अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?
अलीकडील घटना पहाता अमेरिका भारताशी मैत्री करू इच्छिते आहे असे चित्र दिसत आहे. क्लिंटन यांच्या कारकीर्दीत याला सुरुवात झाली होती पण त्यांच्या कारकीर्दीत ’नारळ फोडण्या’पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत कांहींसा वेग आला व अणू ऊर्जा करार होण्यात त्याची परिणती झाली.
आता ओबामांच्या कारकीर्दीत मैत्री वाढण्याच्या दिशेने खूपच नवी-नवी चिन्हे दिसत आहेत. मनमोहन सिंग यांच्या अमेरिका भेटीत त्यांना शाही मेजवानी दिली गेली. राष्ट्रपती म्हणून 'व्हाईट हाऊस’मधली ही पहिलीच शाही मेजवानी होती आणि ती भारताच्या पंतप्रधानांना दिली गेली हा केवळ योगायोग म्हणता येणार नाहीं. मग ओबामा इथे आले, भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत कायमच्या सदस्यत्वाबद्दल त्यांनी पाठिंबा दिला, अनेक व्यापारी करार झाले, लष्करी करारही झाले किंवा होऊ घातले आहेत. थोडक्यात अमेरिका भारताबरोबरचे मैत्रीचे संबंध वाढवायला उत्सुक दिसते आहे.
एका एकी ’सर्वात मोठी लोकशाही’चे पडघम वाजत असले तरी आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच सर्वात मोठी लोकशाही राबवत आहोत व ते अमेरिकेला माहीत नव्हते असे मुळीच नाहीं! मग विचार येतो कीं ही मैत्री खर्याखुर्या हृदयपरिवर्तनातून होत आहे कीं एक अजस्त्र बाजारपेठ काबीज करून त्याद्वारे व्यापारवृद्धी साधण्यासाठी होत आहे कीं चीनशी भिडवण्यासाठी त्यांना आपण एक प्यादे हवे आहे म्हणून होत आहे?
पण त्या आधी अमेरिका एक मित्रराष्ट्र म्हणून विश्वासार्ह आहे का याबद्दल विचार करणे आवश्यक आहे.
१९६५ सालापासून-जेंव्हा भारत-पाकिस्तान युद्ध झाले तेंव्हापासून मी राजकारणासारख्या विषयावरील वाचन करू लागलो. युद्ध दोन-अडीच आठवड्यातच आटोपले. ’युद्धस्य कथाः रम्याः’ या उक्तीनुसार वृत्तपत्रातील राजकीय बातम्या वाचायला पहिल्यांदा सुरुवात झाली (तो पर्यंत फक्त क्रिकेटच्या बातम्याच वाचायचो!). तेंव्हापासून ही संवय जणू जन्माचीच लागली व ती संवय आजतागायत लागलेलीच आहे.
तेंव्हांपासून मी अमेरिका टाकत असलेली पावलेही पहात आलो आहे. त्यावेळी मी काम करत असलेल्या कंपनीने कळव्याला एक नवीन प्रकल्प सुरू केला होता. माझी नेमणूक त्या विभागात (Project) झाली होती. युद्ध सुरू झाल्याबरोबर आमच्यासारख्या 'ब्रम्हचार्यां'ना प्रकल्पाच्या जागेवर रहायला जायचा प्रस्ताव मांडला गेला. रहायची आणि जेवण्या-खाण्याची सोय आणि दिमतीला एक 'जीप' अशी आमची बडदास्त कंपनीने ठेवली होती. आम्ही गेलो आणि रात्री-अपरात्री गस्त-बिस्त घालू लागलो. गोप बहादुर नावाचा एक पहारेकरी नेहमी झोपलेला आढळून् यायचा म्हणून त्याचे ’झोपबहादुर’ असे पुनर्नामकरणही आम्ही केले!
त्या युद्धादरम्यान लक्षात आले कीं पाकिस्तानने जरी स्वतःला अमेरिकेच्या गोठ्यात बांधून घेतले असले तरी त्यांना अमेरिकेचा पाठिंबा मनापासून मिळत नसावा! अमेरिकेचे पाकिस्तानला दिलेले समर्थन कांहींसे बिचकत-बिचकतच वाटायचे! अमेरिकेकडून मिळालेली शस्त्रे केवळ साम्यवादाविरुद्धच्या लढाईसाठी पाकिस्तानला दिली गेली होती आणि ती भारताविरुद्ध वापरायला बंदी हे त्यातलेच एक कलम होते तर पाकिस्तानला शस्त्रे फक्त भारतावर चाल करण्यासाठी हवी होती! त्यामुळे इथे "परस्पर हितसंबंधांतील संघर्ष" (conflict of interest) स्पष्ट दिसत होता. त्यात दोघांची कोंडी व्हायची.
६५च्या युद्धात आपल्या हवाई दलाने आपल्या नॅट (चिलट, मच्छर) नावाच्या चिमुरड्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानकडील जास्त प्रगत ’सेबर जेट’ विमानांना जोरदार टक्कर दिली (खरे तर आपण त्या विमानांची बेइज्जतीच केली.) कीलर बंधुद्वय त्यायोगे नावाजले व त्यांना खूप पदकेही मिळाली. अमेरिकेच्या "पॅटन" रडगाड्याची इज्जतही भारताच्या चिलखती तुकडीने मातीला मिळविली. ले. क. तारापोर यांच्या नेतृत्वाखाली भारताने चिलखती रणगाड्यांचे युद्ध जिंकले व या पराक्रमासाठी त्यांना (मरणोत्तर) परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मानही देण्यात आला होता. त्यांच्या शौर्यामुळे पॅटन रणगाडे आज भारताच्या कित्येक शहरांतील उद्यानांमध्ये पारितोषिकांसारखे (trophy) अभिमानाने ठेवले गेले आहेत.
अमेरिकेच्या अशा वागण्याने पाकिस्तानचे त्यावेळचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुत्तो संतापले होते व १९६५ च्या पराजयानंतर आणि ताश्कंदच्या मानहानीकारक करारानंतर त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांच्यावर टीका करत परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे ते स्वत:च आधी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष व नंतर पंतप्रधान झाले. भारताने अण्वस्त्राची पहिली चांचणी केली त्यानंतर भुत्तोंनी अमेरिकेडून अण्वस्त्रविरोधी ’छत्र’ मिळविण्याचे खूप प्रयत्न केले पण अमेरिकेने दाद दिली नाहीं. त्यामुळे त्यांनी अमेरिका हे एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र नाहीं असा निष्कर्ष काढून पाकिस्तानचे चीनबरोबरचे संबंध घनिष्ट करायला सुरुवात केली. पुढे पाकिस्तानला अण्वस्त्रधारी बनविण्यात अमेरिकेइतकीच चीनचीही मदत झाली.[१]
अमेरिकेचे धोरण असे दिसते कीं जे हुकूमशहा ताटाखालच्या मांजरासारखे त्यांच्या तालावर नाचतील त्यांना 'बक्कळ' आर्थिक आणि लष्करी मदत द्यायची आणि असे हुकूमशहा आपल्या जनतेवर करीत असलेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष करायचे. पण अशा अन्यायामुळे संतापलेली जनता जेंव्हां बंड करून तख्तापालट करायला उठाव करायची तेंव्हां आपण लोकशाही राष्ट्र असल्याचा आव आणून आपल्याच मित्राला (’पित्त्या’ला) उपदेशामृत पाजत पाजत High & Dry सोडून द्यायचे व नव्या राज्यकर्त्याशी जुळते कां हे पहायचे!
बांगलादेशच्या युद्धातही पाकिस्तानला अमेरिकेच्या अवसानघातकी धोरणाचा प्रत्यय आला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी पाकिस्तानचा दारुण पराभव होणार हे दिसत असतानासुद्धा आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवायच्या निर्णयाला खूपच उशीर केला. पूर्व पाकिस्तानविरुद्धची मोहीम इतक्या झपाट्याने संपुष्टात आली कीं त्या आरमाराला एक तोफही डागण्याची संधी मिळाली नाहीं. अमेरिकेने केलेला हा विश्वासघात सर्वांनी पाहिला!
