ध्येय!
लेखनविषय:
काव्यरस
पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. :)
आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज,
भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे!
अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही..
मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे!
कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण)
कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे!
प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा..
क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे!
कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता)
आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!!
राघव
वाचने
3855
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा..
क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे! ... सुंदर !
अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही..
मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे!
कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण)
कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे!
अप्रतिम!
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी
कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता)
आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!!
खास! अप्रतिम शब्द आणि अप्रतिम कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू
In reply to छान by बेसनलाडू
असेच म्हणतो.
बऱ्याच दिवसांनी?
कविता, अतिशय आवडली. 'मनातले सल रुजून आता, त्यांचा झाला मरवा रे' ही बोरकरांची अप्रतिम ओळ आठवली तिसरं कडवं वाचून.
सर्वांचे मनापासून आभार.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
वा ! सुरेख कविता