो तेव्हा ह्या सामान्य नागरिकाचे ( नागरिक एकवचनी म्हणून एकेरी उल्लेख , लेखकाचा नाही.) असामान्य जावाईशोध आणि आधीच ठरवलेले मत काही घटनांचा संदर्भ देऊ चिकटवण्याची घाई पाहिली आणि ह्या लगबगीची चिड येण्या ऐवजी किव आली. भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे. ह्या वाक्यावर तर ठार उडालोच. धम्या इस्टाईलने म्हणायचे झाल्यास फुटलो.... धन्य धन्य ! ज्यांना संघ काय? संघाची रचना काय? आदींची प्राथमिक जरी माहिती असेल त्यांना सुध्दा वरील वाक्यातील विनोदाने हसू येईल. अशी वाक्ये हिंदीभाषी न्यूज चॅनेलमध्ये शोभून दिसतात हो ! कोट बदलला आणि आवाजाची पट्टी बदलली की त्या निवेदकांना जगातील कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार मिळतो. तुमचा तसा काही ग्रह झालाय का? :) असो... लेखकाला आपलं मत मांडायला अधीक भरपुर वाव आहे. माझं मत एवढंच की पुर्वग्रहदूषीत मत मांडतांना उगाच संघाचा आणि परिवारातील संघटनांचा आणि सोबतच गेल्या ६० वर्षांचा अभ्यास असल्याचा आव कशाला आणता? वर अभिज्ञ ने म्हटल्या प्रमाणे झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे उठवणार? - नीलकांत

विजुभाऊ Wed, 09/09/2009 - 11:20
एका सामान्यनागरीकाने ही मते व्यक्त केली आहेत. त्या नागरीकाला संघ नक्की काय कार्य करतो ते ठाऊक व्हावे ही अपेक्षा आहे. त्या नागरीकाची मते जशीच्यातशी दिली आहेत. संघाची भूमिका स्पष्ट करु शकत असाल तर बरे होईल अशी त्या नागरीकाची अपेक्षा आहे. त्या नागरीकाची मते ही वैचारीक दिवाळखोरी असू शकेल पण त्याबद्दल आपण त्याला नीट महिती सांगु शकतो. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

नीलकांत Wed, 09/09/2009 - 13:20
माफ करा मात्र ही एका सामान्य नागरीकाची मते नाहीतच. सामान्य नागरीक हे बिरूद येथे केवळ आपली तटस्थता जाणवावी म्हणून घेतलेलं आहे. लेखाच्या सुरूवातीच्या परिच्छेदात जसे संदर्भ दिलेले आहेत त्यावरून संघाच्या समग्र वाटचालीचा अभ्यास (?) करून केलेले विधानं दिसतात. संघसंबंधीत काही घटनांचा अभ्यास करून मग संघात कसा संभ्रम आहे आदींचे विश्लेशन करणार्‍या व्यक्तीला जेव्हा हे लक्षात येतं की हे फारच एककल्ली होतंय तेव्हा "ही सामान्य मानसाची मते आहेत" अशी झुल पांघरली की झालं. फारच सोईची वाक्ये आहेत ना? संघाबाबत येथे आणि इतरत्र आधीच अनेक लोकांनी खुप उत्तम लिहून ठेवलं आहे. सामान्य मानसाने केवळ शीर्षक लिहून गुगललं असतं तरी सर्व संभ्रम (?) दूर झाले असते. त्याच विषयावर नव्याने चर्चा करायला हरकत नाही. पण काही तर नवीन मुद्दे हवेत ना? - नीलकांत

In reply to by नीलकांत

विजुभाऊ Wed, 09/09/2009 - 13:35
तटस्थता वगैरे नाही. लिखाण एकांगी असु शकेल पण जे मुद्दे मला भेटलेल्या त्या इसमाने मांडले त्याचे मुद्देसूद उत्तर मला देता आले नाही हे खरे. निदान इथे त्यांची उत्तरे मिळतील म्हणून ते जसे च्या तसे लिहिले जो बोलला तो कदाचित सेवादलाचा कार्यकर्ताही असू शकेल

In reply to by विजुभाऊ

नीलकांत Wed, 09/09/2009 - 13:58
स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे. बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे. संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे. संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे ही वाक्ये वाचली की मनोरंजन होतं आणि शेवटी एवढ्या संख्येने सामान्य लोक संघाचं चांगलं व्हावं असं म्हणत आहेत तर संघाची काळजी करण्यासारखं काही नाही असं सुध्दा वाटतं. खरं तर संघासाठी आयुष्य अर्पण करनार्‍या लोकांपेक्षा ज्यांना संघाच्या राजकीय क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे. आधीच्या उठसुठ संघाला शिव्या देऊन आपलं सेक्युलॅरिझम सिध्दं करणारे आता संघाच्या भविष्याबाबत काळजी व्यक्त करण्याचा नवा पायंडा घालू पाहताहेत की काय? :) - (आनंदीत) नीलकांत

In reply to by नीलकांत

पिशी अबोली Sat, 04/20/2013 - 23:00
खरं तर संघासाठी आयुष्य अर्पण करनार्‍या लोकांपेक्षा ज्यांना संघाच्या राजकीय क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे
+१ फार बुवा काळजी करतात हे लोक.. काळजी करण्यात इतके मग्न की संघाने केलेलं काम डोळ्यांसमोर असूनही दिसत नाही बिचार्‍यांना..

छोटा डॉन Wed, 09/09/2009 - 11:23
बरेच काही नवे वाचायला मिळाले. लेख पुन्हा एकदा व्यवस्थित वाचुन सविस्तर प्रतिक्रिया देतो. तुर्तास ही पोच समजावी .. विस्तृत प्रतिक्रियेसाठी "ही जागा" राखुन ठेवत आहे ... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

मागे विनायक पाचलग ह्यांनी ह्याच नावाने चालु केलेला काथ्याकुट आठवला आणी त्याच जोडीने पाचलगांना ९९% प्रतिसादातुन मिळालेला "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही" असा मिळालेला सल्ला आठवला. चालायचेच, इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला पण... :D आणि हो, "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही" हा सल्ला त्यांना खूपच उपयोगी ठरला म्हणे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by परिकथेतील राजकुमार

निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 17:20
पाचलगचा धागा पाहिला. तो धागा संघाची स्तुती करणारा होता. असल्या अतिरेकी संघटनेची भलवाण करणार्‍याला "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही"असे सांगणे जरुरी होते. त्यामुळे अश्या प्रतिक्रिया आल्यास ते योग्यच आहे. पाचलग जसजसा मोठा होत जाई/ भरपूर वाचन करेल तसतसे त्याचे विचार बदलतील अशी आशा करुया.

In reply to by निमीत्त मात्र

दशानन Wed, 09/09/2009 - 17:31
>>>असल्या अतिरेकी संघटनेची भलवाण करणार्‍याला बरं बरं... खान साहेब... समजला तुमचा अभ्यास :)

In reply to by दशानन

निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 17:35
खान साहेब? पहा धर्मांध विचारसरणीचा परीणाम. राजेंनी लगेच मला मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु इ.इ. ठरवुन टाकले असेल.

In reply to by निमीत्त मात्र

दशानन Wed, 09/09/2009 - 17:45
>>धर्मांध विचारसरणीचा परीणाम =)) बरं बरं ! >>राजेंनी लगेच मला मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु इ.इ. ठरवुन टाकले असेल. टोमणा कळाला नसावा.. त्यामुळे होतं असे कधी कधी... चालू दे ! >>मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु =)) च्यामायला तुम्ही संघामधे असलेल्या एका विशीष्ठ धर्माशी संबधीत लोकाच्यावर लिहले तर तुम्ही .. काय म्हणात तुमच्या भाषेत... सेकुलर... च्यामायला आम्ही नुस्तं खान म्हणालो की धर्मांधं :? लै भारी... ! जरा चष्मा काढा... नाही तर... दवाची मात्रा वाढवा मात्र साहेब ;)

In reply to by दशानन

निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 17:52
टोमणा कळाला नसावा.. त्यामुळे होतं असे कधी कधी... चालू दे !
टोमणा व्यवस्थित कळला. आणि बरोबर उत्तर दिले आहे. तुम्ही हसुन लोळणाररी चित्रे टाकून त्याकडे दुर्लक्ष केलेत. हरकत नाही.

In reply to by निमीत्त मात्र

JAGOMOHANPYARE गुरुवार, 09/10/2009 - 11:17
पाचलग साहेबानी आधी सन्घावर चिखल्फेक सुरु केली होती... आधी मोठा हो बाळा, असा घाऊक सल्ला मिळाल्यावर मग त्यानी नमस्ते सदा वत्सले सन्घभूमे सुरु केलं होतं............ :)

नाना बेरके Wed, 09/09/2009 - 14:56
असे विचार कोणाचे कां असेनात, पण ते दळभद्री आहेत हे मात्र खरे. ज्यांचा पक्ष भारतात जवळपास ६०-६२ ( मधली काही भाजपा आणि जनता सरकारची वर्षे सोडून) वर्षे सरकार स्थापून आहे ( पक्षी : काँग्रेस पक्ष ) त्यांनी देशाला पुरते नागवले. "अजूनही पोटापाण्याचे प्रश्न नीटपणे सुटत नसलेल्या लोकांचा देश " अशी अवस्था ज्यांनी केली त्यांच्या बद्द्ल कोणी काही लिहित नाही. पण कुणाचे, कधीही, कुठल्याही प्रकारचे नुकसान केले नाही आणि करणार देखील नाही अश्या संघासारख्या संघटनेने जरा राजकारणात- अलिप्त किंवा सक्रीय काय असेल ते राहून - जरा डोके वर काढले कि बोंब मारायला सुरवात. खरोखरी, आपल्या अंतर्मनात जावून संघाच्या सुरवातीपासूनच्या वाटचालीचा त्रयस्थपणे आढावा घ्या आणि संघाने देशाचे, देशवासियांचे काही नुकसान केले आहे कां, ते पहा आणि मग विचार मांडा.

In reply to by नाना बेरके

विजुभाऊ Fri, 09/11/2009 - 09:57
असे विचार कोणाचे कां असेनात, पण ते दळभद्री आहेत हे मात्र खरे. हे अतीअवांतर वैयक्तीक मत झाले. साधन्शुचितेबाबत चोखंदळ ,परखड असणारे लोक जेंव्हा वेगळे वागु लागतात तेंव्हा खटकते. याअ लेखात संघाबद्दल कोणतीच टीका केलेली नाही. फक्त बदलत्या राजकीय /आर्थीक्/जागतीक संदर्भात संघाची ध्येयधोरणे कशा प्रकारे आखली/बदलली/टिकवली आहेत. आणि ती नक्की काय आहेत हे विचारले आहे. कावीळ झालेल्याना म्हणे जग फक्त पिवळेच दिसते तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या बद्दल कोणी काही विचारले की त्याना थेट दळभद्री विचारांचे म्हणवले जाते.कोणतिही चिकित्सा नाकारायची आणि स्वप्रेमात मग्न व्हायचे या वृत्तीला नार्सीसस असे म्हंटले जाते. त्यामुळे कोणतीच प्रगती सुधारणा मात्र होत नाही. असो......... पवित्र डबक्यातले पाणी ......... त्यात शेवाळ आणि आणखी कायकाय साठून वास मारत असला तरी त्याबद्दल विचारायचे नसते...... पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 17:12
संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे.

संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच. :) -दिलीप बिरुटे (दक्ष)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रावण मोडक Tue, 04/23/2013 - 22:33
संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच.
अगदी प्रा.डॉ. प्रतिसाद. ;-)

In reply to by श्रावण मोडक

विकास Tue, 04/23/2013 - 22:59
बिरूटे सरांच्या प्रतिसादास उत्तर देण्यास तब्बल साडेतीनवर्षांचा कालावधी! नशीब तुम्ही त्यांचे विद्यार्थी नाही आहात आणि हा गृहपाठ नव्हता! ;)

In reply to by विकास

श्रावण मोडक Tue, 04/23/2013 - 23:08
हाहाहा... धागाच आत्ता वाचतोय... आता लॉग काढून पाहू नका, की किती वेळेस 'श्रावण मोडक' या आयडीनं या धाग्यावर भेट दिलीये... ;-) कारण तसा अनेकदा उघडला, पण वाचलेला नाहीये.

In reply to by श्रावण मोडक

विकास Tue, 04/23/2013 - 23:32
आम्हाला असले लॉग वगैरे बघण्याचे हक्क नाहीत. :( पण नाही आहेत तेच बरे आहे. :) कारण तसा अनेकदा उघडला, पण वाचलेला नाहीये. हे तुम्ही कसे करू शकता? शिकले पाहीजे तुमच्याकडून! तसे करू शकलो तर भरपूर वेळ वाचेल आणि जरा मनःशांती देखील लाभेल. :)

sujay Wed, 09/09/2009 - 19:08
संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे. काय बोलणार?? आलाय हातात कळफलक, टंका हवा ते आणि करा प्रकाशीत. चालु द्या. सुजय

लिखाळ Wed, 09/09/2009 - 19:17
ह्म्म .. लेखाबद्दल बोलण्यासारखे माझ्याकडे काही नाही. संघाबद्दलची वाईट मते प्रतिसादांतून वाचूनही वाईट वाटले. -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

प्राजु Wed, 09/09/2009 - 19:24
अतिशय एकांगी लेख आहे. संघाबद्दल काही जास्ती माहिती नसली तरी जे लिहिले आहे ते नक्कीच चुकीचे आहे... बाकी चालूद्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे Wed, 09/09/2009 - 20:41
लेख एकांगी आहे असं गृहित धरलं तरी मग ह्याची दुसरी बाजू वाचायला आवडेल. 'संघ म्हणजे नक्की काय', 'संघ नक्की काय करतो', 'संघाने केलेली काही ठळक विधायक कामे', 'संघात गेल्याचे काय व्यक्तिगत फायदे / तोटे आहेत' अशा स्वरूपाची माहिती संघाच्या जाणकारांनी दिली तर खर्‍या अर्थाने चांगली चर्चा होईल अन्यथा बहुतांश प्रतिसाद भरकटताना दिसतील. --------- अवांतरः मी स्वतः शाळेत असताना काही वर्षं संघात जायचो. 'संघात जाऊन संस्कारांच्या दृष्टीने नक्की काय मिळवलं / गमावलं ते आठवायचा प्रयत्न करतोय.

In reply to by संदीप चित्रे

प्रभाकर पेठकर Wed, 09/09/2009 - 21:36
लहानपणी मी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो. एकूणात शिस्त, वेळेचे महत्त्व, लोकसंग्रह इत्यादी शिकलो. आमच्या शाखेत धार्मिक शिक्षण नव्हते. देशप्रेमावर व्याख्याने व्हायची. गुरू-शिष्य नात्यावरही बौद्धीकं व्हायची. ह्याचा बर्‍यापैकी फायदा पुढील आयुष्यात झाला.

