आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात
लेखनप्रकार
ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित.
माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले. असे म्हंटताना त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मी उत्तर दिले, भारताचे युद्धक विमाने पडली आणि तुला आनंद होत आहे. बाकी तात्या खरे बोलले, पाकिस्तान ने आपल्या आक्रमण करणार्या युद्धक विमानांना पाडले. वैमानिकांनी पेराशूट उघडले. ते पाकिस्तानच्या जमिनीवर उतरले. तिथून त्यांनी ओला-उबेर पकडली आणि ते भारतात परतले. तो म्हणाला, पटाईत काहीतरी बरगळू नको. मी म्हणालो, गाढवा मग काय म्हणू. विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते. किमान एवढी तरी अक्कल तुला असायला पाहिजे. तू काही राजनेता नाही ज्याला असत्य प्रचार करून लोकांची मते घ्यायची आहे. काहींची इच्छा तर भारत पराजित झाला पाहिजे अशी होती. बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने विडियो टाकले असते. या शिवाय भारतात शहीद होणार्या प्रत्येक सैनिकाला मानाची वंदना दिली जाते, एवढे माहीत आहे ना, तुला. आता त्याचे सूर बदलले. तो म्हणाला, मग तात्या खोटे का बोल्ले. मी उत्तर दिले, तात्या कोमात गेले आहे. किराणा हिल्स वर बहुतेक तात्यांचे आण्विक अस्त्रांचा साठा असू शकतो. भारताने किराणा हिल्स वर मिसाईल हल्ला केला नाही, असेच विधान केले असले तरी तिथल्या स्फोटांचे उपग्रह फोटो मीडियावर आहे. नंतर त्याच भागात जमिनीच्या आत अनेक भूकंप ही आले. नूरखान बेस वर ही जमिनी खाली असलेले शस्त्र भंडार ही नष्ट झाले. बहुतेक भारताने दाखविले पाकिस्तानचे अस्त्र भंडार सुरक्षित नाही. पण इथे ठेवलेले अस्त्र- शस्त्र भंडार तात्यांचे असेल तर तात्या कोमात जाणारच.
पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ एका प्रेस कोन्फ्रेंस मध्ये म्हणाले होते, ते भल्या पहाटे भारतावर हवाई हल्ला करणार होते, त्या आधीच अडीच वाजता भारताने ब्रम्होस मिसाईलने आमच्या विमानतळांवर हल्ले केले. आम्हाला प्रतिकार करण्यासाठी 30 सेकंड ही नव्हते. भारताच्या हल्ल्यात तिथल्या हवाई पट्ट्या आणि तिथे उभी असलेली अनेक विमाने नष्ट झाली. त्यांची विमाने आक्रमण करण्यासाठी तैयारी करत असल्याने त्यांची विमाने असुरक्षित होती. किमान 30-40 विमानांना निश्चित नुकसान झाले असेल, खरी संख्या काही वर्षांनी पाकिस्तान उघडी करेलच. भारता जवळ शत्रूवर पिन पॉइंट आक्रमण करण्याची क्षमता पाहून तात्यांना धक्का बसणे स्वाभाविक होते.
नुकतेच झालेल्या इजराईल आणि इराण युद्धात हजारून जास्त किमी दूरून येणार्या मिसाईल आणि द्रोण अमेरिकेचे आधुनिक डिफेंस सिस्टम थांबवू शकले नाही. दुसरी कडे 25-50 किमी दुरून येणारे द्रोण आणि मिसाईल भारताने रोखले. ह्याचा आघात ही त्यांना जबरदस्त बसला असेल.
