Skip to main content

(चेप राजसा..)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 21/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूची 'थांब राजसा..' ही कविता वाचली आणी काही वेगळेच दृश्य डोळ्यांसमोर तरळून गेले! इर्शाद! ;) भात सागुती, कांदा संगती चेप राजसा भिऊ नको.. तर्रि अमृती, रे वाटी रिती कमी उगा तू जेवू नको.. मांडिस अलगद, दोंद टेकले गळा जाडशा-वळ्या गुंफिले घर्मबिंदू अन नयनी गंगा तोंड माखले , तवंग रंगा दंग भोजनी उरकू नको.. चेप राजसा भिऊ नको.. चटचट वाजे पुन्हा पाऊल नवा वाढपी नवीन चाहूल आर्त भुकेने पोट पुकारे जिलबी दिसता, लाळ पाझरे पंचकडी तू सोडू नको.. चेप राजसा भिऊ नको.. ओठी ओल्या, भजी राहु दे पापडकुर्डी, जरा खाऊ दे वामदिशेची चटणी चाखू दे शेवटचाही भात येऊ दे काही बाकी ठेऊ नको चेप राजसा भिऊ नको.. चतुरंग
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3692
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

हे हे हे उद्या ग्रहण आहे. कल्जी घेने. उपास करणे. इतके न चेपणे. प्राजुची कविता वाचून हे एक चांगले रॉ मटेरिअल आहे हे समजले होतेच. विडंबन लय भारी, तुडुंब !! (तुडुंब चेपलेला) कपिल

हा हा हा .. एकदम मस्त :) मांडिस अलगद, दोंद टेकले गळा जाडशा-वळ्या गुंफिले घर्मबिंदू अन नयनी गंगा तोंड माखले , तवंग रंगा मजा आली. चटचट वाजे पुन्हा पाऊल नवा वाढपी नवीन चाहूल मस्त मस्त :) आता 'ढोस राजसा' असे दारूसंबंधी विडंबन यायला नको. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

राजसा चे विडंबन टाकु का? नको, लगेच उडेल.

In reply to by विनायक प्रभू

म्हणुनच मी पण नाय टाकले :$ --अवलिया

झकास! फेटा उडवून दाद दिली बर्र का राव!! - कोकणी फणस

In reply to by आशिष सुर्वे

--टुकुल

हा हा हा मस्त! ऋषिकेश ------------------ साहेब म्हणतो चेपेन चेपेन.. पोलिस म्हणतो चेपेन चेपेन कविता झाली कच्चा माल.. राजसही म्हणतो चेपेन चेपेन!! ;)

In reply to by ऋषिकेश

बेष्ट... :)) एवढ्या सगळ्या मेजवानीवर ऋषिकेशची चारोळीपण आहेच! पोट हसून दुखतंय की तुडुंब जेवून दुखतंय कळायला मार्ग नाही!

काही बाकी ठेऊ नको लिही चतुरंगा थांबू नको... (स्वगत: इतर अनेकांच्या बाबतीत मात्र असं म्हणता येणार नाही. :( )

रंगाशेठ, मांडिस अलगद, दोंद टेकले गळा जाडशा-वळ्या गुंफिले हा हा हा..झकास चित्रमय विडंबन.. (आस्वादक)केशवसुमार (स्वगतः अरशात पाहिल्यागत वाटलं असं कोण म्हणालं रे)

मस्तच आहे. झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड