प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथचे अद्भुत मंदिर-१
ह्या पहिल्या भागात पाहूया प्रभास पाटण चे पौराणिक महत्व! प्रभास हे इथल्या भागाचे नाव! आणि पाटण हे गावाचं नाव. सोमनाथच्या मंदिराची इथे स्थापना होण्याच्या आधीपासून पाटणचे धार्मिक महत्व आहे. ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे.
मग येते मुख्य कथा! भारतीय पुराणांची काही वैशिष्ट्ये आहेत. निसर्गातल्या गोष्टींना पुराणात खूप सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या कथामध्ये गुंफले आहे. त्यात काही देव आणि देवता हे वारंवार येतात. त्यात मुख्यत्वे आहेत इंद्र आणि चंद्र!
सोमनाथ इथल्या कथेचा नायक आहे चंद्र. चंद्राला एकूण 27 बायका होत्या (तो देव आहे, त्यामुळे शक्य आहे). ह्या सगळ्या जणी म्हणजे नक्षत्रासारख्या होत्या, खरं म्हणजे नक्षत्रच. तर त्यांचे वडील म्हणजे दक्ष राजा ह्यांनी लग्न लावताना असं वचन घेतलं होतं की चंद्र ह्या सगळ्यांवर सारखंच प्रेम करेल, दुजाभाव (इथे हा शब्द वापरता येईल की नाही, शंकाच आहे). करणार नाही. पण असं काही झालं नाही. लग्नानंतर चंद्राच प्रेम फक्त रोहिणी वर दिसायला लागलं. बाकी 26 झाल्या नावडत्या! मग काय त्या गेल्या पित्याकडे आणि केली तक्रार नवऱ्याची. संख्याबळ जास्त असल्यामुळे दक्ष राजाला दखल घ्यावीच लागली. त्याने जावयाला समजावून सांगितलं, वचनाची आठवण करून दिली पण काही उपयोग झाला नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. सासऱ्याने जावयाला शाप दिला की तुझी ओळख, तुझं वैशिष्ट्य असलेलं तुझं हे तेज नष्ट होऊन जाईल!
हा शाप भयंकरच होता. पण शब्द निघून गेले होते. चंद्राचे डोळे खाडकन उघडले. आता काय? चंद्र गेला ब्रम्ह देवाकडे. ब्रम्हदेव एकदम हुशार, ते काही ह्या सासरा जावयाच्या भानगडीत पडले नाही आणि त्यांनी ही तक्रार redirect केली महादेवाकडे. पण चंद्राला काहीतरी धीर द्यावा म्हणून सांगितलं की बाबा एक काम कर, पाटणला जा, तिथं सरस्वती नदी आहे त्यात स्नान कर आणि महादेवाला शरण जा. चंद्राने पडत्या फळाची आज्ञा प्रमाण ह्या न्यायाने लगेच सांगितलं तसं केलं. आता तसं बघायला गेलं तर हे दोघे साडू. त्यामुळे महादेवाला लक्ष घालावंच लागलं. त्यांनी सगळी स्टोरी ऐकली आणि लई भारी सॉल्यूशन दिलं. ते म्हणाले शाप तर काही reverse घेता येणार नाही पण त्याला sub clause जोडतो. एकदा नष्ट झाल्यावर तुला तुझं तेज हळूहळू परत मिळेल. एकदा सगळं तेज परत मिळालं की सासरेबुवाचा शाप परत activate होईल आणि हे चक्र असंच चालू राहील. हे एकदम भारी झालं. चंद्राला धडा मिळाला, सासरेबुवाचा मान अबाधित राहिला, मेव्हण्या पण खुश आणि निसर्गाचा समतोल पण साधला. सगळी win-win situation!
ह्यानंतर मात्र चंद्राने खुश होऊन महादेवाचं सुंदर असं देऊळ सोन्यात बांधलं. महादेवाने सोमनाथ असं नाव धारण करून तिथेच राहण्याचा वर दिला. चंद्राला त्याच तेज इथे परत मिळालं म्हणून त्या क्षेत्राला प्रभास असं नाव पडलं.