In reply to by प्रभाकर पेठकर

निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 21:55
लहानपणी मी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो.
मग मोठे झाल्यावर ते बंद करावेसे का वाटले तेही कृपया लिहा.

In reply to by निमीत्त मात्र

विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/10/2009 - 16:26
माझ्यामते लहानपणी असलेली एखादी चांगली सवय मोठेपणी बंद पडली म्हणजे ती आपण त्याज्य ठरवली किंवा टाळली असे नाही होत. मोठेपणी संसाराचे व्याप वाढले की आपोआप बाकी सगळे कमी होत जाते, पण त्याचा अर्थ जुने सगळे त्याज्य ठरवले आहे किंवा सोडले आहे असा होत नाही. कॉलेजमध्ये असताना मी ही संघात जायचो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे कार्य करायचो, जे आता इतर व्यापामुळे नाही जमत. पण याचा अर्थ आज मला स्वामी विवेकानंदांची किंवा कै. हेडगेवारांची , कै. गोळवलकर गुरुजींची मते पटत नाहीत असा नाही होत. माझ्या दुर्दैवाने त्या कार्याला मी तेवढा वेळ देवु शकत नाही एवढाच याचा अर्थ होतो. काय पेठकरकाका? चुकत असेन तर सांगा. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 17:14
मला उत्तर पेठकरांकडून हवे होते. त्यांनी दिले नाही, त्यातच सगळे आले. तुमचा प्रतिसाद तुमच्या ख्यातीप्रमाणेच आहे..असो..

In reply to by निमीत्त मात्र

विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/10/2009 - 17:43
आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझी ख्याती काय आहे ते पण सांगा ना राव! मला पण कळु दे मी ख्यातनाम आहे की कुख्यात? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by निमीत्त मात्र

प्रभाकर पेठकर Fri, 09/11/2009 - 01:37
श्री. निमित्त मात्र, लहानपणी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायचो म्हणजे त्यांच्या कुठल्या आदर्शांनी प्रेरित होऊन जात होतो अशातला भाग नाही. मला स्वयंसेवकांचा गणवेश, ते खेळ, तो दंड आणि ती एकसुरात गाईलेली प्रार्थना आवडायची. त्यामुळे मी शाखेत जाऊ लागलो. पुढे त्यात रस वाढू लागला. पण दुर्दैवाने, शाखेच्या मैदानावर एका इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि शाखा एका दूरच्या मैदानावर भरू लागली. तिथेही मी सुरूवातीला जात होतो. पण ते मैदान मला लांब पडायचे. त्याकाळातच आमच्या गल्लीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा सुरू झाली . तिथे मला वाचनाची आवड लागली. आमच्या गल्लीतच एका सेवाभावी डॉक्टरांनी एक मोफत वाचनालय सुरू केले होते. तिथेही मी जायचो. वाचनाच्या आवडीतून माझी 'पुलं'च्या साहित्याशी ओळख झाली तसेच काही प्रवासवर्णने , वासू मेहेंदळ्यांचे 'विचित्र विश्व', कुमार, नवनीत, विज्ञानयुग अशी काही नियतकालिके वाचावयास मिळाली. मधुनमधुन वेळ मिळाला आणि मनात आलं की मी शाखेवर चक्कर टाकायचो. पण वाचन, माफक प्रमाणात टेबलटेनिस, बॅडमिन्टन आणि काही तारूण्यसुलभ आकर्षणांच्या प्राधान्य क्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागे पडत गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मी काही फार प्रेमात होतो अशातला भाग नाही आणि त्यांचा मी कधी तिरस्कारही केला नाही. शाखेमुळे आयुष्यात जे माझे फायदे झाले त्याचे श्रेय मी त्यांना का नाकारू? ते मी त्यांना देतो आणि कायम देत राहीन. मला वाटते पुरेसे सविस्तर उत्तर मी दिले आहे. आपली जिज्ञासा शमली असेल असे मी मानतो. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

श्रावण मोडक Tue, 04/23/2013 - 22:38
प्रांजळ प्रतिसाद आवडला. सहज विचार डोक्यात आला, शाखेच्या जागी वाचनालय! मला वाटतं, तुमच्याकडं असलेला समतोल दृष्टिकोन ही त्या वाचनालयाची देणगी असावी, आणि तुमच्यातली शिस्त शाखेची देणगी असावी.

सुधीर काळे Wed, 09/09/2009 - 21:08
खरं सांगायचं तर विजूभाऊना खूप सांगायचं/लिहायचं होतें पण जसजसा तो लेख मोठा होत गेला तसतसा त्यांना बहुदा अस्वस्थ वाटू लागलं असावं व त्यांनी तो घाईघाईने आटोपता घेतला. त्यामुळे या लेखाद्वारे त्यांना काय म्हणायचे आहे तेच समजत नाहीं. भरपूर 'डाटा' दिलाय, पण निष्कर्ष काढायचा राहून गेलाय असे मला वाटले. माझा त्यांना सल्ला आहे कीं त्यानी हा लेख स्वतःच एकदा नीट वाचावा व पुन्हा लिहावा. नक्कीच मस्त होईल. बघा पटते का. एक अशाच विषयांवरचा लेखक या नात्याने मी या चक्रव्युहात कधी-कधी सापडलो आहे. अशा वेळी एकाद्या मित्राला सल्ला विचारावा. मी असे खूपदा करतो. गैरसमज नसावा ही कळकळीची विनंती. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

आण्णा चिंबोरी Wed, 09/09/2009 - 21:54
संघाचे वास्तविक स्वरुप सांगणारा माझा प्रतिसाद का उडवला कळेल का? मी मिपाच्या संचालक, संपादक किंवा सदस्यांसह कोणावरही काही वैयक्तिक आरोप केले नव्हते. कोणत्याही जातीवर-धर्मावर टीका केली नव्हती तरीही हा प्रकार संतापजनक आहे. वर उदाहरणार्थ नाना बेरके यांचा दळभद्री विचार वगैरे शब्द असलेला प्रतिसाद मात्र तसाच आहे. काल मी म्हटले होते की ब्राम्हण विरोधी काहीही लिहिले की ते ताबडतोब संपादित होते त्याचा पुरावा एका संपादकाला हवा होता. जर त्या संपादकानेच माझा प्रतिसाद उडवला नसेल तर त्याला पुरावा मिळाला असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.

In reply to by आण्णा चिंबोरी

निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 21:58
असे खरंच झाले असेल तर ते चुकिचे आहे. विचारांची मुस्कटदाबी होते आहे. शक्य असल्यास सदर संपादकांने खुलासा केल्यास गैर समज होणार नाहीत.

In reply to by निमीत्त मात्र

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/10/2009 - 12:27
मिपावर नवीन(पक्षी: हल्लीच जास्त कार्यरत झालेले) दिसता.. मागे मिपा मुखपृष्ठावर कोल्हापुरी चपलांचे चित्र होते. असो. चांदणी भयामुळे इथे जास्त काही लिहीत नाही. :) वरील लेख प्रतिक्रिया देण्यायोग्य वाटला नाही म्हणून प्रतिसादाला अवांतर प्रतिसाद देत आहे. पुण्याचे पेशवे हा मोनॅकोपॉवर्ड प्रतिसाद आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 17:17
मिपावर नविन असणे, हल्लीच कार्यरत असणे हा गुन्हा आहे का? मला दुसर्‍यांदा ह्यावरुन डिवचले जाते आहे म्हणून विचारले. कृपया तात्या किंवा संपादक ह्यांनी खुलासा करावा. चप्पल घालून चालते व्हा म्हणून तुम्ही दिलेला सल्ला आवडला. आपल्या विचारांपेक्षा वेगळे विचार असणार्‍याच्या विचारांचा पराभा करण्याचा याहून सोपा मार्ग कोणता?

In reply to by निमीत्त मात्र

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/10/2009 - 17:42
हा प्रतिसाद मूळ चर्चेशी पूर्ण अवांतर असून विनाकारण वैयक्तिक रोख ठेउन दिलेला आहे. संपादकांनी कृपया कारवाई करावी. संदर्भः याच चर्चेवर सध्या पुढच्या पानावर बिल्ला क्र: २५८० यांनी दिलेला प्रतिसाद. प्रतिसाद मात्र

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 17:46
कोणाचा प्रतिसाद माझा की पेशव्यांचा? आधी पेशव्यांचा प्रतिसाद वाचा. हा कसला पेशवा? हा तर चांदणीला घाबरणारा पळपुटा बाजीराव!! असले सवंग मलाही लिहिता आले असते. त्यावर तुमची ही प्रतिक्रिया योग्य ठरली असती.

In reply to by निमीत्त मात्र

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/10/2009 - 22:53
हा प्रतिसाद मूळ चर्चेशी पूर्ण अवांतर असून विनाकारण वैयक्तिक रोख ठेउन दिलेला आहे. संपादकांनी कृपया कारवाई करावी. संदर्भः याच चर्चेवर सध्या पुढच्या पानावर बिल्ला क्र: २५८० यांनी दिलेला प्रतिसाद. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 23:06
मी तक्रार केलेला जो प्रतिसाद दाखला म्हणून देत आहात तो आत दिसत नाही कारण मूळ प्रतिसादच साफ झाला आहे. तुम्ही तुमची जळ्जळ उगाळत राहा.मला हरकत नाही. इनो हवे असेल तर सांगा..

In reply to by निमीत्त मात्र

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/10/2009 - 23:23
आम्हा कष्टकरी माणसांना झोप लागण्यासाठी इनोची गरज नसते. इतर कोणाला हवं असेल तर परोपकार म्हणून दिलं, शिवाय ओव्याचा "देशी" मार्गही सुचवला. ;-) असो. अदिती

आण्णा चिंबोरी Wed, 09/09/2009 - 21:56
यात आक्षेपार्ह काय आहे? खरे बोलणे हे? अतिशय सुरेख व समतोल लेख. विजुभाऊंचे अभिनंदन करावेसे वाटते. बंद पडलेल्या मिपा संपादकीय या सदराला पुनरुज्जिवीत करण्यासाठी हा उत्तम लेख आहे. संघ ही फॅसिस्ट विचारसरणीचीच संघटना आहे. घातपात करण्यासाठी, दंगली पसरवण्यासाठी त्यांना बजरंग दल, विहिंप, आक्रस्ताळी दुर्गा वाहिनी, त्याचबरोबर एकमेकांचा पायपोस नसलेल्या पतित पावन संघटना, वंदे मातरम संघटना अशा दहशतवादी संघटना लागतात. ही संघाचीच वेगवेगळी रुपे. पुराणात रावणाला जशी दहा तोंडे पण एकच शरीर आणि आत्मा होता तसाच हा दहा तोंडाचा एक राक्षस आहे. सिमी, तालिबान लष्कर ए कायदा आणि संघ यांच्या कार्यपद्धतीत फरक असला तरी विचारसरणीचे सूत्र मात्र एकच आहे. किंबहुना अधिक संभावित आणि चलाख असल्याने संघ तुलनेने धोकादायक आहे. सावरकरांनी केलेले दलितांसाठीचे कार्य, आंबेडकरांच्या चळवळी याच्याशीही संघाचा काहीही संबंध नाही. संघ प्रसिद्धीसाठी हपापलेला नाही असे म्हणत ठिकठिकाणच्या चर्चांमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे पिलू सोडून स्वतःच स्वतःच्या टे-या बडवायच्या यातही संघ सराईत आहे. वास्तविक पाहता देशभरात निस्पृहतेने कार्य करणा-या अनेक संघटना आहेत. राष्ट्र सेवा दलापासून वैयक्तिक पातळीवर अथक काम करणारे अवचट, दलवाई, बंग, बाबा आढाव, बावस्कर अशी अक्षरश: आकाशाएवढे कर्तृत्व असणारी माणसे कोणताही राजकीय अजेंडा न घेता निरलसपणे कार्य करत होती, आहेत. त्यांच्याशी संघाची तुलना कशी करायची हा प्रश्नच पडतो. संघाचे मुख्य कार्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. गोळवलकर गुरुजींपासून ते करंदीकर, दाते, देवरस, भागवत ही मराठी माणसे या जातीयवादी संघटनेच्या प्रमुखपदी विराजमान असल्याने आणि गांधींच्या खुनात संघिष्ठांचा हात असल्याने मराठी माणसांबाबत इतर देशवासीयांच्या मनात अप्रीती, अविश्वास आणि भीती निर्माण करण्यासाठीही संघच जबाबदार आहे.

In reply to by निमीत्त मात्र

आण्णा चिंबोरी Wed, 09/09/2009 - 22:04
वरील प्रतिसादात 'संघाची फारशी माहिती नाही पण जे लिहिले आहे ते नक्कीच चुकीचे आहे' छाप प्रतिक्रिया वाचून हसू आले'. हेही लिहिले होते. कदाचित त्यामुळे प्रतिसाद उडाला असावा.

In reply to by आण्णा चिंबोरी

विजुभाऊ Fri, 09/11/2009 - 09:41
राष्ट्र सेवा दलापासून वैयक्तिक पातळीवर अथक काम करणारे अवचट, दलवाई, बंग, बाबा आढाव, बावस्कर संघाचे मुख्य कार्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. गोळवलकर गुरुजींपासून ते करंदीकर, दाते, देवरस, भागवत पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

मुत्सद्दि Wed, 09/09/2009 - 21:59
क्षणभर तर मला सुमार साहेबांचे "लोकसत्तेचे" संपादकीयच वाचतोय असा भास झाला. सर्वसामान्यांच्या नावावर खपवलेली वैचारिक दिवाळखोरी मात्र चांगलीच करमणूक करून गेली ह्यात काहि वाद नाहि. पुढील लेखनास शुभेच्छा. देव (मानत असा/नसा) तुम्हाला चांगले लेख लिहिण्याबद्दल सदबुध्दी देवो एवढीच इच्छा. मुत्सद्दि.

In reply to by मुत्सद्दि

निमीत्त मात्र Wed, 09/09/2009 - 22:03
अहो मग त्यातल्या मुद्द्यांचा वैचारिक प्रतिवाद करा ना. मलाही वाचायला आवडेल. नुसतीच चीड चीड कशासाठी?

कपिल काळे Wed, 09/09/2009 - 22:45
गादीवरुन डायरेक्ट संघ? अतिशय एकांगी लेख. वैचारिक गोंधळ उडाला आहे लेखकाचा.

