पत्रास कारण की
लेखनप्रकार
मा० राष्ट्रपती
मा० पंतप्रधान
मा० सरन्यायाधीश,
भारत सरकार
स० न० वि० वि०
या देशाचा नियमित कर भरणारा आणि कायद्याला भिणारा एक नागरिक म्हणून मला देशातील अधिकाधिक गढूळ वातावरणाची चिंता वाटते. आजचे गढूळ वातावरण भविष्याचा पाया असल्याने ते जास्त धोकादायक आहे. मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.
माझ्या अल्पमती धारणेनुसार अस्मिता माणसाला एक प्रकारे मानसिक ताकद देते. त्या ताकदीतून आत्मविश्वासाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. तसेच प्रगतीच्या प्रयत्नांना दिशा पण मिळू शकते.
पण टाचणी लागलेल्या फुग्याप्रमाणे किंवा काचेच्या वस्तू प्रमाणे अस्मिता फुटणार असेल तर ती अस्मिता किती खरी मानायची? अस्मितेची ऊर्जा दहशत निर्माण करण्यासाठी वापरायची की आपल्या प्रगतीसाठी याचे भान मोठ्या संविधानिक पदावरील पदांवरील व्यक्तीना नाही यासारखी शोचनीय गोष्ट दुसरी नाही.
मी माझ्या वैयक्तिक उत्सूकतेपोटी कुत्र्यांच्या मानवीकरणाचा अभ्यास करतो. त्यातून माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट अशी की माणसे सहसा कुत्र्याच्या प्रत्येक ’योग्य’ वर्तनाला शाबासकी देतात, येताजाता त्याचे लाड करतात, पण माणसांच्या बाबतीत मात्र विरूद्ध वर्तन करतात. म्ह० माणसाच्या प्रत्येक ’योग्य’ वर्तनाला शाबासकी कधीही मिळत नाही. पण एखाद्या क्षुल्लक चुकीबद्दल उध्वस्त करणारी शिक्षा मिळू शकते. जी व्यक्ती १०० पैकी एकदा दोनदा चुकते त्याला लगेच शिक्षा आहे, पण जी १०० पैकी ९० वेळा जी चुकते ’तो/ती तशीच आहे’ म्हणुन दुर्लक्ष केले जाते. हा विरोधाभास कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरत नाही.
संविधानिक आणि इतर मोठ्यापदांवरील व्यक्तींकडून वापरल्या जाणार्या हिंसक भाषेला आळा घालायची गरज निर्माण झाली आहे. कारण समाज घडनविण्यात त्यांची भूमिका अतिशय निर्णायक असते.
एक सामान्य (आणि ज्येष्ठ) नागरिक म्हणून मी आपल्याला फक्त विनंती करू शकतो. प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी केवळ आपणच समर्थ आहात!
माझ्या लहानपणी वृत्तपत्रांमध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये आलेली पत्रे न्यायालये स्वत:हून अर्ज म्हणून दाखल करून घेत असत. तसं काही माझ्या या जाहिर पत्रामुळे घडलं तर मीच नाही तर असंख्य सामान्य भारतीय आपल्याला दुवा देतील, याची मला खात्री आहे.
-एक नागरिक
वाचने
7650
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
हा हा हा
संविधानिक आणि इतर
संदर्भ कळेल का?
In reply to संदर्भ कळेल का? by अमरेंद्र बाहुबली
उगी उगी
In reply to उगी उगी by प्रसाद गोडबोले
;-)
In reply to उगी उगी by प्रसाद गोडबोले
मी दोन हजाल एकोनतीस मध्ये
मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये !२०२९ पर्यन्त वायू कसा रोखून धरणार? :)शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब
In reply to शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब by वामन देशमुख
नेमके कुठे घडले ते सांगतो
In reply to नेमके कुठे घडले ते सांगतो by विजुभाऊ
इतके गंभीर गुन्हे असूनही हे
In reply to इतके गंभीर गुन्हे असूनही हे by श्रीगुरुजी
ते स्वतःला लोक त्यांचे
In reply to ते स्वतःला लोक त्यांचे by विजुभाऊ
त्यांना अधिकार नाही. अधिकार
In reply to नेमके कुठे घडले ते सांगतो by विजुभाऊ
सुस्पष्ट संदर्भासाठी धन्यवाद!