बाकी तात्यांप्रमाणे भारतात ही अनेकांना दारुण धक्का बसला आणि त्यांचे ही मानसिक संतुलन बिघडले. भारताने 9 आतंकी तळ उध्वस्त केले. तिथे इतके आतंकी मेले की एक आतंकी म्होरक्या म्हणाला, "आम्ही प्रेत मोजता मोजता थकून गेलो. आमचे दुख कुणाला ही कळू शकत नाही". 11 विमान तळे उध्वस्त झाल्याने पुढील वर्षभर तरी पाकिस्तान पुन्हा गडबड करू शकत नाही. इराण ने भारताला धन्यवाद याच कारणाने दिला असेल. एवढे नुकसान झाल्यावर पाकिस्तान ने बदला न घेता युद्धविराम स्वीकार केला अर्थात सरेंडर केले/ तरीही आपले काही नेता "भारताने सरेंडर असा शब्द प्रयोग करतात". बहुतेक पाकिस्तानच्या दारुण पराजयाचे पाकिस्तानपेक्षा त्यांनाच जास्त दु:ख झाले असावे आणि ते ही तात्या प्रमाणे बरगळू लागले.
बाकी आता भारतासोबत सर्व व्यापारीक सौदे बरोबरीच्या नात्याने करण्याची मानसिक तैयारी ही तात्यांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी तात्यांना कोमातून बाहेर पडावे लागेल. पंतप्रधान मोदींच्या भारताला आता कुणीही हलके घेऊ शकत नाही.
वाचने
6490
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
खरे आहे
In reply to खरे आहे by कपिलमुनी
उत्तम.
In reply to उत्तम. by प्रसाद गोडबोले
द्वेष ?
In reply to द्वेष ? by कपिलमुनी
2029
In reply to 2029 by प्रसाद गोडबोले
असू दे
In reply to असू दे by कपिलमुनी
2029 उगी उगी.
In reply to 2029 उगी उगी. by प्रसाद गोडबोले
२९, ३४ ,३९
In reply to २९, ३४ ,३९ by कपिलमुनी
ते की.
In reply to उत्तम. by प्रसाद गोडबोले
विमान पडले असते तर त्यांनी
In reply to खरे आहे by कपिलमुनी
असे आहे, पुतीन ज्या भागातून
In reply to असे आहे, पुतीन ज्या भागातून by विवेकपटाईत
संदर्भ द्या हो
In reply to संदर्भ द्या हो by कपिलमुनी
झालं मोदी द्वेषाची , भाजप
बाप दाखव नाहीतर श्राध्द कर
In reply to बाप दाखव नाहीतर श्राध्द कर by चंद्रसूर्यकुमार
व्हाटस अॅप
In reply to बाप दाखव नाहीतर श्राध्द कर by चंद्रसूर्यकुमार
कमाल आहे
मुळात, विमान पाडल्याबाबत जो
In reply to मुळात, विमान पाडल्याबाबत जो by रात्रीचे चांदणे
संभ्रम
In reply to मुळात, विमान पाडल्याबाबत जो by रात्रीचे चांदणे
बाप दाखव नाहीतर श्राध्द कर
In reply to बाप दाखव नाहीतर श्राध्द कर by चंद्रसूर्यकुमार
कूटनितीक कारण
वाचतोय.
देशभक्ती
In reply to देशभक्ती by सुक्या
फक्त बाता आहेत
In reply to फक्त बाता आहेत by कपिलमुनी
मी तेच म्हणालो. सगळ्या गोष्टी
In reply to मी तेच म्हणालो. सगळ्या गोष्टी by सुक्या
लोकशाही
In reply to फक्त बाता आहेत by कपिलमुनी
जनतेला सर्व माहिती आर्मीने
लोकशाही
पाकिस्तानकडून आपलं विमान
In reply to पाकिस्तानकडून आपलं विमान by रात्रीचे चांदणे
कारगिल किंवा मुंबई
In reply to कारगिल किंवा मुंबई by प्रसाद गोडबोले
बरखा दत्त आणी समजुतदार??
एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप
In reply to एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप by सुबोध खरे
फ्रान्सच्या राफेलला बदनाम
In reply to एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप by सुबोध खरे
भारतात सर्वांत जवळ मोबाईल आहे
In reply to एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप by सुबोध खरे
मुळात पाकिस्तानने भारताच्या
पंचवीस वेळा...
ट्रम्प तात्या वरच विश्वास
In reply to ट्रम्प तात्या वरच विश्वास by सुबोध खरे
डॉ.'खरे' आहे.
In reply to डॉ.'खरे' आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऐका ऐका
तात्या वर विश्वास ठेवायचा तर