ध्येय!
लेखनविषय:
काव्यरस
पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. :)
आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज,
भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे!
अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही..
मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे!
कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण)
कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे!
प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा..
क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे!
कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता)
आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!!
राघव
वाचने
3853
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
वा ! सुरेख कविता
सुरेख!
आहा!!!
छान
In reply to छान by बेसनलाडू
+१
In reply to +१ by घाटावरचे भट
+२
छान
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आभार