विकास Wed, 09/09/2009 - 23:02
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. संघाची मूळ भुमिका (संघटन आणि कार्यकर्ता निर्माण) बदलत असताना दिसत नाही. राष्ट्रासाठी आणि समाजासाठी काम करताना कालानुरूप बदल घडवण्याची लवचिकता नक्कीच संघाने दाखवलेली आहे. नाहीतर उद्या म्हणाल की आता इंटरनेट वापरतात, फोनवरून एसएमएस करतात वगैरे...संघातून प्रेरणा घेऊन जर कोणी कामे करत असले तर ती वेगळी संघटना असते आणि त्यात त्या संघटनेच्या उद्दीष्टांप्रमाणे त्या संस्थे संघटक भुमिका ठरवणार... राजीव गांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते गांधीवादी समाजवाद हा इंदिरागांधींच्या अखेरच्या काळात आला होता. ते वाजपेयींचे विचार होते. त्यातून एक नक्की दिसते की संघाचे विचार काही असले (अथवा वाटले) तरी भाजपाने स्वतंत्र भुमिका घेतली होती. आणि अर्थातच त्या आधी म्हणजे बांग्लादेश मुक्तीयुद्धाच्या वेळेस इंदीरा गांधींची भुमिका पाहून तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरसांना त्यांना "दुर्गा" असे कौतुकाने म्हणत संघाचापाठींबा देण्यास कमी वाटले नव्हते. पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला. रामजन्मभूमीचा प्रश्न मंडलच्या आधी नवा नव्हता. तो आधीपासूनच होता, जरी मधल्या काळात निद्रीस्त झाला असला तरी. तो परत जागृत होण्याचे कारण हे शहाबानो प्रकरणात अल्पसंख्यांकाचे लांगुलचालन करत जी घटनादुरूस्ती करून सर्वोच्च न्यायालयाला देखील कमी पणा आणताना काही वाटले नव्हते, ते होते. भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. उदाहरण दिल्यास समजेल की यात तथ्य किती आहे. ४२ च्या आंदोलनात करा अथवा मरा म्हणताना गांधीजींनी स्वत:ची भुमिका बदलली असे म्हणतात. वास्तवीक ती परिस्थितीनुरूप होती असे म्हणायला हवे. तीच कथा कदाचीत आपण उदाहरण दिल्यास स्पष्ट करता येईल. नाहीतर उगाच पोकळ वल्गना आहे. संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. अहो गांधीटोपी घालणारी प्रत्येक व्यक्ती गांधीवादी असते का? (असते असे जरी कोणी म्हणाले तरी ते गांधीवाद किती पाळतात आणि "पुरूष" नाटकात दाखवल्याप्रमाणे आवाज उठवण्याऐवजी, तोंडात कोंबून बंद करायला किती लावतात हा अजूनच वेगळा प्रश्न आहे). विहिंप, बजरंगदल आदी संघटनांपैकी किमान काही (सगळ्याच असतील असे नाही) या संघाच्या सहकार्यातून तयार नक्कीच झाल्या. मात्र त्या स्वतंत्र संघटना आहेत. त्यात अनेक जण किंबहूना बहुतेक जणांनी कधी खाकीचड्डी घातली नाही की "नमस्ते सदा" म्हणले नाही. थोडक्यात जो शाखास्थानी आला नाही, ध्वजप्रणाम केला नाही तो स्वयंसेवक नाही आणि तशी संस्था म्हणजे संघ ही नाही...कायद्याने नाही असे नाही तर वैचारीक आणि आचारानेपण. गांधीजी स्वतःला काँग्रेसचे चार आण्याचे सदस्य पण नाही असे म्हणायचे पण त्यांचा प्रभाव काँग्रेसवर होताच की. भाजपा जर चालू करण्यात स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला तर त्यात संघाच्या वैचारीक छटा दिसल्या तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले. अजूनही मोदी लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. तसेच टाटा-अंबानीसकट त्यांच्या राज्यात आणि सरकारबरोबर धंदा करायला कोणालाही कमीपणा वाटत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे, गेली पाच+ वर्षे विरुद्ध सरकार केंद्रस्थानी असूनही मोदींच्या विरोधात अजून काहीच आरोपपत्र नाही. हा मुद्दा मांडायचे कारण मोदी बरोबर की चूक हे नसून जे विरोधकांकडूनही सिद्ध झालेले नाही ते होई पर्यंत हिटलर वगैरे म्हणणे अयोग्य वाटते. संजय गांधी जरी कट्टर शत्रू होता तरी मनेका गांधी या अनेक वर्षे भाजपात आहेत आणि मंत्रीही होत्या. तरी देखील राहून राहून एक वाटते की जेंव्हा आपण अजूनही त्याचे आई-बाप काढून मुलाची ओळख करावी का? कुठेतरी आपण घराणेशाहीत रमून जातो... भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्‍याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. संघाच्या बर्‍याच स्वयंसेवकांनी सत्तेची चव चाखली असेल पण जे स्वयंसेवक सतेत गेले त्यांना संघात काहीच दायीत्व राहीलेले नव्हते. संघाचे ध्येयधोरण म्हणाल तर एकच राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटन करणे आणि त्यासाठी कार्यकर्ता निर्माण करून तो राष्ट्रप्रवाहात सोडून देणे. त्यापासून ते कधीच ढळले नाहीत. आणि हा काय प्रकार आहे हे कधी त्याचा अनुभव जाउंदेत पण अभ्यास न केलेल्याला समजले नाही... कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे. असे विधान सुषमा स्वराज यांनी केले होते. रा.स्व.संघ ही जन्मापासून केवळ "पुरूषांची" संघटना होती/आहे. त्यात सुषमा स्वराज नव्हत्या... मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले. बातम्या पाहील्यातर यात तथ्य नाही हे समजेल.... आत्ताच्या बातम्यात तर माजी सरसंघचालक काय म्हणाले हे वाचले नसेल तरच आश्चर्य... संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे. याला काही आधार नसावा. कारण जर ध्येयधोरणे समजत नसतील तर स्वयंसेवक संघापासून फारकत घेतील. तशी ते घेताना दिसत नाहीत. संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत. या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी संबंध नाही. संघ संघटना काय आहे हे मला सामान्य असून आणि (लहानपणी कधीपण न जाता) अभ्यास, निरीक्क्षण करून समजू शकते. ते जर इतरांना समजू शकले नाही तर एकतर आधीच डोक्यात काहीतरी आहे तसेच संघातील ज्या व्यक्तींशी संबंध आला त्या हे सांगायला कमी पडल्या असा अर्थ होऊ शकतो. "त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत" या वाक्यातून पुर्वीचे स्वयंसेवक प्रभावी होते असे आपल्याला म्हणायचे आहे असे दिसते. चांगले आहे... बाकी आत्ताची काळजी करू नये, अनेकजण प्रभावी आहेत. पण ते प्रसिद्धीसाठी काम करत नसल्याने एकतर माध्यमांमधे दिसत नाहीत आणि त्यांच्यावर टिका झाली तरी ते खचत नाहीत. बाकी तेहलका मधील हा लेख काहीतरी सनसनाटी असेल असे वाटले पण त्यातून काहीच उलटसुलट ते लिहू शकलेले नाहीत असे वाटले...एक केवळ संघ भाजपाला झोडपतोय इतकेच काय ते. आता त्यातील किती खरे ठरते त्यावरून तेहलकाची वृत्तपत्रीय आचारसंहीता समजेल नाहीतर नसतेच सनसनाटी आणि कुणाच्या तरी बाजूने कुणाच्या तरी विरुद्ध ओरडणारे इतकेच काय ते...

मिसळभोक्ता Wed, 09/09/2009 - 23:16
सध्या आम्ही जहाल आणि मादक पेयाचा आस्वाद घेतो आहोत. सर्वसामान्य नागरीकांच्या वैचारिक दिवाळखोरीकडे नंतर वळू. बाकी सगळ्यांचे प्रतिसाद त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच आहेत. (एक्सेप्ट फॉर वनः नीलकांतचा नेहमीचा सौम्यपणा कुठे गेला?) -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 04:37
बाकी सगळ्यांचे प्रतिसाद त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच आहेत
बाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे ;) असो..जोक्स अपार्ट, विकासने आण्णा चिंबोरींच्या प्रतिसादाचाही प्रतिवाद करावा अशी विनंती. तो पर्यंत त्याचा वरील प्रतिसाद नीट वाचून घेतो.

In reply to by निमीत्त मात्र

मिसळभोक्ता गुरुवार, 09/10/2009 - 06:02
विकासचे प्रतिसाद मी वाचत नाही. एक तर चार ओळी पेक्षा मोठे प्रतिसाद मी वाचतच नाही. (कुणी लिहिला आहे ते बघून फक्त +१ म्हणतो.) दुसरे म्हणजे असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. विकासचे प्रतिसाद वाचण्याचे काम मी विकी ला आउटसोर्स केलेले आहे. -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 07:02
विकासचे प्रतिसाद वाचण्याचे काम मी विकी ला आउटसोर्स केलेले आहे.
हाहाहाहा मीही तेच करावे म्हणत आहे. वाचायला वेळ पुरत नाही तिथे इतके टंकायला कसा काय वेळ मिळतो ह्याचाच विचार करत होतो. असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. हे मात्र अगदी लाखमोलाचे बोललात.

In reply to by निमीत्त मात्र

विकास गुरुवार, 09/10/2009 - 07:57
बाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे तुम्ही जरी विनोद म्हणून लिहीले असले आणि त्याअर्थाने मी जरी हलके घेत असलो तरी डिसक्लेमर करावासा वाटला. लहान मुले भांडताना एकाचे मुद्दे संपतात आणि मग उत्तर देता आले नाही की तो म्हणतो, "तू वेडा आहेस" आणि मग वाद दुसरीकडेच भरकटतो. मी ब्रेन वॉशिंग करतो असे म्हणणे हा यातीलच एका अर्थी प्रकार वाटतो... मी माझा वरील प्रतिसाद हा संघाचा प्रचार करायला लिहीला नसून मूळ लेखातील तृटी आणी कमतरता दाखवण्यासाठी लिहीला होता. इतके दिवस गांधीचे मारेकरी असे बोंबलत त्यांच्या विरोधकांनी स्वतःचे (चुकीचे) शस्त्र बोथट केले, परीणामी आता जनतेला त्याचा काही फरक पडत नाही. याचा अर्थ सर्व स्वयंसेवक झाले अथवा संघाचे झाले असा नसून साम्यवादी आणि तथाकथीत समाजवादी यांची खरी प्रतिमा आता जनतेला समजून चुकू लागली आहे. मग आता बाकी कशावरून तरी झोडा असा हा प्रकार आहे. असे विचार पसरवणार्‍या संस्था/विचारवंत, काही न करता बोटे मोडत आणि कागाळ्या करत बसतात आणि वास्तवीक इतरांचे ब्रेनवॉशींग करण्याचा प्रयत्न करतात. केवळ संघाच्या संदर्भातच नाही तर एकूणच समाज, राष्ट्र, संस्कृती सगळ्याच्याच संदर्भात. जर तुम्हाला संस्कृती मान्य नसेल तर नसूंदेत पण इतरांना कशाला नावे ठेवता? बाकी संघावरील माझा मूळ प्रतिसाद (विनायक पाचलगच्या चर्चेतील) आपण वाचला असेलच. त्यातील फक्त शेवटचे वाक्य येथे "ब्रेन वॉशिंगच्या" संदर्भात सांगतो: "म्हणूनच संघावर टिका करत बसण्याऐवजी जसे हवे तसे, वाटते त्या विचारधारेचा आधार घेऊन आपण समाजाला परत काही देतो का, याचा विचार करायला हवा इतकेच म्हणावेसे वाटते." आणि तसे प्रामाणिक काम करणारे सर्व विचारधारेत असतात आणि त्यांना असल्या फुटकळ काड्या करायला वेळ नसतो. त्यांचे ब्रेन वॉश करायचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्याकडून तुम्हीआम्ही शिकण्यासारखे बरेच काही असते. आणि इतरांची अवस्था ही कच्च्या मडक्याप्रमाणे... ते ही उलटे ठेवलेले. आणि तुम्हाला माहीत असेलच की त्याला एक मराठीत चांगली म्हण आहे: पालथ्या घड्यावर पाणी!

In reply to by विकास

निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 08:13
विकास, सर्वप्रथम हलके घेतल्याबद्दल आभारी आहे.
मी ब्रेन वॉशिंग करतो असे म्हणणे हा यातीलच एका अर्थी प्रकार वाटतो...
हे मलाच वाटत नाही, तर इतर सदस्यांनाही वाटते. आणि हे एक निव्वळ निरिक्षण आहे. "तू वेडा आहेस'" असे मी कुठेही म्हंटलेले नाही. त्यामूळे तू दिलेले उदाहरण मला मान्य नाही.
बाकी संघावरील माझा मूळ प्रतिसाद (विनायक पाचलगच्या चर्चेतील) आपण वाचला असेलच.
नाही वाचला. मूळ लेखा पेक्षा प्रतिसादच मोठा असेल तर मी सहसा वाचायचे टाळतो. बुवा वितभर आणि दाढी हात भर असे होण्याची शक्यता असते.
आणि तसे प्रामाणिक काम करणारे सर्व विचारधारेत असतात आणि त्यांना असल्या फुटकळ काड्या करायला वेळ नसतो..
साम्यवादी सुडो सेक्युलर विचारसरणीतही असे लोक असतात का?