इथून पुढे ह्या सगळ्या क्षेत्राचं महत्व वाढतच गेलं. श्रीकृष्णाच्या आयुष्यात असणारी स्यमंतक मण्याची गोष्ट सुद्धा इथेच घडली. जांबुवंतासोबत इथेच ती प्रसिद्ध fight होऊन सत्यभामेशी लग्न झालं. मुख्य म्हणजे चंद्राप्रमाणेच श्रीकृष्णाला सुद्धा दोष मुक्ती सोमनाथानेच दिली. श्रीकृष्णाची अवतार समाप्ती ह्याच ठिकाणी झाली आहे. मंदिरापासून जवळच असणाऱ्या भालका तीर्थ इथे पारध्याचा बाण लागून श्रीकृष्णाच्या नर देहाची इथे सांगता झाली.
चंद्रानंतर रावणाने हे मंदिर चांदीत बांधले होते आणि त्यानंतर श्रीकृष्णाने सुंदर असं लाकडी मंदिर बांधलं होतं.
वचनाला जागत सोमनाथ इथे राहून त्यांच्या भक्तांना दोषमुक्त करतात. ह्या स्थानाचं महत्व इतकं जास्त आहे की, सोमनाथच्या दर्शनमात्रे दोषमुक्ती मिळते, वेगळं काहीही करायची आवश्यकता नाही.
अशी ही सोमनाथ क्षेत्राची कहाणी सुफळ संपूर्ण!
वाचने
5302
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
एक विनंती.
In reply to एक विनंती. by चित्रगुप्त
सहमत आहे ...
In reply to एक विनंती. by चित्रगुप्त
अजून एक खटकलेले वाक्य म्हणजे....
In reply to अजून एक खटकलेले वाक्य म्हणजे.... by मुक्त विहारि
तुमच्या ह्या कमेंटला काय
In reply to अजून एक खटकलेले वाक्य म्हणजे.... by मुक्त विहारि
प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश
In reply to प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश by प्रचेतस
सत्तेपुढे जनतेचे शहाणपण चालत नाही हेच खरे...
In reply to प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश by प्रचेतस
जहांगीराला त्याचे हिंदू
In reply to अजून एक खटकलेले वाक्य म्हणजे.... by मुक्त विहारि
लॉजिक?
In reply to एक विनंती. by चित्रगुप्त
सर्वप्रथम ह्यातल्या काही
In reply to एक विनंती. by चित्रगुप्त
मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली
In reply to मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली by प्रचेतस
ह्या कमेंटबद्दल मनापासून
In reply to मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली by प्रचेतस
ह्या कमेंटबद्दल मनापासून
In reply to मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली by प्रचेतस
ह्या कमेंटबद्दल मनापासून
In reply to मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली by प्रचेतस
ह्या कमेंटबद्दल मनापासून
In reply to मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली by प्रचेतस
ह्या कमेंटबद्दल मनापासून
In reply to मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली by प्रचेतस
ह्या कमेंटबद्दल मनापासून
In reply to मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली by प्रचेतस
ह्या कमेंटबद्दल मनापासून
In reply to मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली by प्रचेतस
ह्या कमेंटबद्दल मनापासून
In reply to मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली by प्रचेतस
+१
मुवी कायच्या काय लिवताय.
In reply to मुवी कायच्या काय लिवताय. by विजुभाऊ
मी तोच प्रश्न विचारला आहे?
सुरुवात चांगली पण लेख अगदी
In reply to सुरुवात चांगली पण लेख अगदी by प्रचेतस
ही माहिती नवीन आहे. तिथल्या
लेख आवडला
In reply to लेख आवडला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद! आता इतिहासातल्या
लेखाला सुरुवात करून चालना
In reply to लेखाला सुरुवात करून चालना by कंजूस
धन्यवाद! हो हे खरं आहे,
संगम कुठे आहेत ?
In reply to संगम कुठे आहेत ? by सौन्दर्य
धन्यवाद