१९७१ ते १९७८ पर्यंतच्या काळात अनेक घडामोडी झाल्या. त्यात भुत्तोंना दिलेली फाशी ही एक महत्वाची घटना होती. आले. त्यावेळी अमेरिकेने भुत्तोंना वाचवायचे जे प्रयत्न केले तेही थातुर-मातुरच (half-hearted) होते. झिया नवे राष्ट्राध्यक्ष झाले तरी अमेरिकेने त्यांना जवळ-जवळ वाळीतच टाकले होते. पण अफगाणिस्तानवर सोवियेत संघराज्याचे आक्रमण झाल्यावर मात्र परिस्थिती बदलली. अमेरिकेला जणू एकाएकी पाकिस्तानची आठवण झाली. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कार्टर यांनी परत पाकिस्तानला थोडी-फार शस्त्रे देण्याचे अमीष दाखवून पुन्हा युद्धात ओढण्याचा प्रयत्न केला पण झिया वाटले होते त्यापेक्षा धूर्त निघाले. त्यांनी अमेरिकेला ठणकावून सांगितले कीं अमेरिकेने "आपण विश्वासू मित्रराष्ट्र आहोत" हे आधी सिद्ध करावे, तरच ते पुढे चर्चा करतील.[१] कार्टर यांनी पाकिस्तानला देऊ केलेल्या मदतीचे वर्णन "peanuts" या उपरोधी शब्दात करून त्यांनी कार्टरना भेटण्यासाठी "व्हाईट हाऊस"ला जाण्याबद्दल अनुत्साह दाखविला. तोपर्यंत कार्टर निवडणूक हरणार असे वारेही जोरदारपणे वहात होते.
रेगन आल्यावर मात्र चित्र पालटले व रेगननी त्यांना "तुम्ही सोवियेत संघराज्याचा समाचार घ्या आम्ही तुमच्या अणूबॉंब बनविण्याच्या पयत्नांकडे पाहून न पाहिल्यासारखे करू" असे वचन दिले. या युद्धात बिन लादेन अमेरिकेच्या बाजूने लढले. रेगन यांची कारकीर्द संपता संपता दोन मोठ्या गोष्टी घडल्या. पहिली होती पाकिस्तान अण्वस्त्रधारी झाल्याची आणि दुसरी होती सोवियेत संघराज्याचे सैन्य परत गेल्याबरोबर अमेरिकेन (थोरल्या बुशसाहेबांच्या कारकीर्दीत) पाकिस्तानबरोबरचे संबंध जवळ-जवळ तोडून टाकले. अमेरिकेची पाकिस्तानला पुन्हा वार्यावर सोडण्याची ही कृती तशी त्यांच्या नेहमीच्या "कामापुरता मामा" या धोरणाला धरूनच होती व त्यामुळे ओसामा बिन लादेन संतापले व अमेरिकेचे कट्टर शत्रू बनले. त्यातूनच अल कायदा ही संघटना अस्तित्वात आली. आज अमेरिका या दोन्ही घटनांवरून नक्कीच पस्तावत असेल!
पण या आधी अमेरिकेने असेच इराणच्या शहालाही वार्यावर सोडले होते. इराणचे शहा अमेरिकेचे खंदे पुरस्कर्ते होते. शहांनी जी मनमानी इराणमध्ये केली ती कांहीं प्रमाणात तरी अमेरिकेच्या समर्थनाच्या बळावरच होती. पण या मनमानीमुळे त्यांची लोकप्रियता घटल्यावर अमेरिकेने त्यांच्याशी इतकी जेवढ्यास तेवढी वर्तणूक केली कीं त्याला तोडच नाहीं. एक तर त्यांना अमेरिकेने भरीव मदत केली नाहीं व त्याचा परिणाम म्हणून शेवटी त्यांना जेंव्हां देश सोडायला लागला तेंव्हां त्यांना अमेरिकेने राजनैतिक आश्रयही दिला नाहीं कारण अमेरिकेच्या मुत्साद्द्यांना इराणच्या सरकारने ओलीस म्हणून धरून ठेवले होते. एके काळचा अमेरिकेचा खंदा पुरस्कर्ता असलेल्या आणि मयूर सिंहासनावर बसणार्या या सम्राटाने शेवटी एकाद्या निर्वासितासारखा एका देशातून दुसर्या देशात फिरत-फिरत इजिप्तमध्ये देह ठेवला. त्यांना शेवटी कर्करोगाने गाठले होते.
असाच प्रसंग नंतर अमेरिकेने मार्कोस या फिलिपाइन्सच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांवरसुद्धा आणला. त्यांची सद्दी संपल्याबरोबर अमेरिकेने त्यांनाही आधी मनीलातून उचलून अमेरिकेला आणले. पण नंतर मात्र त्यांना एकाद्या चिरगुटासारखे फेकून दिले व तेही असेच निर्वासितासारखे अमेरिकेत शहरा-शहरातून हिंडत शेवटी हवाई बेटावर कालवश झाले.
इंडोनेशियाच्या सुहार्तोंच्या बाबतीतही कांहींसे असेच झाले. साम्यवादाचे कट्टर विरोधक म्हणून एकेकाळी अमेरिकेच्या गळ्यातला ताईत असलेले हे लाडके राष्ट्राध्यक्ष त्याची सद्दी संपल्यावर अमेरिकेने वार्यावरच सोडले. फरक इतकाच कीं ते त्याच्या स्वतःच्या देशात लोकप्रिय होते आणि त्यांची शक्ती केवळ सिंहासनावर अवलंबून नव्हती. त्यामुळे ते जकार्तातच राहिले व वार्धक्याने दोन-एक वर्षांपूर्वी निवर्तले. पण अमेरिकेने त्यांनाही हवे तेंव्हा आणि हवे तितके समर्थन दिले नाहीं हे नक्कीच.
अमेरिकेच्या अवसानघातकी धोरणाचा फटका मुशर्रफ यांना व बेनझीरबाईंनाही बसला. एके काळी मुशर्रफना अमेरिकेने अस्पृश्यासारखेच वागविले . इतके कीं एका पत्रकार परिषदेत धाकल्या बुशसाहेबांना त्यांचे नांवही आठवले नाहीं.[१] पण ९/११च्या हल्ल्यानंतर मात्र ते रातो-रात War on terror मधले बुशसाहेबांचे लाडके मित्रच बनले! पण त्यांची उपयुक्तता संपल्याबरोबर त्यांच्यामागेही अमेरिकेने लोकशाही आणण्याचा तगादा लावला. त्यांच्यावर बेनझीर अक्षरशः लादली. पण तिची हत्त्या झाल्यावर जेंव्हां निवडणुकीत मुशर्रफ यांचे पानीपत झाले तेंव्हां मुशर्रफनाही वार्यावर सोडले. आता (सत्तेवरून हाकलल्या गेलेल्या पाकिस्तानच्या इतर प्रधानमंत्र्यांप्रमाणे (राष्ट्राध्यक्षांप्रमाणे) मुशर्रफसाहेब सध्या लंडनमध्ये स्वघोषित हद्दपारीची मजा लुटत आहेत.)
अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे इजिप्तच्या मुबारक यांचे. अन्वर सादात यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलला मान्यता देणारे इजिप्त हे मध्यपूर्वेतील पहिले राष्ट्र होते. सादात यांची हत्त्या झाल्यावर इजिप्तच्या 'योम किपुर' युद्धात हवाई दलात खूप पराक्रम गाजविलेले आणि सुप्रसिद्ध फायटर पायलट असलेले मुबारक त्यांच्या जागी आले. आजवर इस्रायलशी मैत्रीचा करार केलेले व न लढणारेही इजिप्त हे पहिले राष्ट्र होते. अमेरिकेने आर्थिक व लष्करी मदतीचा इजिप्तमध्ये ओघ चालू ठेवला होता. पण मुबारक यांची लोकप्रियता घटल्याबरोबर अमेरिकेने त्यांनाही राजकीय सुधारणा करण्याचे बोधामृत पाजण्यास सुरुवात केली. नव्या राजवटीलाही अमेरिकेचा जो संदेश गेला त्यात पूर्वीचे सर्व करार (म्हणजे इस्रायल बरोबरचा मैत्रीचा करार) नव्या सरकारने बदलू नयेत अशी अटही घातली. आता तर मुबारकही गादीवरून दूर फेकले गेले.
सध्या अमेरिकेने तेच टुमणे बहारीनच्या राजांच्यामागे लावले आहे. येमेनमध्येही तेच होईल अशी लक्षणे दिसत आहेत. मग शेवटी अमेरिकेशी मैत्रीचा करार कोण करेल?
उत्तर आहे कीं गमतीने अमेरिकेचेच ५१वे व ५२वे राज्य समजण्यात येणारी इंग्लंड आणि इस्रायल हीच ती दोन राष्ट्रे होत!
मैत्रीचा हात पुढे करण्याच्या आधी या सर्व इतिहासाचा भारत सरकारने विचार करावा. मैत्री जरूर करावी पण अमेरिका हे राष्ट्र "न इनकी दोस्ती अच्छी ना इनकी दुष्मनी अच्छी" या वर्गात मोडते. तेंव्हा हस्तांदोलन जरूर करावे पण हस्तांदोलन करून हात मागे घेतल्यावर प्रत्येक वेळी आपली पाची बोटे जागेवर आहेत ना याची पक्की खात्री करून घ्यावी!
दोस्ती करावी पण डोळे उघडे ठेवून!
______________________
टीप:
[१] याबद्दल अधीक माहिती माझ्या "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकाच्या संक्षिप्त केलेल्या मराठी अनुवादावर आधारित ई-सकाळवरील मालिकेत वाचायला मिळेल.
वाचने
41647
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचनिय
.
विचार समजला पण....
विकास तुझ्या मुद्यांशी
In reply to विचार समजला पण.... by विकास
सहमत...
In reply to विकास तुझ्या मुद्यांशी by निनाद मुक्काम …
सर्वप्रथम एक जुनी आणि अशा
In reply to विचार समजला पण.... by विकास
इंग्लडचे परराष्ट्रीय धोरण
In reply to विचार समजला पण.... by विकास
विश्वास
टोकाचे
In reply to विश्वास by आंसमा शख्स
लेख
आपल्या मुद्द्याची नोंद घेतली आहे. तो पटलाही.
In reply to लेख by आंसमा शख्स
विकास आणि निनाद यांच्याशी
>>हस्तांदोलन जरूर करावे पण
आर्थिक भक्कमपणा...!
ह्म्म्म
हिंदुस्थान ही महासत्ता आहे हा
मागच्या वेळी विंध्यगिरी
In reply to हिंदुस्थान ही महासत्ता आहे हा by मदनबाण
नौदलाला झालेले अपघात
In reply to मागच्या वेळी विंध्यगिरी by मदनबाण
.
In reply to नौदलाला झालेले अपघात by मदनबाण
दुर्घटनाग्रस्त
In reply to नौदलाला झालेले अपघात by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- INS Betwa slippage: Never seen anything like this, negligence likely cause says naval communityजपान मधे असलेले अमेरिकेचे
In reply to हिंदुस्थान ही महासत्ता आहे हा by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- INS Betwa slippage: Never seen anything like this, negligence likely cause says naval communityअमेरीकेच्या या चतुरपणामागे एक
मेक्सिको आणि पर्ल हारबर
In reply to अमेरीकेच्या या चतुरपणामागे एक by विजुभाऊ
नाही
अमेरिका - अविश्वासार्ह मित्र
मदन बाण ह्यांचे विशेष आभारमी
इतिहास
आले का नेहरूद्वेष्टे
In reply to इतिहास by हुप्प्या
"गरजेवर आधारलेल्या मैत्रीला
भारत परावलंबी नाही
लोकशाहीच्या चौकटीत राहून परस्पर सहाय्यासाठी मैत्री जरूर करावी
In reply to भारत परावलंबी नाही by शेखर काळे
ज्या कोणाला भारतीय
=)) =)) =)) =)) बोलके
In reply to ज्या कोणाला भारतीय by परिकथेतील राजकुमार
हा प्रतिसाद वाचून दु:ख तर झालेच पण आश्चर्यही वाटले!
In reply to ज्या कोणाला भारतीय by परिकथेतील राजकुमार
परीकथेतील राजकुमार, हा
In reply to हा प्रतिसाद वाचून दु:ख तर झालेच पण आश्चर्यही वाटले! by सुधीर काळे
पण नेम चुकल्यासारखे वाटले!
In reply to परीकथेतील राजकुमार, हा by परिकथेतील राजकुमार
ही चर्चा चालू राहीली पाहिजे
@ते वैयक्तिक पातळीवर न उतरता
मूळ विषया पासुन जरासे अवांतर
In reply to @ते वैयक्तिक पातळीवर न उतरता by निनाद मुक्काम …
पाकड्यांचे चीनपुरस्कॄत
In reply to मूळ विषया पासुन जरासे अवांतर by मदनबाण
छ्या! तुम्ही मिपावर काय
In reply to पाकड्यांचे चीनपुरस्कॄत by मदनबाण
पाकड्यांचे चीनपुरस्कॄत
In reply to छ्या! तुम्ही मिपावर काय by ऋषिकेश
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- चिनी त्रिकोणाचे गणितचीनने नेपाळमध्ये फुटीरतावादी
In reply to पाकड्यांचे चीनपुरस्कॄत by मदनबाण
हे उच्चवर्णीय....हे आंबेडकरी
In reply to चीनने नेपाळमध्ये फुटीरतावादी by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- चिनी त्रिकोणाचे गणितआपल्या देशातल्या पगारी
In reply to हे उच्चवर्णीय....हे आंबेडकरी by मदनबाण
पण या सगळ्यत पाकिस्तानची
In reply to हे उच्चवर्णीय....हे आंबेडकरी by मदनबाण
पाकड्यांचे चीनपुरस्कॄत
In reply to हे उच्चवर्णीय....हे आंबेडकरी by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गुलाबो... जरा इत्र गिरादो... ;) :- Shaandaarग्वादर अपडेट...
In reply to पाकड्यांचे चीनपुरस्कॄत by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मंत्रभूमीची बदलणारी ओळखखरी प्रेरणा मिळाली विकास-जींच्या प्रतिसादावरून!
काका तुमचा गैरसमज दूर झाला हे
काल ’सकाळ’वर माझ्या या लेखाची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली
आपण ( म्हणजे आपण सगळेच मिपाकर
मिपावरचे गुंड संपादक अशा
In reply to आपण ( म्हणजे आपण सगळेच मिपाकर by प्रसाद१९७१
भिकार नाही हो भिकारचोट आहे
In reply to मिपावरचे गुंड संपादक अशा by बॅटमॅन
उत्तम - आता माझे मत देतो.
In reply to मिपावरचे गुंड संपादक अशा by बॅटमॅन
भारतात कमीतकमी ५०-१०० लष्करी
In reply to उत्तम - आता माझे मत देतो. by प्रसाद१९७१
अतिशय गंभीरपणे आणि मनापासुन
In reply to भारतात कमीतकमी ५०-१०० लष्करी by मृत्युन्जय
काल ’सकाळ’वर माझ्या या लेखाची
आयला कोणी विचारत नाही म्हणुन
In reply to काल ’सकाळ’वर माझ्या या लेखाची by प्रसाद१९७१
अमेरिका हे अत्यंत चांगले आणि
In reply to आयला कोणी विचारत नाही म्हणुन by मृत्युन्जय
सहमत
तो प्रोब्लेम पाकिस्तान आणि
In reply to सहमत by वेताळ
अतिशय गंभीरपणे आणि मनापासुन
धन्य तुमची
In reply to अतिशय गंभीरपणे आणि मनापासुन by प्रसाद१९७१
अमेरिका भारताच्या
In reply to धन्य तुमची by पुण्याचे वटवाघूळ
काय सांगता राव
In reply to अमेरिका भारताच्या by प्रसाद१९७१
तळ कशाकरता हे मी दिलेच आहे
In reply to काय सांगता राव by पुण्याचे वटवाघूळ
उत्तम
In reply to तळ कशाकरता हे मी दिलेच आहे by प्रसाद१९७१
ज्याला पूर्ण युद्ध ( full
In reply to उत्तम by पुण्याचे वटवाघूळ
अमेरिकेचे सैन्य भारतात घेऊन परिस्थिती कशी बदलेल?
In reply to ज्याला पूर्ण युद्ध ( full by प्रसाद१९७१
इतर देशांचे सैनिक अथवा नाविक
मुर्खाला नोकर ठेवण्या पेक्षा
In reply to इतर देशांचे सैनिक अथवा नाविक by मदनबाण
माझा ५० वर रुमाल
काय बोलणार?
परराष्ट्रीय धोरण
भारताच्या नेव्ही पेक्षा चीन
तेच कोको आयलंड जे कधी काळी
In reply to भारताच्या नेव्ही पेक्षा चीन by मदनबाण
हे नवीनच कळतंय. या विद्वान
In reply to तेच कोको आयलंड जे कधी काळी by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walshकारगिल युद्धाच्यावेळी
ह्याला युद्ध म्हणणे बरोबर
काय ठरलं मग?
काय ठरलं मग?
कळवतो!
In reply to काय ठरलं मग? by नाना चेंगट
विश्वासार्ह मित्रराष्ट्र ही
हेच म्हणायला आलो होतो.
In reply to विश्वासार्ह मित्रराष्ट्र ही by शैलेंद्रसिंह
कोणी कोणाचाच मित्र नसतो
अमेरिका मैत्रीचा आव आणत असेल