In reply to by निमीत्त मात्र

विकास गुरुवार, 09/10/2009 - 08:25
नाही वाचला. मूळ लेखा पेक्षा प्रतिसादच मोठा असेल तर मी सहसा वाचायचे टाळतो. बुवा वितभर आणि दाढी हात भर असे होण्याची शक्यता असते. छान! मिसळभोक्तांच्या छोट्या प्रतिसादाने पण तुमचे ब्रेन वॉशिंग होते तर... :-) साम्यवादी सुडो सेक्युलर विचारसरणीतही असे लोक असतात का? विचारसरणी सुडो नसते तीचा गैरवापर करणारे सुडो असतात. म्हणूनच कधी कधी "तथाकथीत" हिंदूत्ववादी असेही म्हणावे लागते. :-(

विजुभाऊ गुरुवार, 09/10/2009 - 09:51
रास्वस बद्दल काय लिहिणे अपेक्षीत आहे ? रास्वसं ची सफल झालेली उघड उद्दीष्ठ्ये.त्यांची ध्येय धोरणे नक्की काय आहेत. जर राजकीय अजेंडा नसेल तर सामाजीक अजेंडा कोणता या बद्दल माहिती हवी होती. त्याबाबत कोणीच फारसे लिहिले नाही. हे राष्ट्र हिंदुराष्ट्र व्हावे ही अपेक्षा कधीच शक्यतेत नव्हती. आजवरच्या इतिहासात भारतभूमी वर एकसंघ कोणाचेच कधीच राज्य नव्हते. हिंदु धर्म हा त्या अर्थाने कधीच आग्रही नव्हता. या भूमीवर बाहेरुन आलेले धर्म क्षणभर बाजूला ठेवुयात. पण जे धर्म याच भूमीत उमग पावले आहेत त्यांचे काय ? बौद्ध,जैन, पुष्टीमार्गीय वैष्णव , नागर , शिवधर्म हे स्वतःला हिंदु मानत नाहीत त्यांचे काय? या धर्माना पंथ म्हणता येणार नाहीत. शंकराचार्याना त्यांच्या वैदीक मताला विरोध करणारेही बरेच आहेत. असो..... या धाग्याचा हेतू संघ बदलत्या राजकीय/जागतीक परिस्थीत कसा बदलला आहे त्याची माहिती मिळावी त्यावर चर्चा व्हावी अशी आहे. त्याबद्दल कोणीच बोलत नाहीत. धाग्यात मांडलेले विचार कदाचित एकांगी असतील पण त्यावर वैचारीक प्रतिसाद कोणीच दिला नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते. मी सुद्धा एकेकाळी अभाविप चा कार्यकर्ता होतो. शाखेत ही जायचो. अभाविपसाठी कोपरा सभा घेतल्या आहेत. विद्यार्थीपरिषदेत असताना मला तेथे परिषदेचा संघाशी संबन्ध नाही असेच सांगण्यात यायचे पण कोणी जरा वेगळे मत मांडले की त्याला बाजूला काडले जायचे. तेथेही सम आर मोअर इक्वल हे जाणवण्याइतपत हा अनुभव मलाही आला होता. अंधश्रद्धेवर टीका केलेली चालायची नाही. "हिंदु मोरा भई हिंदु मोरा " या गाण्यात असणार्‍या "मार्कसिझम मतिमंदु" या ओळीचे एकाला स्पष्टीकरण विचारले होते. त्या दिवसापासून हा जणू कोणी छुपा हेर आहे असे वातावरण झाले होते. असो.... लोक हे संघटनेमुळे बांधले जातात. संघटना लोकमानस घडवते. एखाद्या संघटनेतले नेते जे बोलतात तेच त्या संघटनेचे विचार असतात असे लोक मानतात. माझ्या लिखाणात मी कोणाचीच बाजू घेतली नाही . मला फक्त माहिती हवी आहे आणि ती येथे कोणीच देत नाही. एवढे कट्टर स्वयंसेवक येथे आहेत निदान त्यानी तरी वैचारीक मतभेद बाजूला ठेवुन संघाच्या सध्याच्या ध्येयधोरणांबद्दल माहिती द्यावी ही विनन्ती. काँग्रेस किंवा इतर संघटना कशा आहेत यावर टीका करण्यापेक्षा जी संघटना साधनशुचितेवर विष्वास ठेवते त्या संघटनेच्या एकूणच धोरणात बदलत्या काळानुसार काय बदल झाले आहेत याची माहिती हवी होती. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/10/2009 - 10:22
धाग्यात मांडलेले विचार कदाचित एकांगी असतील पण त्यावर वैचारीक प्रतिसाद कोणीच दिला नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते.
विजुभाऊ, तुम्हीही मिभोकाकांच्या पावलावर पाऊल ठेवून विकासचे प्रतिसाद दुर्लक्षित केलेत का? अदिती

नाना बेरके गुरुवार, 09/10/2009 - 10:27
संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे. श्री. निमित्तमात्र १ फॅसिस्टची व्याख्या करता कां जरा ? म्हणजे निदान सगळ्यांना कळेल कि तुमच्या मते फॅसिस्ट कुणाला म्हणतात ? २. आणि संघामध्ये फॅसिझम कसा आहे, ते ही सांगा - उदाहरणासकट. ३. संघाचा हा जो काही 'हिडन अजेंडा' आहे तो तुम्ही कुठे वाचलात ? जर तसे तुमच्या विचारातून आलेले असेल तर त्या विचारांना काय 'बेस' आहे ते सांगा.

In reply to by नाना बेरके

बाळ्कोबा गुरुवार, 09/10/2009 - 10:43
ते बहुजन वगैरे मुद्दा पण तितका कळला नाही. पण ह्याच संदर्भात एक अतिशय चांगलं पुस्तक आहे. पुस्तक वर टिचका. शक्यतो मराठी मिळालं तर आवर्जून वाचा.

शाहरुख गुरुवार, 09/10/2009 - 10:44
उत्सुकतेपोटी संघाची वेबसाईट बघितली.तेथून... Who can become a member of RSS? Any Hindu male can become member of RSS. संघाने त्यांचे हे धोरण बदलले पाहिजे असे माझे बिलकूल म्हणणं नाहीय.. फक्त मला हे विशेष वाटल्याने (आणि आधी माहित नसल्याने) इथे सांगतोय.

In reply to by शाहरुख

निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 17:39
Any Hindu male can become member of RSS. अहो मुळात इथेच गोची आहे ना! हिंदू म्हणजे कोण? ह्याचीच व्याख्या कुणाला माहित नाही. नाना बेरके म्हणतात भारतातले सगळे हिंदू (मिरजेतली दंगल दोन हिंदू गटांमध्येच काय हो नाना?).. विकास म्हणतो सगळे अमेरिकेतले हिंदू्. ..यशोधरा म्हणते व्याख्याच कशाला हवी? थोडक्यात सोयीप्रमाणे कुणीही हिंदू म्हणवला जाऊ शकतो/ अपात्र ठरवला जाऊ शकतो.

नाना बेरके गुरुवार, 09/10/2009 - 11:04
अभ्यंकर संघ पुरुषांकरीताच आहे. महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती आहे. दुसरे म्हणजे " हिंदूची व्याख्या अशी आहे कि, हिंदुस्थानात जो राहतो तो हिंदू " मग त्यात भारतातले मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर सगळे येतात.

In reply to by निमीत्त मात्र

विकास गुरुवार, 09/10/2009 - 19:12
आणि मग अमेरिकेत राहतो तो? विकास हिंदू नाही का? काय तुमची व्याख्या.. हा मुद्दा येथे स्पष्ट करण्यासाठी अवांतर आहे. मधे तुम्ही चर्चा चालू केली होती तेंव्हा लिहायला आवडले असते पण वेळेअभावी त्यात लिहू शकलो नाही. खालील स्पष्टीकरण केवळ वरील वाक्याशी मर्यादीत आहे. भारतात जन्माला आलेला आणि भारतास पितृभू/मातृभू पुण्यभू मानणारा हिंदू अशी सावरकरांनी हिंदू या शब्दाची आणि पर्यायाने हिंदूत्वाला जन्म देणारी व्याख्या केली. कधी काळी परकीयांनी या देशातील जनतेस "हिंदू" हे नाव दिले कालांतराने ते येथील संस्कृतीत मिळून गेले नंतर इस्लामीक आक्रमणांपासून त्याला धार्मिक छटा आली. ब्रिटीशांनी तो एक त्यांच्या व्याख्येतील धर्म, म्हणजे इंग्रजीतील रीलीजन आणि मराठीतील संप्रदाय करून टाकले. त्यातील जन्माने आपण सर्वच भारतीय आहोत (आणि अमेरिकेत असलो तरी अजूनही मी भारतीय नागरीकच आहे :) ) म्हणून त्या अर्थाने हिंदू. जे भारताबाहेर राहूनही भारतीय वंशाचे आहेत, तसे स्वतःला मानतात आणि राष्ट्राने इतर देशाशी समरस झाले असले तरी भारतातील संस्कृती जपतात- त्या अर्थे पुण्यभू मानतात, ते देखील हिंदूच. त्या अर्थाने अमेरिका अजून नवीन आहे, पण अनेक पिढ्या असलेले द. अफ्रिका, कॅरीबिअन्स, ब्रिटन मधील अनेक जण हे सांस्कृतिक दृष्ट्या हिंदू आहेत - स्वतःच्या आचरणातून आणि इतरांच्या नजरेतून... माझ्या "आपण सारे हिंदू" या न्यूजवीक मधील मूळ लेखाच्या चर्चेवरून आपण वर लिहीले आहे. त्यात म्हणलेले "तत्वज्ञानाने" हिंदू झालेली नवीन अ-भारतीय वंशाची माणसे येतात. असा प्रकार केवळ "एक पुस्तक, एक प्रेषित" असा प्रकार नसलेल्या हिंदू धर्मातच होऊ शकतो कारण तो एका अर्थाने एका भूभागाशी संलग्न आहे आणि तरी देखील त्याचे तत्वज्ञान हे वैश्विक आहे. असो.

In reply to by विकास

निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 19:31
भारतात जन्माला आलेला आणि भारतास पितृभू/मातृभू पुण्यभू मानणारा हिंदू अशी सावरकरांनी हिंदू या शब्दाची आणि पर्यायाने हिंदूत्वाला जन्म देणारी व्याख्या केली
. भारतात जन्माला आलेला म्हणजे नक्की काय? सध्या ज्याला आपण भारत असे म्हणतो तो १९४७ साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी अफगाणिस्तान पासून ते ब्रह्मदेशापर्यंत भारतच होता असे काही लोकांचे म्हणणे आहे. म्हणजे १९४७ पूर्वी जन्मलेल्या माणसाने हिंदू असण्यासाठी नक्की कोणत्या भूभागावर जन्म घेतलेला असला पाहिजे? भारत पाकिस्तान असे तुकडे स्वातंत्र्या नंतर झाले, त्यापूर्वी पाकिस्तानात जन्म घेतलेले सगळे हिंदूच काय?
जे भारताबाहेर राहूनही भारतीय वंशाचे आहेत, तसे स्वतःला मानतात आणि राष्ट्राने इतर देशाशी समरस झाले असले तरी भारतातील संस्कृती जपतात- त्या अर्थे पुण्यभू मानतात, ते देखील हिंदूच.
भारतीय संस्कृती जपण्याचे निकष काय आहेत? वर्षभरातून एकदा इंडीयन असोशिअन मधे जाऊन इंडीयन फूड हादडले म्हणजे भारताबाहेर राहूनही संस्कृती जपतात असे म्हणावे का? भारतीय संस्कृती जपणारे (म्हणजे नेमके काय ते स्पष्ट नसल्याने, मी केलेल्या व्याख्येने जपणारे) परंतू ख्रिश्चन बनलेले काही भारतीय मी पाहिले आहेत, ते ही हिंदूच का? बॉबी जिंदाल हिंदू आहे का? आणि शेवटी.. वरील व्याख्येप्रमाणे..मिरजेतील दंगल ही हिंदूंच्या दोन गटातीलच का? तूर्तास ह्या प्रश्नांची उत्तरे कृपया द्यावीत..

In reply to by निमीत्त मात्र

विकास गुरुवार, 09/10/2009 - 20:06
भारतात जन्माला आलेला म्हणजे नक्की काय? ... भारत पाकिस्तान असे तुकडे स्वातंत्र्या नंतर झाले, त्यापूर्वी पाकिस्तानात जन्म घेतलेले सगळे हिंदूच काय? माझा प्रतिसाद नीट वाचलात तर समजेल. परत तेच (कारण उत्तर वेगळे असूच शकत नाही) फक्त वेगळ्या शब्दात: हिंदू हा शब्द भौगोलीक, धार्मिक आणि तत्वज्ञान या अर्थाने वापरला जातो. म्हणून भौगोलीक अर्थाने पाकीस्तानात जन्मलेले सगळे हिंदूच होते. माझे काय घेऊन बसता? ते बिचारे आम्ही पाक (शुद्ध) आणि इस्लामीक स्टेट वगैरे म्हणत जगभर ओरड करतात पण त्यांना आज देखील मध्यपुर्वेतील (मूळचे) मुस्लीम त्यांना आजही समान वागणूक देत नाहीत. कारण कधीकाळचे ते हिंदू होते... भौगोलीक भारताशी नाते टिकवणे - त्यात व्यक्तीगत नात्याशिवाय, समाजकार्याला मदत करणे इत्यादी पण गृहीत धरले आहे. जेंव्हा २६ नोव्हेंबर नंतर धर्माचे बंधन न मानता सर्व भारतीय एकत्र येऊन निषेध करतात, त्सुनामी सारख्या आपत्तीनंतर मोकळ्या हाताने मदत करतात तेंव्हा ते सर्व भौगोलीक दृष्ट्या हिंदूच आहेत. भारतीय संस्कृती जपण्याचे निकष काय आहेत? वर्षभरातून एकदा इंडीयन असोशिअन मधे जाऊन इंडीयन फूड हादडले म्हणजे भारताबाहेर राहूनही संस्कृती जपतात असे म्हणावे का? भारतीय संस्कृती जपणारे म्हणजे माझ्या लेखी: जे तत्वज्ञान, (चांगले/आदर्श)आचार-विचार, भाषा वगैरे सर्व काही आले, जे भारतीय उपखंडातून तयार झाले आहेत ते जपणारे/आचरणारे कुणीही हिंदूच आहेत. मग त्यांचा संप्रदाय या अर्थाने काही असोत. म्हणूनच जेंव्हा दंगली होतात तेंव्हा त्यांना सांप्रदायीक दंगली असे अथवा जातीय दंगली असे बहुतांशी वेळेस म्हणले जाते. तुम्ही कुठे राहता आणि काय करता हे माहीत नाही, पण, "वर्षभरातून एकदा इंडीयन असोशिअन मधे जाऊन इंडीयन फूड हादडले म्हणजे भारताबाहेर राहूनही संस्कृती जपतात असे म्हणावे का?" असे म्हणणे म्हणजे (for lack of any better word) पूर्ण अज्ञान आहे. चला! म्हणजे तुमच्या दृष्टीने संघ म्हणजे लष्करे तोयबा आणि अनिवासी भारतीय म्हणजे फक्त "इंडीयन फूड हादडणारे". या दोन गोष्टीतून कुठलाही अभ्यास न करता केवळ ठणाणा करत बसणे आणि त्यालाच मत आहे असे म्हणणे चालू आहे. तरी बरं, बाकी सगळे लांब राहूंदेत, गांधीजी पण २१ वर्षे अनिवासी भारतीय आणि स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेणारे होते, इतका इतिहास तरी माहीत असावा अशी अपेक्षा आहे. भारतीय संस्कृती जपणारे (म्हणजे नेमके काय ते स्पष्ट नसल्याने, मी केलेल्या व्याख्येने जपणारे) परंतू ख्रिश्चन बनलेले काही भारतीय मी पाहिले आहेत, ते ही हिंदूच का? बॉबी जिंदाल हिंदू आहे का? हो त्या अर्थाने ते हिंदूच आहेत. माझे विविधधर्मीय भारतीय जवळून ओळखीचे आहेत (भारतात आणि अमेरिकेत) जे या अर्थाने हिंदूच आहेत. असे संप्रदायाने ख्रिश्चन आणि मुसलमान माझ्या जवळून ओळखीचे आहेत जे देवधर्माच्या बाबतीत हिंदूपद्धती जपत नाहीत पण बाकी जेंव्हा भाषा, सामाजीक बांधिलकी, देशाशी प्रेम आदी येते तेंव्हा भारतीत संस्कृती जपत असतात. म्हणून ते सांस्कृतीक दृष्ट्या ते हिंदूच असतात. बॉबी जिंदाल यांनी कारणे काही सांगितली तरी राजकीय महत्वाकांक्षेपोटी धर्मांतर केले आहे. त्यांचे आई-वडील हे हिंदूच आहेत आहेत आणि (ऐकीव माहीती प्रमाणे) घरातील वातावरण पण भारतीयच / हिंदूच आहे. ------------- मूळ विषयाशी अवांतर होत असल्याने, तसेच जास्त प्रतिसाद झाल्याने ट्रॅक करणे अवघड होत असल्याने या विषयावर अधिक चर्चा करायची असेल तर कृपया खरड करा ही विनंती.

