राजयोग-१८
***
***
सेकंदाला हजारो मैल इतक्या झंझावाती वेगाने ब्रह्मांडातून भरारी मारताना कॅप्टन विजयच्या मनात त्याने मिळवलेल्या दैदिप्यमान विजयांच्या सुखद स्मृती क्षणभर डोकावून गेल्या. लढाईच्या सहाव्या टप्प्यात दुष्मनाला लालूच दाखवत विस्तीर्ण पर्वतरांगांच्या कड्याकपारींमधे अडकवून त्यांच्यावर तोफगोळ्यांचा जोरदार भडिमार करताना दाखवलेली अफलातून कल्पकता! त्या दिवशी त्याला एका पाठोपाठ एक अशी तीन शौर्यपदके मिळालेली होती. पुढे मोजून तीन दिवसात ३१ डिसेंबरच्या त्या अविस्मरणीय रात्री कॅप्टन विजय कुमार या जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा ठरलेला होता.
The Tell-Tale Heart by Edgar Allan Poe
हे अगदी खरंय की मी तेव्हा अतिशय निराश होतो. आताही आहे म्हणा तसा. पण केवळ तेव्हढ्यामुळे तुम्ही काय मला वेडा म्हणणार आहात का? खरं सांगायचं तर या आजारपणामुळे माझी पंचेद्रियं निकामी वा कमजोर न होता अधिकच कार्यक्षम झाली आहेत. त्यापैकी सगळ्यांत सुधारली ती श्रवणशक्ती. मी आता या पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्यादेखील सर्व गोष्टी ऐकू शकतो. इतकंच काय मला नरकातल्यासुध्दा अनेक गोष्टी ऐकू येतात. तरी मी वेडा म्हणे! आता हेच बघा ना, किती शांततेने, चित्त थार्यावर ठेवून मी ही गोष्ट तुम्हाला सांगणाराय ते!
शवविच्छेदन...... भाग - १
शवविच्छेदन...... भाग - २
....ती दुपार अशीच गेली. संध्याकाळी पाटलांनी - त्या माणसाचे नाव रवि पाटील होते, त्या दोघांना हॉटेलमधे जंगी मेजवानी दिली. गंमत म्हणजे मद्यपान, जेवण झाल्यावर पाटलांनी डॉ. मानकाम्यांना हॉटेलचे बील चुकते करायला सांगितले. ते बाहेर पडले तेव्हा बराच उशीर झाला होता. पाटील जवळजवळ झिंगले होते आणि डॉ. मानकामे बील भरायला लागल्यामुळे चडफडत दात ओठ खात होता.
प्रिय ओंकार,
जिथे असशील तेथे तू आनंदात असशील याची मला खात्री आहे... मी शक्यतो कोणाला अरे तुरे करत नाही पण आपल्यात जो काही पत्रव्यवहार झाला फ्रॅन्झ काफ्काबद्दल, त्याचा धागा धरुन तुला एकेरी हाक मारतोय. (अणि शिवाय वाढलेल्या वयाचा थोडास गैरफायदाही घेतोय !) तुझ्यासाठी एक युद्धकथाच लिहायचे मनात होते पण सध्या Caliphateचा इतिहास लिहित असल्यामुळे त्यात व्यस्त आहे. तुलाही हे सांगितले होतेच... असो पण ही एक छोटी कथा तुझ्यासाठी लिहित आहे.... तुला आवडेल अशी आशा आहे... पुढेमागे एक युद्धकथाही लिहिनच..
आपला,
जयंत कुलकर्णी
शवविच्छेदन
प्रस्तावना: एपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच "माध्यमांतर" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे!!
गोव्यांत External Affairs मिनिस्ट्री ह्या शब्दाचे भाषांतर भायल्या भानगडीचो मंत्री असे केले जाते. विनोद सोडून द्या. मिपा वर हार प्रकारच्या विषयावर लोक धुळवड उडवत असतात. काही दिवस आधी मी एक परिसंवाद ऐकायला गेले होते तिथे एक महिला "affairs expert" म्हणून अली होती आणि तिने त्या विषयावर पुस्तक सुद्धा लिहिले होते.
लग्नाचे बंधन नसल्याने ह्या विषयावर माझी माहिती शून्य होती म्हणून मी जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भांत मिपा वरील जाणकार आणि एक्स्पर्ट लोकांसाठी काही प्रश्न . (अर्थानं आमच्या मित्राचे असे झाले हो ... म्हणून सुद्धा तुम्ही ऐकीव गोष्टी इथे चिकटवू शकता)