सण आणि आपण
गौरी/ महालक्ष्मी चा सण येताहेत..
महाराष्ट्रात याचे फार महत्त्व.स्त्रीयांसाठी विशेष.
हा एक प्रकारचा कुलाचार, कुलधर्म. तीन दिवसाचा.
पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरी/महालक्ष्मी चे
आगमन व प्रतिष्ठापना असते.दुसरेदिवशी मुख्य पूजा व महा नैवेद्य .तिसरे व शेवटचे दिवशी निर्गमन. पुन्हा पुढील वर्षी येण्यासाठी.
भारतीय संस्कृती मधे बहुतेक सणामागील हेतू मानवाचे निसर्गाशी असलेले नाते दृढ व्हावे,त्याची कृपा सदैव आपल्या वर राहावी,'त्याच्या' प्रति कृतज्ञता व्यक्त करावी हाच आहे असे म्हटले जाते.