In reply to by विकास

निमीत्त मात्र गुरुवार, 09/10/2009 - 20:13
मूळ विषयाशी अवांतर होत असल्याने, तसेच जास्त प्रतिसाद झाल्याने ट्रॅक करणे अवघड होत असल्याने या विषयावर अधिक चर्चा करायची असेल तर कृपया खरड करा ही विनंती
ठीक आहे. प्रतिसादात अनेक मुद्दे अनुत्तरीत असले आणि बाकीचे मुद्दे भरकटवणारे असले तरी त्याचा उहापोह इथे नको. पण खरडवही पेक्षा...हाच प्रतिसाद 'हिंदू कोण?' ह्या मी सुरू केलेल्या चर्चेत हलवलात तर तिथे अधिक चर्चा करता येईल आणि सर्व मिपाकरांना त्यात सामील होता येईल.

In reply to by विकास

शाहरुख Fri, 09/11/2009 - 08:26
मी भागवतांच्या जागी असतो आणि मला जर कुणाही भारतीयाने संघात यावे असे वाटत असते तर मी "Any Indian can become member of RSS" असे लिहिले असते. मग हिंदुत्वाची कोणीही कशीही काहीही व्याख्या करो....

JAGOMOHANPYARE गुरुवार, 09/10/2009 - 11:51
सन्घाची समाजसेवा........ :) [edit] Allegations by Leftist groups and rejection of charges by UK Charity commissioner A group by name "Campaign to Stop Funding Hate" (SFH), a front for the Forum of Indian Leftists (FOIL)[89] , had accused that affiliates of the RSS had raised millions of dollars for 'relief and development work' in India and that the funds had been misused and channeled to many RSS activities, allegedly through a US based organization called the "India Development and Relief Fund" (IDRF)and other organisations[90]. The IDRF responded to these charges as "untenable and made by communist activists"[91]. The charges were investigated by the UK Charity Commissioner who after the investigations, expressed "satisfaction" at the handling of the funds by the Sangh. The Commission said that its investigations showed that all the money collected and spent could be accounted for and that "trustees have taken sufficient steps to ensure that funds have been applied in accordance with the appeal." It rejected allegations of misuse of funds[92]. [edit] Defamation case against journalist for false allegations On January 15 2000, a daily, 'The Statesman' carried a story about the RSS by A G Noorani, which depicted the RSS as the killer of Gandhi[93]. Subsequently the Delhi unit of the RSS filed a criminal case of defamation against author of the article A G Noorani along with the cartoonist and the Managing Director of the publishing house. When two of the accused did not respond to the Court summons, non-bailable warrants were issued in their name by the Court[14]. On February 25,2002, Noorani wrote an unconditional apology to the court in which he regretted writing the defamatory article against the RSS. On March 3, 2002, 'The Statesman' also published an apology regretting the publication of the said article.[94 सन्दर्भ : http://en.wikipedia.org/wiki/Rashtriya_Swayamsevak_Sangh

दत्ता काळे गुरुवार, 09/10/2009 - 18:06
कुठल्याही विवाद्य गोष्टींमध्ये " संघाचा हात आहे " असे समीकरण अनेक वर्षांपासून मांडले जात आहे. त्यात कितपत तथ्य असते ते कुणास ठाऊक, पण त्यामुळे मने / मते बिघडवणारी चर्चा थांबते. संघाने असल्या गोष्टीना कधी भीकच घातली नाही. कारण 'संघाचा तथाकथित हात असणे' कधीही, कुठेही सिध्द झालेले नाही. संघाबद्दलच्या ह्या तिखटजाल चर्चेमध्येसुध्दा संघाचाच हात असावा असे ( परंपरेनुसार ) विधान करणे सहज शक्य आहे. ते केले म्हणजे कदाचित चर्चा थांबेल.

अनाडि गुरुवार, 09/10/2009 - 22:44
विकास शेठ तुम्हारा पुरा प्रतिसादच चुक्याच. तुम कायकु इदर गीता पढ रहेला है? अनाडि. ब्दुल नारायण डिसुझा.

In reply to by अनाडि

विकास गुरुवार, 09/10/2009 - 22:56
तुमचे (मिपा) नाव हे आमचे विशेषण असावे म्हणून असे झाले असावे! :-) बाकी संपुर्ण नाव एकदम मस्त आहे.

vidulatai Fri, 09/11/2009 - 10:39
नमस्कार , फारच सुन्दर लेख . योगायोगाने मला देखील सन्घाबद्द्ल काही दिवस आधी विशेष माहिती मिलाली .दुर्दैवाने चान्गली बाजु कधी समोर येत नाही .सदर लेखाबद्दल अभिनन्दन !!!!

आशु जोग Wed, 04/17/2013 - 12:19
विजुभाऊ यांनी महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. उद्याच्या लोकसभा निवडणूकीत काय होइल. दिल्ली अभी एक साल दूर है. पण यंग आणि डायनॅमिक मनमोहनसिंग यांनी 'बचेंगे तो और भी लढेंगे' म्हटले आहे. असो भाजप बाबत म्हणाल तर ते कुणालाही आपलसं करु शकतात. रेखाताई पुरुषोत्तम खेडेकर किंवा कलमाडींनाही पाठिंबा देऊ शकतात. ते फार व्यापक आणि मनाने उदार लोक आहेत. कलमाडींना पाठिंबा दिला होता तेव्हा यांचे कलमाडीप्रेम उतू जात होते. पुणेकर याबाबत अधिक सांगू शकतील !

श्रीगुरुजी Wed, 04/17/2013 - 12:43
>>> कलमाडींना पाठिंबा दिला होता तेव्हा यांचे कलमाडीप्रेम उतू जात होते. शरद पवारांशी झालेल्या मतभेदांमुळे कलमाडीला १९९७ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. १९९७ मध्ये गुजराल सरकारच पाठिंबा काँग्रेसने काढून घेतल्यावर कलमाडीने काँग्रेसचे तब्बल ४० खासदार आपल्या बाजूला जमवून वाजपेयींचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पक्षांतरबंदी कायदा व २७३ चा आकडा गाठण्यासाठी अजून काही खासदार कमी पडल्याने तो प्रयत्न फसला. नंतर मार्च १९९८ मधल्या लोकसभा निवडणुकीत कलमाडीने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. सरकार स्थापन करण्याचे भाजपचे प्रयत्न १९९६ मध्ये फसले होते कारण खासदारांची संख्या कमी होती. आपल्याला पाठिंबा देणार्‍या खासदारांची संख्या वाढावी म्हणून स्थानिक भाजप नेत्यांचा व संघाचा विरोध असतानासुद्धा वाजपेयींनी पुण्यातून भाजप उमेदवार न देता कलमाडीला पाठिंबा दिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

आशु जोग Wed, 04/17/2013 - 16:59
गुरुजी > कलमाडीने काँग्रेसचे तब्बल ४० खासदार आपल्या बाजूला जमवून वाजपेयींचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता या गोष्टी खर्‍या समजता आपण आम्ही ४० नव्हे ६० खासदार ऐकले होते जबाबदार लोकांकडून

In reply to by आशु जोग

श्रीगुरुजी Wed, 04/17/2013 - 17:24
कलमाडीला फक्त वाजपेयींच्या आग्रहामुळे पाठिंबा दिला गेला. भाजपचे स्थानिक नेते, शिवसेना व संघाचा कलमाडीला स्पष्ट विरोध होता. एका सभेत बोलताना बाळासाहेब ठाकर्‍यांनी कलमाडीविषयी बोलताना त्याला बेडकाची उपमा देऊन बेडकाप्रमाणे हा टुणकन उडी मारून काँग्रेसमध्ये परत जाईल हे भाकीत वर्तविले होते जे वर्षभरातच खरे झाले. मे १९९९ मध्ये शरद पवारांना काँग्रेसने काढून टाकल्यावर लगेचच कलमाडी स्वगृही परतला. स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे स्थानिक नेत्यांनी अविनाश धर्माधिकारींना अपक्ष म्हणून उभे केले होते व त्यांना ३५ हजाराहून अधिक मते मिळाली होती. ही सर्व मते कलमाडीची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती.

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण Wed, 04/17/2013 - 21:30
ही सर्व मते कलमाडीची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती.
३५००० मते ही कलमाडींची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती हो. बाकीच्या संघ कार्यकर्त्यांना कलमाडींची उमेदवारी आवडली असावी. नाही का? सत्ताप्राप्तीसारख्या मोठ्या ध्येयासाठी विचारसरणीचा त्याग हा एवढा मोठा गुन्हा नाही. ;)

In reply to by पिंपातला उंदीर

श्रीगुरुजी गुरुवार, 04/18/2013 - 13:17
>>> गुरुजींच्या कलमाडी प्रतिसादा वरुन भाजप हा संघपरिवारचा बॅड बॉय आहे हे पुन्हा अधोरेखित होत आहे का ; ) ते कसे काय बुवा?

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी गुरुवार, 04/18/2013 - 12:59
>>> बाकीच्या संघ कार्यकर्त्यांना कलमाडींची उमेदवारी आवडली असावी. नाही का? सत्ताप्राप्तीसारख्या मोठ्या ध्येयासाठी विचारसरणीचा त्याग हा एवढा मोठा गुन्हा नाही. नाही. बाकीच्यांनी मतदान केलेच नाही.

आशु जोग Wed, 04/17/2013 - 20:45
गुरुजी डू नॉट मेक राँग अ‍ॅजंप्शन्स एवढच म्हणेन

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण गुरुवार, 04/18/2013 - 21:09
तुमच्या प्रतिसादात हे अध्याहृत आहे की भाजपा आणि संघपरिवार हे एकमेकांशी संबंधित आहेत. हे मिपावर आम्ही जे काही शिकलो आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मिपावरील माहितीनुसार मुळात भाजपा आणि संघपरिवार या अगदी वेगळ्या संघटना असून अटलबिहारी वाजपेयी यांची भाजपाकडून पंतप्रधानपदासाठी झालेली निवड व त्यांचे सरकार टिकवण्यासाठी कलमाडींनी केलेले प्रयत्न याच्याशी संघपरिवाराचा काही संबंध असू शकत नाही. पुण्यात अधिकृत भाजपा उमेदवाराऐवजी कलमाडींना पाठिंबा दिल्याने संघस्वयंसेवकांना काही फरक पडू नये कारण संघ व भाजपा हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुमचा मुद्दा रॉंग आहे. आता संघ व भाजपा वेगवेगळे आहेत मात्र संघस्वयंसेवक व भाजपा कार्यकर्ते एकच असू शकतात असा काहीसा युक्तिवाद तुम्हाला करता येईल.

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Fri, 04/19/2013 - 14:24
>>> कारण संघ व भाजपा हे वेगवेगळे आहेत. नक्कीच. संघ अराजकीय संघटना आहे तर भाजप राजकीय पक्ष आहे. संघाचा स्वतःचा अजेंडा आहे व स्वतःची विचारसरणी आहे. भाजपचा स्वतःचा अजेंडा आहे व भाजपची स्वतःची विचारसरणी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Sat, 04/20/2013 - 01:21
संघाचा स्वतःचा अजेंडा आहे व स्वतःची विचारसरणी आहे. भाजपचा स्वतःचा अजेंडा आहे व भाजपची स्वतःची विचारसरणी आहे.
धन्यवाद. थोडेथोडे कळत आहे. कदाचित या विचारसरणी व अजेंडे योगायोगाने सारखे असल्याने काँग्रेसपुरस्कृत मीडियामुळे आमचा गैरसमज होत आहे. मिपावरील स्पष्टीकरणांमुळे हे गैरसमज दूर होतात ही मोठीच मिळकत आहे.

आशु जोग गुरुवार, 04/18/2013 - 18:30
>> भाजप हा संघपरिवारचा बॅड बॉय आहे बाकी भाजप माहीत नाही पण पुण्यापुरते म्हणायचे तर ते मनाने अतिशय उदार असल्याने कुणालाही आपलेसे करु शकतात. बा द वे साठ खासदार एकत्र केले होते(?) अहो ५४ खासदारवाले देवीगौडा पंतप्रधान होतात मग साठ खासदारवाला स्वतःच पी एम झाला नसता का आज पवारसाहेबांच्या पक्षाचा आकडा ११ च्या वर जात नाही तेव्हा ६० खासदार यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. भर सभेत अटलजींच्या तोंडून सुरुवातीला कलमाडी नव्हे तर धर्माधिकारींचे नाव बाहेर पडते आणि सगळी खेळी उघडी पडते. त्या वेळचे काही युक्तिवाद पहा १. स्वतःच्या मुलावर काय कुणीही प्रेम करेल ? दुसर्‍याच्या मुलावर प्रेम करायला मोठं मन लागतं २. आपद्धर्म आहे ३. घराला आग लागली आहे शुद्ध पाण्याचा आग्रह कशाला ? गटारातील पाणीही चालेल. या सगळ्या आत्मघातकी प्रचाराचा उलटा परीणाम झाला त्यात धर्माधिकारींनी चालवलेली मोहीम. अनेकांनी त्यांना मत दिले नाही तरी कुठला उमेदवार नको हे त्यांच्यामुळे मनाशी स्पष्ट झाले आणि मग नकोशा उमेदवाराला कोण पाडू शकेल त्याच्या पारड्यात मत टाकले गेले नव्वद हजाराने पराभव झाला तेव्हा या लोकांचा आनंद गगनात मावेना.

In reply to by आशु जोग

श्रीगुरुजी Fri, 04/19/2013 - 14:29
>>> साठ खासदार एकत्र केले होते(?) अहो ५४ खासदारवाले देवीगौडा पंतप्रधान होतात मग साठ खासदारवाला स्वतःच पी एम झाला नसता का देवेगौडाला २७३ पेक्षा अधिक खासदारांनी पाठिंबा दिला होता. साठवाल्याला तितका पाठिंबा मिळविता आला असता तर तो पंतप्रधान झाला असता. >>> आज पवारसाहेबांच्या पक्षाचा आकडा ११ च्या वर जात नाही तेव्हा ६० खासदार यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मग नका ठेवू विश्वास. >>> त्या वेळचे काही युक्तिवाद पहा १. स्वतःच्या मुलावर काय कुणीही प्रेम करेल ? दुसर्‍याच्या मुलावर प्रेम करायला मोठं मन लागतं २. आपद्धर्म आहे ३. घराला आग लागली आहे शुद्ध पाण्याचा आग्रह कशाला ? गटारातील पाणीही चालेल. हे कोण व कधी बोलले याची कल्पना नाही. पण यातले क्र. (३) वाक्य वाचून चर्चिलच्या खालील वाक्याची आठवण आली. "हिटलरचा नाश करायला मला सैतानाची मदत सुद्धा चालेल"

हा धागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी असल्यामुळे पुरुष विभागात आहे असं समजावं का? तसं असेल तर इथे प्रतिसाद लिहू दिल्याबद्दल धागालेखक श्री. विजुभाऊ आणि अन्य पुरुष आयडींचे मी आभार मानते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आशु जोग Fri, 04/19/2013 - 08:50
When you get in to the fight with pig , it is the pig who enjoys.. you only get dirty ! असा प्रसाद या धाग्यावर तुम्हाला मिळाला होता. त्याला तुम्ही उत्तर दिलं नव्हतत. नेहमीप्रमाणे लिहिताना तुम्ही लाइन ऑफ कंट्रोल क्रॉस करण्यापूर्वीच सागून ठेवतो. बाकी आपली मर्जी...

In reply to by आशु जोग

When you get in to the fight with pig , it is the pig who enjoys.. you only get dirty !
सल्ल्याचं तंतोतंत पालन केलेलं होतंच की!
त्याला तुम्ही उत्तर दिलं नव्हतत.
त्यातून आमच्या भागात गेली दोन वर्ष दुष्काळ सुरू आहे. "पाणी वाचवा" असं स्थानिक सरकार वारंवार विनवून सांगतं आहे, तर कुठे डुकरांशी मस्ती करून घाण व्हायचं आणि पुन्हा शुचितेखातर पाणी वाया घालवायचं? म्हणून उत्तर दिलं नाही. बाकी माझं खर्र खर्र प्रेम आहे हो तुमच्यावर. आय लौ यू! त्या प्रेमाला कधी प्रतिसाद देणार?

In reply to by आशु जोग

तुम इतना जो मुस्करा रहे हो...
तुम्ही एवढ्या प्रेमाने विचारतंय. माझ्या डोळ्यात बै टचकन पाणीच आलं हे वाचून. कुण्णी, कुण्णी मला कधी एवढ्या आपुलकीने विचारलं नव्हतं हो आत्तापर्यंत. प्रेमाला असा प्रतिसाद दिला की किती भरून येतं यावर मी तर बै एक कविताच लिहीणार आहे.

आशु जोग Fri, 04/19/2013 - 09:02
> मी लिहिले त्यात नक्की कोणते असम्पशन आहे आणि, असल्यास, त्यातले कोणते राँग आहे? श्रीगुरुजी कुणीतरी स्थानिक पातळीवर कलमाडींशी समेट केला. त्यासाठी अटलजींचे नाव वापरले आणि साठ खासदार इ. गोष्टी सांगितल्या या त्या गोष्टी

In reply to by आशु जोग

श्रीगुरुजी Fri, 04/19/2013 - 14:21
>>> कुणीतरी स्थानिक पातळीवर कलमाडींशी समेट केला. त्यासाठी अटलजींचे नाव वापरले आणि साठ खासदार इ. गोष्टी सांगितल्या यात असम्प्शन कोणते आहे व असल्यास त्यात काय राँग आहे?

आशु जोग Fri, 04/19/2013 - 18:29
श्रीगुरुजी > यात असम्प्शन कोणते आहे व असल्यास त्यात काय राँग आहे ? यात केवळ माझे अंदाज नव्हे प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. पुन्हा वाचा म्हणजे कळेल > "हिटलरचा नाश करायला मला सैतानाची मदत सुद्धा चालेल" धिस इज नॉट अ‍ॅप्लिकेबल हियर ना ! बा द वे तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी ऐकीव दिसताहेत हे उघड आहे

बंडा मामा Sat, 04/20/2013 - 17:07
रास्वस हा कायमच स्फोटक विषय आहे. इतके समाजकार्य, शिस्तपालनाची आवड, संघटन वगैरे अनेक चांगल्या बाबींचा एककल्ली विचारसरणीने केलेला चुथडा म्हणजे रास्वसं. मुसलमान द्वेष, गुजरात दंगलीच्यावेळी मतदार याद्या वापरुन मुसलमानांची घरे शोधण्याचा केलेला घॄणास्पद वापर, ओरिसातल्या ख्रिश्चनांविरुद्ध केलेल्या दंगली , हिटलर सारख्या लोकांचे आदर्श आणि त्यायोगे येणारे हिंसेचे आकर्षण इ.इ. अनेक गोष्टी शाखा/संघ इत्यादींपासुन दूर रहाणेच चांगले मानायला लावतात.

In reply to by कवितानागेश

पिशी अबोली Fri, 04/26/2013 - 17:36
+१०००० घोर अज्ञान.. मी राष्ट्र सेविका समितीची लहानपणापासून सेविका आहे. आणि भाऊ आणि बाबांबरोबर संघाच्या शाखेवर लहानपणी गेले आहे. बाकी एवढे अज्ञान पाजळणार्‍यांनी संघाबद्दल कितीही तारे तोडले तरी संघाला काही फरक पडत नाही. कुणा चार-पाच विचारवंत म्हणवणार्‍यांची मते वाचून संघाबद्दल खूप काही माहीत असल्याचा आव आणणार्‍यांची कीव येते.

In reply to by पिशी अबोली

मग तुमच्यासाठी मला कधीचे पडलेले प्रश्न आहेत: १. राष्ट्रसेविका समितीचं नक्की काम काय? (ओन्व्हलोप, गोळाबेरीज माहिती आहे ... धर्म, संस्कृती रक्षण वगैरे. मला थोडे तपशील हवे आहेत.) २. सेविकांना भाजपमधे कितपत रस असतो? समितीमधे भेटल्यावर सेविका राजकारणाबद्दल चर्चा करतात का? ३. समिती कितपत स्त्रीवादी आहे? आधुनिक स्त्रीवादी मूल्यांसंदर्भात समितीची (आणि/किंवा सेविकांची) मतं कुठे वाचायला मिळतील? ४. समितीची एक आदर्श झाशीची राणी आहे असं त्यांच्या संस्थळावर लिहीलेलं आहे. ती पारंपरिक लिंगसंकल्पना मोडून काढणारी होती. तिचे यजमान साड्या गुंडाळत, पाळी आल्यासारखं महिन्यातले चार दिवस बाजूला बसत आणि राणी मात्र पुरुषी कपडे घालून तलवारबाजी करत असे. तिचा उल्लेख ह्यू रोजनेसुद्धा '१८५७ च्या युद्धातला एकमेव मर्द' असा (काहीसा अतिशयोक्तपूर्ण असला तरी) पुरुषी समजले जाणारे गुण (लढाई, नेतृत्त्व) दाखवणारी असा केला आहे. (लैंगिकतेचं असं दर्शन परदेशी लोकांना चक्रावणारं होतं.) अशा प्रकारचे गुण वाढीस लागावेत, स्त्रियांना संधी मिळाव्यात अशा प्रकारचं काही काम समितीमधे होतं का? ५. समिती आणि संघाचं कितपत इंटरॅक्शन आहे. त्यांचं काम परस्परपूरक असं असतं का? असल्यास त्याचे तपशील? ६. समितीशी संबंधित इतर काही माहिती तुम्हाला द्यावीशी वाटली तर ती ही द्याल का? इथे अवांतर वाटत असेल तर वेगळा धागा किंवा व्यनी/खरडीतून कळवलंत तरी चालेल. या आणि अशा प्रश्नांची उत्तरं समितीच्या संस्थळावर आणि विकीपानावरही मिळाली नाहीत. असे प्रश्न पडल्यापासून भारताबाहेर असल्यामुळे प्रत्यक्ष समितीत जाऊन माहिती मिळवणंही जमणें नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पिशी अबोली Sat, 04/27/2013 - 00:33
जमेल तेवढा प्रयत्न करते. १. राष्ट्र सेविका समितीचं काम संघाच्या धर्तीवर चालतं. पूर्,भूकंप अशा ठिकाणी मदतकार्य तर बरंच चालतं. पण स्त्रियांचे काही वेगळे प्रश्न असतात. अशा ठिकाणी सेविका आवर्जून काम करतात. याव्यतिरिक्त अनेक सेवाकार्ये समितीत होतात. हे मोठ्या पातळीवरचं काम झालं. आमच्या शाखेने छोट्या पातळीवर केलेले काही प्रयत्न म्हणजे झोपडपट्टीतील मुलींसाठी शाखा लावणे. रोजच्या किचकिचाटातून दूर होऊन शाखेत येण्यासाठी त्या मुली खूप उत्सुक असायच्या. सगळ्या मुलींसोबत राहिल्याने,चर्चा केल्याने त्यांच्यात खूप फरक पडला. तसेच शाखेवरच्या आम्हा अन्य मुलींनाही त्यांच्याकडून काही ना काही शिकता आले. दुसरा प्रयत्न कॉलेज तरुणींचं साप्ताहिक मेलन. या मुलींचा संघाशी काही संबंध नव्ह्ता. पण शाखेपूर्वीच्या तासाभराच्या भेटीत एखादा सामाजिक विषय घेऊन त्यावर चर्चा व्हायच्या. हे असे अनेक छोटे छोटे उपक्रम समितीच्या शाखांवर चालतात. मुलींनी नेहमीच्या जगातून बाहेर पडून सामाजिक भान जपावं अशी एक गोष्ट यातून नक्कीच साधली जाते. २. भाजप आणि संघपरिवार या स्वतंत्र गोष्टी आहेत. माझ्या लहानपणापासून मी अनेक पक्षातील महिलांना समितीत येताना पाहिलं आहे. समितीचे उद्दिष्ट राजकारण नसून समाजकारण आहे. अर्थात राजकारणाविषयी भान आणि जागरुकता सेविकांना नक्कीच असते. ३ व ४ याचं उत्तर एकत्र द्यायचा प्रयत्न करते. समिती तीन स्त्रियांना आदर्श मानते. जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई व देवी अहिल्याबाई होळकर. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व असे हे तीन आदर्श आहेत. आधुनिक राहूनही हे तिन्ही आदर्श जपता येऊ शकतात असं माझं स्वतःचं मत आहे. बाकी मते वाचण्यासाठीचे जमतील तसे संदर्भ मी व्यनी/खरडीतून कळवेन. 'स्त्रियांना संधी' म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे ते मला नीटसं कळलेलं नाही. जे कळलं त्याला उत्तर देते. समितीच्या शिबिरांमधे कराटे,लाठी इ.सहजपणे उपलब्ध असलेल्या शस्त्रांचा व पद्धतींचा वापर शिकवला जातो. अचानक आलेल्या संकटांना तोंड कसं द्यावं याची तयारीही काही पद्धतींनी,काही प्रमाणात करून घेतली जाते. सकाळी हे प्रशिक्षण, संध्याकाळी मैदानी खेळ व मधल्या वेळात चर्चा, बौद्धिक इ. असा साधारण साचा असतो. स्वसंरक्षणाची शारीरिक तसेच मानसिक तयारी शाखेवरही करुन घेतली जाते. ५.समिती आणि संघाचं काम समांतर चालतं. समिती संघाचा भाग नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे मदतकार्य इ.करताना परस्परपूरक काम आपोआप होतं. ६.

In reply to by पिशी अबोली

प्रतिसाद मोठा दिसला तरी अजून थोडेसेच प्रश्न आहेत: समितीच्या साधारण किती सदस्या/सेविका आहेत? (अंदाजे आकडा असेल तरी चालेल. म्हणजे दोन लाख, दीड कोटी अशा प्रकारचा. दोनाच्या जागी एक असेल किंवा चार असतील, त्याने फार फरक पडणार नाही.)
समितीचे उद्दिष्ट राजकारण नसून समाजकारण आहे.
हे असं असेल तर (झाशीची) राणी या साच्यात कुठे बसते ते लक्षात येत नाहीये. झाशीच्या राणीचा मुख्य वारसा आपले (भारतीय) आणि बाहेरचे (ब्रिटीश) हे लक्षात घेऊन त्यासंदर्भात राजकारण (तिच्या बाबतीत राजनैतिक तह, ते न जमल्यास युद्ध) असा आहे. तेव्हा भारत असा काही देश नसूनही राणीला हे 'आपलं' आहे असं लक्षात आलं आणि ते टिकवून ठेवण्याचा तिने प्रयत्न केला असा तिचा राजकारणाचा वारसा आहे. समितीचं उद्दीष्ट राजकारण नसल्यास समितीची राणीसंदर्भात काय मतं आहेत याबद्दल मला अधिक कुतूहल आहे. (दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जर्मनीमधे जर्मन विज्ञान आणि ज्यू विज्ञान अशी विभागणी होत असे. क्वांटम मेकॅनिक्स, सापेक्षतावाद यांना ज्यू विज्ञान समजलं जात असे. अशा प्रकारची विभागणी अयोग्य, अग्राह्य आहे असं विज्ञानात सरसकट समजलं जातं.) इतिहास हा विषय विज्ञानासारखा स्वच्छ, स्पष्ट नाही. शिवाय इतिहासाची मांडणी आपापल्या दृष्टीकोनातूनही करता येते. त्यामुळे इतिहास-संशोधकांचं राणीबद्दल, तिच्या वारशाबद्दल काही एक मत असलं तरी ते सगळ्यांनाच ग्राह्य वाटेल असंही नाही. तसा समितीचा इतिहास कशा प्रकारे मांडलेला आहे? 'स्त्रियांना संधी' यात मला राजकारण या पैलूबद्दलच कुतूहल आहे. महिला आरक्षण, एखाद्या ठिकाणी महिला आरक्षण असेल तर तिच्या घरातल्या पुरुषांनी तिला प्रॉक्सी म्हणून वापरून घेणं वगैरे विषय आजच्या, स्त्रियांसंबंधीच्या राजकारणासंबंधीचे आहेत. सुषमा स्वराज, वृंदा करात किंवा सोनिया गांधी यांच्यासारख्या नाही तर सामान्य स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी राजकारण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. नर्मदा बचाव किंवा काश्मीरमधे चालणार्‍या घटनांमधे महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं. या महिला मोठ्या प्रमाणात राजकारणात सहभागी होताना दिसतात. आधुनिक होऊनही समितीच्या तीन आदर्शांबद्दल मला फार प्रश्न नाहीत; प्रश्न तपशीलांसंदर्भात आहेत. आधुनिक जगात येणार्‍या अडचणींसंदर्भात आहेत. उदाहरणार्थ: १. स्त्रियांवरच मूल वाढवण्याची जबाबदारी असेल तर आधुनिक जगात जी लिंग समानता मानली जाते ती तिथे मोडते. त्यासंदर्भात समिती सेविका किंवा संपर्कात येणार्‍या इतर स्त्रियांना काय शिकवते? २. आधुनिक जगात स्त्रियांना शिक्षण, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक वेळेस कराटे शिकून नाहीतर पाच-सात किलोची वजनं उचलून फायदा होईलच असं नाही. अनेकदा डोकं लढवून परिस्थितीतून सुटका करून घ्यावी लागते. कोणी समोर चाकू नाहीतर पिस्तूल घेऊन आला तर कराटे किंवा पुष्ट स्नायूंचा फायदा होत नाही. कधी सुटका झालीच नाही तर मानसिक तयारी असणं महत्त्वाचं समजलं जातं. एखादी दुर्दैवी घटना घडली तरीही त्याबद्दल व्यापक विचार करावा लागतो. (सोहेल अब्दुलाली हे एक उदाहरण.) एकेकाळी बलात्कार झाला तर बायका बहुतांशी आत्महत्या करत असत. आता तसं होत नाही, होऊ नये यासाठी समाज प्रयत्नशील आहे. पण अजूनही "आता या मुली/स्त्रियांचं लग्न कसं होणार?" याच चिंतेत समाज अडकलेला दिसतो. पीडीतेला त्रास होतो पण बलात्कार करणार्‍याचं जगणं समाज मुश्कील करत नाही. या संदर्भात समितीचे विचार आणि/किंवा काम काय आहेत? धर्म, संस्कृती, परंपरेत योनीशुचितेला फार महत्त्व आहे. पण आधुनिक जगात योनीशुचितेला महत्त्व नाही. दुसर्‍या एका धाग्यावर लग्न ठरवण्याच्या परंपरेत मुलीची अन्याय्य पद्धतीने अधिक चिकीत्सा होते असा एक मुद्दा आलेला आहे. पारंपरिकरित्या स्त्रियांना पुरुषापेक्षा खालचं स्थान दिलेलं आहे; धार्मिक विधींमधे एकटी स्त्री धर्मकार्य करू शकत नाही, विधवा तर नाहीच नाही. अशा अडचणीच्या प्रसंगांमधे जिथे धर्म, परंपरा, संस्कृती सरळसरळ आधुनिक मूल्यांच्या आड येतात तिथे समितीची भूमिका काय असते?