In reply to नेमके कुठे घडले ते सांगतो by विजुभाऊ
म्हणजे सरळ सांगा की मावीआच्या
In reply to म्हणजे सरळ सांगा की मावीआच्या by अमरेंद्र बाहुबली
धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे,
In reply to धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, by अमरेंद्र बाहुबली
राऊत आणि जितुद्दीन हे
In reply to राऊत आणि जितुद्दीन हे by विजुभाऊ
कुठे त्या भुजबळांच्या नादी
In reply to राऊत आणि जितुद्दीन हे by विजुभाऊ
मला मड रेसलिंग मधे
मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो.वा वा वा, आधी चिखलात उतरून इतराना कुस्ती खेळा म्हणून दंड थोपटायचे नि बेडकुळ्या दाखवायच्या मग एखाद्याने भाजप नेत्यांची तीच बाजू दाखवली तर “मला मड रेसलिंग मध्ये रस नाही” म्हणून पळ काढायचा. ह्याला काय अर्थ आहे?दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेलअनेक भाजप नेते महिलांबद्दल वाईट बोलले आहेत गेला बाजार मूनगांटीवर हे लोकसभेवेळी प्रियांका गांधी ह्यांच्या बद्दल तर विखे पाटील ह्यांच्या सभेत कुणीतरी देशमुख नावाचा भाजप नेता बाळासाहेब थोरातांच्या लेकीबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलला होता तेव्हा कुठे तुम्ही निषेध व्यक्त केला होता?? दाखवता का? येऊन जाऊन फक्त राऊत नि आव्हाडांविरुद्ध गरळ ओकायची नि पळ काढायचा ह्याला काय अर्थ आहे? चालले इतरांना ज्ञान द्यायला.In reply to धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, by अमरेंद्र बाहुबली
धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे,
संदर्भासह स्पष्टीकरण द्या.
मुळात कोणताही धर्म देशाच्या
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
त्यामुळे संविधानात्मक पदावरील
त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते.सहमत. फक्त संविधानात्मक व्यक्तीने नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीने असे हिंसात्मक आवाहन करणे अत्यंत भयंकर गुन्हा समजून कायदेशीर कारवाई व्हायला हवी.ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?In reply to त्यामुळे संविधानात्मक पदावरील by श्रीगुरुजी
कोणत्या देशात मनुस्मृतीला
In reply to कोणत्या देशात मनुस्मृतीला by युयुत्सु
हिंदू लॉ मधील कोणते कायदे
In reply to हिंदू लॉ मधील कोणते कायदे by श्रीगुरुजी
हे प्रश्न कृपया ए० आय० ला
In reply to हे प्रश्न कृपया ए० आय० ला by युयुत्सु
तुम्ही दावा केलाय म्हणून
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
मनुस्मृती मधील पुढील श्लोक
In reply to मनुस्मृती मधील पुढील श्लोक by वामन देशमुख
बरोबर आहे.
In reply to मनुस्मृती मधील पुढील श्लोक by वामन देशमुख
उजव्यांमध्ये सुद्धा
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
+१
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
मनुस्मृती मधील पुढील श्लोक ..
In reply to मनुस्मृती मधील पुढील श्लोक .. by सुबोध खरे
सर
मनुवादी स्वतला उजवे समजतात खर
In reply to मनुवादी स्वतला उजवे समजतात खर by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
दिसला खांब आणि केली तंगडी वर.
In reply to दिसला खांब आणि केली तंगडी वर. by श्रीगुरुजी
कुठे त्या भुजबळांच्या नादी
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादी by सुबोध खरे
कोणत्याही विषयावर धागा असो,
In reply to कोणत्याही विषयावर धागा असो, by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी, विद ड्यू
अतिडाव्या" विचारसरणीने चिंतेत असलेले
अतिरेक्यांसाठी जालीम उपाय
मग कसाबवर खटला चालवायचा