मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.
इंद्रसेन आजोब लई जोमात आहेत. जलदगती गोलंदाज कधी ६०० गाठेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आजोबा तर ६२०+ मारून जम्बोदादाच्याही पुढे गेले. ६५० मारणार का ते बघायचं.
-गा.पै.
भारताला जिंकायला १५७ धावा हव्यात व ९ गडी पडायचे बाकी आहेत. उद्या पहिल्या सत्रात ६० धावा व दुसऱ्या सत्रात १०० धावा काढून खेळ आटोपण्यावर भर राहील. पण पावसाचं भाकीत भारी निराशाजनक आहे. एकंदरीत शर्यत पावसाशीही आहे.
-गा.पै.
गेल्या दोन तासांपासून ते चालू घटकेपर्यंत पावसाची स्थिती इथे पाहता येईल : https://www.netweather.tv/live-weather/radar
कसोटी सामना चालू आहे त्या नॉटिंगम चा पोस्टकोड NG11AA टाकावा.
-गा.पै.
कालचा संपूर्ण पाचवा दिवस पावसाने वाया गेल्याने सामना अनिर्णित राहिला. भारताला विजयासाठी फक्त १५७ धावा शिल्लक असल्याने व फक्त एकच फलंदाज बाद झालेला असल्याने विजयाची बरीच संधी होती. अर्थात इंग्लंडच्या गोलंदाजांनाही थोडी संधी होती. भारताचे दुर्दैव.
भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना -
भारत पहिला डाव ३६४/१०
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड पहिला डाव ३९१/१०
जो रूट फारच त्रास देतोय. पहिल्या कसोटीत ६४ व १०९ आणि दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात नाबाद १८०.
सामना मस्त चालू आहे ..चाहापणा पर्यंत इंग्रज ६७-४..भारताला विजयासाठी ६ बळींची आवश्यकता. जो रूट ची विकेट निर्णायक भूमिका बजावेल अस वाटतंय. खराब लाईट पण घोटाळा करू शकते.
काल विंडीजने सुद्धा पहिल्या कसोटी सामन्यात पाकड्यांना १ फलंदाज राखून हरविले.
विंडीज-पाकडे पहिला कसोटी सामना -
पाकडे पहिला डाव २१७/१०
विंडीज पहिला डाव २५३/१०
पाकडे दुसरा डाव २०३/१०
विंडीज दुसरा डाव १६८/९
दुसऱ्या डावात विंडीज सुरूवातीला १६/३, नंतर ११४/७ व शेवटी १५१/९ अशा वाईट अवस्थेत होते. पण नेटाने किल्ला लढवून सामना जिंकला.
तिसर्या दिवसाखेर भारत २१५/२, अजुन १३९ धावांची पिछाडी
पुजारा खूप दिवसांनी चांगला खेळतोय, कोहलीने पण चांगली साथ दिली.
पण सामना वाचवायचा असेल तर काहीतरी चमत्कारच व्हायला पाहिजे. (ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने केलेले असे चमत्कार)
राहाणे, पंत, जडेजा सगळे नेटाने उभे राहायला पहिजेत.
सौंदाळा,
विराट कोहली या परिस्थितीतही विजयाचाच विचार करीत असणार याची खात्री आहे.
त्याकरिता आजचा ( चौथा ) दिवस पूर्ण व उद्या उपाहारापर्यंत फलंदाजी करावी लागेल. तोवर भारताकडे २५०+ धावांची आघाडी जमलेली असेल. इंग्लंडास २ सत्रांत २५० धावांचं माफक म्हणूनंच आकर्षक आव्हान मिळेल. त्याचा पाठलाग करू जाता भारतास चौथ्या डावात विरलेली खेळपट्टी व उत्तम गोलंदाजी यांच्या आधारे यजमानांना उखडणं जमून जावं.
आ.न.,
-गा.पै.
दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज डेल स्टेनने वयाच्या ३८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने ९३ कसोटीत ४३९ फलंदाज बाद केले आहेत. १२५ एकदिवसीय सामन्यात त्याने १९७ फलंदाज बाद केले आहेत.
२०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत प्रथम फलंदाजी करताना ३८.५ षटकात १ बाद २६९ अशा भक्कम स्थितीत होता. परंतु नंतर स्टेनच्या भेदक माऱ्यापुढे डाव कोसळला व शेवटी ४९ व्या षटकात २९६ धावांवर भारताचे सर्व फलंदाज बाद झाले. डेल स्टेनने ५ बळी घेऊन भारताचे कंबरडे मोडले होते. शेवटी तो सामना आफ्रिकेनेच जिंकला.
२०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरूद्ध आफ्रिकेने ४३ षटकात २९७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. परंतु न्यूझीलंडने ते पार करून आफ्रिकेचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणले. तेव्हा सामना हरल्यानंतर मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन यांचे निराश रडवेले चेहरे अजून आठवतात. डेल स्टेनच्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकात विजयी षटकार मारणारा न्यूझीलंडचा ग्रँट ईलियट हा आफ्रिकेत स्थानिक सामन्यात डेल स्टेन बरोबरच खेळायचा. सामना संपल्यावर त्याने जमिनीवर निराश रडवेल्या अवस्थेत बसलेल्या डेल स्टेनकडे जाऊन हात पुढे करून त्याला उठविले होते. क्रीडाभावनेचे ते उत्कृष्ट उदाहरण होते.