बंडा मामा Sun, 04/21/2013 - 19:53
संघ परीवाराला आपल्या निष्ठा अर्पण केलेल्यांना दुसरी बाजू मांडली की राग येणे स्वाभाविक आहे. मग कुणाला तो प्रोपागंडा वाटेल कुणाला खोटारडे पणा. पण ज्यांना तटस्थ वृत्तीने विचार केल्यास संघ परीवाराची ही दुसरी बाजू कुणाच्याही लक्षात येईल. संघ परीवाराला मुसलमान/ख्रिश्चन धर्मांविषयी प्रतिकुल मते आहेत हे कुणीही शाखा अटेंड केलेला किंवा अ‍ॅक्टीव संघ कार्यकर्त्याच्या संपर्कात आलेला सांगू शकेल. त्यासाठी ओरिसा दंगलींचे दाखले, नानावटी रिपोर्ट, किंवा संघ परीवारातल्या बाबू बजरंगीचे कारनामे असले संदर्भ द्यायची काही गरज नाही. संघाला कायमच हिटलर सारख्यांचे आकर्षण होते/आहे हे ही छुपे रहस्य नाही. माधव गोळवलकरांचे त्यावरील विवेचन प्रसिद्ध आहेच. शिवाय अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसीझमशी संघाच्या विचारसरणीशी केलेली तुलना बिनबुडाची म्हणून उडवुन लावण्याइतकी पोकळ नाही. (संघनिष्ठांना मात्र ती तशीच जाणवणार कारण त्यांचा उघड बायस) अर्थात त्यामुळे संघाने केलेले समाजकार्य (विशेषतः नैसर्गिक आपत्ती प्रसंगी) आणि त्यांचे चांगले गुण नाहिसे होत नाहीत जे मी ही माझ्या प्रतिसादात नाकारलेले नाहीत.

In reply to by बंडा मामा

विकास Mon, 04/22/2013 - 08:11
खोटारडेपणा आहे कारण कुठलाही पुरावा नाही. उगाच मंथरेने चार चार वेळातीच गोष्ट सांगायची आणि रामायण घडवायचे, त्यातलाच हा प्रकार आहे.
संघ परीवाराला मुसलमान/ख्रिश्चन धर्मांविषयी प्रतिकुल मते आहेत हे कुणीही शाखा अटेंड केलेला किंवा अ‍ॅक्टीव संघ कार्यकर्त्याच्या संपर्कात आलेला सांगू शकेल.
तुम्ही आला असला तर तसे सांगा. मी संपर्कात आलो आहे आणि मला कधीच असे जाणवले देखील नाही. त्यामुळे तुमचे मुद्दे खोटे आहेत असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही एखाद्या व्यक्तीने तसे म्हणले असे वादासाठी गृहीत धरले तरी ती व्यक्ती त्या संघटनेत नक्की कुठे आहे हे देखील सांगा.
संघाला कायमच हिटलर सारख्यांचे आकर्षण होते/आहे हे ही छुपे रहस्य नाही. माधव गोळवलकरांचे त्यावरील विवेचन प्रसिद्ध आहेच.
पुरावा द्या, उत्तर मिळेल. पुरावा नसल्यास खोटेपणा आहे हे सिद्ध होईलच.
शिवाय अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसीझमशी संघाच्या विचारसरणीशी केलेली तुलना बिनबुडाची म्हणून उडवुन लावण्याइतकी पोकळ नाही. (संघनिष्ठांना मात्र ती तशीच जाणवणार कारण त्यांचा उघड बायस)
परत तेच जे लेखक म्हणता त्याचे पुरावे द्या. मी देखील असे लेखक वाचले आहेत. त्यांनी त्यांना काय वाटते ते लिहीले आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी ना धड तळटीप, ना धड संदर्भ.

In reply to by विकास

बंडा मामा Tue, 04/23/2013 - 00:26
खोटारडेपणा आहे कारण कुठलाही पुरावा नाही. हा तर अतिरेक झाला. मिपावर येणारे ९०%च्या वर प्रतिसाद हे कुठल्याही तळ्टीपा आणि संदर्भ ह्याशिवाय येतात. ह्या सर्व लेखनाला तुम्ही खोटारडेपणा म्हणता का? खाली श्रीगुरुजींनी संघांवर स्तुतीसुमने उधळणारा भला मोठा प्रतिसाद दिला आहे. पण कसलाही संदर्भ न दिल्याने त्याला खोटारडेपणा म्हंटले तर चालेल का? थोडा शोध घेतला असतात तर, गोळवलकारांचे हिटलरची स्तुती करणारे विधान तुम्हाल सहज सापडले असते. To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the Semitic races—the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindustan to learn and profit by" — M. S. Golwalkar

In reply to by बंडा मामा

विकास Tue, 04/23/2013 - 01:54
विंदांच्या कवितेचे शिर्षक आठवले.. "तेच ते नि तेच ते" :) गुरूजींचे हे वाक्य तुम्ही दिले पण परत संदर्भ न देता. त्यात काही आश्चर्य नाही म्हणा, संदर्भ देणे हे का कोणास ठाऊक, अनेक भारतीयांना कमीपणाचे वाटते. जणू काही संदर्भ मागितला म्हणजे तुम्हाला कोणी खोटेच ठरवत आहे. मिपावरील लेखांमधे अहो अगदी राहूल गांधींवर पण टिका करताना पब्लीक वृत्तपत्रीय संदर्भ देते. इथे तुम्ही एका संस्थेवर गंभीर आरोपच नाही, टिकाच नाही तर संदर्भाविना अनुमान काढत आहात. जे आक्षेपार्ह आहे. म्हणून तुमच्या विधानास खोटे म्हणण्याशिवाय पर्याय राहीला नाही. असो. तुम्ही दिलेले गुरूजींचे वाक्य हे मार्च १९३९ साली त्यांनी लिहीलेल्या "वुई ऑर अवर नेशनहुड डिफाईन्ड" या पुस्तकातील आहे. ते बाबाराव सावरकरांच्या राष्ट्रमिमांसेचे, गोळवलकरांनी, ३२ व्या वर्षी, सरसंघचालक होण्याआधी केलेले भाषांतर आहे. जे काही या संदर्भात वाचले आहे त्याप्रमाणे, त्याची शेवटची आवृत्ती ही १९४७ ला निघाली होती आणि गांधीहत्येनंतरच्या बंदीत ते पुस्तक जप्त् झाले. तात्पर्यः गोळवलकारंच्या हयातीत आणि नंतरही हे पुस्तक १९४८ सालानंतर प्रकाशनात आले नाही. नंतरच्या काळात जेंव्हा हिटलरची विकृती आणि दूष्कृत्ये बाहेर आली तेंव्हा गोळवलकरांनी, "The Christians committed all sorts of atrocities on the Jews by giving them the label “Killers of Christ”. Hitler is not an exception but a culmination of the 2000-year long oppression of the Jews by the Christians." असे देखील त्यांच्या "बंच ऑफ थॉट्स" ह्या पुस्तकात म्हणलेले आहे. तरी देखील त्या संदर्भात थोडे अधिक सांगतो.... त्याआधी म्हणजे डिसेंबर १९३८ मधे टाईम मॅगझीनने हिटलरला "मॅन ऑफ दी इअर" घोषित केले होते आणि नोबेल समितीच्या शांततापुरस्कारासाठी देखील हिटलरचे नाव घेतले गेले होते. सांगायचा हेतू एकच की हिटलर नक्की काय आहे हे पब्लीकला समजलेले नव्हते. इतकेच काय, १९४० साली I do not want to see the allies defeated. But I do not consider Hitler to be as bad as he is depicted. He is showing an ability that is amazing and seems to be gaining his victories without much bloodshed. Englishmen are showing the strength that Empire builders must have. I expect them to rise much higher than they seem to be doing. - मे १९४० साली, राजकुमारी अम्रित कौर यांना लिहीलेल्या पत्रात आणि Germans of future generations will honour Herr Hitler as a genius, as a brave man, a matchless organizer and much more. - "हरीजन" २२ जून १९४० अशी दोन्ही गांधीजींची विधाने आहेत. सुभाषबाबूंनी तर काय हिटलरशी हातमिळवणी केली होती... मग आता काय गांधीजीना अथवा सुभाषबाबूंना हिटलरच्या हिनकृत्यांचे पुरस्कर्ते म्हणणार आहात का? मी तसे म्हणत नाही, मला तसे वाटत देखील नाही आणि हा धागा गांधीजींवर, टाईम मॅगझीन अथवा नोबेल समितीवर लिहीण्यासाठी देखील नाही. लिहायला भाग पडते कारण जेंव्हा एखादे संदर्भहीन वाक्य जेंव्हा परत परत (आत्ताच्या काळात) जालावर वापरून एखाद्या व्यक्तीस/संघटनेस बदनाम करायला वापरले जाते तेंव्हा त्याच संदर्भात इतरांबद्दल देखील काय भुमिका घेतली जाते हे दाखवण्याचा उद्देश होता. तुम्हाला इतर कुठले तुमच्या विधानास पूष्टी देणारे संदर्भ माहीत आहे का? पण अर्थातच ते तुम्हाला माहीत नसणार कारण तुम्ही ज्या अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसिझम आणि संघ अशी तुलना केलेली आहे, ती या एका वाक्याचा उपयोग करत संदर्भाविना आणि स्वतःच्या डाव्या विचारांच्या सोयीसाठी केलेल्या इतिहासाच्या विश्लेषणाला धरून आहे, म्हणून ती देखील खोटी आहे. असो.

In reply to by विकास

श्रीगुरुजी Tue, 04/23/2013 - 13:00
विकास, उत्तम प्रतिसाद! पण हा प्रतिसाद म्हणजे 'पालथ्या घड्यावर पाणी' असेच होणार आहे. संघाची ज्यांना कावीळ झाली आहे, त्यांना संघाची प्रत्येक गोष्ट वाईटच दिसणार.

In reply to by विकास

बंडा मामा Tue, 04/23/2013 - 21:26
संदर्भ मागणे ह्यात चुकिचे काहीच नाही. पण तो मिळायच्या आत समोरच्याला खोटारडा ठरवणे हे असंमजसपणाचे लक्षण आहे. मला वाटतय माझा हा मुद्दा तुम्हाला आणि श्रीगुरुजींना नीट समजलाच नाहीये गोळवलकरांचे वाक्य हे मी माझ्या प्रतिसादातील मुद्याला संदर्भ म्हणूनच दिले आहेत. आता त्या पुस्तकाची छपाईच होत नाही, खूप पुर्वी लिहिलेले वाक्य आहे वगैरे पळावाटा आहेत. गोळवलकरांनी हे वाक्य कधी जाहीरपणे नाकारले आहे का? असल्यास त्याचा पुरावा द्या. तुम्ही दिलेल्या संदर्भात (ज्याचाही पॄष्ठ क्रमांक दिलेला नाही) हिटलरच्या संहाराविषयी असलेले मत आहे, पण मुळात त्याच्या रेशीयल प्युरिटीच्या आयडियोलॉजीला विरोध केल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे त्यांचे मी दिलेले वाक्य हे अजुनही ग्राह्य धरले जाते.

In reply to by बंडा मामा

विकास Tue, 04/23/2013 - 23:39
संदर्भ मागण्यात चुकीचे नसते तर तो न देण्यात चूक असते. वर देखील आधी म्हणले आहेच. एखाद्या व्यक्तीस अथवा संघटनेस एखाद्या गोष्टीविषयी अनुमान काढत गंभीर आरोप करायचे आणि ते देखील संदर्भ न देता हे चुकीचे आहे. या उपचर्चेत देखील जर तुम्हाला संदर्भ मागितला नसता तर तुम्ही देणार होता का? नसलात तर ती दिशाभूल करणे आहे ज्यातून खोटा मतप्रवाहच तयार केला जातो. कदाचीत तुम्ही देखील तुमचे मत असेच तयार केले असेल. एका प्रकारच अंधश्रद्धाच ती... आणि माझा आक्षेप त्याला आहे. तुम्हाला संघ आवडतो का नाही, गुरूजी प्रात:स्मरणीय वाटतात का नाही, असल्या वैयक्तिक गोष्टींच्या संदर्भात नाही... गोळवलकरांचे वाक्य हे मी माझ्या प्रतिसादातील मुद्याला संदर्भ म्हणूनच दिले आहेत. अहो पण आधी सुरवात तुम्ही संघावर गंभीर आरोप करून करता. मग त्याला पुरावा विचारल्यावर तो गोळवलकरांच्या एका वाक्याचा देता, जे वाक्य एका पुस्तकातले आहे, जे त्यांनी सरसंघचालक होण्याच्या आधी लिहीलेले आहे आण जे पुस्तक संघाने संघसाहीत्यात धरलेले नाही, अर्थात त्यातील मते ही संघाने संघटनेची मते म्हणून मानलेलीच नाहीत. एखाद्या संघकार्यकर्त्यास अथवा स्वयंसेवकास जर विचारले तर "वुई" माहीत असलेले किती असतील ते पहा. केवळ स्युडोसेक्यूलर्सच मिळतील. त्या ऐवजी "बंच ऑफ थॉट्स" मात्र माहीत असलेले लक्षात येइल... म्हणून परत विचारतो की संघाच्या संदर्भात असा काही पुरावा तुमच्याकडे आहे का? नसल्यास असले गंभीर आरोप करणे म्हणजे काय सत्यवादीपणा आहे असे म्हणायचे का? आता त्या पुस्तकाची छपाईच होत नाही, खूप पुर्वी लिहिलेले वाक्य आहे वगैरे पळावाटा आहेत. पळवाटा कसल्या? एखाद्या गोष्टीचे विश्लेषणच करायचे असले तर त्याच्या मागेपुढे बघणे महत्वाचे नसते का? मग त्याच प्रमाणे गांधीजी, सुभाषचंद्र बोस, टाईम मॅगझीन, नोबेल समिती यांनी (आणि तसेच चर्चिलचे पण सांगू शकेन) हिटलरबद्दलचे जे बोलणे/समजणे होते त्यावरून या सर्वांना तुम्ही काय नाझी प्रेमी म्हणणार आहात का? त्याचे उत्तर दिलेत तर बरे होईल. खूप पूर्वी लिहीले होते असे म्हणायचे कारण इतकेच की गुरुजींना जर्मनीत काय घडले हे समजल्यावर त्यांनी त्यांचे हिटलरबद्दलचे म्हणणे स्पष्टपणे सांगितले जे आधीच्या प्रतिसादात दिले आहेच. पण तसे जर गांधीजींचे दिसले नाही अथवा सुभाषबाबूंचे दिसले नाही तर मग तुमचे काय म्हणणे आहे? म्हणून विश्लेषण न करता कुठल्याही नेतृत्वाचे एक वाक्य घेयचे आणि तेच ते बोलायचे हे जे काही डाव्या विचारवंत लेखकांनी केले आहे ते चुकीचे आणि खोटारडेपणाचे आहे...त्या व्यतिरीक्त कुणाचिही लेटेस्ट मते बघणे हे जास्त योग्य असते. कारण तरूण पणातली अनेक मते पौढपणी बदलू शकतात. गोळवलकरांनी हे वाक्य कधी जाहीरपणे नाकारले आहे का? त्यांना कधी कोणी जाहीरपणे तसे विचारले होते का? अरूंधती रॉय ज्यांचा संदर्भ आपण दिलेल्या वाक्यासाठी विकीमध्ये दिलेला आहे, त्या तर गुरूजींच्या हयातीत नावारूपाला आलेल्या देखील नव्हत्या! त्या व्यतिरीक्त त्यांच्या हयातीतले जे कोणी ह्या वाक्याचा उपयोग करून त्यांच्यावर टिका करत होते त्यांनी कधी गुरूजींची भेट घेऊन विचारले आहे? तुम्ही दिलेल्या संदर्भात (ज्याचाही पॄष्ठ क्रमांक दिलेला नाही) हिटलरच्या संहाराविषयी असलेले मत आहे, पण मुळात त्याच्या रेशीयल प्युरिटीच्या आयडियोलॉजीला विरोध केल्याचे दिसुन येत नाही. बंच ऑफ थॉट्स, पृष्ठक्रमांक: १३४ of ३६४. येथे हे वाक्य आहे. परत त्या संदर्भातले तुमचे "रेशीयल प्युरिटी" संदर्भातील विधान, हे न वाचता अनुमान काढण्याचे उदाहरण आहे... त्याच पानावर (१३४), "दि सेमिटीक कॉन्ट्रॅस्ट" मथळ्याखाली लिहीलेल्या भागात गुरूजींनी हिंदूधर्म आणि सेमिटीक रिलीजन यातील फरक सांगताना ते लिहीलेले आहे. अर्थात त्यांच्या लेखी हा मुद्दा वंशाशी / रेशिअल प्युरीटी संबंधीत नसावा तर हिंदू धर्म आणि सेमिटीक रिलीजन्स यातील फरकामधे असावा असे वाचताना लक्षात येते. थोडक्यात येनकेन प्रकारेण डावे बुद्धीभेदी लेखक (उ.दा. अरूंधती रॉय आणि अनेक) लिहीत रहातात, आणि त्यांनी लिहीले म्हणजे खरेच असणार असे समजणारे देखील असतात. असो.

In reply to by विकास

बंडा मामा Sun, 04/28/2013 - 20:41
माझा आक्षेप हा संदर्भ मागण्या आधीच एखाद्याला खोटारडा ठरवण्याला आहेत. संदर्भाची मागणी ह्यात काहीच अयोग्य नाही असे मीच म्हंटले आहे. रास्वसं हा हिटलरच्या नाझीझम किंवा मुसोलिनीच्या फॅसीझमने प्रभावित होता/आहे हे संतुलित विचार करणार्‍या कुणालाही स्पष्ट दिसेल. त्यांचा गणवेश, संचलन, मानवंदना, एक राष्ट्र एक धर्म असल्या खुळ्या कल्पना हे सगळे नाझी लोकांशी साधर्म्य दाखवणारे आहे. बरं संघाने इतके चांगले संघटन असुन त्याचा देशासाठी काय उपयोग केला? संघसमर्थक हे लगेच आपत्कालिन मदती विषयी बोलतात कारण त्यापलिकडे संघाने काहीही कर्तुत्व दाखवलेले नाही. आणि हे आपत्कालिन कार्य देखिल बाळासाहेब देवरसांच्या आगमनानंतर सुरु झाले. तोपर्यंत ३०-४० वर्षे (माझ्या अंदाजाने) संघ काहीही भरीव कामगिरी करत नव्हता नुसत्या राष्ट्रप्रेमाच्या गप्फा हाणणे सोडल्यास. आणि आपत्कालिन कामही कुठे आपत्ती आल्यास केले जाते. इतकी मोठी संघटना आणि संघटन असताना आपत्ती येण्याची वाट का बघीतली जाते? आपल्या देशात समस्यांची काही कमी नाही. अनेक लोक मूलभुत गरजांपासुन वंचित आहेत. अशांसाठी संघाने आजपर्यंत काय केले आहे? श्रीगुरुजींनी म्हंटले आहे की संघ अतिशय हार्मलेस आहे, अहो पण तो हार्मलेस नसुन आजच्या समाजातला 'युसलेस' घटक आहे. स्वातंत्रवीर सावरकरांचे आणि संघाचेही ह्याच कारणावरुन वाजले होते. संघाने वैज्ञानिक दॄष्टीकोनाचा प्रसार करावा, अनिष्ठ रुढी प्रथांना हद्दपार करावे असा सावरकरांचा आग्रह होता. संघाने अर्थातच ह्यातले काहीही केलेले नाही. सावरकरांचे हे उद्गार बरेच काही सांगुन जातात, "the epitaph for the RSS volunteer will be that he was born, he joined the RSS and he died without accomplishing anything". अर्थात हे सगळे संघाला निष्ठा अर्पण केलेल्या समर्थकांना पटवुन सांगणे अशक्य कोटीचे काम आहे, हे मी आधीच मान्य केलेले आहे.

In reply to by बंडा मामा

विकास Mon, 04/29/2013 - 08:19
अर्थात हे सगळे संघाला निष्ठा अर्पण केलेल्या समर्थकांना पटवुन सांगणे अशक्य कोटीचे काम आहे, हे मी आधीच मान्य केलेले आहे. स्वतःचेच विधान स्वतःस मान्य आहे का? रास्वसं हा हिटलरच्या नाझीझम किंवा मुसोलिनीच्या फॅसीझमने प्रभावित होता/आहे असे केवळ असंतुलीत व्यक्तीसच खरे वाटू शकते आणि अशा तथाकथीत बुद्धीवाद्यांना ज्यांना संघटन करणे कधी जमलेच नाही. जमले ते फक्त बोटे मोडणे. असो. त्यांचा गणवेश, संचलन, मानवंदना, एक राष्ट्र एक धर्म असल्या खुळ्या कल्पना हे सगळे नाझी लोकांशी साधर्म्य दाखवणारे आहे. गणवेश, संचलन, मानवंदना म्हणजे तुम्हाला खालील छायाचित्रांमधे दिसत आहेत त्यांना म्हणायचे आहे का? Rahul Gandhi राष्ट्रसेवादलाची मानवंदना स्विकारतानाचे सोनीया गांधींचे छायाचित्र (कॉपिराईट असल्याने नुसता दुवा देत आहे). Sewa Dal Sewa Dal आणि राष्ट्र - धर्म या संदर्भात या धाग्यात देखील पहील्यापानावर उत्तरे दिली आहेत. त्यामुळे परत लिहीत बसत नाही... तोपर्यंत ३०-४० वर्षे (माझ्या अंदाजाने) संघ काहीही भरीव कामगिरी करत नव्हता नुसत्या राष्ट्रप्रेमाच्या गप्फा हाणणे सोडल्यास. नक्की का? का अभ्यास कमी पडतोय? का वाचन कमी पडतयं? अधिक नंतर...

In reply to by विकास

बंडा मामा Mon, 04/29/2013 - 20:47
काय कमाल करता बुवा तुम्ही. सिरियसली? तुम्ही दिलेल्या फोटोंमधले गांधी टोपी आणि खादी सदरे घातलेले लोक तुम्हाला नाझींची किंवा मुसोलिनिच्या रेड आर्मीची आठवण करतात? हा फोटो बघा.. RSS दुसरे म्हणजे मी गणवेष, संचलन, विचारसरणी हे एकत्रितरीत्या नाझी किंवा रेड आर्मीचे भारतीय रुप वाटते असे लिहिले होते.
नक्की का? का अभ्यास कमी पडतोय? का वाचन कमी पडतयं?
माझा असेल बॉ कमी पडत पण सावरकरांचा ह्या विषयतील अभ्यास तरी नक्कीच कमी पडत नसणार.

In reply to by बंडा मामा

विकास Mon, 04/29/2013 - 22:19
नाझी विचारसरणीत वंशवाद होता... तसा येथे कोठे दिसतो ते सांगू शकाल का? आणि हो आधी गणवेश, मानवंदना म्हणाला होता... आता राहूलबाबांची (आणि इतर काँग्रेसींची) मानवंदना दाखवल्यावर जरा वाक्य बदलणे आले... तुम्ही दाखवलेला गणवेष तर सरकारमान्य शाळेतली मुले पण घालतात (आम्ही पण घातले होते. मग काय ती मुले, शाळा पण नाझी असे म्हणायचे आहे का? आणि दंडच म्हणत असाल तर नाझी अथवा रेड आर्मी काय दंड घेऊन संचलन करत होती/(रेड आर्मी अजूनही) करत असते असे म्हणायचे आहे का? तरी देखील तुम्ही साधर्म्य दिसते म्हणतच आहात म्हणून खालील छायाचित्रे पहा आणि नक्की काय साधर्म्य आहे ते सांगा... गणवेषधारी नाझी आर्मी German Army गणवेषधारी रेड आर्मी Red Army काहीही आपलं उगाचच. लहानमुलांना नसलेल्या बागूलबुवाची भिती दाखवण्यातला प्रकार. कोणी तरी तथाकथीत विचारवंत दाखवतात आणि झापडे लावलेले त्यावर विश्वास ठेवतात, झालं! तरी बरं गेल्या ८८ वर्षात कुठे असा वंशवाद केलेला दिसला नाही. जेंव्हा केंव्हा संघावर आरोप केले गेले, बंदी घातली गेली तेंव्हा देखील काहीच सिद्ध न करता आल्याने ती उठवावी लागली. तरी बोटे मोडणे चालूच आहे... म्हणूनच आधी देखील म्हणल्याप्रमाणे, कुणाला संघ आवडतो का नाही ह्या बाबतचा मुद्दा नाही. पण मुद्दा हा खोटे आरोप करण्याबाबतचा आहे. माझा असेल बॉ कमी पडत पण सावरकरांचा ह्या विषयतील अभ्यास तरी नक्कीच कमी पडत नसणार. अहो असेल नाही, अभ्यास नक्कीच कमी पडतोय. अजून नक्की का म्हणून विचारतो. आणि हो सावरकरांच्या इतर मतांशी देखील आपण ते बरोबर असल्याने सहमत असालच असे (आत्ता पर्यंत नाही न म्हणल्याने) समजतो. तरी देखील तुम्ही सावरकरांच्या १९३८च्या एका वाक्याला चिकटूनच बसत असाल तर बसा... पण तरी देखील थोडक्यात : सावरकर असे म्हणाले त्या आधी हेगडेवारांना कोणीतरी (अशा अर्थाचे) विचारले होते की एकदा संघटन झाले की काय करणार? त्यांनी उपरोधीकपणे सांगितले की सगळ्यांना झोपायला सांगणार! त्यावर सावरकरांची तुम्ही सांगितलेली प्रतिक्रीया होती. त्याआधी ब्रिटीश गृहखात्याने संघास हिंदूमहासभेचाच भाग असल्याचे मानलेले होते... तर स्वयंसेवकांनी १९३७ साली सावरकरांची पूर्णमुक्तता झाल्यानिमित्त मानवंदना दिली होती. अर्थात १९३८ सालानंतर १९४० साली डॉ. हेडगेवारांच्या निधनानंतर हिंदूमहासभेतर्फे शोक पाळला गेला होता... १९४३ साली गुरूजी, डॉ. मुंजे आणि भावाबरोबर संघ शिक्षा वर्गासमोर बोलताना, त्यांनी संघ देशभरात वाढतो आहे याबद्दल समाधान आणि अभिमान व्यक्त केले होते.

In reply to by विकास

श्रीगुरुजी Tue, 04/30/2013 - 12:50
विकास, उत्तम प्रतिसाद! पण आधी लिहिल्याप्रमाणे हा प्रतिसाद देखील "पालथ्या घड्यावरच्या" पाण्याप्रमाणे वाहून जाणार. कितीही दाखले दिले तरी मनात अत्यंत पूर्वग्रह ठेऊन लिहिणार्‍यांच्या मतात बदल होणार नाही.

In reply to by बंडा मामा

श्रीगुरुजी Tue, 04/30/2013 - 12:32
>>> तुम्ही दिलेल्या फोटोंमधले गांधी टोपी आणि खादी सदरे घातलेले लोक तुम्हाला नाझींची किंवा मुसोलिनिच्या रेड आर्मीची आठवण करतात? मग काय वरील फोटोतील हातात लाठी घेतलेले स्वयंसेवक नाझी किंवा रेड आर्मीचे वाटतात? >>> दुसरे म्हणजे मी गणवेष, संचलन, विचारसरणी हे एकत्रितरीत्या नाझी किंवा रेड आर्मीचे भारतीय रुप वाटते असे लिहिले होते. काहीतरीच काय. नाझींची विचारसरणी वांशिक श्रेष्ठत्वाची व हिंसाचाराची होती. संघाची अशी विचारसरणी कधीही नव्हती. गणवेष, संचलन इ. अनेक जण करतात. म्हणून ते लगेच नाझी/फॅसिस्ट होतात का? याउलट गणवेष, संचलन इ. न करता सुद्धा गुंडगिरी करणारे व इतर जातींना कनिष्ठ मानणारे ब्रिगेडी हे नाझीझम/फॅसिझमच्या जास्त जवळ आहेत.