मागील काही वर्षे त्याला टाचेच्या दुखापतीने ग्रासले होते. त्यामुळे तो फार कमी सामन्यात दिसत होता.
अत्यंत आक्रमक गोलंदाजी करणारा व मैदानात कायम उत्साही असणारा डेल स्टेन कायम स्मरणात राहील. ही स्टेनगन आता परत धडधडताना दिसणार नाही हे आपले दुर्दैव.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही संघांनी दोन बदल केलेत. इशांत शर्मा व शमी ऐवजी शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव आत आलेत. जॉस बटलर आणि करन ऐवजी ऑली पोप आणि ख्रिस वोक्स संघात आलेत.
भारत सध्या २८/१ (९). रोहीत वोक्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे सोपा झेल देऊन ११ धावांवर बाद झाला.
हे लेकाचे दिवस संपत यायला लागला की तारून नेतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळ पासून फक्त मैदानावर हजेरी लावून येतात. उद्याचा संपूर्ण दिवस बॅटिंग केली तर आहे काहीतरी खरं.
एकंदरीत बेत असा दिसतोय की, उद्या अर्ध्या दिवसात १८० टाकून दीड दिवसात ३५० धावा काढायचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवणार. मग चौथ्या डावात यजमानांना २०० च्या आत गुंडाळायचं.
-गा.पै.
ऋषभ पंत व शार्दूल ठाकूर ११५ ते १२५ षटकांच्या दरम्यान ५ च्या सरासरीने खेळले. याचा दराने खेळंत राहिले तर ४०० ची आघाडी सहज आवाक्यात आहे. मात्र त्याआधी भारताचा डाव लवकर घोषित केला तर इंग्लंडास फलंदाजीसाठी पुरेसा वेळ मिळू शकतो. याउलट उशीर लावला तर इंग्लंड जिंकायचा प्रयत्न न करता सामना अनिर्णीत ठेवण्याचं धोरण अंगिकारू शकतात. त्यामुळे आता कोहलीच्या धूर्तपणाची परीक्षा आहे.
-गा.पै.
In reply to भारत सर्वबाद २७८. भारताला ९५ by श्रीगुरुजी
आजोबा लई जोमात
In reply to आजोबा लई जोमात by गामा पैलवान
तो बहुतेक ऍशेसची मालिका खेळून
९ गडी व १५७ धावा
पावसाची स्थिती
कालचा संपूर्ण पाचवा दिवस
भारत-इंग्लंड दुसरा कसोटी
विंडीज-पाकडे पहिला कसोटी
पाचव्या दिवसाच्या पहिल्या
सामना मस्त चालू आहे ..चाहापणा
रूट गेलाय, पण अनिर्णित
भारताचा लॉर्डस वर ऐतिहासिक
In reply to भारताचा लॉर्डस वर ऐतिहासिक by सुजित जाधव
हे हे हे. बाकी काही नाही
भारताचा लॉर्डस वर ऐतिहासिक
भारताचा अविश्वसनीय विजय झाला.
काल विंडीजने सुद्धा पहिल्या
आज
तिसरा कसोटी सामना -
तिसर्या दिवसाखेर भारत २१५/२,
In reply to तिसर्या दिवसाखेर भारत २१५/२, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
विजयाचे प्रयत्न ....
In reply to विजयाचे प्रयत्न .... by गामा पैलवान
म्हणजे भारताने दुसऱ्या डावात
गळती
पहिला डाव फक्त ७८ धावात
सर्वबाद २७८. १ डाव ७६ धावांनी
In reply to सर्वबाद २७८. १ डाव ७६ धावांनी by श्रीगुरुजी
पहिल्या २ कसोटीतील दमदार
आज केवळ पावणेदोन तासात १९.३
दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान
In reply to दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान by श्रीगुरुजी
खरंय
मॅच सुरू झाली आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून
In reply to इंग्लंडने नाणेफेक जिंकून by श्रीगुरुजी
शमी
In reply to शमी by गुल्लू दादा
दुखापतीमुळे बाहेर आहे. आता ३२
३९/३. जडेजा ५ व्या क्रमांकावर
४३/३.५
भोजनसमयी ५४/३
१०७/५. कोहली अर्धशतक करून बाद
१२२/६, रहाणे गेला.
188
भारत १९०/१०. इंग्लंड ५/२ वरून
५३/३
भारत सर्वबाद १९१
दुसऱ्या दिवसाखेर भारत ४३/०
In reply to दुसऱ्या दिवसाखेर भारत ४३/० by श्रीगुरुजी
हे
भारताने दुसऱ्या डावात किमान
अजून तरी
अभिनंदन
आजचा खेळ संपला. भारत २७०/३.
In reply to आजचा खेळ संपला. भारत २७०/३. by श्रीगुरुजी
आजून १८० हवेत ....
भोजनसमयी भारत ३१४/६, २१५
In reply to भोजनसमयी भारत ३१४/६, २१५ by श्रीगुरुजी
भारताचा डाव
भारत दुसरा डाव ४६६/१०.